Maasir-i-Alamgiri (Marathi)
 9789354069086

Table of contents :
अनुक्रमणिका
ऋणनिर्देश
प्रस्तावना
जदुनाथ सरकार यांची प्रस्तावना
नकाशांची सूची
चित्र सूची
अध्याय १
उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते
पहिले मंचकारोहण
दाराच्या मागावर
खाजवा येथे शुजाशी युद्ध
दाराचा पाठलाग चालूच
दाराशी दुसरे युद्ध आणि त्याचे पलायन
अध्याय २
दुसरा राज्याभिषेक, मे १६५९
दारा शुकोहचे दैव
अध्याय ३
१ मे १६६० ते १९ एप्रिल १६६१
अध्याय ४
२० एप्रिल १६६१ ते ९ एप्रिल १६६२
कूचबिहार व आसाम वरील आक्रमणाचा वृतांत
अध्याय ५
१० एप्रिल १६६२ ते २९ मार्च १६६३
आसाम प्रकरणाचा निष्कर्ष
अध्याय ६
३० मार्च १६६३ ते १७ मार्च १६६४
अध्याय ७
१८ मार्च १६६४ ते ७ मार्च १६६५
अध्याय ८
८ मार्च १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६
अध्याय ९
२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७
अध्याय १०
१५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८
युसुफझाय अफघाणांनी केलेली गडबड
अध्याय ११
मूळ लेखकाची प्रस्तावना
४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९
अध्याय १२
२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०
बसऱ्याचा पूर्व प्रांतप्रमुख हुसैन पाशा याचे आगमन
बंडखोरांचा पराभव करण्यासाठी बादशाहाचा आग्र्याला प्रवास
अध्याय १३
१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१
अध्याय १४
२ जानेवारी ते २१ डिसेंबर १६७१
बादशाहाचा आग्र्याहून दिल्लीला प्रवास
अध्याय १५
२२ डिसेंबर १६७१ ते १० डिसेंबर १६७२
मुहम्मद अकबर व सलीमा बानू बेगम यांचा विवाह
अध्याय १६
११ डिसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३
अध्याय १७
३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४
शुजाअत खानाचा मृत्यू व बादशाहा हसन आब्दाल ला जातो
अध्याय १८
१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५
अध्याय १९
९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६
बादशहा हसन अब्दालहून दिल्लीला परततो
बादशाहा लाहोरहून दिल्लीला परततो
अध्याय २०
२८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७
पादशाहजादा मुहम्मद सुलतानाचा मृत्यू
अध्याय २१
१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८
अध्याय २२
७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टेंबर १६७९
बादशाहाचा पहिला अजमेर प्रवास
बादशाहा दुसर्‍यांदा अजमेरला जातो
अध्याय २३
२६ सप्टेंबर १६७९ ते १४ सप्टेंबर १६८०
बादशाहाचे अजमेरहून उदयपूरकडे कूच
मुहम्मद आजमची बंगालहून वेगवान चाल
बादशाहा उदयपूरहून अजमेरला परततो
अध्याय २४
१५ सप्टेंबर १६८० ते ३ सप्टेंबर १६८१
पादशाहजादा मुहम्मद अकबर याचे बंड
संभा तसेच विजापूर व हैदराबादच्या राजांचे निर्मूलन करण्यासाठी मुहम्मद आजमला सैन्यासह पाठवले जाते – मुहम्मद अकबर याचा अजमेरहून दख्खन पर्यंत पाठलाग – आजमला शाह उपाधी दिली जाते
अध्याय २५
४ सप्टेंबर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२
बादशाहाचे अजमेरहून बऱ्हाणपूरला कूच
बादशाहाचे बऱ्हाणपूरहून औरंगाबादकडे कूच
अध्याय २६
२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३
अध्याय २७
१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४
बादशाहा औरंगाबादहून अहमदनगरकडे कूच करतो
अध्याय २८
२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५
बख्तावर खानाचा मृत्यू
नाजिर दरबार खान याचा मृत्यू
अहमदनगर किल्ल्याचे वर्णन
बादशाहाचे अहमदनगरहून सोलापूरास कूच
अबुल हसनच्या विरोधात शाह आलम बहादुरच्या हाताखाली सैन्य पाठवले जाते
अध्याय २९
२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६
शाह आलम बहादुर याचा हैदराबादवर विजय
विजापूरचा किल्ला घेण्यासाठी बादशाहाचे सोलापूरहून कूच
अध्याय ३०
१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७
बादशाहा विजापूरहून सोलापूरला परत येतो
बादशाहा सोलापूरहून हैदराबादकडे कूच करतो
पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला अटक
अध्याय ३१
१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८
गोळकोंडा किल्ला घेतला
सागर प्रांतावर विजय
बादशाहा हैदराबादहून विजापूरला परततो
अध्याय ३२
२० जून १६८८ ते ८ जून १६८९
भयंकर महामारी - बादशाहाचे विजापूरहून संभाच्या देशात कूच
नीच संभाला अटक व मृत्यूदंड देऊन नरकात प्रवेश
अध्याय ३३
९ जून १६८९ ते २८ मे १६९०
रायचूरचा विजय
अध्याय ३४
२९ मे १६९० ते १८ मे १६९१
आसद खान कृष्णेच्या पलीकडे जातो
अध्याय ३५
१९ मे १६९१ ते ६ मे १६९२
पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याची सुटका
अध्याय ३६
७ मे १६९२ ते २५ एप्रिल १६९३
शाहजादा मुहम्मद अजीमुद्दीन याचा विवाह
अध्याय ३७
२६ एप्रिल १६९३ ते १५ एप्रिल १६९४
काम बक्ष चे दुखद वर्तन
आलीजाह आजम दरबारास येतो
अध्याय ३८
१६ एप्रिल १६९४ ते ४ एप्रिल १६९५
अध्याय ३९
५ एप्रिल १६९५ ते २४ मार्च १६९६
बादशाहाचे विजापूरहून ब्रह्मपुरीला कूच नामांतर करून इस्लामपुरी (१६९५)
कासिम खान बहादुर व खानाहजाद खानावर जी आपत्ती कोसळली त्याचा संक्षिप्त वृतांत
हिम्मत खानाचा मृत्यू
अध्याय ४०
२५ मार्च १६९६ ते १३ मार्च १६९७
अध्याय ४१
१४ मार्च १६९७ ते २ मार्च १६९८
भीमेचा महापूर
अध्याय ४२
३ मार्च १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९
ख्वाजा याकुत बाणाने जखमी होतो
अध्याय ४३
२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००
काफिरांचे किल्ले घेण्यासाठी बादशाहाचे कूच
साताऱ्याचा विजय
अध्याय ४४
१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१
परळी किल्ल्याचा विजय
बादशाही सैन्याचे भूषणगडाकडे कूच
पन्हाळा घेण्यासाठी बादशाहाचे कूच
अध्याय ४५
२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२
इनायतुल्लाह खान तान व खालशाचा दिवाण होतो
खेळण्याचा विजय व इतर घटना
अध्याय ४६
१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३
अध्याय ४७
८ जानेवारी १७०३ ते २७ डिसेंबर १७०३
अध्याय ४८
२८ डिसेंबर १७०३ ते १६ डिसेंबर १७०४
वागीनगेराच्या विजयासाठी कूच
अध्याय ४९
१७ डिसेंबर १७०४ ते ५ डिसेंबर १७०५
बादशाही छावणी देवापूरला पडते
बादशाहाच्या आजाराचा वृतांत
अध्याय ५०
६ डिसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६
अध्याय ५१
२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७
बादशाहाचा मृत्यू
या परिपूर्ण राज्यकर्त्याचे पावन चरित्र
या पुण्यवान बादशाहाच्या अपत्यांचा वृतांत
बादशाहाची मुले
बादशाहाच्या मुली
परिशिष्टे
बादशाहाचा प्रवास
स्थानांची बदललेली नावे
मराठे किंवा दख्खनशी संबंधित उल्लेख
धर्माशी संबंधित काही ठळक घटना
राजघराण्यातील जन्म, मृत्यू व धार्मिक विधी
फार्सी शब्दसूची
नकाशातील स्थळांची सूची
संदर्भ सूची

Citation preview

‫مآث ِر عالمگيري‬ मआसिर-ए-आलमगीरी

बादशाहा औरंगजेब आलमगीर याचा अधिकृत इततहास (राजवट इसवी सन १६५८ ते १७०७)

साक़ी मुस्तैद खान

मराठी अनुवाद

रोतहत सहस्रबुद्धे २०२०

मआसिर-ए-आलमगीरी अनुवाद - रोतहत सहस्रबुद्धे प्रकाशक marathaempire.in [email protected] ISBN - 978-93-5406-908-6

प्रथम आवृत्ती ऑगस्ट २०२० मुखपृष्ठावरील चित्र The Metropolitian Museum of Art, New York, USA

यांच्या संकेतस्थळावरून साभार मुखपृष्ठ व मलपृष्ठ रोतहत सहस्रबुद्धे पुस्तकातील चित्र या िंग्रहालयांच्या िंकेतस्थळावरून िाभार The Metropolitian Museum of Art (MET), New York, USA Bibliothèque nationale de France (BnF), Paris, France

पुस्तकातील नकाशे िाभार Google Earth Pro, Google LLC, USA © या पुस्तकािे िवव अचिकार अनुवादकाच्या स्वािीन आहेत

अनुवादकाच्या ललखखत अनुमती लशवाय, या पुस्तकाचे ककिंवा यातील कुठल्याही भागाचे, छापील, संगणक़ीय ककिंवा इतर कुठले ही माध्यम वापरून, मुद्रण करणे, प्रत बनवणे ककिंवा त्याचा प्रसार करणे अवैि आहे.

अपवणपत्रत्रका औरंगजेबास पदोपदी िूळ चारणारे छत्रपती लशवाजी महाराज आणण या िममयुद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती दे णारे िममवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पतवत्र स्मृतीस

अनुक्रमणणका ऋणतनदे श...........................................................................................................९ प्रस्तावना ..........................................................................................................११ जदुनाथ सरकार यांची प्रस्तावना .............................................................................१५ नकाशांची सूची ..................................................................................................२२ धचत्र सूची ..........................................................................................................२३ अध्याय १ – उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते ...............................................................२४ पतहले मंचकारोहण ............................................................................२९ दाराच्या मागावर ...............................................................................२९ खाजवा येथे शूजाशी युद्ध ....................................................................३३ दाराचा पाठलाग चालू च ......................................................................३४ दाराशी दुसरे युद्ध आणण त्याचे पलायन ...................................................३७ अध्याय २ – दुसरा राज्याणभषेक, मे १६५९................................................................४० दारा शुकोहचे दै व ..............................................................................४३ अध्याय ३ - १ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१ .............................................................४९ अध्याय ४ - २० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२ .......................................................५३ कूचतबहार व आसाम वरील आक्रमणाचा वृतांत ........................................५६ अध्याय ५ - १० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३ .......................................................५८ आसाम प्रकरणाचा तनष्कषम..................................................................५९ अध्याय ६ - ३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४ ..........................................................६२ अध्याय ७ - १८ माचम १६६४ ते ७ माचम १६६५ ............................................................६६ अध्याय ८ - ८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६ .......................................................६८ अध्याय ९ - २५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७ ................................................७४ अध्याय १० - १५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८ ................................................८० अध्याय ११ - मूळ ले खकाची प्रस्तावना ....................................................................८५ ४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९ ...............................................८७ अध्याय १२ - २३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७० ............................................९४ बसऱ्याचा पूवम प्रांतप्रमुख हुसैन पाशा याचे आगमन ...................................९७ बंडखोरांचा पराभव करण्यासाठी बादशाहाचा आग्र्याला प्रवास .................. १०० अध्याय १३ - १३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१ ............................................ १०४ अध्याय १४ - २ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१ ...................................................... ११२ बादशाहाचा आग्र्याहून ददल्लीला प्रवास ............................................... ११५

अध्याय १५ - २२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२ ............................................. ११७ मुहम्मद अकबर व सलीमा बानू बेगम यांचा तववाह ................................. ११९ अध्याय १६ - ११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३ ............................................ १२२ अध्याय १७ - ३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४ ........................................... १२७ शुजाअत खानाचा मृत्यू व बादशाहा हसन आब्दाल ला जातो .................... १२७ अध्याय १८ - १९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५ .............................................. १३३ अध्याय १९ - ९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६ ........................................... १४० बादशहा हसन अब्दालहून ददल्लीला परततो ......................................... १४० बादशाहा लाहोरहून ददल्लीला परततो .................................................. १४४ अध्याय २० - २८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७ ....................................... १४६ पादशाहजादा मुहम्मद सुलतानाचा मृत्यू ............................................... १४८ अध्याय २१ - १८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८ ......................................... १५१ अध्याय २२ - ७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९ ............................................ १५८ बादशाहाचा पतहला अजमेर प्रवास ..................................................... १६० बादशाहा दुसऱ्यांदा अजमेरला जातो................................................... १६६ अध्याय २३ - २६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८० ............................................. १६७ बादशाहाचे अजमेरहून उदयपूरकडे कूच .............................................. १६७ मुहम्मद आजमची बंगालहून वेगवान चाल ............................................ १६८ बादशाहा उदयपूरहून अजमेरला परततो ............................................... १७३ अध्याय २४ - १५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१ ............................................... १७८ पादशाहजादा मुहम्मद अकबर याचे बंड ............................................... १७९ संभा तसेच तवजापूर व हैदराबादच्या राजांचे तनमूमलन .............................. १९० अध्याय २५ - ४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२ ............................................... १९१ बादशाहाचे अजमेरहून बऱ्हाणपूरला कूच ............................................. १९१ बादशाहाचे बऱ्हाणपूरहून औरंगाबादकडे कूच ....................................... १९४ अध्याय २६ - २४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३ ............................................. १९८ अध्याय २७ - १४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४ ............................................... २०६ बादशाहा औरंगाबादहून अहमदनगरकडे कूच करतो ............................... २०८ अध्याय २८ - २ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५ ................................................... २१३ बख्तावर खानाचा मृत्यू .................................................................... २१८ नाजजर दरबार खान याचा मृत्यू .......................................................... २१९ अहमदनगर तकल्ल्याचे वणमन ............................................................ २२० बादशाहाचे अहमदनगरहून सोलापूरास कूच .......................................... २२२ अबुल हसनच्या तवरोिात शाह आलम बहादुर ....................................... २२३

अध्याय २९ - २२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६ ..................................................... २२५ शाह आलम बहादुर याचा हैदराबादवर तवजय........................................ २२८ तवजापूरचा तकल्ला घेण्यासाठी बादशाहाचे सोलापूरहून कूच ..................... २३६ अध्याय ३० - १२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७...................................................... २३८ बादशाहा तवजापूरहून सोलापूरला परत येतो.......................................... २४१ बादशाहा सोलापूरहून हैदराबादकडे कूच करतो ..................................... २४२ पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला अटक........................................ २४८ अध्याय ३१ - १ जुलै १६८७ ते १९ जून १६८८ ........................................................ २५२ गोळकोंडा तकल्ला घेतला ................................................................. २५२ सागर प्रांतावर तवजय ...................................................................... २५५ बादशाहा हैदराबादहून तवजापूरला परततो ............................................ २५७ अध्याय ३२ - २० जून १६८८ ते ८ जून १६८९ ........................................................ २५९ भयंकर महामारी - बादशाहाचे तवजापूरहून संभाच्या दे शात कूच ................ २६२ नीच संभाला अटक व मृत्यूदंड दे ऊन नरकात प्रवेश ................................ २६४ अध्याय ३३ - ९ जून १६८९ ते २८ मे १६९० ........................................................... २७२ रायचूरचा तवजय ............................................................................ २७४ अध्याय ३४ - २९ मे १६९० ते १८ मे १६९१ ........................................................... २७७ आसद खान कृष्णेच्या पलीकडे जातो ................................................. २७७ अध्याय ३५ - १९ मे १६९१ ते ६ मे १६९२ ............................................................. २७९ पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याची सुटका ....................................... २८० अध्याय ३६ - ७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३ ........................................................ २८४ अध्याय ३७ - २६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४ ................................................ २८९ काम बक्ष चे दुखद वतमन ................................................................... २८९ आलीजाह आजम दरबारास येतो ....................................................... २९३ अध्याय ३८ - १६ एतप्रल १६९४ ते ४ एतप्रल १६९५ .................................................. २९९ अध्याय ३९ - ५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६ .................................................... ३०२ बादशाहाचे तवजापूरहून ब्रह्मपुरीला कूच ............................................... ३०४ कालसम खान बहादुर व खानाहजाद खानावर ........................................ ३०५ तहम्मत खानाचा मृत्यू ....................................................................... ३०८ अध्याय ४० - २५ माचम १६९६ ते १३ माचम १६९७..................................................... ३०९ अध्याय ४१ - १४ माचम १६९७ ते २ माचम १६९८ ....................................................... ३१२ भीमेचा महापूर .............................................................................. ३१४ अध्याय ४२ - ३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९ .................................................. ३१७ ख्वाजा याकुत बाणाने जखमी होतो .................................................... ३२०

अध्याय ४३ - २१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७०० ............................................. ३२४ कातफरांचे तकल्ले घेण्यासाठी बादशाहाचे कूच ....................................... ३२७ साताऱ्याचा तवजय.......................................................................... ३३० अध्याय ४४ - १० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१ .......................................... ३३७ परळी तकल्ल्याचा तवजय .................................................................. ३३७ बादशाही सैन्याचे भूषणगडाकडे कूच .................................................. ३३९ पन्हाळा घेण्यासाठी बादशाहाचे कूच ................................................... ३४३ अध्याय ४५ - २९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२ ......................................... ३४४ इनायतुल्लाह खान तान व खालशाचा ददवाण होतो ................................. ३४९ खेळण्याचा तवजय व इतर घटना ........................................................ ३५० अध्याय ४६ - १९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३ ........................................... ३५३ अध्याय ४७ - ८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३ ............................................. ३६३ अध्याय ४८ - २८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४ ............................................. ३७१ वागीनगेराच्या तवजयासाठी कूच ......................................................... ३७६ अध्याय ४९ - १७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५ ............................................... ३७८ बादशाही छावणी दे वापूरला पडते ...................................................... ३८८ बादशाहाच्या आजाराचा वृतांत .......................................................... ३८९ अध्याय ५० - ६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६ .............................................. ३९१ अध्याय ५१ - २६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७ ........................................... ३९६ बादशाहाचा मृत्यू ............................................................................ ३९६ या पररपूणम राज्यकत्यामचे पावन चररत्र .................................................. ४०० या पुण्यवान बादशाहाच्या अपत्यांचा वृतांत .......................................... ४०६ बादशाहाची मुले ............................................................................ ४०६ बादशाहाच्या मुली .......................................................................... ४१० पररलशष्टे ......................................................................................................... ४१२ बादशाहाचा प्रवास .......................................................................... ४१२ स्थानांची बदलले ली नावे .................................................................. ४१८ मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख ............................................... ४२० िमामशी संबंधित काही ठळक घटना .................................................... ४२६ राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी ......................................... ४३१ फासी शब्दसूची ............................................................................. ४३६ नकाशातील स्थळांची सूची ............................................................... ४५२ संदभम सूची ................................................................................... ४५५



मआलसर-ए-आलमगीरी

ऋणत्रनदे श या उपक्रमात मला अनेकांची मदत लाभली, पण इततहासकार श्री गजानन भास्कर मेहद ें ळे यांचे, या पुस्तकाच्या तनधमत्ताने माझ्यावर मोठे ऋण आहे. फासी लशकण्यासाठी प्रोत्साहन दे ण्यापासून ते पुस्तकाच्या प्रकाशनापयंत लाभले ल्या त्यांच्या प्रेरणादायी पाठठिंब्यालशवाय हे काम अशक्य होते. सािारण अडीच वषांपूवी हे काम प्रथम हातात घेतले होते त्या सुमारास, भारत इततहास संशोिक मंडळात प्राथधमक फासीचा वगम सुरू झाला होता. दुदै वाने तेव्हा मला तो पूणम करता आला नाही व नंतर काही कारणास्तव या कामात ही खंड पडला. या वषी पुन्हा एकदा मंडळाने फासीचा वगम सुरू केल्यामुळे या कामाबरोबर, फासी लशकण्याच्या प्रयत्नांना ही गती धमळाली. या वगाममुळे फासीचे गुरू श्री राजेन्द्र जोशी यांचे बहुमोल मागमदशमन लाभले . याबद्दल मंडळाचे व श्री राजेन्द्र जोशी सरांचे मी मनापासून आभार मानतो. अनेक वषांपासूनचे माझे धमत्र श्री पराग जोगळे कर, श्री लशरीष दे शपांडे व इततहास अभ्यासक श्री संददप परांजपे (आबा) यांनी मला वेळी अवेळी पडणाऱ्या प्रश्ांचे तनरसन अगदी आपुलक़ीने केले . इततहासाची गोडी तनमामण झाल्यावर लाभले ले पण अभ्यासात मात्र माझ्या खूप पुढे असले ले धमत्र - श्री अमोल बनकर, श्री तनखखल बेल्लारीकर, श्री अणभजीत मोतहरे, श्री पराग कपिंपळखरे - या सवांचे सहकायम लाभल्यामुळे हे काम पूणमत्वास नेता आले . हे माझे पतहले च पुस्तक असल्यामुळे प्रकाशन, ई-पुस्तक इत्यादी संबंधित प्रश्ांचे तनरसन केल्याबद्दल श्री अनीश गोखले यांचे ही आभार मानले पातहजेत. या पुस्तकाच्या संकल्पनेपासून ते प्रकाशनापयंत माझे धमत्र, इततहास अभ्यासक श्री सत्येन वेलणकर, यांचा मोठा वाटा आहे. स्वतःची नोकरी, घर, वाचन, ललखाण या सगळ्या गोष्टी सांभाळू न केवळ फासी लशकण्याच्या ध्यासापोटी उताऱ्यांचे वाचन करायला ते कायम उत्सुक असत. त्यांचे प्रोत्साहन व पाठठिंबा यामुळे आज हे पुस्तक वाचकांसमोर येत आहे असे म्हटल्यास जराही अततशयोक्त़ी होणार नाही.

मआलसर-ए-आलमगीरी

१०

त्याबरोबरच घरातल्या व जवळच्या सवांनीच, इतक़ी वषम माझे इततहासाचे वेड सहन केले , प्रोत्साहन ददले हे माझे सौभाग्य आहे. त्यातून धमळणारी ऊजामच आपल्याला काम करायचे बळ दे ते. या उपक्रमात इतरही अनेकांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत झाली पण तवस्तारभयास्तव सवांचा नामोल्ले ख करणे अवघड आहे. त्या सवांचे मी मनापासून आभार मानतो. जदुनाथ सरकार व त्यांच्यासारख्या इतर ददग्गज इततहासकारांनी, मूळ हस्तललखखतांचा अनुवाद करून अनेक ऐततहालसक ग्रंथांची कवाडे इततहास प्रेमी व अभ्यासकांसाठी खुली केली. या सवम इततहासकारांचे तर आपल्यावर कायमचे ऋण आहे. इततहासाने घडवले ल्या आपल्या आयुष्यावर अनेकांचे ऋण असते. वतममानात त्याचे भान ठे वणे मात्र आपल्या हाती आहे ! रोतहत सहस्रबुद्धे, पुण.े

११

मआलसर-ए-आलमगीरी

प्रस्तावना आिार ग्रंथ - सवमप्रथम, या अनुवादासाठी वापरले ल्या ग्रंथांची मातहती दे णे आवश्यक आहे. साक़ी मुस्तैद खान याने ललतहले ल्या मआलसर-ए-आलमगीरी या ग्रंथाचा, कलकत्त्याच्या रॉयल एलशयादटक सोसायटी ऑफ बंगाल यांनी सन १९४७ मध्ये प्रलसद्ध केले ला, ददवंगत इततहासकार श्री जदुनाथ सरकार यांचा इंग्रजी अनुवाद, आणण, त्याच संस्थेने तबब्ब्लयोलथका इंधडया माललका २२ यात, सन १८७१ मध्ये प्रलसद्ध केले ला, श्री आघा अहमद अली यांनी संपाददत केले ला मूळ ग्रंथाचा फासी पाठ, या दोन ग्रंथांवर हा अनुवाद आिाररत आहे. तसेच काही दठकाणी, सन १९०९ मध्ये प्रकालशत, श्री दे वीप्रसाद मुनशी यांनी ललतहले ल्या ‘औरंगजेबनामा’, या कहिंदी अनुवादाचा ही वापर केला आहे. यापुढे जजथे ‘फासी पाठ’ म्हटले आहे ततथे श्री आघा अहमद अली यांनी संपादन केले ल्या ग्रंथाकडे, जजथे ‘इंग्रजी अनुवाद’ म्हटले आहे ततथे श्री जदुनाथ सरकार यांच्या अनुवादाकडे तसेच जजथे ‘कहिंदी अनुवाद’ म्हटले आहे ततथे श्री दे वीप्रसाद मुनशी यांच्या अनुवादाकडे तनदे श केला आहे. इंग्रजी अनुवादातील काही शब्दांचा ककिंवा वाक्यांचा नेमका अथम स्पष्ट होत नसेल, ककिंवा त्यात काही महत्त्वाचे शब्द ककिंवा वाक्ये गाळली गेली असतील तर, फासी पाठाचा आिार घेऊन बदल केला आहे. ज्या दठकाणी काही महत्त्वाचे बदल केले असतील ततथे तशी तळटीप ददली आहे. या अनुवादासाठी जदुनाथ सरकार यांचा अनुवाद वापरला असल्याने त्यांच्या प्रस्तावनेचा अनुवाद ही इथे ददला आहे. पण या व्यततररक्त, दोन तीन कारणे आहेत ज्यामुळे त्यांची प्रस्तावना दे णे आवश्यक वाटले . एक म्हणजे फासी ग्रंथांची हस्तललखखते कुठू न धमळाली, फासी ग्रंथाचे स्वरूप काय आहे, त्यामागची प्रेरणा व पररब्स्थती इत्यादी गोष्टींचा तपशील त्यांनी त्यात ददला आहे. दुसरे म्हणजे मुघल बादशाहांचे नामे व अखबार यांचे महत्त्व, त्यातून आपल्याला कशा प्रकारची मातहती धमळते हे सुद्धा त्यांनी सोप्या शब्दात सांतगतले आहे. ततसरे व महत्त्वाचे म्हणजे, मूळ फासी ले खक साक़ी मुस्तैद खान याची थोडी मातहती व औरंगजेबावर असले ली त्याची तनतांत श्रद्धा याचाही त्यांनी उल्ले ख केला आहे.

मआलसर-ए-आलमगीरी

१२

कात्रिर म्हणजे नेमके काय ? - मआलसर-ए-आलमगीरी मध्ये ले खकाने वापरले ल्या काही तवलशष्ट फासी शब्दांचा अथम ‘फासी शब्दसूची’ या पररलशष्टात ददला आहे. तरी एका शब्दाची उकल इथे करून दे णे आवश्यक वाटते. मुघलांच्या शत्रूंना उद्दे शन ू यात अनेक तवशेषणे वापरली गेली आहेत. पैक़ी, ‘कातफर’ हे तवशेषण अगदी सढळपणे वापरले ददसते. फासी शब्दकोशानुसार याचा अथम जरी अप्रामाणणक, कृतघ्न, व्यणभचारी, िममकनिंदक, मूतीपूजक (स्टा. १००७, १०३८) असा असला तरी प्रत्यक्षात हा, मुसलमान नसले ल्या लोकांसाठी वापरले ला ददसतो. िमवशास्ता – औरंगजेबाचा राज्याणभषेक झाल्यानंतर लगेच त्याने इस्लामी चालीरीतींचे आचरण नीट होत आहे का नाही यावर लक्ष ठे वण्यासाठी एका व्यक्त़ीची नेमणूक केली. फासी पाठात त्याला ‘एहतसाब’ (‫ )احتساب‬म्हटले आहे. शब्दकोशात याचा अथम पोलीसांचा प्रमुख, तनयंता ककिंवा अनाचारावर आळा घालणे असा येतो (स्टा. २०, डं.फो. १९). इंग्रजी अनुवादात जदुनाथ सरकार याला ‘Censor’, म्हणजे तनयंता म्हणतात. फासी पाठात पृ.२८२ वर, एका व्यक्त़ीला काझी व दुसऱ्याला ‘एहतसाब’ म्हणून तनयुक्त केल्याचा उल्ले ख येतो. यावरून हे पद (ककिंवा त्याची अपेणक्षत कायमकक्षा) काझी पेक्षा वेगळे आहे हे लक्षात येते. दरबारासाठी, प्रांतासाठी तसेच सैन्याच्या छावणीत ही या पदाची तनयुक्त़ी केले ली आढळते. या सगळ्यावरून, या पदावर असले ल्या व्यलक्तकडे दरोग्यासारखे काही दं डाधिकार असावेत असे ददसते. त्यामुळे इथे याला िममशास्त्री ककिंवा िममगुरू न म्हणता िममशास्ता, म्हणजे िार्मिंक अनाचार करणाऱ्यांना शासन करणारा, म्हटले आहे. त्रवशेषनामे - फासी पाठातील व्यक्तींच्या नावांचे उल्ले ख शक्यतो आहेत तसे ठे वून त्यांना उद्दे शून वापरले ली तवशेषणे ही, आहेत तशीच, अनुवाद करून मांडली आहेत. मूळ ले खकाला त्यातून जे सांगायचे आहे त्यात बदल न करता, ते आहे तसे वाचकांसमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे. या उल्ले खातून, ककिंवा इततहासातील कोणत्याही व्यक्त़ीच्या उपािी-तवरतहत एकेरी उल्ले खातून, त्या व्यक्त़ी तवषयी अनादर व्यक्त करण्याचा ककिंवा कोणाच्या ही भावना दुखावण्याचा हेतू नाही. इततहासाबद्दल ललतहताना शक्य होईल तततके तटस्थपणे ले खन करणे आवश्यक असते. त्यामुळे वैयलक्तक भावना ककिंवा अस्स्मता बाजूला ठे वून ललखाण करण्याचा यत्न करणे क्रमप्राप्त आहे. यावर अधिक मातहतीसाठी इच्छु कांनी श्री ग.भा. मेहद ें ळे यांच्या श्री राजा

मआलसर-ए-आलमगीरी

१३

लशवछत्रपती, खंड १ मिील प्रस्तावनेचे पतहले दोन पररच्छे द अवश्य वाचावेत. यालशवाय, तवशेषनामांच्या अक्षरतवन्यासात सातत्य ठे वण्याचा प्रयास मी केला आहे पण एखाद्या दठकाणी नजरचुक़ीने त्यात त्रुटी रातहली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मनिब - अनेक दठकाणी मनसबींचा उल्ले ख येतो, त्यात जात व स्वार असे दोन आकडे असतात. त्यातील पतहला आकडा जात (श्रेणी) व दुसरा (कंसातील) आकडा स्वारांचा अशी पद्धत वापरली आहे. उदा. हजारी (२०० स्वार) म्हणजे एक हजार जात व २०० स्वार अशी मनसब आहे. यामध्ये स्वारांचा आकडा जातच्या आकड्यापेक्षा अधिक असत नाही असा तनयम आहे. पण या ग्रंथात असे अपवादात्मक उल्ले ख येतात. ते फासी हस्तललखखत ककिंवा पाठातील (चुक़ीच्या ?) उल्ले खांमुळे आले आहेत असे सध्या तरी म्हणावे लागते. यावर अधिक मातहतीसाठी श्री ग.भा. मेहेंदळे यांचे श्री राजा लशवछत्रपती, खंड १, पृ. २२०-२३० पाहावे.

‫ ) ز ز‬हा शब्द वापरला गेला आहे. संन्यासी, त्रनवृत्ती - फासी पाठात मुंज़वी (‫منوی‬ अललप्त, एकांतात राहणारा असा याचा अथम आहे (स्टा. १३२६). इंग्रजी अनुवादात पृष्ठ ७३ वरील तळटीप सांगते क़ी सरकारी नोकरीतून राजीनामा दे ऊन बाहेर पडले ल्या लोकांसाठी सामान्यपणे हा शब्द वापरला जातो. त्यामुळे बहुतेक दठकाणी जजथे ‘तनवृत्त’ म्हटले असेल ततथे ‘शासक़ीय नोकरीतून राजीनामा दे ऊन बाहेर पडले ला’ असा अथम अणभप्रेत आहे. त्रहजरी - ज्युसलयन - जदुनाथ सरकारांनी तहजरी ततथी वरून ज्युललयन ददनांक काढण्यासाठी श्री स्वामीकन्नू तपल्लै यांची जंत्री वापरल्याचे म्हटले आहे. इंग्रजी अनुवादात जजथे ज्युललयन ददनांक ककिंवा वार चुकल्याचे लक्षात आले ततथे तपल्लै जंत्री वापरून त्यात सुिारणा केली आहे. चित्रे - या अनुवादात काही समकालीन धचत्रे दे ता आली तर वाचकांना नक्क़ीच आवडेल या तवचाराने, The Metropolitian Museum of Art (MET), New York, USA तसेच Bibliothèque nationale de France (BnF), Paris, France या दोन

संग्रहालयांच्या संकेतस्थळावरून, काही धचत्रे ददली आहेत. या पुस्तकासाठी ही धचत्रे उपलब्ि करून ददल्याबद्दल या दोन्ही संग्रहालयांचे मनःपूवमक आभार. नकाशे – इततहासातील घटनाक्रम सांगताना नकाशाची तवजेरी हाताशी नसेल तर त्या घटनांच्या मागे लपले ला भूगोल अंिारातच राहतो. ही महत्त्वाची उणीव भरून

मआलसर-ए-आलमगीरी

१४

काढण्यासाठी गूगल नकाशांचा वापर करून औरंगजेबाचा एकूण प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गूगल ने ही सुतविा उपलब्ि करून ददल्याबद्दल त्यांचे ही आभार मानले पातहजेत. त्रुटी - एकही चूक ककिंवा त्रुटी राहू नये यासाठी यत्न करून ही या पुस्तकात अनाविानाने जर काही त्रुटी रातहल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व. वाचकांनी मला या चुका कळवल्यास पुढच्या आवृत्तीत नक्क़ीच त्यात सुिारणा केली जाईल. िरते शेवटी हा उपक्रम हाती का घेतला याबद्दल दोन शब्द ललतहणे अनुधचत होणार नाही. सन १६५८ ते १७०७ इतक़ी दीघमकाळ चालले ली औरंगजेबाची राजवट भारताच्या अस्स्तत्वासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. इस्लामचा झेंडा भारतीय उपखंडात सवमत्र पसरवण्याचे त्याचे उदद्दष्ट होते व ते साध्य करण्याचा त्याने हर प्रकारे प्रयत्न केला. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे तर, ‘या सगळ्यामागे माझा बाक़ी काही उद्दे श नसून, िममयुद्ध हेच एकमेव उदद्दष्ट आहे.’1. सन १६८२ ते १७०७ ही पंचवीस वषम तर आलमगीर बादशाहाच्या नेतृत्वाखाली सवमशक्त़ीतनशी लढणाऱ्या, भारतातील सवामत बलाढ्य साम्राज्याला, अत्यंत कडवी, अतवश्रांत आणण तवजयी झुंज फक्त मराठ्ांनी ददली. आददलशाही व कुतुबशाही ही दख्खनमिील प्रबळ सत्ताकेंद्रे मुघल वरवंट्याखाली धचरडली गेल्यानंतर ही, इथले तकल्ले , शहरे व खेड्या पाड्यात, मराठ्ांचा स्वातंत्र्य यज्ञ अहोरात्र िगिगत होता. औरंगजेबाचा तनकटवती आणण या काळातील अनेक घटनांचा प्रत्यक्षदशी असले ल्या साक़ी मुस्तैद खान याने ललतहले ला, औरंगजेबाच्या राजवटीचा अधिकृत इततहास अद्याप मराठीत उपलब्ि नाही ही खंत बरेच ददवस मनात होती. आज हे पुस्तक वाचकांसमोर प्रस्तुत करताना खूप समािान होत आहे. रोतहत सहस्रबुद्धे, पुणे. श्रावण वद्य द्वादशी, शके १९४२.

1

फासी पाठात पृष्ठ ४१० वर हा उल्ले ख आला आहे.

१५

मआलसर-ए-आलमगीरी

जदुनाथ िरकार यांिी प्रस्तावना एक बादशाहा अकबर याने (राजवट इसवी सन १५५६ ते १६०५) शासक़ीय आदे श काढू न त्याच्या राजवटीचा सतवस्तर इततहास ललतहण्याचा प्रघात पाडला. त्यातून अबुल फज़्ल याचे (त्याच्या मृत्यूनंतर इतरांनी पूणम केले ले) अकबरनामा ककिंवा ‘अकबराचे पुस्तक’ तयार झाले . त्यानंतर बादशाहा जहांगीर आला, ज्याने तुझुक-ए-जहांगीरी मध्ये त्याच्या आठवणी स्वतः सांतगतल्या आहेत, म्हणून त्याचा शासक़ीय जहांगीरनामा ललहावा लागला नाही. पण त्यामुळे या पुस्तकात शासक़ीय इततहासाबरोबर आत्मचररत्राचे सातहलत्तक गुण धमसळले ले ददसून येतात, ककिंवा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर, राजवटीतील घटनांच्या तनरपेक्ष नोंदींबरोबरच बादशाहाच्या भावना व तवचार यात आले ले ददसतात. तसे पातहले तर, याच्या नंतरच्या मुघल शासक़ीय इततहासाचे सातहलत्तक स्वरूप या राजवटीतच आखले गेले, जे पादशाहनामा (शाहजहान), आलमगीरनामा (औरंगजेब, जो मआलसर-ए-आलमगीरी ने पूणम केला), बहादुरशाहनामा (शाह आलम पतहला) आणण काही नंतरचे प्रयत्न, जसे तारीख-ए-अहमदशाही आणण तारीख-ए-आलमगीर सानी यात आले ले ददसते. या सगळ्या ललखाणात, म्हणजे नाम्यांमध्ये, तारखांप्रमाणे घटनाक्रम ददला आहे. यात अचूक पण रटाळ वाटणारी लोकांच्या व स्थानांच्या नावांची जंत्री प्रत्येक मतहन्यातील घटनांच्या वणमनात आले ली ददसते, व राजवटीच्या प्रत्येक वषामसाठी एक अध्याय याप्रमाणे पुस्तकाचे तवभाजन केले ले ददसते. इतक़ी सगळी मातहती अचूक हवी असल्यास त्याला शासक़ीय नोंदींचा आिार लागतो. सगळ्या सुभ्यांमिून ददल्लीला तनयधमतपणे पाठवले जाणारे घटनांचे ‘वातकया’ ककिंवा शासक़ीय नोंदी यांचा त्यासाठी उपयोग होतो. अकबराने त्याच्या राजवटीच्या चोवीसाव्या वषी ददले ल्या आदे शानुसार त्याच्या राज्यातील प्रत्येक सुभ्यात वाकनतवस, ककिंवा घटनांची नोंद ठे वणारे तवलशष्ट अधिकाऱ्यांचे दल नेमले होते (Akbar-namah, Bev.tr., iii. 413, also 559). जहांगीर ने ही पद्धत चालू ठे वली. तो ललतहतो क़ी, “सुभ्यातील घटना त्याच्या सीमांप्रमाणे नोंदवल्या गेल्या पातहजेत असा तनयम पाडला होता आणण या कामासाठी दरबारातील वाकनतवस नेमले गेले होते. माझ्या पूज्य वधडलांनी हा तनयम घालू न ददल्यामुळे, मी ही तो

मआलसर-ए-आलमगीरी

१६

पाळतो, ... जग आणण त्यातील लोक यांची मातहती यामुळे धमळते.” (Tuzuk, Roger’s tr. i. 247, see also Baharistan-i-Ghayibi, Borah’s tr. i. 209). पण सुभ्यांमध्ये

बातम्या ललतहणारे गुप्त वाकनतवस नेमण्याची पद्धत भारतीय मुघलांनी अब्बासीद खलीफांकडू न घेतली, ज्यांनी ती प्राचीन इराणी साम्राज्याकडू न घेतली. या वाकनतवसांचे प्रकार व काम करण्याची त्यांची पद्धत याबद्दलचे सतवस्तर वणमन, Mughal Administration, ch. IV, sec. 6., या माझ्या पुस्तकात ददले आहे.

शाहजहान व औरंगजेबाच्या काळात झाले ल्या मुघल साम्राज्याच्या तवस्तारातून जेव्हा ही शासक़ीय गुप्तचर यंत्रणा पूणम तवकलसत झाली, तेव्हा लहानशा कागदाच्या तुकड्यांवर ललतहले ल्या व बांबच्ू या नळकांड्यांतून (नालो) दर आठवड्याला ककिंवा पंिरवड्याला राजिानीत पाठवल्या जाणाऱ्या नोंदी जमा होऊन वृत्तांचा एक प्रचंड मोठा साठा राजिानीत तयार झाला. या व्यततररक्त अखबारात-ए-दरबार-ए-मुआला, ककिंवा बादशाहाच्या उपब्स्थतीत घडले ल्या ककिंवा बोलले ल्या गोष्टी ही होत्या. बादशाहाने सकाळी रजा दे ऊन संध्याकाळी दरबार घेतला असल्यास, त्यानुसार या नोंदी रोज एकदा ककिंवा दोनदा ललतहल्या जायच्या. हे अखबारात ककिंवा बातम्यांची सगळी हस्तललखखते बादशाहाच्या अधिपत्याखालील राजे, सुभेदार आणण मोतहमांवरील सरदार यांच्याकडे दरबारातील त्यांचे पगारी गुमास्ते पाठवत. तसेच त्या दठकाणांहून पाठवले ली शासक़ीय वाकनतवसांची वृत्ते व त्यासोबत जोडले ल्या शासक़ीय गुप्तहेरांच्या नोंदी, त्यांच्या उगम स्थानातील बदल वगळता, याच प्रकारच्या असत. घडणाऱ्या घटनांच्या या एकतत्रत केले ल्या अचूक, सतवस्तर आणण अगदी समकालीन नोंदींचा वापर करून, राजवटीचा नामा ककिंवा शासक़ीय इततहास ललतहण्यासाठी, दरबारी फासीची उत्तम जाण असणाऱ्या एखाद्या माणसाला बादशाहा नेमत असे. हे पुस्तक बादशाहाला वाचून दाखवले जात असे आणण त्याच्या तनदे शानुसार त्यात बदल करून मगच ते प्रकालशत केले जात असे - इथे ‘प्रकालशत’ चा अथम इतर राजे व नामदार यांच्याकडे याची प्रत बनवून पाठवण्यासाठी ते उपलब्ि करून दे णे असा होतो. एक ककिंवा दोन प्रातततनधिक वाचनांनंतर बादशाहा हे काम त्याच्या वजीराकडे सुपद ू म करत असे. या शासक़ीय नोंदींमध्ये त्यांचा पुरस्कताम व त्याची ‘पतवत्र’ संतती यांची, लशसारी येण्याइतक़ी अवाजवी स्तुती असायची, जी बाजूला ठे वल्यास, या नोंदी अततशय सतवस्तर

१७

मआलसर-ए-आलमगीरी

असत. उदाहरणाथम शाहजहानच्या राजवटीतील पतहल्या २० वषांच्या नोंदींसाठी, प्रत्येक़ी २२ ओळी असले ली १६६२ छापील पाने (म्हणजे सरासरी एका वषामसाठी ८३.१ पाने) घेतली आहेत; औरंगजेबाच्या पतहल्या दहा वषांसाठी त्याच मापाची ११०७ पाने (म्हणजे एका वषामसाठी ११०.७ पाने). पण यातील मातहती व तारखा महत्त्वाच्या आहेत, जरी काही दठकाणी शासक़ीय दप्तरातील वाकनतवसाच्या ललखाणावरून त्याच्या इततहासात नोंद उतरवून घेताना इततहासकाराच्या ले खतनकाने केले ल्या तनष्काळजीपणामुळे मला नाम्यातच चुक़ीची तारीख सापडली. पण त्या ददवसाचा अखबारात उपलब्ि असल्याने, नाम्यातील चुक़ीची तारीख सुिारणे मला शक्य झाले . हे ही लक्षात घेतले पातहजे क़ी ले खकाने केले ली बादशाहाची अवाजवी स्तुती आजच्या काळात जरी आक्षेपाहम वाटली तरी ती तथयांमिील उणीव नसून तत्कालीन ले खनपद्धती मिील उणीव आहे. अनेकदा काही संबंि नसताना बादशाहाला श्रेय ददले गेले असले तरी या शासक़ीय नोंदींमध्ये वस्तुब्स्थती बदलले ली ददसत नाही. आलशयाई दरबाराची रीत ले खक पाळत होता हे आपण लक्षात घेतले तर या तवनयशील ले खकाच्या बाबतीत अधिक संयम बाळगून आपण या पुस्तकाचा लाभ घेऊ शकतो. आणण फक्त आलशयाई का बरं ? इंग्लं डचा राजा स्टू अटम याला ‘कृपाळू व पुण्यवान महाराज’ म्हटले जायचे आणण नेपोललयन चे मोतनतर1 थोडीच वस्तुतनष्ठतेचे पुतळे होते. त्यामुळे आपल्या हातात नामा येताच आपल्याला त्या राजवटीतील घटनाक्रमाचा पाया धमळतो आणण त्यावरून आपल्याला त्यातील पात्रे व राजक़ीय शक्तींचे मुल्यमापन करता येते. त्यांचा प्रमुख दोष – आणण ज्यामुळे त्यांना आजच्या काळानुसार इततहास म्हणता येत नाही, ते म्हणजे त्या काळातील आर्थिंक आणण सामाजजक बाबी तसेच ज्याला सामान्य जनांची पररब्स्थती म्हणतात, त्यावर त्याचे मौन.

दोन औरंगजेबाच्या राजवटीतील पतहल्या दहा वषांचा इततहास संपूणम नामा या स्वरूपात त्याच्या आदे शानुसार, धमझाम मुहम्मद काजझम याने, आलमगीरनामा या नावाने ललतहला (तबब्ब्लयोलथका इंधडका माललकेत रॉयल एलशयादटक सोसायटी, बंगाल ने तो छापला). पण दहा वषम पूणम केल्यानंतर बादशाहाने ले खकाला पुढचे काम थांबवायला 1

नेपोललयन बोनापाटम याच्या राजवटीत छापले जाणारे Le Moniteur हे वृत्तपत्र.

मआलसर-ए-आलमगीरी

१८

सांतगतले . याचे कारण दे ताना साक़ी मुस्तैद खान म्हणतो क़ी, “कारण सगळ्या तवश्वाच्या या बादशाहाला गोष्टी उलगडू न मांडण्यापेक्षा त्यांचे गूढ स्वरूप जपणे अधिक भावले ” (फासी पाठ पृष्ठ ६८). खरतर काजझम याने जेव्हा दहाव्या वषामचे ललखाण पूणम केले तेव्हा

राज्याचा खचम कमी करण्यासाठी औरंगजेबाने इततहास ले खनाचा हा खर्चिंक तवभाग बंद केला. औरंगजेबाने इततहास ले खनावर बंदी आणली होती ककिंवा खफ़ी खानाने त्याचा वृतांत गुप्तपणे ललतहला होता म्हणून त्याचे नाव तसे (खूतफया) आहे या आख्यातयकांना काही सबळ पुरावा नाही. खफ़ी या शब्दाचा खूतफया या शब्दाशी काही संबंि नाही; हेरात व तनशाबर यांच्या मध्ये असले ल्या खुरासानच्या ख्वफ जजल्याचा रतहवासी असा त्याचा अथम होतो (Encyclopaedia of Islam, ii. 866). सन १६७८ मध्ये औरंगजेबाच्या राजवटीची वीस वषम पूणम झाल्यानंतरही त्याची आर्थिंक ब्स्थती सुिारली नाही. आता त्याला अफगाण सीमेवरील जमावांना तोंड द्यावे लागत होते व त्यानंतर लगेच रजपूत व मराठ्ांनी त्याला हैराण केले . त्यामुळे त्याच्या राजवटीचा अलं काररक आणण सतवस्तर इततहास ललतहण्याच्या तनरुपयोगी कामासाठी पैसा व वेळ दे णे त्याला शक्य झाले नाही. ही पररब्स्थती त्याच्या मृत्यूपयंत बदलली नाही. त्यामुळे असे झाले क़ी त्याच्या राजवटीचा संपूणम इततहास तो जजवंत असे पयंत ललतहलाच गेला नाही. सन १७०७ मध्ये तो वारल्यावर त्याचा शेवटचा सधचव आणण राजनीती व िमम या तवषयातला लशष्य, इनायतुल्लाह खान काब्श्मरी याने साक़ी मुस्तैद खान याला अशा आदशम बादशाहाचा इततहास पूणम करण्याचा आग्रह केला. यासाठी त्याला राज्याचे दफ्तर खुले करून ददले गेले. त्यातून त्याने पुस्तकासाठी आवश्यक असले ल्या गोष्टींचा सारांश घेतला व सन १७१० मध्ये मआलसर-ए-आलमतगरी ग्रंथ पूणम केला. इनायतुल्लाहच्या कारतकदीसाठी इवामईन याचे Later Mughals, पृष्ठ २५९ व ३३३ बघावे. तो मुहम्मद शाहच्या हाताखाली वजीर झाला व कहिंदंवर पुन्हा जजझया लावण्यास उत्सुक होता (Ibid. l.103-105).

आपला ले खक मुहम्मद साक़ी मुस्तैद खान याच्या आयुष्याबद्दल आपल्याला थोड्याच गोष्टी मातहत आहेत, त्या सवम त्याने स्वतः ललतहले ल्या औरंगजेबाचा इततहास या पुस्तकात ककिंवा त्याचा पुरस्कताम बख्तावर खान याच्या ‘मीरत-उल-आलम’ मिील प्रस्तावनेत ददल्या आहेत. औरंगजेबाच्या आवडत्या अधिकाऱ्यांपैक़ी एक असले ल्या

मआलसर-ए-आलमगीरी

१९

बख्तावर खानाने, ज्याची मातहती मआलसर (फासी पाठ पृष्ठ २५३) मध्ये ददली आहे, त्याला लहानाचे मोठे केले . या खानाच्या हाताखाली त्याने मुनशी आणण ददवाणाचे काम केले . त्याने आयुष्याची शेवटची सतरा वषम मीरत-उल-आलम ललतहण्यात बख्तावर खानाची मदत केली. बख्तावर खानाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याला हे प्रकालशत करण्याची परवानगी ददली होती. नंतर तो मनसब धमळवून शाही नोकरीत रुजू झाला. या बादशाहाकडे त्याने जानमाज-खान्याचा मुश्रीफ, गुरुवारचा वाकनतवस, खवासींचा मुश्रीफ आणण नजारलचा मुनशी ही कामे पार पाडली (फासी पाठ पृष्ठ २५३, २५५, ४०७, ४६२). पाटणा शहरातील बाबू राम बहादुर (छोटू लाल), यांच्याकडे इन्शा-इ-मत्लु ब नावाचे एक फासी हस्तललखखत आहे, ज्यात साक़ी मुस्तैद खान याने त्याच्या समकालीन लोकांना ललतहले ली काही पत्रे आहेत, पण त्यात पृष्ठ ९-४८ नाहीत व त्याचा कागद खूप जुना व दठसूळ झाला आहे. नाम्यांच्या तुलनेत मआलसर-ए-आलमतगरी हे अततशय संणक्षप्त स्वरूपाचे आहे; यात एका वषामच्या नोंदींसाठी सािारण ११ पाने वापरली आहेत, जजथे आलमगीरनाम्यात त्याच काळासाठी ११०.७ पाने वापरली आहेत. पण यात मातहतीपूणम भाग गाळला नसून अलं काररक भाग वगळला आहे. त्यामुळे अनेक दठकाणी ही सरकारी राजपत्रासारखी शासक़ीय नेमणुका व बढत्यांची रुक्ष सूची वाटते. पण यातील इतर भागात, तवशेष करून जजथे ले खकाने स्वतःची तनरीक्षणे व तवचार मांडले आहेत ककिंवा चररत्रे रेखाटली आहेत, ततथे काही महत्त्वाची, व काही वेळा सुरस मातहती धमळते. या अनुवादात संतहता ककिंधचत छोटी केली आहे. यात कुठलाही मजकूर ककिंवा तारीख मी वगळले ली नाही पण काही मोठ्ा वाक्यांची रचना त्यातील आशय मांडण्यापुरती बदलली आहे तसेच (पारंपाररक फासी ऐततहालसक सातहत्यात तवभागाच्या सुरवातीला येणारे) काही जुनाट वैचाररक व नैततकतापूणम भाग पूणमपणे गाळले आहेत; आणण काव्यपंक्त़ी व स्तुतीपर वाक्ये ही गाळली आहेत. पण सगळी महत्त्वपूणम तवशेषणे घेतली आहेत. फासी पाठाचे पृष्ठ क्रमांक या अनुवादात मी ददले आहेत जेणेकरून मूळ पाठाचा हा पूणम इंग्रजी अनुवाद आहे हे एखाद्या उत्सुक वाचकास पडताळता येईल. सगळ्या तहजरी तारखांचे रूपांतर स्वामी कन्नू तपल्लै यांच्या ‘Indian Ephemeris’ च्या आिारे खिस्ती तारखांत केले आहे.

मआलसर-ए-आलमगीरी

२०

हा अनुवाद मी माझ्या उपयोगासाठी काही वषांपूवी केला होता व माझे History of Aurangzib याचे पाच खंड ललहून झाल्यावर तो बाजूला पडला. रॉयल एलशयादटक

सोसायटी ऑफ बंगाल ने तो प्रकालशत करायचे मान्य केल्यामुळे भारतीय इततहासातील मुघलांच्या तवश्वसनीय सािनांमध्ये असले ली ५१ वषांची दरी भरली आहे. माझा अनुवाद मूळ संतहतेशी शब्दशः ताडू न त्यात सुिारणा केल्या आहेत, आणण अनेक दठकाणी, मूळ संतहतेतील वाक्प्रचार व वाक्ये, जी उपयुक्ततेचे लक्ष्य असणाऱ्या माझ्या पतहल्या आवृत्तीत वगळली होती, ती समातवष्ट करून वाढवला ही आहे. आता मला वाटते क़ी ले खकाचा हेतु आणण तवचार मांडण्यासाठी आवश्यक व महत्त्वाचा असा मूळ फासी संतहतेतील प्रत्येक शब्द घेतला गेला आहे. या सुिाररत आवृत्तीच्या कामात मला प्राध्यापक तनरोद भूषण रॉय, एम.ए., यांची खूपच मदत झाली. या कामात (तसेच सोसायटीने योजले ल्या इतर पुस्तकांसाठी) मला मदत करण्यासाठी सोसायटीने त्यांना नेमले आहे. त्यांनी माझा अनुवाद अगदी दक्षतापूवमक तपासला आहे आणण जजथे कुठे माझे शब्द बदलण्याची आवश्यकता असेल ककिंवा मूळ संतहतेतील ले खकाच्या उद्दे शाच्या जवळ जाण्यासाठी शब्द वाढवायची आवश्यकता असेल ततथे ते त्यांनी माझ्या लक्षात आणून ददले . चचेअंती बहुतेक दठकाणी मी त्यांच्या सूचना स्वीकारून ते बदल केले आहेत. प्रकाशनासाठी प्रत तयार झाल्यानंतर आणण काही भाग छपाईस सज्ज असताना, खान साहेब सय्यद हसन अस्कारी, एम.ए., (प्राध्यापक, पाटणा कॉले ज) यांनी, ददवान नालसर अली (खुजवान, जजल्हा अरामह) यांच्या वक्फ संग्रहालयातील फासी संतहतेचे सुमारे १७५० मिील जुने हस्तललखखत, ज्यात तबब्ब्लयोलथका इंधडकाच्या आवृत्ती पेक्षा अधिक अचूक मजकूर आहे व ज्यामुळे आिीच्या संतहतेतील, छपाई करण्यापूवी लक्षात न आले ल्या काही मोठ्ा उणीवा भरून तनघतात, मला उपलब्ि करून ददले . प्राध्यापक तन.भू.रॉय यांनी माझा इंग्रजी अनुवाद दक्षतापूवमक या नवीन हस्तललखखताशी ताडू न बऱ्याच सुिारणा केल्या आहेत. या हस्तललखखताची छापील प्रत व इतर तवश्वसनीय सािनांनस ु ार केले ले बहुतेक बदल प्रत्येक पानावर तळ दटपा न दे ता, अनुवादात मी Cor या अक्षरांनी धचखन्हत केले आहेत. छापील प्रती मिल्या इतरही अनेक स्वाभातवक चुका वेगळा ककिंवा तवलशष्ट तनदे श न करता सुिारल्या आहेत. हा अनुवाद उपयुक्त होण्यासाठी केले ल्या या सुिारणांबद्दल वाचकांनी प्राध्यापक रॉय यांचे आभार मानावेत.

मआलसर-ए-आलमगीरी

२१

छपाईतील सध्याच्या अडचणींमुळे या अनुवादात कमीतकमी व अगदी आवश्यक तततक़ीच उच्चारभेद1 दशमक अक्षरे वापरली आहेत, जसे ā, é व ‘ain मिील पतहले धचन्ह. पण जे शब्द अनेक वेळा येतात त्यात ही धचन्हे वापरणे ककिंवा ते तनयम काही पानांवर पाळल्यानंतर ती पद्धत पुस्तकाच्या शेवटापयंत चालू ठे वणे अनावश्यक आहे असे वाटते. इतक्या मोठ्ा पुस्तकात अनेक वेळा येणाऱ्या तवशेष नामांच्या अक्षरतवन्यासात सारखेपणा ठे वणे मला शक्य झाले नाही. तवशेष करून जजथे शेवटचे अक्षर h असेल ततथे. प्राध्यापक तनरोद भूषण रॉय यांनी तवस्ताररत वणमसूची तयार केली आहे जी त्यातील मातहती संकलन व पद्धतशीर मांडणी यामुळे वाचकास उपयोगी ठरेल. कठीण शब्दांची सूची मी ददली आहे. जदुनाथ सरकार, ऑक्टोबर १९४७.

1

या उच्चारभेदांचा उल्ले ख जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी अनुवादासाठी केला होता.

२२

मआलसर-ए-आलमगीरी

नकाशांिी िूिी सन १६५८ ........................................................................................................२५ सन १६५९ ........................................................................................................३२ सन १६६० ते १६६३............................................................................................४७ सन १६६४ ते १६७६............................................................................................६९ सन १६७७ ते १६८१......................................................................................... १६१ सन १६८२ ते १६८५......................................................................................... १९५ सन १६८६ ते १६८८......................................................................................... २३५ सन १६८९ ते १६९२......................................................................................... २६६ सन १६९५ ते १७००......................................................................................... ३०० सन १७०१ ते १७०२......................................................................................... ३४५ सन १७०३ ते १७०७......................................................................................... ३६७

२३

मआलसर-ए-आलमगीरी

चित्र िूिी अबुल जफर मुतहउद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर पादशाह गाझी .....................२८ दारा शुकोह चे मुंडके औरंगजेबासमोर दरबारात सादर करताना .....................................४५ अमीर-उल-उमरा शातहस्ता खान .............................................................................६३ धमझाम राजा जयससिंह ............................................................................................७१ छत्रपती लशवाजी महाराज .....................................................................................७६ आजम व जहानझेब यांचे नाते ...............................................................................८९ हत्तींची झुंज.......................................................................................................९० रत्नजधडत खंजीर ............................................................................................ ११३ काझी उल कुझात अब्दुल वह्हाब ........................................................................ १३६ महाराजा जसवंतससिंह ....................................................................................... १५९ पादशाहजादा मुहम्मद अकबर............................................................................. १८० खखलअत ककिंवा अंगरखा .................................................................................... २१४ कुतुबशाहाचा प्रिानमंत्री मदाण्णा ........................................................................ २३२ सतराव्या शतकातील मुसलमानी फक़ीर ................................................................ २४५ हररताश्माची मूठ असले ला खंजीर ........................................................................ २७३ सतराव्या शतकातील सोन्याचे काम असले ली ढाल .................................................. ३१३ चौदोल .......................................................................................................... ३४२ तख्त-ए-रवा – हलते ससिंहासन ............................................................................ ३८२

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

२४

मआसिर-ए-आलमगीरी अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते [२]1 ६ सप्टें बर १६५७ / ७ जजल्हेज १०६७ रोजी शाहजहान बादशाहा, ज्याचा

उल्ले ख यापुढे आला हजरत असा केला जाईल, ददल्लीत आजारी पडला, [३] आणण त्याला राज्याचा कारभार करणे अशक्य झाले . त्याचा सवामत मोठा मुलगा दारा शुकोह याने संिी सािून सुभ्यांकडू न येणाऱ्या बातम्यांच्या वाटा बंद केल्या, त्यामुळे साम्राज्यात मोठ्ा प्रमाणात गोंिळ माजला. गुजरातचा सुभेदार असले ला बादशाहाचा चौथा मुलगा मुराद बक्ष, (ततथे) ससिंहासनावर बसला. बादशाहाचा दुसरा मुलगा, शाह शूजा, याने तीच गोष्ट बंगालमध्ये केली आणण सैन्य घेऊन पाटण्यावर चालू न गेला. औरंगजेबाच्या भीतीमुळे दारा शुकोहने शाहजहानला त्याच्यापासून दर करायचा प्रयत्न केला (होता) आणण अनेक खोट्या गोष्टी सांगून त्याच्या मदतीसाठी पाठवले ले सैन्य परत बोलवून घेण्यासाठी त्याला उद्युक्त केले . बादशाहा जजवंत असे पयंत आणण त्याच्या रक्षणाखाली शूजा आणण मुराद बक्षचा काटा काढू न नंतर तनवांतपणे दख्खनकडे लक्ष दे ऊन औरंगजेबाला बाजूला सारता येईल असा तवचार करून, बादशाहाला आजाराने पूणम ग्रासले असताना दाराने त्याला आग्र्याला हलवले . त्याने राजा जयससिंह बरोबर बादशाही सैन्य व सुलेमान शुकोह या आपल्या मुलाच्या नेतृत्वाखाली स्वत:चे सैन्य दे ऊन त्यांना शूजाच्या तवरोिात पाठवले . त्याच वेळी त्याने शाहजहानच्या आईच्या नात्यात असले ल्या व कहिंदुस्थानातील प्रमुख राजांपक ै ़ी एक अशा राजा जसवंतससिंहावर प्रचंड तवश्वास ठे वून त्याला महाराजाची उपािी ददली व त्याच्याकडे मोठे सैन्य दे ऊन दख्खनची वाट अडवण्यासाठी त्याला माळव्याकडे पाठवले . कालसम खानाच्या हाताखाली आणखी एक सैन्य दे ऊन उज्जैनच्या महाराजाला बरोबर घेऊन तशी वेळ [४] आल्यास, त्याला मुराद बक्षच्या तवरुद्ध जायला सांतगतले गेले. दारा शुकोहच्या जादने बादशाहाचे मन

1

चौकोनी कंसातील आकडे श्री आघा अहमद अली यांनी संपाददत केले ल्या तबबललयोलथका इंधडका, कलकत्ता १८७१ या फासी पाठातील पृष्ठ क्रमांक दशमवतात.

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

२५

औरंगजेबाबद्दल कलु तषत केले होते. त्याच्या दरबारातील इसा बेग या औरंगजेबाच्या दताला काही कारण नसताना त्याने अटक केले , पण नंतर या कृत्याची लाज वाटल्याने त्याला सोडू न ददले गेले. कहिंदंची तत्त्वे ककिंवा रीतींबद्दल दारा शुकोहला वाटणारी आपुलक़ी तसेच इस्लामने सांतगतले ल्या तनबंिांची (इबहात व इल्हाद) त्याच्याकडू न होणारी उपेक्षा यामुळे औरंगजेबाला त्याचे दुष्टपणाचे वागणे खटकत असे. त्यामुळे राज्याचे व िमामचे रक्षण करण्यासाठी औरंगजेबाने मुराद बक्षला बरोबर घेऊन, ज्याने काही मूखामसारख्या

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

२६

गोष्टी करून नंतर औरंगजेबाची क्षमा मातगतली होती, शाहजहानकडे जाण्याचा तनिामर केला. जसवंतससिंह व कालसम खान लढण्याची शक्यता असल्याने औरंगजेबाने युद्धाची तयारी केली व सोमवार, २५ जानेवारी १६५८ / १ जमाद-उल-अव्वल १०६८ तहजरी रोजी औरंगाबादहून बऱ्हाणपूराकडे तनघाला आणण गुरुवार, १८ फेब्रुवारी १६५८ / २५ जमाद-उल-अव्वल १०६८ ला ततथे पोहोचला. शाहजहानला त्याच्या आजारपणात भेटण्यासाठी (अनुमती मागण्यास) ततथून त्याने पत्र ललतहले . एक मतहना गेला तरी त्याचे काही उत्तर आले नाही पण िक्कादायक बातम्या येत होत्या. दारा शुकोहच्या धचथावणीमुळे जसवंतससिंह आक्रमक होत होता. २० माचम १६५८ / २५ जमाद-उस-सानी १०६८ रोजी औरंगजेब आग्र्याकडे तनघाला आणण बुिवार, १४ एतप्रल १६५८ / २१ रज्जब १०६८ रोजी दीपलपूरहून [५] पुढे जाताना अहमदाबादहून आले ला मुराद बक्ष त्याला वाटे त भेटला. जसवंतससिंह आणण कालसम खानाचा तळ जजथे होता त्या गावापासून एक कोस अंतरावर (उज्जैन पासून ७ कोसावर असले ल्या) िरमतपूरला औरंगजेबाने तळ ठोकला. शत्रूने त्याची मयामदा ओलांडत लढाईची तयारी केली. गुरुवार, १५ एतप्रल १६५८ / २२ रज्जब १०६८ रोजी औरंगजेबाने त्याचे सैन्य लढाईत उतरवले आणण युद्धाचे नगारे वाजवले . जसवंतससिंहाने ही सैन्य गोळा करून चाल केली आणण दोन्ही सैन्य एकमेकांना णभडली. कहिंदंची संख्या अधिक असूनही ते मारले गेले आणण शेवटी जसवंतससिंहाने लहानशा तुकडी सोबत त्याच्या घराकडे, म्हणजे मारवाडकडे पळ काढला. [६] या तवनाशातून आपल्याला पळ काढता आला हे आपले भाग्यच आहे असे

कालसम खान व इतर बादशाही सैन्याला वाटले . औरंगजेबाचा तवजय झाला व शत्रूची सवम मालमत्ता त्याला धमळाली. पादशाहजाद्याच्या आदे शानुसार जवळपास सहा हजार मृत मोजले गेले. रतववार, २३ मे १६५८ / १ रमजान १०६८ रोजी औरंगजेबाने चंबळ ओलांडली आणण त्याला कळले क़ी दारा शुकोह िौलपूरहून तनघाला आहे. शुक्रवार, २८ मे १६५८ / ६ रमजान १०६८ रोजी तो दाराच्या सैन्यापासून दीड कोसावर येऊन थांबला. दारा घोड्यावर स्वार होऊन त्याच्या छावणीच्या थोडा पुढे आला पण औरंगजेबाच्या भीती पोटी आणखी पुढे आला नाही, त्याने त्याच्या सुसज्ज सैतनकांना ददवसभर तापले ल्या रणात वाऱ्यावर उभे करून ठे वले . अनेक जण भूकेने व तहानेने मेले. ददवस मावळल्यावर

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

२७

तो परत छावणीत गेला. दुसऱ्या ददवशी औरंगजेबाने त्याच्या सैन्याला आग्र्याकडे चाल करायला सांतगतले . २९ मे १६५८ / ७ रमजान १०६८ रोजी आदल्या ददवशी पुढे पाठवले ले आपले सैन्य जमवून दाराने औरंगजेबाच्या सैन्यावर चाल केली. तुंबळ युद्ध झाले . दोन्ही बाजूंच्या तोफा आणण बंदुकींच्या िडाक्याने युद्धाला तोंड फुटले . त्यांची आग संहार करत पुढे सरसावली. रुस्तम खान, राव छत्रसाल, राजा रायससिंह राठोड आणण दाराच्या सैन्यातील इतर सरदार कामी आले आणण [७] त्याच्या बरोबर अधिक सैन्य असूनही त्याचे िैयम खचले . हत्तीवरून खाली उतरून दारा घोड्यावर स्वार झाला. अवेळी केले ल्या या बदलामुळे त्याच्या सैन्याच्या मनात शंका तनमामण झाली आणण ते पळू लागले . औरंगजेबाच्या तवजयी पताका फडकू लागल्या. औरंगजेबाचे भाग्य चांगले असल्याचा जणू हा संकेत होता क़ी इतर युद्धात किी झाले नव्हते इतके दारा शुकोहच्या सैन्यातील अनेक सरदार मारले गेले – सामान्य सैतनकांची झाले ली हानी तर सोडू नच द्या – आजम खान आणण मुल्तफत खान, जे युद्धानंतर उष्माघाताने मेले, वगळता तवजयी सैन्यातील इतर कुठल्याही सरदाराचा मृत्यू झाला नाही. दारा ततथून पळू न गेला आणण त्याचा मुलगा व इतर काही नोकरांसोबत संध्याकाळी आग्र्याला त्याच्या घरी पोहोचला. रात्रीचे तीन प्रहर ततथे थांबून मग तो ददल्लीकडे गेला. औरंगजेबाने तवजय धमळवून दे णाऱ्याचे (ईश्वराचे) आभार मानले व शत्रूच्या छावणीत जाऊन अजून उभ्या असले ल्या दारा शुकोहच्या तंबूत गेला आणण ती रात्र त्याने ततथेच काढली. दुसऱ्या ददवशी सैन्य सामूगढकडे तनघाले . हे युद्ध करावे लागले याबद्दल शाहजहानची क्षमा मागणारे एक तवनम्र पत्र त्याने त्या ददवशी ललतहले . मंगळवार १ जून १६५८ / १० रमजान १०६८ ला तो आग्र्याच्या नूरमंजजल बागेत पोहोचला. शाहजहान ने त्याच्या पत्राला उत्तर ददले व दुसऱ्या ददवशी आलमगीर नावाची तलवार [८] त्याला भेट ददली. औरंगजेबाच्या आश्रयाच्या अपेक्षेने बादशाही मातबर सरदार व

अधिकारी स्वतःचे सैन्य घेऊन त्याच्या दरबारात आले व त्यांच्या श्रेणीप्रमाणे सवांचा सन्मान केला गेला. शुक्रवार, ११ जून १६५८ / २० रमजान १०६८ रोजी त्याने आग्रा शहरात प्रवेश केला आणण तो दारा शुकोहच्या राजवाड्यात रातहला. १२ जून १६५८ / २१ रमजान १०६८ ला त्याला कळले क़ी दारा शुकोह ५ जून १६५८ / १४ रमजान १०६८ ला ददल्लीस पोहोचला होता. औरंगजेबाच्या मनात शाहजहानला भेटायची इच्छा होती पण दाराने गुप्त पत्रे पाठवून त्याचे मन कलु तषत केले होते. त्यामुळे त्याने तो तवचार

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

अबुल जिर मुत्रहउद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर पादशाह गाझी (साभार MET)

२८

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

२९

सोडला व रतववार, १३ जून १६५८ / २२ रमजान १०६८ ला ददल्लीकडे तनघाला. मंगळवार, १५ जून १६५८ / २४ रमजान १०६८ ला घाटसामी येथे असताना त्याला कळले क़ी दारा ददल्ली सोडू न पळू न गेला आहे. २१ जून १६५८ / ३० रमजान १०६८ ला बहादुर खानला दाराच्या मागावर जायला सांतगतले गेले. मुराद बक्ष सशत्र उठावाच्या प्रयत्नात संिीची वाट बघत असल्यामुळे औरंगजेबाने त्याला मथुरेला तुरुंगात ठे वले आणण या प्रकारे बुिवार, २३ जून १६५८ / २ शव्वाल १०६८ रोजी लोकांना आणखी खोडसाळपणा व रक्तपातापासून वाचवले ; बंददवानाला शेख मीर कडे दे ऊन ददल्लीच्या तकल्ल्यात पाठवले गेले. दारा शुकोह लाहोरकडे जात आहे हे कळल्यावर औरंगजेबाने पंजाबला जायचे ठरवले .

पत्रहले मंिकारोहण ज्योततषींनी बुिवार, २१ जुलै १६५८ / १ जजल्कदा १०६८ हा ससिंहासनावर बसण्यासाठी चांगला [९] ददवस असल्याचे सांतगतल्याने आणण ददल्लीच्या तकल्ल्यात जाऊन सगळ्या समारंभाची तयारी करायला वेळ नसल्यामुळे औरंगजेब काही वेळ आघराबादच्या (शालीमार) बागेत थांबला आणण वर ददले ल्या सुमुहूतामवर ससिंहासनावर बसला. या प्रसंगी पादशाहजादे , मातबर सरदार, मनसबदार व इतर अधिकाऱ्यांना ददले ल्या भेटवस्तुंची गणतीच करता येणार नाही. अब्दुर रशीद ततवी याला कुराणातील

ُ

َْ

ُ

۟

َ َ‫۟ ه‬

َ

َ ‫ٱلر ُس‬ ُ ‫يعوا ٱَّلل َوأط‬ ُ ‫‘ )أط‬अततआ-उआल्लाह वाततआ-उ-अलَّ ‫يعوا‬ (‫ول َوأ ۟و ِِل ٱل ْم ِر ِمنك ْم‬ ِ ِ

रसूला वाओली-अलामरी-ए-धमनकुम’1 या पंक्त़ीत मंचकारोहणाची तारीख (कालश्ले ष) धमळाली.

दाराच्या मागावर हा समारंभ थोडक्यात आटपायचे ठरल्यामुळे राज्याणभषेकाचे बरेचसे तविी दुसऱ्या (वषामतील) समारंभासाठी ठे वले गेले. उदा., खुत्ब्याचे वाचन, नाणी पाडणे आणण बादशाहाने नाव िारण करणे हे सगळे तेव्हा न करता तात्पुरते सोडू न ददले गेले.

1

इंग्रजी अनुवादात हा कालश्ले श पूणम ददले ला नाही. हा फासीत नसून अरबीत आहे व कुराणातील सुरा ४, आयत ५९ मिील शब्द यात घेतले आहेत. ‘अल्लाहच्या, त्याच्या प्रेतषताच्या तसेच तुमच्यात असले ल्या अधिकारी व्यक्तींच्या आज्ञेचे पालन करा’ असा याचा अथम आहे.

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३०

मंचकारोहण करण्यापूवी खलीलु ल्लाह खानाकडे सैन्य दे ऊन त्याला बहादुर खाना सोबत सतलज तीरी पोहचून ती पार करण्याची व्यवस्था करायला सांतगतले गेले. सुलैमान शुकोह त्याच्या वधडलांना जाऊन धमळण्यासाठी गंगेच्या पैलतीरावरून सहारणपूरमागे हररद्वाराकडे चाल करत असल्याचे औरंगजेबाला कळले . त्याने अमीरउल-उमरा शातहस्ता खान, शेख मीर व इतर सरदारांना त्याच्या तवरुद्ध मोतहमेसाठी नेमले . गुरुवार, २२ जुलै १६५८ / २ जजल्कदा १०६८ ला [१०] त्याने पंजाबकडे चाल करण्यासाठी दोन तंबू उभे करायचा आदे श ददला. बुिवार, ४ ऑगस्ट १६५८ / १५ जजल्कदा १०६८ रोजी बहादुर खानाकडू न बातमी आली क़ी त्यांनी सतलज पार केली होती व दाराच्या लोकांनी पळ काढला होता. त्याच वेळी सुलैमान शुकोह काश्मीरच्या डोंगरात गेला म्हणून बादशाहाने त्याच्या तवरुद्ध पाठवले ले सैन्य परत बोलावले . लाहोरला पोहोचल्यावर दाराने जवळपास वीस हजाराचे सैन्य जमवले . बहादुर खान व खलीलु ल्लाह खान यांनी सतलज पार केल्याचे समजताच त्याने व्यास नदीजवळ त्यांना अडवण्यासाठी दाऊद खानाकडे मोठे सैन्य ददले आणण लसतपहर शुकोहला त्याच्या मागे पाठवले . त्यावर बादशाहाने िूतमपणे राजा जयससिंह याला पतहल्या तुकडी सोबत राहायला सांतगतले . दाराला हे कळल्यावर त्याला मोह आवरला नाही आणण तो लाहोरहून मुलतानकडे तनघाला. त्यावेळी महाराजा जसवंतससिंह त्याच्या दे शातून आला आणण लीन होऊन (झाल्या गोष्टीबद्दल) पश्चात्ताप व्यक्त करत दरबारासमोर कपाळ रगडले . बादशाहाने ही मोठ्ा मनाने त्याचे अपराि क्षमा केले व त्याचा यथोधचत सन्मान करून त्याला ददल्लीला पाठवले . रतववार, १२ सप्टें बर १६५८ / २४ जजल्हेज १०६८ रोजी बादशाहाला खलीलु ल्लाह खान व हैबतपुरी पाटी येथील इतर सरदारांकडू न कळले क़ी दारा शुकोहने लाहोरहून बाहेर पडू न युद्ध सामग्री घेऊन बादशाही सैन्याशी लढायची तयारी केली होती आणण हे बघून बादशाही सरदारांनी त्यांच्या पाठलागाची गती कमी केली होती. त्यामुळे बादशाहाने पादाहजादा आजम याला अनावश्यक सामान [११] व सैतनकांसह ततथून लाहोरला पाठवले आणण त्याने स्वतः वेगाने चाल करायचे ठरवले . बादशाहाला जेव्हा कळले क़ी दारा शुकोह मुलतानलाही थांबला नाही तसेच त्याच्या बरोबरच्या बऱ्याच लोकांनी त्याची साथ सोडली आहे आणण त्याच्या अडचणी वाढतच आहेत तेव्हा त्याने

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३१

चालीचा वेग कमी करत सोप्या टप्प्यात, ठरले ल्या दठकाणी थांबत1 मुलतान गाठले . बुिवार, २२ सप्टें बर १६५८ / ४ मुहरमम १०६९ ला सफलशकन खान मुलतानहून दाराच्या मागावर तनघाला होता तरी सावितगरी म्हणून शेख मीर याला सुद्धा नऊ हजार लोकांसोबत त्याच कामतगरीवर पाठवले गेले. त्याच वेळी बादशाहाला कळले क़ी त्याचा भाऊ शाह शूजा, ज्याच्याशी मंचकारोहणापूवी त्याचे जवळचे संबि ं होते, तो वैर बाळगून बंगालहून बाहेर पडला आहे. त्यामुळे गुरुवार, ३० सप्टें बर १६५८ / १२ मुहरमम १०६९ रोजी औरंगजेब मुलतानहून तनघाला आणण शतनवार, २० नोव्हेंबर १६५८ / ४ रतब-उल-अव्वल १०६९ ला ददल्लीच्या तकल्ल्यात पोहोचल्यावर लगेच त्याला शूजाने केले ल्या गडबडीची बातमी धमळाली. (शूजाच्या वागण्याकडे) बादशाहाला शक्य तततके दुलम क्ष करायचे मनात होते, पण शूजा जेव्हा उद्धटपणे बनारसच्या सीमेवर आला तेव्हा त्याने लढायचे ठरवले . शतनवार, ४ धडसेंबर १६५८ / १८ रतब-उल-अव्वल १०६९ रोजी, पादशाहजादा मुहम्मद सुलतान याला आग्र्याहून बाहेर पडू न त्या ददशेने जायला सांगण्यालशवाय बादशाहाकडे काही पयामय उरला नव्हता. शाह शूजा बनारसच्या सीमेवरून पुढे चाल करणार असल्याच्या बातम्या वारंवार येत असल्यामुळे सोरोन येथील लशकारीच्या जागेवर राहून शूजाच्या बातमीची वाट बघायची आणण जर तो पाटण्याकडे वळला तर त्याच्या तवरुद्ध पाठवले ले सैन्य परत बोलवायचे नाही तर त्याच्या तवरुद्ध मोतहम पुढे न्यायची असा तवचार बादशाहाने केला. [१२] त्यानुसार गुरुवार २ धडसेंबर १६५८ / १६ रतब-उल-अव्वल १०६९ रोजी त्याने ददल्ली सोडली. ६ धडसेंबर १६५८ / २० रतब-उल-अव्वल १०६९ ला बातमी आली क़ी तनयुक्त केले ले सैन्य ५ धडसेंबर १६५८ / १९ रतब-उल-अव्वल १०६९ ला इटवाहला पोहोचले आहे. बादशाहाने लशकार अललकडे घ्यायचे ठरवले आणण १९ धडसेंबर १०५८ / १३ रतब-उल-अव्वल १०६९ रोजी तो सोरोनला पोहोचला. शूजाचा प्रश् सामंजस्याने सोडवायची इच्छा असल्यामुळे त्याचा हेतु जाणून घेण्यासाठी त्याने त्याला समजुतीचे पत्र

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘without halting anywhere’ असे ददले आहे पण फासी पाठात ِّ ‫‘ )بآرام‬बआराम तय मरातहल नमूदन्द’ म्हणजे ठरले ले पडाव घेत आरामात (‫یط مراحل نمودند‬ गेले असे आहे.

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३२

ललतहले . पण जेव्हा त्याची खात्री झाली क़ी त्याचा सौम्यपणा आणण दयाळू पणा यांचा काही एक उपयोग होणार नाही तेव्हा, २१ धडसेंबर १६५८ / ५ रतब-उस-सानी १०६९ ला शूजाचा पराभव करण्यासाठी तो सोरोनहून बाहेर पडला. पादशाहजादा मुहम्मद सुलतानकडे तनरोप पाठवण्यात आला क़ी थेट युद्धाला तोंड न दे ता एका दठकाणी येऊन बादशाहाला धमळण्याची वाट पाहावी.

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३३

शूजाच्या छावणी पासून चार कोसावर, कोराम गावात पादशाहजादा मुहम्मद सुलतान याच्या, पुढे पाठवले ल्या दलाची छावणी होती. रतववार, २ जानेवारी १६५९ / १७ रतब-उस-सानी १०६९ रोजी त्या गावाबाहेर बादशाही छावणी पडली. खानदे शातून बोलावून घेतले ला मुअज्जम खान याच ददवशी बादशाही छावणीत सामील झाला.

खाजवा येथे शुजाशी युद्ध शूजाला तोफखाना पुढे ठे वून युद्धासाठी त्याच्या सैन्याची फळी तयार करायची होती. मंगळवार, ४ जानेवारी १६५९ / १९ रतब-उस-सानी १०६९ रोजी, बादशाहा कोरामला पोहोचल्याच्या ततसऱ्या ददवशी, आदे श ददला गेला क़ी तोफखान्याने पुढे न जाता शूजाच्या सैन्यावर आग पाखडू न बादशाही सैन्याने िीराने युद्धात उतरावे. [१३] आदे श ददल्याबरोबर सैतनकांचे लोंढे लगेच पुढे येऊ लागले आणण जवळपास नव्वद हजाराचे घोडदळ युद्धासाठी तयार झाले . बादशाहाच्या छावण्या व तंबू आहेत ततथेच ठे वण्याचा आदे श झाला. त्या ददवशी शूजा सुद्धा त्याच्या सैन्याची रचना करण्यात गुंतला होता. ददवसाच्या चार घटका झाल्यावर बादशाहाने त्याच्या व शूजाच्या छावणीतले अंतर पार केले आणण ददवसाचे तीन प्रहर झाल्यावर त्याच्या छावणीपासून एका मैलावर सैन्याची रचना केली. शूजाने पुढे न येता काही तोफगोळे उडवले . रात्र होई पयंत ही खडाजंगी चालली. त्यानंतर शूजाने त्याच्या तोफा मागे घेतल्या. सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना घेऊन, मोचांचा बंदोबस्त करून आणण सैन्याला सतकम राहायला सांगून बादशाहा मैदानात उभारले ल्या शाधमयानात गेला. ती रात्र संपताना एक घटना झाली जी काही अदरदशी लोकांना मोठ्ा संकटासारखी वाटे ल. या घटनेमळ ु े बादशाही सैन्यात गोंिळ माजला. त्याचे असे झाले क़ी दुष्ट महाराजा जसवंतससिंह हा बाहेरून आज्ञािारक असल्याचा आव आणत होता पण काहीतरी खोडी काढण्याची संिी शोित होता. बादशाहाने त्याला उजवी बाजू सांभाळण्याची जबाबदारी ददल्यावर तो ततथून बाहेर पडला आणण शूजाला ही मातहती दे ण्यासाठी गेला. रात्र संपल्यावर काही रजपूतांसोबत तो परतला आणण त्याआिी वाटे त असले ली मुहम्मद सुलतान याची छावणी त्याने लु टली. छावणीवर मोठी [१४] आपत्ती आली. भयंकर बातम्या पसरू लागल्या. खोडसाळ लोकांचे हात बादशाही सामान व

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३४

सरदारांच्या वस्तुंकडे गेले. बादशाहाला हे कळल्यावर तो जागचा हलला नाही. त्याचे जवळपास अिे सैन्य सगळीकडे तवखुरले होते तरी तनयतीवर तवश्वास ठे वून, कमी झाले ल्या सैन्यबलाकडे दुलम क्ष करून तो रणांगणात उतरला. आिीच्या ददवशी असले ली सैन्य रचना शूजाने त्या ददवशी बदलली व त्याचे सैन्य वेगळ्या प्रकारे उभे केले . दोन्ही बाजूंनी बाण, तोफा आणण बंदुकींचा वषामव सुरू झाला. या ददवशी बादशाही सैन्याला बरीच हानी सोसावी लागली; स्वतःकडे फक्त २००० घोडदळ उरले असताना बादशाहाने ज्या ददशेला लक्ष वळवले ककिंवा पाय रोवले , त्या बाजूला झाले ली हानी भरून तनघत होती. त्याची तनभमयता व आवेश बघून त्याच्या बहरामी सैतनकांनी प्रचंड वीरता दाखवत शत्रूचा इतका िुवा उडवला क़ी शूजाच्या सैन्याची फळी पार कोलमडली. तो रणांगणातून पसार झाला आणण बादशाही सैन्याला त्यांच्या कतृमत्वामुळे नव्हे तर केवळ दै वाने साथ ददल्यामुळे मोठे यश प्राप्त झाले . [१५] बादशाहाने यश दे णाऱ्याचे आभार मानले आणण खाजवा येथील तलावाजवळ असले ल्या शूजाच्या छावणीत सैन्याबरोबर जाऊन ततथेच तळ ददला. त्याच ददवशी त्याने पादशाहजादा मुहम्मद सुलतान याला शूजाच्या मागावर पाठवले आणण तो स्वतः मंगळवार, ११ जानेवारी १०५९ / २६ रतबउस्सनी १०६९ पयंत ततथेच रातहला. बुिवार, १२ जानेवारी १०५९ / २७ रतब-उस-सानी १०६९ ला तो खाजवाहून तनघाला आणण शुक्रवार, १४ जानेवारी १०५९ / २९ रतब-उस-सानी १०६९ ला तो गंगातीरी पोहोचला. त्यावेळी मुअज्जम खान आणण इतर सरदारांची पादशाहजादा मुहम्मद सुलतान याच्या सोबत जाण्यासाठी तनयुक्त़ी करून त्यांना ही शूजाच्या मागावर जायला सांतगतले गेले.

दारािा पाठलाग िालू ि शेख मीर व सफलशकन खान यांना दाराच्या मागावर जाण्याकरता ददले ल्या सैन्यबद्दल आता मी सांगतो. बुिवार, २२ सप्टें बर १६५८ / ४ मुहरमम १०६९ रोजी दाराचा पाठलाग करण्यासाठी सफलशकन खान मुलतानहून त्वरेने तनघाला व व्यास नदी ओलांडल्यावर त्याला कळले क़ी दारा आणखी पुढे गेला आहे. त्यामुळे खान आणखी पुढे गेला व शेख मीर व ददले र खानासाठी काही ददवस थांबल्यावर त्यांचे सैन्य त्याला येऊन धमळाले . दाराने भक्कर येथे नदी ओलांडली व आता तो शक्करला थांबला आहे अशी बातमी आली. बादशाही अधिकाऱ्यांनी तवचार केला क़ी शेख मीर व ददले र खानाने

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३५

नदी ओलांडून शक्करच्या ददशेने चाल करावी व सफलशकन खानाने त्याच्या सैन्याबरोबर नदीच्या अललकडू न भक्करकडे चाल करावी म्हणजे शत्रूला दोन्ही बाजूस असले ल्या सैन्याच्या कात्रीत पकडता येईल. दुसऱ्या ददवशी सफलशकन खान [१६] शेख मीरला सोडू न भक्करकडे तनघाला. शेख मीर ने दोन ददवसात नदी ओलांडली व शतनवार, २३ ऑक्टोबर १६५८ / ५ सफर १०६९ ला शक्कर पासून १२ कोसावर आला व २४ ऑक्टोबर १६५८ / ६ सफर १०६९ ला शक्करला पोहोचला. सफलशकन खान तीन ददवसांपूवीच भक्करला पोहोचला होता पण शेख मीर ततथे पोहोचण्याच्या आिी एक ददवस तो पुढे गेला. १८ ऑक्टोबर १६५८ / ३० मुहरमम १०६९ ला दारा त्याचे अवजड सामान भक्करच्या तकल्ल्यात टाकून खजजना व मौल्यवान सामान होडीने पाठवून स्वतः जंगलातून वाट काढत गेला होता असे कळाले . दाऊद खान व इतर सरदार त्याला सोडू न गेले होते. दाराला शक्करहून कंदाहारला जायचे होते पण सरदार सोडू न गेल्यामुळे व त्याच्या जनानखान्यातील बायकांनी त्याच्या या योजनेला नकार ददल्यामुळे तो तट्ट् याकडे तनघाला. सफलशकन खानाने भक्कर येथे आघर खानाजवळ थोडे लोक ठे वले व वेढा पक्का करण्यासाठी तो स्वतः लसतवस्तानकडे गेला. दारा तकल्ल्यापासून पाच कोसावर आहे व सफलशकन खानाने लवकर येऊन त्याच्या खजजन्याच्या होड्या आडवाव्यात असे सांगणारे, मुहम्मद सलीह तारखान या ततथल्या तकल्ले दाराचे पत्र आता त्याला धमळाले . खानाने त्याच्या नात्यात असले ल्या मुहम्मद मआसूम याला दाराच्या होड्यांपढ ु े जाऊन नदीकाठी पहारा दे ण्यासाठी काही लोकांसोबत पुढे पाठवले . तो स्वतः रात्री चाल करून दाराच्या सैन्यासमोरून तीन कोसांवरून पुढे गेला आणण शत्रूच्या होड्यांसाठी थांबला. त्याला नदी पार करून शत्रूवर चाल करायची होती. सफलशकन खानाच्या होड्यांना तवरोि करत दाराच्या होड्या जेव्हा पुढे आल्या, तेव्हा त्याने मुहम्मद सालीहकडे तनरोप पाठवला क़ी दाराला तवरोि करत होड्या पलीकडच्या बाजूला पाठवाव्यात. पण हा आदे श लक्षात घेऊन तो पाळण्याची दै वी समज मुहम्मद सालीहकडे नसल्यामुळे त्याने सांतगतले क़ी या बाजूस [१७] कंबरे इतकेच पाणी आहे त्यामुळे होड्या त्या बाजूनेच जातील; म्हणून सफलशकन खानाने नदी ओलांडली नाही. दुसऱ्या ददवशी पलीकडच्या तीरावर िुराळा उडाल्यावर लक्षात आले क़ी दारा चाल करून त्याच्या होड्या त्या बाजूला उतरवत होता. मुहम्मद सालीहच्या दुटप्पीपणामुळे एक मोठा तवजय हातातून तनसटला.

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३६

थोडक्यात, दाराने लसतवस्तानची छोटी टे कडी पार केली व सफलशकन खानाने नदीच्या त्या बाजूने जात त्याचा पाठलाग करत दोन पडाव गाठले . शेख मीर याने पलीकडच्या तीरावर येत तनरोप पाठवला क़ी सफलशकन खान नदी ओलांडून त्याच्या बाजूला आला तर दोघांना एकत्र पाठलाग करता येईल. म्हणून सफलशकन खानाने नदी ओलांडली व त्याला कळले क़ी दारा तट्ट् याला पोहोचला आहे व आता गुजरातकडे जाणार आहे. सफलशकन खान घाईने चाल करून शेख मीर च्या आिी तट्ट् याला नदी पासून एका कोसावर आला, पण दारा नदी पलीकडू न गुजरातकडे गेला होता. सफलशकन खानाने सात ददवसात पुल बांिन ू नदी पार केली. तोवर शेख मीर, ददले र खान व सफलशकन खान यांना दाराचा पाठलाग सोडू न परत येण्याचा बादशाहाचा आदे श आला. बादशाहाला जेव्हा कळले क़ी दारा गुजरातला गेला आहे तेव्हा तो आलाहाबादहून परतला. शतनवार, १५ जानेवारी १६५९ / १ जमादउल-अव्वल १०६९ ला मुहम्मद सुलतानच्या सैन्याने आलाहाबाद घेतल्याचे त्याला कळले . दाराशी हात धमळवणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जसवंतससिंहाला अद्दल घडवणे आवश्यक असल्यामुळे त्याने घाटमपूरहून मीर बक्षी मुहम्मद आमीन खान याच्या बरोबर १६ जानेवारी १६५९ / २ जमाद-उल-अव्वल १०६९ ला त्याचा पराभव करण्यासाठी नऊ हजाराचे सैन्य पाठवले . जसवंतससिंहाला अद्दल घडवण्यासाठी [१८] व दाराला पराभूत करण्यासाठी त्वररत चाल करायची इच्छा असल्यामुळे बादशाहा आग्र्याला न जाता शुक्रवार, ४ फेब्रुवारी १६५९ / २१ जमाद-उल-अव्वल १०६९ ला नूरमंजजल बागेतून अजमेरकडे तनघाला. ८ फेब्रुवारी १६५९ / २५ जमाद-उल-अव्वल १०६९ ला जेव्हा तो रूपबासच्या लशकारगृहाहून तनघाला तेव्हा दाराचा पाठलाग सोडू न परतले ले शेख मीर खान व ददले र खान त्याला येऊन धमळाले . सैन्य परतल्यानंतर दाराला मोकळीक धमळाली, त्यामुळे तो जंगलात घुसून कच्छला आणण ततथून गुजरातला गेला. बादशाहाची ददवंगत पत्नी ददलरस बानू बेगम चे वडील शाहनवाज खान सफावी, याला बादशाहाने त्या प्रांताचा सुभेदार नेमले होते, पण अतवचारामुळे तो दाराला धमळाला. गुजरात मध्ये एक मतहना आणण सात ददवस काढल्यावर दाराने बावीस हजार घोडदळ जमवले आणण १४ फेब्रुवारी १६५९ / १ जमादउस-सानी १०६९ ला तो ततथून तनघाला. वाटे त असतानाच त्याला अजमेरला येण्याचे

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३७

आमंत्रण दे णारी जसवंतससिंहाची पत्रे धमळाली. त्यामुळे पुढे कूच करण्यासाठी त्याला उत्साह आला. रतववार, २० फेब्रुवारी १६५९ / ७ जमाद-उस-सानी १०६९ ला बादशाहाचा तळ कहिंदौन येथे होता आणण इथून तनघाल्यावर तुडा गावापयंत तो कुठे ही थांबला नाही. बादशाहाच्या आदे शानुसार मुराद बक्षला ददल्लीहून ग्वाल्हेरला घेऊन जाणारा शेख मीर याचा भाऊ अमीरखान, सोमवार, २८ फेब्रुवारी १६५९ / १५ जमाद-उस-सानी १०६९ ला, हा बादशाहाला येऊन धमळाला.

दाराशी दुिरे युद्ध आणण त्यािे पलायन अजमेरला पोहोचल्यावर दाराने युद्धाची तयारी केली. बुिवार, ९ माचम १६५९ / २४ जमाद-उस-सानी १०६९ ला बादशाहाचा पडाव रामेश्वर तलावापासून ६ कोसावर होता [१९] आणण ततथे त्याने युद्धासाठी सैन्याच्या फळ्या उभ्या करायचे आदे श ददले . जसवंतससिंह येणार या आशेवर दारा िाडस दाखवत होता. तेव्हा राजा रायससिंह याने पापी जसवंतससिंहावर दया दाखवत बादशाहाला त्याच्या दुवमतमनाबद्दल क्षमा करायला सांगून त्याला तसे पत्र ललहून दाराला सामील होण्यापासून परावृत्त केले . त्याला ते धमळाल्यावर जोिपूरहून वीस कोसावर असताना तो परत तफरला. दाराने त्याला बोलवायचा प्रयत्न करण्यासाठी त्याच्या मुलाला, लसतपहर शुकोहला त्याच्याकडे पाठवले पण काही उपाय झाला नाही. तोवर बादशाही सैन्य अजमेर जवळ आले होते त्यामुळे दाराला युद्धाला तोंड दे णे भाग होते. पण मोकळ्या मैदानात बादशाही सैन्याला सामोरे जाण्याचे सामथयम नसल्यामुळे त्याने अजमेरच्या खखिंडीत पाय रोवले . अमजेर पासून ३ कोसांच्या अंतरावर असले ल्या दे वराई येथे बादशाही सैन्य थांबले . दाराचा तळ ततथून थोड्याच अंतरावर होता. दुसऱ्या ददवशी बादशाही सैन्य अिाम कोस पुढे जाऊन थांबले . शत्रूला बाहेर खेचण्यासाठी बादशाहाने तोफखाना पुढे पाठवला. त्याला शत्रूने तोफा व बंदुकींच्या माऱ्याने उत्तर ददले . त्या ददवशी आणण रात्रीच्या ततसऱ्या प्रहरापयंत दोन्ही सैन्यात चांगले च युद्ध जुंपले . शाहनवाज खान सफावी, मुहम्मद शरीफ [२०] दाराचा मीर बक्षी व इतर काही सरदार कामी आले . बादशाहाच्या बाजूने लढणारा शेख मीर बंदुक़ीची गोळी छातीतून गेल्यामुळे मेला पण त्याच्या मागे बसले ला त्याचा सहकारी मीर हाशीम, याने त्याला

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३८

हत्तीच्या हौद्यावर हाताने िरून ठे वल्यामुळे युद्ध संपे पयंत कोणाला ते कळले नाही. बादशाही सैन्याचे शौयम बघून व स्वतःच्या सैन्याची फळी सुब्स्थतीत असतानाही दारा मागे तफरला व गुजरातला गेला. दे श आणण लोकांना इतके प्रचंड यश प्राप्त झाले . हे कळल्यावर बादशाहाने यश दे णाऱ्या ईश्वराचे आभार मानले . या बादशाहाला एका वषमभरात राज्यासाठी कराव्या लागले ल्या मोठ्ा युद्धां इतक़ी युद्धे व राजनैततक झगडे अगदी थोड्याच राजांना करावे लागले असतील. पण दै वाची साथ लाभल्यामुळे, तसेच त्याचे बाहुबल व तलवारीची िार यामुळे त्याला सगळीकडे यश धमळाले . पण त्याचे शौयम आणण तत्परता इतक़ी उत्तम असतानाही तो अत्यंत तवनयशील होता. या यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता तो नेहमी त्याला ईश्वरी कृपेचा चमत्कार म्हणत असे आणण सतत तनमामत्याचे आभार मानत अल्लाह वर असले ली भक्त़ी, प्रेतषताने स्थापन केले ल्या शरीयाची अंमलबजावणी तसेच अवैि व अनैततक प्रथांचे तनमूमलन या सगळ्यामुळे ते झाल्याचे म्हणत असे. [२१] इतके वैभव व सामथयम असूनही एक क्षणही त्याने तवसावा घेतला नाही ककिंवा शरीराला मरगळ येऊ ददली नाही, तर सदै व सतकम राहून, ईश्वराची भक्त़ी करून, न्याय करून, लोकांच्या भल्यासाठी काम करून, शेतकरी व सैतनकांकडे लक्ष दे त, तसेच न्याय व समानता या तनयमांचे पालन करत ससिंहासनाला झळाळी प्राप्त करून ददली. या िममतनष्ठ बादशाहाच्या राजवटीमुळे भौततक व अध्यास्त्मक तवश्वे सतत तेजाने झळकतील अशी मी आशा करतो. दुसऱ्या ददवशी, सोमवार, १४ माचम १६५९ / २९ जमाद-उस-सानी १०६९ ला त्याने राजा जयससिंह व बहादुरखान यांना दाराचा पाठलाग करायला िाडले आणण दाराचा िोका टळल्यामुळे शुक्रवार1, १८ माचम १६५९ / ४ रज्जब १०६९ ला तो अजमेर येथून परतीच्या मागामला लागला. पादशाहजादा मुहम्मद सुलतान याने बातमी आणली क़ी शाह शूजा काही ददवस मुंगीरला तळ दे ण्याचा तवचार करून थांबला होता पण बादशाही सैन्य येईल या भीती पोटी जहांगीरनगरकडे गेला व मुअज्जम खान याने मुग ं ीरच्या तकल्ल्यात प्रवेश केला. गुरूवार, ७ एतप्रल १६५९ / २४ रज्जब १०६९ ला बादशाहा फतेहपूरला पोहोचला व मंगळवार, १९ एतप्रल १६५९ / ६ शाबान १०६९ ला ददल्लीकडे तनघाला. मुहम्मद 1

इंग्रजी अनुवादात इथे चुकून सोमवार असे ददले आहे. तप.जं. प्रमाणे शुक्रवार आहे.

अध्याय १

उत्तराधिकाराचे युद्ध सुरू होते

३९

सुलतानाच्या बातम्यांवरून कळले क़ी शाह शूजा राजमहल येथे गेला होता पण बादशाही सैन्य त्या शहरात पोहोचल्यावर त्याने त्याचे सामान होड्यांमध्ये लादले होते, त्यामुळे आता राजमहल सुद्धा बादशाही सैन्याकडे आले होते. बातमी आली क़ी अजमेर सोडल्यावर गुजरात (अहमदाबाद) पुन्हा जजिंकण्यासाठी दारा ततथे गेला पण स्थातनक तुकडीतील एक अधिकारी सरदार खान, याने [२२] त्याला तवरोि केला. यामुळे शहर जजिंकण्याचा प्रयत्न सोडू न दे ऊन दारा आश्रयासाठी कान्हजी कुलीला गेला. सोमवार, २ मे १६५९ / १९ शाबान १०६९ ला1 बादशाहा खखज्राबादच्या महालात पोहोचला. ततथे तो आकरा ददवस थांबला व गुरुवार, १२ मे १६५९ / २९ शाबान १०६९ ला त्याने ददल्लीच्या तकल्ल्यात प्रवेश केला.

1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४०

अध्याय २ दुसरा राज्याणभषेक, मे १६५९ पतहल्या राज्याणभषेकाच्या (मंचकारोहण) वेळी पंजाबची स्वारी आणण वेळेची कमतरता यामुळे समारंभ आटोपता घ्यावा लागला होता. त्यामुळे खुतब्याचे वाचन, नाणी पाडणे आणण बादशाहाने िारण केले ल्या नावाची घोषणा यासारख्या गोष्टी पुढे ढकलल्या होत्या. आता मोतहमेचे काम पूणम झाल्यामुळे त्याने त्याच्या अधिकाऱ्यांना राज्याणभषेकाची तयारी करायचे आदे श ददले आणण त्यांनी ही शक्य होते ते सगळे केले . रतववार, ५ जून १६५९ / २४ रमजान १०६९ रोजी, बादशाहाचे वय ४० वषम ७ मतहने १३ ददवस (सौयम) ककिंवा ४१ वषम १० मतहने व २ ददवस (चांद्र) इतके असताना तो ससिंहासनावर बसला ... [२३] एका सुवचनी खाततबाने मंचावरून एक प्रभावी खुत्बा वाचला आणण

त्याला उपहारांनी उपकृत करण्यात आले . बादशाहाच्या नावाने सोन्याची व चांदीची इतक़ी नाणी वाटली गेली क़ी ती उचलणाऱ्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूणम झाल्या. दरबारातील लोकांनी बादशाहाला आदराने अणभवादन करत त्याची प्रशंसा केली व त्याच्या (भल्या) साठी प्राथमना केली. बादशाही खजाना सवांसाठी उघडला गेला व लहान थोर, सवांची इच्छापूती झाली. पूवी अश्रफ़ी (सोन्याची नाणी) व रुपयांवर (चांदीची नाणी) कुराणातील कलमा छापला जायचा आणण या नाण्यांना लोकांच्या हाताचा व पायाचा स्पशम होत असे. (हे टाळण्यासाठी) नाण्यांवर वेगळे शब्द छापले तर बरे होईल असे औरंगजेबाने सांतगतले . त्यावेळी मीर अब्दुल बाक़ी, उपनाम सुहबाई, याने स्वतः रचले ल्या ओळी दाखवल्या –

ّ ‫بدر منن‬ ِ ‫سکه زد در جهان چو‬ ‫شاه اورنگزيب عالمگن‬ पौर्णिंमेच्या चंद्रासम प्रकाशमान अशी या जगात पाडले ली नाणी शाह औरंगजेब आलमगीर

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४१

बादशाहाला हे आवडले व त्याने आदे श ददला क़ी मोहर (अश्रफ़ी) व रुपयाच्या एका बाजूस हे वचन व दुसऱ्या बाजूस नाणे जजथे पाडले गेले त्या शहराचे नाव आणण राजवटीचे वषम छापावे. शासक़ीय लशक्क्यावर बादशाहाची उपािी अबुल जफर मुतहउद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर पादशाह गाझी अशी छापण्याचा आदे श ददला गेला. राज्याणभषेकाची बातमी दे णारी तसेच [२४] सवांचे सौख्य व सुरक्षेची आनंदवाताम दे णारी आज्ञापत्रे राज्याच्या सवम प्रांतात पाठवायचा आदे श ददला गेला. बादशाहाने पादशाहजादे , बेगम व शाही दाशांना मुक्त हस्ताने मोठी बणक्षसे ददली. सवम नामदार व इमानी सेवकांना त्यांच्या पदांप्रमाणे बढत्या धमळाल्या. श्रद्धाळू व िममतनष्ठ, कवी, कलाकार व गायक अशा सवांना सुयोग्य बणक्षसे व भेटवस्तू धमळाल्या. लोकांनी अनेक वषांपासून बाळगले ल्या इच्छा आकांशा पूणम होण्यासाठी, शक्रवार, १९ ऑगस्ट १६५९ / १० जजल्हेज १०६९ (ईद-उज-जुहा1) पयंत हे समारंभ चालू ठे वावेत व शेवटच्या ददवशी त्याची सांगता करावी, असा बादशाहाने आदे श ददला.

ّ )2 या बदकशानचा मुल्ला शाह याने राज्यणभषेकाचे वषम जजल्ल-अल-हक (‫ظل الحق‬ कालश्ले षात मांडले . आणखी एका तवद्वानाने या प्रसंगाची तारीख ‘पादशाह-ई-मललक-ई-हफ्तइक्लीम’ (‫ملک هفت اقليم‬ )3 या कालश्ले षात तर ततसऱ्याने ‘झेब अवरंग व ِ ِ ‫پادشاه‬ ताजहा-ए-शहान’ (‫)زيب اورنگ و تاجهاء شهان‬4 या कालश्ले षात दाखवून ददली. इस्फाहानचा मुल्ला ताक़ी [२५] याचा मुलगा, मुल्ला अझीझुल्लाह, याने ‘आन-अल-

1 2

इंग्रजी अनुवादात इथे ‘Id-uz-buha’ ददले आहे. ही टं कले खनातील चूक असावी. ‘सत्याची सावली’ असा याचा अथम होतो. ‘हक’ (‫ )حق‬या शब्दाचा इथे अणभप्रेत असले ला अथम जरी ‘सत्य’ असा असला तरी याचा आणखी एक अथम ‘मृत्यू’ (अंततम सत्य या अथी) असाही आहे. स्टा. ४२५.

3

‘तवश्वाचा स्वामी’ असा याचा अथम होतो. ‘हफ्त इक्लीम’ म्हणजे ‘संपूणम जग’. स्टा. ८८.

4

इंग्रजी अनुवादात इथे ‘Zeb-i-aurang wa taj-i-padishahan’ असे ददले आहे पण फासी पाठात ‘झेब अवरंग व ताजहा-ए-शहान’ असे आहे. इथे शहान च्या ऐवजी पादशहान िरले तर कालश्ले षातून अपेणक्षत वषम धमळत नाही. ‘ससिंहासनाचा अलं कार व राजांमिील सवमश्रेष्ठ’ असा याचा अथम आहे. स्टा. ६३२, ११९, २७३, ७२६.

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४२

ٓ َ َ ْ ُ ‫ ِّ ُ َ ه‬1 मललक अल्लाही युततही मन यशाओ’ (‫يه َمن يشا ُء‬ ِ ‫ )ان الملک‬या ईश्वराच्या ِ ‫ٱَّلل يؤ ِت‬ (कुराणातील) शब्दात त्या वषामचा कालश्ले ष मांडला. बादशाहाला रमजान मतहन्यात (सुरवातीचे) तवजय धमळाले होते म्हणून दर वषी त्याच्या राजवटीच्या वषामची (जुलूस) सुरवात रमजान मतहन्याच्या पतहल्या तारखेपासून मोजावी असा त्याने आदे श ददला. आिीच्या बादशाहांनी फवमदीनचा पतहला ददवस, जमशीद व नौलशवामन, असा उत्सव साजरा करण्याची रीत पाडली होती. या िार्मिंक वृत्तीच्या बादशाहाने आदे श ददला क़ी पारसी नववषामतील नवरोज हा सण साजरा न करता त्याच्या जागी दर वषी रमजान मतहन्यात ईद-उल-तफत्र पयंत शासक़ीय उत्सव साजरा केला जावा आणण त्याला जश्ए-तनशात-अफ्रोज2 असे म्हटले जावे. तनतषद्ध (िममबाय) मानले ल्या प्रथा व चालींवर बंदी लागू करण्यासाठी तवद्वानांचा प्रमुख असले ल्या मुल्ला औज वजीह याला िममशास्ता नेमले गेले व त्याला वार्षिंक १५००० रुपये असा भत्ता न दे ता एक हजारी (१०० स्वार) अशी मनसब ददली गेली. ईश्वराची कृपा आहे क़ी बादशाहाच्या या िार्मिंक वृत्तीमुळे आता तरी कहिंदुस्तानात नातवन्याची व पाखंडीपणाची घाण ददसणार नाही. तेव्हा बंगालच्या बातम्यांवरून बादशाहाला कळले क़ी शूजाचा पराभव करण्यासाठी मुअज्जम खान याच्या बरोबर नेमले ला पादशाहजादा मुहम्मद सुलतान, शूजाच्या धचथावणीला बळी पडू न बुिवार, ८ जून १६५९ / २७ रमजान १०६९ ला काही सेवकांना बरोबर घेऊन होड्या घेऊन गेला आणण शूजाला जाऊन धमळण्याच्या हेतूने बादशाहीला तवरोि करण्याची भूधमका घेतली होती.

1

हा कालश्ले ष फासीत नसून अरबीत आहे. यातील ‘अल्लाह युततह मन यशाओ’ हा भाग कुराणातील सुराह ६२ आयत ४ मिून घेतला आहे म्हणून याला ईश्वराचा शब्द म्हटले आहे. याचा

2

अथम ‘अल्लाहची इच्छा असते त्याला तो दे तो’ असा आहे. इंग्रजी अनुवादात इथे ‘nishat-afroz jashan’ असे म्हटले आहे पण फासी पाठात ‘जश्-एतनशात-अफ्रोज’ म्हणजे ‘प्रकाशमान करणारा उत्सव’ असे ददले आहे.

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४३

दारा शुकोहिे दै व १० जून १६५९ / २९ रमजान १०६९ ला दादरचा [२६] जमीनदार, मललक जजवान याने दारा शुकोह व त्याचा मुलगा लसतपहर शुकोह यांना बंदी बनवल्याचे व मललकचे पत्र धमळाल्यावर बहादुर खान याने त्वरेने जाऊन दोघांचा ताबा घेतल्याची बातमी शतनवार, २ जुलै १६५९ / २१ शव्वाल १०६९ ला दरबारास धमळाली. अमीर-उलउमराला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्या हाताखाली दख्खनचा सुभेदार नेमले गेले, अतकदत खान याला अक़ील खानाच्या हाताखाली दौलताबादचा तकल्ले दार नेमले गेले. तो व वजीर खान यांना पादशाहजाद्याबरोबर दरबारास उपब्स्थत राहण्यास सांतगतले गेले. शतनवार, २ जुलै १६५९ / २१ शव्वाल १०६९ ला पादशाहजादा मुहम्मद आजम याचा सहावा (सौर वषामप्रमाणे) वाढददवस होता. त्याला एक रत्नजधडत लशरपेच, मोत्यांचा पट्टा असले ली कट्यार व पाच घोडे भेट ददले . मललक जजवान याला दाराला पकडल्याबद्दल मानाची वस्त्रे व एक हजारी (२०० स्वार) तसेच बब्ख्तयार खान ही उपािी ददली गेली. मुनशी कातबल खान याला तनवृत्त व्हायचे होते, त्याला वार्षिंक ५००० रुपये ददले गेले. श्रीनगरचा जमीनदार पृथवीपत याला प्रलोभने दे ऊन ककिंवा भीती दाखवून सुलैमान शुकोह याला बादशाही सैन्याच्या स्वािीन करायला भाग पाडावे यासाठी राजा राजरूप याला ततथल्या डोंगरात पाठवले गेले. बंगाल मिून बातमी आली क़ी अकबरनगरहून तांड्याला जाताना शाह शूजाला आललवदी खानाच्या वागण्यावरून शंका आली क़ी तो त्याला सोडू न जाणार आहे त्यामुळे त्याने त्याला व त्याचा मुलगा सैफुल्लाह यांना मारून टाकले . यावेळी आग्र्याच्या तकल्ल्या भोवती शेरहाजी भभिंत (अधिक सुरक्षेसाठी) बांिण्याचा आदे श ददला व इततबार खानाच्या दे खरेखीत हे काम तीन वषामत पूणम करण्यात आले . मंगळवार, २ ऑगस्ट १६५९ / २३ जजल्कदा १०६९ ला चांद्र वषामप्रमाणे बादशाहाच्या ४२ व्या वाढददवसातनधमत्त त्याची सुवणमतुला करण्यात आली व गरीबांना सोने वाटण्यात आले , तसेच जवळच्या लांबच्या सगळ्या लोकांना मानाची वस्त्रे, बढत्या तसेच जडजवाहीर, घोडे व हत्ती असे उपहार दे ण्यात आले . [२७] या समयी बहादुर खानाने दारा शुकोहला दरबारात सादर केले . त्याला

खखज्राबादच्या वाड्यात ठे वले गेले. तवतवि कारणांसाठी जगाच्या पटलावरून त्याच्या (दारा) जीवनाची िूळ दर करण्याची आवश्यकता असल्यामुळे मंगळवार, ३० ऑगस्ट

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४४

१६५९ / २१ जजल्हेज १०६९ ला रात्री त्याच्या आयुष्याचा ददवा तवझवला गेला व त्याला हुमायूनच्या थडग्यात पुरले गेले. लसतपहर शुकोह याला ग्वाल्हेरच्या तकल्ल्यात पोहोचवण्याची जबाबदारी सैफ खानाला ददली गेली व ततथून परतल्यावर त्याला आग्र्याच्या तकल्ल्याची तकल्ले दारी घेण्यास सांतगतले गेले. बहादुर खान पुढे तनघून आल्यावर, मागे पडले ला राजा जयससिंह दरबारास आला व त्याचा यथोधचत सन्मान केला गेला. राजा व बहादुर खानाने लांबचे पल्ले गाठत चाल केली होती त्यामुळे त्यांचे अनेक घोडे कामी आले होते म्हणून बादशाहाने उदार मनाने राजाला २०० व खानाला १०० घोडे ददले . यावेळी त्याच्या (बादशाहाच्या) नेहम े ीच्या उदारतेमुळे िान्य व इतर सामग्रीवरील राहदारी बंद केला गेली. यासाठी खालसा मुलुखातून वार्षिंक २५ लक्ष रुपयांच्या महसूलाचा त्याग केला गेला. संपूणम साम्राज्यात तकती मोठ्ा रकमेचा कर सोडू न ददला असेल त्याची कल्पनाही करता येणार नाही. यावेळी झुब्ल्फकार खान करामानलू 1 मरण पावला. त्याचा मुलगा आसदखान व जावई नामदार खान यांना बादशाहाने मोठ्ा मनाने मानाची वस्त्रे दे ऊन त्यांचे सांत्वन केले . दादरचा जमीनदार बब्ख्तयार खान, याला त्याच्या प्रांतात परत पाठवले गेले. कुत्बउल-मुल्कच्या हाताखाली काम करताना मुअज्जम खानाने कनामटक जजिंकले होते. खानाच्या माणसांनी कांजी कोटा (गांडीकोटा) [२८] हा ततथला तकल्ला त्यांच्याकडे ठे वला होता पण कुत्ब-उल-मुल्क याने तो त्याच्याकडे घेतला. मीर अहमद ख्वाफ़ी याला मुस्तफा खान ही उपािी दे ऊन या प्रांतावर शासन करण्यासाठी पाठवले गेले. काबुलहून बातमी आली क़ी सआदत खानाचा मुलगा व ददवंगत तर्बिंयत खान याचा नातू शेरुल्लाह (शेर बेग) याने त्याच्या वधडलांना कट्यारीने मारले . बादशाहाने महाबतखानास त्याला अटक करण्याचा आदे श ददला व ददवंगत माणसाच्या जागी शमशीर खानाला काबुलचा तकल्ले दार नेमले . तुरान प्रदे शातून बातमी आली क़ी बाल्खचा राजा, सुभान कुली खान व त्याचा भाऊ कालसम सुलतान, ज्याच्याकडे तकल्ल्याचे अधिकार होते, यांच्यातील प्रेमाचे रूपांतर

1

हा इराण ककिंवा तुकी मिील करामन प्रांताचा रतहवासी असावा. फासी पाठात याचा उल्ले ख करामानलू असा केला आहे. स्टा. ९६६.

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

दारा शुकोह िे मुंडके औरंगजेबािमोर दरबारात िादर करताना (साभार BnF)

४५

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४६

भांडणात झाले व सुभान कुली खान याने काहीतरी युक्त़ी करून त्याचा काटा काढला होता. पादशाहजादा मुहम्मद सुलतान याचे शुजाच्या गोटात जाणे हे बंगालच्या सैन्यासाठी फार मोठे संकट होते. मुअज्जम खान त्या सैन्याचे नेतृत्व करत असल्याने बादशाहाला आश्वस्त वाटत असले तरी आयुष्याच्या ४१ व्या सौर वषामची सुरवात होताना केले ल्या तुला समारंभात ददले ल्या भेटवस्तुंमळ ु े जेव्हा लोकांच्या आशा अपेक्षा पूणम झाल्या तेव्हा रतववार, १३ नोव्हेंबर १६५९ / ८ रतब-उल-अव्वल १०७० ला सावितगरीचा उपाय म्हणून तो गंगेकाठी जाण्यासाठी सैन्यासतहत बाहेर पडला. राजा जयससिंह याला एक लक्ष रुपयाची भेट ददली गेली व राजा जसवंत ससिंह याला क्षमा करून महाराजा उपािी पुन्हा बहाल केली गेली. ददवंगत मीर नुमान याचा मुलगा मीर इब्रातहम, याला मक्का व मदीनेच्या शरीफांकडे सहा लक्ष तीस हजार रुपयांच्या वस्तु पोहोचवण्यासाठी नेमण्यात आले . गुरुवार, २४ नोव्हेंबर १६५९ / १९ रतब-उल-अव्वल १०७० ला बादशाहा गढमुक्तेश्वरला पोहोचला. रतववार, २७ नोव्हेंबर १६५९ / २२ रतब-उल-अव्वल १०७० ला मुहम्मद मुअज्जम याने दख्खनहून आले ल्या वजीर खानासोबत [२९] बादशाहाची भेट घेतली. मंगळवार, २० धडसेंबर १६५९ / १५ रतब-उस-सानी १०७० ला पादशाहजाद्याचा (मुअज्जम) तववाह खुरासनच्या एका उच्चकुलीन मुलीशी करण्यात आला. शतनवार, ७ जानेवारी १६६० / ४ जमाद-उल-अव्वल १०७० ला बादशाहाने गढमुक्तेश्वरहून आलाहाबादकडे चाल केली. त्याच वेळी मुअज्जम खानाकडू न बातमी आली क़ी शूजाशी युद्ध संपवण्याच्या हेतुने त्याने गंगा पार केली आहे पण तांडा येथील सैन्याचा तळ सोडू न शूजा ढाक्याकडे गेला. बादशाहाच्या या चालीचा उद्दे श बंगालमिील सैन्य प्रबळ करणे हा होता आणण त्याबद्दल आता त्याचे मन आश्वस्त झाल्यामुळे तो शम्साबादहून1

1

इंग्रजी अनुवादात शम्साबाद मऊ (Mau) असे म्हटले आहे पण फासी पाठात शम्साबाद असा उल्ले ख आहे. जदुनाथ सरकारांना जर उत्तरप्रदे श मिील मऊ आणण आजमगढ यांच्या मध्ये असले ले शम्साबाद अपेणक्षत असेल तर ते दठकाण गढमुक्तेश्वरहून आलाहाबाद (प्रयागराज) च्या वाटे वर येत नाही. त्यामुळे हे स्थान गंगेच्या दणक्षण तीरावर, फरुम खाबाद जजल्यातील शम्साबाद असण्याची शक्यता अधिक वाटते. आग्रा शहराच्या थोडे दणक्षणेस ही एक शम्साबाद आहे पण ते सुद्धा उपयुमक्त वाटे वर येत नाही.

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४७

ददल्लीकडे परतला व सोमवार १३ फेब्रुवारी १६६० / ११ जमाद-उस-सानी १०७० ला तकल्ल्यात प्रवेश केला. सामूतहक नमाजाचे अतनवायम कायम करता यावे असे या िममशील बादशाहाला वाटत होते म्हणून त्याच्या तवश्रामाच्या जागे शेजारी त्याने एका लहान संगमरवरी व पानाफुलांचे तसेच इतर नक्षीकाम असले ल्या मलशदीचे बांिकाम सुरू केले . याचे काम पाच वषांनी पूणम झाले व यावर एक लक्ष साठ हजार रुपये खचम झाले . अक़ील खान याने

अध्याय २

दुसरा राज्याणभषेक, मे १६५९

४८

َ َّ ْ ََ َ (‫‘ )ان ال َم َساجد هلل فلتدع ُوا َم َع هللا‬आन्न-उल-मसाजजद-अल्लाह फला तद्दउआ-माआल्लाह’ या पतवत्र पंक्त़ीत या घटनेचा कालश्ले ष प्रस्तुत केला. यावेळी बंगालहून बातमी आली शूजा दख्खनला पळाला तेव्हा पादशाहजादा मुहम्मद सुलतान [३०] याला पश्चात्ताप झाल्याने तो जजथून गेला होता त्या अकबराबाद येथेच तो परतला व इस्लाम खानाला धमळाला. गुजब म दामर मुहम्मद मीरक याने बादशाहा तफे त्याच्यासाठी वस्त्र व काही दुर्मिंळ वस्तु नेल्या तसेच पादशाहजाद्याला दरबारात घेऊन येण्याचा आदे श तफदाई खानाला ददला गेला. तो राजिानी जवळ आला तेव्हा गुरुवार, २६ एतप्रल १६६० / २५ शाबान १०७० ला आलाह यार खान याने होडीतून त्याला सलीमगढला नेले व त्याला मुआतमाद खानाच्या सुपूतम केले गेले.

अध्याय ३

१ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१

४९

अध्याय ३ राजवटीचे ततसरे वषम - तहजरी १०७०-७१ १ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१ आता रमजानचा मतहना सुरू झाला. गुरुवार, २४ मे १६६० / २४ रमजान १०७० तहजरी रोजी एक आकषमक आणण भव्य दरबार भरला होता व आनंददायी संगीत वाजवले जात होते. या शुभ ददवशी बंगालहून बातमी आली क़ी ढाक्याला थांबणे अशक्य झाल्याने रतववार, ६ मे १६५९ / ६ रमजान १०७० ला शूजा रखांग1 येथे पळू न गेला आहे आणण मुअज्जम खानाने ढाक्यात प्रवेश केला आहे. दुसऱ्या मंचकारोहणाची ततथी २४ रमजान, रोजी उत्सव सुरू करून ईद-उलतफत्र पयंत चालू ठे वावा असा आदे श दे ण्यात आला होता. या काळात दरबारातील सवम अधिकारी, जवळचे व लांबचे, [३१] लहान थोर, सगळ्यांना बादशाहाकडू न भेटवस्तू दे ण्यात आल्या. ईदच्या ददवशी बादशाहा मलशदीत गेला व ईद नंतर दोन ददवसांपयंत उत्सव व जेवणावळी चालू होत्या. आता मी दरबारातील घटनांचा वृतांत दे तो पण या लहान पुस्तकात बंगाल मिील घटनांच्या इततहासाचे तसेच जानेवारी १६५९ मध्ये आलाहाबादहून (काशी) पादशाहजादा मुहम्मद सुलतान व मुअज्जम खान यांच्या नेतत्ृ वाखाली शूजाचा पाठलाग करण्यासाठी नेमले ल्या सैन्याचे अपार कष्ट, या सगळ्याचे संणक्षप्त वणमन ही मावणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा सतवस्तर वृतांत दे ण्याचा प्रयत्न मी सोडू न दे तो. इथे इतकेच सांगणे पुरेसे आहे क़ी बादशाही सैन्य त्याच्यावर चालू न गेले त्यामुळे शूजावर इतका दबाव आला क़ी सय्यद आलम बादहकश, हा बरहा येथील एक सय्यद तसेच सय्यद कुली उझबाक आणण याच्या बरोबर असले ले बारा मुघल व काही इतर लोक, हे वगळता इतर कोणीही त्याला वाचवू शकले नाही. अत्यंत दुघमट प्रदे श पार करत तो रखांग मिील एका

1

इंग्रजी अनुवादात इथे आराकन म्हटले आहे. हा आजच्या म्यानमार मिील रोकहिंग्यांची वस्ती असले ला ‘राखीन’ प्रदे श. फासी पाठात याचा उल्ले ख रखंग (‫ )رخنگ‬असा आला आहे. फासी शब्दकोशात याचा उल्ले ख रखांग (‫ )رخانگ‬असा आहे (स्टा. ५७१).

अध्याय ३

१ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१

५०

भयंकर बेटावर पोहोचला जजथे कातफरांच्या दे शात तो त्यांच्या कचाट्यात सापडला. त्याचे पुढचे तवधिललखखत योग्य दठकाणी ददले जाईल. रतववार, १५ जुलै १६६० / १७ जजल्कदा १०७० ला चांद्र वषामप्रमाणे बादशाहाच्या ४४ व्या वाढददवसाला त्याची तुला केली गेली. लोकांना भेटवस्तू दे ण्यात आल्या. पादशाहजाद्यांवर बादशाही कृपेचा वषामव झाला. बंगालचा अधिकारी मुअज्जम खान [३२] याला शूजाचा पराभव केल्याबद्दल खान-इ-खानान व लसपेसालार या उच्च उपाध्या दे ण्यात आल्या तसेच सात हजारी (सात हजार दोअस्पा व सेहअस्पा), मानाची वस्त्रे आणण रत्नजधडत तलवार अशी बणक्षसे ददली गेली. बंगालला पाठवले ल्या सैन्यातील अधिकारी, प्रतततनिी व दरबारी यांना सवम प्रकारची बणक्षसे व सवलती दे ण्यात आल्या. काही कारणांमुळे नजाबत खानावर बादशाहाची अवकृपा झाली होती. त्याला क्षमा केली गेली व तलवारीची भेट दे ऊन त्याचा सन्मान केला गेला. काशगरचा प्रमुख अब्दुल्ला खान याच्या भीतीमुळे त्याचा भाऊ मनसूर व त्याचा मुलगा माहदी हे बदक्शान मागे भारतात आले व बादशाही सेवेत रूजू झाले . बेगम सातहब व इतर बेगम व पादशाहजाद्यांनी ददले ल्या भेटवस्तू, ज्यामध्ये रत्ने, रत्नजधडत वस्तु होत्या, बादशाहाला ददल्या गेल्या व त्याने त्या स्वीकारल्या. ७ ऑगस्ट १६६० / १० जजल्हेज १०७० रोजी आनंददायी ईद-उज-झुआच्या तनधमत्ताने अनेकांना शाही बणक्षसे वाटण्यात आली. तबकानेरचा राव कणम भूर्तिंया दाराच्या धचथावणीमुळे परवानगी न घेता दख्खनहून घरी परतला होता. त्या घाबरले ल्या व अपमातनत माणसाने क्षमा मातगतली तर त्याला सोबत आणण्यास व तसे न केल्यास तनदम यपणे त्याचे तनमूमलन करण्यासाठी आमीर खानाला ततथे पाठवण्यात आले . खान जेव्हा तबकानेरच्या सीमेवर पोहोचला तेव्हा राव त्याच्यासाठी बाहेर येऊन थांबला होता. खानाच्या मध्यस्तीने त्याला कृपाळू बादशाहा समोर आणले गेले व भेटवस्तू ददल्या गेल्या. रतववार, २ सप्टें बर १६६० / ७ मुहरमम १०७१ ला [३३] इखलास खान ख्वेशगी, ज्याने बंगालहून दातगने, जवातहर, खजजना व इतर वस्तु तसेच शूजाचा जनाना आणला होता, त्याने बादशाहाची भेट घेतली.

ٔ ‫بدفع‬ ‫صوبهدار دکن که‬ ‫بسیع امناالمرا‬ ‫واليت کوکن‬ ‫درين ّايام قلعه چاکنه از‬ ِ ِ ِ ّ ‫سيواي‬ ‫مزور مردود و ز‬ ‫حکومت‬ ‫بسبب انقالب در‬ ‫حصون واليتش که‬ ‫انن ِاع‬ ِ ِ ِ ِ

अध्याय ३

१ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१

५१

ٔ ّ ‫ز‬ ‫مترصف شده دستوري يافته بود‬ ‫عمده بيجاپوريان‬ ‫کشت افضل‬ ‫بيجاپور و‬ ِ ‫مردم آن مطرود را ز‬ ‫واجب داده تهانها نشاند‬ ‫ساي ی‬ ِ ‫مفتوح گشت و چند جا‬ त्या सुमारास कोकणात1 असले ला चाकणचा तकल्ला आमीर-उल-उमरा (शातहस्ता खान) याने जजिंकला. तवजापूरच्या प्रशासनातील बदलांमुळे (ऱ्हासामुळे) तसेच तवजापुरी सरदार अफजल याच्या हत्येमळ ु े , दुष्ट खोटारड्या लसवाने जजिंकले ल्या बळकट जागा पुन्हा जजिंकून घेण्यासाठी व लसवाला पराभूत करण्यासाठी दख्खनचा सुभद े ार, अमीर-उल-उमरा याला ततथे पाठवले गेले होते. खानाने लसवाच्या लोकांना कडक शासन करून काही दठकाणी चौक्या बसवल्या. यावेळी सौर वषामनुसार बादशाहाच्या ४३ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली व अनेकांवर बादशाही कृपादृष्टी झाल्याने ते उपकृत झाले . यावेळी एकही वार न करता पररिंडा धमळवता आला. घाललब नावाच्या ततथल्या आददलशाही तकल्ले दाराने बादशाही सेवेत येण्याच्या इच्छे ने अमीर-उल-उमरा (शातहस्ता खान) याला तकल्ला दे ऊ केला. अमीर-उल-उमरा ने मुख्तार खानाला ततथली तकल्ले दारी ददली व घाललबला स्वतःकडे ठे वून घेत बादशाहाच्या वतीने त्याला चार हजारी, खान ही उपािी व इतर बणक्षसे ददली. यावेळी श्रीनगरच्या डोंगरातील जमीनदार पृथवीससिंग याने राजा जयससिंह याला पत्र ललहून सुलैमान शुकोहला थारा ददल्यामुळे झाले ल्या अपरािांसाठी क्षमायाचना केली. राजाच्या तवनंतीनुसार सुलैमानला परत आणण्यासाठी त्याचा मुलगा कुमार रामससिंह याला ततथे जाण्याची परवानगी ददली गेली व त्याने गुरुवार, २७ धडसेंबर १६६० / ५ जमाद-उल-अव्वल १०७१ ला त्याला ददल्लीला आणले . त्याला सलीमगढला ठे वण्यात आले . मंगळवार, १५ जानेवारी १६६१ / २४ जमाद-उल-अव्वल १०७१ ला मुतमजा खान त्याला व मुहम्मद सुलतान यांना घेऊन ग्वाल्हेरला गेला व त्यांना ततथला तकल्ले दार मुआतमाद खान याच्या स्वािीन केले . सुरतेच्या बातम्यांवरून बादशाहाला जेव्हा कळले [३४] क़ी बसऱ्याचा प्रशासक हुसैन पाशा याने त्याचा नोकर कालसम आका याच्या करवी बादशाहाच्या 1

चाकणचा तकल्ला कोकणात असल्याचे इथे म्हटले आहे. मूळ ले खकाला (साक़ी मुस्तैद खान) महाराष्ट्राचा प्रदे श नेमका मातहत नसल्यामुळे तसे झाले असावे.

अध्याय ३

१ मे १६६० ते १९ एतप्रल १६६१

५२

राज्याणभषेकाबद्दल अणभनंदनपत्र तसेच इराणी घोडे पाठवले आहेत तेव्हा सूरत बंदराचा मुत्सद्दी मुस्तफा खान, याच्या नावे आदे श काढला गेला क़ी कालसम आकाला प्रवासासाठी चार हजार रुपये दे ऊन त्याला दरबारास पाठवावे. यावेळी बाल्खचा राजा, सुभान कुली खान याचा दत इब्रातहम बेग हा तुराण दे शातून तवशेष पत्र व भेटवस्तू घेऊन दरबारात आला. तो या आिीच आजाराने ग्रस्त असल्याने (इथे आल्यावर) काही ददवसात मरण पावला. त्याच्या साथीदारांना वस्त्रे व वीस हजार रुपये दे ऊन त्यांना परत पाठवले गेले. साम्राज्यात अनेक भागात दुष्काळ पडला होता त्यामुळे गरीबांना मदत करण्यासाठी आिी उभारले ल्या कायमस्वरूपी अन्नछत्रांबरोबर ददल्ली मध्ये आणखी दहा तसेच आजूबाजूच्या परगण्यांत आणखी बारा अन्नछत्र उघडावीत असा आदे श ददला गेला. अशीच सोय लाहोर मध्ये ही केली गेली. मुहरमम, रज्जब, शाबान, रमजान, रतबउल-अव्वल आणण जजल्हेज या मतहन्यात नेहमी जजतक़ी रक्कम खचम केली जायची त्याच्या दुप्पट रक्कम या वषी वाटली गेली. नामदारांपासून ते एक हजारीच्या अधिकाऱ्यांपयंत सवांना आदे श ददले गेले क़ी त्यांनी स्वयंस्फूतीने दान करावे आणण तुटवडा सरून तवपुलता येईपयंत दानिमम चालू होता.

अध्याय ४

२० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२

५३

अध्याय ४ राजवटीचे चौथे वषम - तहजरी १०७१-७२ २० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२ रमजानच्या मतहनापासून [३५] राजवटीचे चौथे वषम सुरू झाले . रमजानच्या २४ तारखेला राज्याणभषेकाचा विामपनददन होता व गेल्या वषी याच ददवशी उत्सव सुरू झाला होता. पण रमजानचे उपास सुरू असल्यामुळे उत्सवाकडे लोकांचा तेवढा कल नव्हता. त्यामुळे उत्सवाची सुरवात पुढे ढकलू न ईद पासून (१ शव्वाल) केली गेली व त्यापुढे दहा ददवस उत्सव साजरा केला गेला. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला मुलगा झाला व त्याचे नाव सुलतान मुहम्मद मुईझुद्दीन ठे वले गेले. बादशाहास कळले क़ी इराणचा राजा शाह अब्बास दुसरा याचा दत बुदाक बेग शुक्रवार, १९ एतप्रल १६६१ / २९ शाबान १०७१ रोजी मुलतानला आला. सुभद े ार तरतबयत खान याने त्याला मानाची वागणूक ददली व पाच हजार रुपये व कापडाचे नऊ ताग भेट ददले . लाहोरला खलीलु ल्लाह खानाने त्याला सन्मानाने वागवले व वीस हजार रुपये, मुलामा चढवले ली तलवार व खंजीर तसेच कहिंदुस्थानातील सात दुर्मिंळ कापडांची भेट ददली. तो जेव्हा सराई बावडीला पोहोचला तेव्हा खुद्द बादशाहासाठी लशजवले ले अन्न त्याला पाठवले गेले व त्याला २२ मे १६६१ / ३ शव्वाल १०७१ रोजी भेट घ्यायला सांतगतले गेले. शव्वाल सुरू झाला तेव्हा आिी आदे श ददल्याप्रमाणे बादशाही उत्सवाची तयारी करण्यात आली होती. बादशाहा इदगाहला गेला. (२० मे १६६१ ईद-उल-तफत्र) ततथून परतल्यावर तो तवश्वाच्या इच्छा अपेक्षा पूणम करण्यात गुंतला – पादशाहजादा, नामदार, राजा, आमीर - या सवांना त्यांच्या अपेक्षांपक्ष े ा अधिक बणक्षसे व भेटवस्तू धमळाल्या. कालसम आका रूमी याने भेट घेताना, हुसैन पाशा [३६] याने ददले ले पाच अरबी घोडे, तसेच त्याने स्वतः आणले ले इतर घोडे व जॉर्जिंया येथून आणले ले गुलाम सादर केले . त्याला अंगरखा व पाच हजार रुपये दे ऊन सन्मातनत केले गेले. इराणचा दत बुदाक बेग ईदच्या ततसऱ्या ददवशी, २३ मे १६६१ / ४ शव्वाल १०७१1 रोजी जेव्हा ददल्लीच्या

1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय ४

२० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२

५४

सीमेवर आला तेव्हा आसद खान, सैफ खान व मुल्तफत खान त्याच्या स्वागतासाठी शहराबाहेर गेले व त्याला शहरात घेऊन आले . ही भेट ददवान-ए-खास व ददवान-ए-आम1 मध्ये होईल असे ठरवले गेले. त्याने आदराने खाली वाकून शाह याने ददले ले बादशाहाच्या राज्याणभषेकाचे अणभनंदनपत्र प्रस्तुत केले . त्याला एक अंगरखा, एक लशरपेच (जजघा), रत्नजधडत खंजीर, पेला व बशी असले ला उत्सवात वापरायचा एक अगमजा व पानसुपारीची डबी व तबक ददले गेले. रुस्तुम खानाच्या बंगल्यात त्याची सोय केली गेली व त्याच्या दे खभालीसाठी मीर अज़ीज़ बदख्शी याची नेमणूक केली गेली. रतववार, २६ मे १६६१ / ७ शव्वाल १०७१ ला शाहाकडील भेटवस्तू बादशाहासमोर प्रस्तुत केल्या गेल्या. यात इतर गोष्टींबरोबर ६६ घोडे आणण ३७ कॅरेटचा एक गोल मोती होता व या सगळ्याची एकूण ककिंमत चार लक्ष बावीस हजार रुपये होती. शतनवार, ६ जुलै १६६१ / १९ जजल्कदा १०७१ ला चांद्र वषामनुसार बादशाहाच्या ४५ व्या वाढददवसातनधमत्त पारंपाररक पद्धतीने त्याची तुला केली गेली. लहान थोर, दरबारातील व प्रांतातील सवम लोकांना भेटवस्तू धमळाल्या. शतनवार २७ जुलै १६६१ / १० जजल्हेज १०७१ ला ईद-उज-जुहा साजरी झाली. बादशाहाने इराणच्या दताला तनरोप ददला व एक लक्ष रुपयाचे बणक्षस, अंगरखे, मोत्यांचा पट्टा असले ला मुलामायुक्त खंजीर, सोन्याची खोगीर व लगाम असले ला घोडा, सोन्याची जीन (बैठक) व चांदीची झालर असले ला एक हत्ती, सोन्याचे भरतकाम असले ली अंबारी, एक वॉलरस2 आणण सोन्याचा साज असले ली एक पालखी ददली. शाहच्या पत्रास लवकरच [३७] उत्तर दे ण्यात येईल असे सांतगतले गेले. सगळ्या भेटवस्तू धमळू न दताला पाच लक्ष रुपये व त्याच्या सहकाऱ्यांना पसतीस हजार रुपये ददले गेले. आक़ील खानाने तनवृत्तीची तवनंती केली व त्याच्यासाठी वषामला नऊ हजार रुपयांची सोय केली गेली. सौर वषामप्रमाणे बादशाहाच्या ४४ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली व सवांचा सन्मान केला गेला. हुसैन पाशाचा अधिकारी कालसम आका, याला बारा हजार 1

इंग्रजी अनुवादात फक्त ‘Hall of Audience’ म्हटले आहे पण फासी पाठात ( ‫ديوان خاص و‬ ِ

ّ ‫‘ )عام بآستانبوس‬ददवान-ए-खास व आम आस्तान-बोस मुकरमर गश्त’ आहे. ‫مقرر گشت‬ 2

इंग्रजी अनुवादात याला ‘dariai elephant’ म्हटले आहे. फासी पाठात ‘तफल दरीयायी’ ( ‫قيل‬

‫ )در ٔ ٔ ٔي‬म्हटले आहे, ज्याचा शब्दशः अथम ‘पाण्यातला हत्ती’ असा होतो पण शब्दकोशानुसार ‘वॉलरस’ आहे. स्टा. ९४५.

अध्याय ४

२० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२

५५

रुपये व अंगरखा तसेच त्याच्या साथीदारांना एक हजार रुपये, पाशासाठी एक रत्नजधडत तलवार असे सगळे दे ऊन तनरोप ददला गेला. रतववार, १७ नोव्हेंबर १६६१ / ४ रतब-उस-सानी १०७२ ला बुखाऱ्याचा राजा अब्दुल अजीज खान याचा दत ख्वाजा खावंद महमूद याचा मुलगा ख्वाजा अहमद ददल्लीच्या जवळ पोहोचला. सैफ खान त्याच्या स्वागतासाठी पुढे गेला व त्याला बादशाहा समोर घेऊन आला. त्याने एक पत्र व काही भेटवस्तू ददल्या, ज्यात लांब पल्ल्याचे तुकी घोडे, दु-मदारी1 मोठे नर व मादी उंट तसेच इतर गोष्टी होत्या, त्यात चोवीस हजार रुपयांचे एक माणणक ही होते. बादशाहाने कृपावंत होऊन त्याला एक अंगरखा, रत्नजधडत पट्टा असले ला खंजीर, वीस हजार रुपये व राहायला एक महाल ददला. यावेळी मुसलमान बनवून बादशाही जनानखान्यात वाढवल्या गेलेल्या राजा रूपससिंहाच्या मुलीचा तववाह पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्याशी करण्यात आला. या अप्रततम सोहळ्याचा सतवस्तर वृतांत सुप्रलसद्ध पुस्तकात (आलमगीरनामाह) धमळे ल. पाटण्याचा सुभेदार दाऊद खान [३८] याने तबहार प्रांतातील पलामऊचा प्रदे श जजिंकून घेण्यासाठी घनघोर युद्ध केले . त्याच्यासाठी मानाची वस्त्रे पाठवण्यात आली. सय्यद आमीर खान याला महाबत खानाच्या जागी काबुलचा सुभद े ार नेमले गेले. सोमवार, १० फेब्रुवारी १६६२ / १ रज्जब १०७२ ला फाजजल खान आग्र्याहून आला व शाहजहान ने पाठवले ले काही दातगने व रत्नालं कार त्याने प्रस्तुत केले . ११ फेब्रुवारी १६६२ / २ रज्जब १०७२ ला2 बातमी आली क़ी लाहोरचा सुभेदार खलीलु ल्लाह खान, जो ददल्लीला येतानाच आजारी होता, तो इथे आल्यावर मरण पावला. त्याच्या दुसऱ्या ददवशी बादशाहा त्याच्या नातेवाईकांच्या घरी गेला व मीर खान, रुहुल्लाह खान व अजीजुल्लाह, त्याची मुले व इतर आप्तांना अंगरखे दे ऊन सन्मातनत केले . त्याची तविवा हमीदा बानू तहला पन्नास हजार रुपये वार्षिंक भत्ता मान्य झाला. ती मुमताझ-उझ-झमानीची बहीण मललका बानू तहची मुलगी होती. शतनवार, १५ फेब्रुवारी १६६२ / ६ रज्जब १०७२ ला पादशाहजादा मुहम्मद अकबराची सुंता केली गेली. बुखाऱ्याचा दत ख्वाजा अहमद याला अंगरखा, मोत्यांचा

1

मदार म्हणजे उंटाच्या पाठीवर असले ले वसशिंड, इथे दोन वसशिंड असले ले उं ट अणभप्रेत आहेत.

2

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय ४

२० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२

५६

पट्टा असले ला एक रत्नजधडत खंजीर व तीस हजार रुपये बणक्षस दे ऊन परत पाठवले गेले. सगळ्या भेटवस्तू धमळू न या दताला एक लक्ष वीस हजार रुपये ददले गेले. शुक्रवार, १२ माचम १६६२ / १ शाबान १०७२ ला खान-इ-खानान याने शूजाचे ऐंशी हत्ती व पलामऊ येथे जजिंकले ले दोन हत्ती बादशाहाला ददले . बादशाहाला अनेकदा प्रफुब्ल्लत करणाऱ्या लशकारीचे पूणम वणमन मी कसे करू ? मी अगदी थोडक्यात सांगायचा यत्न करतो – या वषी बादशाही ससाण्यांनी १५०

कुलं ग1 मारले . एका लशकारीत ३५५ हरणे जाळ्यात पकडली गेली, पैक़ी आठ [३९] बादशाहाने मारली व हरणे हाकारली होती त्या दठकाणी लशकार करण्याची परवानगी ज्या गटाला ददली होती, त्यांनी आणखी ४७ मारली. इतर हरणांना सोडू न दे ण्याचा आदे श ददला. बादशाहाला कळवले गेले क़ी आिी हाकाऱ्यांच्या गोलात बरीच हरणे सापडली होती पण ती एकदम तबथरली आणण त्यांच्या अंगावर िावून गेली. पाच जणांना त्यांच्या सशिंगांमुळे दुखापत झाली तर दोन जण मारले गेले. सािारण एक हजार हरणे पळू न गेली. बादशाहासमोर एक लक्षवेिक घडामोड मांडली गेली – सोनपत गावात काही मुले राजा व मंत्री हा खेळ खेळत होती, ज्यात दोघांवर चोरीचा (खेळातला) आळ होता, लशपाई त्यांना राजाकडे घेऊन गेला व राजाने लशक्षा ददली. त्या मूखम (खोट्या) लशपायाने काठीने त्या दोघांच्या डोक्यावर इतक्या जोरात वार केला क़ी ती मुले मेली, व हा खेळ त्यांच्या जीवावर बेतला.

कूित्रबहार व आिाम वरील आक्रमणािा वृतांत १०६७ तहजरी वषामच्या शेवटास (सप्टें बर १६५७), शाहजहानचे आजारपण वाढल्यामुळे सवम प्रांतात अस्थैयम माजले होते, कूचतबहारचा जमीनदार भीम (प्राण) नरैन याने बादशाही क्षेत्रात येणारा कामरूप जजल्हा घेतला. त्याच वेळी आपला प्रदे श बादशाही सैन्यापासून सुरणक्षत आहे असे मानणारा व हा प्रदे श घेऊ पाहणारा आसामचा राजा जयध्वजससिंह याने जधमनी मागामने कामरूपकडे [४०] मोठे सैन्य पाठवले .

1

इंग्रजी अनुवादात इथे मोठे कोंबडे ककिंवा बगळे म्हटले आहे. कुलं ग म्हणजे मोठ्ा पक्ष्याचा नर, ककिंवा करकोचा, सारस, बगळा. स्टा. १०४४.

अध्याय ४

२० एतप्रल १६६१ ते ९ एतप्रल १६६२

५७

ही दोन्ही आक्रमणे तातडीची असल्याचे जाणून शुक्रवार, १ नोव्हेंबर १६६१ / १८ रतब-उल-अव्वल १०७२ ला बादशाही आदे शानुसार खान-इ-खानान खखज्रपूरहून तनघाला. १९ धडसेंबर १६६१ / ७ जमाद-उल-अव्वल १०७२ ला त्याच्या सैन्याने कूचतबहार शहर ताब्यात घेतले व त्याचे नामकरण आलमगीरनगर असे केले गेले. गुरुवार, ९ जानेवारी १६६२ / २८ जमाद-उल-अव्वल १०७२ ला बादशाही सैन्य घोराघाट मागे आसाम वरील आक्रमणासाठी तनघाले . पाच मतहने मोतहम चालवल्यानंतर सोमवार, १७ माचम १६६२ / ६ शाबान १०७२ रोजी आसामची राजिानी घरगाव येथे इस्लामी सत्ता प्रस्थातपत झाली. आलमगीरनाम्यात जे तपशील ददले आहेत ते सगळे मी इथे दे ऊ शकत नाही, तवशेष करून तनष्ठावंत सैन्याचे डावपेच, बादशाहा प्रतत कमालीची भक्त़ी व तनष्ठा असल्यामुळे त्यांनी घेतले ले अपार कष्ट व पररश्रम, जजिंकले ल्या अनेक प्रकारच्या गोष्टी ज्यात पैसे व इतर गोष्टी आहेत, तसेच कूचतबहार आणण आसाम मिील आश्चये, दुर्मिंळ, तवधचत्र व मौल्यवान गोष्टी ज्यात सजीव व तनजीव गोष्टींचा समावेश आहे, ततथे असले ले वैतवध्य – झाडे, फळे , पाने, सपाटी, नद्या, खाणे, पेहराव, तकल्ले व घरांचेही वणमन मी इथे करू शकत नाही. खान-इ-खानानच्या बातम्यांवरून बादशाहाला जेव्हा या प्रलसद्ध तवजयाबद्दल कळले तेव्हा तनष्ठावंत खानासाठी, आमीन खान, या दरबारात असले ल्या त्याच्या मुलाकडे त्याने मोठ्ा मनाने एक अंगरखा, भरपूर प्रशस्ती असले ले एक फमामन, एक तवशेष अंगरखा, तुमान-इ-तुघ, व एक करोड दाम (अडीच लक्ष रुपये) ददले . [४१]

अध्याय ५

१० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३

५८

अध्याय ५ राजवटीचे पाचवे वषम - तहजरी १०७२-७३ १० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३ रमजानचा मतहना नेमून ददले ल्या िार्मिंक गोष्टी करण्यात गेला. राजवटीचे पाचवे वषम सुरू झाले . मागील वषांप्रमाणे उत्सव व फटाक्यांची व्यवस्था लावण्यात बादशाही अधिकारी गुंतले . ईदच्या ददवशी, शतनवार, १० मे १६६२ / १ शव्वाल १०७२ ला1 मलशदीतून परतल्यानंतर बादशाहाने दरबारातील लोक, सवम दठकाणचे अधिकारी, सुभ्यातले आमीर यांना भेटवस्तू व बणक्षसे ददली तसेच बादशाहाला सादर केले ले नजराणे त्याने स्वीकारले . सोमवार, १२ मे १६६२ / ३ शव्वाल १०७२ ला2 बादशाहाची प्रकृती तबघडली. बरेच रक्त गेल्याने अशक्तपणा येऊन झोकांड्या जाऊ लागल्या. मंगळवार, १७ जून १६६२ / १० जजल्कदा १०७२ पयंत असे चालू रातहले , तेव्हा हक़ीम मुहम्मद आमीन व हक़ीम महदी यांनी अनेक उत्तम उपाय करून बधघतले . प्रकृतीत सुिारणा होण्यासाठी तसेच गरीबांना मदत करण्यासाठी दानिमम करण्यात आला. मंगळवार, २४ जून १६६२ / १७ जजल्कदा १०७२ ला बादशाहाला बरे वाटले व त्याने आंघोळ केली. मंगळवार, १७ जुलै १६६२ / १० जजल्हेज १०७२ ला (ईद-उज-जुआ) तो मलशदीत गेला, त्याला पाहून लहान थोर, गरीब श्रीमंत सगळ्यांना, ईद दोनदा आल्या सारखा आनंद झाला. गुरुवार, २३ जुलै १६६२ / १६ जजल्हेज १०७२3 ला चांद्र वषामनुसार बादशाहाच्या ४६ व्या वाढददवसाला त्याची तुला केली गेली. महाबत खानाला महाराजा जसवंतससिंहाच्या जागी गुजरातचा सुभेदार नेमले गेले व त्याला सहा हजारीची (५००० स्वार) वाढ ददली गेली. तनवृत्तीच्या आयुष्यातून परत आल्यावर रजवी खान बुखारी याला २५०० जात (४०० स्वार) अशी मनसब ददली गेली. [४२] आददल खानाच्या (आददलशाह) अधिकाऱ्यांनी त्याचा नजराणा आणला होता,

1

इंग्रजी अनुवादात वार व तहजरी ततथी ददले ली नाही.

2

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही. इंग्रजी अनुवादात १७ जजल्हेज ददले आहे पण फासी पाठात (‫ )شانزدهم‬शांजदाम म्हणजे १६

3

जजल्हेज आहे. इंग्रजी अनुवादात ददले ला ज्युललयन ददनांक मात्र बरोबर आहे.

अध्याय ५

१० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३

५९

त्यांना वस्त्रे दे ऊन परत पाठवण्यात आले . तकरमब खानाचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा मुहम्मद अली खान, ज्याला त्याच्या वधडलांच्या अपरािासाठी पदच्युत केले होते, त्याला मोठ्ा मनाने दुखवट्याची वस्त्रे दे ऊन १५०० (२०० स्वार) अशी मनसब ददली गेली. सैफ खान तनवृत्ती घेऊन गेला होता, तो सरकहिंदहून परत आला. त्याला अंगरखा, तलवार व दोन हजारी (१५०० स्वार) अशी मनसब ददली गेली. मंगळवार, २ धडसेंबर १६६२ / १ जमाद-उल-अव्वल १०७३ ला सौर वषामनुसार बादशाहाच्या ४५ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला करण्यात आली. सवांना त्यांच्या इच्छे प्रमाणे भेटवस्तू धमळाल्या. नजाबत खानाला पतहल्या वषी कोणत्या तरी अपरािा करता लशक्षा केली होती. आता त्याला पाच हजारी (४००० स्वार) अशी मनसब ददली गेली. सोमवार, ८ धडसेंबर १६६२ / ७ जमाद-उल-अव्वल १०७३ ला बादशाहा लाहोरकडे तनघाला. कनामल येथे मीर-इ-सामान फाजजल खान, याला अततररक्त लोक व सामानासतहत थेट मागामने लाहोरकडे पाठवले गेले आणण बादशाहा लशकारीसाठी मुखललसपूरच्या मागामने गेला व रतववार, ८ फेब्रुवारी १६६३ / १० रज्जब १०७३ ला लाहोरला पोहोचला. बादशाहाला काश्मीरला जाण्याची इच्छा असल्यामुळे त्याने खखदमतगार खान याला रस्ते बनवण्यासाठी पाठवले . शुक्रवार, १३ फेब्रुवारी १६६३ / १५ रज्जब १०७३ ला जुनागढचा फौजदार कुतबुद्दीन खान ख्वेश्गी याने रायससिंह, त्याचा मुलगा, काका व इतर नातेवाईक, सगळे धमळू न ३०० लोकांना मारून टाकले . रायससिंह हा जामचा जमीनदार छत्रसाल, याचा काका होता व त्याने छत्रसालच्या वधडलांच्या, म्हणजे रायमालच्या (रानमाल) मृत्यूनंतर दं गा करून त्याला पदच्युत केले होते. [४३] खानाने दाखवले ल्या शौयामची आठवण म्हणून बादशाहाने त्या दे शाला इस्लामनगर, असे नाव दे ण्याचा आदे श ददला.

आिाम प्रकरणािा त्रनष्कषव खान-इ-खानान याने पावसाळ्यासाठी व सगळा प्रदे श पाण्याने भरला असताना जेव्हा मथुरापूरला छावणी टाकली तेव्हा आसामचे लोक तनिामस्तपणे वावरू लागले . मुघल सैन्याला दौडता येत नसल्यामुळे आसामी लोकांनी सगळे तनबंि पायदळी तुडवले . त्यांचा राजा नामरूपच्या डोंगरातून खाली आला. मुघल चौक्या मागे घेतल्या होत्या आणण केवळ घरगाव व मथुरापुर बादशाही सैन्याकडे रातहले होते. रसद संपली होती. ततथल्या

अध्याय ५

१० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३

६०

तवषारी हवेमुळे रोगराई पसरली व मोठ्ा प्रमाणात लोक मेले. हा प्रकार सगळ्या आसामात पसरला आणण शत्रूकडील डोंगरातले बरेच लोक नरकात गेले (मेले). यावेळी सैतनक व गुरांचे मुख्य खाणे भात व मांस होते, जे मोठ्ा प्रमाणात शत्रूकडू न हस्तगत केले होते. पावसाळा संपायची वाट बघण्यालशवाय काही करता येत नव्हते. (सप्टें बर / सफर) मतहन्याचा मध्य आल्यावर पाऊस कमी झाला व रसदे च्या होड्या ही तेव्हाच पोहोचल्या. रतब-उल-अव्वल संपताना जसे पाणी हटले , तसे मुघल सगळीकडू न पुढे घुसले व पूवीप्रमाणेच शत्रूची कत्तल उडवून ददली. राजा डोंगरात पळू न गेला व तहाची बोलणी करू लागला पण खानाने ती िुडकावून लावत नामरूपकडे चाल केली. तोवर अनेक घातक आजारांनी खानाला त्रस्त केले होते. सैन्य ही हाल झाल्यामुळे कष्टी झाले होते व इतक्या भयंकर प्रदे शात मरायला लागेल या कल्पनेने भयभीत होऊन [४४] ते खानाला सोडू न बंगालला परतण्याच्या मनब्स्थतीत होते. खानाला हे कळल्यावर त्याला खूप दुःख झाले व शुक्रवार, ५ धडसेंबर १६६२ / ४ जमादउल-अव्वल १०७३ ला त्याने पुढच्या पडावाकडे चाल केली. पण पररब्स्थतीने त्याला तह करून परतायला भाग पाडले . राजाला आता त्याचा पराभव ददसत होता म्हणून त्याने ददले र खानाला मध्यस्त केले व त्याने खान-इ-खानानला राजाचा प्रस्ताव मान्य करण्यास प्रवृत्त केले . सोमवार, ५ जानेवारी १६६३ / ५ जमाद-उस-सानी १०७३ ला राजाचे दत बादशाही छावणीत वीस हजार तोळे सोने, एक लक्ष आठ हजार तोळे चांदी, बादशाहा साठी २० हत्ती, खान-इ-खानान साठी १५ हत्ती, ददले रखानास ५ हत्ती तसेच राजाची मुलगी व आसामच्या दुसऱ्या एका राजाची (मुख्य राजाचा नातलग) मुलगी व राजाच्या दरबारातील प्रततधष्ठतांचे चार मुलगे (सध्या ददले ला नजराणा सोडू न उरले ला नजराणा धमळे स्तोवर जे बंगाल मध्ये बंिक म्हणून राहणार होते) असे सगळे घेऊन आले . शतनवार, १० जानेवारी १६६३ / १० जमाद-उस-सानी १०७३ ला खान-इखानान नामरूप डोंगराच्या पायथयाहून बंगालकडे जायला तनघाला व गुरुवार, २२ जानेवारी १६६३ / २२ जमाद-उस-सानी १०७३ ला लाखुघरला पोहोचला. बुिवार, ११ फेब्रुवारी १६६३ / १३ रज्जब १०७३ ला तो काजलीहून तनघाला व गौहाटीच्या पलीकडे पांडू येथे पोहोचला आणण त्याने राशीद खान याला कामरूपचा फौजदार नेमन ू पाठवले .

अध्याय ५

१० एतप्रल १६६२ ते २९ माचम १६६३

६१

यावेळी त्याचा आजार उपचारा पलीकडे गेला. स्वतःची पररब्स्थतीत लक्षात घेऊन त्याने अक्सर खान याला कूचतबहार घेण्यासाठी नेमले . भीम (प्राण) नारायणाने ते पुन्हा जजिंकून घेतले होते. मग तो स्वतः खखज्रपूरकडे तनघाला. ३१ माचम १६६३ / २ रमजान १०७३ ला तो खखज्रपूरहून दोन कोसावर मरण पावला. [४५]

अध्याय ६

३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४

६२

अध्याय ६ राजवटीचे सहावे वषम - तहजरी १०७३-७४ ३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४1 गुरुवार, २३ एतप्रल १६६३ / २५ रमजान १०७३ ला दरबारी अधिकाऱ्यांनी रवी नदीच्या पललकडील तीरावर असले ल्या ददलकशा बागेत राज्याणभषेक ददना तनधमत्त उत्सवाची तयारी केली. त्या ददवशी बादशाहा काश्मीरला जायला तनघाला व बागेत थांबला. त्याच ददवशी खान-इ-खानान याच्या मृत्यूची बातमी आली. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम मुहम्मद आमीन खानाच्या घरी गेला व त्याला घेऊन बादशाहाकडे आला, त्याने त्याला अंगरखा दे ऊन त्याचे सांत्वन केले . ईदचा नमाज (२९ एतप्रल ला) छावणीतल्या मलशदीत झाला. पादशाहजादा तसेच दरबारातील व प्रांतातील अधिकारी यांचा सन्मान केला गेला. शुक्रवार, १ मे १६६३ / ३ शव्वाल १०७३ ला बादशाहा पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडला.

ّ ٔ ‫دايره امناالمرا و بريده‬ ‫آوردن سيواي جهنیم بر‬ ‫سوانح اين ّايام شبخون‬ ‫از‬ ِ ِ ٔ ّ ‫ز‬ ‫پرس اوست‬ ‫شدن سبابه او هنگا ِم مقابلت و‬ ِ ِ ‫شهيدگشت ابوالفتح خان‬ ِ या सुमारास झाले ली एक घटना म्हणजे राक्षसी लसवाने आमीर-उल-उमराच्या छावणीवर रात्री केले ला हल्ला. यात त्याची तजमनी कापली गेली व मुलगा अबुल फतह खान मारला गेला. या श्रेष्ठ अधिकाऱ्याच्या तनष्काळजीपणामुळे हे घडले होते त्यामुळे लशक्षा म्हणून बादशाहाने त्याला दख्खनच्या सुभेदार पदावरून (जे पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमला ददले गेले) हटवून बंगालला, ददवंगत मुअज्जम खानाच्या जागी, त्याची नेमणूक केली. मंगळवार, १२ मे १६६३2 / १४ शव्वाल १०७३ ला काश्मीरचे प्रवेशदार असले ल्या भीमबार येथे बादशाहा पोहोचला. त्याच्या लाहोरच्या वास्तव्याप्रमाणेच पीर पंजालच्या वाटे वरील बफम नाहीसा झाल्याने बादशाही दल पुढे जाणार होते. राजा 1

इंग्रजी अनुवादात इथे १८ माचम १६६४ ददले आहे पण तप.जं. प्रमाणे हे १७ माचम १६६४ आहे.

2

इंग्रजी अनुवादात नजरचुक़ीमुळे १२ मे च्या ऐवजी १४ मे झाले आहे.

अध्याय ६

३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४

अमीर-उल-उमरा शात्रहस्ता खान (साभार BnF)

६३

अध्याय ६

३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४

६४

जयससिंह व नजाबत खान याने [४६] अततररक्त लोकांबरोबर चेनाब नदीकाठी थांबावे असा आदे श ददला गेला. इतर काही आमीरांबरोबर तातहर खान याला त्याच्या जाहगीरीकडे जायची मुभा धमळाली. सफलशकन खानाला भीमबार घाटाच्या पायथयापाशी काही लोकांना बरोबर घेऊन संरक्षणासाठी थांबायला सांतगतले गेले. काही नामदार व नोकर बादशाहा बरोबर होते तर मुहम्मद आमीन खान व फाजजल खान बादशाही दलाच्या मागे तीन टप्प्यांवर राहणार होते. गुरुवार, १४ मे १६६३ / १६ शव्वाल १०७३ ला तो भीमबारहून बाहेर गेला. पीर पंजालच्या भयंकर घाटातून जाताना एक हत्ती घाबरून उलटा तफरला व एखादी तवपदा ककिंवा वावटळ यावी तसा उिळला आणण भीमबारच्या ददशेने पळू लागला. त्या तनमुळत्या घाटात लोक व इतर प्राण्यांची पार तारांबळ उडाली. या िावत्या डोंगराच्या आवेशामुळे काही हत्तीणी आणण बादशाही भारवाहक त्या तवध्वंसाच्या दरीत कोसळू न इतके धचरडले गेले क़ी लोकांचे तर तवचारूच नका पण हत्तींची हाडे दे खील ददसत नव्हती. या भयंकर अपघातामुळे संवेदनशील बादशाहाचे हृदय इतके व्यलथत झाले क़ी काश्मीरला पुन्हा किीही जायचे नाही असे त्याने त्याच क्षणी ठरवले . थोडक्यात, मंगळवार, २८ मे १६६३ / १ जजल्कदा १०७३ ला तो श्रीनगर शहरात आला. महसूल खात्यातील राजा रघुनाथ मुत्सद्दी (अिीक्षक) मरण पावला. रतववार, ७ जून १६६३ / ११ जजल्कदा १०७३ ला फाजजल खानाला वजीरी ददली व इब्फ्तकार खानाला खान-इ-सामान हे पद धमळाले . शाहजहानच्या राजवटीपासून सदर-उस-सदुर मिून दर वषी पाच मतहन्यात ७९००० रुपये वाटले जायचे पण उरले ल्या सात मतहन्यात काही (दान) ददले जात नव्हते. बादशाहाने आता आदे श ददला क़ी पाच मतहन्यात आिीची प्रथा चालवावी व उरले ल्या सात मतहन्यात दर मतहन्याला १०००० रुपये वाटावेत म्हणजे दर वषी सगळे धमळू न एक लक्ष [४७] ४९००० रुपये गरजू लोकांना ददले जातील. शतनवार, १३ जून १६६३ / १७ जजल्कदा १०७३ ला चांद्र वषामनुसार बादशाहाच्या ४७ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. दरबारातील व सगळ्या प्रांतांमिील नामदारांना भेटवस्तू दे ण्यात आल्या. ददवाणीचा पदभार घेतल्यावर फाजजल खान बराच आजारी पडला व मरण पावला. मंगळवार, २३ जून १६६३ / २७ जजल्कदा १०७३ ला इराणहून आले ल्या बऱ्हाणुद्दीन या फाजजल खानाच्या पुतण्याला अंगरखा

अध्याय ६

३० माचम १६६३ ते १७ माचम १६६४

६५

दे ऊन बादशाहाने त्याचे सांत्वन केले व कृपावंत होऊन त्याच्या दे खभालीची सगळी जबाबदारी घेतली. काश्मीर मिील सगळ्या दठकाणांच्या सौंदयामचा आस्वाद घेतल्यावर १६ ऑगस्ट १६६३ / २२ मुहरमम १०७४ ला तो या सुखावणाऱ्या दठकाणाहून लाहोरला जायला तनघाला. जाफर खान याला वजीरी दे ण्यासाठी दरबारात पाचारण करण्यात आले व नजाबत खान याला त्याच्या जागी नेमण्यात आले . सोमवार, २ नोव्हेंबर १६६३ / ११ रतब-उस-सानी १०७४ ला सौर वषामनुसार बादशाहाच्या ४६ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. अक़ील खान तनवृत्त होऊन लाहोरला राहात होता. त्याला दोन हजारी (७०० स्वार) दे ऊन पुन्हा सेवेत घेतले गेले. बुदाग बेग याने आणले ल्या शाह अब्बास याच्या पत्राचे उत्तर तसेच सात लक्ष रुपयांच्या मौल्यवान व दुर्मिंळ गोष्टी दे ऊन तरतबयत खानाला इराणला पाठवले गेले. सोमवार, ९ नोव्हेंबर १६६३ / १८ रतब-उस-सानी १०७४ ला1 बादशाहा ददल्लीला जायला तनघाला. जाफर खान पातनपतला भेट घ्यायला आला व त्याला वजीरी ददली गेली. शुक्रवार, २० नोव्हेंबर १६६३ / २९ रतब-उस-सानी १०७४ ला बादशाहा ददल्ली जवळ पोहोचला. [४८]

1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी व वार ददले ला नाही.

अध्याय ७

१८ माचम १६६४ ते ७ माचम १६६५

६६

अध्याय ७ राजवटीचे सातवे वषम - तहजरी १०७४-७५ १८ माचम १६६४ ते ७ माचम १६६५ रमजानच्या आगमनाने उत्सवाची तयारी केली गेली. मलशदीतून आल्यावर बादशाहा ससिंहासनावर बसला व शाही भेटवस्तू दे ऊन पादशाहजादे , नामदार, गरीब व श्रीमंत सगळ्यांना उपकृत केले . त्याच्या समोर सादर केले ले नजराणे ही त्याने स्वीकारले . रतववार, ५ जून १६६४ / २१ जजल्कदा १०७४ ला चांद्र वषामनुसार त्याच्या ४८ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम व मुहम्मद मुईझुद्दीन याची आई यांना मुलगा झाल्याचे पत्र धमळाले . मुलाचे नाव इझ्झुद्दीन ठे वण्यात आले . मुस्तफा खान खाफ़ी याला तुरानला दत म्हणून पाठवण्यात आले . दातनशमंद खानाने ललतहले ले पत्र व एक लक्ष पन्नास हजार रुपयांची रत्नजधडत वस्तु, बुखाऱ्याचा राजा अब्दुल अजीज खान याच्यासाठी, तसेच आणखी एक पत्र व एक लक्ष रुपयाच्या भेटवस्तू बाल्खचा राजा सुभान कुली खान याच्यासाठी, त्याच्या बरोबर ददल्या गेल्या. महाराजा जसवंतससिंह लसवाला त्याच्या प्रदे शातून बाहेर काढायचा, त्याचा प्रदे श उजाड करायचा व त्याचे तकल्ले जजिंकायचा बराच प्रयत्न करत होता पण राज्यासाठी त्यातून काही तनष्पन्न होत नव्हते. त्यामुळे त्याचा पराभव करण्यासाठी राजा जयससिंह याला, इतर काही प्रलसद्ध सेनापती सोबत दे ऊन, नेमण्यात आले . शुक्रवार, ३० सप्टें बर १६६४ / १९ रतब-उल-अव्वल १०७५ ला सौर वषामनस ु ार बादशाहाच्या ४७ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. पादशाहजादे व नामदारांचा शाही मानसन्मान केला गेला. माळव्याचा सुभेदार नजाबत खान मेल्याचे बादशाहाला कळले . खानदे शचा सुभेदार वजीर खान याला त्याचा उत्तराधिकारी नेमले गेले [४९] व राजा जयससिंहाचा एक हस्तक दाऊद खान, याला खानदे शची सुभेदारी धमळाली. पण त्याच्या नावे फमामन िाडले गेले क़ी बऱ्हाणपूरला त्याचा एक हस्तक नेमून दे ऊन त्याने (मराठ्ांच्या) मोतहमेवर जावे.

अध्याय ७

१८ माचम १६६४ ते ७ माचम १६६५

६७

मुहम्मद मुअज्जम याचे पत्र आले क़ी सोमवार, ५ धडसेंबर १६६४ / २६ जमादउल-अव्वल १०७५ ला रूपससिंह राठोडच्या मुलीला मुलगा झाला. त्याचे नाव सुलतान मुहम्मद अजीम ठे वण्यात आले .

अध्याय ८

८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६

६८

अध्याय ८ राजवटीचे आठवे वषम - तहजरी १०७५-७६ ८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६ रमजानच्या आगमनाने राजवटीचे आठवे वषम सुरू झाले . उत्सवाची तयारी केली गेली. ईद-उल-तफत्रला मलशदीतून परतल्यावर बादशाहाने अनेक चांगल्या गोष्टी केल्या व सवांना उपहार दे ऊन उपकृत केले . हाजी अहमद सईद याला राजवटीच्या चौथया वषी पूज्य शहरांना (मक्का व मदीना) सहा लक्ष साठ हजार रुपयांच्या भेटवस्तू दे ण्यासाठी पाठवले गेले होते. त्याने परत आल्यावर पेशकश म्हणून १४ अरबी घोडे सादर केले . मक्केचा शरीफ सय्यद यातहया याने बादशाहाची भेट घेतली व एक प्रशंसा पत्र, तीन अरबी घोडे व काही पतवत्र अवशेष सादर केले . त्याला एक अंगरखा व सहा हजार रुपये भेट दे ण्यात आले . हबसाणातील दत लसद्दी काधमल व (अरबस्थानातील) हजरामोतच्या राजाचा दत, सय्यद अब्दुल्लाह पत्रे व भेटवस्तू घेऊन दरबारात आले . त्यांचा उत्तम रीतीने आदर सत्कार करून त्यांना अंगरखे व रोख रक्कम ददली गेली. येमेनचा राजा इमाम [५०] इस्माईल याने पाठवले ले नऊ अरबी घोडे बादशाहासमोर आणले गेले. हा उत्सव पाच ददवस चालला. आग्र्याचा उच्चाधिकारी इततबार खान मरण पावल्याची बातमी दरबारास पोहोचली. आग्र्याच्या पररसराचा फौजदार रादअंदाज खान याला इततबार खानाच्या जागी नेमले गेले व त्याच्या जागी सुभद े ार हुशदार खानाला नेमले गेले. शतनवार, १३ मे १६६५ / ८ जजल्कदा १०७५ ला महाराजा जसवंतससिंह दख्खनहून आला व भेट घेतली. रतववार, २३ एतप्रल १६६५ / १७ शव्वाल १०७५ ला चांद्र वषामनस ु ार बादशाहाच्या ४९ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. शाही भेटवस्तू दे ऊन दरबारातील व प्रांतांमिील सेवकांचा सन्मान करण्यात आला. रोख रक्कम आणण भेटवस्तुंची सुयोग्य बणक्षसे दे ऊन मक्का, हबसाण व हजरामोत इथल्या दतांना तनरोप दे ण्यात आला. बुिवार, १४ जून १६६५ / १० जजल्हेज १०७५ ला ईद-उज-जुहा होती.

अध्याय ८

८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६

६९

शुक्रवार, २३ जून १६६५ ला / १९ जजल्हेज १०७५1 ला ईद-इ-गुलाबीचा सण होता जेव्हा पादशाहजादे व नामदारांनी रत्नजधडत ककिंवा मुलामा ददले ले प्याले सादर केले . बादशाहाला कळले क़ी राजा जयससिंह, ददले रखान व इतर वीरांनी घेतले ल्या पररश्रमांमळ ु े दुष्ट लसवाचे पुरद ं र, रुद्रमाळ व इतर तकल्ले जजिंकता आले , आणण आपला 1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय ८

८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६

७०

अंत जवळ आला आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने लगेच हुशारीने राजाकडे सुरक्षेची भीक मागण्यासाठी दत पाठवले व राजाने ददले ले वचन आणण त्याची संमती यामुळे तनराशेच्या छायेतून बाहेर पडत [५१] त्याने त्याचे २३ तकल्ले बादशाही अधिकाऱ्यांच्या स्वािीन केले होते. सोमवार, १२ जून १६६५ / ८ जजल्हेज १०७५ ला तो तनःशस्त्र होऊन राजाच्या भेटीस आला. राजाने त्याला आसलिंगन दे ऊन शेजारी बसवले व त्याच्या जजवाला व मालमत्तेला िोका नसल्याचे आश्वासन ददले . राजाने त्याला रत्नजधडत तलवार व खंजीर दे ऊन ती अंगावर बाळगायला सांतगतले व तसेच पुढे ददले र खानाची भेट घेण्याकरता पाठवले . ददले र खानाने ही त्याचा यथोधचत सन्मान केला. राजाच्या तवनंती मिील कलमांनुसार लसवाला क्षमा केल्याचे एक फरमान तसेच बादशाहाकडू न तवशेष अंगरखा पाठवण्यात आला. त्याचा मुलगा संभा याला पाच हजारी (५००० स्वार) ददली गेली. राजा जयससिंह याच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्याला सात हजारी (७००० स्वार, दो-अस्पा, सेह-अस्पा) दे ण्यात आली. दरबारात असले ला त्याचा मुलगा रामससिंह, ददले र खान, दाऊद खान, रायससिंह, क़ीरतससिंह व इतरही लोकांना अनेक मान सन्मान ददले गेले. तवजापूरच्या आददलशाहाने खंडणी पाठवायला उशीर केल्यामुळे तसेच लसवाला मदत करायचा प्रयत्न केल्यामुळे राजा जयससिंहाला बादशाही आदे श पाठवला गेला क़ी लसवाचे तकल्ले घेऊन प्रदे शात स्थैयम आल्यानंतर त्याने थेट तवजापूरवर आक्रमण करून तकल्ल्याच्या वेढ्यात अडकून न पडता शत्रूला पूणमपणे उध्वस्त करावे. काझी अस्लमचा मुलगा, मुहम्मद झाहीद याला दरबाराचा िममशास्ता नेमले गेले. प्रिानमंत्री जाफर खान याने यमुनेवर छान महाल बांिला होता. बादशाहाने त्याला भेट ददली. प्रिानाने दरवाज्यासमोर गाललचा पसरून गृहप्रवेशाचे आमंत्रण दे ण्याचा लशष्टाचार पार पाडला. त्याने बादशाहाला अनेक मौल्यवान भेटवस्तू सादर केल्या ज्यात काही दुर्मिंळ व आश्चयमकारक गोष्टी ही होत्या. काश्गरचा राजा अब्दुल्लाह खान याच्या पत्राला [५२] या वषी उत्तर दे ऊन ते ख्वाजा इशाक याच्या हाती काही मौल्यवान वस्तूंसतहत पाठवण्यात आले . बुिवार, २५ ऑक्टोबर १६६५ / २५ रतब-उस-सानी १०७६ ला सौर वषामनस ु ार बादशाहाच्या ४८ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. दरबारातील तसेच प्रांतांतील नामदारांना भेटवस्तू दे ण्यात आल्या. आददलशाहीतील प्रमुख सरदार मुल्ला अहमद नवायत त्याच्या मालकाचा तहतचचिंतक बनून राजा जयससिंह याच्याकडे आला

अध्याय ८

८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६

चमझाव राजा जयसििंह (साभार BnF)

७१

अध्याय ८

८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६

७२

होता. त्याला बादशाही सेवेत येण्याची इच्छा होती तसेच योग्य संिीसाठी तो थांबला होता, म्हणून राजा जयससिंहाच्या तवनंतीनुसार त्याच्या नावे फरमान काढू न त्याला सहा हजारी (६००० स्वार) दे ण्यात आली. शतनवार, ९ धडसेंबर १६६५ / ११ जमाद-उस-सानी १०७६ ला काश्मीरचा सुभेदार, सैफ खान याच्या बातम्यांतून बादशाहाला कळले क़ी बादशाही आदे शानुसार, मोठ्ा ततबेटचा जमीनदार, दलाई मुहामुनी1 याने बादशाहाच्या नावे दे शात खुतबा वाचून, बादशाही नाणी पाडू न व मोठी मशीद बांिून इस्लामचा स्वीकार केला होता. खानाने हे प्रकरण उत्तमपणे हाताळल्याबद्दल त्याला वाढ तसेच वस्त्रे पाठवून त्याची प्रशस्ती करण्यात आली. छोट्या ततबेटचा जमीनदार मुराद खान याने या प्रकरणात बरीच मदती केली होती म्हणून त्याच्यासाठी मानाची वस्त्रे पाठवण्यात आली. बुिवार, ३ जानेवारी १६६६ / ७ रज्जब १०७६ ला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम दख्खनहून आला व (बादशाहाची) भेट घेतली. दख्खनहून बातमी आली क़ी मुल्ला अहमद नवायत दरबाराकडे तनघाला असता मृत्यू पावला. आदे श तनघाला क़ी त्याचा मुलगा असद व कुटुं बातील इतर सदस्यांना बादशाहाकडे पाठवले जावे. [५३] आग्र्यातील बातमीदारांच्या पत्रांवरून कळले क़ी ८ जानेवारी १६६६ / १२ रज्जब १०७६ ला शाहजहानला उन्हाळीचे दुखणे होऊन ते गंभीर होत होते व रोग हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्याने वैद्यांनी औषिपाणी बंद केले होते. बादशाहाला ततथे जाण्याची इच्छा झाली. दक्षतेसाठी पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला शुक्रवार, १९ जानेवारी १६६६ / २३ रज्जब १०७६ ला पुढे पाठवण्यात आले . सोमवार, २२ जानेवारी १६६६ / २६ रज्जब १०७६ ला रात्रीच्या सुरवातीस शाहजहान आजारामुळे मरण पावला. या घटनेनंतर बेगम जहानआरा तहच्या इच्छे नुसार रादअंदाज खान, ख्वाजा फुल (बहलोल), सय्यद मुहम्मद कनौजी व काझी कुरबान घुसलखान्यात गेले व अंत्यसंस्काराची तयारी करायला लागले . त्याचे पार्थिंव तकल्ल्याच्या अष्टकोनी बुरुजाच्या (मुसाम्मान) दरवाज्यातून बाहेर नेण्यात आले . हुशदार खान सुभेदार अंतयात्रेत साधमल झाला व शवपेटी यमुने पलीकडे नेऊन ददवंगत बादशाहाने बांिले ल्या मुमताज-उज-जमानी तहच्या

1

फासी पाठात याचे वाचन दलदल मुहामल असे झाले आहे पण ते चुकून झाले असून ततथे दलाई महामुनी असावे असे इंग्रजी अनुवादातील तळदटपेत ददले आहे.

अध्याय ८

८ माचम १६६५ ते २४ फेब्रुवारी १६६६

७३

थडग्याकडे घेऊन गेला. अंत्यसंस्काराचा नमाज झाल्यावर पार्थिंव घुमटाखाली पुरले गेले. अश्रफ खान याने ‘शाहजहान मेला’ व ‘रजजउल्लाह’ हे शाहजहानच्या मृत्यूचे काळश्ले ष केले . तो ७६ वषम तीन मतहने जगला व ३१ वषम २ मतहन्यांची त्याची राजवट होती. ततथून सात कोसावर, पहाटे च्या सुमारास पादशाहजाद्याला ही बातमी धमळाली. अंत्ययात्रेच्या ददवशी पहाटे तो शहरात पोहोचला व त्याने सांत्वनाचा कायमक्रम पार पाडला. [५४] ही दुखद बातमी धमळाल्यावर बादशाहा, पादशाहजादे व बेगम यांनी सुतक पाळले . यापुढे पत्रे व आज्ञापत्रांवर शाहजहानचा उल्ले ख ‘तफदौस आलशयानी’ या उपािीने करावा असा आदे श ददला गेला. रतववार, ४ फेब्रुवारी १६६६ / ९ शाबान १०७६ ला त्याच्या वधडलांच्या थडग्याला भेट दे ण्यासाठी बादशाहा होडीने आग्र्याला तनघाला. शुक्रवार, २३ फेब्रुवारी १६६६ / २८ शाबान १०७६ ला तो दारा शुकोहच्या वाड्यात उतरला व थडग्याला भेट ददली. दुसऱ्या ददवशी तो तकल्ल्यात गेला व बेगम सातहबा व जनानखान्यातील इतर मतहलांचे सांत्वन केले व त्यांना सुतक संपवायला सांतगतले . काही कारणास्तव त्याला थोडे ददवस आग्र्याला राहावे लागणार होते म्हणून त्याने त्याच्या जनानखान्यातील स्त्स्त्रयांना ददल्लीहून बोलावून घेतले . यावेळी अमीर-उल-उमराच्या पररश्रमांमुळे चातगावचा तकल्ला हाती आला. त्याचा मुलगा बुजग ु म उम्मेद खान व इतर अधिकाऱ्यांचा मान सन्मान करून व भेटवस्तू दे ऊन त्यांना उपकृत करण्यात आले .

अध्याय ९

२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७

७४

अध्याय ९ राजवटीचे नववे वषम - तहजरी १०७६-७७ २५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७ रमजानच्या आगमनाने राजवटीचे नववे वषम सुरू झाले . ईद साठी दरबार सजवला गेला. मंगळवार, २७ माचम १६६६ / १ शव्वाल १०७६ ला आनंददायी संगीत वाजवले गेले. मलशदीतून परतल्यावर बादशाहा ससिंहासनावर बसला. बेगम सातहबाला एक लक्ष सोन्याची नाणी बणक्षस दे ण्यात आली. ततचा वार्षिंक भत्ता १२ लक्ष रुपये इतका होता त्यात पाच लक्ष रुपयांची वाढ करण्यात आली. [५५] पुरहुनर बानू बेगम व गौहरआरा बेगम यांना प्रत्येक़ी एक लक्ष रुपये ददले गेले. राजवटीच्या पाचव्या वषी अधिकाऱ्यांनी बादशाही खजजना आग्र्याहून ददल्लीला हलवला होता तो आता पुन्हा आग्र्याला नेला गेला. राजा जयससिंह याने लसवाला दरबारास पाठवले होते आणण तो आग्र्याच्या बाहेर पोहोचला असल्याने कुमार रामससिंह व मुखललस खान यांना आदे श ददला गेला क़ी पुढे जाऊन त्याची भेट घेऊन त्याला बादशाहासमोर आणावे. शतनवार, १२ मे १६६६ / १८ जजल्कदा १०७६ ला चांद्र वषामनुसार बादशाहाच्या ५० व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. लसवा व त्याचा मुलगा संभा यांना भेटीचे सौभाग्य लाभले . त्याने १५०० अश्रफ़ी नजर व ६००० रुपये तनसार म्हणून प्रस्तुत केले . राजा जयससिंह याने लसवाच्या तवनंतीनुसार त्याला दरबारास पाठवले होते त्यामुळे त्याचे आिीचे अपराि क्षम्य मानून त्याचा सत्कार करून काही ददवसांनी त्याला तनरोप द्यावा अशी बादशाहाची इच्छा होती. भेटीच्या ददवशी तो इतर मान्यवरांसोबत योग्य जागी उभा होता. पण दरबारातील चालीरीती मातहत नसले ल्या अज्ञानाच्या अरण्यातील या जंगली पशूने कोपऱ्यात जाऊन अयोग्य हातवारे करून असंतोष व्यक्त करत कुमार रामससिंहाकडे तक्रार केली. त्याचे मस्तक बुद्धीहीन असल्यामुळे त्याने असा गोंिळ घातला. बादशाहाने आदे श ददला क़ी कुमार रामससिंह याने स्वतःच्या महालाजवळ त्याची राहायची सोय करावी व त्याने आता ततथे परतावे, तसेच त्याचा मुलगा संभा याला दरबारात भेटीसाठी आणावे व फुलाद खानाने त्याच्यावर (लसवा) लक्ष ठे वावे जेणेकरून त्याने काही लबाडी ककिंवा चेटूक करू नये.

अध्याय ९

२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७

ّ ‫منشور متضمن اين‬ ‫] اصدار يافت که آنچه صالح‬۵۶[ ‫کيفيت براجه جيسنگه‬ ِ ّ ‫داند معروض دارد تا باو معامله رود پس از دو سه روز آن‬ ‫بيم قهر‬ ‫از‬ ‫ر‬ ‫مزو‬ ِ ٔ ‫جگرباخته در‬ ّ ‫چاره کار خود شد و‬ ‫اظهار عجز و‬ ‫توسل برفيع مقداران جسته‬ ِ ِ ‫عرضهداشت راجه جيسنگه ز‬ ‫نن رسيد که با او‬ ‫ندامت پيش گرفت درين اثنا‬ ِ ّ ‫ز‬ ‫جرم‬ ِ ‫عهد و قول درميان آوردهام و بمهم‬ ِ ‫ات اين حدود مشغولست گذشت از‬ ‫آن مخذول ر‬ ‫خنداران را‬ ‫باکن مصالح اقربست بنابرآن بفوالدخان حکم شد که ی‬ ِ ‫منل او بردارد کنوررامسنگه ز‬ ‫زز‬ ‫نن از پاسداري غفلت ورزيد – آن گربز محتال‬ ِ ‫از‬ ٔ ‫وادي فرار گرديد کنور‬ ‫هفتم صفر با پرس رهگراي‬ ‫تغن وضع داده بيست و‬ ِ ِ ‫رامسنگه از منصب برطرق شد و براجه جيسنگه فرمان رفت که نيتوی فتنه‬ ‫تماس راجه پنج هزاري پنج هزار سوار‬ ‫بآنضال مضل قرابت دارد و بال‬ ‫جو را که‬ ِ ِ ‫بحسن تدبن دستگن کرده بحضور بفرستد‬ ‫نزد اوست‬ ِ ‫منصب يافته‬ ِ या सगळ्या गोष्टी असले ले बादशाहाचे पत्र राजा जयससिंह याला [५६] पाठवण्यात आले . यापुढे लसवाला कशी वागणूक द्यावी हे ठरवण्यासाठी या घटनांवर जयससिंह याचे मत काय आहे हे त्याला या पत्रात तवचारले गेले. बादशाहाच्या िाकाने घाबरले ला हा नीच माणूस दोन तीन ददवसांनंतर काहीतरी उपाय शोित होता, नामदारांना मध्यस्तीची तवनंती करत, पश्चात्ताप व्यक्त करून शरणागती पत्करत होता. याच वेळी राजा जयससिंह याचे पत्र आले क़ी, ‘मी त्याला सुरक्षेचे आश्वासन व तवश्वास ददला आहे आणण या भागात तो आपल्या बाजूने युद्ध करत आहे. त्याच्या अपरािांबद्दल त्याला क्षमा करणे उधचत होईल’. म्हणून फुलाद खानाला त्याच्या घरावरील पहारे काढायला सांतगतले गेले. कुमार रामससिंह याने ही त्याचे पहारे कमी केले . हा िूतम लबाड आजाराचे सोंग घेऊन त्याच्या मुलासकट रतववार, १९ ऑगस्ट १६६६ / २७ सफर १०७७ ला पळू न गेला. त्यामुळे कुमार रामससिंह याची मनसब काढू न घेण्यात आली. राजा जयससिंह याला आदे श पाठवला क़ी लसवाच्या नात्यात असले ला बंडखोर नेतो, ज्याला राजाच्या तवनंतीनुसार पाच हजारी (५००० स्वार) ददली होती व जो त्याच्या बरोबर राहत होता, त्याला चलाखीने अटक करून दरबारास पाठवावे.

७५

अध्याय ९

२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७

छत्रपती सशवाजी महाराज (साभार BnF)

७६

अध्याय ९

२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७

७७

काही कामांसाठी बादशाहाने ददल्लीला जायचे ठरवले होते त्यामुळे बेगम साहेब व जनान्यातील इतर स्त्स्त्रयांना पुढे पाठवण्यात आले . यावेळी इराणला पाठवले ला दत तरबीयत खान परत आला व त्याने शाह अब्बासच्या हृदयातील कुटीलपणा, मूखमपणा, संताप व कमालीची घमेंड याबद्दल वृतांत दे ऊन खुरासानला युद्ध करण्यासाठी जाण्यची इच्छा व्यक्त केली. तरबीयत खान दरबारात आल्यानंतर त्याने व इतर उपब्स्थतांनी हे प्रकरण पुन्हा बादशाहाच्या कानावर घातले . काही कारण नसताना त्यांच्यातली युती मोडायला तनघाले ल्या ररकाम्या डोक्याच्या राजाला अद्दल घडवावी असे बादशाहाने ठरवले . [५७] त्याप्रमाणे त्याने प्रथम पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्या सोबत महाराजा जसवंतससिंह याला नेमले व मग तो स्वतःच पंजाबवर चाल करून जाईल असे घोतषत केले . तरबीयत खानाने दतावासाच्या कामात काहीतरी घोटाळा केला असल्याने त्याला दरबार मना करण्यात आला. मंगळवार, ९ ऑक्टोबर १६६६ / १९ रतब-उस-सानी १०७७ ला बादशाहा आग्र्याहून यमुनम े ागे ददल्लीला जायला तनघाला, हे अंतर १४ ददवसात पार झाले . शतनवार, २७ ऑक्टोबर १६६६ / ८ जमाद-उल-अव्वल १०७७ ला सौर वषामनुसार बादशाहाच्या ४९ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. काबुलचा नाजजम, आमीर खान याने काही मुघलांना हेरतगरीसाठी अटक करून दरबारास पाठवले होते. बादशाहाने इततमाद खान व मुल्ला अब्दुल कावी याला या प्रकरणी चौकशी करायला नेमले . खानाने त्यातील एकाला बेड्या ककिंवा साखळी न बांिता त्याच्या खोलीत नेले. अचानक तो माणूस खोली बाहेर त्याची हत्यारे बाळगणाऱ्याकडे पळू न गेला व त्याच्याकडू न स्वतःची तलवार खेचून घेऊन परत आत आला आणण खानावर वार करून त्याला मारले . जवळील लोकांनी त्या माणसाला कापून काढले . इतक्या तवश्वासू व जुन्या सेवकाचा मृत्यू झाल्याचे कळल्यावर बादशाहाला अतीव दुःख झाले व त्याने त्याच्या मुलांना व इतर नातलगांना अंगरखे व बढत्या ददल्या. मग तो (बादशाहा) प्रिानमंत्री जाफर खान याच्या वाड्यावर गेला. त्याने बादशाहाला रत्ने व रत्नजधडत भेटवस्तूंचा नजराणा ददला. गेल्या वषी ख्वाजा इशाक काश्गरच्या दतावासाला गेला होता व त्या दे शात चालले ल्या िामिुमीबद्दल कळल्यावर (वाटे तूनच) परतला. पण आता ततथे स्थैयम आले आहे हे कळल्यावर त्याला परत पाठवले गेले. [५८]

अध्याय ९

२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७

७८

इराणचा राजा फारुखाबादहून इस्फाहानला जात असताना वाटे त त्याला संसगम झाल्यामुळे घश्याचे दुखणे होऊन बुिवार, २२ ऑगस्ट १६६६ / १ रतब-उल-अव्वल १०७७ ला तो खारसम्मानला मरण पावला. त्याच्या मंत्र्याने त्याचा मोठा मुलगा धमझाम सफ़ी याला गादीवर बसवले . बुिवार, १२ धडसेंबर १६६६ / २४ जमाद-उस-सानी १०७७ ला औरंगजेब त्याच्या खास लशकारी वर असताना त्याला सीमेवरील बातमीदारांकडू न हे कळले व तो म्हणाला क़ी, ‘माझी इच्छा (या पेक्षा) वेगळी होती. पण खऱ्या सूड घेणाऱ्याने त्याला लशक्षा केली असल्यामुळे इराणवर सैन्य पाठवणे यात कुठले ही औदायम ककिंवा शौयम नाही’. त्यामुळे लाहोरच्या पुढे न जाता काही ददवस ततथेच राहावे असा आदे श पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला दे ण्यात आला. पादशाहजाद्यासोबत गेलेला एक अधिकारी बहादुर खान हा वाटे तून दरबारास परतला, त्याची आलाहाबादला सुभेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. राजा जयससिंह याने लसवाचा नातलग नेतो याला पकडू न दरबारास पाठवले . त्याला तफदाईखानाकडे ददले गेले व त्याने इस्लाम स्वीकारला. लसवाच्या तवरुद्ध चालले ली मोतहम संपवल्यानंतर राजा जयससिंह बादशाही सैन्य घेऊन आददल खानाला िडा लशकवायला गेला होता. तेव्हा दोन टप्पे पुढे गेल्यानंतर आददल खानाचा एक अधिकारी बहलोल याचा नातू अबुल मुहम्मद, राजाला येऊन धमळाला. राजाच्या तवनंतीनुसार त्याला पाच हजारी (५००० स्वार) दे ऊन युद्धात मदत करण्यासाठी नेमले गेले. राजाचे नेतृत्व व त्याचा सेनापती नेतो [५९] यांची सेवा व पररश्रमांमळ ु े फळटण, ताथवडा, खावन आणण मंगळवेढा हे तकल्ले जजिंकले . या काळात अबुल मुहम्मद, खवास खान व त्याच्या अगणणत सैन्याशी अनेक शौयमपूणम आक्रमणे व लढती झाल्या. बादशाही सैन्य यशस्वी झाले . तवजापूर जवळची सवम गावे आपल्या सैन्याने पुनःपुन्हा पादाक्रांत करून उध्वस्त केली गेली. थोडक्यात, बादशाही सैन्य तवजापूरच्या पाच कोसावर पोहोचले . आददल खानाने तवजापूरचा तकल्ला भक्कम करून टाक्या मोकळ्या केल्या, आजूबाजूच्या तवतहरीत काटे कुटे टाकून त्या तनकामी केल्या, तकल्ल्या भोवती असले ली वस्तीची घरे पाडू न टाकली, वेढा लढवायची तयारी केली आणण बादशाही सैन्याला पळवून लावायचे काम त्याच्या सैन्याला ददले . राजा (जयससिंह) तवजापूरच्या तकल्ल्याला वेढा घालायच्या तयारीने आला नसल्याने काही ददवस थांबून परत गेला. शतनवार, २० जानेवारी १६६६ / २४ रज्जब १०७६ ला त्याने भीमा नदी पार

अध्याय ९

२५ फेब्रुवारी १६६६ ते १४ फेब्रुवारी १६६७

७९

केली. आददल खानचा तवश्वासू नोकर, ददयानत राय क्षमा मागून शरणागती व्यक्त करण्यासाठी काही रत्नजधडत वस्तू घेऊन राजाकडे आला. पावसाळा सुरू झाला व पावसाळा औरंगाबादे त काढा असे सांगणारे पत्र राजाला बादशाहाकडू न धमळाले त्यामुळे तो मोतहम सोडू न परतला. यावेळी बादशाही आदे शानुसार ददले रखान पतहले चांद्याला गेला : जमीनदार मांजी मल्लार खान ददले र खानाला भेटला व त्याला पाच लक्ष रुपये दे ऊन बादशाहाला एक कोटी रुपये दं ड तसेच वार्षिंक कर म्हणून दोन लक्ष रुपये दे ण्याचे मान्य केले . मग खान दे वगडला गेला. राजा कोक (कुतकया) ससिंह याने मागची बाक़ी रक्कम म्हणून पंिरा लक्ष रुपये व दर वषी [६०] तीन लक्ष रुपये कर द्यायचे मान्य केले . या प्रदे शांतील व्यवस्था लावून ददल्यावर खान पुन्हा सैन्य घेऊन दख्खनला गेला व त्याला पाच हजारी (५००० स्वार, दोअस्पा सेहअस्पा) ददली गेली.

अध्याय १०

१५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८

८०

अध्याय १० राजवटीचे दहावे वषम - तहजरी १०७७-७८ १५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८ रमजानच्या आगमनाने दान व पुण्यकमामत वाढ झाली. दरबारी अधिकाऱ्यांनी उत्सवाची तयारी केली. रतववार, २४ फेब्रुवारी १६६७ / १० रमजान १०७७, उदीपुरी महाल तहला मुलगा झाला व त्याला मुहम्मद काम बक्ष हे नाव दे ण्यात आले . पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याने लाहोरहून आल्यावर त्याने भेट घेतली. रतववार, १७ माचम १६६७ / १ शव्वाल १०७७ ला बादशाहा मलशदीत जाऊन आला व ससिंहासनावर बसून पादशाहजादे व नामांतकत लोकांना पुरस्कार प्रदान केले . लसवाचा नातलग नेतो, ज्याने इस्लाम स्वीकारला होता, त्याला सुत ं ा केल्यावर तीन हजारी (२००० स्वार) दे ण्यात आली व मुहम्मद कुली खान ही उपािी धमळाली. बयुतातचा ददवाण मीर इमादुद्दीन, याला रहमत खान ही उपािी धमळाली व अजीजुद्दीन याला बहरामंद खान. शतनवार, २३ माचम १६६७ / ७ शव्वाल १०७७ ला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला दख्खनचा सुभेदार नेमन ू , पाच हजाराची वाढ [६१] दे ऊन वीस हजारी (१२००० स्वार) दे ऊन तनरोप दे ण्यात आला. महाराजा जसवंतससिंह, रायससिंह, सफलशकन खान व सरबुलंद खान यांना त्याच्या हाताखाली नेमून पुरस्कार दे ण्यात आले . राजा जयससिंह याला दरबारात बोलावले गेले.

युिुिझाय अिघाणांनी केले ली गडबड बादशाहाला कळले क़ी युसुफझाय अफघाणांनी उठाव करून मुहम्मद शाह या फुटकळ णभकाऱ्याला सेनापती तनयुक्त केले आहे, लबाड भोंद व दुष्ट मुल्ला चालाक याच्या उचापतींमुळे गोंिळ माजला आहे तसेच काळ्या तोंडाचा भागू याने उठावाचे नेतत्ृ व केले आहे. बादशाहाने अटकेचा फौजदार कामील खान याला आदे श ददला क़ी तनलाब नदीच्या प्रदे शातील सगळ्या फौजदार व जाहगीरदारांना एकत्र घेऊन बंडखोरांना शक्य तततके ठे चून टाकावे.

अध्याय १०

१५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८

८१

त्यांचा (बंडखोरांचा) पराभव करण्यासाठी काबुलचा सुभद े ार आमीर खान याला आदे श ददला क़ी शमशेर खानाच्या हाताखाली पाच हजार लोक द्यावेत. कामील खानाने उत्साहाच्या भरात शमशेर खानाची वाट न बघता शत्रूशी अटीतटीचे युद्ध करून त्यावर मात करून बादशाही ठाणी परत घेतली. गुरुवार, २ मे १६६७ / १८ जजल्कदा १०७७ ला शमशेर खानाने तनलाब नदी ओलांडल्यावर अटकेपाशी आला व युसफ ु झाय दे शाच्या समोरील नदीच्या पलीकडच्या तीरावर आला व शत्रूच्या सीमेत लशरला. शत्रू डोंगरात जाऊन संिीची वाट बघत बसला. त्या ददवशी मुहम्मद आमीन खान मीर बक्षी, आमीर खान, कुबाद खान व इतर सरदार, एकूण ९००० सैन्य बंडखोरांना िडा लशकवण्यासाठी दरबारातून पाठवले गेले. हा खान ततथे पोहोचायच्या आिी शमशेर खानाने मोठी युद्ध व झटापटी केल्या होत्या. [६२] त्यांच्या जमातीतील तीनशे मललक नेत्यांना बंदी बनवले गेले. हे कळल्यावर

बादशाहाने शमशेर खान व कामील खानाला शाही पुरस्कार दे ऊन सन्मातनत केले . गुरुवार, ९ मे १६६७ / २५ जजल्कदा १०७७ ला चांद्र वषामनुसार बादशाहाच्या ५१ व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. या समारंभात पादशाहजादा मुहम्मद आजम याला तीन हजाराची वाढ दे ऊन पंिरा हजारी (७००० स्वार) दे ण्यात आली. पादशाहजादा मुहम्मद अकबर याला आठ हजारी (२००० स्वार) व तुमान तुघ, नगारे व छत्री ददली गेली. उम्दत-उल-मुल्क जाफर खान व दरबारातील तसेच प्रांतांतील अधिकाऱ्यांना तवतवि पुरस्कार दे ऊन गौरतवण्यात आले . बुखारा व बाल्खच्या राजांचे दत रुस्तम बे व खुशी बे यांना अंगरखे व रोख रक्कम दे ऊन तनरोप दे ण्यात आला. सगळे धमळू न बुखाऱ्याच्या दतावर दोन लक्ष रुपये तर बाल्खच्या दतावर एक लक्ष पन्नास हजार खचम झाले . बुखाऱ्याचा रझवी खान याला अतबद खानाच्या जागी सद्र तनयुक्त केले गेले. तरबीयत खानाचे अपराि माफ करून त्याला ददवंगत खानदौरानच्या जागी ओरीसाचा सुभेदार नेमले गेले. बऱ्हाणपूरच्या बातमीदारांकडू न कळले क़ी राजा जयससिंह औरंगाबादहून दरबारास येत असताना ततथे (बऱ्हाणपूरला) आल्यावर १० जुलै १६६७ / २८ मुहरमम १०७८1 ला त्याचा मृत्यू झाला. बादशाहाने त्याचा मुलगा कुमार रामससिंह,

1

इंग्रजी अनुवादातील तळटीपेनुसार, हा ददनांक चुकला आहे. ले खकाचे एकमेव सािन म्हणजे आलमगीरनामा इतकेच सांगतो क़ी – २८ ला मतहना ददले ला नाही बऱ्हाणपूरच्या बातम्यांवरून

अध्याय १०

१५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८

८२

ज्याला इतके ददवस लशक्षा केली होती, त्याला राजाची उपािी व बरेच पुरस्कार दे ऊन सन्मातनत केले . मुहम्मद आमीन खान याने अफघाण दे शात पोहोचल्यावर त्यांची (अफघाणी लोकांची) घरेदारे उध्वस्त करून शक्य होईल तेवढे त्यांना त्रस्त केले . शमशेर खानाला ततथे ठे ऊन बादशाहाने त्याला लाहोरला परतायला सांतगतले , [६३] व इब्रातहम खानाच्या जागी ततथली सुभेदारी ददली. सोमवार, २ धडसेंबर १६६७ / २५ जमाद-उस-सानी १०७८ ला सौर वषामनुसार बादशाहाच्या ५० व्या वाढददवसातनधमत्त त्याची तुला केली गेली. लहान ततबेटचा जमीनदार मुराद खान व काश्मीरच्या बातमीदारांच्या बातम्यांवरून बादशाहाला कळले क़ी काश्गरचा राजा अब्दुल्लाह खान याला त्याच्या मुलाने हकलवून ददल्यामुळे तो त्याचे कुटुं ब, आणश्रत व काही नोकरांना घेऊन अत्यंत हालाक़ीच्या पररब्स्थतीत बादशाहाकडे आश्रय धमळे ल या अपेक्षेने या ददशेला वळला. असेही कळले क़ी ख्वाजा इशाक, ज्याला त्याच्याकडे दत म्हणून पाठवले होते त्याने त्याची भेट घेऊन त्याला या संकटातून बाहेर पडायला मदत केली, व लवकरच ते काश्मीरला पोहोचतील. हे कळताच बादशाहाने अपार काळजीने व त्याचे मूल्य ओळखून सैफुल्लाह व बदक्शानचा ख्वाजा सादीक यांना या नामवंत राजाचे आदराततथय करायला नेमले . एक खंजीर, एक रत्नजधडत जजघा, १०९ अरब, इराणी व तुरक़ी घोडे, त्यातील काहींना रत्नांची व सोन्याची झालर होती, दोन हत्ती, काही सोन्याची व चांदीची भांडी, काही पररिान करण्याची वस्त्रे, चांगला अंगरखा, तंबू, शाधमयाने, मौल्यवान गाललचे व अशा अनेक शोणभवंत वस्तु वरील अधिकाऱ्यांबरोबर ददल्या गेल्या. त्यांना लवकरात लवकर काश्मीरला जाऊन या उच्चकुलीन खानाला ततथे भेटून दरबारास घेऊन येईपयंत त्याची काळजी घ्यायला सांतगतले गेले. काश्मीरचा सुभद े ार मुमताज खान याला आदे श ददले गेले क़ी अब्दुल्लाह खान [६४] जेव्हा त्या रम्य दठकाणी येईल तेव्हा राज्याकडू न त्याला लागतील त्या सवम सुतविा ददल्या जाव्यात तसेच प्रदे शाच्या खजजन्यातून पन्नास हजार बादशाहाला कळले क़ी राजा जयससिंहचा शहरात मृत्यू झाला. जयपूर राज्याच्या वंशावळीत त्याच्या मृत्यूचा ददनांक २८ ऑगस्ट १६६७ (१८ रतब-उल-अव्वल) ददला आहे त्यामुळे त्याची बातमी बादशाहाला २८ मुहरमम (१० जुलै) ला नाही तर २८ रतब-उल-अव्वल ला धमळाली असणार.

अध्याय १०

१५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८

८३

रुपये व जेव्हा तो ततथून दरबारास यायला तनघेल तेव्हा सुभेदाराने त्याच्या सोबत येऊन त्याला बादशाहा समोर प्रस्तुत करावे. लाहोरचा सुभद े ार मुहम्मद आमीन खान याला आदे श ददला गेला क़ी अब्दुल्लाह खान जेव्हा त्या राज्याच्या सीमेत प्रवेश करेल तेव्हा सन्मानाने त्याचे स्वागत करून त्याची सवम प्रकारे काळजी घेऊन तसेच सरकारी खजजन्यातून पन्नास हजार रुपये दे ऊन त्याच्या वतीने मोठी रक्कम व काही वस्तू द्याव्यात. वाटे तील इतर सुभद े ार व फौजदारांना ही त्या त्या दठकाणी त्याचे हरप्रकारे आदराततथय करावे व त्यांच्या प्रदे शातून जाताना त्याची उत्तम सोय करावी असे आदे श ददले गेले. गुरुवार, १९ धडसेंबर १६६७ / १३ रज्जब १०७८ ला मुहम्मद आमीन खानाच्या जागी दातनशमंद खानाला मीर बक्षी केले गेले व एक तवशेष अंगरखा आणण एक रत्नजधडत ले खणीदान ददले गेले. यावेळी मुहम्मद मुआतमाद खानाच्या जागी ख्वाजा बहलोल याला ग्वाल्हेरचा तकल्ले दार नेमले गेले व त्याला एक अंगरखा, एक घोडा, एक खंजीर व खखदमतगुजार खान ही उपािी दे ण्यात आली. त्यावेळी बंगालच्या बातम्यांवरून कळले क़ी नीच आसामी लोकांनी तनभमयपणे दुसऱ्यांदा त्यांची सीमा ओलांडून मोठी सेना व नौदलासतहत बंगालच्या सीमेवरील गौहाटीवर आक्रमण केले होते. ततथला ठाणेदार, सय्यद तफरुज खान याच्याकडे कुमक न पोहोचल्याने शत्रूने गौहाटी घेतले व या खानाने तनकराची [६५] झुंज दे त त्याच्या अनेक साथीदारांसोबत आपल्या सेवेप्रती तनष्ठा दाखवत प्राण अपमण केले . बादशाहाने ठरवले क़ी शत्रूला परास्त करण्यासाठी दरबारातील मोठ्ा व नामवंत सरदाराला बादशाही सैन्य घेऊन बंगालला पाठवले पातहजे व त्याने बंगालमिील सैन्याला बरोबर घेऊन या दुष्ट जमातीला शासन केले पातहजे. त्यामुळे राजा रामससिंह याला या मोतहमेसाठी तनयुक्त करण्यात आले . शुक्रवार, २७ धडसेंबर १६६७ / २१ रज्जब १०७८ ला त्याला एक अंगरखा, सोन्याची झालर असले ला घोडा व मोत्यांचा पट्टा असले ला रत्नजधडत खंजीर दे ऊन तनरोप दे ण्यात आला. नुसरत खान1, क़ीरतससिंह

1

इंग्रजी अनुवादात नालसरी खान म्हटले आहे, फासी पाठात नुस्र त खान (‫)نرصت خان‬.

अध्याय १०

१५ फेब्रुवारी १६६७ ते ३ फेब्रुवारी १६६८

८४

राठोर1, रघुनाथ ससिंह मैरततया, ब्रह्मदे व लससोददया व इतर अनेक नामवंत सरदार व मनसबदार, १५०० अहदी व ५०० बरकंदाज त्याच्या हाताखाली दे ण्यात आले . इथे माझ्या पतहल्या दहा वषांच्या इततहासाचा सारांश संपला.

1

इंग्रजी अनुवादात केसरी ससिंग भूरतीया (राठोड) असे ददले आहे पण फासी पाठात तळटीपेत क़ीरतससिंह राठोड (‫ )کنتسنگه راتهور‬अशी शुद्धी सुचवली आहे.

अध्याय ११

मूळ ले खकाची प्रस्तावना

८५

अध्याय ११ मूळ ले खकाची प्रस्तावना [२२ ओळींची दटप्पणी वगळली आहे]

[६७] वाचकांस हे कळू दे क़ी आलमगीरनाम्यात बादशाहा अबुल जफर

मुतहयुद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी याच्या पतहल्या दहा वषांच्या राजवटीतील घटना ज्याने ललतहल्या तो *** [६८] धमझाम मुहम्मद काझीम. बादशाहाने त्या ले खकाला याच्या पुढचा इततहास ललतहण्यास मनाई केली होती. *** या बादशाहाच्या मृत्यूनंतर अबुल नजर कुतबुद्दीन शाह आलम बहादुर पादशाही गाझी याच्या राजवटीत, वजीरच्या ददवाणीचा मुख्य व आलमगीरचा लशष्य इनायतुल्लाह खान याने मुहम्मद मुस्तैद खान या तनरुपयोगी मूखामला तवनवणी केली क़ी औरंगजेबाच्या शेवटच्या चाळीस वषामतील अनेक घडामोडी व घटना, तसेच त्याचे उद्गार व आचार यापासून आपण वंधचत आहोत व आलमगीरचे कायम इततहासात नोंदवले गेलेले नाही. ‘तू भाषेचा प्याला चाखला आहेस आणण आलमगीराची प्रशंसा मांडण्याची तसेच हे काम पार पाडण्याची क्षमता तुझ्यात आहे’. मी तवनवणी केली क़ी, ‘हे काम [६९] अवघड आहे, अनेक दोष अंगी असले ल्या माझ्यासारख्या माणसाच्या क्षमते बाहेरचे आहे. असे काम पार पाडण्यासाठी गुणवत्तेची जाण असले ल्या नेत्यांची तसेच शब्द हाताळण्याची क्षमता असले ले सुतवचारी तज्ञांची आवश्यकता असते. त्यांच्या अभावात झाले ले काम तवस्मृतीत गेल्यातच जमा असते. दरबार व प्रांतातील बातमीपत्रांचे कागद गोळा केले तर संकलनाचे काम सहजपणे पूणम करता येईल. वाटे ल ते करून आपली तीव्र इच्छा पूणम करणे व त्यातून आपल्या मागे धचरंतन स्मरण ठे वणे या लशवाय एखाद्या उत्कट धमत्राचा दुसरा तवचार असू शकत नाही’. (पण) माझ्या तवनवणीचा (त्याच्या मनावर) काही पररणाम झाला नाही. हा तवनम्र सेवक, ज्याला बादशाहाच्या धमठाशी प्रामाणणक राहणे हे त्याचे कतमव्य वाटत असे, व जो आयुष्यभर बादशाहाच्या दाराबाहेर उभ्या असले ल्या सेवकांतील एक पाईक होता, ज्याने बधघतले ले सवम व त्या काळात शासक़ीय पदांवर काम करणाऱ्या तवश्वासू धमत्रांना तवचारणा केल्यावर त्यांच्याकडू न जे कळले ते सगळे नोंदवले होते. बादशाहा आलमगीरच्या दै वी तवजयांचे हे पुस्तक असल्याने याला मआलसर-ए-

अध्याय ११

मूळ ले खकाची प्रस्तावना

८६

आलमतगरी हे नाव मला सुयोग्य वाटले तसेच यातून त्याचे (पूणमत्वाचे) वषम, तहजरी ११२२ (१९ फेब्रुवारी १७१० ते ७ फेब्रुवारी १७११)1, ही कळते. [७०]

1

इंग्रजी अनुवादात इथे तहजरी ११२० व इसवी १७०८ म्हटले आहे. मआलसर-ए-आलमगीरी हा कालश्ले ष असून याची बेरीज ११२२ येते. कहिंदी अनुवादात ही तहजरी ११२२ अशी तारीख ददली आहे. इंग्रजी अनुवादाच्या प्रस्तावनेत (या पुस्तकात सुरवातीला ददली आहे) जदुनाथ सरकार यांनी सन १७१० मध्ये हा ग्रंथ पूणम केला असे म्हटले आहे. यावरून इथे तहजरी ११२० व सन १७०८ हा उल्ले ख नजरचुक़ीने झाला असावा. दुसरे असे क़ी तहजरी ११२२ हे ईसवी १७१० मध्ये सुरू होऊन सन १७११ मध्ये संपते. त्यामुळे पुस्तकाचे ले खन यापैक़ी नेमके कुठल्या वषी संपले हे सांगणे कठीण आहे. वरील स्पष्टीकरणावरून तहजरी ११२२ हे ग्रंथाच्या पूणमत्वाचे वषम िरले तर ७ फेब्रुवारी १७११ च्या आत ललहून संपले असे म्हणता येते.

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

८७

राजवटीचे आकरावे वषम - तहजरी १०७८-७९ ४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९ रमजानात राजवटीचे ११ वे वषम सुरू झाले . दरबारातील अधिकारी (राज्याणभषेकाचा वार्षिंक) उत्सवाची तयारी करू लागले . रमजानचा मतहना ददवसा उपास व रात्र शांततेत घालवण्यात गेला. गुरुवार, ५ माचम १६६८ / १ शव्वाल १०७८ ला बादशाहा ईद-उल-तफत्रच्या नमाजासाठी मलशदीत गेला व परत आल्यावर ददवाण-एआम मिील ससिंहासनावर बसला. पादशाहजादे व सहकाऱ्यांनी त्याला अणभवादन केले व त्यांना बढत्या, मानाची वस्त्रे व उपाध्या दे ण्यात आल्या. राज्याणभषेक राजपत्र – मुहम्मद आजमला एक अंगरखा व एक रत्नजधडत िूप तर मुहम्मद काम बक्षला अंगरखा धमळाला. उम्दत-उल-मुल्क जाफर खान याला अंगरखा, चांदीची मूठ असले ला खंजीर, मीर बक्षी दातनशमंद खान याला अंगरखा, एक हत्ती व वाढ दे ऊन पाच हजारी (२००० स्वार), राजवैद्याला २५०० जात (१०० स्वार) अशी वाढ धमळाली, [७१] तहम्मत खानला २५०० (१२०० स्वार), तर लु त्फुल्लाह खानाला १५०० (५०० स्वार), असद खानाचा मुलगा मुहम्मद इस्माईल, याला तीन सदीची1 मनसब धमळाली. शेख मीर चा मुलगा, मुहम्मद याकूब याच्याकडे आिी चार सदी (१०० स्वार) होती त्याला दोनशे स्वारांची वाढ धमळाली. इब्रातहम खानाला लश्कर खानाच्या जागी तबहारचा सुभद े ार नेमले गेले व त्याला वाढ दे ऊन पाच हजारी (५००० स्वार) धमळाली. अहमदाबाद, गुजरात इथला सुभेदार महाबत खान याने भेट घेतली व त्याला सय्यद अमीर खान याच्या जागी काबुलचा सुभेदार नेमले गेले. बादशाहाला चैन करायची आवड नव्हती व तो कतमव्यतनष्ठ असल्यामुळे त्याला आनंदोत्सवासाठी वेळ धमळत नसे म्हणून त्याने दरबारातील प्रमुख संगीतकार (गायक?) खुशहाल खान, तबसराम खान, रासबीन व इतरांनी दरबारात आले तरी चाले ल पण संगीत सादर करू नये असे आदे श ददले . कालांतराने ते (संगीत) पूणमपणे तनतषद्ध झाले . गुरुवार, १२ माचम १६६८ / ८ शव्वाल १०७८ ला अब्दुल्लाह खान (काश्गरचा हद्दपार केले ला राजा) ददल्लीच्या जवळपास येऊन एका बागेत थांबला होता. त्याचे उत्तम

1

सदी म्हणजे शत, शंभर. त्यावरून तीन सदी म्हणजे तीनशे.

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

८८

प्रकारे स्वागत करण्याचा आदे श बादशाहाने ददला. रतववार, १५ माचम १६६८ / ११ शव्वाल १०७८ ला त्याला बादशाहा समोर घेऊन जाण्यासाठी उम्दत-उल-मुल्क जाफर खान व आसद खान शहराबाहेर गेले. घोड्यावर स्वार असताना त्याने दोघांशी हस्तांदोलन केले , ददवान-ए-आमच्या दारापयंत घोड्यावर आला, व ततथून पुढे पालखीने लाल कठड्यापयंत आला, [७२] मग चांदीच्या कठड्यापयंत पायी आला. सोन्याच्या कठड्याजवळ बसून त्याला दे ऊ केले ल्या बादशाहाच्या ताटातील अन्नपाणी त्याने ग्रहण केले . नंतर त्याला ददले ल्या रत्नजधडत दं डाचा मुका घेऊन त्याने तो हातात घेतला. एक प्रहर सहा घटकांनंतर तो घुसलखान्यात गेला व नंतर नदीकाठी जाऊन बसला. एका तासानंतर बादशाहा ततथे आला. खान त्याच्याजवळ गेला व अणभवादन करून त्याच्याशी हस्तांदोलन केले . बादशाहाने मग त्याला हात िरून मलशदीत नेले. अध्याम तासानंतर त्याला परतायची अनुमती धमळाली. एक्कताज खान, मुबाररज खान व ख्वाजा मुहम्मद सादीक त्याला घेऊन ददवंगत रुस्तम खान याच्या आकषमक हवेलीत घेऊन गेले. ततथे बादशाहाच्या वैयलक्तक संग्रहातील गाललचे व घरात वापरायच्या इतर वस्तु नुकत्याच नेऊन ते नव्याने सजवले होते. ददवाण-ए-आम मध्ये त्याच्यासाठी अकरा लक्ष रुपये रोख, वीस हजार रुपयांच्या वस्तु व रत्ने, सोने, चांदीकाम असले ले व सोन्याचे तवणकाम असले ला घोड्याचा झगा हे सगळे आणून ठे वले होते ते त्याला सादर केले गेले. त्याच्या पुढचा पूणम ददवस त्याने त्याच्या जनान्यासोबत सातहबाबादच्या बागेत तवलासात घालवला. [७३] बेगम सातहबा कडू न त्याला वीस हजार रुपये, १८ थान कापड, फुल कटारा असले ला रत्नजधडत खंजीर, सोन्याचे तबक असले ला रत्नजधडत पानदाणी, मुलाम्याची थूंकदाणी, अभ्रकाचा चौरंग, खाण्याचे २०० पदाथम व अगमजाह आणण पान ददले गेले. २९ माचम १६६८ / २५ शव्वाल १०७८ ला (ससिंहासनावरून) उठू न जेव्हा बादशाहा दरबारातील कारंज्याजवळ उभा होता तेव्हा उम्दत-उल-मुल्क खानाला घेऊन समोर आला. त्यांच्यात एका याडामपेक्षा कमी अंतर होते. खानाने वाकून नमन केले व बादशाहाने स्वतःच्या कृपावंत हृदयावर हात ठे वला. त्याच्या आदे शानुसार खान बादशाहा समोर कारंज्याजवळ उभा रातहला व त्याला तुघून1 ससाणा भेट ददला गेला. खानाचे मनोरंजन करण्यासाठी

1

तुघून ककिंवा तुघन हा ससाण्याचा प्रकार आहे, फासी शब्दकोशात (स्टा. ८२२) याला शाही ससाणा म्हटले आहे.

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

८९

त्याला हत्तीची झुंज दाखवून उम्दत-उल-मुल्क याला त्याच्या सोबत थांबायचा आदे श दे ऊन बादशाहा त्याच्या शयनगृहात गेला. शतनवार, २५ एतप्रल १६६८ / २३ जजल्कदा १०७८ ला बादशाहाची पारंपाररक पद्धतीने घुसलखान्यामध्ये तुला करण्यात आली. चांद्र वषामप्रमाणे त्याच्या आयुष्यातील ५२ वे वषम सुरू झाले . पादशाहजादे व नामदारांना भेटवस्तू धमळाल्या व बेगम सातहबा आणण इतर स्त्रीवगम व पादशाहजाद्यांनी बादशाहाला भेटवस्तू ददल्या. रतववार, ३ मे १६६८ / १ जजल्हेज १०७८ ला आसामच्या राजाची मुलगी रहमत बानू, तहचा तववाह मुहम्मद आजमशी करण्यात आला, मुलीची मेहर एक लक्ष ऐंशी हजार रुपये होती. तट्टा प्रांतातून कळले क़ी लारी बंदराच्या कायमक्षेत्रातील सामावनी [७४] गाव त्यातील तीस हजार रतहवाशांसतहत भूकंपामुळे बुडाले . मंगळवार, १२ मे १६६८ / १० जजल्हेज १०७८ ला बादशाहा ईद-उज-जुहा च्या

नमाजासाठी गेला. शुक्रवार, १७ जुलै १६६८ / १७ सफर १०७९ ला मुहम्मद आजमचे लग्न दारा व नाददरा बानू बेगम यांची मुलगी जहानझेब बानू बेगम तहच्याशी लावण्यात आले . नाददरा ही जहान बानू बेगमची मुलगी होती. जहान बानू ही अकबरचा चौथा मुलगा सुलतान मुराद याची मुलगी व शाह जहानचा मोठा भाऊ सुलतान पवीझ याची बायको होती. बादशाहाची बहीण जहाआरा बानू जजला बेगम सातहबा म्हणत, ततने जहानझेब बानू बेगमला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवले होते. ततच्याच घरी हा समारंभ पार पडला.

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

हत्तींिी झुंज (बहुदा िन १६३९) पादशाहनाम्यातील या धचत्रात शाहजहान व त्याची दोन मुले वर ददसतात (साभार MET)

९०

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

९१

उम्दत-उल-मुल्क जाफर खान व इतर नामदारांनी एक लक्ष साठ हजार रुपये लग्नाची भेट (साचक) म्हणून ददले . शतनवार, १ ऑगस्ट १६६८ / ३ रतब-उल-अव्वल १०७९ ला लश्कर खानाला तातहर खानाच्या जागी मुलतानचा सुभेदार म्हणून नेमले गेले. बंगालहून बातमी आली क़ी आिी िुळीचे लोट तयार झाले व एक भयानक उंच तपशाच्च ददसले आणण काही वेळानंतर नाहीसे झाले . त्यानंतर असे लक्षात आले क़ी त्याच्या आसपास दीड मैलाच्या पररसरात माणसे व प्राणी मेलेल्या ककिंवा दुखापत झाले ल्या अवस्थेत पडले होते. सोमवार, १४ सप्टें बर १६६८ / १७ रतब-उस-सानी १०७९ ला जौनपूरहून बातमी आली क़ी ७ ऑगस्ट १६६८ पासून २२ ददवस प्रचंड पाऊस पडला होता. तकल्ल्यातील अनेक उंच इमारती व पूवेकडील तटाची २२ याडम भभिंत पडली होती. काही दठकाणी वीज पडली होती, काही माणसे मेली होती व जे बेशद्ध ु झाले होते ते शुद्धीवर आल्यावर बतहरे झाले होते. अब्दुन नबी खान [७५] याला फतहपूर झुंझुनू येथील त्याच्या पदावरून काढल्यावर त्याला दोन हजारी (१००० स्वार) दे ऊन मथुरेचा फौजदार म्हणून नेमणूक झाली. मुहम्मद अली खानला रौशनआरा बानू बेगमचा ददवाण नेमले गेले. बादशाहाने आलाहाबाद व अविच्या सुभद े ार व फौजदारांना आदे श ददला क़ी लहान मुलांना पकडू न त्यांचे लशश् कापून टाकणाऱ्या लोकांना शोिून बेड्या घालू न दरबारात हजर करावे व अशा पाशवी कृत्यात कोणीही सहभागी होऊ नये असा कायमस्वरूपी आदे श असल्याचे समजावे. बुिवार, २१ ऑक्टोबर १६६८ / २५ जमाद-उल-अव्वल १०७९ ला सौर वषामनुसार बादशाहाचे ५१ वे वषम सुरू झाले . बादशाहा घुसलखान्यात ससिंहासनावर बसला होता व तो तुला समारंभाकरता सजवला होता. पण ५१ व्या वषामच्या सुरवातीला त्याने वाढददवसाच्या ददवशी केली जाणारी तुला समारंभाची पद्धत थांबवायचा आदे श ददला. मुहम्मद आजम याला अध्याम बायांचा अंगरखा, एक रत्नजधडत पागोटे व एक तवशेष अंगरखा धमळाला. ददल्लीत आठ मतहने आनंदात घालवल्यावर अब्दुल्लाह खान याला पतवत्र शहरांना (मक्का, मदीना) भेट द्यायची इच्छा झाल्याने [७६] त्याला तनरोप दे ण्यात आला. बादशाही अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रवासाची पूवत म यारी केली. त्यांच्या प्रदे शातून जाताना मोठ्ा सन्मानाने खानाचे आदराततथय करावे असे आदे श ददल्ली पासून

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

९२

सुरतेपयंत सवम सुभेदार, दं डाधिकारी व फौजदारांना पाठवले गेले. हे पाहुणे आले तेव्हा त्यांची दे खभाल करण्यासाठी अधिकारी नेमण्यात आले होते. तेव्हापासून सगळे धमळू न त्यांच्यावर दहा लक्ष रुपये खचम झाले होते. खालशाचा ददवाण, इनायत खान याला वाढ दे ऊन नऊ सदी (१०० स्वार) ददली गेली, शेख सुलैमान याची मीर हुसैनीच्या जागी न्यायालयाचा दरोगा म्हणून नेमणूक झाली व सात सदी (७० स्वार) मनसब असले ला बुखाऱ्याचा राजा अब्दुल अजीज याचा पागाप्रमुख इस्लाम कुली, याला हजारी ददली गेली. काबुलचा पदच्युत केले ला सुभेदार सय्यद आमीर खान, याने भेट घेतली व ५०० मोहरा आणण दोन हजार रुपये सादर केले . त्याने बादशाहाच्या पायाचा मुका घेतला व बादशाहाने मोठ्ा मनाने त्याच्या पाठीवर हात तफरवला. खुशहाल खान व उत्सवाचे आयोजन करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांना तीन हजार रुपये व ४० खखलत ददल्या गेल्या. मक्केच्या महापौराचा दत सय्यद उस्मान, याला अंगरखा, नऊ हजार रुपये व चांदीची झालर असले ला घोडा दे ऊन तनरोप दे ण्यात आला. शफ़ी खान याला तकफायत खानाच्या जागी ददवान-ए-तान नेमले गेले. मुलतानचा पदच्युत केले ला सुभेदार तातहर खान, याने भेट घेतली व १०० मोहरा आणण १००० रुपये सादर केले . मुलगा झाल्याच्या आनंदात महाबत खानाने [७७] पाठवले ल्या ५०० मोहरा बादशाहासमोर सादर झाल्या. मुलाचे नाव जमान बेग ठे वले गेले. नोकर व जमीनदार वगळता तीन सदींपयंत (३००) मनसब असले ल्यांचे सवम स्वार बडतफम करण्याचा आदे श बादशाही बक्षींना ददला गेला. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम व परांड्याचा तकल्ले दार मुख्तार खान यांच्याकडे काम करणारा सफलशकन खान आला व बादशाहाची भेट घेतली. ईश्वरी शरीअत व सुन्नत मिील तनयमांचे काटे कोर पालन करण्यासाठी व िमामत तनतषद्ध मानले ले नातवन्य नष्ट करण्यासाठी तकल्ल्याच्या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस बसवले ली व कुशल लशल्पींनी घडवले ली खऱ्या हत्तीच्या आकाराची दोन दगडी लशल्पे काढू न टाकण्याचा आदे श बादशाहाने ददला. या लशल्पांवरूनच त्याला हाततयापुल हे नाव पडले होते. आजमचे लग्न. सोमवार, २१ धडसेंबर १६६८ / २७ रज्जब १०७९ ला लग्नाचा आनंदोत्सव सुरू झाला. रतववार, ३ जानेवारी १६६९ / १० शाबान १०७९ ला बादशाहा

अध्याय ११

४ फेब्रुवारी १६६८ ते २२ जानेवारी १६६९

९३

ददवान-ए-खास मध्ये बसला, पादशाहजाद्याला चारकब व अंगरखा, दहा अरबी व इराक़ी घोडे, सोन्याची झालर असले ले दोन हत्ती, एक तलायर, वीस हजार रुपयांची एक रत्नजधडत तलवार, साठ हजार रुपयांची एक पगडी [७८] व बारा लक्ष रुपये रोख धमळाले . बेगम सातहबा तहला सवारगंज नावाचा पंिरा हजार रुपयांचा हत्ती व जहानझेब बानू बेगम तहला दोन हत्ती धमळाले . रात्रीच्या पाच घटकांनंतर पादशाहजादा लवाजम्यासमेत बादशाहाकडे आला, जो नंतर मलशदीत गेला. काझी अब्दुल वाहाब याने लग्न लावले , मीर सय्यद मुहम्मद कनौजी हा त्याचा सहाय्यक होता आणण मुल्ला औज अब्ख्सखाती व शेख सैफुद्दीन सरकहिंदी हे साक्षीदार होते. धमळाले ली मेहर सहा लक्ष रुपये इतक़ी होती. बादशाहा व पादशाहजादा घोड्यावरून बेगम सातहबाच्या घरी गेले. नामदारांपासून ते दीड हजारी सरदारांपयंत सवम पादशाहजाद्याच्या वरातीत सामील झाले . रात्रीचे दोन प्रहर एक घटका झाल्यावर बादशाहा व पादशाहजादा परतले . सकाळ होता होता नवरी मुलगी पादशाहजाद्याच्या घरी आली. रतववार, १० जानेवारी १६६९ / १७ शाबान १०७९ ला बादशाहा पादशाहजाद्याच्या घरी गेला. [७९] तकल्ल्यापासून त्याच्या घरापयंत सोन्याचे, चांदीचे व सािे कापड अंथरले होते. बादशाहा सोन्याच्या ससिंहासनावर बसला होता. दरबारातील उपब्स्थतांनी (त्याला) अणभवादन केले . नामदारांपासून ते दीड हजारी सरदारांपयंत सवांनी बक्षी माफमत अणभवादन करून मानाची वस्त्रे घ्यावीत व इतरांनी खखलअतखान्याच्या दरोग्यामाफमत अणभवादन करावे असा आदे श ददला गेला. पादशाहजाद्याने पाच लक्ष रुपयांची रत्ने व कापड भेट ददले . नंतर बादशाहा अंतःपुरात गेला व त्यानंतर महालात परतला. बादशाहा परत आला तेव्हा पादशाहजादा त्याच्या स्वागतासाठी दरवाज्या बाहेर गेला होता. परतीच्या वेळी त्याला घुसलखान्यातून मानाने तनरोप दे ण्यात आला. बुिवार, ६ जानेवारी १६६९ / १३ शाबान १०७९ ला काश्गरचा राजा बल्बरीस खान याचा दत अब्दुर रशीद याने भेट घेतली व त्याच्या िन्याचे पत्र सादर केले . अजांचा दरोगा खखदमत खान याच्याकडे ते ददले गेले. १३ जानेवारी १६६९ / २० शाबान १०७९ ला बादशाहा ने आदे श ददला क़ी पुरुषांनी त्यांच्या कपड्यांमध्ये सोन्याचा वापर करू नये कारण ते (िमामत) तनतषद्ध मानले होते.

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

९४

अध्याय १२ राजवटीचे बारावे वषम - तहजरी १०७९-८० २३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७० बादशाहाने रमजानचा मतहना िार्मिंक कृत्यांमध्ये घालवला. दरबारी अधिकाऱ्यांनी राज्याणभषेक ददनाच्या समारंभाची तयारी केली. [८०] शुक्रवारी शव्वालचे चंद्र दशमन झाले . ईद च्या ददवशी बादशाहा ईदगाहात गेला व परतताना शुक्रवारचा नमाज जामा मलशदीत केला. [१ शव्वालला सोमवार होता, २२ फेब्रुवारी]. मंगळवार, २३ फेब्रुवारी १६६९1 / २ शव्वाल १०७९ ला तो रत्नजधडत ससिंहासनावर बसला. राज्याणभषेक ददनाचे राजपत्र. पादशाहजादा मुहम्मद आजम याला अंगरखा व पंिरा हजारी (९००० स्वार) अशी वाढ धमळाली, पादशाहजादा अकबर याला अंगरखा धमळाला, उम्दत-उल-मुल्क जाफर खान, मुहम्मद आमीन खान, आसद खान, नजर मुहम्मद खान याचा मुलगा अब्दुर रहमान सुलतान, नामदार खान, दातनशमंद खान, सय्यद मुनाव्वर खान व इतर लहान थोर अधिकाऱ्यांना अंगरखे, घोडे, हत्ती व बढत्या धमळाल्या. खुसरो सुलतान याचा मुलगा बादी सुलतान, याला दोन हजारी (२०० स्वार) धमळाली. खलीलु ल्लाह खानाचा मुलगा आमीर खान याला हसन अली खानाच्या जागी मनसबदारांचा दरोगा केले गेले. नजाबत खानाचा मुलगा मुआतकाद खान याच्याकडू न काहीतरी आगळीक झाल्यामुळे त्याची मनसब काढू न घेण्यात आली होती, ती त्याला पुन्हा बहाल करत दोन हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. बहलोल खान धमयाना याचा नातू अबुल मुहम्मद [८१] दख्खनहून भेटीस आला, त्याला पाच हजारी (४००० स्वार) व इखलास खान ही उपािी धमळाली. परांड्याचा तकल्ले दार मुख्तार खान याला (नेमणुक़ीच्या जागी) जायची परवानगी धमळाली. गुरूवार, ८ एतप्रल १६६९ / १७ जजल्कदा १०७९ ला ग्रहण होते, रीतीप्रमाणे प्राथमना व दानिमम केला गेला. िमामचा तारणहार असले ल्या औरंगजेबाला कळले क़ी तट्टा, मुलतान आणण तवशेष करून वाराणसी मध्ये, पाखंडी ब्राह्मण त्यांनी प्रस्थातपत केले ल्या शांळांमध्ये त्यांची

1

इंग्रजी अनुवादात ज्युललयन ददनांक ददले ला नाही.

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

९५

खोटी पुस्तके लशकवत होते. त्यांचे लशष्य व चाहते, ज्यात कहिंद व मुसलमान दोन्ही असत, हे अिम ज्ञान ग्रहण करण्यासाठी या ददशाभूल करणाऱ्या लोकांकडे दर प्रदे शातून येत. इस्लाम प्रस्थातपत करण्यासाठी आतुर असले ल्या बादशाहाने सवम प्रांतप्रमुखांना आदे श पाठवला क़ी या कातफरांची मंददरे व शाळा पाडू न टाकाव्या तसेच समाजात होणारे त्यांच्या िमामचे पालन व लशकवणींचे तातडीने दमन करावे. शुक्रवार, ९ एतप्रल १६६९ / १८ जजल्कदा १०७९ ला चांद्र वषामनुसार बादशाहाचा ५३ वा वाढददवस होता व तो नेहमी प्रमाणे दरबारात समारंभपूवमक साजरा केला गेला. बादशाहा ससिंहासनावर बसला पण तुला झाली नाही कारण हा प्रघात आकराव्या वषामपासून थांबवला होता. पण नौबतखान्यात सुमिुर संगीत मात्र वाजत होते. पादशाहजादा मुहम्मद आजम याला एक अंगरखा व रत्नजधडत ढाल, मुहम्मद अकबर याला एक अंगरखा, उम्दत-उल-मुल्क जाफर खान व इतर [८२] दरबारी लोकांना अंगरखे धमळाले . तवजापूरचा राजा आददल खान याने ददले ला माणणक मुहम्मद मुअज्जम ने बादशाहा करता पाठवला. त्याचे वजन ५ टाक ५ सुखम इतके होते तर त्याची अंदाजे ककिंमत वीस हजार रुपये होती. बादशाहाने पादशाहजाद्याला अंगरखा पाठवला. दे वगड जजिंकल्याबद्दल ददले र खानाला पाच हजारी (तततकेच स्वार) धमळाली. आलाहाबाद प्रांतातून बातमी आली क़ी आलावदी खान आलमगीरशाही वारला. हसन अली खान, अस्लम न खान, मुहम्मद शाह, अमानुल्लाह खान, हजबर खान, हुसैन अली खान व संजर या त्याच्या भावांना दुखवट्याची वस्त्रे दे ऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले . मीर खान याला मृताच्या जागी आलाहाबादचा सुभेदार नेमून त्याला चार हजारी (३००० स्वार) व एक अंगरखा दे ण्यात आला. त्याच्या जागी मुआतकाद खानाला नोकरांच्या लवाजम्याचा दरोगा नेमले गेले. तहम्मत खानला ददवान-इ-खास चा दरोगा नेमले गेले. जाफर खानाचा मुलगा कामगार खान याला रत्नबाजाराचा दरोगा नेमले गेले. ददवंगत सआदुल्लाह खानाचा मुलगा लु तफुल्लाह खान याला तनवृत्त झाले ल्या आक़ील खानाच्या जागी, बालाबंद दे ऊन डाक चौक़ीचा दरोगा नेमले गेले. बुखाऱ्याच्या राजाचा दत मीर लशहाबुद्दीन याला दोन घोडे भेट ददले गेले. शतनवार, १ मे १६६९ / १० जजल्हेज १०७९, बादशाहा ईद-उज-जुहाच्या नमाजासाठी मलशदीत गेला. [८३] दख्खनहून आले ल्या बुलंद खानाला भेटीची अनुमती धमळाली. हाक़ीम इब्राहीम याने आदे शाप्रमाणे अब्दुल्लाह खान काशघरी याला सुरतेला

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

९६

पोहोचवले होते, ततथून परतल्यावर त्याने (बादशाहाची) भेट घेतली. धमझाम मुकरमम खान सफावी हा तनवृत्ती नंतर तनशस्त्र ब्स्थतीत दरबारास परतला, बादशाहाने त्याला तलवार ददली. ९०० ते २०० जात या श्रेणींतील अधिकाऱ्यांचा त्यांच्या अनुपब्स्थतीत उल्ले ख केला जावा तसेच १०० ते २० जात या श्रेणींतील अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून उपब्स्थती नोंदवावी असा आदे श ददला गेला. सैफ खान याला मुबाररज खानाच्या जागी काश्मीरचा सुभेदार नेमले गेले. बुिवार, १२ मे १६६९ / २१ जजल्हेज १०७९ ला असे कळले क़ी ततलपत गावात उत्पात करणाऱ्या लोकांना लशक्षा करण्यासाठी मथुरेचा फौजदार अब्दुन नबी खान याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा पराभव केला पण त्या झटापटीत बंदुक़ीची गोळी लागून तो स्वतः मरण पावला. तो एक िममतनष्ठ व उदार माणूस होता. त्याच्याकडे प्रशासक़ीय कौशल्य तसेच सेनेचे नेतृत्व करण्याची ही क्षमता होती. त्याने मथुरच े ी भव्य मशीद बांिली होती. त्याच्या भावाचा मुलगा व (त्याचा) जावई मुहम्मद अन्वर याला दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. त्याची मालमत्ता सरकारजमा केली गेली, त्यात ९३००० सोन्याच्या मोहरा व तेरा लक्ष रुपये होते. गुरूवार, १३ मे १६६९ / २२ जजल्हेज १०७९ ला रआदअंदाज खान याला आग्र्याजवळ असले ल्या बंडखोरांना िडा लशकवण्यासाठी नेमण्यात आले [८४] व सोन्याची झालर असले ला घोडा ददला गेला. सरबुलंद खान याला तहम्मत खानाच्या जागी कुरबेगी म्हणून नेमण्यात आले . लाहोरचा सुभेदार (नाज़ीम) मुहम्मद आमीन खान याला त्याच्या तनयुक्त़ीच्या जागी जायची अनुमती धमळाली. मआसूम खानाने बातमी ददली क़ी शूजाचा तोतया तनमामण झाला होता व तो मोरांगच्या आसपास उपद्रव करत होता. इब्रातहम खान व तफदाई खानाला आदे श दे ण्यात आला ही त्यांच्या क्षेत्रात जर त्याने डोके वर काढले तर त्याचा लशरच्छे द करावा. सफलशकन खान याला अब्दुन नबी खानाच्या जागी मथुरेचा फौजदार नेमण्यात आले व बहादुर खान रोतहल्याचा मुलगा ददलीर तहम्मत याला नदरबारचा फौजदार नेमण्यात आले . ब्रह्मदे व लससोददयाला सफलशकन खानासोबत जायला सांतगतले गेले. माधछनच्या राजाचा दत सय्यद अब्दुल वह्हाब याने भेट घेतली. गुजमबदामर सालीह बहादुर याला मलाणामचे मंददर पाडण्यासाठी पाठवण्यात आले .

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

९७

गुरूवार, ३ जून १६६९ / १३ मुहरमम १०८० ला रात्रीचा एक प्रहर झाल्यावर बादशाहा हयातबक्ष बागेमागे शेख सैफुद्दीन सरकहिंदी याच्या राहण्याची व्यवस्था केली होती त्या घरात गेला. त्या संताशी एक तास चचाम केल्यावर त्याचा सन्मान करून तो राजवाड्यात परतला. लोकांना खोट्या श्रद्धांनी भुलतवल्याबद्दल उद्धव बैरागी नावाच्या भटक्या कहिंद संताला कोठडीत ठे वले होते व काझी अब्दुल वह्हाबचा मुलगा, काझी अबुल मुकारम याच्याकडे त्याचे दोन लशष्य त्याच्या सुटकेसाठी जात होते व संिी धमळताच [८५] त्यांनी त्याला वाटे त भोसकले . बादशाहाने ततघाही कहिंदंना मारण्याचा आदे श ददला. रघुनाथ ससिंह लससोददया राण्याला सोडू न बादशाहाकडे आला, त्याला हजारी (३०० स्वार) व एक हजार रुपयाचा खंजीर धमळाला.

बिऱ्यािा पूवव प्रांतप्रमुख हुिैन पाशा यािे आगमन मुलतानच्या बातमीदारांनी बादशाहाला कळवले होते क़ी बसऱ्याचा प्रांतप्रमुख हुसैन पाशा याचे तुकीच्या राजाशी भांडण झाले म्हणून त्याच्या जागी त्याने यातहया पाशा याला नेमले होते. त्यामुळे हुसैन पाशाला ततथे राहणे ककिंवा राजाकडे परतणे, दोन्ही शक्य नव्हते. मग त्याने त्याचे कुटुं ब व काही नोकर यांसतहत स्वतःला स्वतःच्या दे शातून हद्दपार करायचे ठरवले . आिी तो इराणला गेला पण ततथे त्याचे स्वागत झाले नाही त्यामुळे (मुघल) राजदरबारात यायचे ठरवून तो टप्प्या टप्प्याने भारताकडे येत होता. * * * * [८६] बादशाहाने त्याची इच्छा मान्य करून अतामक बेग गुजमबदामरासोबत एक

अंगरखा, पालखी व एक हत्तीण असे सगळे या भाग्यवान माणसाकडे लसरकहिंदला पाठवले व त्याने अगदी तनःसंकोचपणे बादशाहाकडे यावे असा तनरोप ददला. गुरूवार १ जुलै १६६९ / ११ सफर १०८० ला बादशाहाला कळले क़ी हुसैन पाशा आग्रहाबादे ला पोहोचला आहे. बादशाही आदे शानुसार फुलाद खान त्याला मीठ बाजारात जाऊन भेटला. बक्षी-उल-मुल्क आसद खान, सद्र-उस-सदर अबीद खान व मीर तुझुक इक्काताज खान हे सगळे गावकोटाच्या लाहोर दरवाज्याजवळ त्याच्या स्वागतासाठी थांबले होते व तो ततथे आल्यावर त्याला बादशाहाकडे घेऊन आले . बक्षी-उल-मुल्क दातनशमंद खान व आसद खान त्याला घुसलखान्याच्या दरवाज्यापयंत घेऊन आले . त्याने रीतीप्रमाणे अणभवादन केले , व त्याला ससिंहासनाचा मुका घेऊन आदर व्यक्त करण्याची

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

९८

अनुमती धमळाली, बादशाहाने त्याच्या पाठीवरून हात तफरवला. त्याची मुले अफ्रसैब बेग व अली बेग यांनी पाच हजार रुपये सादर केले व त्याने वीस हजार रुपयाचा माणणक तसेच दहा अरबी घोडे सादर केले . बादशाहाने त्याला एक तवशेष अंगरखा, सहा हजार रुपयांची एक रत्नजधडत तलवार, [८७] एक रत्नजधडत खंजीर, चांदीची झालर असले ला हत्ती व तलै र, एक लक्ष रुपये रोख, पाच हजारी (तततकेच स्वार) व इस्लाम खान ही उपािी ददली, अफ्रासैब बेग याला खान ही उपािी व दोन हजारी (१००० स्वार) व अली बेग याला खान उपािी व दीड हजारी (५०० स्वार) ददली गेली. त्यांना रुस्तुम खान याचे गाललचे व इतर सामान असले ले घर ददले गेले. तसेच, गाललचा घातले ली एक होडी होती ज्यातून जलमागामने तो बादशाहाला अणभवादन करण्याकरता येत असे. * * * * अटक बनारस हून बातमी आली क़ी गुरूवार २४ जून १६६९ / ४ सफर १०८० ला भूकंपाच्या प्रचंड िक्क्याने ५० याडम लांब व अगणणत खोल खड्डा तयार झाला होता. काश्मीरहून बातमी आली क़ी बुिवार, २३ जून १६६९ / ३ सफर १०८० ला संध्याकाळ पासून ते (दुसऱ्या ददवशी) सकाळ पयंत भूकंप चालू होता. इमारती पाळण्यासारख्या हलत होत्या पण काही नुकसान झाले नाही. बारयाच्या सय्यद खान जहान याचा मुलगा सय्यद मुनव्वर खान याला बारयाचा फौजदार नेमले गेले. बरैलीहून बदली झाल्यावर राय मकरंदची बंगालला नेमणूक झाली. लहान पादशाहजादा मुहम्मद काम बक्ष याला हत्तीचे तपल्लू भेट ददले गेले. धमझाम राजा जयससिंह याचा मुलगा राजा रामससिंह याला एक हजार स्वारांची वाढ धमळाली. [८८] इस्लाम खानाला एक हजार जात (तततकेच स्वार) अशी वाढ, दहा मतहन्यांचा पगार रोख व त्याच्या मुलांना आठ मतहन्यांचा पगार रोख, व त्याच्या बाबतीत गुरांच्या खाद्याचे पैसे दे ण्यापासून कायमची तर त्याच्या मुलांना दोन वषांकरता सूट ददली गेली. अब्दुल्लाह खानाची दोन हजारी (१००० स्वार) पूवमवत करून त्याला एक अंगरखा, मुलामा ददले ला खंजीर व घुसलखान्याचा दरोगा हा पदभार ददला गेला. गुरूवार २ सप्टें बर १६६९ / १५ रतब-उस-सानी १०८० ला धमझाम मुकरमम खान सफावी गंभीर तापामुळे वारला. बादशाहाच्या आदे शानुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशी तवश्वनाथाचे मंददर पाडले होते अशी बातमी धमळाली.

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

९९

शतनवार, १८ सप्टें बर १६६९ / २ जमाद-उल-अव्वल १०८० ला लाहोर दरवाज्याच्या पहाऱ्यावर असताना एक्कताज खान व तगरीिरदास लससोददया यांच्यात झटापट झाली. कहिंद (तगरीिरदास) नरकात गेला, खानाला पाच जखमा झाल्या व त्याच्या लोकांपैक़ी काही मुघल जखमी झाले . खान-ए-सामान इब्फ्तकार खान याला उंट, गायी व खेचरांची दर वषी दोनदा तपासणी करायचा आदे श ददला गेला. शतनवार, २ ऑक्टोबर १६६९ / १६ जमाद-उल-अव्वल १०८० ला बादशाहा ददवान-ए-आम मध्ये बसला असताना मुल्तफत खान, तहम्मत खान व रुहुल्लाह खान बोलत होते तेव्हा उल्फत खानाचा (मुहम्मद तातहर) मुलगा व दौलत खानाचा नातू ददलदार ज्याचे मुल्तफत खानाशी वैर होते, त्याने दोन्ही हातांनी खानाच्या पाठीत अचानक तलवारीचा वार गेला. तो तफरल्यावर त्याने आणखी तीन वार केले जे मुल्तफत खानाने त्याच्या ढालीवर घेतले आणण त्याच्या तलवारीने पलटवार केला. तोवर तहम्मत खानाने त्याच्यावर तलवारीने वार केला, मीर तुजुक फजलु ल्लाह खान याने लशगेनी त्याच्या डोक्यावर वार केला. बहरामंद खान व इतरांकडू न वार झेलत गोंिळले ला [८९] मारेकरी संगमरवरी बैठक़ीपाशी गेला. बादशाहाला चामर ढाळणारा जमील बेग खवास याने त्याच्या काखेत खंजीराने वार केला. तो मेला व त्याचे पार्थिंव बाहेर टाकून दे ण्यात आले . डाव्या हाताचा समूह (दं गलइ-छाप) व त्या ददवशीच्या पहाऱ्यावरील गुलाम व इतर वरच्या तसेच खालच्या स्तरावरील पदाधिकाऱ्यांची पदावनती केली गेली. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला तहस्सार येथील जाहगीरीतून जे दोन कोटी दाम ददले होते ते इनाम म्हणून दे ण्यात आले व त्या जाहगीरीच्या जागी त्याला दख्खन मिील जाहगीर दे ण्यात आली. सोमवार, ११ ऑक्टोबर १६६९ / २५ जमाद-उल-अव्वल १०८० ला असे कळले क़ी रात्रीच्या चार घटका झाल्या असताना पूवेकडील एक तारा आकाशातून तनखळू न पणश्चमेकडे पडला. त्याच्या चंद्रासम तेजाने घरे उजळू न तनघाली व त्यानंतर वीज पडल्यासारखा कडकडाट झाला. बादशाहाच्या कृपादृष्टीने जाफर खानाला आघराबाद व नलबारीच्या बागेत जायचा आदे श धमळाला व तो ततथे गेला. सोमवार, २६ ऑक्टोबर १६६९ / १० जमाद-उस-सानी १०८० ला सौर वषामनुसार बादशाहाच्या ५२ व्या वषामची सुरवात झाली. उत्सव साजरा केला गेला आणण पादशाहजादे व नामदारांकडू न भेटवस्तुंची दे वाणघेवाण झाली. [९०] इस्लाम खानाला सोन्याचे भरतकाम केले ल्या शंभर वस्तु दे ण्यात आल्या. फजलु ल्लाह खान व हजबर

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

१००

खान यांनी बाल्खचा दत शादमान ख्वाजा याला घुसलखान्याच्या दरवाज्यापासून पुढे आणले . त्याने सुभान कुली खानाचा प्रणाम सादर केला व त्याला एक अंगरखा व दहा हजार रुपये धमळाले . सफ़ी खानाला तर्बिंयत खानाच्या जागी ओरीसाचा सुभेदार म्हणून पाठवले . रतववार व सोमवार, ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर १६६९ / १५ व १६ जमादउस-सानी १०८० ला बादशाहाने हुमायून, शेख तनजामुद्दीन अवललया व ख्वाजा कुतबुद्दीन बब्ख्तयारी काक़ी तुशी यांच्या थडग्यांना भेट ददली. तीनही दठकाणी दे खभाल करणाऱ्यांना रोख बणक्षस दे ण्यात आले व त्यांनी पतवत्र पुरातन गोष्टी दाखवल्या. इततकाद खानाचा मुलगा मुहम्मद यार याला चार सदी (४०० जात) अशी पतहली मनसब धमळाली. गोळकोंड्याचा दत अली अकबर याने भेट घेऊन एक हजार मोहरा आणण पंिरा हत्तींचा नजराणा सादर केला. आबीद खानाचा मुलगा मीर लशहाबुद्दीन तवलायतेहून दरबारात आला व फुलांचा मुलामा असले ली ढाल प्रस्तुत केली. त्याला तीन सदी (७० स्वार) ददली गेली. ख्वाजा मुहम्मद याकुब, ज्याबद्दल [९१] नंतर काहीतरी ललतहणार आहे, त्याने ले खकाला सांतगतले क़ी, “सुभान कुली खानाने मला त्याच्या टरबूजाच्या शेतात नेले. रुस्तम बे अताललक व मी एका बाजूला बसलो होतो तेव्हा मीर लशहाबुद्दीन माझ्याकडे आला व म्हणाला क़ी, ‘माझे वडील मला बोलवत आहेत पण मालक मला जायची परवानगी दे त नाही’. त्यावेळी अताललक व मला त्याची तवनंती रास्त वाटली क़ी पत्र आिीच ललहून ठे वले तर नंतर ते ललतहण्यात वेळ जाणार नाही. आम्ही त्याच्या जेवणाच्या वेळेला त्याच्याकडे गेलो व तवनंती करून तशी परवानगी धमळवली. त्यावेळी लशहाबुद्दीन याने ही त्याच्या वधडलांनी पाठवले ल्या काही शाली खानाला दाखवल्या. पत्रावर राजधचन्हे लागली व खानाने त्याच्या प्रवासासाठी प्राथमना केली. तो काही पावले गेला असता खानाने त्याला परत बोलावून सांतगतले क़ी, ‘तू कहिंदुस्तानात जात आहेस जजथे तू मोठा माणूस होशील. तू मला तवसरणार नाहीस अशी आशा करतो’”.

बंडखोरांिा पराभव करण्यािाठी बादशाहािा आग्र्याला प्रवाि रतववार, २८ नोव्हेंबर १६६९ / १४ रज्जब १०८० ला यमुना तीरावर बादशाही तंबू [९२] लागले व ठरले ल्या वेळी सैन्य आग्र्याकडे तनघाले . प्रवासातील बहुतेक ददवशी बादशाहाने लशकार केली. शतनवार, ४ धडसेंबर १६६९ / २० रज्जब १०८० ला लशकारीसाठी दौडत असताना रेवारा, चंदरखा व सरखुद गावातील बंडखोरीची पररब्स्थती त्याला कळली. बादशाहाच्या आदे शानुसार हसन अली खानाने त्यांच्यावर आक्रमण केले .

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

१०१

मध्यान्हापयंत त्यांनी बाण व बंदुकींनी प्रततकार केला पण त्यानंतर ते शक्य नसल्याने अनेकांनी त्यांच्या बायकांचा जौहर केला व हातघाईच्या लढाईस उतरले . हसन अली खान व बादशाहाकडील अनेक शहीद झाले तर ३०० कातफर नरकात गेले. २५० लोक, पुरुष व स्त्स्त्रया, बंिक बनवले गेले. सूयामस्ताला खान बादशाहाकडे आला व युद्धाचा वृतांत कळवला. बंदींना ततथला जाहगीरदार सय्यद झैन-उल-आतबदीन याच्याकडे द्यायचा आदे श झाला. मथुरेचा फौजदार सफलशकन खान भेटीकरता आला. गावातील तपकांचे रक्षण करण्यासाठी व सैतनकांनी कोणालाही त्रास दे ऊ नये ककिंवा लहान मुलांना बंिक बनवू नये यासाठी त्याने त्याच्या नोकरांपैक़ी २०० स्वार नेमावे असा आदे श ददला गेला. मुरादाबादचा फौजदार नामदार खान धमळाले ल्या आदे शाप्रमाणे भेटीकरता आला. त्याने शंभर मोहरा, एक हजार रुपये व दोन काळे ससाणे भेट ददले . हसन अली खानाला सफलशकन खानाच्या जागी मथुरेचा फौजदार नेमले गेले [९३] व त्याला ३५०० जात (२००० स्वार), अंगरखा, तलवार व घोडा धमळाले . आग्रा पररसराचा फौजदार आलावदी खान आलमगीरशाही याचा मुलगा आमानुल्लाह याला ३०० स्वारांची वाढ धमळाली व उपरोक्त खानाला मदत करायचा आदे श ददला गेला. खानाच्या हाताखाली २००० बकमअंदाज स्वार, १००० िनुिामरी स्वार, १००० बंदुकची, १००० बाणअंदाज, २५ तोफा, १००० बेलदार व १००० तीरदार1 ददले गेले. आग्र्याचा प्रांतप्रमुख होशदार खान2 भेटी करता आला. बुिवार, १५ धडसेंबर १६६९ / १ शाबान १०८० ला रूपससिंह राठोडच्या मुलीला मुलगा झाल्याची बातमी दे णारे पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमचे पत्र व सोबत १००० मोहरा धमळाल्या. मुलाचे नाव दौलतआफ्जा ठे वण्यात आले , एक पत्र व एक लक्ष रुपयाची रत्ने मुलाला व त्याच्या पालकांना पाठवण्यात आली. शुक्रवार, ३१ धडसेंबर १६६९ / १७ शाबान १०८० ला बादशाहाने शाहजहान व मुमताज-उज-जमानी तहच्या 1

इंग्रजी अनुवादात इथे बहुदा नजरचुक़ीमुळे तबरदार ददले आहे पण फासी पाठात (‫)تندار‬ तीरदार ददले आहे.

2

इंग्रजी अनुवादात इथे ‘Hushdar Khan’ असे म्हटले आहे पण कहिंदी अनुवादात होशदार खान आले आहे जे अधिक अथमपूणम वाटते. फासीतील ‘वाव’ (‫ )هوشدار‬या अक्षराचा उच्चार ‘उ’ ककिंवा ‘ओ’ असा होत असल्यामुळे इंग्रजी अनुवादात ‘Hushdar’ घेतले असावे.

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

१०२

थडग्याला भेट ददली व स्वतःच्या तसेच दोन पादशाहजाद्यांच्या वतीने ततथल्या अधिकाऱ्यांना ४४००० रुपये ददले . शतनवार, १ जानेवारी १६७० / १८ शाबान १०८० ला बादशाहा आग्रा तकल्ल्यातील राजवाड्यात राहायला लागला. ततलपत मध्ये गडबड करणाऱ्यांचा प्रमुख व अब्दुन नबी खान याच्या हत्येसाठी जबाबदार असले ला तसेच सआदाबादवर [९४] छापा घालणारा कनिंद्य बंडखोर गोकला जाट1, हा हसन अली खान व त्याचा सहाय्यक शेख राजजउद्दीन यांची वीरता व पररश्रम यामुळे पकडला गेला. खानाने त्याला व त्याचा तवध्वंसक सहकारी ससिंग2 यांना शेख कौम याच्या माफमत बादशाहाकडे पाठवले . बादशाहाच्या आदे शानुसार कोतवालीच्या चबुतऱ्यावर एक एक करून त्याचे हातपाय तोडले गेले. त्याचा मुलगा व मुलगी यांना (मुसलमान म्हणून) वाढवण्यासाठी नाजजर जवाहर खान याच्याकडे दे ण्यात आले . चेला (दास) शाह कुली या वरच्या श्रेणीच्या खासगीतील नोकराशी त्याच्या मुलीचे लग्न लावण्यात आले . त्याचा मुलगा फाजजल या नावाने ओळखला गेला व त्याने कुराणाचे पाठांतर केले . बादशाहाच्या मतानुसार इतर पाठींपेक्षा त्याचे पाठांतर सवामत अचूक होते व त्याला बादशाहाने वाचले ले कुराण ऐकण्याचे सौभाग्य धमळाले . शेख राजीउद्दीन हा तबहारच्या भागलपूरचा उच्चकुलीन व उच्चलशणक्षत माणूस होता तसेच फतवा-इ-आलमगीरी चे संपादन करणाऱ्या तवद्वानांपैक़ी एक होता. त्याला तीन रुपये रोज असा भत्ता धमळत होता. तो लष्करी तसेच प्रशासक़ीय कामात तनष्णात होता. त्याची वाणी मिुर होती व त्याला बहुतेक दठकाणांची मातहती असायची. दरबारी िममशास्ता काझी मुहम्मद हुसैन जौनपुरी व खासगीतील एक सहकारी बख्तावर खान यांनी बादशाहा समोर त्याच्या कायामचा गौरव केला. त्याला प्रथम एक सदीची मनसब

1

गोकला जाट भरतपूर गादीचा संस्थापक होता असे मानले जाते. त्याने इस्लाम स्वीकारला नाही पण त्याच्या पश्चात त्याच्या कुटुं बाला जबरदस्ती मुसलमान बनवले गेले. History of Aurangzeb, खंड ३, पृष्ठ २९५.

2

इंग्रजी अनुवादात इथे ‘Sonki’ म्हटले आहे व फासी पाठात ‫سنک‬ असे आहे. पण फासी पाठात ٔ

हे ससिंग (त्याचा सहकारी उदयससिंह) असावे असे वाटते. फासी ललतहताना ककिंवा वाचताना ‘क’ आणण ‘ग’ या अक्षरांत किीकिी गोंिळ झाले ला ददसतो. कहिंदी अनुवादात (खंड २, पृष्ठ २०२१) कलकत्याच्या फासी प्रतीमध्ये इथे ससिंग असल्याची तळटीप ददली आहे.

अध्याय १२

२३ जानेवारी १६६९ ते १२ जानेवारी १६७०

१०३

ददली होती. ततथून सुरवात करून मग कालांतराने हसन अली खान याच्या मदतीने तो आमीर व नंतर खान होऊन त्याने उत्तम सेवा केली. शेवटी तो मृत्यूच्या छायेत तवसावला. [९५]

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१०४

अध्याय १३ राजवटीचे तेरावे वषम – तहजरी १०८०-८१ १३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१ गुरूवार, २७ जानेवारी १६७० / १५ रमजान १०८० ला न्यायतप्रय बादशाहाने आदे श ददला क़ी अजमदारांना दशमनाच्या खखडक़ीपासून दर केले जाऊ नये व अधिकाऱ्यांनी दोर वापरून त्यांचे अजम घ्यावेत व बादशाहाला दाखवावेत. चमत्कारांनी भरले ल्या रमजानच्या मतहन्यात न्यायाचा प्रवतमक, छळाचे उच्चाटन करणारा, सत्य जाणणारा, अत्याचाराचा ध्वंस करणारा, तवजयाच्या बागेतील पणश्चमेचा सौम्य वारा व प्रेतषताच्या िमामचे पुनरुज्जीवन करणाऱ्या बादशाहा ने ‘केशवराय चा दे हरा’ या नावाने प्रलसद्ध असले ले मथुरेतील मंददर पाडण्याचा आदे श ददला. त्याच्या अधिकाऱ्यांनी खूप कष्ट घेऊन कातफरांच्या या भक्कम अधिष्ठानाचा थोड्याच वेळात तवध्वंस केला व मोठी रक्कम खचम करून ततथे एक भव्य मशीद उभारली गेली. त्या शतमूखम बीरससिंह बुंदेल्याने हे मूखमतेचे मंददर बांिले होते. ससिंहासनावर बसण्यापूवी जहांगीर शेख अबुल फजल वर रुष्ट झाला होता. [९६] त्याला मारून हा पातक़ी कातफर बादशाहाच्या पसंतीस उतरला व जहांगीर ससिंहासनावर बसल्यावर बक्षीस म्हणून त्याला हे मंददर बांिायची परवानगी धमळाली, जे त्याने तेहतीस लक्ष रुपये खचम करून बांिले . इस्लामच्या सवमश्रेष्ठ ईश्वराचा जयजयकार असो क़ी मूतीपूजक व बंडखोर लोकांचा अंत करणाऱ्या या सुमंगल राजवटीत अशक्य वाटणारे तसेच तवस्मयकारक काम यशस्वीपणे पार पडले . बादशाहाच्या िमामचे सामथयम व ईश्वरावरील त्याच्या भक्त़ीच्या भव्यतेने गर्विंष्ठ राजे स्तंणभत झाले व अचंतबत होऊन भभिंतीकडे तोंड केले ल्या धचत्रांसम उभे रातहले . मंददरात रचले ल्या व मूल्यवान अलं कारांनी सुशोणभत अशा लहान मोठ्ा मूती आग्र्याला आणून त्या सतत पायदळी तुडवल्या जाव्यात यासाठी बेगम सातहबाच्या मलशदीच्या पायऱ्यांखाली पुरल्या गेल्या. मथुरेचे इस्लामाबाद झाले . शतनवार, १२ फेब्रुवारी १६७० / १ शव्वाल १०८० ला बादशाहा व त्याच्या मागे बसले ला पादशाहजादा मुहम्मद आजम असे एका भल्या मोठ्ा हत्तीवर बसून इदगाह समोर पायउतार झाले . [९७] दुसऱ्या ददवशी अमीर-उल-उमरा अली मदामन खान याने ददले ल्या व राजवाड्याच्या दालनात मध्यभागी ठे वले ल्या सोन्याच्या ससिंहासनावर

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१०५

बादशाहा बसला. पादशाहजादा मुहम्मद आजम व अकबर यांना अंगरखे ददले गेले. उम्दत-उल-मुल्क जाफर खान याला १००० स्वारांची वाढ व एक कोटी दाम बक्षीस धमळाले . राजा रामससिंह याला चार हजारी (४००० दो अस्पा, सेह अस्पा) ददली होती त्याला आसामला नेमणुक़ीच्या अटीवर १००० स्वारांची वाढ धमळाली. रामससिंहचा मुलगा कुमार तकशनससिंह, याला एक रत्नजधडत पगडी धमळाली. हसन अली खानच्या दीड हजारी वरची अट काढू न टाकण्यात आली व त्याला नगाऱ्याचा मान दे ण्यात आला. अशरफ खान व तहम्मत खानाला ५०० स्वारांची वाढ धमळाली. मीर ताक़ी याला तीन हजारी धमळाली, मुल्तफत खान व मुगल खानाला ५०० ची वाढ दे ऊन दोन हजारी धमळाली. सजावर खान व फजलु ल्लाह खानाला प्रत्येक़ी १०० स्वार धमळाले . बक्षी-उलमुल्क आसद खान व फैजुल्लाह खानाला दोन वेगवान घोडे ददले गेले. अब्दुर रहमान सुलतान व बहराम सुलतान यांना प्रत्येक़ी दहा हजार रुपयांचे बक्षीस धमळाले . बाल्खचा दत शादमान ख्वाजा याला परतीचा तनरोप दे ताना २५००० रुपये रोख, एक खखलअत, ५००० रुपयांची रत्नजधडत तलवार, चांदीची जीन असले ला एक हत्ती, फुलांचे तवणकाम केले ले कापड (ककिंवा शाल) १०० नग, पाच अंगरखे, आघाबानी पगडी व तततकेच (ककिंवा तततक्याच ककिंमतीचे) गुजराथी कापड आणण त्याच्या सहकाऱ्यांना दहा हजार रुपये बणक्षस ददले गेले1. जातहद खान पंजाबीचा मुलगा मुहम्मद अबीद याला दीड हजारी (३०० स्वार) [९८] व नवाजजश खान ही उपािी धमळाली. बादशाहाच्या बंदुकखान्याचा दरोगा दाराब खान याला अब्दुल्लाह खानच्या जागी घुसलखान्याचा दरोगा नेमण्यात आले . आग्र्याच्या बयूताती ने बादशाहाला िान्याची ककिंमत कळवली ती अशी – एका रुपयाला

1

या वाक्याच्या इंग्रजी व कहिंदी अनुवादात काही त्रुटी असल्याने पूणम वाक्याचा फासी पाठ व दे वनागरी ललप्यंतर खाली ददले आहे –

ٔ ‫شمشن‬ ‫رخصت معاودت و بيست و پنج هذار روپيه نقد و خلعت و‬ ‫ايلچ بلخ‬ ‫شادمان خواجه‬ ِ ِ ٔ ‫هذار روپيه و فيل باذين نقره و جامهوار يکصد و پنج ثوب و چنه آغابايز‬ ّ ‫پنج‬ ‫قيمت‬ ‫مرصع‬ ِ ٔ ِ ٔ ‫ز‬ ‫همت قدر و بهمراهانش ده هزار روپيه انعام يافت‬ ‫اي‬ ٔ ‫و فوطه گجر‬ शादमान ख्वाजा इलची बाघरुखसत-इ-मुआवदत व तबस्त व पंज हजार रतपया नकदा व खखलत

व शमशीर-ए-मरस्सआ तकमत-इ-पंजहजार रुतपया व तफल बा जीने नकरा व जामावार यकसद व पंज सोब व चीरा आघाबानी व फुताह गजराती हमीन कदर व बहमराहानश दाहजार रुतपया इनाम याफ्त.

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१०६

चांगला सुखदास तांदुळ १४ शेर, गहू ३५ शेर, कडिान्य १ मण २ शेर, तूप ४ शेर व इतर वस्तूंच्या तकमतीही या मापाप्रमाणे होत्या. रतववार, २७ माचम १६७० / १५ जजल्कदा १०८० ला चांद्र वषामनुसार बादशाहाचे ५४ वे वषम सुरू झाले . उत्सवासाठी केली जाणारी सजावट स्थतगत करण्यात आली होती. रतववारच्या उत्सवासाठी ददवसभर वाजवले जाणारे समारंभाचे संगीत आता एक प्रहर झाल्यानंतर सुरू करावे असा आदे श नगारखान्यातील अधिकाऱ्यांना दे ण्यात आला. खवासींचा दरोगा बख्तावर खान याला स्फदटकाची मूठ असले ला खंजीर दे ण्यात आला. मीर सय्यद मुहम्मद कनौजीचा मुलगा सय्यद आमजद खान याला ददवंगत काझी मुहम्मद हुसैन याच्या जागी बादशाही छावणीचा िममशास्ता नेमले गेले. एकमेकांना अणभवादन करताना जे दरबारी डोक्याकडे हात नेत असत त्यांना आता (फक्त) सलाम आलै कुम असे म्हणायचा आदे श ददला गेला. बुिवार, २० एतप्रल १६७० / ९ जजल्हेज १०८०, मुल्ला अब्दुल रशीद अकबराबादीचा मुलगा मुल्ला अब्दुल अजीज इज्जत [९९] याने तहम्मत खान व बख्तावर खान यांच्या मध्यस्तीने मलशदीत (बादशाहाची) भेट घेतली. ज्ञानाच्या पारंपाररक तसेच बुजद्धवादी शाखांचा अभ्यास करून शास्त्रांचे तवद्वानपद धमळवल्यावर तो केवळ तीन रुपयांच्या पगारावर एकटाच आपल्या घरात राहत होता व त्याने कोणाही सामथयमवान नामदारांसमोर किीही मान तुकवली नाही. त्याच्या दै वात प्रलसद्धी व प्रगती ललतहली असल्यामुळे त्याची प्रचंड बौजद्धक क्षमता, सूज्ञपणा, आशय प्रातवण्य, भाषा लाललत्य, उत्तम समज व मनधमळाऊ वृत्ती, संतुललत वाणी व योजना करण्याची क्षमता यामुळे सवम गुणांची पारख असणाऱ्या बादशाहाने दरबारात प्रलशक्षणासाठी त्याची तनवड करून त्याला उपकृत केले . त्या शेखला आिी ४०० ची मनसब, अंगरखा, पाच घोडे, तलवार, खंजीर, भाला, सजवले ली पालखी व इतर वस्तु ददल्या गेल्या. चौथया ददवशी जेव्हा नेमणुकांचे पुनरावलोकन झाले तेव्हा त्याला १०० (३० स्वार) अशी वाढ धमळाली व लु तफुल्लाह खानाच्या जागी दरोगा-ए-अजम-ए-मुकरम हे पद धमळाले . त्याला वैयलक्तक भेटीची व अणभवादनासाठी कोणासमोर ही डोक्याकडे हात न नेता फक्त सलाम आले क इतकेच म्हणायची मुभा धमळाली. दख्खनहून बातमी आली क़ी लसवाने पुरंदर घेतल्यावर तकल्ले दार राजीउद्दीन याला बंदी बनवले आहे. बख्तावर खानाने ददवाणी अधिकाऱ्यांना आदे श ददला क़ी त्यांनी

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१०७

दर वषामच्या शेवटी बादशाहाकडे उत्पन्न व खचामचा दाखला आणावा तसेच दर बुिवारी ददवाणी वेतन व खालसा तवभागातील नोंदवया घुसलखान्यात आणाव्यात. इनायत खानाने कळवले [१००]1 क़ी शाहजहानच्या राजवटीपासून राज्याचा खचम त्यातील उत्पन्नापेक्षा चौदा लक्ष रुपये अधिक आहे. खालसा तवभागातील पगार व खचम चार कोटी रुपये इतकाच ठे वावा असा आदे श झाला. दे यकांची खाती बधघतल्यावर बादशाहाने स्वतःच्या, पादशाहजाद्यांच्या व बेगमांच्या खचामतील अनेक गोष्टी कमी केल्या. कातफर बंडखोरांची कत्तल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी हसन अली खान पूणम पररश्रम घेत आहे अशी बातमी आली. त्याने त्यांची घरे लु टून, कुटुं बे उध्वस्त करून त्यांचे भक्कम तकल्ले पाडू न टाकले आहेत व जमीनदारी महालांवर शाह मुहम्मद नवाज, लसदाम बलू च, शेख राजजउद्दीन, लाल मुहम्मद, नजर मुहम्मद व इतरांना नेमले आहे असे कळले . त्याला दरबारास परतण्याचा आदे श ददला गेला. बुिवार, ६ एतप्रल १६७० / २५ जजल्कदा १०८० ला त्याने दरबारात येऊन भेट घेतली व त्याची खूप प्रशंसा झाली. शतनवार, ९ एतप्रल १६७० / २८ जजल्कदा १०८० ला ददल्लीहून बातमी आली क़ी बादशाहाची मुलगी बद्रुस्त्न्नसा बेगम वारली आहे. रातबया सारखे पातवत्र्य, कुराणाचे पाठांतर, स्वच्छ चाररत्र्य व उत्तम लशष्टाचार यामुळे ततच्या वधडलांना ती फार तप्रय होती. बातमी आली क़ी खोटी स्तुती करणाऱ्यांनी पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला स्वेच्छे नुसार व स्वतंत्रपणे वागायला प्रवृत्त केले होते. [१०१] बादशाहाच्या समजुतीच्या पत्रांनी काही फरक पडत नसल्याने त्याच्या आईने काही सांगन ू तो पुन्हा योग्य मागामवर येणार असेल तर ततला पाठवून बघावे म्हणून बादशाहाने ददल्लीहून त्याच्या आईला, नवाब बाईला बोलवून घेतले . पादशाहजाद्याला प्रेमळ समज दे ण्यासाठी इब्फ्तकार खानाला तोंडी संदेश दे ऊन त्याच्याकडे पाठवले . खान तातडीने त्या दठकाणी गेला व त्याचे कायम पूणम केले . पादशाहजाद्याचा हेतु स्वच्छ असल्यामुळे व त्याच्या बद्दल धमळाले ले वृत्त िादांत खोटे असल्यामुळे त्याने अत्यंत तवनम्रपणे दुःख व खेद प्रकट केला. त्यामुळे बादशाहा पादशाहजाद्यातवषयी आश्वस्त झाला व इब्फ्तकार खानाच्या चुक़ीच्या वृत्तामुळे त्याच्यावर रुष्ट झाला. खान परतल्यावर त्याचे व त्याचा भाऊ मुल्तफत खान [१०२] यांची पदे व उपाध्या काढू न घेतल्या गेल्या. गुजमबदामर शेर बेग याने सुलतान

1

फासी पाठातील पृष्ठ क्रमांकाचा हा आकडा इंग्रजी अनुवादात टाकायचा राहून गेला आहे.

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१०८

हुसैनला अटक नदी ओलांडून ददली व त्याच्या कडक संरक्षणाखाली मीर इब्रातहम हुसैनला लाहोरला पोहोचवले . अशरफ खानाला इब्फ्तकार खानाच्या जागी खान-एसामान केले गेले व अशरफ खानाच्या जागी मुघल खानाला गुजब म दामरांचा दरोगा बनवले गेले. हाजी अहमद सईद खान याला मुघल खानाच्या जागी अजम-ए-मुकरमर चा दरोगा नेमले गेले. मंगळवार, २९ माचम १६७० / १७ जजल्कदा १०८० ला बातमी आली क़ी दे वगडची जमीनदारी ततथल्या जमीनदाराकडे परत करून ददले र खान औरंगाबादला परतला होता. ददल्लीहून बोलावून घेतले ली नवाब बाई गुरूवार, १३ एतप्रल १६७० / २ जजल्हेज १०८०1 ला लसकंदऱ्याला पोहोचली. पादशाहजादा मुहम्मद अकबर, बक्षी-उलमुल्क आसद खान व बहरामंद खान ततच्या स्वागतासाठी पुढे गेले व ततला बादशाही जनानखान्यापयंत घेऊन आले . गुरूवार २१ एतप्रल १६७० / १० जजल्हेज १०८० ला ईद-उज-जुहा होती. नमाजासाठी व बळी दे ण्यासाठी बादशाहा ईदगाहला गेला. खुत्बा वाचणारा दोस्त मुहम्मद याला अंगरखा व ५०० रुपये व खानसामा तनआमत खान बकावल याला ठरले ल्या रीतीप्रमाणे सुरी दे ण्यात आली. ददले र खान व दाऊद खानाला गुजमबदामराकरवी अंगरखे व रत्नजधडत खंजीर पाठवले गेले. मुकरममात खानाच्या जागी हाजी शफ़ी खान दख्खनचा ददवाण झाला, हाजीच्या जागी तकफायत खानाला दफ्तर-इ-तान2 ददले गेले व तकफायत खानाच्या जागी शाह ख्वाजा दाघ व तशीहा तवभागाचा दरोगा झाला. नवाब बाई औरंगाबादे कडे तनघाली. ग्वाल्हेरला बंदी बनवले ल्या मुहम्मद सुलतान, या ततच्या सवामत मोठ्ा मुलाजवळ दोन ददवस घालवायचा आदे श ततला ददला गेला. [१०३] ततला दख्खनला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमकडे पोहोचवून परतायचा आदे श सरबुलंद खानाला ददला गेला. उम्दत-उल-मुल्क जाफर खानचा आजार तीव्र झाला तसा बादशाहा त्याच्याकडे दोन वेळा गेला, पतहल्यांदा त्या आजारी माणसाला िीर द्यायला व दुसऱ्यांदा त्याच्या नातेवाईकांचे सांत्वन करायला. शुक्रवार ६ मे १६७० / २५ जजल्हेज १०८० ला तो वारला. तो अत्यंत कृपाळू व उदात्त मनाचा होता. बादशाहाने या तनष्ठावंत सेवकाच्या मृत्यूचा

1

इंग्रजी अनुवादात इथे नजरचुक़ीमुळे जजल्कदा मतहना ददला आहे.

2

इंग्रजा अनुवादात इथे ददवान-इ-तान ददले आहे पण फासी पाठात दफ्तर-इ-तान आहे.

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१०९

दुखवटा प्रकट केला व दुःखात बुडाले ल्या त्याच्या कुटुं बाला रोज १२० खाद्यपदाथम पाठवायचा आदे श ददला गेला. पादशाहजादे मुहम्मद आजम व अकबर यांना नामदार खान व कामगार खान या जाफर खानाच्या मुलांकडे जाऊन रीतीप्रमाणे त्यांची तवचारपूस करून फरजाना बेगम, या त्यांच्या आईचे सांत्वन करायला सांतगतले गेले. त्या दोघांसाठी तवशेष अंगरखे व ततच्यासाठी तोरा पाठवला गेला. अकबराने त्यांना दुखवटा सोडण्यास सांतगतले आणण बादशाहा समोर आणले . बादशाहाने त्यांना मोत्याचा इलाका असले ला रत्नजधडत खंजीर व इतर अनेक उपहार दे ऊन सन्मातनत केले व प्रेमळ शब्दांनी त्यांचे सांत्वन केले . बक्षी-उल-मुल्क आसद खान, धमझाम बहराम व त्याची मुले बहरामंद खान व शफुमद्दीन तसेच इब्ल्तफात खान, मुफ्तखर, मुफाखर, रौशनददल व इतर यांना दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. आसद खानाला सहाय्यक ददवाणाचे पद ददले गेले व स्वतः बादशाहाच्या हातून एक रत्नजधडत खंजीर व दोन जुडी तवड्याची पाने ददली गेली. बादशाहाने आदे श ददला क़ी आसद खानाच्या तनयुक्त़ीपत्रावर पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमच्या [१०४] मध्यस्तीने असे ललहून ददयानत खानाने त्यावर पादशाहजाद्याचा लशक्का मारावा. रतववार, ८ मे १६७० / २७ जजल्हेज १०८० ला इक्कताज खानाला बुखाऱ्याला दत म्हणून पाठवले गेले व त्याला १०० मोहरा ककिंमतीचा एक घोडा, ४००० रुपयांचा एक हत्ती, एक रत्नजधडत खंजीर, एक रत्नजधडत लशरपेच ददला गेला. तो दीड हजारी (५०० स्वार) होता व आता त्याला ५०० (१०० स्वार) अशी वाढ धमळाली. बुखाऱ्याचा राजा अब्दुल अजीज याच्यासाठी इतर भेटवस्तूंव्यततररक्त कहिंदुस्तानातील दुर्मिंळ वस्तु त्याच्या बरोबर ददल्या गेल्या. या सवांची ककिंमत दोन लक्ष रुपयांपेक्षा अधिक होती व या बरोबर पाच ताजी आणण चार कच्छी घोडे ददले गेले. मुघल खानाला इक्कताज खानाच्या जागी मीर तुजुक नेमले गेले व एक सोन्याची आसा ददली गेली. मुबाररज खानाला लश्कर खानाच्या जागी मुलतानचा प्रांतप्रमुख बनवले गेले. जहांगीर कुली खानाला संबल चकलाच्या फौजदारीत मुहम्मद आजमचा नायब म्हणून नेमण्यात आले . मुहम्मद आमीन खानाकडे फमामन पाठवून त्याला महाबत खानाच्या जागी काबुलचा सुभेदार नेमले गेले. तफदाई खान दरबारास आला व त्याने ग्वाल्हेरला राहणे उपयुक्त वाटल्यामुळे त्याला ततथे पाठवून तरतबयत खानाला त्याच्या जागी अविचा सुभद े ार नेमले गेले. बादशाहाच्या तोफखान्याचा दरोगा रादअंदाज खान, राजा दे वी ससिंह, यातहया खान दख्खनी, सय्यद अली अकबर, रुमी खान, कारतलब खान मेवाती, बल्खचा बडी

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

११०

सुलतान, धमझाम सुलतान याचा मुलगा धमझाम सद्रुद्दीन व त्याच्या साथीदारांना त्यांच्या श्रेणीनुसार बढत्या, अंगरखे, घोडे, तलवारी व [१०५] खंजीर ददले गेले. बादशाहाच्या तोफखान्याचा दरोगा रादअंदाज खान याच्या हाताखाली जानी खान याला नायब म्हणून तनयुक्त केले गेले. गुरूवार, ४ ऑगस्ट १६७० / २७ रतब-उल-अव्वल १०८१ ला मुहम्मद आजम व जहानजेब बानू बेगम यांना मुलगा झाला. बादशाहाने त्याला बीदर बख्त असे नाव ठे वले व त्याला १०००० रुपयाची टोपी भेट ददली. बेगमला १०००० रुपयांचा मोत्यांचा हार व ७००० रुपयांची स्मरणी भेट ददली गेली. अमानत खान म्हणजेच सय्यद अहमद खत्ताब याला खान ही उपािी धमळाली व त्याची बंगालच्या ददवाणपदी तनयुक्त करून त्याला पाठवले गेले. काश्गरचा अब्दुल्लाह खान पतवत्र शहरांना (मक्का व मदीना) भेट दे ऊन दरबारास परतला. त्याला सुरत व माळव्याच्या धमळकती मिून एक लक्ष रुपये दे ण्यात आले . बातमी आली क़ी ददल्लीचा नाजजम, तकल्ले दार मीर बक्षी दातनशमंद खान सोमवार, १८ जुलै १६७० / १० रतब-उलअव्वल १०८१ ला वारला. या काळातला तो सवोत्तम तवद्वान होता व शेवटपयंत तो अत्यंत उदार व िममतनष्ठ होता. दरबरास आले ला मुलतानचा सुभद े ार लश्कर खान याला त्याच्या जागी मीर बक्षी नेमले गेले. त्याला त्याच्या आिीच्या चार हजारी (तततकेच स्वार) वर एक हजार (तततकेच स्वार) अशी वाढ धमळाली. उपसहाय्यक बक्षी तहम्मत खान याची आसद खानाच्या जागी सहाय्यक बक्षी म्हणून तनयुक्त़ी झाली. नामदार खानाला ददल्लीचा सुभेदार नेमले गेले तर मुआतमाद खानाची तकल्ले दार म्हणून तनयुक्त़ी झाली. सय्यद अमीर खान [१०६] पदावरून राजीनामा दे ऊन ददल्लीत राहत होता. तो ३ सप्टें बर १६७० / २७ रतब-उस-सानी १०८१ ला वारला. बादशाहाने त्याच्या भावाची, शेख मीर याची मुले मुहम्मद इब्रातहम, मुहम्मद इशहाक व मुहम्मद याकूब यांना अंगरखे दे ऊन त्यांचे सांत्वन केले . पेशावरहून बातमी आली क़ी १७ ऑगस्ट १६७० / १० रतब-उस-सानी १०८१ ला मुहम्मद आमीन खान ततथे पोहोचला. आसद खान, मुतमजा खान, आतबद खान, हसन अली खान, तातहर खान व इतर दरबारी तसेच प्रांतातील अधिकाऱ्यांना पावसाळी अंगरखे दे ण्यात आले . हाजी अहमद सईद याची बेगम सातहबाचा ददवाण म्हणून नेमणूक झाली. त्याच्या जागी लु त्फुल्लाह खानाला अजम-इ-मुकरमरचा दरोगा नेमले गेले.

अध्याय १३

१३ जानेवारी १६७० ते १ जानेवरी १६७१

१११

पादशाहजादा आजम याच्या प्रतततनिींच्या जागी फैजुल्लाह खानाला संबलचा फौजदार नेमले गेले व त्याच्या जागी सरबुलंद खानाला कुशबेगी नेमले गेले. शतनवार, २९ ऑक्टोबर १६७० / २४ जमाद-उस-सानी १०८१ ला सौर वषामनुसार बादशाहाच्या आयुष्याचे ५३ वे वषम चालू झाले . तो सोन्याच्या ससिंहासनावर बसला. पादशाहजादे , आमीर व नामदारांचा सन्मान केल्याने त्यांचा आनंद तद्वगुणणत झाला1. तफदाई खानासोबत गेलेल्या रादअंदाज खानाला दरबारात उपब्स्थत राहायला सांतगतले गेले व त्याला भेटीचा मान प्राप्त झाला. बातमी आली क़ी रतववार, २ ऑक्टोबर १६७० / २७ जमाद-उल-अव्वल १०८१ ला त्या कनिंद्य लसवा ने सुरतेवर आक्रमण केले , काही तास नगर जाळू न लु टले व परत गेला. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम कडू न त्याला व संजारच्या नजाम-इ-सानीची मुलगी यांना मुलगा झाल्याबद्दल [१०७] एक हजार मोहरा व पत्र आले . पादशाहजाद्याचा दत धमझाम मुहम्मद याने ते बादशाहाला ददले , ज्याने मुलाचे नाव रतफ-उस-शान असे ठे वले . नवाब बाईला दख्खनला घेऊन गेलेला सरबुलंद खान आता परतला व त्याने भेट घेतली. काबुलचा पूवम सुभेदार महाबत खान आला व त्याने भेट घेतली. बादशाहा म्हणाला, ‘तुझे स्वागत आहे’. सोमवार, २८ नोव्हेंबर १६७० / २५ रज्जब १०८१ ला त्याला दख्खन मोतहमेवर पाठवले गेले व गळापट्टी (collar) असले ला अध्याम बायांचा अंगरखा, सोन्याची झालर असले ला घोडा व तलै र असले ला एक हत्ती ददला गेला. त्याचा मुलगा बहराम याला एक रत्नजधडत खंजीर धमळाला. राव कणमचा मुलगा राव रूपससिंह, तकशनससिंहचा मुलगा अमरससिंह, महाबतचा भाऊ ददले र तहम्मत व भावाचा मुलगा सुहराब व खानाच्या सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना भेटवस्तू धमळाल्या. पादशाहजादे व त्यांच्या श्रेणीतील इतरांच्या होड्या व पालख्यांना युरोपी पद्धतीच्या झालरी लावायचा आदे श दे ण्यात आला.

1

पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे वाक्य इंग्रजी अनुवादात वगळले असावे.

अध्याय १४

२ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१

११२

अध्याय १४ राजवटीचे चौदावे वषम – तहजरी १०८१ २ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१ रमजान मतहन्याने राजवटीचे चौदावे वषम सुरू झाले . * * * * * * [१०८] बुिवार, १ फेब्रुवारी १६७१ / १ शव्वाल १०८१ ला ईद-उल-तफत्र होती. मलशदीतून परतल्यावर बादशाहा ससिंहासनावर बसला. * * * आसद खानला ददवंगत लश्कर खानाच्या जागी मीर बक्षी नेमले गेले. एक अंगरखा व घोडा ददल्यावर हसन अली खान त्याच्या पदावर त्वररत परतला. बुखाऱ्याचा दत मुहम्मद शरीफ याला २५००० रुपये, एक अंगरखा व सोन्याची झालर असले ला घोडा भेट ददली गेली. मक्क्याच्या शरीफाचा दत शेख उस्मान याने त्याच्या िन्याने ददले ल्या भेटवस्तू म्हणजे दोन अरबी घोडे, चांदीचे नक्षीकाम असले ला तलवारीचा पट्टा व एक बतहरी ससाणा बादशाहाला भेट ददले . त्याला रत्नजधडत खंजीर, १०००० रुपये, १०० मोहरा ककिंमतीचे सोन्याचे नाणे व १०० रुपये वजनाचा एक रुपया ददला गेला. मक्क्याच्या शरीफाला दे ण्यासाठी त्याच्याकडे वीस हजार रुपये दे ण्यात आले . हबसाणाचा दत सय्यद मुहम्मद रुमी याने आणले ल्या भेटवस्तू सादर केल्या. पतहल्या भेटीत त्याला अंगरखा ददला गेला तसेच तनरोप दे ताना अंगरखा व १०००० रुपये ददले गेले. पलं गतोश1 खान बहादुर याला तलवार, भाला व एक ढाल ददली गेली. इरादत खानाला रुहुल्लाह खानाच्या जागी आख्ताबेगी बनवले गेले. दरबारास आले ला सआदत खान काशाल त्याच्या नेमणुक़ीच्या जागी परतला. सोमवार, १० एतप्रल १६७१ / १० जजल्हेज १०८१ ला ईद-उज-जुहा झाली. पुरहुनर बानू बेगम व गौहरारा बेगम यांना प्रत्येक़ी ५००० मोहरा ददल्या गेल्या. सोमवार, १२ जून १६७१ / १४ सफर १०८२ ला मुहम्मद आमीन खान दरबारास आला. [१०९] लु तफुल्लाह खान तकल्ल्याच्या दरवाज्यापाशी तर आसद खान घुसलखान्याच्या 1

इंग्रजी अनुवादात याचा उल्ले ख यलं गतोश खान असा केला आहे. फासी पाठात पृ. १०८, १३५ वर पलं गपोश खान तर यानंतर पलं गतोश खान असे येते. फासी पाठात पृ. १५२ वर या उल्ले खा बद्दल तळटीप ददली आहे. पलं क ककिंवा पलं ग म्हणजे तबबट्या (स्टा. २५४), तोश म्हणजे शक्त़ी, सामथयम, जोम (स्टा. ३३५).

अध्याय १४

२ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१

११३

रत्नजचडत खंजीर (साभार MET)

दरवाज्यापाशी त्याला जाऊन भेटले . त्याने चार अरबी व इराक़ी घोडे सादर केले . बादशाहाने त्याला अंगरखा ददला व आपुलक़ीने त्याची तवचारपूस केली. रतववार, २१ मे १६७१ / २२ मुहरमम १०८२ ला शाह नवाज खान सफावी याची पत्नी नौरस बानू बेगम वारली. नूरजहा बेगमचा भाचा धमझाम अबू सैद, याची मुले दाराब खान व खानाजाद खान

अध्याय १४

२ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१

११४

यांना दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. अमीर-उल-उमराने ददले ल्या दोन लक्ष तीस हजार रुपयांच्या भेटवस्तू म्हणजे हत्ती, दुर्मिंळ वस्तु व इतर गोष्टी बादशाहासमोर ठे वल्या गेल्या. शादकाम चेला हा बादशाहाचा जुना दास वारला. त्याच्या कुटुं तबयांना पदे व वस्त्रे ददली गेली. महाराजा जसवंतससिंह याला जामरुदचा ठाणेदार नेमले गेले व पावसाळ्याचा अंगरखा तसेच ५०० मोहरा ककिंमतीचा एक घोडा ददला गेला. मुख्य संगीतज्ञ तबसराम खान वारला. त्याचा मुलगा भूपत व संगीतज्ञ खुशहाल खान यांना अंगरखे दे ण्यात आले . अशरफ खानाच्या मुलीची मुले जजयाउद्दीन हुसैन, यादगार हुसैन व मुहम्मद हुसैन भेटीस आले व त्यांना अंगरखे ददले गेले. ते अंगाने एकदम िट्टे कट्टे असल्याने बादशाहाने त्यांच्यापैक़ी एकाला रोज दरबारात आणायचा आदे श ददला. अमीर-उल-उमरा अली मदम न खान याचा मुलगा मुहम्मद अली बेग इराणहून आला व भेट घेतली. त्याला एक अंगरखा, एक तलवार, मोत्याचा इलाका असले ला एक रत्नजधडत खंजीर व १०००० रुपये ददले गेले. शतनवार, २९ जुलै १६७१ / २ रतब-उससानी १०८२ ला नुकताच इराणहून परतले ला असालत खानाचा भाऊ मीर मुहम्मद याने बादशाहाची भेट घेतली. [११०] त्याला एक रत्नजधडत खंजीर व ७००० रुपये ददले गेले. दाऊद खानाच्या जागी हुशदार खानाला बऱ्हाणपूरचा नाजजम नेमले गेले व भेट घेतल्यानंतर दाऊद खानाला मीर खानाच्या जागी अलाहाबादचा नाजजम नेमले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा, सोन्याची झालर असले ला एक घोडा व तांब्याची झालर असले ला हत्ती ददला गेला. खालसाचा दफ्तरदार इनायत खान याला बरैली चाकला इथली फौजदारी धमळाली. अमानत खान उफम धमराक मुईनुद्दीन याला इनायत खानाच्या पदावर नेमून स्फदटकाची दौत ददली गेली. इततकाद खानाचा मुलगा मुहम्मद यार याचे फरुम ख फाल याच्या मुली बरोबर लग्न झाल्याबद्दल त्याला एक अंगरखा ददला गेला. मुहम्मद अली बेग याला अली कुली खान ही उपािी, दोन हजारी (तततकेच स्वार), एक अल्म, नगारे व ३०००० रुपये ककिंमतीच्या सोन्याच्या व चांदीच्या वस्तु ददल्या गेल्या. तुरक़ीच्या राजाने हुसैन पाशाच्या जागी बसरा प्रांतावर तनयुक्त केले ल्या यातहया पाशा याचे भाग्य उजळल्यामुळे त्याने ते पद स्वीकारले नाही व तो बादशाहाच्या दरबारास आला. त्याला सोन्याच्या दोऱ्याच्या गुंड्या असले ला अंगरखा, रत्नजधडत तलवार व खंजीर, १०००० रुपये व दीड हजारी (७०० स्वार) धमळाली. पादशाहजादे तसेच दरबार व प्रांतांतील सवम स्तरांवरील नामदारांना बारानी ददले गेले. मुबाररज खानाच्या जागी

अध्याय १४

२ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१

११५

आबीद खानाला मुलतानचा सुभेदार नेमले गेले. सोमवार, ११ सप्टें बर १६७१ / १७ जमाद-उल-अव्वल १०८२, बादशाहाची बहीण रोशनआरा बेगम वारली [१११]. ती शालीन, गुणसंपन्न होती व ततच्या भावावर ततचे खूप प्रेम होते. ततच्या आत्म्याच्या शांतीसाठी बादशाहाने दानिमम करत मोठी रक्कम वाटली व ततच्या पुरुष व स्त्री सेवकांचा सन्मान केला. मुहम्मद आमीन खान याला वजीरीचा पदभार दे ण्यासाठी दरबारात बोलावले गेले. तो प्रामाणणकपणे सल्ला दे ण्यात तवशेष होता हे खरे आहे पण त्याच्या स्वभावात अहंकार व गवम हे अवगुण होते. त्याने काही अयोग्य तवनंत्या केल्यामुळे बादशाहाच्या संतुललत मनातून तो उतरला व शुक्रवार, १५ सप्टें बर १६७१ / २१ जमाद-उल-अव्वल १०८२ ला त्याची काबुलचा सुभद े ार म्हणून नेमणूक झाली. त्याला एक तवशेष अंगरखा, हररताश्म बसवले ला व मोत्यांचा इलाका असले ला खंजीर व चांदीची झालर असले ला एक उंच हत्ती ददला गेला. इब्फ्तकार खान व मुल्तफत खानाचे अपराि क्षमा करून त्यांना त्यांची पदे [११२] व उपाध्या परत ददल्या गेल्या. तनवृत्ती घेतल्यामुळे पदच्युत केले ल्या सैफ खान याच्या जागेवर इब्फ्तकार खानाला काश्मीरचा सुभेदार नेमले गेले तर मुल्तफत खानाला मुआतमाद खानाच्या जागी ददल्लीचा तकल्ले दार नेमले गेले. गुरूवार, २८ सप्टें बर १६७१ / ४ जमाद-उस-सानी १०८२ ला अलाहाबादचा पूवम सुभद े ार मीर खान याने भेट घेतली. लु त्फुल्लाह खानाला लश्कर खानाच्या मुलीशी झाले ल्या त्याच्या तववाहाबद्दल अंगरखा ददला गेला. कामगार खानाला अमीर-उल-उमराकडे पाठवण्यात आले . सुफ़ी बहादुर याला उरगंजचा राजा अनुशा खान याच्याकडे दत म्हणून पाठवण्यात आले व त्याला अंगरखा, रत्नजधडत जजघा, एक तलवार, एक भाता व एक ढाल ददली गेली. नामदार खानाला आग्र्याचा सुभेदार नेमले गेले व मुआतमाद खानाला आग्रा तकल्ल्याचा तकल्ले दार नेमले गेले. बादशाहाला कळले क़ी अब्दुल्लाह खान तीथमयात्रा करून परत बादशाही दरबारास येत होता, त्याने त्याला १००० मोहरा व चांदीचे तबक व झाकण बहाल केले .

बादशाहािा आग्र्याहून ददल्लीला प्रवाि गुरूवार, २ नोव्हेंबर १६७१ / १० रज्जब १०८२ ला वाटे त लशकार करत बादशाहा आग्र्याहून तनघाला. गुरूवार, २३ नोव्हेंबर १६७१ / १ शाबान १०८२ ला तो

अध्याय १४

२ जानेवारी ते २१ धडसेंबर १६७१

११६

खखज्राबादला पोहोचला. रतववार, २६ नोव्हेंबर १६७१ / ४ शाबान १०८२ ला त्याने ख्वाजा कुतबुद्दीन व ददल्लीचा दीपस्तंभ [११३] असले ल्या शेख नलसरुद्दीन यांच्या थडग्यांना भेट ददली व ततथल्या लोकांना १५०० रुपयांचे बणक्षस दे ऊन तो राजवाड्यात पोहोचला. सोमवार, १८ धडसेंबर १६७१ / २६ शाबान १०८२ ला पादशाहजादा मुहम्मद आजम याने त्याच्या पत्नीला झाले ल्या मुलाच्या आनंदात १००० मोहरा पाठवल्या. त्याला जवान बख्त नाव ददले गेले. कामयाब खान सफावी ज्याला पदच्युत केले होते त्याला पुन्हा त्याचे पद ददले गेले. बादशाहाच्या आिी ददल्लीला पोहोचले ल्या अब्दुल्लाह खानाला आसद खान व बहरामंद खान यांनी दरबारास आणले व त्याला भेटीचा सन्मान धमळाला. त्याच्या घरी २००० मोहरा व खाण्याची पन्नास ताटे पाठवण्यात आली. पदच्युत केले ल्या मीर खानाला पुन्हा त्याचे पद दे ण्यात आले . मीर महमूद याला हजारी (४०० स्वार) व आतकदत खान अशी उपािी ददली गेली. १६ धडसेंबर १६७१ / २४ शाबान १०८२ ला बादशाहाला मुहम्मद आमीन खान याच्याकडू न एक लक्ष पाच हजार रुपयांचे २८० मोती व ५० घोडे भेट धमळाले .

अध्याय १५

२२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२

११७

अध्याय १५ राजवटीचे पंिरावे वषम – तहजरी १०८२-८३ २२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२ रमजानचा मतहना व बादशाहा भेटवस्तूंचे वाटप करतो * * * [११४] अक़ीदत खानाला रुहुल्लाह खानाच्या मुली बरोबर झाले ल्या त्याच्या तववाहाबद्दल अंगरखा ददला गेला. मुल्तफत खान आलमगीरी याचा मुलगा व आजम खान जहांगीरी याचा नातू हुशदार खान याच्या मृत्यूनंतर कामगार व जाफर या त्याच्या मुलांनी भेट घेतली. सतनामी ककिंवा मुंधडया नावाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांचे आश्चयमकारकपणे दमन झाल्याची घटना. ज्यांना दै वाचे चमत्कार ददसतात ते या प्रकरणाने फार तवस्मयचतकत झाले आहेत. सोनार, सुतार, भटके, चांभार [११५] व इतर हलक्या प्रकारची कामे करणारे लोक, जे साहाजजकच दुबमल असतात व कत्तल होणेच ज्यांचे तवधिललखखत असते, त्यांनी डोक्यात काय भरून घेतले मला मातहत नाही ज्यामुळे त्यांच्या अंगात एक दुराग्रही आत्मा संचारला आणण बंडाळीस कारणीभूत झाले ल्या त्यांच्या गवाममळ ु े त्यांचे डोकेच त्यांच्या खांद्यांवर भार झाल्याचे त्यांना वाटू लागले व स्वतःच्या पायाने ते तवनाशाच्या सापळ्यात चालत गेले. या प्रकरणाचा सतवस्तर वृतांत असा आहे – मीवात जजल्यात दुष्ट बंडखोरांचे एक मोठे दल जधमनीतून बाहेर पडणाऱ्या वाळवी प्रमाणे अचानक बाहेर पडले व आकाशातून येणाऱ्या टोळिाडीप्रमाणे खाली आले . हे लोक स्वतःला धचरायु समजतात व त्यांच्यातला एक मेला तर त्याच्या जागी सत्तर तयार होतील असे म्हटले जात होते. त्यांनी बादशाही आधिपत्य िुडकावून ५००० लोकांच्या दलाने नरनौल भागातील परगणे व गावे लु टली. फौजदार तातहर खान त्यांना रोखू न शकल्यामुळे दरबारास आला व बादशाहाने त्या नीच कातफरांना ठे चून टाकायचा तनिामर केला. शुक्रवार, १५ माचम १६७२ / २६ जजल्कदा १०८२ ला रादअंदाज खानाबरोबर तोफखाना, हमीद खानाबरोबर खास चौक़ीतील लशपाई व त्याच्या वधडलांचे, म्हणजे सय्यद मुतमजा खानाचे ५०० लोक, यातहया खान रुमी, नजीब खान, रुमी खान, ददले र खानाचा मुलगा कमालु द्दीन, तफरोज खान मेवाती याचा मुलगा परददल खान व पादशाहाजाद्याच्या सैन्यासमेत पादशाहजादा अकबर याचा बक्षी असफनददयार, यांना

अध्याय १५

२२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२

११८

या कातफरांवर चालू न जाण्याचा आदे श ददला गेला. जेव्हा बादशाही सैन्य ततथे पोहोचले तेव्हा शत्रूकडे आवश्यक युद्धसातहत्य नसताना ही ते युद्धासाठी उभे रातहले . [११६] ‘युद्धभूमीत हत्तींची कत्तल करणे’ असा अथम असले ल्या महाभारत नावाच्या एका कहिंदंच्या

ग्रंथात ददले ल्या युद्धाच्या वणमनाप्रमाणे त्यांनी युद्ध केले . मुसलमानी वीर त्यांच्यावर तुटून पडले व बंडखोरांच्या रक्ताने त्यांनी त्यांच्या क्षमाहीन तलवारी लाल केल्या. भयंकर युद्ध झाले . रादअंदाज खान, हमीद खान व यातहया खान यांनी तवशेष पराक्रम केला. अनेक मुसलमान मारले गेले व इतर अनेक जखमी झाले . शेवटी शत्रूसन्ै य पळाले व ते पळू न जात असताना त्यातील अनेकांना तवजेत्यांनी कंठस्नान घातले , अगदी थोडे बचावले . आपल्या सरदारांना तवजय प्राप्त झाला व प्रदे शातून कातफरांची बोळवण झाली. तवजेत्यांना बादशाहाने भेटीचा सन्मान ददला व त्यांचे अणभनंदन केले . रादअंदाज खानाला शुजाअत खान ही उपािी व ३५०० (२००० स्वार), हमीद खान, यातहया खान, रुमी खान, नजीब खान व सवम स्तरातील योद्धांना वाढ व अंगरखे धमळाले . शुक्रवार, २९ माचम १६७२ / १० जजल्हेज १०८२ ला ईद-उज-जुहा झाली. [११७] मुहम्मद आमीन खानावर अररष्ट व खैबर खखिंडीतून माघार - * * * मुहम्मद आमीन खानाला काबूलवर सत्ता प्रस्थातपत करून बंडखोर अफगाणींना संपवायचे होते. रतववार, २१ एतप्रल १६७२ / ३ मुहरमम १०८३ ला ज्या ददवशी तो खैबर खखिंडीतून जाणार होता त्याच्या अदल्या ददवशी अफगाणींनी खखिंड अडवली आहे हे कळू न ही, त्यांना ततथून हटवणे आवश्यक वाटल्यामुळे त्याकडे लक्ष न दे ता तो तसाच पुढे गेला. खखिंड ओलांडताना अकबराच्या वेळी हक़ीम अबुल फथ, झैन खान कोकाह व राजा तबरबल यांच्या सैन्यात जसा गोंिळ उडाला होता त्याची पुनरावृत्ती झाली. अफगाणी लोकांनी त्यांना सवम बाजूंनी घेरले आणण दगड व बाणांचा वषामव सुरू केला. सैन्य सैरभैर झाले व [११८] घोडे, हत्ती व लोकांची एकच तारांबळ उडाली. काही हजार लोक दरीत पडू न मेले असताना इतक्या मोठ्ा संकटातही मुहम्मद आमीन खान त्याच्या प्रततष्ठेसाठी युद्धात स्वतःचा जीव झोकून दे णार होता. पण त्याच्या सेवकांनी त्याच्या हातून लगाम खेचून घेतला व त्याला संकटातून बाहेर सुरणक्षत दठकाणी नेले. खानाचा तरूण व तनष्ठावंत मुलगा अब्दुल्लाह खान, याला गमावल्यानंतर, प्रततष्ठा गमावून, दारुण अवस्थेत तो परत पेशावरला दौडत गेला. बादशाहाला ही बातमी ३० एतप्रल १६७२ / १२ मुहरमम १०८३ ला धमळाली.

अध्याय १५

२२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२

११९

शतनवार, १८ मे १६७२ / ३० मुहरमम १०८३ ला तफदाई खान लाहोरहून पेशावरकडे तनघाला. ८ मे १६७२ / २० मुहरमम १०८३ सरबुलंद खानाला नामदार खानाच्या जागी आग्र्याचा सुभेदार नेमले गेले. मुल्तफत खानाला सरबुलंद खानाच्या जागी बादशाही लवाजम्याचा दरोगा नेमले गेले. फैजुल्लाह खानाला एक तवशेष पोशाख व सोन्याची झालर असले ला घोडा ददल्यावर तो मुरादाबादकडे तनघाला. अब्दुलाह खानाला २०००० रुपये ददले गेले. तनवृत्ती घेतले ल्या सैफ खानाने भेट घेतली. त्याला एक तलवार दे ऊन पूवीच्या पदावर तनयुक्त़ी केली गेली.

मुहम्मद अकबर व िलीमा बानू बेगम यांिा त्रववाह सुलैमान शुकोहच्या मुलीला गौहरअरा बेगमने दत्तक घेऊन स्वतःच्या [११९] मुलीसारखे वाढवले होते. पादशाहजाद्याला चार लक्ष रुपये, अध्याम बायांचा एक तवशेष अंगरखा, एक कलगी, रत्नजधडत िूप, एक हार, मोत्यांचा सेहरा तसेच दोन अरबी व इराक़ी घोडे भेट धमळाले . मंगळवार, १८ जून १६७२ / २ रतब-उल-अव्वल १०८३, मुख्य काझी अब्दुल वह्हाब याने मलशदीत लग्न लावून ददले . मेहर म्हणून पाच लक्ष रुपये ठरवले गेले. सवम उपब्स्थतांनी शुभेच्छा ददल्या. रात्रीच्या पाच घटका झाल्यावर पादशाहजादा एका भव्य धमरवणुक़ीत घोड्यावर बसून तनघाला. मुहम्मद आजम, बक्षीउल-मुल्क आसद खान, मीर खान, नामदार खान व इतर नामवंत सरदार त्याच्या सोबत होते. ददल्ली दरवाज्यापासून ते बेगमच्या महालापयंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लाकडी आिारांवर रोषणाई करण्यात आली होती. * * * बातमी आली क़ी पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम बादशाहाच्या भेटीकरता येत होता. गुरूवार, २५ जुलै १६७२ / ९ रतब-उस-सानी १०८३ ला [१२०] मुअज्जमने भेट घेतली व त्याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत तलवार, एक मोत्यांचा हार, रत्न बसवले ली असी व एक लक्ष रुपये भेट ददले गेले. शाहजादे मुहम्मद मुईजुद्दीन व मुहम्मद अजीमउद्दीन यांना कंठ्ातील लोलक भेट ददले गेले. रतववार, १५ सप्टें बर १६७२ / २ जमाद-उस-सानी १०८३ ला ख्वाजा तातहर नक्षबंदी याचा मुलगा मुहम्मद सलीह, याचा तववाह मुराद बक्षची मुलगी आसैश बानू बेगम, तहच्याशी करण्यात आला. त्याला एक अंगरखा, सोन्याची झालर असले ला एक

अध्याय १५

२२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२

१२०

घोडा, एक खंजीर, एक कलगी व एक हत्तीण भेट धमळाली. सरबुलंद खान, काझी अब्दुल वह्हाब व मुल्ला मुहम्मद याकूब यांच्या उपब्स्थतीत तववाह पार पडला. बुिवार, ९ ऑक्टोबर १६७२ / २६ जमाद-उस-सानी १०८३ ला वजीर खान तसेच एक जुना तनष्ठावंत सेवक मुहम्मद तातहर, हे दोघे वारले . मीर खानाला वजीर खानाच्या जागी माळव्याची सुभद े ारी धमळाली. सरबुलंद खानाला तहम्मत खानाच्या जागी बक्षीचा सहाय्यक हे पद धमळाले तर तहम्मत खानाला त्याच्या जागी आग्र्याची सुभेदारी ददली गेली. मुघल खानाला तहम्मत खानाच्या जागी कुशबेगी केले गेले. बादशाहाचे मंचकारोहण होण्यापूवी मुहम्मद तातहर नावाचा त्याचा एक सेवक होता, जो सध्या आदे शानुसार हसन अली खान याच्याकडे ददवाणीचे काम करत होता. त्याने पतहल्या तीन खललफांना दषण दे ण्याचे पापकृत्य केले आहे असा त्याच्यावर आरोप होता. उले मांचा प्रमुख मुल्ला औज वातहज याचा दृढतनश्चय आणण शरीयतच्या तनयमांप्रमाणे ३ नोव्हेंबर १६७२ / २२ रज्जब १०८३ ला त्याचा लशरच्छे द केला गेला. मुराद बक्षचा मुलगा इजजद बक्ष, ज्याला ग्वाल्हेरच्या तुरुंगातून दरबारास आणले होते, त्याचा तववाह बादशाहाची मुलगी मेहरुस्त्न्नसा बेगम तहच्याशी बुिवार, २७ नोव्हेंबर १६७२ / १६ शाबान १०८३ ला काझी अब्दुल वह्हाब, शेख तनजाम, बख्तावर खान व दरबार खानाच्या उपब्स्थतीत झाला. [१२१] ग्वाल्हेरहून मुहम्मद सुलतान व लसतपहर शुकोहला आणायला गेलेल्या मुल्तफत खानाने रतववार, ८ धडसेंबर १६७२ / २७ शाबान १०८३ ला भेट घेतली. सलीमगढ तकल्ल्यात दोघांना ठे वण्याची व्यवस्था केली गेली. मंगळवार, १० धडसेंबर १६७२ / २९ शाबान १०८३ ला बादशाहा पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्या घरी गेला. सलीमगढच्या पुल दरवाज्या जवळील धमनारापासून ते पादशाहजाद्याच्या महालापयंत सोन्याचे भरतकाम केले ला गाललचा व इतर गोष्टींची सजावट केली होती. पादशाहजादा मुहम्मद अकबर याच्याकडे वीस हजारी (२००० स्वार) होती, त्याला आता २००० जात ची वाढ धमळाली. गुरूवार, ५ धडसेंबर १६७२ / २४ शाबान १०८३ ला बादशाहाच्या व्यलक्तगत रत्नशाळे चा कोशाध्यक्ष ख्वाजा जवातहर खान वारला. तो बादशाहाचा जुना दास होता व गरीबांना दयेने वागवायचा. शतनवार, १८ मे १६७३ / ३० मुहरमम १०८४, तफदाई खान लाहोरहून पेशावरकडे तनघाला. मुहम्मद आमीन खानाला अहमदाबाद गुजरात येथे सुभद े ार म्हणून नेमले गेले व त्याची सहा हजारी (५००० स्वार) वरून पाच

अध्याय १५

२२ धडसेंबर १६७१ ते १० धडसेंबर १६७२

१२१

हजारी (तततकेच स्वार) वर पदावनती केली गेली. बादशाहाची भेट न घेता पदभार स्वीकारण्याचा आदे श त्याला ददला गेला. महाबत खान, जो आग्र्याला बादशाहाकडे आला होता व ज्याला दख्खन मोतहमेवर तनयुक्त केले होते त्याला अफघाणांशी असले ल्या त्याच्या संबि ं ांमळ ु े दरबारास मनाई केली गेली. इस्लाम खानाने त्याचे कुटुं ब व ततसरा मुलगा मुख्तार बेग, यांना भारतात आणायला उशीर केल्यामुळे त्याला पदच्युत करून दरबारास मनाई केली गेली. तो सध्या उज्जैनला राहत होता. उम्दत-उल-मुल्क [१२२] बहादुर खान याच्या तवनंतीने त्याला पुन्हा पद ददले गेले व खानाच्या सैन्यात त्याची नेमणूक झाली. त्याने त्याचा मुलगा व कुटुं बाला बसऱ्याहून बोलावून घेतले .

अध्याय १६

११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३

१२२

अध्याय १६ राजवटीचे सोळावे वषम – तहजरी १०८३-८४ ११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३ १० जानेवारी १६७२ / १ शव्वाल १०८४ ला ईद-उल-तफत्र राजवाड्यात साजरी केली गेली. नेहमी प्रमाणे दरबार-ए-आम व घुसलखान्यात सजावट केली होती. पादशाहजादे व दरबारी बादशाहा बरोबर जायला जमा झाले होते व तो हत्तीवर1 बसून ईदगाहला गेला. [१२३] शतनवार, ११ जानेवारी १६७३ / २ शव्वाल १०८४, बादशाहा राजवाड्यातील दरबारात ससिंहासनावर बसला. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला अध्याम बायांचा अंगरखा, मोत्यांचा कंठा, एक लक्ष रुपये व सोन्याची झालर असले ला ५००० रुपयांचा हत्ती ददला गेला. पादशाहजादा मुहम्मद आजम याला अध्याम बायांचा अंगरखा व पादशाहजादा मुहम्मद अकबर याला लशरपेच ददला गेला. बक्षी-उल-मुल्क आसद खान व इतर लहान थोर अधिकाऱ्यांना अनेक भेटवस्तू धमळाल्या जसे क़ी रत्ने, अंगरखे, घोडे, हत्ती व बढत्या. मुहम्मद मुअज्जमकडे वीस हजारी (१५००० स्वार) होती. त्याला तीन कोटी दामचे बक्षीस व दहा हजार (५००० स्वार) ची वाढ ददली गेली. सुलतान मुईजुद्दीन, ज्याला १५० रुपये रोज धमळत होते त्याला ५० रुपयांची वाढ ददली गेली. सुलतान मुहम्मद अझीम याला १०० रुपये रोज धमळत होते त्याला ५० रुपयांची वाढ ददली गेली. पादशाहजादे व दरबारातील नामदारांनी बादशाहाला ५० लक्ष रुपयांच्या भेटवस्तू ददल्या. तवजापूरचा राजा लसकंदर अली खान याच्या दताने चार लक्ष रुपयांची रत्ने व भरतकाम केले ल्या वस्तु भेट ददल्या. हैदराबादचा राजा अब्दुल्लाह कुत्ब-उल-मुल्क याच्या दताने वस्तु, रत्ने व गोळकोंड्याच्या धचनीमातीच्या फुलदाण्या ददल्या. बादशाहाने या सगळ्या वस्तुंची ककिंमत तीन लक्ष रुपये समजावी असा आदे श ददला. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्या प्रतततनिींच्या जागी बहादुर खानाला [१२४] दख्खनचा सुभद े ार नेमले गेले व त्याला खानजहान बहादुर अशी उपािी धमळाली. एका गुजमबदामराकरवी त्याच्यासाठी एक तवशेष अंगरखा व रत्नजधडत

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘high chair’ असे म्हटले आहे तर फासी पाठात ‘तख्त-इ-तफल’ म्हणजे ‘हत्ती वरील ससिंहासन’ असा उल्ले ख आहे.

अध्याय १६

११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३

१२३

खंजीर पाठवण्यात आला. तो सहा हजारी (५००० स्वार दोअस्पा सेहअस्पा) होता. त्याला १००० स्वारांची वाढ धमळाली. सतफया बानू बेगमच्या कोकाहचा जावई मीर इब्रातहम, याला धमवातची फौजदारी दे ण्यात आली व कारतलब खान ही उपािी ददली गेली तर मुशीद कुली खानाला त्याच्या जागी दाघ-ए-तशीहाचा दरोगा नेमले गेले. ज्योततषशास्त्रात सवमश्रेष्ठ असणारा ददयानत खान अवकाशात तवलीन झाला. त्याची मुले ददवाफ खान, शेराफ खान व रुस्तम यांना बढत्या व दुखवट्याचे अंगरखे ददले गेले. सोमवार, १६ धडसेंबर १६७२ / ६ रमजान १०८३1 ला बादशाहाने आदे श ददला क़ी दाराब खानाने मुहम्मद सुलतान व लसतपहर शुकोहला त्याच्या शयनगृहात आणावे. बादशाहाने दोघांनी भेट घेतली व त्यानंतर त्यांना अंगरखे व पाचूचे लशरपेच ददले गेले. मुहम्मद सुलतानचे लग्न मुराद बक्षची मुलगी दोस्तदार बानू बेगम तहच्याशी लावले गेले व त्याला एक अंगरखा, तलवार, रत्नजधडत मुत्तका व रत्नजधडत खोगीर असले ला एक घोडा ददला गेला. शयनगृहात बादशाहाने स्वतःच्या हाताने पादशाहजाद्याच्या डोक्यावर मोत्यांच्या मुंडावळ्या बांिल्या व त्याला मलशदीत नेले. काझी-उल-कुझत अब्दुल वह्हाब, त्याचा सहाय्यक मीर सय्यद मुहम्मद याकुब व मीर सय्यद मुहम्मद कनौजी, मुल्ला औज वजीह हे साक्षीदार यांनी लग्न लावले . दोन लक्ष रुपये मेहर द्यायचे ठरले . शुजाअत खान, शेख तनजाम, [१२५] दरबार खान, बख्तावर खान व खखदमतदार खान उपब्स्थत होते. गुरूवार, ३० जानेवारी १६७३ / २१ शव्वाल १०८३, झुब्दतुस्त्न्नसा बेगमचे लग्न दारा शुकोहचा मुलगा लसतपहर शुकोह याच्याशी लावले गेले. मेहर म्हणून चार लक्ष रुपये द्यायचे ठरले . बादशाहा, काझी अब्दुल वह्हाब, मुल्ला औज वाजीह, मुल्ला याकुब, दरबार खान व बख्तावर खान यांच्या उपब्स्थतीत लग्न लावून ददले . लसतपहर शुकोहला एक रत्नजधडत खंजीर, रत्नजधडत लशरपेच, मोत्यांचा कंठा व मोत्यांची माळ ददली गेली. गौहरआरा बेगम व हमीदा बानू बेगम यांनी लग्न समारंभाचे आयोजन केले . इब्फ्तकार खानाला काश्मीरहून काढल्यावर पेशावरला पाठवले गेले. पादशाहजादा मुहम्मद सुलतान याला १२००० रुपये वार्षिंक भत्ता, लसतपहर शुकोहला ६००० रुपये व इजजद बक्षला ४००० रुपये ददला गेला. मंगळवार, ११ फेब्रुवारी १६७३ / ४ जजल्कदा १०८३ ला कुशखान्याचा मुश्रीफ सैफुल्लाह खान याने कळवले क़ी एका

1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही पण फासी पाठात ६ रमजान ददले आहे.

अध्याय १६

११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३

१२४

मीर-इ-लशकारला स्वप्न पडले क़ी त्याला कोणीतरी तलवारीने मारत आहे. जाग आल्यावर त्याने पातहले तर त्याची तलवार म्यानातून काढू न ठे वले ली होती व तो जखमी झाला होता. रतववार, २३ फेब्रुवारी १६७३ / १६ जजल्कदा १०८३ ला आदे शानुसार पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याने ख्वाजा कुतबुद्दीनच्या थडग्याला भेट ददली व ततथे १००० रुपये दान केले . मंगळवार, २५ माचम १६७३ / १६ जजल्हेज १०८३ ला पादशाहजादा मुहम्मद सुलतान याने सुद्धा थडग्याला भेट ददली व ५०० रुपये दान केले . सोमवार, १० माचम १६७३ / १ जजल्हेज १०८३ ला आसद खानाने ददवाणाचा सहाय्यक या पदावरून राजीनामा ददला. [१२६] बादशाहाने आदे श ददला क़ी खालसाचा ददवाण अमानत खान व ददवान-इ-तान तकफायत खान यांनी ददवाणाच्या लशक्क्याच्या थोडे खाली त्यांचे लशक्के मारावेत व ददवाणीचे काम करावे. फरजाम तबरलास याने त्याच्या मुलीचे लग्न त्याच्या बतहणीच्या १४ ककिंवा १५ वषामच्या मुलाशी करायचे मान्य केले होते. पण त्याची बहीण त्या काळातली सवामत कजाग बाई असल्यामुळे शेवटी ते लग्न मोडले . तेव्हा अटकेची फौजदारी त्याच्याकडू न काढू न घेतल्यावर तो दरबारात आला असता त्याची बहीण ततच्या मुलाला धचथावणी दे त म्हणाली क़ी, ‘तू जर या तनलम ज्ज नीच माणसाला दरबारात मारले नाहीस तर तुला माझ्या दुिाची आण आहे’. असे म्हणून ततचा बुरखा त्याच्याकडे फेकून पुन्हा म्हणाली क़ी, ‘हे घाल आणण घरात बस’. आईच्या आदे शाचे पालन करण्यासाठी तो मुलगा, बादशाहा ददवान-ए-आम मध्ये बसत असताना होणाऱ्या गडबडीत, फरजाम उभा होता ततथे गेला व त्याला एका वारात भोसकून ठार करून पळू न जाऊ लागला. पण त्याला पकडू न तुरुंगात टाकले गेले. गुरूवार, १३ माचम १६७३ / ४ जजल्हेज १०८३, काझीच्या तनणमयानुसार त्या मुलाला ददवाण-ए-आम समोर जजलौखान्याच्या टाक्यापाशी मृत व्यक्त़ीच्या वारसांसमोर दे हदं ड झाला. त्यांनी (वारसांनी) सूडाचा अधिकार सोडू न द्यावा अशी इच्छा बादशाहाने व्यक्त केली होती पण त्यांनी ती मानली नाही. तकल्ल्याच्या दरवाज्या बाहेर रथ घेऊन उभ्या असले ल्या त्याच्या आईकडे त्याचे कले वर ददले गेले. बुिवार, १९ माचम १६७३ / १० जजल्हेज १०८३ ला [१२७] ईद-उज-जुहा होती. बादशाहा ईदच्या नमाजासाठी चारही पादशाहजाद्यांसोबत मलशदीत गेला व एका बकरीचा बळी ददला गेला. आदे शानुसार पादशाहजादा मुहम्मद सुलतान ने एका उंटाचा बळी ददला. परतताना एक वेडा माणूस त्या लवाजम्याजवळ आला व त्याने एक काठी

अध्याय १६

११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३

१२५

णभरकावली. ती शाही तख्ताच्या खुचीवर आपटू न बादशाहाच्या गुडघ्यावर पडली. गुजमबदामरांनी त्याला अटक केली. पण बादशाहाने त्याला काही त्रास न दे ता सोडू न द्यायचा आदे श ददला. रतववार, २३ माचम १६७३ / १४ जजल्हेज १०८३ ला काम बक्षची सुंता झाली. रायससिंहच्या मृत्यू नंतर त्याची मुले मानससिंह, महाससिंह व अनूपससिंह दरबारास आली. त्यांची भेट झाली व त्यांना अंगरखे ददले गेले. इरीचचा फौजदार धमझाम जान धमनूछर वारला. बादशाहा म्हणाला, ‘माही व मराततब मी खानजहान बहादुर याला दे त आहे. त्याने ते करून घ्यावे’. खलीलु ल्लाह खानाचा मुलगा रुहुल्लाह खान िामुनीचा फौजदार झाला. दख्खनचा बक्षी बाक़ी खान वारला व मुशीद कुली खानाला त्याच्या जागी नेमले गेले. बुिवार, २३ एतप्रल १६७३ / १६ मुहरमम १०८४ ला बातमी आली क़ी महाबत खान पेशावर जवळील जफरबागेहून काबुलकडे जायला तनघाला आहे. सरबुलंद खानाला त्याच्या तवभागाबरोबर वालाशाही तवभागातील नोंदींचा ताबा घेण्याचा आदे श ददला गेला. सोमवार, १६ जून १६७३ / ११ रतब-उल-अव्वल १०८४ ला असे कळले क़ी मध्यान्हाच्या दोन तास आिी सूयामभोवती इंद्रिनुसारखी प्रभावळ ददसली व ती सात घटका रातहली. शुक्रवार, [१२८] १८ जुलै १६७३ / १३ रतब-उस-सानी १०८४ ला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याची पत्नी, अब्दुल मुमीनची मुलगी वारली. जामा मलशदीत जाऊन आल्यावर बादशाहाने पादशाहजाद्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, फाततहा वाचला व होडीने राजवाड्यास परतला. शतनवार, २ ऑगस्ट १६७३ / २८ रतब-उस-सानी १०८४ ला दख्खनहून बातमी आली क़ी धमझाम राजा जयससिंहाचा मुलगा क़ीरतससिंह वारला. बुिवार, २० ऑगस्ट १६७३ / १७ जमाद-उल-अव्वल १०८४ ला पादशाहजादा अकबर याला मुलगा झाला व त्याचे नाव अब्दुल वह्हाब ठे वले गेले. बुिवार, २४ सप्टें बर १६७३ / २२ जमाद-उस-सानी १०८४ ला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम ला मुलगा झाला व त्याचे नाव खुजजश्ता अख्तर ठे वले गेले. बादशाही सैन्याच्या हालचालींमुळे कुमाऊच्या जमीनदाराला वाटणारी िास्ती सय्यद मुतमजा खान याच्या मध्यस्तीमुळे शमली व तो तनणश्चन्त झाला. त्याने हमीद खानाला तवनंती केली क़ी त्याच्या मुलाला दरबारास घेऊन जावे. खानाने तसे केले व ३ ऑक्टोबर १६७३ / २ रज्जब १०८४ ला पादशाहजादा भेटीस आला. त्याने १००० मोहरा व ३००० रुपये नजराणा सादर केला, त्याला अंगरखा धमळाला. इराणहून बातमी आली क़ी तनशापूर, हेरात व सब्जावार ही शहरे जधमनीत

अध्याय १६

११ धडसेंबर १६७२ ते २९ नोव्हेंबर १६७३

१२६

गाडली गेली. खानजहान बहादुर ने साठ कोसांचा पल्ला पार करत बंडखोर लसवाचा पूणम पराभव केला व मोठी रक्कम जप्त करून दलपत कुमारच्या [१२९] हाती बादशाहाकडे पाठवली, त्याने बुिवार, २२ ऑक्टोबर १६७३ / २१ रज्जब १०८४ ला त्याची पाहाणी केली. खानाने कुमाऊच्या डोंगरातून आणले ला तीन पायांचा बगळा दाखवला. फैजुल्लाह खान मुरादाबादहून भेटी करता आला. महाबत खानाने अफगाणी बंडखोरांना िडा लशकवण्याचे टाळले व एकमेकांना त्रास द्यायचा नाही असा त्यांच्याशी गुप्त तह करून तो काबुलला गेला. यामुळे बादशाहा फार रुष्ट झाला. सोमवार, १७ नोव्हेंबर १६७३ / १७ शाबान १०८४ ला शुजाअत खानाला अफघाणी बंडखोरांना िडा लशकवण्यासाठी मोठे सैन्य व भरपूर युद्ध सामग्री दे ऊन पाठवले गेले, त्याला एक तवशेष अंगरखा, हररताश्म व रत्ने बसवले ला एक जजघा, सोन्याची झालर असले ला अरबी घोडा, ५०० जात (तततकेच स्वार) अशी वाढ ददली गेली. सफमराज खानाला तोफखान्याचा नायब केले गेले, खखदमतगार खानाला सहाय्यक तकल्ले दार व दरबार खानाला घुसलखान्याचा नायब केले गेले. त्याच्या (दरबार खान) समथमकांनाही अंगरखे, तलवारी, घोडे, हत्ती व बढत्या धमळाल्या.

अध्याय १७

३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४

१२७

अध्याय १७ राजवटीचे सतरावे वषम – तहजरी १०८४-८५ ३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४ [१३०] मंगळवार, ३० धडसेंबर १६७३ / १ शव्वाल १०८४,1 ईद-उल-तफत्र च्या

ददवशी बादशाहा मलशदीत गेला, नेहमीप्रमाणे भेटवस्तू, बणक्षसे व बढत्या ददल्या गेल्या. इराणचा सद्र व वजीर खलीफा सुलतान याचा भाऊ मीर कवामुद्दीन त्याच्या सुदैवाने भारतात आला. रतववार, ४ जानेवारी १६७४ / ६ शव्वाल १०८४ ला त्याने बादशाहाची भेट घेतली व त्याच्यावर कृपादृष्टी झाली. त्याला एक तवशेष अंगरखा, फूल-कटारा व मोत्याचा इलाका असले ला रत्नजधडत खंजीर, सोन्याचा साज असले ली तलवार, गुलाबाच्या फुलांची कलाकारी असले ली ढाल, गदा (आसा), हररताश्म असले ली कलगी, १०००० रुपये रोख, तीन हजारी (१५०० स्वार) व खान ही उपािी ददली गेली. त्याचा मुलगा सद्रुद्दीन याला एक अंगरखा, सोन्याचा साज असले ली एक तलवार व सात सदी (१०० स्वार) ददली गेली. शेख मीर याचा मुलगा मीर इब्रातहम मक्केला जाऊन आल्यावर दरबारास आला व त्याला त्याची मनसब १५०० (१००० स्वार) परत ददली गेली. हक़ीम सलीह खान वारला. हक़ीम मुहासन व त्याच्या इतर मुलांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. [१३१] तकरमब खानाचा मुलगा मुहम्मद अली खान याला त्याच्या (हक़ीम सलीह खान) जागी तकरतकराकखान्याचा दरोगा केला गेला. ददवंगत इस्लाम खानाचा मुलगा मीर अब्दुर रहमान याला दत म्हणून हैदराबादला पाठवले गेले. ८ माचम १६७४ / १० जजल्हेज १०८४ ला ईद-उज-जुहा होती, बादशाहा नमाजासाठी मलशदीत गेला.

शुजाअत खानािा मृत्यू व बादशाहा हिन आब्दाल ला जातो शतनवार, १४ फेब्रुवारी १६७४ / १८ जजल्कदा १०८४ ला बादशाहाला कळले क़ी शुजाअत खानाने गुड ं ाब नदी ओलांडून खारप्याचा कोताल (खखिंड) पार करण्यासाठी सैन्य एकतत्रत केले होते. संिीची वाट पाहणाऱ्या अफघाणांनी त्या चचिंचोळ्या घाटात त्याला घेरले . बादशाही सैन्य शौयामने लढले व त्यांनी अचाट पररश्रम केला पण त्यांच्या भाग्यात काही वेगळे च असल्यामुळे तो ददवस ते काढू शकले नाहीत व त्या लढाईत 1

इंग्रजी अनुवादात वार व तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय १७

३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४

१२८

शूजाअत मारला गेला. अफगाणांनी केले ल्या दगडांच्या वषामवातून ज्यांना स्वतःला वाचवता आले ते पेशावरला पळू न गेले. बादशाहाने स्वतः ततथे जायचे ठरवले [१३२] व ७ एतप्रल १६७४ / ११ मुहरमम १०८५ ला हसन आब्दाल कडे जायला तनघाला. तहम्मत खानाला घुसलखान्याचा दरोगा नेमले व सफ लशकन खानाला नुकत्याच वारले ल्या शुजाअत खानाच्या जागी तोफखान्याचा दरोगा नेमले . आग्र्याचा नाजजम सफ़ी खान याला ददल्लीचा नाजजम नेमले गेले. मुआतमाद खानाला आग्र्याच्या तकल्ले दारी बरोबर आग्र्याची फौजदारी ही ददली गेली. फैजुल्लाह खान मुरादाबादला परत गेला. इमारतींचा दरोगा इहतमाम खान व ददल्लीतील इतर अधिकारी आपापल्या पदावर रुजू झाले . कवामुद्दीन खान व त्याच्या मुलाला दोन मतहन्यांनी बादशाहाकडे जाण्याचा आदे श ददला गेला. सरकहिंद चाकलाचा फौजदार शेख अब्दुल अजीज याला ददलावर खान ही उपािी धमळाली. सरबुलंद खानाला अडीच हजार लोक व तोफखाना घेऊन डोंगराच्या पायथयापाशी पुढे येण्याचा आदे श झाला. नामदार खानावर बादशाहा रुष्ट झाल्यामुळे त्याला पदच्युत करून वार्षिंक ४००० रुपयाचा भत्ता ददला गेला. तफदाई खानाचा मुलगा मुहम्मद सालीह याला खान ही उपािी धमळाली व त्याला त्याच्या वधडलांकडे पाठवले गेले. प्रेतषताची पुण्यततथी साजरी करण्यासाठी रहमत खान बयुताती याला लाहोरला पाठवले गेले. खलीलु ल्लाह खानाचा मुलगा मीर खान याने इरीच ची फौजदारी घ्यायला नकार ददल्यामुळे त्याला पदच्युत केले गेले. मुलतानचा जमीनदार इस्माईल हट याला खान उपािी व एक घोडा दे ऊन मंगळवार, २३ जून १६७४ / २९ रतब-उल-अव्वल १०८५ ला त्याच्या घरी पाठवण्यात आले . इब्फ्तकार खान व आक़ीदत खानाला जम्मू मोतहमेत तफदाई खानाच्या मदतीसाठी पाठवण्यात आले . [१३३] राजौरचा जमीनदार राजा इनायतुल्लाह याला जायची परवानगी दे ण्यात आली. शुक्रवार, १२ जून १६७४ / १८ रतब-उल-अव्वल १०८५ ला बक्षी-उल-मुल्क सरबुलंद खान याला बडी सुलतान, नामदार खान व एका मोठ्ा सैन्यातनशी पेशावरला पाठवले गेले. रतववार, १४ जून १६७४ / २० रतब-उल-अव्वल १०८५ ला जामरूदचा थाणेदार महाराजा जसवंतससिंह हा, त्याच्या दठकाणापासून पुढे येऊन बादशाहाला रावळकपिंडीला भेटला, त्याला एक तवशेष अंगरखा, ७००० रुपयांची असी व तनरोप दे ताना एक तलवार व रत्नजधडत साज तसेच एक हत्ती व तलै र ददले गेले.

अध्याय १७

३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४

१२९

शुक्रवार, २६ जून १६७४ / २ रतब-उस-सानी १०८५ ला बादशाहा हसन आब्दालच्या राजवाड्यात पोहोचला. सकळ जगाचा दाता अशा ईश्वराचा प्रतततनिी असले ल्या बादशाहाचे सद्गुण व दयाळू पणा याबद्दल एक सुरस कथा सांतगतली जाते. हसन आब्दालला आल्यावर दोन ककिंवा तीन ददवसांनी तो ततथल्या बागेत गेला होता. ले खकाच्या सेवकांनी तक्रार केली क़ी राजवाड्याच्या भभिंतींखाली एक वृद्ध माणूस एक पाणचक्क़ी चालवायचा ज्यासाठी लागणारे पाणी वरच्या बागेतन ू यायचे व नंतर खालच्या नाल्यात जायचे. पण राजवाड्याची ती जागा नाजजरच्या अधिकारात असल्यामुळे त्याच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची वाट अडवली होती. त्यामुळे लोकांना पीठ दळू न घेण्याची अडचण तनमामण झाली होती व त्या वृद्ध माणसालाही उत्पन्नाचे सािन उरले नव्हते. [१३४] हा सगळा प्रकार मी बख्तावर खानाला सांतगतला व त्याने तो बादशाहाच्या कानावर घातला. बादशाहाने त्याला स्वतः जाऊन पाण्याची वाट मोकळी करायचा आदे श ददला व इतर कोणीही त्या वृद्ध माणसाच्या कामात काही अडथळा आणू नये असा कडक आदे श ददला. बादशाहाच्या आदे शाप्रमाणे केले गेले. रात्री जेव्हा दीड प्रहरानंतर खान त्याच्या घरी परतला तेव्हा स्वतःच्या भोजनगृहात बसले ल्या बादशाहाने अततशय तवद्वान व दरबारातील आसामी, शेख तनजाम याचा मुलगा शेख अबुल खैर याला खाण्याची दोन ताटे व पाच अशरफ़ी ददल्या व सांतगतले क़ी, ‘हे बख्तावर खानाकडे घेऊन जा. तो तुला त्या वृद्ध माणसाचे घर दाखवेल कारण बहुदा त्याला ते मातहत असावे. त्या गरीबाला माझा नमस्कार सांग व त्याला म्हणावं, तो माझा शेजारी आहे. माझ्या येण्यामुळे त्याला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा कर’. शेख खानाकडे आला व तवचारपूस केल्यावर एका वाटसरू कडू न कळले क़ी दुसऱ्या टे कडीवर एक गाव होते जजथे त्या माणसाची झोपडी होती. त्या माणसाने शेखला मध्यरात्री त्या वृद्ध माणसाच्या घराची वाट दाखवली. ततथे पोहोचल्यावर शेखने त्याला उठवले व त्याची क्षमा मागून पापक्षालन करतवले . दुसऱ्या ददवशी बादशाहाची पालखी त्या (वृद्ध) माणसाकडे नेऊन त्याला महालात घेऊन येण्याचा आदे श नाजजर दरबार खान याला ददला गेला. ज्या वृद्ध माणसाने किी पालखीचे नावही ऐकले नसेल त्याने चांदीच्या काठ्ांची पालखी बधघतल्यावर त्याची अवस्था काय वणामवी. त्याला (बादशाहा समोर) आणले गेले. बादशाहाने त्याची तवचारपूस केली. त्याने सांतगतले क़ी त्याला दोन अतववातहत मुली व दोन मुले आहेत

अध्याय १७

३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४

१३०

ज्यांना काही काम नाही, व त्याची पत्नीही जजवंत आहे. त्याला दोनशे रुपये ददले गेले. तो दोन ददवस महालात रातहला व सवांकडू न त्याला पैस,े अलं कार व कपडे धमळाले . [१३५] त्याच्या अडचणीबद्दल मी बख्तावर खानाकडे शब्द टाकला होता हे त्याला

कोणाकडू न तरी कळले . तसा तो माझ्या तंबूसमोर आला. त्याच्या पाठीवर दुशाला होता, अंगावर दामन असले ला एक पेशवाज (अंगरखा), डोक्यावर सोन्याच्या िाग्यांचे उपरणे, खाली तकमखाबाचा1 पायजमा, पुढ्यात सोन्याची नाणी, रुपये व अलं कार भरले ले तसेच िूसर झाले ले डोळे व शंभर सुरकुत्या असले ला चेहरा. मी तवचारले , ‘तुम्ही कोण आहात ?’ तो म्हणाला क़ी ‘मी तो माणूस आहे ज्याला तुमच्या व खानाच्या मदतीमुळे एवढे

सौभाग्य लाभले आहे’. ‘सुखी राहा’. मी पुढे होऊन त्याला खानाकडे घेऊन गेलो व खानाने ही त्याला काही भेटवस्तू ददल्या. दोन तीन ददवसांनंतर बादशाहाने पुन्हा त्या माणसाला व त्याच्या मुलींना घेऊन यायचा आदे श नाजजरला ददला. भोयांनी (षंढ) पालखी नेली व त्यांना घेऊन आले . यावेळी त्याने हुंड्यासाठी १००० रुपये आणले . महालातील लोकांनी त्याला गेल्या वेळे पेक्षा दुप्पट पैसे, अलं कार व कपडे ददले . त्याला जवळच दुसऱ्या पाणचक्क़ीसाठी पाणी दे ण्यात आले . बादशाही दफ्तरातून त्याला सनद दे ऊन कर व इतर उपकर यातून त्याला सूट द्यावी असा नाजजरला आदे श ददला गेला. आदे शाप्रमाणे हाक़ीम सनजाक त्या वृद्ध माणसाचे घर बघण्यासाठी गेला. त्यानंतर त्याला पादशाहजादे मुहम्मद सुलतान, मुहम्मद आजम, मुहम्मद मुअज्जम, मुहम्मद अकबर तसेच आसद खान व पलं गतोश खान यांच्या घरी नेले गेले व सवांनी त्याचे आदराततथय केले . त्याच्या मुलींचे लग्न लावून ददले गेले. त्याच्या मुलांनी सोन्याचे भरतकाम असले ले अंगरखे पररिान केले . त्याच्या पत्नीचे वय जरी तारुण्य व उमेदीच्या पुढे गेले असले तरी ती गावकऱ्यांची पुढारीण म्हणून प्रलसद्ध होती. पण त्या काळातील युसुफच्या (बादशाहा) आलशवामदाने ती वृद्धा पुन्हा झुलेखा सारखी तरुण झाली. यात अजजबात अततशयोक्त़ी नाही क़ी ततच्या चेहेऱ्यावरील सुरकुत्या [१३६] नाहीशा होऊन त्या जागी सौंदयम ददसू लागले . ततच्या िूसर डोळ्यात पुन्हा चमक आली. * * *

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘kinkhab’ असे ददले आहे पण फासी पाठात (‫ )کمخاب‬म्हणजे तकमखाब असे आहे. अथामसाठी फासी शब्दसूची हे पररलशष्ट पाहावे.

अध्याय १७

३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४

१३१

आघर खानाला नुसरत खान, धमझाम सुलतान व युद्धसामग्री सतहत सैन्य दे ऊन जामरूद व खैबरच्या अफगाणांना िडा लशकवायला पाठवले गेले. राय लालचंदला काबुल सुभ्यातील खालसा जमीनींचे व्यवहार तपासायला पाठवले गेले. पादशाहजादा अकबर व आसद खान यांनी कोहातमागे तातडीने काबूलला पोहोचावे असे बादशाहाने ठरवले . मंगळवार, १५ सप्टें बर १६७४ / २४ जमाद-उस-सानी १०८५ ला पादशाहजाद्याला एक तवशेष अंगरखा, पर-इ-कुलं ग ची कलगी, एक तलवार व रत्नजधडत ढाल, ५० अरबी, इराक़ी, डोंगरी व तुकी घोडे व चांदीचा साज असले ला एक हत्ती ददला गेला. आसद खानाला एक तवशेष अंगरखा, एक तलवार, एक घोडा व एक हत्ती ददला गेला. शाहामत कान, घैरत खान, सय्यद मुनव्वर खान, मुबारीज खान, लसयादत खान, मुफ्तखार खान, सजावर खान, कामयाब खान, आसद खानाचा मुलगा मुहम्मद इस्माईल, इनायत खान, मुफाखार खान, बहरामंद खान, हयात बेग, बहादुर खानाचा मुलगा ददले र, राजा रामससिंहचा मुलगा कुमार तकशनससिंह व इतर अधिकाऱ्यांची तवतवि पदे व कामतगरींवर तनयुक्त़ी झाली व त्यांना भेटवस्तु ददल्या गेल्या. रतववार, २७ सप्टें बर १६७४ / ७ रज्जब १०८५ ला महाबत खानाच्या जागी तफदाई खानाला काबुलचा सुभेदार नेमले गेले व त्याच्या बरोबर मोठे सैन्य तसेच भरपूर युद्ध सातहत्य [१३७] पाठवले गेले. बख्तावर खानाकडे त्याच्यासाठी आदे श ददला गेला क़ी जेव्हा त्याचे सैन्य खखिंडीत (कोतल) लशरेल तेव्हा तबनीच्या पथकाने आिी खखिंड ओलांडून पलीकडे जाऊन ततथे थांबावे. दुसऱ्या ददवशी सैन्याच्या मिल्या फळीने पलीकडे जावे, तोवर मागच्या फळीने ततथेच थांबावे, व उजव्या फळीला जर जागा कमी पडली तर त्यांनी तबनीच्या पथकाबरोबर तसेच डाव्या फळीने मागच्या पथकाबरोबर जावे. सोमवार, १६ नोव्हेंबर १६७४ / २७ शाबान १०८५ ला महाबत खानाने भेट घेतली. तवठ्ठलदास गौड याचा नातू वीरससिंह याच्यावर चालू न जायचा आदे श त्याला ददला गेला. अजम-इ-मुकरमरचा दरोगा शेख अब्दुल अजीज याला सात सदी (२०० स्वार) ददली होती पण त्याच्या उिळे पणामुळे व त्याला जाहगीर आणण रोख बणक्षसे दे ऊन सुद्धा त्याला त्याचे खचम भागवणे अवघड जात होते. कामात तसेच दरबारातील उपब्स्थतीत त्याचा चुकारपणा ददसू लागला होता आणण तो यातून बाहेर पडणार नाही हे जणू त्याच्या दै वातच असावे कारण त्याने काही वेळा करता लाहोरला जाण्यासाठी अजम केला. हे बोलू न बादशाहाने सहमती ददली –

अध्याय १७

३० नोव्हेंबर १६७३ ते १८ नोव्हेंबर १६७४

१३२

स्वतःचा हात मानेला बांिून ठे ऊ नका व पूणम मोकळा ही सोडू नका (अगदी कंजूसपणे वागू नका तसेच उिळपट्टीही करू नका) लु त्फुल्लाह

खानाने

बादशाहाचा

सहाय्यक

म्हणून

अधिकाऱ्यांना

बादशाहासमोर सादर करावे व बख्तावर खानाने बादशाहाच्या सही करता गुप्त कागदपत्रे सादर करावीत असा आदे श ददला गेला. लाहोरला आल्यावर शेखने खालील गजल बख्तावर खाना करता ललतहली. [१३८] * * * (गजल वगळली आहे)

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

१३३

अध्याय १८ राजवटीचे आठरावे वषम – तहजरी १०८५-८६ १९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५ शतनवार, १९ धडसेंबर १६७४ / १ शव्वाल १०८५ ला ईद-उल-तफत्र झाली व दरबारात पारंपाररक समारंभ पार पडला. पादशाहजादे व नामदारांनी नजराणे ददले . त्यांना भेटवस्तू व बढत्या धमळाल्या. [१३९] पादशाहजादा मुहम्मद सुलतान याला वीस हजारी (१०००० स्वार)

धमळाली व अध्याम बायांचा अंगरखा, मोत्यांचा कंठा, १४००० रुपयांचा माणणकाचा कंठा, एक लक्ष रुपये रोख, सोने व मुलाम्याचा साज असले ले दोन घोडे, चांदीचा साज असले ले दोन हत्ती, नगारे, तुघ व तनशाण ददले गेले. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला एक अंगरखा, मोत्यांचा कंठा, माणकाचे लोलक, रत्नजधडत लशरपेच व पाच लक्ष रुपये ददले गेले. मुहम्मद आजम, मुहम्मद अकबर व सुलतान मुईजुद्दीन यांना अध्याम बायांचा अंगरखा, सुलतान मुहम्मद अजीम याला अंगरखा ददला गेला व शेवटच्या दोघांना सात हजारी (२००० स्वार) तसेच तुघ, तनशाण व नगारे धमळाले . राणा राजससिंह याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व प्रशंसा करणारे फमामन पाठवले गेले. महाराजा जसवंतससिंह याला एक तवशेष अंगरखा ददला गेला. तहम्मत खान, खान-ए-सामान अशकफ खान, सद्र-उस-सद्र रजावी खान व इतर लहान थोर दरबारींना मानाची वस्त्रे धमळाली. बक्षी-उल-मुल्क सरबुलंद खान याला पाच सदीची वाढ धमळू न तो चार हजारी (२५०० स्वार) झाला. आिी पदच्युत केले ल्या मीर खानाला आमीर खान ही उपािी दे ऊन चार हजारी (३००० स्वार) ददली गेली. कवामुद्दीन खानाला पाच सदीची वाढ धमळू न तो साडे तीन हजारी (१५०० स्वार) झाला. [१४०] कामगार खान व मुहम्मद अली खान यांना प्रत्येक़ी ५०० ची वाढ धमळाली व ते दोन हजारी (५०० स्वार) झाले . ख्वाजा शाह याला शरीफ खान ही उपािी धमळाली व ददले र खानाचा मुलगा कमालु द्दीन तसेच बक्र खान यांना प्रत्येक़ी दोन सदीची वाढ धमळू न ते हजारी (७०० स्वार) झाले . ददवंगत फाजजल खानाच्या भावाचा मुलगा कातबल खान बुहामनुद्दीन याला इततमाद खान ही उपािी धमळाली. जुना वालाशाही सेवक अबुल फतह काबील खान याचा भाऊ आणण डाक व दार-उल-इन्शा चा दरोगा मुहम्मद शरीफ मुनशी याला कातबल खान उपािी व १०० जात

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

१३४

ची वाढ धमळाली. बख्तावर खानाला हजारी (२५० स्वार) ददली गेली. मक्केच्या शरीफचा दत सय्यद अली व सालार-इ-अस्पान मुहम्मद आमीन यांना प्रत्येक़ी ५००० रुपये दे ऊन तनरोप ददला गेला. बाल्खचा राजा नजर मुहम्मद खान याचा जावई व जुबैरच्या ख्वाजांचा प्रमुख ख्वाजा मुहम्मद याकुब याला १०००० रुपये भेट ददले गेले. ही रक्कम दर मतहन्याला ख्वाजाच्या घरी पोहोचवावी असा आदे श ददला गेला. ददले र खानाने भेट घेतली व त्याला आबीद खानाच्या जागी मुलतानचा सुभद े ार नेमले गेले. अलीमदम न खानाचा जावई हुसैन बेग खान याला जौनपूरचा फौजदार नेमले गेले. जम्मूचा जमीनदार पृथवीससिंह याला लोदी खाना सोबत काबुल मोतहमेवर जायचा आदे श ददला गेला. ददवंगत अब्दुल्लाह खानाचा मुलगा मुहम्मद वफा याला गुजर-ऋतष व कोहातचा ठाणेदार नेमून पाठवले गेले. महाबत खानाची मुले बहराम व फजामम [१४१] यांच्या पत्रावरून कळले क़ी २२ धडसेंबर १६७४ / ४ शव्वाल १०८५ ला महाबत खान अमानाबादला वारला. त्यांना दरबारास बोलावले गेले. राण्याचा एक अधिकारी रघुदास झाला1 बादशाहाकडे आला व त्याला सात सदी (५०० स्वार) ददली गेली. शेख मीर याचा सवामत मोठा मुलगा मुहतशाम खान, मीर इब्रातहम याला मुल्तफत खानाच्या जागी लं गरकोटचा फौजदार नेमले गेले. त्याला एक अंगरखा, तनशाण व सोन्याची झालर असले ला एक घोडा ददला गेला. मंगळवार, ९ माचम १६७५ / २२ जजल्हेज १०८५, मुलतानहून बदली झाले ला आबीद खान परतला व बादशाहाच्या भेटीकरता थांबला. मुहम्मद आमीन खानाचा जावई व सय्यद सुलतान करबलाईचा भाऊ मीर अब्बास, ज्याला घरी परतण्याची परवानगी धमळाली होती, त्याला एक अंगरखा व २००० रुपये बक्षीस धमळाले . औरंग ख्वाजा चौराघासी याला बुखाऱ्याला जाताना एक अंगरखा, एक रत्नजधडत जजघा, एक हत्तीण व १०००० रुपये ददले गेले. ख्वाजा मुहम्मद सालीह याचे वडील व मुराद बक्षचा जावई ख्वाजा मुहम्मद तातहर नक्षबंदी याला घरी परतण्याची परवानगी धमळाली व ५०० मोहर बक्षीस धमळाले . ग्वाल्हेरचा तवक्रमससिंह याला ठाणेदार म्हणून तनणश्चत केले गेले व त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व सोन्याची झालर असले ला एक घोडा ददला गेला. त्याला त्याच्या सोबत अडीच हजाराचे डोंगरातले पायदळ आणायचा आदे श झाला. इनायत खानाला

1

‘रघुदास झाला’ हे व्यक्त़ीनाम आहे.

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

१३५

मुजातहद खानाच्या जागी खैराबादचा फौजदार नेमले गेले. सोमवार, २४ मे १६७५ / ९ रतब-उल-अव्वल १०८६ ला सफलशकन खान वारला. [१४२] मुल्तफत खानाला त्याच्या जागी तोफखान्याचा दरोगा नेमले गेले. एका गुजमबदामराबरोबर त्याच्यासाठी एक अंगरखा पाठवला गेला. खानजहान बहादुर याने अनेकदा हल्ले करून व लांब पल्ल्याची चाल करून नीच लसवाला हरवले होते तसेच दख्खन, तवजापूर व हैदराबाद मिील इतर बंडखोरांना िडा लशकवण्यासाठी अपार कष्ट घेतले होते म्हणून बुिवार, ७ जुलै १६७४ / २३ रतबउस-सानी १०८६ ला बादशहाने त्याला खानजहान बहादुर जफर जंग कोकलताश ही उपािी दे ऊन त्याला एक हजार जात अशी वाढ दे ऊन सात हजारी (तततकेच स्वार) दे ऊन सन्मातनत केले व त्याला एक कोटी दाम बक्षीस ददले गेले. त्याचा नोकर मोहम्मद सालीह ज्याने भेटीची रोख रक्कम, घोडे व हत्ती आणले होते त्याला एक अंगरखा व त्याच्या सहकाऱ्यांना एक हजार रुपये ददले गेले. गुजमबदामर मोहम्मद धमरक याने जफर जंग व त्याच्या मुलांसाठी उत्तम अंगरखे, बढत्या, उपाध्या व प्रशस्तीचे फमामन नेले. जफर जंगच्या तवनंतीनुसार लसवाचा मुलगा संभा याला सहा हजारी (तततकेच स्वार), आठ लक्ष दाम बक्षीस, नगारे व तनशाण ददले गेले. गुजमबदामराच्या हाती एक अंगरखा व फमामन पाठवले गेले. [१४३] सद्र रजावी खान याच्या भावाच्या मृत्यू नंतर खान-इ-सामान अश्रफ खान याने त्याचे सांत्वन केले व त्याला दरबारास घेऊन आला. त्याला दुखवट्याची वस्त्रे दे ऊन ददल्लीला जाण्याची परवानगी दे ण्यात आली. गुरुवार २२ जुलै १६७५ / ९ जमाद-उल-अव्वल १०८६ ला मुहम्मद आजमला मुलगा झाला, त्याचे नाव लसकंदर शान असे ठे वण्यात आले . पादशाहजाद्याला एक अंगरखा, बाळासाठी मोत्याचा कंठा व जहानजेब बानू बेगम तहला दहा हजार रुपये दे ण्यात आले . दरवषी मक्का व मददनाला पाठवली जाणारी नजर स्वतः ततथे नेल्याबद्दल या वषी आबीद खान याला मीर-ए-हज नेमण्यात आले . काझी-उल-कुझात अब्दुल वह्हाब आजारी पडल्यामुळे ददल्लीला जायला तनघाला. लाहोरचा काझी सय्यद अली अकबर हा त्याचा सहाय्यक झाला. काश्गरचा अब्दुल्लाह खान जो ददल्लीला बादशाहाच्या भत्त्यावर आनंदाने जगत होता तो २० ऑक्टोबर १६७५ / १० शाबान १०८६ ला वारला. नालसर खान व मृताच्या इतर नातेवाईकांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली.

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

काझी-उल-कुझात अब्दुल वह्हाब तवतवि िार्मिंक कायामत मग्न असले ली माणसे या धचत्रात दाखवली आहेत. तसेच एका माणसाची मान काखेत िरून त्याला लशक्षा दे ताना ही दाखवले आहे. (साभार BnF)

१३६

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

१३७

सोमवार ८ नोव्हेंबर १६७५ / २९ शाबन १०८६ ला बातमी आली क़ी हैदराबादचा राजा अब्दुल्ला कुत्ब-उल-मुल्क वारला व त्याच्या जागी त्याच्या भावाचा मुलगा व त्याचा जावई अबुल हसन ससिंहासनावर बसला. नामदार खानाला त्याची चार हजारी (२००० स्वार) परत ददली गेली व त्याला सआदत खानाच्या जागी सुभेदार नेमले गेले. इस्लाम खानचा ततसरा मुलगा मुख्तार बेग जो खानाच्या कुटुं बासोबत उजैनला आला होता त्याला सात सदी (दोनशे स्वार) ददली गेली. अमानत खानाने [१४४] खालशाचा पेशदास्त या पदावरून राजीनामा ददला व त्याला लाहोरचा प्रांतप्रमुख केले गेले. दफ्तर-ए-तानचा पेशदास्त तकफायत खान याला खालशाचा पेशदास्त ही अततररक्त जबाबदारी ददली गेली. ददवंगत आजम खान याचा मुलगा खानजमान याला बेरारचा नाजजम केले गेले व पाच हजारी (३००० स्वार) ददली गेली. हैदराबादचा राजा अबुल हसन याने कवामुदद्दन या दुताबरोबर नऊ लक्ष रुपये, अलं कार व हत्ती असा नजराणा पाठवला. या दताला आल्यावर व तनरोप दे ताना अंगरखे ददले गेले. रुहुल्लाह खानाची पुनर्निंयुक्त़ी करून त्याला दीड हजारी (४०० स्वार) ददली गेली व सहारनपुरचा फौजदार नेमले गेले. तरतबयत खानाला शेख मीर याचा दुसरा मुलगा मुकरमम खान मोहम्मद इशाक याच्या जागी बादशहाच्या लवाजम्याचा दरोगा नेमले गेले. मुकरमम खानाचा िाकटा भाऊ शमशेर खान व मोहम्मद याकूब यांच्या बरोबर मोठे सैन्य दे ऊन त्यांना खापाशच्या खखिंडीजवळ (कोतल) अफगाणांना िडा लशकवण्याचा आदे श ददला गेला. शुक्रवार ११ जून १६७५ / २७ रतब-उल-अव्वल १०८६ ला असे कळले क़ी त्याने शत्रूशी लढाई करून त्यांची घरे लु टली व अनेकांना बंदी केले . एके ददवशी सुरवातीला काही अफगाण आले . त्यांची संख्या कमी होती हे बघून खान त्यांच्यावरती तुटून पडला व सुरवातीला त्यांना पराभूत केले . त्यानंतर डोंगरात लपून बसले ल्या दोन मोठ्ा तुकड्या त्याच्यावर तुटून पडल्या. शमशेर खान व शेख मीर याचा जावई मीर अजीजुल्लाह हे शेवटपयंत लढले व अनेक बादशाही लोकांबरोबर [१४५] त्यांना वीरगती प्राप्त झाली. कुठल्याही ददशेला पाणी ककिंवा रस्ता नसल्यामुळे अनेक घोडे व पायदळाचे लशपाई मरण पावले . आपल्यासाठी हा खूप मोठा पराभव होता व लहानथोर सगळ्यांवरच आपत्ती कोसळली. तो भाग माहीत असले ल्या काही लोकांच्या मदतीने मुकरमम खान व इतर काही वाचले ले सुदैवी लोक बजौरचा ठाणेदार इज्जत खान याच्याकडे गेले. त्याने अफगाणींना अनेकदा हरवले होते व तो ततथे त्याच्या दला सोबत

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

१३८

राहत होता. वाचले ले लोक फारच सुदैवी आहेत असे त्याला वाटले व त्याने त्यांची सवम प्रकारे मदत केली. बादशाहाला त्याच्या सेवकांचे तवशेषतः तरुण शमशेर खान याच्या तनिनाचे फार दुःख झाले व त्याने इज्जत खानाच्या पररश्रमांची प्रशंसा केली. त्याने मुकरमम खानाला दरबारास यायला सांतगतले . मुहतशाम खानाकडे सांत्वन करणारे पत्र व अंगरखा पाठवण्यात आला. सोमवार, १४ जून १६७५ / ३० रतब-उल-अव्वल १०८६ ला बक्षी-उल-मुल्क सरबुलंद खान याला मोठ्ा सैन्यासमेत (सगळे धमळू न ९००० स्वार) व भरपूर युद्धसातहत्य दे ऊन शत्रूशी सामना करायला पाठवले गेले. आघर खानाला जलालाबाद, हजबर खानाला जगदलक, फराक खानाला लमघान तसेच आल्लाहदाद याला घरीबखानाह अशी सवांची ठाणेदार पदी नेमणूक झाली. गरशास्पचा मुलगा सुहराब याला दानक़ी तर खंजर खानाला बंगशात इथला फौजदार नेमले गेले. बादशहाने सुतफद खाकचे नाव बदलू न मुघलाबाद व बाजारक चे फाततहाबाद केले . तफदाई खानाच्या सैन्यातील वाकनतवसाने कळवले क़ी गुरुवार १ जुलै १६७५ / १७ रतब-उस-सानी १०८६ ला खान [१४६] पेशबुलाकहून काबुलकडे तनघाला. खानाने अफगाणांवर आक्रमण करण्यात तसेच त्यांची घरे लु टून उद्ध्वस्त करण्यात कमालीचे पररश्रम घेतले होते त्यामुळे त्याच्या सेवेची प्रशंसा झाली व त्याला आजम खान कोकाह अशी उपािी ददली गेली. गुरुवार, २६ ऑगस्ट १६७५ / १४ जमाद-उस-सानी १०८६ ला बातमी आली क़ी जगदलकचा ठाणेदार हजबर खान याने अफगाणांशी युद्ध केले . तो व त्याचा मुलगा इतर बादशाही सैतनकांबरोबर मारले गेले. बारनगाब व सूरखाबचा ठाणेदार अब्दुल्ला ख्वेशगी त्याचे ठाणे सोडू न पळू न गेला व त्याचे बरेचसे सहकारी मारले गेले ककिंवा पकडले गेले. मंगळवार १९ ऑक्टोबर १६७५ / ९ शाबान १०८६ ला आमीर खानाकडू न पत्र आले क़ी बादशाही सैन्याकडू न पराभव झाल्यानंतर शाहजहानपूर व कांतगोलाह चे आलम, इस्माईल व इतर अफगाणी बंडखोर तकल्ल्यात लपले होते व पकडले गेले. बंगालहून येणाऱ्या इब्रातहम खानासोबत त्यांना दरबारास पाठवण्यात येईल असे त्यात म्हटले होते. बख्तावर खानाने आदे शानुसार बादशाहा व पादशाहजादे यांच्या ज्योततषांकडू न आश्वासने घेतली क़ी ते पुढच्या वषामचे पंचांग करणार नाहीत व तशा अथामचे आदे श इतर प्रांतांना पाठवले गेले.

अध्याय १८

१९ नोव्हेंबर १६७४ ते ८ नोव्हेंबर १६७५

१३९

मुहम्मद सुलतानाचा मीर-इ-सामान मुहम्मद शफ़ी याच्या हवेलीतील तवतहरीत एक टोपली पडली व ती काढण्यासाठी उतरले ली दोन माणसे मेली. ततसरा माणूस मध्यावरून ‘मला बाहेर काढा’ असे ओरडला. एका तासानंतर तो शुद्धीवर आला व म्हणाला क़ी, ‘तवतहरीच्या तळाशी मला एक काळा राक्षस ददसला व भयंकर आवाजात मला [१४७] म्हणाला, तू आत का येत आहेस ? बाहेर पड’. ददल्लीहून बातमी आली क़ी धमझाम हुसैन सफावीची मुलगी कंदहारी महल तहच्या पोटी जन्मले ली शाहजहानची सवामत मोठी मुलगी पुरहुनर बानू बेगम वारली. नाजजम सफ़ी खान व सुभ्यातील इतर अधिकाऱ्यांनी ततच्या तनदे शानुसार बांिल्या गेलेल्या एका थडग्याच्या जागी (बागेत) ततथे पार्थिंव पुरले .

अध्याय १९

९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६

१४०

अध्याय १९ राजवटीचे एकोणणसावे वषम – तहजरी १०८६-८७ ९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६ * * * * ९ धडसेंबर १६७५ / १ शव्वाल १०८६ ला ईद-उल-तफत्र होती. तरबीयत खानाचा मुलगा सैफ खान फक़ीरुल्लाह तनवृत्तीचे आयुष्य सोडू न परत आला. त्याला त्याचे पद परत ददले गेले व एक तवशेष अंगरखा, एक तलवार व मनसब ददली गेली. [१४८] इब्रातहम आददल खानाची मुलगी आणण बहार खान नामक एक तवद्वान यांचा

मुलगा अबुल मोहम्मद, तवजापूरहून भेटीस आला व त्याला एक अंगरखा, तीन हजारी (तततकेच स्वार), खान ही उपािी आणण ६०००० रुपये बक्षीस ददले गेले. त्याच्या भावांना व मुलांना योग्य मनसबी दे ण्यात आल्या. शुक्रवार, १७ धडसेंबर १६७५ / ९ शव्वाल १०८६ ला तबहारच्या आमीर खाननी भेट घेतली, त्याच्या जागी तरबीयत खानाची तनयुक्त़ी झाली. रतववार २ जानेवारी १६७६ / २५ शव्वाल १०८६1 ला शेख तनजाम याने तकश्तवारच्या राजाची मुलगी बाई फूपदे वी तहचा तववाह मुहम्मद सुलतान याच्याशी लावून ददला.

बादशहा हिन अब्दालहून ददल्लीला परततो गुरुवार २३ धडसेंबर १६७५ / १५ शव्वाल १०८६ ला हसन अब्दाल हून परतीचा प्रवास सुरू झाला. पतहला पडाव कालाबाघ इथे होता. वाटे वर अनेक दठकाणी लशकार करत बादशहा लाहोरच्या बागेत शुक्रवार २१ जानेवारी १६७६ / १५ जजल्कदा १०८६ ला पोहोचला. ततथला प्रमुख अधिकारी अमानत खान यांने येऊन भेट घेतली. शुक्रवार, २६ नोव्हेंबर १६७५ / १८ रमजान १०८६ ला अब्दुल वह्हाब ददल्लीला वारल्यामुळे त्याचा मुलगा शेख उल इस्लाम जो ददल्लीचा काझी होता, तो आदे शानुसार दरबारात भेटायला आला व त्याने सैन्याचा काझी हे त्याच्या वधडलांचे पद हाती घेतले . ददवंगत अब्दुल हक़ीम याचा मुलगा, लसयालकोटचा मौलवी अब्दुल्लाह, ज्याच्या अंगी तवद्वत्ता व श्रद्धा याबरोबरच सौजन्यपूणम वागणूक ही होती, त्याला आजवर बादशाहाच्या भेटीचे सौभाग्य

1

इंग्रजी अनुवादात इथे चुकून २७ शव्वाल ददले आहे. फासी पाठात (‫ )بيست و پنجم‬बीस्त व पंजम, म्हणजे २५ शव्वाल ददले आहे.

अध्याय १९

९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६

१४१

धमळाले नव्हते. [१४९] बादशाहा लाहोरला आल्यानंतर त्याला हसन अब्दालहून ततथे यायला सांतगतले गेले. बादशहा ततथे यायच्या आिी दोन-तीन ददवस मौलवी लाहोरला पोहोचला व त्याने बादशहाबरोबर अनेकदा भेट घेतली. त्याला एक अंगरखा, दोनशे मोहरा व एक हत्तीण दे ऊन सन्मातनत केल्यानंतर तो घरी परतला. बाल्खला दत म्हणून गेलेला एक्कताज खान चार वषे व तीन ददवसांनी परतला. त्याने भेट घेतली व त्याला एक अंगरखा ददला गेला. त्याने ११ घोडे, चामड्याच्या वस्तू व एक सुरी सादर केली. सुप्रततधष्ठत मुल्ला औज वजीह याचा भाऊ व सुभान कुली खान याचा दत मुल्ला मोहम्मद तातहर हा एक्कताज खाना बरोबर आला व त्याला एक अंगरखा व ७००० रुपये ददले गेले. लु त्फुल्लाह खानाला फैजुल्लाह खानाच्या जागी तपलखान्याचा दरोगा केले गेले. तुकमताज खानाला एक अंगरखा, एक घोडा, एक भाता व एक म्यान दे ऊन काबुलला पाठवले गेले. शतनवार १९ फेब्रुवारी १६७६ / १४ जजल्हेज १०८६ ला मुहम्मद आजमला मुलतानचा सुभेदार म्हणून पाठवले गेले. ख्वाजा तालीब याने एक अंगरखा, एक रत्नजधडत तलवार, दोनशे अरब, इराक़ी व तुकी घोडे, तलै र व चांदीचा साज असले ले दोन हत्ती व एक कोटी दाम त्याच्या घरी नेऊन ददले . सुलतान बीदर बख्त याला एक अंगरखा, एक घोडा व एक हत्ती ददला गेला. बाल्खचा दत मुल्ला मोहम्मद तातहर याला चार हजार रुपये व गाललचा असले ली एक पालखी [१५०] ददली गेली व त्याच्या सहकाऱ्यांना दोन हजार रुपये ददले गेले. मुहम्मद मुअज्जम याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी धमळाली. त्याला खुजजस्ता अख्तर हे नाव दे ण्यात आले . खुसरो चेला याने एक मोत्यांचा कंठा, एक मोत्यांची टोपी व कापडाचे ५ थान त्याच्याकडे पोहोचवले . ददले र खानाला दख्खन मोतहमेवर एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती व एक रत्नजधडत खंजीर दे ऊन पाठवण्यात आले . घैरत खानला ददवंगत हुसैन बेग खान याच्या जागी जौनपुरचा फौजदार नेमले गेले. इब्रातहम खान तबहारहून आला व भेट घेतली. बुिवार, २९ माचम १६७६ / २४ मुहरमम १०८७ ला बादशाही आदे श काढला गेला, रुहुल्लाह नावाच्या एका अंगरक्षकाने आमीर-उल-उमराकडे एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व मोरांगवरील त्याच्या तवजयाची प्रशंसा करणारे तसेच राशीद खानाच्या जागी त्याला ओरीसाचा सुभेदार म्हणून नेमणूक करणारे फरमान व दोन कोटी दाम बक्षीस पोहोचवले . त्याच्या दताला ही अंगरखा धमळाला. मुल्ला औज वजीह जो तनवृत्त झाला होता त्याला परत एक हजारी पद ददले गेले. तहम्मत खानाला हसन अली खानाच्या जागी

अध्याय १९

९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६

१४२

अलाहाबादच्या सुभद े ार नेमले गेले व एक अंगरखा आणण एक लक्ष रुपये ददले गेले. अब्दुल रहीम खानाला त्याच्या जागी घुसलखान्याचा दरोगा नेमले गेले तर रुहुल्लाह खानाला त्याच्या जागी अख्ताबेगी म्हणून नेमले गेले. सरबुलंद खानाकडू न काढू न घेतले ली मनसब त्याला परत ददली गेली. अजमेरहून आले ला दाराब खान याने भेट घेतली व त्याला मुल्तफत खानाच्या जागी तोफखान्याचा दरोगा नेमले गेले. सय्यद अहमद खान [१५१] याने अजमेरला त्याची जागा घेतली. कवामुद्दीन खानाला काश्मीरला सुभेदार

म्हणून पाठवले गेले. पादशाहजादा मोहम्मद सुलतान याला सात लक्ष रुपयांची रत्ने भेट धमळाली. मोहम्मद मुअज्जमला नऊ हजार रुपयाचा रत्नांच्या झुमक्यांचा तुरा व पन्नास हजार रुपयांची एक रत्नजधडत पहुंची भेट धमळाली. अब्दुल रशीद खान1 याला बादशाही सैन्याने याच वषी जजिंकले ल्या कुलबगामचा तकल्ले दार नेमले गेले. हमजा खान याला कल्याणची तकल्ले दारी, इरीज खानाला खान जमान याच्या जागी इरीजपूरची फौजदारी, तहमास्प खान याला मआसूम खानाच्या जागी आरपनवाराची फौजदारी ददली गेली. बादशाहाला कळले क़ी माळव्याचा नाजजम इस्लाम खान ज्याला खानजहान बहादुर कोकलताश याच्या हाताखाली काम करण्यासाठी नेमले होते तो मंगळवार, १३ जून १६७६ / ११ रतब-दुस-सानी १०८७ ला तबनीच्या पथकाबरोबर उभा होता. युद्धाचे पारडे कोणाच्याही बाजूला झुकले नव्हते, त्यावेळी दारूगोळ्याची दारू सवांना ददली जात असताना अचानक ततने पेट घेतला. त्यामुळे तबथरले ला त्याचा हत्ती एकदम शत्रूच्या गोटात लशरला. शत्रूच्या सैन्याने हौद्याचे दोर कापून त्याला खाली पाडले आणण तो व त्याचा मुलगा अली बेग खान यांचे तुकडे केले गेले. त्याचा सवामत मोठा मुलगा अफ्रासैब खान याचा बादशहाने सन्मान केला व त्याला पाच सदीची (तततकेच स्वार) वाढ दे ऊन [१५२] अडीच हजारी (१५०० स्वार) ददली गेली. त्याचा िाकटा मुलगा मुख्तार बेग याला

तीन सदी (२०० स्वार) अशी वाढ धमळाली व तो एक हजारी (४०० स्वार) झाला. तीन लक्ष रुपये, दोन हजार अशरफ़ी व इतर वस्तू अशी इस्लाम खानाची जी मालमत्ता उज्जैन व सोलापूरहून सरकार जमा केली होती ती त्याच्या मुलांना परत ददली गेली व त्यांच्या वधडलांची दे णी यातून फेडावी असा आदे श दे ण्यात आला. रतववार, २४ सप्टें बर १६७६

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘अब्दुर रसूल खान’ म्हटले आहे. फासी पाठात तळटीप दे ऊन ‘अब्दुल रशीद खान’ (‫ )عبدالرشيد خان‬असे म्हटले आहे.

अध्याय १९

९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६

१४३

/ २६ रज्जब १०८७ ला इस्लाम खानाच्या मृत्यूमुळे मुहम्मद अकबराला माळव्याचा सुभेदार म्हणून पाठवले गेले व त्याला बालाबंद असले ला एक तवशेष अंगरखा, माणकाचा लशरपेच, सोन्याचा साज असले ले दोन अरबी व इराक़ी घोडे व एक हत्ती ददला गेला. मुल्ला मुहम्मद तातहर या दताला तनरोप दे ताना एक हत्ती, दहा हजार रुपये व एक रत्नजधडत आसा दे ण्यात आली. मंगळवार, ३ ऑक्टोबर १६७६ / ५ शाबान १०८७ ला सुलतान मुईझुद्दीनचा तववाह धमझाम मुकरममखान खान सफावी याच्या मुलीची करण्यात आला. त्याला चहारकब सतहत एक अंगरखा, १०००० रुपयांचा मोत्यांचा कंठा, १०००० रुपयांची स्मरणी व तलै र असले ला हत्ती ददला गेला. पलं गतोश खान बहादुर याच्या लग्नाच्या ददवशी त्याला एक अंगरखा, एक पाचूचा लशरपेच, सोन्याचा साज असले ला एक घोडा व चांदीचा साज असले ला एक हत्ती ददला गेला. सुलतान कुली याला खान ही उपािी धमळाली व मीर कुल मुबाररज खान याच्या जागी इस्लामाबाद मथुरेची फौजदारी ददली गेली. रतववार, ८ ऑक्टोबर १६७६ / १० शाबान १०८७ ला आसद खानाला प्रमुख वजीर नेमले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा व ५००० रुपयांची रत्नजधडत दौत ददली गेली. [१५३] रतववार, १५ ऑक्टोबर १६७६ / १७ शाबान १०८७ ला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला अनेक थोर सेनापती बरोबर दे ऊन व तोफखाना, खजजना व सामग्री दे ऊन तसेच शाह आलम बहादुर ही उपािी, अध्याम बायांचा एक तवशेष अंगरखा, दोन लक्ष रुपयांची रत्ने, रत्नजधडत साज असले ल्या तलवारी, रत्नजधडत साज व नक्काशी1 केले ली खोगीर असले ले तीन चांगले अरबी, इराक़ी व तुकी घोडे व एक लक्ष अशरफ़ी दे ऊन काबुलच्या मोतहमेवर पाठवले गेले. सुलतान मुईझुद्दीनला एक अंगरखा, रत्नजधडत कलगी व लशरपेच, सोन्याचा साज असले ला कोह-इ-रज्म नावाचा घोडा, मुलाम्याचा साज असले ली तलवार, चांदीचा साज असले ला हत्ती, एक िनुष्य व भाता ददला गेला. सुलतान मुहम्मद अजीम याला एक अंगरखा, एक कलगी, एक लशरपेच व एक स्मरणी ददली गेली. सुलतान दौलताफ्जा याला माणकाचे लोलक ददले गेले. सुलतान खुजजस्ताह अख्तर याला पाचूचे कडे ददले गेले. आमीर खान, सैफ खान, राजा रामससिंह व इतर नामदारांना भेटवस्तू दे ऊन सन्मातनत केले गेले. मुघल खानाला त्याच्या अडीच

1

इंग्रजी अनुवादात अथे ‘wrought saddle’ म्हटले आहे पण फासी पाठात ‘बा जीन-एّ नक्काशी’ (‫ش‬ ٔ ‫ )با زين نقا‬म्हणजे ‘नक्षीकाम केले ली खोगीर’ असा उल्ले ख आहे.

अध्याय १९

९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६

१४४

हजारी (१४०० स्वार) वरून पदच्युत केले गेले. मुहतशाम खानाला सहारणपूरची फौजदारी धमळाली. हसन अली खानच्या जागी आलाहाबादची सुभद े ारी घेण्यासाठी तहम्मत खान लगबगीने ततथे गेला. कयामुद्दीन खानाचा मुलगा मोहम्मद शूजा इराणहून आला व त्याने भेट घेतली. त्याला एक हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. अक़ील खानाने राजीनामा दे ऊन तनवृत्ती घेतल्याने त्याला वार्षिंक बारा हजार रुपयाचा भत्ता मान्य केला गेला. इब्राहीम खानाने [१५४] त्याच्या मनसबीचा राजीनामा दे ण्यासाठी अजम केला होता तो स्वीकारला गेला. इब्फ्तकार खानाला बंगशातचा फौजदार नेमले गेले. शुक्रवार २७ ऑक्टोबर १६७६ / २९ शाबान १०८७1 ला बादशाहा जामा मलशदीतून परत येत असताना होडीतून उतरून तख्त-ए-रवां मध्ये बसणार होता तेव्हा गुरु तेग ससिंग च्या एका नतद्रष्ट लशष्याने दोन तवटा फेकल्या ज्यापैक़ी एक तख्तापयंत पोहोचली. अंगरक्षकांनी त्याला अटक केली व त्याला कोतवालाकडे सुपूतम करायचा आदे श ददला गेला.

बादशाहा लाहोरहून ददल्लीला परततो गुरुवार, २४ फेब्रुवारी १६७६ / १९ जजल्हेज १०८६ ला बादशहाने लाहोर सोडले . ददले र खानाचा मुलगा कमालु द्दीन याला खान ही उपािी दे ण्यात आली. २१ फेब्रुवारी १६७६ / १६ जजल्हेज १०८६ ला मुहम्मद सुलतानाची पत्नी दोस्तदार बानू बेगम रुस्तम खान याच्या सराई मध्ये वारली. सोमवार, २७ माचम १६७६ / २२ मुहरमम १०८७ ला बादशाहा ददल्लीस पोहोचला. शतनवार, २४ जून १६७६ / २२ रतब-उस-सानी १०८७ ला राजा रामससिंह आसामहून परतला व भेट घेतली. ददवान-ए-आमच्या चौकात बादशाहा घोड्यावर बसत असताना एका अजमदाराने त्याच्या ददशेने एक काठी फेकली. ती बादशहाच्या छत्रीच्या पलीकडे जाऊन पडली. त्या माणसाला कोतवालाकडे ददले गेले.

1

इंग्रजी अनुवादात इथे रमजान मतहना ददला आहे, पण ही शाबान मतहन्यातील ततथी असण्याची शक्यता अधिक आहे. फासी पाठात इथे (‫‘ )بيست و نهم‬बीस्त व नहम’ म्हणजे २९ असे म्हटले आहे पण या आिीची नोंद शाबान मतहन्यातील आहे व २९ शाबान हे इंग्रजी अनुवादात ददले ल्या २७ ऑक्टोबर शी जुळते.

अध्याय १९

९ नोव्हेंबर १६७५ ते २७ ऑक्टोबर १६७६

१४५

टे हळणी करायला पाठवले ल्या लोकांनी पूणम पांढऱ्या रंगाचे हररण दाखवले . गुरुवार, १३ जुलै १६७६ / १२ जमाद-उल-अव्वल १०८७ ला लसतपहर शुकोह व झुब्दतुस्त्न्नसा बेगम यांना मुलगा झाला. त्याला आला तबार हे नाव ददले गेले. ५ ऑगस्ट १६७६ / ५ जमाद-उस-सानी १०८७ ला [१५५] मुहम्मद सुलतानला मुलगा झाला, त्याचे नाव मसाऊद बख्त ठे वण्यात आले . बुिवार, ३० ऑगस्ट १६७६ / १ रज्जब १०८७ ला मुहम्मद सुलतान याचे लग्न दौलताबादी महलच्या भावाच्या मुलीशी केले गेले. शुक्रवार १ सप्टें बर १६७६ / ३ रज्जब १०८७ ला मुहम्मद अकबर याचे लग्न मुराद कुली घक्कर याचा मुलगा आलाह कुली याच्या मुलीशी करण्यात आले . बादशाहाला कळले क़ी खानजहान बहादुरचा मुलगा मुहम्मद मुहसन नळदुगमच्या लढाईत मरण पावला होता. गुरुवार १९ ऑक्टोबर १६७६ / २१ शाबान १०८७ ला जामा मलशदीतून परत आल्यानंतर बादशहा घोड्यावर बसत असताना एक नीच माणूस तलवार उगारून पुढे आला. अंगरक्षकांनी त्याला अटक केली. मुकरमम खानाच्या बोटाला लहानशी जखम झाली. गुजब म दामरांना त्याला मारून टाकायचे होते पण बादशहाने त्यास मनाई केली, त्याला अिाम रुपया रोज दे ऊन रणथंबोरला तुरुंगात पाठवले गेले. बुिवार २५ ऑक्टोबर १६७६ / २७ शाबान १०८७ ला जामा मलशदीच्या पायऱ्यांवर एक पाणक्या बादशाहाच्या समोर आला व बादशाहाला ‘सलाम आलै कुम’ म्हणाला. त्याला कोतवालाकडे दे ण्याचा आदे श झाला.

अध्याय २०

२८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७

१४६

अध्याय २० राजवटीचे तवसावे वषम – तहजरी १०८७-८८ २८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७ * * * * बादशहाने रमजानचा मतहना उपास करण्यात व प्राथमनेत घालवला. बरेच ददवस, तवशेष करून त्या मतहन्याच्या सतरा तारखेपासून तो ददवस-रात्र घुसलखान्याच्या मलशदीत गेला व ततथे [१५६] न्यायसभा भरवली. सोमवार, २७ नोव्हेंबर १६७६ / १ शव्वाल १०८७ ला ईद-उल-तफत्र झाली. अख्तर-ए-औज-ए-जलाल शाह आलम बहादुर याच्याकडे चाळीस हजारी (२५००० स्वार) होती, त्याला पाच हजार स्वारांची वाढ धमळाली. पादशाहजादा मुहम्मद आजमकडे पंिरा हजारी (९००० स्वार) होती, त्याला पाच हजारी जात अशी वाढ धमळाली. पलं गतोश खान बहादुरकडे एक हजारी (५०० स्वार) होती, त्याला ५०० (२०० स्वार) अशी वाढ धमळाली. मीर कुल इततकाद खान याच्याकडू न त्याची मनसब काढू न घेतली होती, त्याला पुन्हा दोन हजारी (१००० स्वार) ददली गेली. सय्यद मुतमजा खानाचा मुलगा सय्यद मुस्तफा याला पाच सदी (१०० स्वार) धमळाली. सोमवार, २७ नोव्हेंबर १६७६ / १ शव्वाल १०८७ ला रुहुल्लाह खान अश्रफ खानाच्या जागी खान-ए-सामान म्हणून तनयुक्त झाला. पलं गतोश खान बहादुर याने मूखमपणाने स्वतःवर सुरीचा वार केला, त्याची मनसब पाच सदी (२०० स्वार) ने कमी करण्यात आली. कामगार खान कडू न त्याची मनसब काढू न घेण्यात आली. मुल्ला औज वजीह हा आघाडीचा तत्त्ववेत्ता वारला. तो समरकंद मिील अखलसकतचा होता. मीर औज ताशकंदी याच्याकडे लशक्षण घेताना तो त्याच्या बरोबरच्या मुलांच्या पुढे असायचा. बाल्ख मध्ये काही ददवस लशक्षकाचे काम केल्यानंतर बादशहा शहाजहानच्या राजवटीच्या तेराव्या वषी तो दरबारात आला आणण छावणीचा मुफ्ती म्हणून काम सुरू केले . औरंगजेबाच्या राजवटीत त्याने बादशाही सैन्याचा िममशास्ता म्हणून काही काळ काम केले व दुष्कृत्यांचे दमन करण्यासाठी त्याने आिीच्या सवम पदाधिकाऱ्यांपेक्षा खूप जास्त पररश्रम घेतले होते. [१५७] उरले ले आयुष्य त्याने लशकवण्यात घालवले व सवम नामदार त्याला खूप सन्मानाने वागवत असत.

अध्याय २०

२८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७

१४७

बादशाहाची भेट घेण्यासाठी मुलतानहून येत असले ला पादशाहजादा मुहम्मद आजम आग्रहाबादला पोहोचला. तेव्हा माह बानूने बादशाहाच्या वतीने त्याच्यासाठी पानदाणी, खवानचा, दोघरा, ररकाबी व हररताश्म असले ली एक दगडी थुंकदाणी या वस्तु नेल्या. मंगळवार, १६ जानेवारी १६७७ / २२ जजल्कदा १०८७ ला त्याला बादशाहाची भेट घेता आली व त्याला लशरपेचासतहत एक अंगरखा, इतर तवशेष वस्त्रे व नऊ घोडे दे ण्यात आले . सुलतान बीदर बख्त व लसकंदर शान यांना प्रत्येक़ी पाच हजार रुपयांचे दोन लशरपेच ददले गेले. शतनवार, १७ फेब्रुवारी १६७७ / २४ जजल्हेज १०८७ ला शाह आलम बहादुर याला मुलगा झाल्याची बातमी घेऊन त्याचा एक सेवक धमझाम बेग १००० मोहरा घेऊन आला. मुलाचे नाव मुहम्मद हुमायून ठे वण्यात आले . पादशाहजाद्यासाठी एक रत्नजधडत लशरपेच व सुलतानासाठी (नातू) एक रत्नजधडत टोपी व मोत्यांचा कंठा त्याच्या बरोबर पाठवण्यात आला. सोमवार, १९ माचम १६७७ / २४ मुहरमम १०८८, शाह आलम बहादुरच्या लशफारसीनुसार आमीर खान याला आजम खान कोकाहच्या जागी काबुलचा सुभेदार नेमले गेले. बक्षी-उल-मुल्क सरबुलंद खान याला हररताश्म असले ली दगडी दौत ददली गेली. सोलापूरचा तकल्ले दार मनोहरदास याने राजा उपािी धमळावी म्हणून पंन्नास हजार रुपये सादर केले . बादशाहाने ते मान्य केले . शुक्रवार, १३ एतप्रल १६७७ / १९ सफर १०८८, पादशाहजादा मुहम्मद आजम याला तरतबयत खानाच्या जागी तबहारचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा, खंजीर, लशरपेच, कलगी, दोन घोडे व पाच कोटी दाम बक्षीस ददले गेले. तरतबयत खानाला हादी खानाच्या जागी ततरहुत व दरभंगा याचा फौजदार नेमले गेले. दाराब खानाला रुहुल्लाह खानाच्या जागी मीर तुझुक नेमले गेले. [१५८] मुकरमम खानाला अब्दुर रहीम खानाच्या जागी गुजब म दामरांचा दरोगा नेमले गेले. सय्यद खानाला इब्फ्तकार खानाच्या जागी बंगशतचा फौजदार व खान जमान याला जाफराबाद बीदरचा सुभद े ार व तकल्ले दार नेमले गेले. शाह बेग खान त्याच्या सुदैवाने भारतात आला. भेट घेतल्यावर त्याला एक तवशेष अंगरखा, सोन्याची मूठ व मोत्याचा इलाका असले ला खंजीर, रत्नजधडत जजघा, सोनेरी फुले जडवले ली ढाल, एक हत्तीण व पाच हजार रुपये रोख ददले गेले. सात पदाथम व पावाची तीन तबके तसेच गाललचा घातले ली पालखी त्याच्या घरी पाठवण्यात आली. त्याला दीड हजारी (२०० स्वार) ददली गेली. रामससिंहचा मुलगा तकशनससिंह काबुलहून आला व भेट घेतली. त्याला घरी जाण्यासाठी चार मतहन्यांची सुट्टी ददली गेली. ददवंगत सआदुल्लाह खानाचा मुलगा

अध्याय २०

२८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७

१४८

इनायतुल्लाह याला हक़ीम मुहम्मद मुहासन याच्या जागी शातगदम पेशाहचा बक्षी नेमले गेले. हसन अली खानला आग्र्याचा सुभेदार नेमले गेल्याचे फमामन एका गुजब म दामराने त्याच्याकडे नेले. उम्दत-उल-मुल्क आसद खानाचा मुलगा मुहम्मद इस्माईल याचा तववाह अमीर-उल-उमरा शातहस्ता खान याच्या मुलीशी झाला. त्याला एक अंगरखा, झगमगीत साज असले ला एक घोडा व इततकाद खान ही उपािी ददली गेली. त्याने स्वतःची कलगी व सेहरा आणला होता. बादशाहाने स्वतःच्या हाताने तो घेत सुलतान लसतपहर शुकोहला त्याच्या डोक्यावर ठे वण्यास ददला. कामयाब खानाला मुहतशाम खानाच्या जागी सहारणपूरचा फौजदार नेमले गेले व मुहतशाम खानाची फुलाद खानाच्या जागी धमवातला तनयुक्त़ी झाली. हमीद खानाला सय्यद अहमद खानाच्या जागी अजमेरचा सुभद े ार नेमले गेले. ख्वाजा नआमतुल्लाह याने बुखाऱ्याच्या राजाचे पत्र आणले होते, त्याला ४०० रुपये दे ण्यात आले . खंबायतच्या बंदराचा मुत्सद्दी मुहम्मद कालसम खान [१५९] याची धघयासुद्दीन खानाच्या जागी सुरतेला नेमणूक झाली. काम बक्षला कुराणाचे पाठांतर पूणम केल्याबद्दल एक अंगरखा, सोन्याचा साज असले ले दोन घोडे, एक रत्नजधडत लशरपेच, एक मोत्यांचा कंठा, रत्नजधडत फुले जडवले ली ढाल, िनुष्य व भाता आणण िनुष्यपेटी1 ददली गेली. खानाहजाद खानाला आलाह यार खानाच्या जागी गझनीनचा ठाणेदार नेमले गेले व आला यार खानाला खानाहजाद खानाच्या जागी काबुलचा तकल्ले दार नेमले गेले. आजम खान कोकाह याला अमीर-उल-उमराच्या जागी बंगालचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर, ५०० मोहरा ककिंमतीचा व सोन्याचा साज असले ला घोडा ददला गेला. इनायत खानाला तकफायत खानाच्या जागी खालशाचा पेशदास्त नेमले गेले. मुघल खानाला पदच्युत केले होते त्याला त्याची मनसब परत दे ऊन बंगालला पाठवण्यात आले .

पादशाहजादा मुहम्मद िुलतानािा मृत्यू पादशाहजाद्याला गंभीर आजाराने ग्रासले होते. तो अशक्त होऊन काही ददवस पलं गावरच पडू न होता. रतववार, ३ धडसेंबर १६७६ / ७ शव्वाल १०८७ ला [१६०]

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘a quiver and a bow-case’ असे म्हटले आहे पण फासी पाठात ُ ‘तीरकश बा कमान व तकरबान मुबाही’ (‫ )تركش با کمان و قربان مبایه‬असे ददले आहे, म्हणजे िनुष्य (स्टा. १०४७), भाता (स्टा. २९६) व िनुष्य ठे वण्याची उत्कृष्ट पेटी (स्टा. ९६३).

अध्याय २०

२८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७

१४९

बादशाहाला मलार येथील त्याच्या लशकारीच्या वाड्यावर असताना त्याच्या तनिनाचे वृत्त कळले . इतका िैयमशाली असूनही ही वाताम कळल्यावर बादशाहा रडला. त्याला ख्वाजा कुतबुद्दीनच्या दग्यामजवळ पुरून संपूणम कुराणाचा पाठ करावा व त्याच्या आत्म्यासाठी दान करावे असा आदे श खान-ए-सामान रुहुल्लाह खान, लसआदत खान, अब्दुर रहीम खान, शेख तनजाम व मुल्ला मुहम्मद याकूब यांना दे ण्यात आला. त्याचा जन्म १६३९ / १०४९ मध्ये झाला होता व मृत्यू समयी तो ३८ वषम १० मतहन्याचा होता. मुहम्मद अकबर याचे पत्र आले क़ी शतनवार, २३ धडसेंबर १६७६ / २७ शव्वाल १०८७ ला त्याने उज्जैन मध्ये प्रवेश केला होता. लसतपहर शुकोहचा मुलगा सुलतान आला तबार मरण पावला व त्याला दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. रतववार, २८ जानेवारी १६७७ / ४ जजल्हेज १०८७ ला शाहजहानची (पत्नी) अकबराबादी महल तहचा मृत्यू झाला. नकदींना आठ व सात मतहन्यांचा पगार दे ण्याचे रद्द करून केवळ सहाच मतहन्यांचा पगार द्यावा आदे श बक्षी-उल-मुल्क सरबुलंद खान याला ददला गेला. शुक्रवार, ३० माचम १६७७ / ५ सफर १०८८ ला बादशाहाला कळले क़ी बंगाल येथे तनयुक्त केले ल्या फैजुल्लाह खान याला एका सेवकाने खंजीराने भोसकून मारले . मंगळवार, ३ एतप्रल १६७७ / ९ सफर १०८८ ला पादशाहजादा मुहम्मद आजमचा मुलगा लसकंदर शान मरण पावला. खान जहान बहादुर याचे पत्र आले क़ी सोमवार, १४ मे १६७७ / २१ रतब-उलअव्वल १०८८ ला बादशाही सैन्याने नळदुगम जजिंकला. ९ जून १६७७ / १७ रतब-उस-सानी १०८८ ला ददवंगत सुलतान मुहम्मद याचा मुलगा सुलतान [१६१] मसाऊद बख्त मरण पावला. उजैनहून बातमी आली क़ी तकशनससिंह हाडा पादशाहजादा अकबर याची भेट घेण्यासाठी आला आहे. मानाची वस्त्रे पररिान करताना पादशाहजाद्याशी अचानक त्याचा काहीतरी खटका उडाला व त्याने स्वतःला भोसकून आत्महत्या केली. त्याच्या चार सेवकांना मारण्यापूवी त्यांनी (पादशाहजाद्याचे) पंिरा लोक मारले . शतनवार, ४ ऑगस्ट १६७७ / १४ जमाद-उस-सानी १०८८ ला पादशाहजादा मुहम्मद आजम पाटण्याला पोहोचला. बुिवार1, १५ ऑगस्ट १६७७ / २५ जमाद-उस-सानी १०८८ ला शाह आलम बहादुर काबुलला पोहोचला. कुतबुद्दीन खान व राजा इंद्रमान बुंदेला मरण पावले . अब्दुर रहमान खानाला कळवले गेले क़ी खान जहान बहादुरला दरबारास बोलावले आहे तसेच

1

इंग्रजी अनुवादात इथे गुरूवार ददले आहे. पण तप.जं. प्रमाणे या ददवशी बुिवार होता.

अध्याय २०

२८ ऑक्टोबर १६७६ ते १७ ऑक्टोबर १६७७

१५०

नवीन सुभद े ार तनयुक्त होईपयंत ददले र खानाला त्याच्या उपदे शाने कारभार चालवायचा आदे श ददला गेला आहे. उम्दत-उल-मुल्क आसद खान याला मोठे सैन्य व भरपूर सामग्री सतहत दख्खनला पाठवण्यात आले .

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५१

अध्याय २१ राजवटीचे एकतवसावे वषम – तहजरी १०८८-८९ १८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८ मंगळवार, ३० ऑक्टोबर १६७७ / १३ रमजान १०८८ ला पादशाहजादा अकबर उजैनहून आला व भेट घेतली. त्याला अध्याम बायांचा अंगरखा, एक बालाबंद व पाच घोडे ददले गेले. [१६२] रतववार, १८ नोव्हेंबर १६७७ / २ शव्वाल १०८८ ला ईदउल-तफत्रच्या दुसऱ्या ददवशी बादशाहा ससिंहासनावर बसला. (राज्याणभषेक-वषमपूती) समारंभातील परंपरेनुसार उपब्स्थतांना अत्तर व पानसुपारी दे ण्यात आली. बादशाहाने सजावटीसाठी वापरले ल्या काही वस्तु काढायचा आदे श ददला व बक्षी-उल-मुल्क सफ़ी खान याला म्हणाला क़ी, ‘हा समारंभ मी स्थतगत करतो आहे. अमीर-उल-उमरा ने पाठवले ल्या भेटवस्तू परत करा तसेच इतर नामदारांनी मला कोणत्याही भेटवस्तू दे ऊ नका. कारकुनांनी चांदीच्या ऐवजी धचनी मातीच्या ककिंवा मुलामा ददले ल्या दगडाची दौत वापरावी. जी इनामाची रक्कम आजवर चांदीच्या ताटावर दरबारात आणली जात असे ती यापुढे ढालींवर आणावी. ज्या लोकांकडे घट्ट पायजमे1 नसतील त्यांनी (पायात) मोजे घालू न यावे. खखलतखान्यात फुलांचे भरतकाम करताना सोने ककिंवा चांदी वापरण्याऐवजी कापड वापरावे. चंदेरीला असले ली दो दामीची (अततशय तरल कापड) वखार बंद करण्यात यावी. सोने व चांदीच्या अवैि कठड्यांऐवजी हररताश्माचा सोन्यात बसवले ला कठडा करावा. आग्रहाबाद व नूरबारी वगळता इतर कुठल्याही शाही बागेत गुलाबाचे वाफे लावू नयेत. चार सदी वरील कुठल्याही मनसबदाराने परवानगी लशवाय पक्क्या घराचे बांिकाम सुरू करू नये’. (वाढीव मातहती) ‘बादशाही महालात आणल्या जाणाऱ्या सोन्याच्या व चांदीच्या िूपदाण्या काढू न टाकाव्यात’. सोमवार, २६ नोव्हेंबर १६७७ / १० शव्वाल १०८८ ला काम बक्ष याला आठ हजारी (२००० स्वार) धमळाली व त्याला एक तुमान तुघ, तनशाण, नगारे, छत्री, ३० घोडे

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘drawers as are sanctioned by the canonical law’ असे ददले ٔ आहे. फासी पाठात ‘पायजामा-ए-शरीयी’ (‫ع‬ ٔ ‫ )پايجامه س‬असे ददले आहे. शरीयी म्हणजे ‘वैि’ ककिंवा ‘योग्य’ पण हा शब्द पायजमा या शब्दाबरोबर आला तर त्याचा अथम घट्ट असा घ्यायचा आहे. (स्टा. ७४१).

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५२

व १५ हत्ती ददले गेले. [१६३] पादशाहजादे व दरबारातील तसेच प्रांतातील नामदारांना थंडीची वस्त्रे दे ण्यात आली. बुिवार, २८ नोव्हेंबर १६७७ / १२ शव्वाल १०८८ ला इब्रातहम खानाला कवामुद्दीन खानाच्या जागी काश्मीरचा सुभद े ार नेमले गेले. इततकाद खानाचा मुलगा मुहम्मद यार खान याला खखदमतगार खानाच्या जागी सोन्याच्या तवभागाचा दरोगा नेमले गेले. सजावर खानाला कनौजचा फौजदार नेमले गेले. पागेचा मुश्रीफ मुहम्मद नईम याला काम बक्षचा बक्षी नेमले गेले. बाल्खचा राजा सुभान कुली खान याच्या बतहणीचा मुलाचा, म्हणजे ख्वाजा पारसा याचा मुलगा ख्वाजा बहाउद्दीन तवलायतेहून (दरबारास) आला व त्याला एक अंगरखा, १४००० रुपये रोख व एक रत्नजधडत खंजीर ददला गेला. ख्वाजा खखदमत खानाला इततकाद खानाच्या जागी जवातहर बाजाराचा दरोगा नेमले गेले. मुघल खानाला रुहुल्लाह खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले. मुनव्वर खानाला शुभकणम बुंदेल्याच्या जागी राथ, माहोबा व जलालपूर खबदपचा फौजदार नेमले गेले. आलमगीरनाम्याचा ले खक मुहम्मद काजजम याला तवक्ऱी तवभागाचा दरोगा नेमले गेले. सरबुलंद खानाचा मुलगा नजाबत खान, याची बहीण माही बेगम1 वारली. नामदार खानाने नजाबत खानाला दुखवट्याची वस्त्रे दे ण्यासाठी बादशाहाकडे आणले . सोमवार, १५ एतप्रल १६७८ / ३ रतब-उल-अव्वल १०८९ ला सय्यद मुतमजा खान मरण पावला. तो उच्च कुळात जन्मला होता, दानशूर व वीर होता व त्याच्या सैतनकांना [१६४] चांगला पगार दे ऊन थाटात ठे वायचा. त्याच्या मृत्यूच्या आिी बादशाहाने बख्तावर खानाला चोकशी करण्यासाठी पाठवले होते. खानाने सय्यदची तवनंती बादशाहाकडे आणली ती अशी, ‘माझ्या िन्याच्या सेवेत माझा प्राण जावा अशी माझी आशा होती. पण तसे झाले नाही याचे मला दुःख आहे. इतर लोक बादशाहाला सोने व रत्ने दे तात. मला तर माझ्या प्राणांच्या बदल्यात बादशाहाला (शत्रूंच)े काही प्राण अपमण करायचे होते. त्याचा बादशाहाला काही उपयोग होऊ शकला असता’. सय्यदच्या मृत्यूनंतर त्याच्या सेवेतील हजारी पासून ते ८० ची मनसब असले ल्या अधिकाऱ्यांपयंत सवांना बादशाही सेवेत घेतले गेले व पायदळातील लोकांनाही कारखान्यांमध्ये काम ददले गेले.

1

इंग्रजी अनुवादात तहचे नाव ‘Ai Begam’ असे ददले आहे पण फासी पाठात या दठकाणी तळटीप दे ऊन ‘माही’ (‫مایه‬ ٔ ) अशी शुद्धी सुचवली आहे.

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५३

गुरूवार, १८ एतप्रल १६७८ / ६ रतब-उल-अव्वल १०८९ ला शेख अब्दुल अजीज वारला. दोनच ददवसांपूवी बख्तावर खानाने ले खकाला (मला) बादशाही आदे श घेऊन त्याकडे पाठवले होते क़ी त्याच्या दे खभालीत कसलीही कसूर होऊ नये व त्याची इच्छा असेल तर बादशाहा त्याच्यावर उपचार करण्यासाठी युनानी वैद्य पाठवायला तयार होता. मी गेलो तेव्हा तो पलं गावर टे कून बसला होता व काव्य ललखाणात मग्न होता, त्याचे काही लशष्य मीर हादी, मुहम्मद सईद इजाझ व इतर त्याचे शब्द ललहून घेत होते. बादशाहाचा संदेश ऐकल्यावर तो ले खकाला म्हणाला क़ी, ‘माझा कुठल्याही उपचार पद्धतीवर तवशेष लोभ नाही पण मला या लोकांच्या (दरबारातील युनानी वैद्यांच्या) पुस्तक़ी ज्ञानावर तवश्वास नाही. त्यांच्यापैक़ी कोणी जर बोलावण्यास योग्य असेल तर माझी काही हरकत नाही. मी अब्दुल मललक याला माझा वैद्य तनवडले आहे व त्याचे ज्ञान, धचतकत्सा, अनुभव व तववेक यावर माझा तवश्वास आहे. आयुष्य वाढवण्यासाठी एवढा सगळा त्रास घ्यावा इतकेही जीवनाचे मोल नाही. पाणी डोक्यावरून जाते तेव्हा बुडणे क्रम प्राप्त आहे’. मी हे बख्तावर खानाला सांतगतल्यावर त्याने ते ललहून घ्यायला व नंतर बादशाहाला वाचून दाखवायला सांतगतले . बादशाहा [१६५] खानाला म्हणाला, ‘तवद्वानांतील तवद्वानाने हे म्हटले आहे यावर तुझा तवश्वास बसणार नाही. आपल्या कमांचा

न्याय ईश्वर करणार आहे या तवचारातून आपल्याला वाटणाऱ्या भीतीचा जन्म होतो’. लु त्फुल्लाह खानाला त्याच्या (शेख अब्दुल अजीज) जागी अजम-ए-मुकरमर चा दरोगा नेमले गेले. अशरफ खानाला लु त्फुल्लाहच्या जागी वातकयाखवानी ददली गेली. मुहम्मद यार खानाला इमामवदीच्या जागी कारखान्याचा दरोगा नेमले गेले व इमामवदीला सहारणपूरचा फौजदार नेमले गेले. मुहसन खानाला मुहम्मद अली खानाच्या जागी धचनीखान्याचा दरोगा नेमले गेले. सोमवार, ८ जुलै १६७८ / २८ जमाद-उल-अव्वल १०८९ ला हमीद खान दरबारास आला व त्याला दुखवट्याची वस्त्रे ददली गेली तसेच त्याच्या ददवंगत तपत्याच्या जागी खासचौक़ीचा दरोगा म्हणून त्याची तनयुक्त़ी झाली. इब्फ्तकार खान त्याच्या जागी अजमेरला गेला. कवामुद्दीन खान काश्मीरहून दरबारास आला व त्याला अंगरखा ददला गेला. अब्दुर रहीम खानाला मुघल खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले. बादशाहाने कृपावंत होऊन लु त्फुल्लाह खानाला पालखीतून तकल्ल्यात प्रवेश करण्याची अनुमती धमळाली.

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५४

दख्खनच्या बातमीदाराकडू न कळाले ही ददले र खानाचे गोळकोंड्याच्या सैन्याशी तुंबळ युद्ध झाले , एका अग्ग्नबाणाने एक हत्ती मेला, खानाचा हत्ती एका गोळ्याने जखमी झाला व खानामागे बसले ला हत्तीचा माहूत एका अग्ग्नबाणाने मारला गेला, त्याची आग खानाच्या अंगरख्यापयंत पोहोचली होती पण त्याने पखालीतील पाण्याने ती तवझवली. खानाकडील तसेच शत्रूकडील अनेक लोक मारले गेले. तो लढत व त्याच्या सैन्याला वाचवत संध्याकाळी छावणीत पोहोचला. रतववार, २० जानेवारी १६७८ / ६ जजल्हेज १०८८ ला शाह आलम बहादुर काबुलहून आला व बादशाहाची भेट घेतली. त्याला एक तवशेष अंगरखा व एक रत्नजधडत जजघा धमळाली. त्याची मुले व हाताखालचे नामदार [१६६] यांनाही अंगरखे व रत्ने धमळाली. २४ जानेवारी १६७८ / १० जजल्हेज १०८८ ला बादशाहा ईद-उज-जुहाच्या नमाजासाठी मलशदीत गेला. बुिवार, ८ मे १६७८ / २६ रतब-उल-अव्वल १०८९ ला त्याला लसवाच्या मुंगीपटणवरील आक्रमणाबद्दल कळले . सुरतेच्या बातमीदाराने कळवले क़ी एका घोडीने तीन पायांच्या घोड्याला जन्म ददला होता. त्याचा ततसरा पाय छातीजवळ होता व तो ततन्ही पायांनी चालत होता. ख्वाजा सलीह नक्शबंदी याच्या भावाचा मुलगा ख्वाजा याकुब, याचा तववाह मुराद बक्षच्या मुलीशी केला गेला. बादशाहाने त्याला एक अंगरखा, सोन्याच्या साजाचा एक घोडा, हररताश्म असले ली जजघा, चार हजार रुपये रोख व एक हत्तीण ददली. प्रथम सरबुलंद खानाने नवरदे वाला बेगम सातहबाच्या घरापाशी अणभवादनासाठी नेले. नंतर अकबराबादी मलशदीत लग्न लावले गेले. मेहरसाठी दोन लक्ष रुपये दे ण्याचे ठरले . सुलैमान शुकोहच्या मुलीचे लग्न ख्वाजा पारसाचा मुलगा ख्वाजा बहाउद्दीन याच्याशी केले गेले व त्यालाही तसाच मान धमळाला. कुत्ब-इ-आलमचा (ददवंगत) उत्तराधिकारी सय्यद मुहम्मद, याचा मुलगा तसेच सद्र-उस-सद्र रजावी खान याच्या मुलाचा मुलगा व जावई सुलतानुद्दीन याला अहमदाबादला जाताना एक अंगरखा, एक हत्तीण व १००० रुपये ददले गेले. सोमवार, २९ एतप्रल १६७८ / १७ रतब-उल-अव्वल १०८९ ला कवामुद्दीन खानाला लाहोरचा सुभद े ार म्हणून व कामगार खानाला रहमत खानाच्या जागी बयुतात म्हणून नेमले गेले. ततथे खूप मान असले ल्या घौस-उल-आजम याचा मुलगा सय्यद

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५५

मुहम्मद तबजापुरी दरबारास आला व त्याला वार्षिंक ६००० रुपये भत्ता ददला गेला. शुक्रवार, ५ जुलै १६७८ / २५ जमाद-उल-अव्वल १०८९ ला पादशाहजादा अकबर याला मुलतानचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा, एक मोत्यांचा कंठा, माणकाचे लोलक, [१६७] सोन्याच्या साजाचे दोन घोडे, एक हत्ती व तलै र ददले गेले. सफ़ी खानाला त्याच्या हाताखाली नेमले गेले व अब्दुर रहीम खानाला त्याचा सहाय्यक म्हणून तनयुक्त केले गेले. क़ीरतससिंहाच्या मुलीचा तववाह शाहजादा मुहम्मद अजीम याच्याशी करण्यात आला, ६३००० रुपये, रत्ने, सोन्याचा चौदोल, एक पालखी व चांदीच्या कठड्याच्या पाच डोल्या हुंड्यात ददल्या गेल्या. लग्नाच्या ददवशी शाहजाद्याला एक तवशेष अंगरखा, एक मोत्यांचा कंठा व एक रत्नजधडत कलगी ददली गेली. मुख्तार खानाचा मुलगा कमरुद्दीन याला खान ही उपािी धमळाली. आददल खान तबजापुरी कडू न आकरा लक्ष रुपयांचा नजराणा धमळाला. अमीर-उल-उमरा शातहस्ता खान बंगालहून आला व त्याने खलबत-खान्यात भेट घेतली. त्याला एक उत्कृष्ट अंगरखा, मुलाम्याचा साज, इलाका व हररताश्माची मूठ असले ला खंजीर तसेच सोन्याच्या साजाची िूप ददली गेली. बादशाहाने स्वतःच्या हातात नेलेली हररताश्माची आसा दे ऊन त्याचा सन्मान केला. अमीर-उल-उमराचा नजराणा तीस लक्ष रुपये रोख व चार लक्ष रुपयांचे रत्नालं कार असा होता. त्यात एक आरसा ही होता ज्याच्यासमोर कसलिंगड ठे वले क़ी ते कोरडे पडायचे व त्यातून पाण्याचे थेंब गळायचे. दुसरी एक पेटी होती ज्याच्या एका बाजूस (खेळातील) हत्ती बांिला होता तर दुसऱ्या बाजूस एक बकरी. त्या हत्तीला ती पेटी खेचता येत नव्हती पण ती बकरी त्या पेटीला व ततच्या बरोबर त्या हत्तीलाही खेचत न्यायची. अमीर-उलउमरा याला त्याच्या तवनंतीनुसार, दरबारातील नामदारांच्या महत्त्वाकांक्षेचा परमोच्च कबिंद गाठण्याचा सन्मान धमळाला, त्याला घुसलखान्यापयंत पालखीतून येण्याची तसेच शाह आलम बहादुर याच्या नौबती नंतर त्याची नौबत वाजवण्याची अनुमती धमळाली. खान [१६८] आदे शानुसार शाह आलम बहादुर याला भेटायला गेला व त्याला २०० मोहरा व

२००० रुपये सादर केले . आसलिंगनभेट झाल्यावर त्याला पादशाहजाद्याच्या आसनाजवळ बसवले गेले व चहारकब असले ला अंगरखा तसेच हररताश्माची मूठ असले ला खंजीर ददला गेला. रतववार, १६ जून १६७८ / ६ जमाद-उल-अव्वल १०८९ ला अमीर-उलउमराला हसन अली खानच्या जागी आग्र्याचा सुभद े ार म्हणून पाठवले गेले व त्याला एक

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५६

तवशेष अंगरखा व दोन अरबी व इराक़ी घोडे दे ण्यात आले . दख्खनचा बक्षी व वाकनतवस अब्दुर रहमान खान याची खान ही उपािी काढू न घेण्यात आली कारण बहादुर खानाने (तवजपूरच्या)

राजाकडू न घेतले ली रक्कम बातमीत नोंदवताना त्याने बदलली होती.

बहादुर खानाकडू न त्याची सुभद े ारी काढू न घेतल्यावर जेव्हा तो दख्खनहून दरबारात आला तेव्हा त्याने केले ल्या गंभीर अपरािांसाठी व नजराणा गोळा करण्यासाठी केले ल्या जबरदस्तीसाठी त्याचे पद व उपाध्या काढू न घेतल्या होत्या – त्याची संपत्ती, रोख, वस्तु, सामान व हत्ती जप्त केले होते. बादशाहाने नंतर मोठ्ा मनाने या जुन्या सेवकाचे अपराि पोटात घातले व त्याला गुरूवार, २३ मे १६७८ / ११ रतब-उस-सानी १०८९ ला भेटीची अनुमती ददली व त्याचे पद व उपाध्या त्याला परत ददल्या गेल्या. आदे शानुसार आक़ील खानाने (त्याला) शाह आलम बहादुरकडे नेले व त्याने त्याला एक अंगरखा व ७००० रुपयांचा खंजीर ददला. बातमी आली क़ी बंगालचा पदच्युत सुभेदार आजम खान कोकाह तबहारला येणार होता पण शुक्रवार, २४ मे १६७८ / १२ रतब-उस-सानी १०८९ ला तो ढाक्याला वारला. (हे कळल्यावर) नवीन सुभद े ार पादशाहजादा मुहम्मद आजम पाटण्याहून लगबगीने ततथे जायला तनघाला. [१६९] नुरुल्लाह खानाला पादशाहजाद्याचा सहाय्यक म्हणून ओरीसाचा कारभार पाहण्यासाठी नेमले गेले. बादशाहाने मृताचा िाकटा भाऊ खान जहान बहादुर याचे सांत्वन केले व त्याच्या दोन मुलांना अंगरखे ददले गेले. एका गुजमबदामराच्या हाती सलीह खान व मृताच्या इतर मुलांसाठी अंगरखे पाठवले गेले. मृत व्यक्त़ीची संपत्ती – बावीस लक्ष रुपये व १,१२,००० मोहरा – जप्त केली गेली. बुिवार, १८ सप्टें बर १६७८ / ११ शाबान १०८९ पादशाहजादा शाह आलम बहादुर याला दख्खनच्या सुभद े ारीवर पाठवले व त्याला रत्नजधडत बालाबंद असले ला एक तवशेष अंगरखा, एक मोत्यांचा कंठा, एक जजघा, तीन घोडे, सोन्याच्या साजाचा एक हत्ती व एक लक्ष अशरफ़ी रोख तसेच त्याला ददले ल्या मनसबी व्यततररक्त, सहा कोटी दाम या आिीच्या भत्त्यात चार कोटी दाम इतक़ी वाढ केली गेली. त्याच्या मुलांनाही सुयोग्य बढत्या व बक्षीसे ददली गेली व त्याच्या चाकरांना अंगरखे, घोडे व हत्ती ददले गेले. लाहोरचा सुभद े ार कवामुद्दीन खान याला जम्मूच्या फौजदारीचा अततररक्त अधिकार दे ण्यात आला. चंपत बुद ं े ल्यांच्या मुलांना (छत्रसाल व अंगद) िडा लशकवण्यासाठी राजा जसवंतससिंह बुंदेला याला पाठवले गेले.

अध्याय २१

१८ ऑक्टोबर १६७७ ते ६ ऑक्टोबर १६७८

१५७

बादशाहाला कळले क़ी लाहोरमध्ये िान्याचा भाव खूप वाढला होता. त्याने अन्नछत्रांच्या अनुदानात वीस रुपये रोज वाढवायचा आदे श ददला. काबुलहून बातमी आली क़ी बाल्ख व बुखाऱ्याच्या राजांमध्ये युद्ध जुंपले होते व दोन्ही दठकाणी िान्याचे दर इतके वाढले होते क़ी लोक [१७०] मेलेल्या जनावरांचे मांस व इतर तनतषद्ध गोष्टी खाऊ लागले होते. शतनवार, २१ सप्टें बर १६७८ / १४ शाबान १०८९ ला बातमी आली क़ी उम्दत-उल-मुल्क आसद खान बऱ्हाणपुरहून औरंगाबादकडे जायला तनघाला आहे. बख्तान बेग याचा मुलगा जान बेग याला आततश खान ही उपािी धमळाली. इनायत खान व तकफायत खानाने बादशाहाला रतववारी व गुरूवारी ददवाणी कामकाजाचा अहवाल सादर करावा असा आदे श ददला गेला. मुराद बक्ष याची मुलगी व ख्वाजा मुहम्मद सालीह याची पत्नी असैश बानू वारली. शतनवार, ८ जून १६७८ / २७ रतब-उस-सानी १०८९ ला काबुलचा सुभद े ार आमीर खान त्याच्या नेमणुक़ीच्या दठकाणी पोहोचला. जौनपूरहून बातमी आली क़ी बुिवार, २९ मे १६७८ / १७ रतब-उस-सानी १०८९ ला पाऊस पडू लागला. घैरात खान जजथे बसला होता त्या पूवेकडील महालावर वीज कोसळली. सहा लोक मेले व दोघे जण बऱ्याच वेळानंतर शुद्धीवर आले . खानाला पायाला जखम झाली पण तो वाचला. सोमवार, २९ जुलै १६७८ / १९ जमाद-उस-सानी १०८९ ला पादशाहजादा मुहम्मद आजम ढाक्यास पोहोचला. बंगालचा ददवाण शफ़ी खान याने पाठवले ल्या कागदांवरून बादशाहाला कळले क़ी अमीर-उल-उमरा याने त्याच्या वेतनापेक्षा एक कोटी बत्तीस लक्ष रुपये अधिक खचम केले होते. त्याच्याकडू न तततके येणे असल्याची नोंद करावी असा आदे श ददला गेला.

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१५८

अध्याय २२ राजवटीचे बावीसावे वषम – तहजरी १०८९ ७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९ * * * * [१७१] बुिवार, १६ ऑक्टोबर १६७८ / १० रमजान १०८९ ला बंगालच्या ददवाणीवर तनयुक्त केले ल्या मीर मुघीस याला ततथे जाताना पादशाहजादा मुहम्मद आजम याच्यासाठी ३५००० रुपये ककिंमतीचा रत्नजधडत लशरपेच घेऊन जाण्याचा आदे श बादशाहाने ददला. पादशाहजादा काम बक्ष याच्या बाराव्या वाढददवसा तनधमत्त त्याला मोत्यांचा कंठा व रत्नांच्या फुलांनी सजवले ली ढाल ददली गेली. ख्वाजा मुहम्मद सालीह नक्षबंदी याचा शेख मीर (मृत) याच्या मुलीशी तववाह झाला. त्याला एक अंगरखा ददला गेला. धघयासुद्दीन खान याच्या तनिनानंतर त्याचे भाऊ अब्दुर रहीम खान व अब्दुर रहमान खान तसेच त्याचा मुलगा राजजउद्दीन याला दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. बहरामंद खान व शफुमद्दीन यांना त्यांच्या आईच्या तनिनानंतर दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. अबुल मुहम्मद खान तबजापुरी याला तहव्वर खानाच्या जागी अविचा फौजदार नेमले गेले. खंदेलच्या रजपुतांना िडा लशकवण्यासाठी तसेच ततथले भव्य मंददर पाडू न टाकण्यासाठी दाराब खानाला मोठ्ा सैन्यातनशी पाठवण्यात आले . बहरामंद खानाला त्याला सहाय्यक तर ख्वाजा धमझाम याला त्याच्या जागी हत्तींचा दरोगा नेमले गेले. बुिवार, ६ नोव्हेंबर १६७८ / १ शव्वाल १०८९ ला ईद-उल-तफत्र झाली. पेशावरहून बातमी आली क़ी मंगळवार, १० धडसेंबर १६७८ / ६ जजल्कदा १०८९ ला महाराजा जसवंतससिंह मरण पावला. सोमवार, १३ जानेवारी १६७९ रोजी ईद-उज-जुहा झाली. [१७२] बहरामंद खानाला लु त्फुल्लाह खानाच्या जागी मीर बक्षी केले गेले, तातहर खानाला फौजदारी ददली गेली व खखदमतगुजार खानाला ददवंगत महाराजाचे (जसवंतससिंह) घर असले ल्या, जोिपूरचा तकल्ले दार नेमले गेले. शेख अनवर याला आमीन व अब्दुर रहीम याला ततथला कोतवाल नेमले गेले.

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

महाराजा जिवंतसििंह (साभार BnF)

१५९

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६०

बादशाहािा पत्रहला अजमेर प्रवाि गुरूवार, ९ जानेवारी १६७९ / ६ जजल्हेज १०८९ ला बादशाहाने ददल्लीहून अजमेरकडे कूच केले . कामगार खानाला तकल्ले दार, फुलाद खानाला फौजदार व इततमाद खानाला ददल्लीचा ददवाण तनयुक्त केले गेले. शुक्रवार, ७ फेब्रुवारी १६७९ / ६ मुहरमम १०९० ला ददवंगत महाराजा जसवंतससिंह याच्या प्रदे शाचा ताबा घेण्यासाठी खान जहान बहादुर याला हसन अली खान व इतर सरदारांबरोबर पाठवण्यात आले . १४ फेब्रुवारी १६७९ / १३ मुहरमम १०९० ला राजा रामससिंहाचा नातू कुमार तकशनससिंह त्याच्या घरून दरबारास आला व बादशाहाची भेट घेतली. रुहुल्लाह खानाला अब्दुर रहीम खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले. सोमवार, १७ फेब्रुवारी १६७९ / १६ मुहरमम १०९० ला दख्खनला नेमणूक झाले ला उम्दतउल-मुल्क आसद खान याने तकशनगढला येऊन बादशाहाची भेट घेतली. बुिवार, १९ फेब्रुवारी १६७९ / १८ मुहरमम १०९०1 ला बादशाहा अजमेरला पोहोचला. ख्वाजा मुईनुद्दीन याच्या थडग्याला भेट ददल्यानंतर त्याने राजवाड्यात प्रवेश केला. बुिवार, २६ फेब्रुवारी १६७९ / २५ मुहरमम १०९० ला ददवंगत महाराजाच्या दताने कळवले क़ी राजाच्या दोन गरोदर पत्नींना [१७३] लाहोरला पोहोचल्यानंतर काही तासांच्या अंतराने दोन मुले झाली. २८ फेब्रुवारी १६७९ / २७ मुहरमम १०९० ला शातहस्ता खान याने आग्र्याहून येऊन भेट घेतली. रतववार, २ माचम १६७९ / २९ मुहरमम १०९० ला पादशाहजादा आजमचा दत दरबारास आला व त्याने गौहाटी जजिंकल्याची बातमी ददली, त्याला १००० रुपये दे ण्यात आले . बादशाहाने पादशाहजाद्याला दोन लक्ष रुपयांचा ९१ मोत्यांचा हार व २५००० रुपयांचा एक रत्नजधडत लशरपेच ददला. सोमवार, १० माचम १६७९ / ७ सफर १०९० ला पादशाहजादा मुहम्मद अकबर मुलतानहून आला व त्याने भेट घेतली. त्याला अध्याम बायांचा अंगरखा व एक बालाबंद ददला गेला. मुलतानहून बातमी आली क़ी तट्ट् याचा पदच्युत केले ला सुभेदार इज्जत खान पादशाहजादा अकबर याचा सहाय्यक म्हणून मुलतानला गेला होता व सफ़ी खानाने लाहोरकडे कूच केले होते. सय्यद अब्दुल्लाह याला लसवानाहला ददवंगत राजा जसवंतससिंह याची मालमत्ता जप्त करण्यासाठी पाठवण्यात आले . अमीर-उल-उमरा 1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६१

याला आग्र्याला परत पाठवण्यात आले , त्याला एक तवशेष अध्याम बायांचा अंगरखा, एक बालाबंद व एक रत्नजधडत खंजीर ददला गेला. खंदेलच्या रजपूतांना िडा लशकवण्यासाठी पाठवले ल्या दाराब खानने ८ माचम १६७९ / ५ सफर १०९० ला त्यांच्यावर आक्रमण केले व तीनशेच्या वर असले ल्या लोकांनी केले ल्या कडव्या प्रततकाराचा तबमोड केला गेला.

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६२

त्यातून एकही वाचला नाही. खंदेल, सानवेला1 तसेच जवळपासची इतर सवम मंददरे पाडू न टाकण्यात आली. तहव्वर खानाला इब्फ्तकार खानाच्या जागी अजमेरचा फौजदार नेमले गेले. [१७४] बादशाहाने राणा राजससिंह याच्या दतांना त्याचे पत्र सादर करण्याची अनुमती ददली. त्याने तवनंती केली होती क़ी त्याचा मुलगा कुमार जयससिंह याला बादशाहाला मुजरा करायची अनुमती धमळावी. ते मान्य झाले . मुहम्मद नईम याला त्याचे सहाय्य करण्यासाठी नेमले गेले. मंगळवार, १ एतप्रल १६७९ / २९ सफर १०९० ला राव रायससिंह याचा मुलगा इन्द्रससिंह छावणीत गेला व त्याला बादशाहाकडे घेऊन आला. भेटीच्या वेळी कुमार याला एक तवशेष अंगरखा, मोती व पाचूंचा कंठा, हररताश्माची असी, एक रत्नजधडत पहुंची व एक हत्तीण धमळाली. मुरादाबाद येथून आले ला फैजुल्लाह खान व माळव्याहून आले ला मुख्तार खान यांना परत त्यांच्या नेमणुक़ीवर पाठवले गेले. अमानुल्लाह खानाला मुआतमाद खानाच्या जागी ग्वाल्हेरचा फौजदार नेमले गेले. सोमवार, १० माचम १६७९ / ७ सफर १०९० ला बादशाही छावणी अजमेरहून परत ददल्लीकडे तनघाली व बुिवार, २ एतप्रल १६७९ / १ रतब-उल-अव्वल १०९० ला ततथे पोहोचली. इस्लामचे राज्य सगळीकडे पसरवणे तसेच कातफरांच्या चालीरीती उखडू न टाकणे हा एकमेव हेतु समोर ठे वून या िार्मिंक बादशाहाने बुिवार, २ एतप्रल १६७९ / १ रतब-उल-अव्वल १०९० ला, उच्च ददवाणी अधिकाऱ्यांना आदे श ददला क़ी, ‘जोवर ते लीनतेने जजझया भरत नाहीत तोवर’ हा कुराणाचा तनदे श, तसेच शरीयाच्या परंपरेनुसार, राजिानी व सवम प्रांतातील कातफरांकडू न (जझम्मी) जजझया कर गोळा करावा. तत्कालीन अनेक प्रामाणणक तवद्वान (जजझया गोळा करण्याच्या) या कामासाठी नेमले गेले. ईश्वराला तप्रय असणाऱ्या तसेच प्रसन्न करणाऱ्या गोष्टी त्याच्याकडू न (बादशाहाकडू न) करवून घेण्यासाठी त्याने त्याला उद्युक्त करावे व त्याच्या वतममानापेक्षा त्याचे भतवष्य उज्वल करावे (हीच सददच्छा). [१७५] रतववार, १३ एतप्रल १६७९ / १२ रतब-उल-अव्वल १०९० ला

पादशाहजादा मुहम्मद अकबर याला लाहोरला पाठवले गेले व त्याला अध्याम बायांचा तवशेष अंगरखा, एक भाता, एक िनुष्यपेटी, सोन्याच्या साजाचे दोन घोडे, एक रत्नजधडत

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘Sanula’ ददले आहे. फासी पाठातही तसेच आहे पण तळटीपेत सानवेला (‫ )سانويله‬अशी शुद्धी सुचवली आहे.

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६३

लशरपेच व एक मुत्तका ददला गेला. मुहम्मद जमान लु हानी याला खान ही उपािी ददली गेली व शाह बेग खान काशघरी याला अब्दुल्लाह खान ही उपािी धमळाली. इब्फ्तकार खान व इतरांचा सन्मान करून झाल्यावर ते पादशाहजाद्याला सामील झाले . शतनवार, १९ एतप्रल १६७९ / १८ रतब-उल-अव्वल १०९० ला राण्याचा मुलगा कुमार जयससिंह याला एक अंगरखा, एक मोत्यांचा कंठा, माणकाचे लोलक, रत्नजधडत लशरपेच सोन्याची झालर असले ला अरबी घोडा व एक हत्ती दे ऊन परत पाठवण्यात आले . राणा राजससिंह यांस एक फमामन, अंगरखा, रत्नजधडत लशरपेच व २०००० रुपये पाठवले गेले. रतववार, २५ मे १६७९ / २४ रतब-उस-सानी १०९० ला जोिपूरची दे वळे पाडू न व स्वतः काही गाड्या भरून मूती घेऊन खान जहान बहादुर बादशाहाच्या भेटीकरता आला. बादशाहाने त्याची भरपूर प्रशंसा केली. त्याने आणले ल्या बहुतांश मूती रत्नजधडत होत्या. बादशाहाने आदे श ददला क़ी दरबारासमोरील जजलोखाना तसेच जामा मलशदीच्या पायऱ्यांखाली त्या पुराव्यात म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय त्यावर पडत राहतील. काही काळ त्या तशाच रातहल्या व शेवटी त्यांची नावेही उरली नाहीत. सोमवार, २६ मे १६७९ / २५ रतब-उस-सानी १०९० ला राव रायससिंह याचा मुलगा व अमरससिंहाचा नातू इन्द्रससिंह याला त्याचा काका जसवंतससिंह याच्या जागी जोिपूरचा उत्तराधिकारी नेमून त्याला राजा ही उपािी, एक तवशेष अंगरखा, सोन्याचा साज असले ली तलवार, [१७६] सोन्याचा साज असले ला घोडा, एक हत्ती, तनशाण, तुघ व नगारे ददले गेले. त्याने छत्तीस लक्ष रुपयांचा नजराणा ददला जो मोठ्ा मनाने मान्य झाला. पूवीच्या बादशाहांनी मोठ्ा राजांच्या कपाळावर स्वतःच्या हाताने दटळा लावण्याची परंपरा जपली होती. या राजवटीत आसद खान आदे शानुसार राजा रामससिंह याच्या कपाळावर दटळा लावत असे. आता ही प्रथा बंद केली गेली व फक्त तसलीम करणे (वाकून अणभवादन) पुरेसे असल्याचे सांतगतले गेले. आक़ील खानाला सफ़ी खानाच्या जागी बक्षी-ए-तान नेमले गेले. मंगळवार, २४ जून १६७९ / २५ जमाद-उल-अव्वल १०९० ला बनी मुख्तार (कुळातील)1 दाराब खान

1

‘बनी’ हे ‘इब्न’ चे अनेकवचन आहे, म्हणजे मुले (स्टा. २०४). ‘मुख्तार’ म्हणजे तनवडले ला, नेमले ला, सवमश्रेष्ठ (स्टा. ११९३). फासी पाठात तळटीपे त ददले आहे क़ी, ‘मआलसर-उल-उमरा’

या ग्रंथात दाराब खानाचा उल्ले ख खुरासान प्रांतातील सब्जवारचा रतहवासी, सादात बनी मुख्तार

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६४

वारला. त्याचा भाऊ जानलसपार खान, मुले मुहम्मद खलील, मुहम्मद ताक़ी व मुहम्मद कामयाब आणण जावई लश्करी यांना दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. रुहुल्लाह खानाला त्याच्या जागी मीर-आततश पद ददले गेले व बहरामंद खानाला रुहुल्लाह खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले तसेच इततकाद खानाला बहरामंद खानाच्या जागी अहदींचा बक्षी नेमले गेले. पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमच्या सैन्यातून बातमी आली क़ी शारजा खान तबजापुरी याने त्याची भेट घेतली. बादशाहाने त्याला रुस्तम खान ही उपािी ददली व त्याच्या नावे एक पत्र, अंगरखा, घोडा, हत्ती, तनशाण व नगारे पाठवले गेले. राजा जसवंतससिंह याचा काबुलला मृत्यू झाला तेव्हा त्याला एकही मुलगा नव्हता. राजाचे तवश्वासू सेवक [१७७] सोनंग, रघुनाथदास भट्टी, रणछोड, दुगामदास व इतर यांनी बादशाहाला कळवले क़ी त्यावेळी गरोदर असले ल्या त्याच्या दोन पत्नी लाहोरला पोहोचल्यानंतर दोघींना प्रत्येक़ी एक मुलगा झाला आहे. ही बातमी ददल्यानंतर (राजाची) मनसब व राज्य (दोघांपैक़ी) एकाला द्यावे अशी तवनंती या सेवकांनी केली. बादशाहाने आदे श ददला क़ी दोघा मुलांना त्याच्याकडे पाठवले जावे व ते मोठे झाल्यावर त्यांना मनसब व राज्य ददले जाईल. या कोत्या मनाच्या लोकांनी ददल्लीला आल्यावरही त्यांची तवनवणी नेटाने लावून िरली. त्यावेळी दोघांपैक़ी एका मुलाचा मृत्यू झाला. ही नीच माणसे दुसऱ्या मुलाला व दोन्ही राण्यांना घेऊन जोिपूरला जाऊन उठाव करणार आहेत हे जेव्हा बादशाहाला कळले तेव्हा त्याने मंगळवार, १५ जुलै १६७९ / १६ जमादउस-सानी १०९० ला रूपससिंह राठोडच्या वाड्यात राहणाऱ्या दोन्ही राण्या व मुलाला पकडू न नूरगडला ठे वायचा आदे श ददला. फुलाद खान कोतवाल, सय्यद हमीद खान याच्या खास चौक़ीतले लोक, दाऊद खानाचा मुलगा हमीद खान, ददले र खानाचा मुलगा कमालु द्दीन खान, ख्वाजा मीर (ज्याला सलाबत खान उपािी ददली होती) व ददवंगत पादशाहजादा सुलतान मुहम्मद याच्या घोडदळातील सेवकांना आदे श ददला गेला क़ी या नीच लोकांना त्यांची पातक़ी योजना तडीस नेण्यापासून रोखा [१७८] व मूखमपणा करत जर त्यांनी प्रततकार केला तर त्यांना चांगल्या प्रकारे िडा लशकवा. नेमले ल्या अधिकाऱ्यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला पण त्या नीच कातफरांनी उन्मत्तपणे

(म्हणजे सय्यद कुळातील), मुख्तार खानाचा मुलगा असा आहे. प्रेतषत मुहम्मदाच्या वंशजांसाठी ‘सादात’ (सैय्यद चे अनेकवचन) शब्द वापरतात (स्टा. ६३९).

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६५

तलवार उगारली व अनेक बादशाही लोकांना मारल्यानंतर बचाव करणाऱ्यांपैक़ी बरेचसे मारले गेले. बादशाही सैतनकांनी जेव्हा रजपूतांना कात्रीत पकडले तेव्हा पुरुषांच्या वेषात ततथे आणले ल्या दोन्ही राण्यांना त्यांनी मारून टाकले व एका दि तवक्रेत्याच्या घरी लपवले ल्या दुसऱ्या मुलाला ततथेच सोडू न सगळे पसार झाले . फुलाद खानाला दुसऱ्या मुलाबद्दल मातहती धमळाली होती. त्याने त्याला ततथून ताब्यात घेतले व दरबारात आणले . त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला अटकेत असले ल्या राजाच्या सेतवकांना दाखवण्यात आले व तो राजाचाच मुलगा असल्याचे त्यांनी सांतगतले . नंतर त्याला झेबुस्त्न्नसा बेगमच्या जनानखान्यात ततच्या सेवकांच्या हाती दे ण्यात आले व मुहम्मदी राज असे नाव ददले गेले. दुसऱ्या ददवशी खानाने त्या मुलाचे अलं कार वगैरे हस्तगत केले . या िामिुमीत राजा, दोन राण्या व इतर रजपूत यांची मालमत्ता लु टारूंनी नेली होती. बादशाही कारकूनांच्या [१७९] हाती जे लागले ते बैत-उल-माल मध्ये भरणा करण्याचा आदे श दे ण्यात आला. दोन राण्या, रजपूत सरदार रणछोड व इतर तीस सरदारांची डोक़ी मोजली गेली. बादशाही अधिकाऱ्यांच्या हातून जे वाचले ते जोिपूरला बुिवार, २३ जुलै १६७९ / २४ जमादउस-सानी १०९० ला पोहोचले . राजा जसवंतससिंह याची दोन मुले, रणथंब (जो वारला) व दुसरा अजजतससिंह, यांच्या जागी तोतये बसवून दुगामदास व इतरांनी लोकांना धचथावणी दे ऊन गडबड सुरू केली. जोिपूरचा फौजदार तातहर खान, याने या पळपुट्यांना पकडण्यासाठी फार काही केले नाही म्हणून त्याला पदच्युत करून त्याची खान ही उपािी काढू न घेण्यात आली. दे शाचा कारभार सांभाळायला व ही बंडाळी मोडू न काढायला अयोग्य असले ल्या इन्द्रससिंह याला दरबारास बोलावले गेले. रतववार, १७ ऑगस्ट १६७९ / २० रज्जब १०९० ला बादशाहाने खखज्राबादच्या बागेला भेट ददली. रजपूतांकडू न जोिपूर घेण्यासाठी सरबुलंद खानाला एक मोठे सैन्य दे ऊन पाठवले गेले. शतनवार, २३ ऑगस्ट १६७९ / २६ रज्जब १०९० ला बादशाहाला कळले क़ी राजाचा एक सरदार राजससिंह राठोड याने स्थातनक लोकांचे मोठे सैन्य उभारून अजमेरचा फौजदार तहव्वर खान याचा सामना केला. तीन ददवस तुंबळ युद्ध झाले . गोळ्या व बाणांच्या वषामवानंतर हातघाईची लढाई झाली. दोन्ही बाजूंच्या मृतांचे ढीग तयार झाले होते. शेवटी तहव्वर खानाला यश धमळाले [१८०] व राजससिंह अनेक लोकांबरोबर नरकात

अध्याय २२

७ ऑक्टोबर १६७८ ते २५ सप्टें बर १६७९

१६६

गेला. बादशाही सैन्य इतक्या वीरश्रीने लढले क़ी रजपूत यानंतर परत किीही लढायला आले नाहीत आणण वाळवंटात ककिंवा ओसाड प्रदे शात लपून रातहले . शुक्रवार, २९ ऑगस्ट १६७९ / २ शाबान १०९० ला मुहम्मद अकबर लाहोरहून आला व भेट घेतली. ख्वाजा तहम्मत याने एक अंगरखा व ७७००० रुपयांची तवशेष रत्ने त्याच्या घरी पोहोचवली.

बादशाहा दुिऱ्यांदा अजमेरला जातो बुिवार, ३ सप्टें बर १६७९ / ७ शाबान १०९० ला बंडखोरांना िडा लशकवायला बादशाही छावणी तनघाली. त्या ददवशी मुहम्मद अकबर याला पालमहून अजमेरला पाठवले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा, एक बालाबंद व सात घोडे ददले गेले. त्याच्या हाताखालच्या लोकांनाही बणक्षसे धमळाली. इततमाद खान बऱ्हाणुद्दीन ददल्लीचा ददवाण झाला. मीर तहदायतुल्लाह बक्षी व वाकनतवस झाला. आफलातून तकल्ले दार, अब्दुल्लाह चलपी बयुतात, काझी अब्दुल वह्हाबचा मुलगा नूर-उल-हक काझी, ददवंगत काझीचा जावई अबु सैद न्यायालयाचा दरोगा झाला व इतर अधिकाऱ्यांना तवतवि पदांवर नेमन ू पाठवण्यात आले . [१८१] मंगळवार, ९ सप्टें बर १६७९ / १३ शाबान १०९० ला अमीरउल-उमरा याला पादशाहजादा मुहम्मद आजम याच्या जागी बंगालचा सुभेदार नेमले गेले व सफ़ी खानाला आग्र्याचा सुभेदार. गुजब म दामरांच्या हाती त्यांच्या करता अंगरखे व फमामने पाठवली गेली. मंगळवार, १६ सप्टें बर १६७९ / २० शाबान १०९० ला धमवातचा फौजदार मुहतशाम खान याने बादशाहा दौडत असताना भेट घेतली. गुरूवार, २५ सप्टें बर १६७९ / २९ शाबान १०९० ला बादशाहाने शेख मुईनुद्दीनच्या थडग्याला भेट दे ऊन ततथे ५००० रुपये ददल्यानंतर, आनासागर तलावाच्या शेजारी असले ल्या जहांगीरी महालात प्रवेश केला.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१६७

अध्याय २३ राजवटीचे तेतवसावे वषम – तहजरी १०९०-९१ २६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८० बादशाहाने रमजानचा पूणम मतहना प्राथमनेत घालवला. शुक्रवार, २६ सप्टें बर १६७९ / १ रमजान १०९० रोजी आलाहाबादचा सुभेदार तहम्मत खान याने भेट घेतली व त्याला तातडीने पादशाहजादा मुहम्मद अकबर याच्या हाताखाली नेमले गेले व एक तवशेष अंगरखा व सोन्याच्या साजाचा एक घोडा ददला गेला. पादशाहजाद्याला दे ण्यासाठी पाचूचा रंगीत लशरपेच त्याच्याकडे ददला गेला. २ ऑक्टोबर १६७९ / ७ रमजान १०९० ला शाहजादा मुहम्मद अजीम याला क़ीरतससिंह याच्या मुलीपासून एक मुलगा झाल्याच्या पत्रासोबत ४०० मोहरा सादर केल्या गेल्या. [१८२] मुलाचे नाव मुहम्मद करीम ठे वले गेले. ४ ऑक्टोबर १६७९ / ९ रमजान १०९० ला ददले र खानाकडू न पत्र आले क़ी

ّ

ّ ‫)از‬ मंगळवेढ्याचा तकल्ला राक्षसी लसवा कडू न जजिंकून (‫ترص ِف سيوای جهنیم برامد‬ घेतला आहे. रतववार, २६ ऑक्टोबर १६७९ / १ शव्वाल १०९० ला ईद-उल-तफत्र झाली. * * * लसवाचा तकल्ला घेतल्याबद्दल सुजनससिंहाच्या नावे प्रशस्ती करणारे फमामन पाठवण्यात आले . अहमदाबादचा सुभेदार हाफ़ीज मुहम्मद आमीन खान याने भेट घेतली. त्याचा व त्याच्या साथीदारांचा सन्मान केला गेला. फकार खानाला अंगरखा दे ऊन ददल्लीला पाठवले गेले. तहव्वर खानाला एक अंगरखा, भाता, िनुष्य व एक हत्ती दे ऊन मंडल व इतर परगणे हस्तगत करायला पाठवले गेले. इन्द्रससिंहाला कनिंबजचा, रघुनाथससिंहाला लसवानह व िामाण आणण मुहाकमससिंह मर्तिंया याला पूर गावाचा ठाणेदार नेमले गेले. २४ नोव्हेंबर १६७९ / १ जजल्कदा १०९० ला मुहम्मद अकबर याच्याकडू न पुत्रप्राप्ती झाल्याचे पत्र व ९०० मोहरा धमळाल्या, मुलाचे नाव नेकुलसयार ठे वले गेले.

बादशाहािे अजमेरहून उदयपूरकडे कूि राण्याला िडा लशकवण्यासाठी रतववार, ३० नोव्हेंबर १६७९ / ७ जजल्कदा १०९० ला बादशाहा अजमेरहून तनघाला. पादशाहजादा अकबर याने मेरत्याहून येत दे वराई येथे भेट घेतली. [१८३]

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१६८

मुहम्मद आजमिी बंगालहून वेगवान िाल बादशाहाच्या आदे शाचे पालन करण्यासाठी अनेक अडथळे पार करत, इतके लांब अंतर कापत जाणे या पादशाहजाद्याचे वैलशष्ठ् होते. त्याच्या बरोबर असले ल्या तवश्वासू लोकांनी सांतगतले क़ी मध्यरात्री नंतर पादशाहजादा पालखीत गेला व झोपला. मुस्तफा काशी, लोहरास्प बेग, कालसम बेग व त्यांसारखे तीन चार अधिकारी त्याच्या सोबत आळीपाळीने थांबले होते. सूयोदयापासून ते मध्यान्ह होईपयंत तो घोड्यावर जात असे म्हणजे तो खाली उतरायचा तेव्हा त्याच्या बरोबर दोन ककिंवा तीन लोकांपेक्षा जास्त कोणी नसायचे. हळू हळू इतर लोकही येऊ लागले . त्याने सामान, जनाना व कारखाने मीर हादीकडे सोपवले व पाटण्याला १००० स्वार त्याच्या मागे येण्याचा आदे श दे ऊन ठे वले . पाटण्याहून बनारसला ते सात ददवसात आले तेव्हा त्याच्या बरोबर जहानझेब बानू बेगम होती. बनारसला मीर खान व शाह कुली खान बक्षी यांना २००० स्वारांच्या सुरक्षेत ततला (जहानझेब) मजल दरमजल करत नेण्याचा आदे श ददला गेला. ते ददल्लीला पंचवीस ददवसात पोहोचले तर पादशाहजादा लांब पल्ले पार करत बनारसहून बारा ददवस तीन तासात पोहोचला व मंगळवार, १६ धडसेंबर १६७९1 / २३ जजल्कदा १०९० ला भेट घेतली. त्या ददवशी त्याने सत्तर कोस2 प्रवास केला. एके ददवशी तो जेव्हा एका मरतुकड्या घोड्यावर बसला होता [१८४] तेव्हा तो कालसम बेगला म्हणाला, ‘माझा भाता मला जड वाटतोय’, खान म्हणाला, ‘हा सेवक तो काढू न घेईल’. पादशाहजाद्याने तवचारले , ‘तुझ्या भात्याचे तू काय करशील ?’ तो उत्तरला, ‘तुमचा भाता मी माझ्या पाठीवर बांिेन’, व त्याने तसे केले . त्याच्या बरोबर पाचशे

खुशअस्पा स्वार होते व अनेकांना घोडे भेट म्हणून धमळाले होते. बारा स्वार, चार जण

1

२२ ऑक्टोबर १६७९, “पादशाहजादा सुलतान आजम शहरातून ६ तारखेला तनघाला आहे व १२ तारखेला त्याने राजमहलकडे कूच केले हे सांगणारे १३ तारखेचे ढाक्याहून आले ले पत्र

2

धमळाले ” - फोटम सेंट जॉजम, डायरी व कन्सल्टे शन बुक १६७९ यातील हूगली रोजतनशीतील नोंद. एक कोस सािारणपणे २ मैल ककिंवा ३.२ तकमी मानले जाते. म्हणजे एका ददवसात त्याने २२४ तकमी प्रवास केला असा याचा अथम तनघतो.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१६९

पायी, एक चोबदार, एक अंतर मोजणारा (जरीबकश) व दोन वेळ मोजणारे (घधडयाली) जे कायम उपब्स्थत होते, हे सवम पादशाहजाद्या बरोबर आले . एकदा प्रवासात जेव्हा पादशाहजादा व त्याचा मुलगा बीदर बख्त ईश्वराच्या कृपादृष्टीखाली घोड्यावर स्वार होते तेव्हा शाहजादा बीदर बख्तला तहान लागली. ते एका गावातल्या तवतहरीपाशी पोहोचले , ततथल्या पाणक्याने त्यांना पाणी ददले व पादशाहजाद्याने त्याला दोन अश्रफ़ी ददल्या. एका चोराने ते पातहले व त्याला वाटले क़ी हा बऱ्याच अशरफ़ी घेऊन जाणारा गुजब म दामर आहे. त्याने त्याची वाट अडवली व सेवकांना पुढे न येण्याची चेतावनी ददली. पादशाहजाद्याने त्याचे काही ऐकले नाही व सेवकही थांबले नाहीत. तो नीच अंगावर िावून आला तसा पादशाहजाद्याने त्याच्या छातीत बाण मारला. तो ततथेच पडला व परत उठला नाही. सगळे सेवक त्यांच्या वाटे ने पुढे गेले. पादशाहजाद्याची सावली सारखी पाठराखण करणारा एक अधिकारी सुहराब बेग ततथे पोहोचला व त्याने तो बाण ओळखला. [१८५] त्याने त्याचे मुंडके छाटले व बाण काढू न पादशाहजाद्याला गाठण्या करता दौडत पुढे गेला. त्याने तो बाण दाखवला व अजम करण्यासाठी खालील ओळी म्हणाला – दुमदुमेल चहू ददशेस आपुली क़ीती, भेदली शराने जशी शत्रुची छाती या प्रसंगानंतर काही दोन, चार आण्याची सोन्याची व चांदीची नाणी तसेच कवड्याही त्याच्या खखशात ठे वाव्यात असा पादशाहजाद्याने आदे श ददला. अनेक पडावांना शाह आलम बहादुरच्या जहागीरीतले अधिकारी व इतर नामदार घोडे, ऊंट व खेचरे चढ्या ककिंमतीला तवकत घेऊन ते आणत तसेच हलवान कोंबडे घेऊन येत असत. पण मालबूरच्या1 काझीचा अपवाद वगळता, लशजवले ले अन्न कुठे ही धमळत नव्हते. त्यामुळे तो (शक्यतो) कोरडा पाव, सुकामेवा व भाजले ला सातू खात असे. एकदा शाहजाद्याने खखचडी खायची इच्छा व्यक्त केली. म्हणून सेवकांनी सराईत जाऊन ती लशजवली व एका ताटलीत ककिंवा लाकडी कटोऱ्यात ती घेऊन आले . दोघे बाप ले क भुकेले होते पण पादशाहजाद्याने एकदा त्याकडे बघता त्याला ती खायचा आदे श ददला. त्याला ती नकोशी वाटत होती. ‘ईश्वर ईच्छे ने दोन तीन ददवसातच आपल्याला बादशाही स्वयंपाकघरातील अन्न धमळे ल’ असे म्हणून त्याने त्याची समजूत काढली.

1

इंग्रजी अनुवादात इथे मालपूर म्हटले आहे पण फासी पाठातील तळटीपेत मालबूर आहे.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७०

१७ धडसेंबर १६७९ / २४ जजल्कदा १०९० ला बीदर बख्त याला आठ हजारी (२००० स्वार) धमळाली. आतबद खानाला कुलीच खान ही उपािी धमळाली. शतनवार, ३ जानेवारी १६८० / ११ जजल्हेज १०९० ला बादशाहाने मंडलहून कूच केले [१८६] तेव्हा कळले क़ी राणाच्या लोकांनी दे बारीची खखिंड सोडू न ददली आहे. हातफज मुहम्मद आमीन खानाने कळवले क़ी त्याचे काही सेवक टे कडी चढू न गेले व पातहले क़ी पलीकडची बाजूही मोकळीच होती. (बहुतेक) राणाने उदयपूर सोडू न पलायन केले होते. ४ जानेवारी १६८० / १२ जजल्हेज १०९० ला बादशाहाने खखिंडीत छावणी टाकली. हसन अली खानाला त्या कातफराच्या मागावर पाठवले गेले. पादशाहजादा मुहम्मद आजम व खान जहान बहादुर यांना उदयपूर पाहण्याची अनुमती धमळाली. त्या काळातील अत्यंत दुर्मिंळ इमारतींपैक़ी असले ले व घृणास्पद उपासकांची संपत्ती तसेच आयुष्याचा तवनाश होण्यास जे मुख्यतः कारणीभूत होते ते राणाच्या महालासमोरचे मंददर पाडण्या करता रुहुल्लाह खान व एकत्तज खान गेले. मंददरात बसले ल्या वीस माचातोर1 रजपूतांनी आत्माहुती द्यायचे ठरवले . आिी त्यांच्यातील एक जण बाहेर आला, त्याने काही सैतनकांना मारले व नंतर तो मारला गेला. असे एक एक करत सगळे वीस जण मारले जाईपयंत त्यांनी तकत्येक बादशाही लोकांना मारले . बादशाही सैन्यातील मृतांमध्ये इखलास नावाचा एक तवश्वासू दास ही होता. मंददर ररकामे झाले . बेलदार व तबरदारांनी मूती फोडल्या ( ‫بيلداران‬

‫)و یتنداران تصوير را شکستند‬. बादशाहाच्या छावणी भोवती कघलचीं बरोबर पहारा दे ण्यासाठी मीर लशहाबुद्दीन याला नेमले असताना, त्याचे दै व बलवत्तर असल्यामुळे बादशाहाने त्याला बोलावले व म्हणाला क़ी, ‘हसन अली खान त्या कातफराच्या मागावर खखिंडीत गेल्याला काही ददवस झाले परंतु त्याची काही बातमी आली नाही. तू जाऊन काय ते बघ’. जराही वेळ न घालवता काही कघलचींना बरोबर घेऊन आदे शाची पूतमता करण्यासाठी तो तनघाला. त्या दे शातील पररब्स्थती त्याला मातहत नसताना, [१८७] उच-सखल भाग, तवतवि रस्ते तसेच लु टारूंची भीती असे सगळे असताना ही सुदैवाने तो खानाच्या सैन्यापाशी पोहोचला. त्याने बातमी घेतली, खानाकडू न पत्र घेऊन त्वररत तनघाला व दोन

1

माचातोर रजपूत हे सतत गांजाच्या प्रभावाखाली असत पण युद्ध करण्यासाठी मात्र सदै व तत्पर असत (डं.फो. ६५७).

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७१

ददवसात परतला आणण भेट घेतली. वाढ ददल्यावर अपेणक्षत अणभवादनासाठी त्याला तयार करायला बक्षीची मध्यस्ती नसताना त्याला २०० ची वाढ दे ऊन सात सदी, खान उपािी, एक हत्ती व एक तवशेष िनुष्य व भाता दे ऊन, त्याला हसन अली खानाकडे बादशाहाचा आदे श घेऊन जाण्यासाठी परत पाठवण्यात आले . ही त्याच्या प्रगतीची सुरवात1 होती. या नंतर त्याला धमळाले ल्या सगळ्या पदोन्नतींपैक़ी एकाच प्रसंगाचे वणमन मी योग्य दठकाणी करेन. शतनवार, २७ धडसेंबर १६७९ / ४ जजल्हेज १०९० ला अनेक ददवसांच्या आजारानंतर मीर बक्षी सरबुलंद खान वारला. तो एक तवश्वासू अधिकारी होताच व अंतबामय चांगला माणूस ही होता. शुक्रवार, १६ जानेवारी १६८० / २४ जजल्हेज १०९० ला तहम्मत खानाला आलाहाबादला पाठवले गेले. पादशाहजादा मुहम्मद अकबर याला ४०००० रुपयांचा माणकाचा लशरपेच दे ऊन उदयपूरला पाठवण्यात आले . हसन अली खानाच्या हाताखाली भरपूर युद्धसामग्री व सैन्य दे ऊन त्याला राण्याचा पाठलाग करायला पाठवले गेले. तनरोप घेताना त्याच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला गेला. त्याच्या सहकाऱ्यांचा सरदार शेख राझीउद्दीन याने या मोतहमेत चांगली कामतगरी केली व त्याला खान ही उपािी धमळाली. रुहुल्लाह खानाला मृत सरबुलंद खानाच्या जागी मीर बक्षी केले गेले पण पदाचे नाव तोंडी सांतगतले गेले नाही. सलाबत खानाला [१८८] त्याच्या जागी तोफखान्याचा दरोगा नेमले गेले व सालीह खानाला सलाबत खानाच्या जागी घुसलखान्याचा दरोगा नेमले गेले. तबव्वर खानाला पादशाही कुली खान ही उपािी धमळाली. लाहोरहून बातमी आली क़ी काझी सय्यद अली अकबर हा प्रामाणणकपणा, शौयम व साहस या त्याच्या गुणांमळ ु े कोणासमोर किी झुकला नाही पण या उलट त्याच्या बतहणीचा मुलगा सय्यद फाजजल हा मूखम, कहिंसक व लशवीगाळ करणारा होता व त्याने त्याच्या बोलण्या वागण्याने नाजजम व कोतवालाचे जगणे कठीण केले होते. शेवटी त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. नाजजम मीर कवामुद्दीन खान याच्या बरोबर झाले ल्या

1

मीर लशहाबुद्दीन हा गाझीउद्दीन तफरोज जंग म्हणून प्रलसद्ध होता व पतहला तनजाम-उल-मुल्क आसफ जाह हा त्याचा मुलगा होता. वरील घटनेसाठी अख्म-ए-आलमगीरी पृष्ट ३३, खफ़ी खान ii, २६७ व मआलसर-उल-उमरा, ii, ८३२ पहा.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७२

वादात काझीला लाजजरवाणा मृत्यू आला. त्याचे (नाजजम) व कोतवाल तनजामुद्दीन याचे पद व मनसब काढू न घेण्यात आली. कोतवालास लाहोरला मारण्यात आले तर कवामुद्दीनला दरबारास बोलावले गेले. पादशाहजादा मुहम्मद आजम याला त्याच्या जागी पंजाबचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक लशरपेच व रत्नजधडत मुत्तका ददला गेला. लु त्फुल्लाह खानाला सुभेदाराचा सहाय्यक नेमले गेले व त्याच्या जागी अबु नस्र खान याला अजम-ए-मुकरमर नेमले गेले. अजमेरच्या दरबारात आल्यावर कवामुद्दीन खानाची शरीयतच्या न्यायसभेत इतक़ी नाचक्क़ी केली गेली क़ी शेवटी सय्यद अली अकबर याच्या मुलाने1 दरबारातील नामदारांच्या तवनंतीनुसार कवामुद्दीनच्या वयाकडे बघून त्याच्या दे हदं डाचा अधिकार सोडू न ददला. जवळपास त्याच सुमारास, स्वतःच्या अवस्थेची क़ीव येऊन खान मरण पावला. शतनवार, २४ जानेवारी १६८० / २ मुहरमम १०९१ ला राणाने बांिले ला उदयसागर तलाव बघण्यासाठी बादशाहा गेला व त्याच्या तीरावर बांिले ली तीनही मंददरे [१८९] पाडण्याचा आदे श ददला.

हसन अली खानाकडू न बातमी आली क़ी बुिवार, २१ जानेवारी १६८० / २९ 2

जजल्हेज १०९० ला त्याने खखिंड ओलांडून त्याने राणा वर आक्रमण केले पण तो सामान सोडू न छावणीतून पळू न गेला होता. या मोतहमेत बरेच िान्य हाती आले ज्यामुळे त्याचा भाव उतरला. २९ जानेवारी १६८०/ ७ मुहरममला १०९१ ला हसन अली खानाने राणाच्या वाड्यातून तंबू व इतर सामानाचे वीस उंटगाडे आणले व कळवले क़ी उदयपूरच्या जवळपासची १७२ मंददरे पाडू न टाकली गेली आहेत. खानाला बहादुर आलमगीरशाही ही उपािी धमळाली. ३१ जानेवारी १६८० / ९ मुहरमम १०९१ ला खान जहान बहादुरला भैंसरोरला पाठवले गेले व त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व सोन्याच्या साजाचा घोडा ददला गेला.

1

इंग्रजी अनुवादात इथे चुकून ‘till at last Sayyid Ali Akbar, the son of the deceased Qazi’ असे म्हटले आहे पण वरती सय्यद अली अकबर हे काझीचे नाव आहे असे ददले

असल्यामुळे, ते नजरचुक़ीने झाले असावे. 2

इंग्रजी अनुवादात इथे चुकून ९ जजल्हेज ददले आहे. फासी पाठात २९ जजल्हेज आहे.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७३

रतववार1, २२ फेब्रुवारी १६८० / १ सफर १०९१ ला बादशाहा धचतोड बघायला गेला. त्याच्या आदे शानुसार ततथली ६३ मंददरे पाडली गेली. गुरूवार2, २६ फेब्रुवारी १६८० / ५ सफर १०९१ ला खान जहान बहादुर भैंसरोरहून परतला व धचतोडला बादशाहाची भेट घेतली. बादशाहाने स्वतःच्या हाताने त्याला अध्याम बायांचा अंगरखा दे ऊन त्याचा सन्मान केला. शतनवार3, २८ फेब्रुवारी १६८० / ७ सफर १०९१ ला अहमदाबादचा नाजजम हातफज मुहम्मद आमीन याला तनयुक्त़ीच्या दठकाणी पाठवले गेले व त्याला एक अंगरखा, एक घोडा व एक हत्ती ददला गेला. १ माचम १६८० / ९ सफर १०९१4 ला खान जहान बहादुर जफर जंग कोकलताश खान याला सवामत मोठ्ा पादशाहजाद्याच्या जागी दख्खनचा सुभद े ार नेमले गेले व त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर, एक घोडा व एक हत्ती ददला गेला. आदालतचा दरोगा शेख सुलेमान याला फजैल खान ही उपािी धमळाली. गुरूवार, ४ माचम १६८० / १२ सफर १०९१ ला [१९०] धचतोड व त्याच्या आसपासच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी पादशाहजादा

मुहम्मद अकबर याला सुसज्ज सैन्यदल दे ऊन नेमले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा, एक मोत्यांचा कंठा, एक रत्नजधडत जजघा, एक घोडा व एक हत्ती ददला गेला. हसन अली खान, राजझउद्दीन खान व इतरांना अंगरखे दे ऊन पादशाहजाद्याच्या सोबत पाठवले गेले. आददल खान तबजापुरी याच्या मुली बरोबर दरबारास आले ल्या हक़ीम शमसा याला एक तवशेष अंगरखा, सोन्याच्या साजाचा घोडा, एक हत्ती, तीन हजारी (१००० स्वार) व शमसुद्दीन खान ही उपािी दे ऊन खान जहान बहादुरकडे नेमणूक करण्यात आली.

बादशाहा उदयपूरहून अजमेरला परततो शतनवार, ६ माचम १६८० / १४ सफर १०९१5 ला बादशाहा उदयपूरहून तनघाला. अब्दुल्लाह खानाचा वार्षिंक भत्ता रद्द केला होता, त्याला दोन हजारी (१००० स्वार) दे ऊन

1

इंग्रजी अनुवादात २२ फेब्रुवारी १६८० ला सोमवार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे रतववार आहे.

2

इंग्रजी अनुवादात २६ फेब्रुवारी १६८० ला शुक्रवार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे गुरूवार आहे.

3

इंग्रजी अनुवादात २८ फेब्रुवारी १६८० ला रतववार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे शतनवार आहे. इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

4 5

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७४

अब्दुर रसूल खानाच्या जागी आग्र्याचा तकल्ले दार नेमले गेले. मुकरमम खानाला एक अंगरखा व हत्ती दे ऊन रणथंबोर जवळ बंडखोरांना िडा लशकवायला पाठवले गेले. मंगळवार, १६ माचम १६८० / २४ सफर १०९१ ला बादशाहाची परस्तार, औरंगाबादी महल तहला झेबुस्त्न्नसा महल बरोबर दरबारास पाचारण केले होते, त्यांना आणायला पलं गतोश खान बहादुरला पाठवले गेले. बादशाहाच्या मंचकारोहणा पूवी, तट्ट् याचा मीर मुनशी अबुल फतेह कातबल खान, हा त्याचा सेवक होता. बादशाहासाठी त्याने केले ली दीघमकालीन सेवा व त्यांचे जवळचे संबंि लक्षात घेऊन बादशाहाने त्याचा भाऊ कातबल खान याला बोलावून कामाला लावले होते पण त्याच्या दुदै वाने तो चुक़ीच्या मागामवर गेला. त्याच्या अयोग्य वागणुक़ीमुळे [१९१] तसेच त्याचे पद तट्ट् याचा कानूनगोई व बादशाहाचा जावई अब्दुल वासी याला तनकटचे असल्यामुळे त्याला हजारी (७० स्वार) वरून काढण्यात आले . बादशाहाने त्याच्या अजामवर ददल्लीला जा असे ललतहले . ततथे आल्यावर फुलाद खानाला आदे श ददला गेला क़ी तो असेल त्या ब्स्थतीत त्याला घराबाहेर काढू न घोड्यावर बसवावे व शहराबाहेर हकलू न द्यावे तसेच त्याचे घर जप्त करावे. तसे केले गेले. बादशाहाच्या तनकट असले ल्या पदावर अडीच वषम काम केल्यानंतर त्याने १२ लक्ष रुपये, इतर सामान व एक नवीन बांिले ले घर इतके सगळे जमवले होते. या सगळ्या गोष्टींवर जप्ती आली. तो लाहोरला गेला व ततथेच मेला. फजैल खानाला कातबल खानाच्या जागी डाकचौक़ीचा दरोगा नेमले गेले व त्याच्या मनातली इच्छा पूणम झाली. तट्ट् याचा शेख मखदुम हा पादशाहजादा मुहम्मद आजम याचा मुनशी होता, आता तो बादशाहाचा मुनशी झाला. त्याला पाच सदी (३०० स्वार), जमिर-एसादाकार, २००० रुपये रोख व कापड, फुताह, जामावार आणण तकमखाबचे1 प्रत्येक़ी १० नग ददले गेले. त्यानंतर तो दीड हजारी पयंत वर गेला व त्याला फाजजल खान ही उपािी आणण सद्र चे पद ददले गेले, जे मृत्यूपयंत त्याच्याकडे रातहले . पादशाहजाद्याच्या हाताखालचे त्याचे पद शेख अब्दुस समद जाफरखानी याचा मुलगा शेख अब्दुल वली याला ददले गेले.

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘kinkhab’ असे ददले आहे पण फासी पाठात (‫ )کمخاب‬म्हणजे तकमखाब असे आहे.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७५

सोमवार, २२ माचम १६८० / १ रतब-उल-अव्वल १०९१1 ला बादशाहा अजमेरला पोहोचला व ख्वाजा मुईनुद्दीनच्या थडग्याला भेट ददल्यानंतर त्याने राजवाड्यात प्रवेश केला. [१९२] तातहर खानाचा मुलगा मुघल खान दख्खनहून आला व भेट घेतल्यावर त्याला प्रथम मीर तुझुक केले गेले. सलाबत खानाकडू न काहीतरी आगळीक झाल्यामुळे त्याला पदच्युत केले गेले व बहरामंद खानाला त्याच्या जागी तोफखान्याचा दरोगा नेमले गेले. अब्दुर रहीम खानाला बहरामंद खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले. बाक़ी खानाचा मुलगा हयात बेग याला खान, ख्वाजा कमाल याला खंजर खान व धमझाम खानाचा मुलगा अब्दुल वातहद याला मीर खान ही उपािी ददली गेली. हुशदार खानाचा मुलगा कामगार खान, ज्याला पदच्युत केले होते, त्याने स्वतःच्या पोटात चार दठकाणी खंजीराने वार केला पण त्याच्या कुटुं तबयांनी त्याची काळजी घेतल्यामुळे तो त्यातून बाहेर आला. बुिवार, ३१ माचम १६८० / १० रतब-उल-अव्वल १०९१ ला पादशाहनाम्याचा ततसरा खंड ललतहणारा वाकनतवस वारीस खान याला त्याच्या एका वेड्या लशष्याने छोट्या सुरीने भोसकून मारले . या लशष्याला इतर पुरुषांच्या अश्लील वतमनापासून वाचवण्यासाठी तो रात्री त्याला स्वतः जवळ झोपवायचा. सोमवार, ५ एतप्रल १६८० / १५ रतब-उलअव्वल १०९१ ला शाह आलम बहादुर कडू न पत्र आले क़ी बादशाहाच्या नावाने तवजापुरात खुतबा वाचला गेला व त्याच्या नावाची सोन्याची व चांदीची नाणी पाडली गेली. दरबारातील उपब्स्थतांनी अणभनंदन व्यक्त करण्यासाठी वाकून बादशाहाला अणभवादन केले . गुरूवार, ६ मे १६८० / १६ रतब-उस-सानी १०९१ ला पादशाहजादा मुहम्मद आजम आदे शानुसार, त्याच्या बतहणीचे स्वागत करायला एक मजल पुढे गेला आणण ततला व औरंगाबादी महल तहला बादशाहाच्या जनानखान्यात घेऊन गेला. बादशाहाला कळले क़ी [१९३] बाल्खचा राजा सुभान कुली खान याचा अताललक, नजर बे हा दरबारास येणार होता. त्याला काबुलच्या तसेच लाहोरच्या कोशागारातून प्रत्येक़ी ५००० रुपये दे ण्याचा आदे श ददला गेला. बाल्खचा दत कलं दर बे याने भेट घेतली व त्याला अंगरखा, एक खंजीर व १००० रुपये रोख ददले गेले. हाजी शफ़ी खान याला मीर

1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७६

मुघीसच्या जागी बंगालचा ददवाण नेमले गेले व त्याच्या जागी शरीफ खानाला दाघ-इतशीहा चा दरोगा नेमले गेले. हमीद खानाला सोजत व जजतारणच्या बंडखोरांना िडा लशकवायला नेमले गेले. मुहम्मद मीरक गुजब म दामर याला खान ही उपािी ददली गेली. इब्फ्तकार खानाला शुजाअत खानाच्या जागी जौनपूरचा फौजदार नेमले गेले. मुल्तफत खानाला आिी पदच्युत केले होते, त्याला आता परत तीन हजारी (१००० स्वार) धमळाली व गाझीपूर जमातनयाचा फौजदार नेमले गेले. तोफखान्याचा दरोगा बहरामंद खान याचे अनासागर तलावाच्या पलीकडील बागेत सरकारी घर होते, तो गुरूवार, २० मे १६८० / १ जमाद-उल-अव्वल १०९१ ला झाडाच्या सावलीत बसला असताना त्याच्यावर वीज पडली. खानाने तलावात उडी मारली व काही तासांनी तो शुद्धीवर आला. बुिवार, ९ जून १६८० / २१ जमाद-उल-अव्वल १०९१ ला बातमी आली क़ी खान जहान बहादुर औरंगाबादे स पोहोचला होता व त्याने शाह आलम बहादुरची भेट घेतल्यानंतर शाह आलम दरबारास जायला तनघाला. १४ जून १६८० / २६ जमाद-उलअव्वल १०९१ ला मुहम्मद आजम व बीदरबख्त यांचा मोठा सन्मान करून त्यांना राणा वरील मोतहमेवर पाठवले गेले. [१९४] नजर बे याला औरंग खान ही उपािी व दोन हजारी (७०० स्वार), मुहम्मद आमीनला शाह कुली खान ही उपािी व हाजी मुहम्मदला मीर खान ही उपािी ददली गेली. शुक्रवार, २५ जून १६८० / ७ जमाद-उस-सानी १०९१ ला पादशाहजादा मुहम्मद आजम धचतोडला पोहोचला. पादशाहजादा मुहम्मद अकबर याने बादशाहा घोड्यावर स्वार असताना त्याची भेट घेतली व नंतर तो धचतोडहून सोजात व जजतारनकडे तनघाला.

ٔ ٔ ‫معروض ايستادهاي پايه س ِير سلطنت گرديد که سيواي شق‬ ‫از واقعه دکهن‬ ِ ٔ ‫گرم‬ ‫بيست‬ ِ ٔ ‫وچهارم ربيع آالخر سنه بيست و سه از سواري آمده باستيالی‬ ّ ‫بقعر جهنم فرورفت‬ ِ ‫دومرتبه خون رد کرد و‬ दख्खनहून बातमी आली क़ी शुक्रवार १४ मे १६८० / २४ रतब-उस-सानी १०९१1 ला नीच लसवा प्रवास करून परतल्यावर घोड्यावरून उतरला, 1

जेिे शकावलीत लशवाजीच्या मृत्यूची ततथी, चैत्र पौर्णिंमा शके १६०२ अशी ददली आहे (ऐ.शका. पृ. २७). याचा ज्युललयन ददनांक ३ एतप्रल १६८० येतो. फासी पाठात २४ रतब-उल-आखखर

अध्याय २३

२६ सप्टें बर १६७९ ते १४ सप्टें बर १६८०

१७७

उष्णतेमुळे त्याला दोनदा रक्ताची उलटी झाली व तो नरकाच्या खड्ड् यात बुडाला. अंबरची मंददरे पाडण्यासाठी पाठवले ला अबु तुराब मंगळवार, १० ऑगस्ट १६८० / २४ रज्जब १०९१ ला दरबारास आला व कळवले क़ी त्याने ६६ मंददरे पाडली होती. ग्वाल्हेरचा तकल्ले दार ख्वाजा मुआतमाद खान गुरूवार, २६ ऑगस्ट १६८० / १० शाबान १०९१ ला वारला.

१०९१ (आखखरच्या जागी सानी ककिंवा थानी असेही वापरले जाते) ही ततथी ददली आहे ज्याचा ज्युललयन ददनांक १४ मे १६८० येतो. इथे रतब-उल-अव्वलच्या ऐवजी चुकून रतब-उल-आखखर ललतहले गेले आहे असे िरले तरी २४ रतब-उल-अव्वलचा ज्युललयन ददनांक १४ एतप्रल १६८० येतो. हा ददनांक वर ददले ल्या तवश्वसनीय सािनातील नोंदीच्या अधिक जवळ जाणारा असला तरी त्यात आकरा ददवसांचे अंतर राहते. त्यामुळे एकतर ले खकालाच चुक़ीची मातहती धमळाली ककिंवा मूळ फासी हस्तललखखतावरून प्रत बनवताना ललतपकाची काहीतरी नजरचूक झाली असावी असे ददसते.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१७८

अध्याय २४ राजवटीचे चोतवसावे वषम – तहजरी १०९१-९२ १५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१ * * * * खखदमतगुजार खानाला धचतोडचा बक्षी व वाकनतवस नेमले गेले. शतनवार, २५ सप्टें बर १६८० / ११ रमजान १०९१ ला एक्कताज खान [१९५] वारला. मीर अब्दुल्लाह, मीर नुरुल्लाह व आयातुल्लाह या त्याच्या मुलांना दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. बक्षीचा सहाय्यक आक़ील खान याला ददल्लीचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा व मोत्यांचा इलाका असले ला एक रत्नजधडत खंजीर ददला गेला. शतनवार, १६ ऑक्टोबर १६८० / २ शव्वाल १०९१ ला घजनफर खानास चारशे स्वार तसेच मुहम्मद शरीफ खुशमंजजल आणण करावली सोबत दे ऊन अजमेर पासून राजसमुद्र तलावापयंतचे पल्ले मोजायला पाठवले गेले. रतववार, २४ ऑक्टोबर १६८० / १० शव्वाल १०९१ ला तहम्मत खानाला बक्षी केले गेले, एक अंगरखा व सोन्याचा दुपट्टा त्याच्या घरी पाठवण्यात आला. त्याच ददवशी मुआतमाद खानाची १२ लक्ष ५०००० रुपयांची मालमत्ता तसेच अलं कार व प्राणी ग्वाल्हेरहून दरबारास आणले गेले. मंगळवार, ९ नोव्हेंबर १६८० / २६ शव्वाल १०९१ ला बंडखोर राठोडांना िडा लशकवण्यासाठी हमीद खान मेरट्याला गेला. लशहाबुद्दीन खान या त्याच्या एका साथीदाराला एक अंगरखा व हत्ती तसेच इतरांना अंगरखे ददले गेले. रुहुल्लाह खानाला सहाय्यक बक्षी नेमले गेले. शतनवार, १३ नोव्हेंबर १६८० / १ जजल्कदा १०९१ ला त्याला एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती व एक तनशाण दे ऊन पादशाहजादा मुहम्मद अकबर याच्या हाताखाली चाकरीसाठी पाठवले गेले. मुघल खानाला सांभर व ददडवानच्या बंडखोरांना िडा लशकवायला पाठवले गेले. इस्लाम खान रूमीचा मुलगा मुख्तार बेग याला नवाजजश खान ही उपािी, मानाचा अंगरखा ददला गेला व भारताचा पारंपाररक पोशाख घालायची अनुमती ददली गेली. मंगळवार, ३० नोव्हेंबर १६८० / १८ जजल्कदा १०९१ ला पादशाहजादा काम बक्ष याचा बक्षी मुहम्मद नईम तसेच त्याच्या इतर अधिकाऱ्यांना बादशाहा कडू न अंगरखे दे ऊन त्यांना पादशाहजादा अकबर याच्या सेवेत पाठवले गेले. कवामुद्दीन खानाचा मुलगा सद्रुद्दीन [१९६] याला त्याच्या वधडलांच्या मृत्यूनंतर अंगरखा दे ण्यात आला. उदवतससिंह

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१७९

भादुरीया याला धचतोडचा तकल्ले दार नेमले गेले. शहामत खानाला सय्यद खानाच्या जागी काबुलची तकल्ले दारी दे णारे फमामन पाठवले गेले. शतनवार, १८ धडसेंबर १६८० / ६ जजल्हेज १०९१ ला लु त्फुल्लाह खान लाहोरहून दरबारास आला व त्याला अब्दुर रहीम खानाच्या जागी घुसलखान्याचा दरोगा नेमले गेले. अब्दुर रहीम खानाला ततसरा बक्षी नेमले गेले व हररताश्माची दौत दे ण्यात आली. सजावर खानाला त्याच्या जागी आख्ताबेगी नेमण्यात आले . काझी अरीफ याचा मुलगा अबुल कालसम याला ततसऱ्या बक्षीचा पेशदास्त नेमण्यात आले व त्याला एक शाल ददली गेली. राजससिंह व पृथवीससिंह राठोड यांना प्रत्येक़ी एक अंगरखा व २००० रुपये दे ण्यात आले . आघर खान याला काबुलचा राहदार नेमण्यात आले व त्याला नगारे ददले गेले. लशहाबुद्दीन खानाच्या हाती कललच खानासाठी, एक अंगरखा व सोन्याच्या साजाचा घोडा पाठवला गेला. ददयानत खानाचा मुलगा दे वाफकन याला, मुआतमाद खान ही उपािी तसेच शरीफ खानाच्या जागी दाघ-इ-तशीहाचा दरोगा नेमले गेले. कुराणाचे पाठांतर पूणम केल्याबद्दल बीदर बख्त याला मोत्यांचा कंठा व माणकाचे लोलक ददले गेले.

पादशाहजादा मुहम्मद अकबर यािे बंड [१९७] गुप्तचरांची व नेमले ल्या बातमीदारांची पत्रे तसेच इतर मतहतगारांकडू न

शुक्रवार, ७ जानेवारी १६८१ / २६ जजल्हेज १०९१ ला बादशाहाला कळले क़ी राठोडांच्या व काही कृतघ्न बादशाही सेवकांच्या धचथावणीला बळी पडू न पादशाहजादा मुहम्मद अकबर याने बंड पुकारून त्याला अनुकूल असणाऱ्या काही बादशाही सेवकांची पदोन्नती केली आहे व त्याच्या तवरोिात असले ल्यांना बंदी बनवले आहे. [१९८] हे ऐकल्यावर बादशाहाला अतीव दुःख झाले . ईश्वराच्या मदतीने त्याने हा खोडसाळपणा आटोक्यात ठे वण्याकडे लक्ष केजन्द्रत केले . बहरामंद खान व मीर आततश यांना छावणी भोवती खंदक खणायला, खखिंडीचे रक्षण करायला माणसे नेमायला व बादशाही छावणी जवळील टे कड्यांवर तोफा चढवायला सांतगतले गेले. अहमदाबादचा नाजजम हतफज मुहम्मद आमीन खान व इतर सरदारांना कळवले गेले क़ी त्यांच्या प्रांताच्या सीमेचे रक्षण त्यांनी खंबीरपणे करावे. यावेळी बादशाही सैन्य रजपूतांच्या बंडाळीची खोड काढायला तवखुरले होते त्यामुळे बादशाहा जवळ असले ले सगळे सेवक धमळू न दहा हजार स्वारांच्या

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८०

पादशाहजादा मुहम्मद अकबर इराणमध्ये याचा मृत्यू झाल्याची बातमी कळल्यावर, ‘कहिंदुस्थानाचा मोठा बंडखोर संपला’ असे औरंगजेब म्हणाला (फासी पाठ पृ. ४८४). संभाजी महाराजांनी पाली जवळ, िोंडसे गावी, ज्याला आज पाच्छापूर (बादशाहपूरचा अपभ्रंश) म्हटले जाते, याची राहायची सोय केली होती. ऐ.शका. पृ.२८, म.रा.धच.ब. पृ.१४. (साभार – BnF)

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८१

वर नव्हते. बादशाहा सारखा म्हणत क़ी, ‘या शाहाण्याला (अकबर) चांगली संिी आहे. तो (माझ्यावर आक्रमण करायला) उशीर का करतोय ?’. सोमवार, १० जानेवारी १६८१ / २९ जजल्हेजला १०९१ लशकारीला जाताना तसेच ततथून परत येताना, दोन्ही वेळेस त्याने (बादशाहाने) अनेक सरदारांचे महल्ले व उम्दत-उल-मुल्क आसद खान व इतर सरदारांच्या मोचांची पाहणी केली. दररोज सूयामस्ताला मोचे तपासायचे असे उम्दत-उल-मुल्क याला सांतगतले गेले. इनायत खानाचा जावई पादशाह कुली खान, नजाबत खानाचा मुलगा शुजाअत खान याचे दत व पादशाहजादा अकबर याचा दत यांना गढतबथली तकल्ल्यात अटकेत ठे वायचा आदे श ददला गेला. [१९९] सोनंग, दुगामदास व गुजरातकडे जाऊ इब्च्छणाऱ्या इतर रजपूतांना िडा लशकवण्यासाठी कललच खानाचा मुलगा लशहाबुद्दीन खान हा लसरोहीच्या ददशेने गेला होता. त्यावेळी शत्रूचा (रजपूत) मोठा जमाव पादशाहजाद्याकडे गेला व या बंडाळीत त्याचे मागमदशमन केले . त्याने मीरक खानाला लशहाबुद्दीनकडे पाठवले आणण उपहार व आश्वासनांनी त्याचे मन वळवून त्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. खानाकडे मोठे सैन्य होते व पादशाहजाद्याच्या सैन्यापासून काही अंतरावर त्याचा तळ होता. त्याने अत्यंत हुशारीने मीरक खानाला बरोबर घेतले आणण ततथून तनघून दोन ददवसात साठ कोस अंतर कापत बादशाहाकडे पोहोचला. त्याच्याकडील २०० जात पयंतच्या सगळ्या सरदारांना भेटीचा सन्मान धमळाला, त्याला अंगरखे, प्रशस्ती व सुयोग्य वेळात मोठी वाढ दे ण्याचे आश्वासन ददले गेले. मीरक खानाने त्याचे सगळे सामान पादशाहजाद्याच्या छावणीत सोडले होते. त्याला एक अंगरखा, २००० रुपये रोख व २०० (५० स्वार) ची वाढ मान्य झाली. लशहाबुद्दीन खानाचा भाऊ मुहम्मद आरीफ याला अंगरखा व वाढ धमळाली. त्याच्या हाताखालच्या लहान मोठ्ा सगळ्यांना अंगरखे व वाढ ददली गेली. सोमवार, १० जानेवारी १६८१ / २९ जजल्हेज १०९१1 ला बादशाहाने लशकारीच्या वेळी सैन्याची व मोचांची पाहाणी केली. हमीद खानाला चौक़ी-इ-खास मिील लोक व इतर

1

इंग्रजी अनुवादात इथे ३० जजल्हेज ददले आहे. फासी पाठात ‘सल्ख-ए-जजतहज्जा’, म्हणजे जजल्हेजच्या शेवटच्या ददवशी असे म्हटले आहे. जजल्हेज १०९१ ला २९ तारीख शेवटची आहे. याच पररच्छे दात वरती २९ जजल्हेज १०९१ ला सोमवार, १० जाने वारी १६८१ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे नजरचुक़ीने झाले असावे असे वाटते.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८२

स्वारांबरोबर मेरता येथील दुजमनससिंह याला िडा लशकवण्यासाठी पाठवले होते. तो लांबचे पल्ले मारत परतला व बादशाहा दौडत असतानाच त्याची भेट घेतली [२००]. बुिवार, १२ जानेवारी १६८१ / २ मुहरमम १०९२ ला शाह आलम बहादुर कडू न पत्र धमळाले क़ी तो राणाच्या तलावा जवळ पोहोचला होता व लवकरच बादशाहाच्या भेटीस येणार होता. आसद खान, मुहम्मद अली खान, अबु नसर खान व इतर लोक पुश्कर तलावाच्या बाजूस टे हळणी करायला गेले व परतले . तहम्मत खानाला गंभीर आजार झाल्यामुळे त्याला अजमेरची दे खभाल करायला तकल्ल्यातच ठे वले गेले. १३ जानेवारी १६८१ / ३ मुहरमम १०९२ ला शुक्रवारचा नमाज झाल्यावर आणण शेख मुईनुद्दीनच्या थडग्यापाशी फाततहा वाचल्यावर बादशाहा अजमेरहून तनघाला व दे वराईच्या छावणीत थांबला. लशहाबुद्दीन खानाने पुढे जाऊन बातमी आणली क़ी शत्रूचे सैन्य कुकीच्या आसपास तवखुरले होते त्यामुळे तो बादशाहाच्या ददशेने न येता रात्रीसाठी ततथेच थांबला होता. उच्च पदावरील बक्षींनी कळवले क़ी बादशाहाच्या सैन्यात १६००० स्वार आहेत. त्यांना सैन्याची जमवाजमव करायला सांतगतले गेले – मिली फळी, तबनीचे पथक व आघाडीचे धमळू न १०००० होते तर उजवी, डावी आणण राखीव असे धमळू न ६००० होते. गुप्तहेरांनी बातमी आणली क़ी पादशाहजादा बादशाहावर चालू न येत होता पण त्याच्या सैन्याला फारशी आशा नव्हती त्यामुळे संिी धमळताच अनेक जण ततथून बाहेर पडत होते. शतनवार1, १५ जानेवारी १६८१ / ५ मुहरमम १०९२ ला सकाळच्या नमाजानंतर बंडखोरांना अद्दल घडवायला पातहजे असे वाटू न बादशाहा तीन मैल दौडत गेला व दोराहा [२०१] ला पायउतार होऊन छावणीतील त्याच्या शाधमयान्यात बसला. तेवढ्यात बातमी

आली क़ी शत्रू चालू न येत आहे. तो म्हणाला, ‘पुढे जाऊ नका, त्यांना येऊ दे त’. दे वराईला असले ला तंबू नीट लावला गेला व बादशाहाच्या वस्तीची सोय केली गेली. रात्रीचा एक प्रहर व दोन घटीका झाल्या होत्या, बादशाहा नमाजाच्या चटईवर गुडघे टे कून बसला होता व शाह आलम बहादुर ततथे होता तेव्हा बातमी आली क़ी पादशाहा कुली खान शत्रूच्या सैन्यातून तनघून ततथे आला व भेटीकरता दालनाच्या दरवाज्यापाशी आला होता. त्याला तनःशस्त्र करून घेऊन यावे असे घुसलखान्याचा दरोगा 1

इंग्रजी अनुवादात इथे रतववार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे शतनवार आहे.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८३

लु त्फुल्लाह खान याला सांतगतले गेले. त्या नीच माणसाच्या मनात कपट असल्यामुळे त्याने घुसलखान्याच्या दरवाज्यापाशी आल्यावर शस्त्र ठे वायला नकार ददला. लु त्फुल्लाह खानाने आत येऊन सांतगतले क़ी, ‘तो म्हणतो क़ी तो खानाहजाद आहे व त्याला आजवर कुठे ही शस्त्र काढू न जायला सांतगतले गेले नाही’. बादशाहा उत्तरला, ‘त्याने शस्त्र घेऊन येता कामा नये’. मग लु त्फुल्लाह खान परत त्याच्याकडे गेला. शेवटी त्याला पकडले गेले. त्याने पळू न जायचा प्रयत्न केला पण त्याच्या कृतघ्नतेनच े त्याला पुढे जाऊ ददले नाही. घुसलखान्याच्या दरवाज्याची झाप ओलांडून बाहेर पडता क्षणी बादशाही पहारेकरी व दासांनी त्याच्यावर चाल केली. त्याने अंगरख्याखाली धचलखत घातले असल्याने त्यांचे वार तनष्फळ ठरले . एक घाव त्याच्या गळ्यावर पडला व त्याची गडबड संपली. शतनवार, १५ जानेवारी १६८१ / ५ मुहरमम १०९२ ला बातमी आली क़ी बादशाहाचे मंचकारोहण होण्यापूवी त्याच्या सेवेत असले ला इस्लाम खान बहादुर, याचा मुलगा तहम्मत खान [२०२] वारला. तो फार चांगला व दानशूर माणूस होता व सवांना मदतीचा हात पुढे करायचा तसेच त्याच्या आसपास सवम प्रकारच्या कला व ज्ञान असले ले लोक गोळा करून त्यांचा सन्मान करायचा. दोघं बाप ले क चांगल्या स्वभावाचे होते तसेच गद्य व पद्य ले खनात प्रवीण होते. रतववार, १६ जानेवारी १६८१ / ६ मुहरमम १०९२ ला बादशाहाला कळले क़ी बादशाही छावणी पासून दीड कोसावर पादशाहजादा मुहम्मद अकबर याची छावणी होती व त्याचे कुटुं ब व मुले यांना ततथेच सोडू न मध्यरात्री तो पळू न गेला होता. * * * * [२०३] दरबारातील उपब्स्थतांनी या तवजयातप्रत्यथम बादशाहाचे अणभनंदन करण्यासाठी त्याला अणभवादन केले . या आनंद सोहळ्याच्या तनधमत्ताने तीन तास संगीत वाजवले गेले. खानइ-सामान मुहम्मद अली खान पादशाहजाद्याचे कारखानजात जप्त करायला गेला. नाजजर दरबार खान याने नेकुलसयार व मुहम्मद आसघर ही मुले, सतफयतुस्त्न्नसा, झतकयतुस्त्न्नसा व नजजबतुस्त्न्नसा या मुली, पत्नी सलीमा बानू बेगम व पादशाहजाद्याच्या इतर नातेवाईकांना बादशाहाकडे आणले . ददवंगत शेख मीर याचा मुलगा मुहतशाम खान, मामूर खान, मुहम्मद नईम खान व सय्यद अब्दुल्लाह यांना त्याच्या तुरुंगातून मुक्त केले गेले व बादशाहाची भेट घेऊन त्यांना अंगरखे ददले गेले. लशहाबुद्दीन खान पादशाहजाद्याशी तनष्ठावंत असणाऱ्यांच्या मागावर गेला होता, त्याने दमल्या भागले ल्या त्याच्या सैन्यातील अनेकांना मारले . शाह आलम बहादुरला पादशाहजाद्याच्या मागावर

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८४

पाठवले गेले. कललच खान, खान जमान, इन्द्रससिंह, रामससिंह, सुजनससिंह व इतरांना त्याच्या हाताखाली दे ण्यात आले . शाह आलम बहादुर याला पन्नास हजार अशरफ़ी, शाहजादा मुईझुद्दीन याला दोन लक्ष रुपये, शाहजादा मुहम्मद अझीमुद्दीन याला तीन हजार अशरफ़ी व शाह आलमच्या तनष्ठावंतांना पन्नास हजार अशरफ़ी ददल्या गेल्या. हा खजजना पादशाहजाद्याकडे न्यावा असे रुहुल्लाह खानाला सांतगतले गेले. सोमवार, १७ जानेवारी १६८१ / ७ मुहरमम १०९२ ला बादशाहा परतला व ख्वाजा मुईनुद्दीनच्या थडग्याला भेट दे ऊन त्याने अजमेरच्या राजवाड्यात प्रवेश केला. १९ जानेवारी १६८१ / ९ मुहरमम १०९२ ला बातमी आली क़ी मंडलचा ठाणेदार मारला गेला आहे व तो लहानसा तकल्ला बंडखोरांनी घेतला आहे. या बंडाळीत मुहम्मद अकबर याला धमळाले ल्या लोकांपैक़ी [२०४] ख्वाजा मंजूर व मुहरीम यांना गढतबतलीत, मुतमझा कुली याला अल्वर, फराक (ककिंवा कझ्झाक) खान याला ग्वाल्हेर तर गझनफर खानाचा मुलगा मुहम्मद हातीम याला कांगडा तकल्ल्यात तुरुंगात टाकायचा आदे श ददला गेला. काझी खुबुल्लाह, मुहम्मद आक़ील, शेख तय्यब व अमरोयाचा मीर गुलाम मुहम्मद ज्यांनी िमामच्या आदे शानुसार बादशाहाला पदच्युत करण्यासाठी काढले ल्या फमामनावर त्यांचे लशक्के मारले होते त्यांना फळ्यांना बािून चाबकाचे फटके मारत गढतबतलीच्या तकल्ल्यात नेऊन डांबायला सांतगतले गेले. इतर अनेकांना चाबकाचे फटके मारून डांबण्यात आले . झेबुस्त्न्नसा बेगम तहने मुहम्मद अकबर याला ललतहले ली पत्रे धमळाली, ततचा चार लक्ष रुपये वार्षिंक भत्ता बंद केला गेला, ततची मालमत्ता जप्त केली गेली व ततला सलीमगढ तकल्ल्यात ठे वले गेले. २३ जानेवारी १६८१ / १३ मुहरमम १०९२ ला काम बक्षचा तववाह मनसबदार बरखुरदार बेग याची मुलगी फि-इ-जहान खानम तहच्याशी करण्यात आला. २६ जानेवारी १६८१ / १६ मुहरमम १०९२ ला औरंगाबादी महल, सलीमा बानू बेगम (मूहम्मद अकबर याची पत्नी) व इतरांना ददल्लीला पाठवण्यात आले . शाह आलम बहादुरच्या सैन्याकडू न बातमी आली क़ी तो जालोरला व मुहम्मद अकबर सांचोरला पोहोचले होते व कललच खान द्रुतगतीने सैन्यासतहत त्याच्या (मुहम्मद अकबर) मागावर होता. पादशाहजादा मुहम्मद आजम याच्या वाकनतवसाने कळवले क़ी राण्याचा ददवाण दयालदास रात्री आक्रमण करणार आहे. हे कळल्यावर पादशाहजाद्याने ददलावर खानाला त्याच्यावर चालू न जायला सांतगतले . युद्ध झाले [२०५] शत्रूकडील अनेक जण

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८५

मारले गेले. त्याच्या पत्नीला मारून तो पळू न गेला. त्याची मुलगी व इतर काही लोकांना बंदी बनवले गेले. पादशाहजाद्याच्या संमतीतवना कललच खान दरबारास आल्याने त्याला भेटीची मनाई करण्यात आली. आिी कोतवाल इल्हततमाम खानाने त्याच्यावर लक्ष ठे वले , नंतर त्याला सलाबत खानाकडे ददले गेले. मुहम्मद इब्रातहम, म्हणजे शुजाअत खान पादशाहजादा मुहम्मद अकबर याच्याकडू न शाह आलमकडे आला व त्याने त्याला दरबारास पाठवले . ततथे त्याला सलाबत खानाकडे दे ऊन अकबरी वाड्यात ठे वले गेले. हातफज मुहम्मद आमीन खानाने पत्र पाठवले क़ी पादशाहजादा मुहम्मद अकबर राठोडांसोबत डोंगराळ प्रदे शातून राण्याच्या दे शात गेला आहे आणण पुढे त्याला अहमदाबादला जायचे आहे. त्यावेळी हेरांनी बातमी आणली क़ी राजपीपला येथून तनघाल्यावर तो सारनगढ मागे दख्खनला गेला होता. सजावर खानाकडू न काही तरी आगळीक झाल्यामुळे त्याला त्याच्या मुलासकट अटक करून जलालबेग चमिंग-बाशी याच्याकडे दे ण्यात आले . घुसलखान्याचा मुश्रीफ मुहम्मद शफ़ी हा सुद्धा यात गुंतला होता त्यामुळे त्याला पदच्युत करण्यात आले . त्याच्या जागी मुघल खानाला आख्ताबेगी नेमण्यात आले व बहरामंद खानाला मुघल खानाच्या जागी मीर तुजुक करण्यात आले . मुशीद कुली खानाचा मुलगा धमझाम मुहम्मद याला घुसलखान्याचा मुश्रीफ नेमले गेले. रुहुल्लाह खानाचा पेशदास्त तापीदास व त्याचा मुनशी बालतकशन यांना कोतवालाकडे दे ण्यात आले कारण ते खान जहान बहादुरचा आधमल गंगाराम यासाठी जामीन होते व त्याने आलाहाबाद प्रांतात बंड पुकारले होते. खान जहान बहादुर कडू न एक पत्र आले क़ी [२०६] रतववार, १५ मे १६८१1 / ७ जमाद-उल-अव्वल १०९२ ला पादशाहजादा मुहम्मद अकबर बऱ्हाणपूरमागे संभाच्या प्रदे शात गेला होता व त्याने कृपावंत होऊन व सन्मानाने त्याला ततथे आश्रय ददला. ददवंगत तहम्मत खान याचा मुलगा मुहम्मद मालसह व इतर मुले, भाऊ व जावई यांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. त्याच्या जागी अशरफ खानाला प्रमुख बक्षी नेमले गेले व त्याच्या जागी कामगार खानाला वाकनतवस नेमण्यात आले व त्याच्या जागी इनायत खानाला बयुतात हे पद ददले गेले. बादी-उज-जमान महाबतखानी, ज्याच्या कौशल्यामुळे त्याला बादशाहाच्या सेवेत येता आले त्याला रशीद खान ही उपािी दे ऊन इनायत खानाच्या जागी खालशाचा पेशदास्त नेमले गेले. रतववार,

1

इंग्रजी अनुवादात इथे १६ मे १६८१ म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे १५ मे १६८१ आहे.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८६

३० जानेवारी १६८१ / २० मुहरमम १०९२ ला मीर सय्यद मुहम्मद कनौजी ददल्लीहून आला व त्याने भेट घेतली. एक हजार रुपये व फळांची दोन ताटे त्याच्याकडे पाठवली गेली. मंगळवार, १ फेब्रुवारी १६८१ / २२ मुहरमम १०९२, लशहाबुद्दीन खान याला ददले ल्या सैन्याच्या तुकडी बरोबर अंगरखे, खंजीर व एक कलगी ददली गेली. मंगळवार, १ माचम १६८१ / २० सफर १०९२1 ला इररज खानाला खान जहान बहादुर याच्या जागी बऱ्हाणपूरचा सुभेदार नेमले गेले. इस्लाम खानाचा मुलगा अफ्रासैब खान िामुनीच्या फौजदारीहून आला व त्याने भेट घेतली. सय्यद अशरफ याला खान उपािी दे ऊन बेगम सातहबाचा मीर-इ-सामान नेमले गेले. रतववार, २० माचम १६८१ / १० रतब-उल-अव्वल १०९२, फैजुल्लाह खान याला एक हत्ती व एक अंगरखा दे ऊन मुरादाबादला पाठवले गेले. इनायत खानाला अजमेरचा फौजदार नेमले गेले व राठोडांना िडा लशकवण्यासाठी तो बरेच कष्ट घेऊ लागला. [२०७] शुक्रवार, २५ माचम १६८१ / १५ रतब-उल-अव्वल १०९२, उगंजच्या राजाचा दत खान धमझाम भेटायला आला व त्याला एक अंगरखा व पट्टा असले ला खंजीर ददला गेला. १६ एतप्रल १६८१ / ७ रतब-उस-सानी १०९२2 ला तनरोप दे ताना त्याला रत्नजधडत जजघा, ५००० रुपये, पन्नास मोहरांच्या वजनाची एक मोहर व शंभर रुपयांच्या वजनाचा एक रुपया ददला गेला. उगंजचा राजा आनुशा खान याच्या साठी २००० रुपयांची रत्नजधडत तलवार त्याच्याकडे ददली गेली. शतनवार, ९ एतप्रल १६८१ / ३० रतब-उल-अव्वल १०९२ ला जसवंतससिंह याचा मुलगा मुहम्मदी राज ददल्लीहून दरबारास आला. २३ एतप्रल १६८१ / १४ रतब-उस-सानी १०९२3 ला दाऊद खानाचा मुलगा हमीद खान याला भोजपूरचा तर मीरक खानाला जालं िर दोआबचा फौजदार नेमले गेले, मुरीद खानाला शाहामत खानाच्या जागी काबुलचा तकल्ले दार नेमले गेले तर राजा मानिाताला घोरबंदचा ठाणेदार नेमले गेले. मीर बहार सैफुल्लाह खान, ज्याने शाह आलम बहादुरची सेवा स्वीकारली होती पण त्याला काही बक्षीस धमळाले नव्हते त्याला पादशाहजाद्याच्या वतीने ५००० रुपये दे ण्यात यावे 1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही.

2

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही. इंग्रजी अनुवादात इथे चुकून १४ रतब-उल-अव्वल म्हटले आहे पण फासी पाठीत रतब-उल-

3

आखखर (सानी) आहे. इंग्रजी अनुवादात ज्युललयन ददनांक मात्र बरोबर आहे.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८७

व ही रक्कम पादशाहजाद्याला दे ण्यात येणाऱ्या रकमेतून वळती करून घ्यावी असा आदे श ददला गेला. मीर बक्षी अशरफ खान व दफ्तर-इ-तानचा पेशदास्त इततमाद खान यांना स्फदटकाची दौत ददली गेली. रतववार, ८ मे १६८१ / २९ रतब-उस-सानी १०९२1 ला कललच खानाची तुरुंगातून सुटका झाली व त्याने भेट घेतली. गुरूवार, २३ जून १६८१ / १६ जमाद-उस-सानी १०९२ ला त्याला ददवंगत रझवी खान याच्या जागी दुसऱ्यांदा सद्रचे पद धमळाले . राणा त्याचे घर व दे श सोडू न पळू न गेला होता * * * व बादशाही सैन्याने त्याला चांगली अद्दल घडवली. त्या वाळवंटी उंदराच्या एक हजार वषम जुन्या घराची बादशाही घोड्यांच्या [२०८] टापांनी उलथापालथ करून टाकली. तो त्याच्या राज्याच्या सीमेपयंत पळाला व त्याच्याकडे भीक मागायला काहीच उरले नव्हते त्यामुळे त्याने पादशाहजादा मुहम्मद आजम याच्याकडे मध्यस्ती करायची भीक मातगतली व त्याचे राज्य व मालमत्ता वाचवण्यासाठी मंडलपूर व बिणूरचे परगणे जजझयाच्या बदल्यात तोडू न दे ण्याची तवनंती केली. पादशाहजाद्याने दया दाखवत त्याचा प्रस्ताव बादशाहाला कळवला. त्याने राणाचे अपराि नजरेआड करत पादशाहजाद्याच्या तवनंतीचा मान ठे वायचे ठरवले . त्याप्रमाणे मंगळवार, १४ जून १६८१ / ७ जमाद-उस-सानी १०९२ ला राजसमुद्र तलावापाशी राणा व पादशाहजाद्याची भेट झाली. ददले र खान व हसन अली खानाने पुढे जात त्याला पादशाहजाद्याकडे घेऊन गेले. त्याने ५०० अशरफ़ी व सोन्याचा, चांदीचा साज असले ले घोडे सादर केले . पादशाहजाद्याने कृपावंत होऊन त्याला डावीकडे बसायला सांतगतले व त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत तलवार, फुलकटारा असले ला खंजीर, सोन्याच्या साजाचा घोडा व चांदीच्या साजाचा हत्ती भेट ददला. राणा ही उपािी त्याला परत केली गेली व त्याला पाच हजारी (तततकेच स्वार) करून परत पाठवले गेले. त्याच्या तनष्ठावंतांना १०० अंगरखे, दहा रत्नजधडत खंजीर व चाळीस घोडे ददले गेले. [२०९] राजा जेव्हा ददले र खानाच्या घरी गेला तेव्हा खानाने त्याचे स्वागत करायला

माणसे पाठवली. त्याला कापडाचे नऊ थान, एक रत्नजधडत तलवार, रत्नजधडत फुले असले ली एक ढाल, एक कोरले ला भाला, नऊ घोडे व एक हत्ती ददला गेला. राणाच्या 1

इंग्रजी अनुवादात ३० रतब-उस-सानी म्हटले आहे पण फासी पाठात सल्ख-ए-रतब-उल-आखखर (सानी) असे म्हटले आहे, म्हणजे रतब-उस-सानी मतहन्याचा शेवटचा ददवस. तप.जं. प्रमाणे ही ततथी २९ रतब-उस-सानी येते. इंग्रजी अनुवादात ज्युललयन ददनांक बरोबर आहे.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८८

मुलाला तीन कपडे, एक रत्नजधडत खंजीर, एक रत्नजधडत असी, एक रत्नजधडत बाजूबंद व दोन घोडे ददले गेले. मुलतफत खानाकडू न गाझीपूर झमातनयाची फौजदारी काढू न घेतल्यावर त्याला आग्र्याच्या पररसराचा फौजदार केले होते. रतववार, २६ जून १६८१ / १९ जमादउस-सानी १०९२ ला एका गावावर चालू न गेल्यावर तो जखमी झाला व मेला. शुक्रवार, १ जुलै १६८१ / २४ जमाद-उस-सानी १०९२ ला आजम खानचा मुलगा व आसफ खानाचा जावई खान जमान खान, जो शाह आलम सोबत दख्खनहून आला होता व बराच काळ त्याची सेवा केली होती, त्याला इररज खानाच्या जागी बऱ्हाणपूरचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक अंगरखा, सोन्याच्या झालरीचा एक घोडा व १००० स्वारांची वाढ दे ऊन पाच हजारी (२००० स्वार) ददली गेली. ६ जुलै १६८१ / २९ जमाद-उस-सानी १०९२ ला शाह आलम बहादुर लगबगीने सोजात व जजतारनहून येऊन बादशाहाला भेटला. इब्फ्तकार खान याला अजमेरच्या सुभद े ारीवरून काढू न जौनपूरच्या फौजदारीवर नेमले होते पण तो वारल्यामुळे त्याच्या जागी तरबीयत खानाला नेमले गेले. तनजामुद्दीन अहमद याला शुकरुल्लाह खानाच्या जागी सरकहिंदचा फौजदार नेमले गेले, जानलसपार खानाला ददवंगत मीर मुहम्मद खान याच्या जागी बीदरचा तकल्ले दार नेमले गेले. बहरामंद खानाला [२१०] लु त्फुल्लाह खानाच्या जागी घुसलखान्याचा दरोगा नेमले गेले व लु त्फुल्लाह खानाला लशहाबुद्दीन खानाच्या जागी अजम-इ-मुकरमरचा दरोगा नेमले गेले. मुरादाबादहून बातमी आली क़ी पादशाही बेगमचा कोकाह जातहद खान याचा मुलगा फैजुल्लाह खान वारला. तो बादशाहा व बेगम सातहबाच्या खूप जवळचा होता. त्याने किी कोणासमोर मान तुकवली नाही व स्वतंत्रपणे जगला. तो स्वभावाने चांगला, दयाळू व दानशूर होता आणण जगाच्या चालीरीतींच्या पलीकडे होता. दर प्रदे शातून व बंदरांवरून त्याच्यासाठी गोळा केले ले सवम प्रकारचे प्राणी, जंगली जनावरे, पक्षी, चरणारी गुरे, साप हेच त्याचे एकमेव साथीदार होते. थोडक्यात तो तवधचत्र स्वभावाचा होता. शेवटी त्याला हत्तीरोग झाला व त्याला हत्तीवरून न्यावे लागत असे. त्याला बादशाहाला भेटायचे असल्यास तो दरबारात येत नसे तर येता जाता त्याच्या लवाजम्या सोबत भेटत असे. त्याच्या जागी अफ्रासैब खानाला मुरादाबादचा फौजदार नेमले गेले.

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१८९

रतववार, १० जुलै १६८१ / ४ रज्जब १०९२ ला पादशाहजादा मुहम्मद आजम व सुलतान बीदर बख्त, राणा तवरुद्ध चालले ले युद्ध संपवून परतले व खाजगीत (बादशाहाची) भेट घेतली. मंगळवार, १९ जुलै १६८१ / १३ रज्जब १०९२ ला लसद्दी याहयाने आददलशाह तवजापुरीची मुलगी शहर बानू तहला जनानखान्यात आणले . २६ जुलै १६८१ / २० रज्जब १०९२ ला ततचा तववाह मुहम्मद आजम याच्याशी करण्यात आला. बादशाहाने सेहरा बांिला, काझी शेख-उल-इस्लामने जामा मलशदीत लग्न लावले . मेहरची रक्कम प्रेतषताच्या (खाददजाशी) तववाहाप्रमाणे ५०० ददरहम ठे वण्यात आली. शतनवार, ३० जुलै १६८१ / २४ रज्जब १०९२1 ला [२११] मुहम्मद काम बक्ष याचा तववाह अमरचंदची मुलगी व मनोहरपूरचा जमीनदार जगतससिंह याची बतहण कल्याण कुमारी म्हणजे जमैतुस्त्न्नसा तहच्याशी लावण्यात आला. काझीने जामा मलशदीत लग्न लावले व हुंड्याची रक्कम ५०००० रुपये होती. शेर मुहम्मद कोहाती याला शेर खान ही उपािी ददली गेली.

‫محفل دولت بظهور‬ ‫بوسان‬ ‫عرضداشت خان جهان بهادر بر بساط‬ ‫شعبان از‬ ِ ِ ِ ٔ ٔ ّ ‫ دوصد‬- ‫مسپوِل سکونت گرفته‬ ‫اکن در قلعه پاِل متص ِل قلعه‬ ‫پيوست که ی‬ ٔ ّ ‫بنام آنها مواج یب مقرر نموده‬ ِ ‫ سنبها‬- ‫سوار و هشصد پياده بااوست‬ शतनवार, ६ ऑगस्ट १६८१ / १ शाबान १०९२ ला खान जहान बहादुर कडू न पत्र धमळाले क़ी पादशाहजादा अकबर मसपुली2 गडा जवळील पाली गडावर

1

इंग्रजी अनुवादात इथे चुकून मुहरमम म्हटले आहे पण फासी पाठात फक्त बीस्त व चहारम म्हटले आहे व या नोंदीच्या आिी रज्जब मतहन्याचा उल्ले ख असल्यामुळे इथेही रज्जब िरणे अपेणक्षत आहे. इंग्रजी अनुवादातील ज्युललयन ददनांक बरोबर आहे.

2

इंग्रजी अनुवादानुसार मूळ फासी पाठात गोव्यातील तबचोललम ऐवजी चुकून मसपुली ददले आहे कारण अकबर गोव्यातील मोतहमेत काही काळ ततथे होता, पण ते काही काळानंतर. तसेच, हे दठकाण पाली जवळ आहे हा उल्ले ख मात्र तनणश्चतपणे चुकला आहे. समकालीन मराठी सािनांप्रमाणे अकबर पाली गडावर (सरसगड) ककिंवा इतर कोणत्याही गडावर असल्याचा उल्ले ख धमळत नाही. त्याला पालीस ठाव ददल्हा व पाच्छापूरला अकबर व संभाजी यांची भेट झाली असा उल्ले ख जेिे शकावलीत (ऐ.शका. पृ.२८) येतो. अकबराला रायगडाजवळ िोंडसे गावी राहायला जागा ददली असा उल्ले ख धचटणीस बखरीत (म.रा.धच.ब. पृ.१४) येतो. आजचे

अध्याय २४

१५ सप्टें बर १६८० ते ३ सप्टें बर १६८१

१९०

राहत होता. त्याच्या जवळ २०० स्वार व ८०० पायदळ होते व संभाने त्याला वार्षिंक भत्ता ठरवून ददला आहे.

िंभा तिेि त्रवजापूर व हैदराबादच्या राजांिे त्रनमूवलन करण्यािाठी मुहम्मद आजमला िैन्यािह पाठवले जाते – मुहम्मद अकबर यािा अजमेरहून दख्खन पयंत पाठलाग – आजमला शाह उपािी ददली जाते रतववार, ३१ जुलै १६८१ / २५ रज्जब १०९२ ला पादशाहजादा मुहम्मद आजम याला शाह ही उपािी दे ऊन दख्खन मोतहमेवर नेमले गेले. खखदमतगार खान याने त्याच्या घरी एक अंगरखा, बालाबंद व लशरपेच नेऊन ददला. पादशाहजाद्याने शयनगृहात जाऊन बादशाहाला अणभवादन केले व ततथे त्याला दोन लक्ष पंचावन्न हजार चारशे रुपयांचे मोती असले ला अध्याम बायांचा अंगरखा भेट ददला गेला व नंतर ददवान-ए-आम मध्ये एक तलवार, दोन अरबी व इराक़ी घोडे, गजमाणणक नावाचा हत्ती व पाच लशकारीचे तबबटे भेट ददले गेले. त्याच वेळी सुलतान बीदर बख्त [२१२] याला तनरोपाचा अंगरखा, एक घोडा व एक रत्नजधडत लटकन दे ले गेले. पादशाहजाद्याच्या तनष्ठावंतांचा ही सन्मान केला गेला. गुरूवार, १८ ऑगस्ट १६८१ / १३ शाबान १०९२ ला उम्दत-उल-मुल्कला आदे श ददला गेला क़ी त्याने त्याची लशबंदी घेऊन हक़ीम मुहासन खान याला ददल्लीला न्यावे व बादशाहाला फुलाद खानाच्या लशक्क्याची पावती आणून दाखवावी. राणा जयससिंह याचा भाऊ राजा भीमससिंह सेवेच्या आशेने दरबारास आला. मुहम्मद नईम ने राणा राजससिंह याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राणा जयससिंह यास दुखवट्याची वस्त्रे नेऊन ददली होती, तो परत आला व त्याने भेट घेतली. त्याला राणा कडू न ४००० रुपये रोख, दोन घोडे, कापडाचे १९ थान व चार उंट धमळाले होते. हे सगळे सरकारकडे सुपूतम करायच्या ऐवजी त्याला ते स्वत: करता ठे वायची अनुमती ददली गेली.

पाच्छापूर गाव (१८.५२९४८९, ७३.३०६१७०) हे पालीपासून काही अंतरावर सुिागडाच्या पायथयाशी आहे. िोंडसे गावी अकबर रातहल्यानंतर किीतरी लोक त्याला पाच्छापूर (बहुदा बादशाहापूरचा अपभ्रंश) म्हणू लागले असावेत. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९१

अध्याय २५ राजवटीचे पंचतवसावे वषम – तहजरी १०९२-९३ ४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२ ****

बादशाहािे अजमेरहून बऱ्हाणपूरला कूि सोमवार, ५ सप्टें बर १६८१ / २ रमजान १०९२ ला बादशहाने छावणी अजमेरहून बऱ्हाणपूरकडे हलवण्याचा आदे श ददला. गुरूवार, ८ सप्टें बर १६८१ / ५ रमजान १०९२ ला तो ततथून तनघाला व दे वराईच्या टप्प्यावर थांबला. शुक्रवार, ९ सप्टें बर १६८१ / ६ रमजान १०९२ ला शाहजादा मुहम्मद अजीम याला एक अंगरखा, एक मोत्यांची स्मरणी, एक रत्नजधडत खंजीर, एक तलवार, एक घोडा व एक हत्ती दे ऊन परत अजमेरला पाठवले गेले. [२१३] उम्दत-उल-मुल्कला त्याच्या बरोबर पाठवले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व एक घोडा ददला गेला. आसद खानाचा मुलगा इततकाद खान, ददले र खानाचा मुलगा कमालु द्दीन खान, राजा भीम व त्याचा मुलगा, नामदार खानाचा मुलगा दीनदार खान (जो नंतर मरहमत खान झाला) व इतरांना अंगरखे, रत्ने, घोडे व हत्ती दे ऊन या सैन्यात तनयुक्त केले गेले. अजमेरचा फौजदार इनायत खान व गढतबतलीचा तकल्ले दार सय्यद युसफ ु बुखारी यांना परत पाठवले गेले. शतनवार, १० सप्टें बर १६८१ / ७ रमजान १०९२ ला ददल्लीहून बातमी आली क़ी मंगळवार, ६ सप्टें बर १६८१ / ३ रमजान १०९२ ला जहांआरा बानू बेगम मरण पावली. ततने स्वतःच्या हयातीत शेख तनजामुद्दीन औललया याच्या थडग्याच्या पररसरात स्वतः करता बांिले ल्या जागेत ततचे पार्थिंव पुरले गेले. त्याच्या सवामत मोठ्ा बतहणीच्या मृत्यूमुळे बादशाहा फार दुःखी झाला व त्याने तीन ददवसांसाठी नौबत बंद ठे वण्याचा आदे श ददला. आता ईश्वरी कृपेत तनदद्रस्त असले ली ही स्त्री दयाळू व कुलीन स्त्स्त्रयांप्रमाणे परोपकारी होती. ती बरोबरीच्या लोकांशी नेहमीच तवनयशीलपणे वागायची व इतरांवर भेटवस्तू व दयेचा वषामव करायची. ततच्या मृत्यूमळ ु े तवश्वाच्या मस्तकावरील औदायामची छाया नाहीशी झाली व काळाच्या हातातले उदारतेचे दालन हरवले . बादशाहाने आदे श ददला क़ी यापुढे ततचा उल्ले ख सातहबात-उज-जमानी असा करावा. * * * *

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९२

[२१४] त्याने ततच्या सेवकांवर व आणश्रतांवर उपहारांचा वषामव केला. बुिवार,

२१ सप्टें बर १६८१ / १८ रमजान १०९२ ला सेवेतून बाहेर पडले ला व मक्केला जायला अनुमती धमळाले ला उझबाक खान नजर बे वारला. सोमवार, १० ऑक्टोबर १६८१ / ७ शव्वाल १०९२ ला मुख्तार खानाने भेट घेतली व दुसऱ्या ददवशी त्याला हररताश्माची मूठ असले ली असा ददली गेली. शतनवार, २२ ऑक्टोबर १६८१ / १९ शव्वाल १०९२ ला बातमी आली क़ी ददल्लीचा फौजदार फुलाद खान याचा मृत्यू झाला. त्याच्या जागी शुक्रुल्लाह खानाला नेमले गेले. गुरूवार, २७ ऑक्टोबर १६८१ / २४ शव्वाल १०९२ ला कललच खान याला दख्खन मोतहमेवर पाठवण्यात आले व त्याला एक तवशेष अंगरखा, एक घोडा व नगारे ददले गेले. लशहाबुद्दीन खानाला आदे श ददला गेला क़ी छावणीच्या मागे येणारे लोक पोहोचेपयंत त्याने छावणीच्या तपछाडीचे रक्षण करावे. बातमी आली क़ी २९ ऑक्टोबर १६८१ / २६ शव्वाल १०९२ ला मुहम्मद आजम याने बऱ्हाणपूर सोडले व शुक्रवार, ११ नोव्हेंबर १६८१ / १० जजल्कदा १०९२ ला तो औरंगाबादला पोहोचला. रतववार, १३ नोव्हेंबर १६८१ / १२ जजल्कदा १०९२ ला बादशाहा बऱ्हाणपूरला पोहोचला. बातमी आली क़ी १४ नोव्हेंबर १६८१ / १३ जजल्कदा १०९२ ला इततकाद खान व बादशाही सैन्याने राठोडांवर आक्रमण केले व तुब ं ळ युद्ध झाले . शत्रूचे पाचशे [२१५] लोक मारले गेले ज्यात सोनंग, त्याचा भाऊ अजबससिंह, श्यामलदास, तबहारीदास,

गोकुलदास व इतर सरदार मारले गेले ककिंवा जखमी झाले . इतर लोक पळू न गेले. बादशाही सैन्यातील अनेक जण मारले गेले. सरदार तारीन, शेर अफकन व इतर जखमी झाले . इततकाद खानाला ५०० ची वाढ धमळाली व त्याच्या सेवकांनाही बक्षीस दे ण्यात आले . मंगळवार, २२ नोव्हेंबर १६८१ / २१ जजल्कदा १०९२ ला अब्दुन्नबी बेग रोजभानी याला खान ही उपािी व दख्खनच्या तोफखान्याचा दरोगा नेमले गेले. २३ नोव्हेंबर १६८१ / २२ जजल्कदा १०९२ च्या मध्यरात्री बऱ्हाणपूर तकल्ल्याजवळ तोफेच्या दारूच्या दोन खणांचा स्फोट झाला व अनेक लोक मारले गेले. त्याच रात्री ढाक्याला लालबाग जवळील लु त्फुल्लाह खान कोकाहच्या छावणीवर लु टारूंनी िाड टाकली, सहा जण मारले गेले, वीस जखमी झाले व मालमत्ता हातून गेली. जुन्नरच्या वाकनतवसाने ललतहले क़ी एका जमीनदाराला मुलगा झाला, त्याच्या डोक्यावर बोटा एवढी लांब दोन सशिंगे होती. दोन ददवसांनी ते मूल मेले. एका बाईला डोके व चेहेरा काळा आणण लाल-पांढरे नाक असले ली मुलगी झाली, ती जगली.

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९३

हसन अली खान इस्लामाबाद (मथुरा) हून आला व भेट घेतल्यावर त्याला एक अंगरखा, एक घोडा व एक हत्ती दे ऊन दख्खनच्या मोतहमेवर पाठवले गेले. राजजउद्दीन खानाकडे बादशाहाच्या घरातील सेवकांची व संबंधित पहाऱ्याची जबाबदारी होती, त्याला काढू न टाकण्यात आले . सोमवार, २१ नोव्हेंबर १६८१ / २० जजल्कदा १०९२ ला बादशाहाने [२१६] शेख अब्दुल लतीफ याच्या थडग्याला भेट ददली. फाततहा वाचल्यानंतर खऱ्या िमामच्या (इस्लामच्या) शत्रूंना ठे चून टाकण्यासाठी त्याने त्या संताच्या आत्म्याकडे मदत मातगतली. २२ नोव्हेंबर १६८१ / २१ जजल्कदा १०९२ ला बुखाऱ्याचा दत रहमान कुली दरबारास पोहोचला. त्याने दोन घोडे, दान-इ-केश चे दहा जोड व एक उंट सादर केला. त्याला एक अंगरखा व ५००० रुपये दे ऊन तनरोप ददला गेला. मुहम्मद आजम शाह याच्या सैन्याकडे खजजना पोहोचवायचे काम घजनफर खानाला ददले गेले. लशहाबुद्दीन खानाला अहदींचा मीर बक्षी नेमण्यात आले . सलाबत खानाला त्याचे पद परत दे ऊन बहरामंद खानाच्या जागी तोफखान्याचा दरोगा नेमले गेले. बुिवार, ३० नोव्हेंबर १६८१ / २९ जजल्कदा १०९२ ला चंद्याचा जमीनदार भेटीस आला व त्याने चार हत्ती व नऊ घोडे सादर केले . रतववार, १ जानेवारी १६८२ / २ मुहरमम १०९३ ला त्याला एक तवशेष अंगरखा, सोन्याच्या साजाचा घोडा, एक हत्ती व एक पाचूचा लशरपेच दे ऊन तनरोप दे ण्यात आला. खान जहान बहादुर कडू न एक पत्र धमळाले क़ी त्याने लशवापूर लु टले . मुहम्मद अली खान दारा शुकोही याचा मुलगा मुहम्मद शाह याला दत म्हणून गोळकोंड्याला पाठवले गेले. रुहुल्लाह खानाला तवजापूरवर स्वारी करायचा आदे श ददला गेला. लशहाबुद्दीन खान व त्याच्या सेवकांना तसेच ददले र खानाचा मुलगा फतह मामूर याला त्याच्या सोबत जायचा आदे श ददला गेला. रतववार, ५ फेब्रुवारी १६८२ / ७ सफर १०९३ ला ततसरा बक्षी अब्दुर रहीम खान वारला. त्याला त्याच्या वधडलांच्या, इस्लाम खान याच्या औरंगाबाद येथील थडग्यात पुरले गेले. कामगार खानाला त्याच्या जागी नेमले गेले. [२१७] बातमी आली क़ी राठोडांनी मंडल-पूर परगण्यावर स्वारी केली व जवळपास सगळी मालमत्ता घेऊन गेले.

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९४

बादशाहािे बऱ्हाणपूरहून औरंगाबादकडे कूि २८ फेब्रुवारी १६८२ / १ रतब-उल-अव्वल १०९३ ला तो बऱ्हाणपूरहून तनघाला. १ माचम १६८२ / २ रतब-उल-अव्वल १०९३1 ला शाहजादा मुहम्मद मुईझुद्दीन याला एक अंगरखा, एक लशरपेच, एक तलवार व एक हत्ती दे ऊन बऱ्हाणपूरला थांबण्यासाठी बहादुरपूरहून पाठवले गेले. नाजजम खान जमान याला एक अंगरखा दे ऊन त्याच्या बरोबर पाठवले गेले. हमीद खान आजारी पडला, बादशाहाने त्याची भेट घेतली व त्याला बरे वाटे पयंत बऱ्हाणपूरला राहण्याचा आदे श ददला. बादशाहाने स्वतःच्या कमरेचा बालाबंद सोडू न त्याला भेट म्हणून ददला. वयोवृद्ध शेख इब्रातहम याच्या मुलीचा मुलगा, तकल्ले दार व फौजदार शेख जहान, याला आसीरला परत पाठवले गेले. १९ माचम १६८२ / २० रतब-उल-अव्वल १०९३2 ला मुहम्मद आजम औरंगाबादहून कान्होरीला3 आला व त्याने बादशाहाची भेट घेतली. बुिवार, २२ माचम १६८२ / २३ रतब-उल-अव्वल १०९३4 ला बादशाहा औरंगाबादच्या राजवाड्यात पोहोचला. पलं गतोश खान बहादुर याला अबु नसर खानाच्या जागी कुरबेगी नेमले गेले. बादशाहाने आब-पाश-इ-दराह तसेच फरमान बाडीच्या बागेला भेट ददली. ततथल्या बागकामगारांना बक्षीसे ददली गेली. एका झटापटीत झाले ल्या जखमांमुळे सोमवार, १० एतप्रल १६८२ / १२ रतब-उस-सानी १०९३ ला राजा रामससिंह याचा मुलगा कुमार तकशनससिंह वारला. १३ एतप्रल १६८२ / १५ रतब-उस-सानी १०९३ ला त्याची एक हजारी (४०० स्वार) मनसब त्याचा मुलगा तबशनससिंह याला ददली गेली. रतववार, १६ एतप्रल १६८२ / १८ रतब-उस-सानी १०९३ ला सआदुल्लाह खान याचा मुलगा इनायतुल्लाह

1 2

इंग्रजी अनुवादात इथे तहजरी ततथी ददले ली नाही. इंग्रजी अनुवादात व फासी पाठात ही इथे मुहरमम मतहना ददला आहे पण याच्या आिीच्या घटना व ददनांक बधघतल्यावर तसेच इंग्रजी अनुवादात ददले ला ज्युललयन ददनांक बधघतल्यावर इथे रतब-

3

4

उल-अव्वल अणभप्रेत असावा असे वाटते. इंग्रजी अनुवादात इथे ‘Kumari’ म्हटले आहे पण फासी पाठात ‘कनोरी’ (‫ )کنوري‬आहे. हे दठकाण औरंगाबादच्या उत्तरेस फुलांब्री तालु क्यातील कान्होरी गाव असावे. इंग्रजी अनुवादात इथे मुहरमम म्हटले आहे पण फासी पाठात मतहना ददले ला नाही त्यामुळे याच्या आिीच्या मतहन्याचा उल्ले ख, रतब-उल-अव्वल इथे अणभप्रेत आहे.

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९५

खान याला इखलास खान ही पदवी ददली गेली. दाऊद खानाचा मुलगा [२१८] जामशीद खान बऱ्हाणपूरला आजारी पडला होता, तो वारला. गुरूवार, ६ एतप्रल १६८२ / ८ रतबउस-सानी १०९३1 ला खगम-गढचा जमीनदार व संभाचा सेवक धचमणाजी बादशाहाकडे

1

इंग्रजी अनुवादात इथे रतब-उल-अव्वल ददले आहे पण ते नजरचुक़ीने झाले असावे. फासी पाठात मतहना ददले ला नाही, म्हणजे याच्या आिी ददले ला मतहना, रतब-उस-सानी अणभप्रेत आहे.

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९६

आला व त्याला अंगरखा ददला गेला. कालीभीतचा जमीनदार प्रतापससिंह याचा मुलगा मकरंदससिंह याने दे य असले ले पैसे न भरल्यामुळे खान जहान बहादुर याने त्याला अटक केले . आदे शानुसार त्याला दरबारास पाठवले गेले. तो फक्त सात वषांचा होता. गुरूवार, ११ मे १६८२ / १४ जमाद-उल-अव्वल १०९३ ला त्याची सुटका करून त्याला परत घरी पाठवण्यात आले . शतनवार, १३ मे १६८२ / १६ जमाद-उल-अव्वल १०९३ ला लसकंदर आददल खानाचा दत यादगार अली याला एक अंगरखा व २००० रुपये ददले गेले व लसद्दी मसाऊद तबजापूरी याचा दत, शेख हसन याला अंगरखा व १००० रुपये दे ऊन तनरोप दे ण्यात आला. लसकंदर आददल खानाने पेशकश म्हणून पाठवले ला हत्ती व अंगठी स्वीकारली गेली नाही व या वस्तू दताकडे परत पाठवल्या गेल्या. गोळकोंड्याचा राजा कुत्ब-उल-मुल्क याचा दत, मुहम्मद मआसूम याने भेट घेतली व त्याला अंगरखा ददला गेला. त्याने दोन लक्ष ४४००० रुपयांची पेशकश सादर केली. शतनवार, २० मे १६८२ / २३ जमाद-उल-अव्वल १०९३ ला शरीफ खान टे हळणी करायला गेला असता शत्रू समोर आला व तुंबळ युद्ध झाले , बरेच कातफर मारले गेले. जातहद खान चुराघासी तसेच सईद खानाचे नातू सैफुल्लाह व एकसानुल्लाह मारले गेले. करावल बेगी कमरुद्दीन खान याने बंदुक़ीच्या तीन गोळ्यांनी नीलगाय मारून बादशाहाला सादर केली. ततची लांबी ३ गज ६.५ तगरा, उंची २ गज ३ तगरा व शेपुट १ गज ३.५ तगरा होती. मंगळवार, २३ मे १६८२ / २६ जमाद-उल-अव्वल १०९३ ला रुहुल्लाह खानाला सोने वापरून घडवले ली तलवार [२१९] दे ऊन नगर जवळ बंडखोरांना िडा लशकवायला पाठवले गेले. हयात खानाला रामसेज तकल्ल्यावरील आक्रमणासाठी सजावल नेमले गेले. बुिवार, १४ जून / १८ जमाद-उस-सानी ला मुहम्मद आजम शाह याला तवजापुरास कूच करायचा तनरोप ददला गेला. त्याला एक अंगरखा, दोन घोडे, एक हत्ती, एक मुत्तका, एक कलगी, एक पहुंची व एक असी ददली गेली. बीदर बख्त याला एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती दे ऊन त्याच्या वधडलांबरोबर पाठवले गेले. शाह (आजम) याचा दत्तक मुलगा मुहम्मद पनाह याला पाचूचा परखानाह ददला गेला. शमशुद्दीन खान व पादशाहजाद्याच्या इतर सेवकांचा सन्मान केला गेला. शरीफ खानाला कललच खानाच्या जागी कहिंदुस्तानचा सद्र नेमले गेले. यशवंतराव दख्खनीला चार हजारी (तततकेच स्वार) व एक रत्नजधडत असी ददली गेली. इब्फ्तकार खानाची मुले अब्दुल्लाह,

अध्याय २५

४ सप्टें बर १६८१ ते २३ ऑगस्ट १६८२

१९७

अब्दुल हादी व अब्दुल बाक़ी वधडलांच्या मृत्यूनंतर दरबारास आले व त्यांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. सोमवार, २६ जून १६८२ / १ रज्जब १०९३ ला बादशाहाला कळले क़ी १६ जून १६८२ / २० जमाद-उस-सानी १०९३ ला अहमदाबादचा सुभेदार हाफ़ीज मुहम्मद आमीन खान वारला. तो ताठ मानेचा, उदार, मृदुभाषी व बादशाहाशी तनष्ठावंत होता. त्याची स्मरणशक्त़ीही उत्तम होती. अहमदाबादच्या सुभद े ारीत अगदी थोड्या वेळात त्याने कुराणाचे पाठांतर पूणम केले होते. त्याच्या जागी मुख्तार खानाला अहमदाबादची सुभेदारी [२२०] ददली गेली व खान जमानला त्याच्या जागी माळव्याचा सुभेदार नेमले गेले. मुघल

खानाला खान जमानच्या जागी बऱ्हाणपूरला थांबायला सांतगतले गेले. फखर खानाचा मुलगा मुफ्तखर खान याला मुख्तार खानाचा मुलगा कमरुद्दीन खान याच्या जागी करावल बेगी नेमले गेले व कमरुद्दीन खानाला त्याच्या वधडलांबरोबर पाठवले गेले. आततश खानाला लसलाह खानाच्या जागी मीर तुझुक केले गेले. कान्होजी दख्खनी याने बादशाहाची भेट घेतली व त्याला पाच हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. शुक्रवार, १८ ऑगस्ट १६८२ / २४ शाबान १०९३ ला खान जहान बहादुर जफरजंग कोकलताश गुलशनाबादहून (नालशक) आला व भेट घेतली. त्याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व बादशाहाच्या स्वयंपाकघरातील पदाथांची चौदा ताटे ददली गेली. सय्यद मुनव्वर खान याला मुघल खानाच्या जागी बऱ्हाणपूरला पाठवले गेले. आमीर खानाचा मुलगा व खवासींचा सरबारी मीर अब्दुल करीम हा बादशाहाचा आवडता होता. हाफ़ीज इब्रातहमचा मुलगा अब्दुल काददर, याच्या जागी त्याला जानमाजखानाहचा दरोगा नेमले गेले. मुल्ला अब्दुल्लाह लसयालकोटी याचा लशष्य आणण वाकनतवस इखलासकेश याला त्याने इस्लाम स्वीकारल्यानंतर रतववारी हे तवशेष नाव दे ण्यात आले व त्याला खरेदी खात्याचा मुश्रीफ नेमले गेले. [२२१]

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

१९८

अध्याय २६ राजवटीचे सव्वीसावे वषम – तहजरी १०९३-९४ २४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३ * * * * शुक्रवार, २५ ऑगस्ट १६८२ / २ रमजान १०९३, धमझाम अबु सैद याचा मुलगा व नूरजहान बेगमच्या भावाचा मुलगा हमीदुद्दीन खान, याला ददवंगत करमुल्लाह खान याच्या जागी मुग ं ीपट्टणचा फौजदार म्हणून पाठवले गेले. मृताच्या मुलांना अंगरखे ददले गेले. सोमवार, २८ ऑगस्ट १६८२ / ५ रमजान १०९३ ला दं डा राजापुरीचे फौजदार याकुत खान व खैरीयत खान यांच्यासाठी मानाचे अंगरखे बहरामंद खानाकडे सुपूतम केले गेले. ३० ऑगस्ट १६८२ / ७ रमजान १०९३ ला खान जहान बहादुर कोकलताश याला एक तवशेष अंगरखा, एक कमरबंद, एक घोडा व एक हत्ती दे ऊन गुलशनाबादला (नालशक) पाठवले गेले. जादव राय दख्खनीचा भाऊ जगदे व राय याने भेट घेतली व त्याला अंगरखा ददला गेला. शतनवार, २ सप्टें बर १६८२ / १० रमजान १०९३ ला दाराब खानाचा मुलगा मुहम्मद ताक़ी याचा तववाह बहरामंद खानाच्या मुलीशी केला गेला व त्याला एक अंगरखा, एक घोडा व एक मोत्यांचा सेहरा ददला गेला. ददवंगत आजम खान याचा मुलगा सलीह खान याला लशहाबुद्दीन खानाच्या जागी आहदींचा मीर बक्षी नेमले गेले. मीर सय्यद मुहम्मद तगसुदराज याचा [२२२] एक मुलगा सय्यद युसूफ याला एक हत्तीण दे ऊन गुलबग्यामला जायला सांतगतले होते, त्याला तनरोप दे ण्यात गेला. दरबारातील व प्रांतांमिील सवम सेवकांना पावसाळी अंगरखे ददले गेले. सोमवार, १८ सप्टें बर १६८२ / २६ रमजान १०९३ ला शाहजादा मुहम्मद मुईजुद्दीन बऱ्हाणपूरहून आला व त्याने भेट घेतली, त्याला एक अंगरखा धमळाला. खखज्र खान पानी याचा भाऊ रणमस्त खान, दाऊद खान व त्याचा भाऊ सुलैमान खान यांनी भेट घेतली व त्यांना अंगरखे धमळाले . दौलताबादचा तकल्ले दार सय्यद मुबारक खान दरबारास आला व नंतर परतला. लु त्फुल्लाह खानाला खास चौक़ी व बादशाही लवाजम्याचा दरोगा नेमले गेले. २८ सप्टें बर १६८२ / ६ शव्वाल १०९३ ला शाहजादा मुहम्मद मुईझुद्दीन याला अंगरखा, मोत्यांचा कंठा, पाचूचा मुत्तका, एक चपळ घोडा व एक हजारीची वाढ दे ऊन त्याला आठ हजारी (६००० स्वार) दे ऊन अहमदनगरच्या जवळ बंडखोरांना िडा लशकवायला पाठवले गेले.

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

१९९

रणमस्त खान, दाऊद खान, घजनफर खान व इतर हाताखालचे सरदार व (शाहजाद्याचे) सेवक यांना बणक्षसे दे ऊन पाठवले गेले. बुिवार, ४ ऑक्टोबर १६८२ / १२ शव्वाल १०९३ ला सद्र शरीफ खान, याचा मृत्यू झाला. त्याची मुले मुहम्मद आददल व मुहम्मद सालीह यांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. शेख मखदुम मुनशी याला मुख्य सद्र नेमले गेले व मुहम्मद सालीह कामबुह याला मीर हुसैनच्या जागी सद्रचा पेशदास्त नेमले गेले. सरदार तारीन याला लशवगावचा फौजदार नेमले गेले. रुहुल्लाह खानाचा भाऊ अजीजुल्लाह खान याला मुहम्मद यारच्या जागी मीर तुजुक नेमले गेले. इखलासकेश याला जानमाजखानाहचा मुश्रीफ नेमले गेले. [२२३] खलीफा सुलतानचा जावई हेदायतुल्लाह याला ददल्लीचा ददवाण म्हणून पाठवले गेले. शुक्रुल्लाह खानाला लसकंदराबादचा फौजदार तर कामील खानाला सहारणपूरचा फौजदार नेमले गेले. तहम्मत खानाचा मुलगा मुहम्मद मसीह याला सलीह खानाच्या जागी मीर तुजुक नेमले गेले. २३ ऑक्टोबर १६८२ / २ जजल्कदा १०९३ ला बादशाहाला कळले क़ी अजमेरचा फौजदार इनायत खान मरण पावला आहे. गुरूवार, २ नोव्हेंबर १६८२ / १२ जजल्कदा १०९३ ला रुहुल्लाह खानाची आई हमीदा बानू बेगम वारली. बादशाहाने कृपाळू होऊन मुहम्मद काम बक्ष व मीर बक्षी अशरफ खान यांना रुहुल्लाहच्या घरी जाऊन त्याचे सांत्वन करून त्याला दरबारास आणायला पाठवले . जझतुस्त्न्नसा बेगमने आदे शानुसार त्याच्या घरी भेट ददली. मंगळवार, ५ धडसेंबर १६८२ / १५ जजल्हेज १०९३ ला कामयाब खान याला दख्खनचा बक्षी नेमून खान जहान बहादुरच्या सैन्यात पाठवले गेले. ददवंगत हातफज मुहम्मद आमीन खान याच्या बतहणीचा मुलगा सय्यद मुहम्मद अहमदाबादहून आला व भेट घेतली. त्याला एक अंगरखा धमळाला. ददल्लीच्या पलं गतोश खान बहादुरचा मुलगा सुभानवदी याने भेट घेतली व त्याला अंगरखा धमळाला. मंगळवार, २६ धडसेंबर १६८२ / ६ मुहरमम १०९४ ला मुकरमम खानाच्या अनुपब्स्थतीत लशहाबुद्दीन खानाला त्याच्या जागी गुजमबदामरांचा दरोगा नेमले गेले. सय्यद उघलान याला त्याचा सहाय्यक नेमले गेले. खानइ-सामान मुहम्मद अली खान अशक्तपणामुळे कठड्यावरून खाली पडला. बादशाहाने त्याला गुलाबपाणी, तबद-इ-धमश्क व काही डासळिंबे ददली. औरंगाबाद शहराभोवती कोट उभारायचे काम [२२४] इहतमाम खानाला ददले गेले. अमानत खानाचा मुलगा अब्दुल काददर याने वचन ददले क़ी हे काम तो चार मतहन्यात पूणम करेल. शतनवार, २० जानेवारी १६८३ / १ सफर १०९४ ला खान जहान बहादुर औरंगाबाद पासून तीन कोसांवर आला.

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

२००

त्याचा मुलगा नुस्रत खान याच्या बरोबर एक अंगरखा पाठवला गेला व त्याला आदे श ददला क़ी त्याने भेटी करता न येता बीदरकडे जाऊन ततथेच थांबावे म्हणजे अकबर येईल त्या ददशेने त्याला त्याच्या मागावर जाता येईल. मंगळवार, ६ फेब्रुवारी १६८३ / १८ सफर १०९४ ला खान जहान बहादुर ने बादशाहाला कळवले क़ी बंडखोर अकबर संभाच्या राज्यातून बाहेर पडला व समुद्रामागे पळू न गेला. बादशाहाने आदे श ददला क़ी दोन हजारी खालील मनसबदारांनी बादशाहाचा तनरोप घेताना फाततहाचे वाचन पूणम होईपयंत थांबू नये, याला अपवाद म्हणजे फाततहा वाचताना बादशाहा स्वतः हात वर करून ज्या अधिकाऱ्यांवर कृपादृष्टी करेल फक्त त्यांनीच थांबावे. तसेच पदच्युत केले ल्या काझींना पुन्हा काझी पदावर नेमले जाऊ नये असा आदे श ददला गेला. गुरूवार, २२ फेब्रुवारी १६८३ / ५ रतब-उल-अव्वल १०९४ ला लसलाह खानाकडे शंभर अरबी, इराक़ी, तुरक़ी व कच्छी घोडे, शंभर उंट, वीस खेचरे, एक उंच हत्ती, ८०००० रुपयांची रत्ने, २००० रुपयांचा अंगरखा व १४००० रुपयांचे इतर कपडे सोपवले गेले. हे सगळे पादशाहाजादा मुहम्मद आजम शाह याच्यासाठी होते. तर शाहजादा बीदर बख्त व गायती आरा बेगम यांच्यासाठी अंगरखे व त्यांच्या इतर अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या पदानुसार अंगरखे ददले गेले व त्याला आदे श ददला गेला क़ी त्याने प्रत्येक सरदाराला इस्स्तकबाल करण्यासाठी पुढे बोलवून त्याला अंगरखा द्यावा व त्यांनी बादशाहाला अणभवादन केल्यानंतर पादशाहजाद्याकडे जावे. बुिवार, २८ फेब्रुवारी १६८३ / ११ रतब-उल-अव्वल १०९४ ला आदे शानुसार काम बक्ष याने जुन्या घुसलखान्यात दरबार भरवला [२२५] व बादशाहाच्या तसेच त्याच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला गेला. पादशाहाजादा दरबार भरवेल तेव्हा बहरामंद खानाला उपब्स्थत राहण्याचा तसेच दरबारात उभे राहण्याचा आदे श ददला गेला. रतववार, ४ माचम १६८३ / १५ रतब-उल-अव्वल १०९४ ला पादशाहाजादा काम बक्ष याचा तववाह लसयादत खान सफावीची मुलगी आजमम बानू तहच्याशी करण्यात आला. खखदमतगार खानाने पादशाहाजाद्याच्या घरी अध्याम बायांचा मोती तवणले ला एक तवशेष अंगरखा नेऊन ददला व खखदमत खानाने दोन लक्ष सव्वीस हजार रुपयांची रत्ने नेऊन ददली. बादशाहाला सलामी म्हणून पाच लक्ष रुपये रोख, दोन अरबी व इराक़ी घोडे व एक हत्ती ददला गेला. काझी शेख-उल-इस्लाम याच्या उपब्स्थतीत मलशदीत लग्र लावले गेले.

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

२०१

रात्रीचा एक प्रहर झाल्यानंतर बादशाहाने स्वतः पादशाहाजाद्याच्या डोक्यावर सेहरा ठे वला व आदे शानुसार सवम नामदारांनी घुसलखान्याच्या दे वडीपासून ते झीनतुस्त्न्नसाच्या दे वडीपयंत पायी एका रांगेत नवरदे वाला नेले. आनंदी व उत्साही वातावरणात हा समारंभ पार पडला. रतववार, ११ माचम १६८३ / २२ रतब-उल-अव्वल १०९४ ला तवजापूरचा एक नामदार हुसैन धमयाना याने बादशाहाची भेट घेतली व घुसलखान्याच्या दरवाज्यापाशी आततश खानाने त्याचे स्वागत केले . भेटीच्या वेळी चबुतऱ्यावरून अशरफ खान त्याला ‘सुस्वागतम’ म्हणाला. त्याला पाच हजारी (तततकेच स्वार), तनशाण, नगारे तसेच [२२६]

फतहजंग खान ही उपािी व ४०००० रुपये इनाम ददले गेले. त्याच्या भावाला व नातेवाईकांना सुयोग्य अंगरखे व पदे ददली गेली. रूपससिंह याचा भाऊ व मंडलपूरचा फौजदार मानससिंह याला दलपतच्या जागी बिनौरच्या फौजदारीचा अततररक्त भार ददला गेला. महाससिंह भादुररयाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा उिवतससिंह याला राजा ही उपािी ददली गेली. ८ माचम १६८३ / १९ रतबउल-अव्वल १०९४ ला तबहारचा पदच्युत सुभेदार सैफ खान दरबारास पोहोचला. त्याने बादशाहाच्या अनुमती लशवाय प्रांताच्या कोशागारातून ५६००० रुपये काढले असल्यामुळे बादशाहाने भेट नाकारली. पैशाची परतफेड होईपयंत मुघल खानाने आदे शानुसार ३ एतप्रल १६८३ / १५ रतब-उस-सानी १०९४ पयंत त्याला बहरामंद खानाच्या कोठडीत ठे वले . मुकरमम खानाला भेट नाकारली गेल्यानंतर शतनवार, ३१ माचम १६८३ / १२ रतबउस-सानी १०९४ ला त्याला भेटीचा मान दे ण्यात आला. खुसरो बेग याने हाफ़ीज मुहम्मद आमीन खान याची मालमत्ता अहमदाबादहून दरबारास आणली ती अशी – सत्तर लक्ष रुपये, एक लक्ष पसतीस हजार अशरफ़ी व इब्रातहमी नाणी, ७६ हत्ती, ४३२ घोडे, ११७ उंट, ११४ खेचरे, धचनीमातीच्या वस्तुंच्या दहा पेट्या, ६० गाडे (रहकला), एक मण तोफगोळे , ५४ मण तोफेची दारू. शतनवार, २१ एतप्रल १६८३ / ४ जमाद-उल-अव्वल १०९४, बादशाहाला कळले क़ी दुजमनससिंह हाडा याने बूंदीच्या तकल्ल्याला वेढा घालू न तो घेतला. २५ एतप्रल १६८३ / ८ जमाद-उल-अव्वल १०९४ ला बुखाऱ्याच्या राजाचा दत मुहम्मद शरीफ याने भेट घेतली व त्याला अंगरखा ददला गेला. बक्षी-उल-मुल्क [२२७] रुहुल्लाह खान कोकण मोतहमेहून दरबारास आला व त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व एक अरबी

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

२०२

घोडा ददला गेला. अजीजुल्लाह, त्याचा भाऊ नवाजजश खान रुमी आणण आक्रम खान दख्खनी यांना प्रत्येक़ी एक अंगरखा व हत्ती ददला गेला. शाह आलमचा सेवक व रुहुल्लाहच्या हाताखाली काम करणारा बारयाचा सय्यद अब्दुल्लाह म्हणजे सय्यद धमया, एक हजारी (६०० स्वार), याला बादशाही सेवेत मनसब (जातबता) धमळाली. बारयाच्या सय्यद नूर मुहम्मद याला सय्यद खान ही उपािी धमळाली. अबुल हसन कुत्बउल-मुल्क याने त्याचा सवमशक्त़ीशाली मंत्री मदाण्णा ब्राह्मण याच्या सांगण्यावरून हैदराबादचा नामदार सय्यद मुजफ्फर याला अटक केली होती. बादशाहाच्या सांगण्यांनुसार बादशाही दताने त्याला ततथून सोडवले व तो दरबारास आला. भेटीच्या ददवशी त्याला एक तवशेष अंगरखा व एक रत्नजधडत खंजीर ददला गेला. त्याच्या दोन मुलांना उच्च मनसबी धमळाल्या व आसालत खान आणण नजाबत खान या उपाध्या धमळाल्या. ९ मे १६८३ / २२ जमाद-उल-अव्वल १०९४ ला गरयाचा जमीनदार छत्रससिंह याचा भाऊ हरीससिंह याने भेट घेतली व त्याला अंगरखा धमळाला. बबमर प्रांताच्या (मघरीबजमीन) राजाचा भाऊ सय्यद अहमद, बादशाहाकडे आला, त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व ५००० रुपये दे ऊन त्याचा मोठा सन्मान केला गेला. दुजमनससिंह याला संपवण्यासाठी मुघल खानाची नेमणूक केली गेली. भावससिंहाचा नातू अतनरुद्धससिंह याला एक अंगरखा, घोडा, हत्ती व नगारे दे ऊन बूंदीला पाठवले गेले. [२२८] महाससिंह भादुररयाचा मुलगा उद्वतससिंह, हाफ़ीज मुहम्मद आमीन खानाच्या बतहणीचा मुलगा सय्यद मुहम्मद अली, सुलैमान शुकोहचा जावई ख्वाजा बहाउद्दीन व इतरांना अंगरखे, घोडे व हत्ती ददल्यानंतर उपयुमक्त खानाच्या (मुघल खान) सोबत जायला नेमले गेले. सोमवार, २१ मे १६८३ / ४ जमाद-उस-सानी १०९४ ला काश्गरचा दत आयुब बेग याला अंगरखा व २००० रुपये दे ऊन तनरोप दे ण्यात आला. ख्वाजा अब्दुर रहीम याला तवजापूरला दत म्हणून पाठवले गेले, त्याला एक अंगरखा, एक घोडा व १००० रुपये धमळाले . सय्यद अब्दुल्लाह याला इज्जत खान ही उपािी परत केली गेली व मुहम्मद आजम शाहच्या सैन्यात ददवाण नेमले गेले. ददले र खान, फतहजंग खान व तवजापूर मोतहमेसाठी नेमले ल्या इतरांना मुहम्मद आजम शाह याच्या आगमनापयंत दरबारास थांबण्याचा आदे श ददला गेला. मनोहरदास गौडचा मुलगा तकशोरीदास सोलापूरचा तकल्ले दार झाला. लशहाबुद्दीन खानाने जुन्नरहून येऊन भेट घेतली.

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

२०३

शुक्रवार, २९ जून १६८३ / १४ रज्जब १०९४ ला जाफराबादहून (बीदर) शाहजादा मुहम्मद मुईझुद्दीन व बऱ्हाणपूरहून शाहजादा मुहम्मद अजीम आले व त्यांनी भेट घेतली. शाहजादा मुहम्मद रफ़ी-उल-कद्र याने स्वतःच्या हस्ताक्षरातील नास्तललक दाखवले व त्याला माणकाचा लशरपेच ददला गेला. रतववार, १५ जुलै १६८३ / ३० रज्जब १०९४ ला पादशाहजादा शाह आलम बहादुर याच्या आयुष्यातील ४१ वे वषम सुरू झाले , त्याला एक लक्ष पाच हजार एकशेऐंशी रुपयांचा रत्नजधडत लशरपेच ददला गेला. बादशाहाला कळले क़ी मुल्ला अब्दुल हक़ीम लसयालकोटी याचा मुलगा व तवद्वान मुल्ला अब्दुल्लाह वारला. बादशाहाने [२२९] त्याची चार मुले व तविवा यांना अंगरखे व भत्त्यात वाढ दे ऊन त्यांचा सन्मान केला. या महान तवद्वानाकडे एवढी ज्ञानसंपदा असूनही तो अत्यंत सदाचारी होता व त्याने ऐतहक लशक्षण तसेच अध्यास्त्मक ज्ञान यांची सांगड घातली होती. सूज्ञपणा व पातवत्र्याचे मूल्य बादशाहाला कळत असल्यामुळे त्याला अशा लोकांची खरी योग्यता ठाऊक होती. त्यामुळे अजमेरला राहत असताना त्याला सद्र चे पद दे ऊ करण्यासाठी बादशाहाने स्वतःच्या हाताने पत्र ललतहले होते. तवद्वान व फक़ीरांशी मैत्री असल्यामुळे बख्तावर खान मध्यस्त बनून त्यांचे अजम बादशाहापयंत पोहोचवायचा. त्यामुळे बादशाहाने बख्तावर खानाला त्याच्या वतीने मुल्लाला याबद्दल पत्र ललहायला सांतगतले . फमामन व पत्र धमळाल्यावर मुल्लाने उत्तरात ललतहले क़ी, ‘ही (जगापासून) तवभक्त होण्याची वेळ आहे, ऐतहक प्रलसद्धी धमळवण्याची नाही. बादशाहाच्या आदे शानुसार मी दरबारास जाईन व ख्वाजा मुईनुद्दीन तसेच बादशाहाच्या भेटीचे आशीवामद घेईन’. बादशाहाला त्या महान तवद्वानाचे शब्द रुचले . त्याने ललतहल्या प्रमाणे तो अजमेरला दरबारास येऊन सतत बादशाहाच्या सातनध्यात काही ददवस रातहला. संताच्या थडग्याला भेट ददल्यानंतर बादशाहाच्या अनुमतीने तो घरी परतला व (काही काळाने) ततथेच वारला. [२३०] बादशाहाला कळले क़ी पादशाहाजादा मुहम्मद आजम शाह याला नीरा

नदीच्या तटावरून भेटीस बोलावले असता त्याने मुसळिार पावसात व बरोबर पुरेसे भारवाही नसतानाही लांब पल्ले गाठत ततथवर पोहोचला होता व त्याच्या स्वतःकडे ही लहानसा तंबू होता. बादशाहाने स्वतःचा एक तंबू ईदगाह जवळ त्याच्यासाठी ठोकायला सांतगतले . संध्याकाळी बादशाहाला कळले क़ी पादशाहजादा घोड्यावरून परत येत असताना फतहजंग खानाचा हत्ती उिळला व सैन्यातील लोकांवर चालू न जात आजम

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

२०४

शाहकडे िावला. त्याने त्यावर एक बाण चालवला परंतु तो जवळ आला. त्याच्या घोड्याने दगा ददल्याने तो खाली उतरला व हत्तीला सामोरे जाऊन त्याच्या सोंडेवर वार केला. तोवर इतस्तत: तवखुरले ले त्याच्या पहाऱ्यातील सैतनक िावून आले व हत्तीवर वार करून त्याला मारले . आदे शानुसार पादशाहजादा मुहम्मद काम बक्ष व रुहुल्लाह खान त्याच्याकडे (आजम) गेले व बादशाहाच्या वतीने त्याला ४००० रुपये व काम बक्ष याच्याकडू न ५०० मोहरा तसेच रुहुल्लाह कडू न १०० मोहरा व १००० रुपये सादर केले . ददवसाचे तीन प्रहर व एक तास झाल्यावर काम बक्ष तनघाला. दुसऱ्या ददवशी बादशाहाशी भेट ठरले ली असताना, पादशाहजादा व एक हजारी पयंत सवम नामदार आजमला भेटायला पुढे गेले. प्रत्येकाने त्यांच्या पदानुसार भेटवस्तू सादर केल्या. आदे शानुसार आजम शाह त्याच्या छावणीतले आनंदी संगीत बाजवत तकल्ल्यात पोहोचला. शाहजादा बीदर बख्त याला ही भेटीचा मान धमळाला. [२३१] आजम शाहाच्या घराची दुरुस्ती करायची असल्यामुळे ती पूणम होईपयंत त्याला जुन्या ददवान-ए-आमच्या जवळील महालात राहायची अनुमती धमळाली. बादशाहाचा एक सेवक मुहम्मद सलीम अस्लम याने या घटनेची तवस्तृत मसनवी ललतहली. [**गाळली आहे**] [२३४] रशीद खानाने बादशाहाला कळवले क़ी त्याच्या आदे शानुसार अमीर-

उल-उमरा याने गौहाटीत खचम केले ले पंचावन्न लक्ष रुपये त्याच्याकडू न वसूल करायचे होते पण त्याने उलटा तनरोप पाठवला क़ी सगळे धमळू न फक्त सात लक्ष रुपयेच खचम झाले होते. उरले ली रक्कम बंगाल प्रशासनाला मदत करण्यासाठी पाठवले ल्या सामानाची ककिंमत होती. बादशाहाने आदे श ददला क़ी केवळ तेवढीच रक्कम त्याच्याकडू न वसूल केली जावी. गुरूवार, २६ जुलै १६८३ / ११ शाबान १०९४ ला आजम शाह याच्या दासीला त्याच्यापासून एक मुलगा झाला, त्यासाठी बादशाहाकडे १००० मोहरा पाठवल्या गेल्या. मुलाचे नाव वालाजाह ठे वले गेले. हाजी शफ़ी खान याला खान जहान याने बादशाहासाठी जजिंकले ल्या नवीन प्रांतांची धमळकत व प्रशासनाची पाहाणी करण्यासाठी पाठवले गेले.

ٔ ٔ ‫منش سيوا بار‬ ‫ز‬ ٔ - ‫رقم دولت بر ناصيه طالع کشيد‬ ‫اده‬ ‫قاض حيدر‬ ِ ‫بندگ‬ ٔ ٔ ٔ ‫بمرحمت خلعت و ده هزار روپيه و منصب دوهز‬ ‫اري مفتخر گرديد‬ ِ ِ

अध्याय २६

२४ ऑगस्ट १६८२ ते १३ ऑगस्ट १६८३

२०५

लसवाचा मुनशी काझी हैदर बादशाहाकडे सेवेच्या इच्छे ने आला. त्याला एक अंगरखा, दहा हजार रुपये व दोन हजारी अशी मनसब ददली गेली. आदे शानुसार हक़ीम मुहसन खान ददल्लीतील खजीन्याच्या तुकडी सोबत दरबारास आला व ददले ल्या लशक्षेतून त्याला मुक्त करण्यात आले . धमझाम सद्रुद्दीन याला खान ही उपािी व रामगीरची फौजदारी धमळाली. २७ जुलै १६८३ / १२ शाबान १०९४ ला कुत्ब-उल-मुल्क याने खान जहानकडे व त्याने दरबारास पाठवले ला रत्नजधडत हार, मोत्यांची असी व दोन हत्ती असे सगळे बादशाहाला दाखवले गेले. ५ ऑगस्ट १६८३ / २१ शाबान १०९४ ला [२३५] बादशाहाने औरंगाबाद तकल्ल्यातील मुहम्मद आजम शाह याच्या पहारेकऱ्यांच्या खोलीला भेट ददली. पादशाहजाद्याला भेट म्हणून २७५ रुपयांची एक अंगठी, जहानझेब बानू बेगम तहला मोत्यांचा कंठा व १४००० रुपयांचे माणकाचे लोलक, आजम शाहची मुलगी गायतीआरा बेगम तहला १९००० रुपयांचा मोत्यांचा कंठा, तबजापुरी महल तहला २२० रुपयांचे रत्नजधडत कडे ददले गेले. आजम शाह याने पेशकश म्हणून २,९८,४०० रुपये ददले जे बादशाहाने मोठ्ा मनाने स्वीकारले . रणमस्त खानाला बहादुर खान ही उपािी ददली गेली. सोमवार, १३ ऑगस्ट १६८३ / २९ शाबान १०९४ ला मुघल खानाचे पत्र धमळाले क़ी त्याने बूद ं ीवर अचानक आक्रमण केले , तीन प्रहर गोळ्या व बाणांचा वषामव सुरू होता, शेवटी रात्रीच्या अंिाराचा फायदा घेत दुजमनससिंह पळू न गेला. त्यानंतर बादशाही सैन्याबरोबर अतनरुद्धससिंह याने बूद ं ीत प्रवेश केला.

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२०६

अध्याय २७ राजवटीचे सत्तातवसावे वषम – तहजरी १०९४-९५ १४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४ * * * * [२३६] रमजानचा मतहना बादशाहाने राजवाड्यातील मलशदीत दानिमम

करण्यात घालवला. सोमवार, २० ऑगस्ट १६८३ / ७ रमजान १०९४ ला मुहम्मद आजम शाह याला एक अंगरखा, लशरपेच, रत्नजधडत खंजीर, एक हत्ती, १०० घोडे व दोन लक्ष रुपये दे ऊन तवजापूर मोतहमेवर पाठवले गेले. बीदर बख्त याला एक अंगरखा, एक लशरपेच, एक कलगी, एक खंजीर व एक हत्ती दे ऊन वधडलांबरोबर पाठवले गेले. सय्यद शेर खान, इखलास खान, कमालु द्दीन खान व पादशाहजाद्याच्या सैन्यात तनयुक्त केले ल्या इतरांचाही सन्मान केला गेला. शुक्रवार, १७ ऑगस्ट १६८३ / ४ रमजान १०९४ ला काब्श्मरचा सुभेदार इब्रातहम खान याचे पत्र धमळाले क़ी त्याचा मुलगा तफदाई खान याने घेतले ल्या पररश्रमांमळ ु े जमीनदार दलाई कडू न ततबेट जजिंकून बादशाही साम्राज्याखाली आणले गेले होते. बादशाहाने दरबारातील उपब्स्थतांना या तवजयाबद्दल अणभवादन करण्याचा व आनंददायी संगीत वाजवायचा आदे श ददला. या तवजयाबद्दल इब्रातहम खान याला दोन हजारीची वाढ दे ऊन पाच हजारी (तततकेच स्वार, २००० दो अस्पा), एक कोटी दाम बक्षीस, प्रशस्तीचे फमामन, एक तवशेष अंगरखा, ७००० रुपये ककिंमतीचा मोत्याचा इलाका असले ला रत्नजधडत फुल कटारा खंजीर, २०० मोहर ककिंमतीचा व सोन्याच्या साजाचा अरबी घोडा व बादशाहाच्या स्वतःच्या हत्तीशाळे तील १५००० रुपये ककिंमतीचा हत्ती ददला गेला. त्याच्या आज्ञािारक मुलाला [२३७] सात सदी (४०० स्वार) वरून एक हजारी (७०० स्वार) तसेच एक तवशेष अंगरखा, सोन्याची कारीगरी व मुलाम्याचा साज असले ली तलवार, १०० मोहरा ककिंमतीचा सोन्याचा साज असले ला इराक़ी घोडा व ११००० रुपये ककिंमतीचा एक हत्ती ददला गेला. आदे शानुसार आततश खान हा मुहम्मद आजम शाह याच्या सैन्यात गेला व मीर खानाचा मुलगा मुहम्मद हादी याला दरबारास घेऊन आला. प्रथम त्याला रुहुल्लाह

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२०७

खानाच्या व नंतर सलाबत खानाच्या कोठडीत ठे वले गेले. शुक्रवार, ७ सप्टें बर १६८३ / २५ रमजान १०९४ ला त्याला दौलताबादच्या तकल्ल्यात ठे वायचा आदे श झाला. १५ सप्टें बर १६८३ / ३ शव्वाल १०९४ ला आदे शानुसार शाह आलम बहादुर याच्या आघाडीच्या छावण्या सुमिुर संगीत वाजवत कोकण, रामदरा व मराठ्ांच्या इतर प्रांतांतील शत्रूला संपवण्यासाठी औरंगाबाद शहराबाहेर आल्या. ददले र खान अफगाण गंभीर आजाराने मरण पावला. त्याने अनेक युद्धात चांगली कामतगरी केली होती. तो कणखर बांध्याचा व प्रचंड शक्त़ीवान होता. त्याचे खाणेही भरपूर होते व सैन्यावर त्याची पकड होती, त्याला नेहमी सुदैवाची साथ लाभली. आता काही िार्मिंक संतांच्या थडग्यांची तसेच वेरूळ गावाची थोडी मातहती दे तो. औरंगाबादहून आठ कोसावर व दौलताबाद तकल्ल्याहून तीन कोसावर शेख बुहामनद्द ु ीन, शेख झैन-उल-हक, शेख मुन्ताखाबुद्दीन झारबक्ष, ददल्लीचा मीर हसन [२३८], मीर सय्यद मुहम्मद तगसुदराज याचा तपता सय्यद राजू व ईश्वराचे इतर ज्ञानी यांची पावन थडगी आहेत. यातील बहुतेक सगळे तनजामुद्दीन औललयाचे अनुयायी होते. ही सवम जगाची तीथमक्षेत्रे आहेत. हे सवम पूज्य लोक तुघलकचा मुलगा मुहम्मद शाह मललक जुना याच्या पररश्रमांमुळे या दे शात आले . दे वतगरी तकल्ल्याचे नामकरण दौलताबाद असे करून ततथे राजिानी स्थापन करायची तुघलकची इच्छा होती व त्याने ददल्लीतील लोकांना त्यांच्या जनानखान्यासतहत इथे हलवले होते. इथून काही अंतरावरच वेरूळ1 नावाचे दठकाण आहे जजथे कैक वषांपूवी हातात जाद असणाऱ्या पाथरवटांनी डोंगर पोखरून एक कोस लांब जागेत भली मोठी घरे खोदली आहेत. ततथल्या सवम भभिंती व छतांवर जजवंत वाटावी अशी लशल्पे कोरली आहेत. वरवर हे डोंगर अगदी इतर सामान्य डोंगरांसारखे ददसतात, इतके क़ी त्यांच्या पोटात असे काही बांिकाम असेल याची बाहेरून जराही शंका येत नाही. पुरातन काळी जेव्हा हा दे श कातफरांच्या अधिपत्याखाली होता तेव्हा भुतांनी (जजन) नव्हे, तर त्यांनीच (कातफरांनी) हे सगळे बांिले असणार. पण या बाबतीत परंपरा काहीतरी वेगळे सांगते. खोट्या िमामवर तवश्वास ठे वणाऱ्या जमातीचे हे पुजेचे दठकाण होते. याचा पाया जरी भक्कम असला तरी सध्या ते अगदी मोडकळीला आले ल्या ब्स्थतीत आहे. भतवष्याचा 1

फारसी पाठात याला (‫‘ )الوره‬अलोरा’ म्हटले आहे.

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२०८

तवचार करणाऱ्यांना (शेवटाची) चुणूक दाखवण्याचे काम हे दठकाण करते. सवम ऋतुंमध्ये आणण तवशेष करून पावसाळ्यात जेव्हा पाणी भरपूर उपलब्ि असते तेव्हा हा डोंगर व त्या खालची सपाटी तहरवळीमुळे एखाद्या बागेसारखी ददसू लागते व लोक हे पाहायला येतात. शंभर याडम रुं द िबिबा या डोंगरावरून खाली कोसळतो. ही जागा डोळ्यांना अततशय मनमोहक तसेच तफरण्यासाठी अत्यंत रमणीय आहे. प्रत्यक्ष बधघतल्या लशवाय, फक्त शब्दांत याचे योग्य वणमन करणे अशक्य आहे. मग माझ्या ले खणीतून या पानावर ही कथा मी कशी बरं उतरवू ? [२३९]

बादशाहा औरंगाबादहून अहमदनगरकडे कूि करतो शुक्रवार, १२ ऑक्टोबर १६८३ / १ जजल्कदा १०९४ ला बादशाहा कणमपुऱ्याला पोहोचला. तोफखान्याचा आवाज शत्रूच्या कानात घुमला. मंगळवार, ३० ऑक्टोबर १६८३ / १९ जजल्कदा १०९४ ला मुहम्मद आजम शाह व बीदर बख्त, जे बादशाहाकडे परतले होते, त्यांना अंगरखे, लशरपेच, हत्ती व एक तनमचाह दे ऊन गुलशनाबादला (नालशक) पाठवले गेले. सागरचा जमीनदार पाम नायक याने भेट घेतली व त्याला एक अंगरखा, एक तलवार व एक खंजीर ददला गेला. चंद्याची जमीनदारी रामससिंह कडू न तकशनससिंह याला ददली गेली. मंगळवार, १३ नोव्हेंबर १६८३ / ३ जजल्हेज १०९४ ला ददले र खान याने अहमदनगरला बांिले ल्या मातीच्या तकल्ल्यापाशी बादशाहा येऊन पोहोचला. काझी अब्दुल वह्हाबचा मुलगा काझी शेख-उल-इस्लाम हा त्याची योग्यता व स्वाभातवक ओढ यामुळे ईश्वराच्या भेटीकरता आतुर झाला होता. त्याने जगाचा त्याग करायचे ठरवले . बादशाहाने त्याला काझीचे पद, ज्यासाठी असे लोक सुयोग्य असतात, न सोडण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला. पण तो त्याच्या तवचारावर ठाम रातहला. बादशाहाला होकार द्यावा लागला. त्याच्या सूचनेनुसार बादशाही छावणीचे काझीपद काझी अब्दुल वह्हाबचा जावई सय्यद अबु सैद याला ददले गेले. तो ददल्लीहून आला व भेट घेतली. त्याला एक अंगरखा, एक तलवार व एक खंजीर ददला गेला. मंगळवार, २० नोव्हेंबर १६८३ / १० जजल्हेज १०९४ ला शहरनौच्या राजाचा दत मुहम्मद खलील [२४०] याला एक अंगरखा व १००० रुपये दे ण्यात आले . श्रीरंगपट्टणच्या जमीनदाराचे दत आले व त्यांनी २०० रुपये पेशकश ददली. सय्यद उघलान याला काम बक्षचा गुरू म्हणून तनयुक्त

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२०९

केले गेले. औरंगाबादचा काझी मुहम्मद सालीह याला ददल्लीचे काझीपद दे ण्यात आले व बादशाही छावणीचा मुफ्ती मुहम्मद अक्रम याला त्याच्या जागी औरंगाबादचा काझी म्हणून नेमले गेले. जानमाजखान्याचा दरोगा मीर अब्दुल करीम याला सात चौक़ीचा आमीन हा अततररक्त पदभार दे ण्यात आला. सरबुलंद खान (मुळचा ख्वाजा याकुब) याला बहादुरगडाजवळ बंडखोरांना िडा लशकवण्यासाठी पाठवले गेले. कामगार खानाला मुघल खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले. कवामुद्दीन खानाचा मुलगा शुजाअत खान याला मीर आततश तर मतलब खानाला अहदींचा बक्षी नेमले गेले. मंगळवार, १८ धडसेंबर १६८३ / ९ मुहरममला १०९५ ला मध्यरात्री रुहुल्लाह खानाला नीरा नदीच्या जवळ तर बहरामंद खानाला अष्टी नदी जवळ शत्रूला परास्त करायला पाठवले गेले. ददले र खान ही उपािी धमळाले ल्या मामूर खान याने शत्रूवर चाल करून तवजय धमळवला. त्याला एक अंगरखा, फमामन, तुघ व तनशाण ददले गेले. सोमवार, २४ धडसेंबर १६८३ / १५ मुहरमम १०९५ ला शत्रूला अनेकदा परास्त केले ल्या लशहाबुद्दीन खानाला मुहम्मद गाझीउद्दीन बहादुर ही पदवी ददली गेली. [२४१] त्याचा भाऊ मुहम्मद आरीफ याला मुजातहद खान तर मुहम्मद सादीक खोश्ती याला सादीक खान ही पदवी धमळाली. दलपत बुंदेला, राजा उदवतससिंह व खानाच्या हाताखालच्या इतर लोकांचा त्यांच्या पदानुसार सन्मान केला गेला. आझम शाहचा सेवक मीर हाशीम याने मुलाच्या जन्माची वाताम दे णारे पादशाहजाद्याचे पत्र व सोबत १००० मोहरा सादर केल्या. मुलाचे नाव झीजाह ठे वले गेले व त्याला मोती तवणले ली टोपी, रत्नजधडत चश्मक व एक मोत्यांची लडी ददली गेली. मीर हाशीम याला अंगरखा व ५०० रुपये धमळाले . बातमी आली क़ी शत्रू पट्टण जवळ तवखुरला होता. मध्यरात्री बहरामंद खानाला िनुष्य व भाता दे ऊन त्यांना पळवून लावायला पाठवले गेले. रतववार, २७ जानेवारी १६८४ / १९ सफर १०९५ ला खान जहान बहादुर कडू न पत्र आले क़ी शत्रू कृष्णा नदीच्या तीरावर जमला होता. तो तीस कोसांवरून लगबगीने ततथे गेला व तुंबळ युद्ध झाले ज्यात कातफरांची कत्तल झाली व त्यांची मालमत्ता व स्त्स्त्रया जप्त केल्या गेल्या. त्याची प्रशंसा करणारे फमामन पाठवले गेले. त्याचा मुलगा मुजफ्फर खान याला तहम्मत खान, नुस्रत खान याला लसपाहदार खान, मुहम्मद शफ़ी याला नुस्रत खान, मुहम्मद बका याला मुजफ्फर खान व आजम खान कोकाह याचा मुलगा व बहादुर खानाचा जावई जमालु द्दीन खान याला सफदर खान ही उपािी धमळाली. अजमेरला असले ला उम्दत-उल-मुल्क

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२१०

आसद खान [२४२] दरबारास आला. शतनवार, २ फेब्रुवारी १६८४ / २५ सफर १०९५ ला बक्षी-उल-मुल्क अशरफ खान त्याचे स्वागत करायला घुसलखान्याच्या दरवाज्यापयंत पुढे गेला. ४ फेब्रुवारी १६८४ / २७ सफर १०९५ ला मुहम्मद आजम शाह व बीदर बख्त यांनी भेट घेतली व बुिवार, १३ फेब्रुवारी १६८४ / ७ रतब-उल-अव्वल १०९५ ला अंगरखे व रत्ने धमळाल्यावर ते बहादुरगडाकडे तनघाले . सलाबत खान नवलखा-अवि येथन ू आला व भेट घेतली, त्याला अंगरखा धमळाला. आजम शाहचा ददवाण मुकुलचंद याला अंगरखा दे ऊन पादशाहजाद्याला ददले ले साठ हत्ती घेऊन जायचा आदे श ददला गेला. सुफ़ी बहादुर काशगरहून सेवेच्या आशेने आला व भेट घेतल्यावर त्याला एक अंगरखा, सोन्याच्या साजाचा खंजीरपट्टा, तलवार व १००० रुपये ददले गेले. मंगळवार, ११ माचम १६८४ / ४ रतब-उस-सानी १०९५ ला रणदौला खान वारला. रतववार, १६ माचम १६८४ / ९ रतब-उस-सानी १०९५ ला शुक्रुल्लाह नजाम-इसानी याला असकर खान ही उपािी धमळाली, खान-इ-दौरानचा मुलगा सय्यद अहसान याला अहसान खान, मुशीद कुली खानाचा मुलगा मुहम्मद मुराद याला मुहम्मद मुराद खान ही उपािी धमळाली. सोमवार, ३१ माचम १६८४ / २४ रतब-उस-सानी १०९५ ला गाझीउद्दीन खान बहादुर याला िनुष्य, भाता, १०००० रुपये व दोन मण सोने दे ऊन पुणे व गढ-नमुनाच्या बाजूला पाठवले गेले. ददवंगत सआदुल्लाह खान याच्या मुलीच्या मुलाचा मुलगा कमरुद्दीन, याला चार सदी (१०० स्वार) अशी पतहली मनसब ददली गेली. शतनवार, ५ एतप्रल १६८४ / २९ रतब-उस-सानी १०९५ ला मुहम्मद नैम ददल्लीचा ददवाण झाला. रतववार, २० एतप्रल १६८४ / १५ जमाद-उल-अव्वल १०९५ ला बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान याला शाह आलम बहादुर याचे सहाय्य करण्यासाठी मोठे सैन्य ददले गेले. [२४३] पादशाहजाद्यासाठी २०००० अशरफ़ी, १०० घोडे, ५०० उंट, २५ खेचरे तसेच,

पादशाहजाद्याची मुले व अधिकारी यांच्या करता अंगरखे, रत्ने, हत्ती व घोडे त्याच्याकडे ददले गेले. त्याच ददवशी मुहम्मद आजम शाह, बीदर बख्त व वालाजाह यांना अंगरखे, रत्ने, घोडे व हत्ती दे ऊन पाठवले गेले. सफ़ी खानाकडे औरंगाबाद सुभ्याच्या रक्षणाची जबाबदारी ददली गेली. बहरामंद खान गुलशनाबाद वरून आला व भेट घेतल्यावर त्याला एक हत्ती ददला गेला. शुजाअत खानाला सफलशकन खान ही उपािी, एक तवशेष अंगरखा, एक जजघा, एक तनशाण व तुघ दे ऊन श्रीरंगपट्टणला पाठवले गेले. संभाचे ११२ सेवक पकडले गेले, त्यांना कोतवालीच्या चबुतऱ्यात अटकेत ठे वले होते. त्यांची डोक़ी

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२११

मारली गेली. ददले र खान मामूरी याचा मुलगा मुहम्मद यार याला मामूर खान ही उपािी दे ऊन त्याला त्याच्या वधडलांकडे पाठवले गेले. रतववार, ११ मे १६८४ / ६ जमाद-उससानी १०९५ ला सुलतान वालाजाह याला दररोज ८० रुपयांचा भत्ता मान्य केला गेला. शतनवार, १७ मे १६८४ / १२ जमाद-उस-सानी १०९५ ला ख्वाजा याकुत याने काम बक्ष याला मुलगा झाल्याची बातमी आणली, ख्वाजाला अंगरखा ददला गेला व पादशाहजाद्याला बालाबंद व अंगरखा आणण एक रत्नजधडत लशरपेच ददला गेला. हाजी इस्माईल खासनतवस याने ‘काम बक्षचा मुलगा’ असा त्या मुलाच्या जन्मददनाचा कालश्ले ष मांडला, त्याला अंगरखा दे ण्यात आला. मुलाचे नाव उम्मेद बक्ष ठे वण्यात आले . शुजाअत हैदराबादी सेवच्े या आशेने दरबारास आला व त्याला पाच हजारी (तततकेच स्वार) व शुजाअत खान ही उपािी दे ण्यात आली. इततकाद खानाला मोठ्ा सैन्यासह जाफराबाद (बीदर) कडे पाठवण्यात आले . [२४४] जालं िर दोआबचा फौजदार मीराक खान याला गुजरातचा फौजदार नेमले गेले. रतववार, १८ मे १६८४ / १३ जमाद-उस-सानी १०९५ ला शाह आलम बहादुर कोकणातून परतला व भेट घेतली, त्याला एक अंगरखा, तीन लक्ष नव्वद हजार रुपयांची रत्ने ददली गेली. त्याच्या मुलांनाही अंगरखे व रत्ने धमळाली. रुहुल्लाह खान व मुनव्वर खानाने भेट घेतली, त्यांना अंगरखे धमळाले . दुजमनससिंह याला परास्त करून बूंदीच्या अतनरुद्धससिंह याला मदत करायला गेलेला मुघल खान यशस्वी होऊन परतला व भेट घेतली, त्याला एक अंगरखा धमळाला व त्याची प्रशंसा केली गेली. हाजी महताब हैदराबादी याने बादशाहाच्या सेवेत येऊन अणभवादन केले . गुरूवार, २६ जून १६८४ / २३ रज्जब १०९५ ला कुत्ब-उल-मुल्क याचा दत मुहम्मद जाफर याने भेट घेतली. तो हाफ़ीज मुहम्मद आमीन खान याच्या गुरूंचा मुलगा होता. मुहम्मद आमीन जेव्हा आग्र्याहून काबुलला गेला तेव्हा त्याने त्याला बादशाहा समोर सादर करावे अशी तवनंती बख्तावर खानाने केली. भेट झाल्यानंतर त्याला मुहम्मद अकबर याच्या हाताखाली मनसब ददली गेली. अकबराच्या बंडाळी नंतर तो हैदराबादला गेला. मोठ्ा अमीरांशी त्याचे जवळचे संबंि आहेत असे भासवून त्याने अबुल हसन व त्याच्या मंत्र्यांना भुलवले व ऐन-उल-मुल्क ही उपािी धमळवली. कुत्बउल-मुल्क याला जेव्हा बादशाहाकडे दत पाठवायचा होता तेव्हा त्याच्या या थापांमुळे त्याची या कामावर नेमणूक झाली. त्याला हे स्वीकारण्यालशवाय काही पयामय नव्हता. भेटीच्या वेळी बख्तावर खान बादशाहाला म्हणाला, ‘हा माणूस [२४५] असा असा आहे’.

अध्याय २७

१४ ऑगस्ट १६८३ ते १ ऑगस्ट १६८४

२१२

बादशाहा म्हणाला, ‘अबुल हसनचा चावटपणा पहा, त्याने अकबरच्या चाकराला दत म्हणून माझ्याकडे पाठवले आहे’. जाफर मला ओळखत होता व त्याने मला भेटीची तवनंती केली. त्याची श्रीमंती, ऐश्वयम व उिळपट्टी बघून मी तवचारणा केली क़ी, ‘तू इथे का आलास ?’. तो म्हणाला, ‘जुन्या धमत्रांना भेटावेसे वाटले म्हणून’. मी म्हणालो, ‘तू चुक़ीचे वागलास’. दोन ददवसांनंतर अचानक कोतवाल त्याच्या घरी गेला, त्याला चबुतऱ्यावर आणले . त्याच्या घरातले सामान-सुमान, दास आणण रोख रक्कम जप्त केली गेली. काही काळानंतर तीन सदीची मनसब दे ऊन त्याला बंगालला पाठवले गेले. सोमवार, ३० जून १६८४ / २७ रज्जब १०९५, झीनतुस्त्न्नसा बेगम औरंगाबादहून दरबारास आली. मुहम्मद काम बक्ष, लसयादत खान व कामगार खान ततचे स्वागत करायला पुढे गेले व ततला बादशाही जनानखान्यात घेऊन आले . गुरूवार, २४ जुलै १६८४ / २१ शाबान १०९५ ला मुहम्मद आजम शाह याने वालाजाह याच्या आईच्या पोटी एका मुलाच्या जन्म झाल्याबद्दल बादशाहाला ५०० मोहरा सादर केल्या. दरबारातील लोकांनी अणभवादन केले . मुलाचे नाव वालाशान ठे वण्यात आले . शुक्रवार, १ ऑगस्ट / २९ शाबान, बादशाहाला कळले क़ी कुत्ब-उल-मुल्क याच्याकडे गेलेले धमझाम मुहम्मद व सोनार तबहारी दास यांना अनुक्रमे १०००० रुपये, एक हत्ती व एक असी तसेच दुसऱ्याला ८००० रुपये व एक हत्ती धमळाले होते पण त्या भेटवस्तू दताकडेच सोडू न ते परत आले होते. बादशाहाने आदे श ददला क़ी त्या वस्तु (कुत्ब-उल-मुल्क याला) परत कराव्यात. बहादुरगडाचा तकल्ले दार अब्दुर रहमान याचा लशक्का असले ली संभाच्या दोन पत्नी, एक मुलगी व तीन दासी यांची पोचपावती बादशाहा समोर ठे वली गेली. खान जहान बहादुर जफर जंग कोकलताश, ददले र खान, गाझीउद्दीन खान बहादुर व इतर नामदार [२४६] व वीरांनी तोवर शत्रूकडू न इतके सारे तकल्ले व महाल जजिंकून बादशाही साम्राज्यात आणले होते क़ी त्याचा तपशील ललहायला अनेक खंड लागतील. * * * *

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२१३

अध्याय २८ राजवटीचे आठ्ठातवसावे वषम – तहजरी १०९५-९६ २ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५ **** बादशाहाने रमजानचा मतहना मलशदीत नमाज करण्यात घालवला. रतववार, ३ ऑगस्ट १६८४ / २ रमजान १०९५ ला मुघल खानाला ददवंगत खान जमान याच्या जागी माळव्याचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक अंगरखा व झुब्ल्फकार नावाचा हत्ती तसेच ३५०० (३००० स्वार) अशी वाढ ददली गेली. ६ ऑगस्ट १६८४ / ५ रमजान १०९५ ला लसआदत खानाला मुअज्जम खान ही उपािी ददली गेली व त्याला मुघल खानाच्या जागी कुशबेगी नेमले गेले. हाजी शफ़ी खान याला सफ़ी खानाच्या जागी औरंगाबादला नेमले गेले व सफ़ी खानाची मुहतशाम खानाच्या जागी आग्र्याला नाजजम म्हणून नेमणूक झाली, तर मुहतशाम खानाला [२४७] ददवंगत सैफ खानाच्या जागी आलाहाबादला नमले गेले. दाराब खानाचा मुलगा मुहम्मद ताक़ी, मतलब खान व अहमदाबादचा सुभेदार, ददवंगत मुख्तार खान याच्या दुःखात बुडाले ल्या इतर नातलगांना बादशाहाने कृपावंत होऊन दुखवट्याची वस्त्रे ददली. त्यांच्या अनेक गुणतवशेषांमुळे बनी-मुख्तारचे घराणे जगात प्रलसद्ध होते. त्यातही मुख्तार खान हा उल्ले खनीय होता व त्याच्या चांगुलपणासाठी ओळखला जायचा. मंगळवार, १९ ऑगस्ट १६८४ / १८ रमजान १०९५ ला दुपारी शाहजादा मुईझुद्दीन याचे मुकरमम खानाचा मुलगा धमझाम रुस्तम याची मुलगी सय्यदुस्त्न्नसा बेगम, तहच्याशी बादशाहा व शाह आलम बहादुर यांच्या उपब्स्थतीत काझी अबु सय्यद याने लग्न लावले . बादशाहाने काझीला १००० रुपये व एक अंगरखा ददला. तकफायत खान, ज्याच्याकडे मनसब नव्हती, त्याचा शतनवार, २३ ऑगस्ट १६८४ / २२ रमजान १०९५ ला ददल्लीला व आलाहाबादचा सुभद े ार सैफ खान याचा २६ ऑगस्ट १६८४ / २५ रमजान १०९५1 ला मृत्यू झाल्याची बातमी आली.

1

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही पण फासी पाठात (‫‘ )بيست و پنجم‬बीस्त व पंजम’ म्हटले आहे.

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

खखलअत ककिंवा अंगरखा (बऱ्हाणपूर ककिंवा हैदराबाद) यावर सोन्याची कलाकारी व फुलांच्या नक्षीचे तवणकाम आहे (साभार MET)

२१४

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२१५

सोमवार, १ सप्टें बर १६८४ / १ शव्वाल १०९५ ला ईद-उल-तफत्र झाली. * * * गुरूवार, ४ सप्टें बर १६८४ / ४ शव्वाल १०९५ ला सलाबत खानाला कारतलब खान मुहम्मद बेग याच्या जागी सुरतेचा मुत्सद्दी नेमले गेले. कारतलब खानाला अहमदाबादचा फौजदार नेमले गेले. तहम्मत खानाचा मुलगा खानाहजाद खान याला सलाबत खानाच्या जागी बादशाही लवाजम्यातील सेवकांचा दरोगा नेमले गेले. आजम खानाचा मुलगा सालीह खान कोकाह याला बरेलीचा ददवाण व फौजदार नेमले गेले. [२४८] त्याचा मुलगा नूरुद्दीन याला एक अंगरखा दे ऊन त्याच्या बरोबर पाठवले गेले. कामयाब खानाला त्याच्या जागी (सालीह खान) िनुिमरांचा बक्षी नेमले गेले. पलं गतोश खान बहादुर याला वार्षिंक भत्ता धमळत होता, २ सप्टें बर १६८४ / २ शव्वाल १०९५ ला त्याला मनसब ददली गेली. जाफर खानाचा भाऊ व बहरामंद खानाचे वडील बहराम, याचा ददल्लीला मृत्यू झाला. मृताच्या बतहणीचा मुलगा उम्दत-उल-मुल्क आसद खान याला बादशाहाने घातले ला व रेशमाचे भरतकाम असले ला अध्याम बायांचा अंगरखा ददला गेला. अशरफ खान याने बक्षी-उल-मुल्क बहरामंद खानाचे सांत्वन करून त्याला दरबारास आणले , त्याला दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. सोमवार, ८ सप्टें बर १६८४ / ८ शव्वाल १०९५ ला मुईझुद्दीनच्या लग्नाचा उत्सव समारंभ झाला. त्याला बालादस्त खखलत, एक लक्ष पन्नास हजार रुपये ककिंमतीची रत्ने, सोन्याच्या साजाचा एक घोडा व चांदीच्या साजाचा एक हत्ती ददला गेला. सय्यदुस्त्न्नसा बेगम तहला ६७००० रुपये ककिंमतीची रत्ने ददली गेली. मघरीबच्या नमाजानंतर शाह आलम बहादुर व इतर शाहजाद्यांनी अततशय उत्सवी वातावरणात रस्त्याच्या दोन्ही बाजून ं ा लावले ल्या ददव्यांमिून मुईझुद्दीन याला त्याच्या घरापासून ते बादशाही राजवाड्यापयंत नेले. उत्सव समारंभाचे आयोजन झीनतुस्त्न्नसा बेगम तहने केले होते. दोन पास (प्रहर) झाल्यानंतर नवरी मुलगी नवरदे वाच्या घरी पोहोचली. रतववार, २१ सप्टें बर १६८४ / २१ शव्वाल १०९५ ला गाझीउद्दीन खानाला रायरी तकल्ला घ्यायला पाठवले गेले. [२४९] त्याला एक तवशेष अंगरखा व पाच घोडे ददले गेले. त्याचा मुलगा कमरुद्दीन याला एक तलवार व इतर अधिकाऱ्यांना अंगरखे ददले गेले. बुिवार, ८ ऑक्टोबर १६८४ / ९ जजल्कदा १०९५ ला मुहम्मद आजम याला मदत म्हणून १०० तुकी व डोंगरी घोडे पाठवले गेले. फिुद्दीनला सुप्याचा ठाणेदार म्हणून पाठवले गेले. अब्दुल हादी खान याला चाकण व नामदार खानाचा मुलगा मरहमत खान, याला गढनमुन्याचा

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२१६

ठाणेदार नेमले गेले. शतनवार, २५ ऑक्टोबर १६८४ / २६ जजल्कदा १०९५ ला बक्षी-उलमुल्क रुहुल्लाह खान याला अंगरखा, खंजीर व एक घोडा दे ऊन शत्रूला िडा लशकवायला पाठवले गेले. शाह आलम बहादुरचे अधिकारी कालसम खान, बाल्खचा मुहम्मद बादी, इल्हामुल्लाह खान व अब्दुर रहमान यांना १००० स्वारांची वाढ ददली गेली. कंदाहारहून दरबारास आले ला हयात अब्दाली व सैन्यातील इतर अधिकाऱ्यांना बढत्या, अंगरखे, घोडे. हत्ती, तलवारी, जजघा दे ऊन सन्मातनत केले गेले. गाझीउद्दीनने पाठवले ले पदमजी, एकोजी, मल्हार व राव सुभानचंद यांना अंगरखे ददले गेले. शाहजादा दौलताफ्जा याला पाचूचे लोलक असले ला माणकाचा लशरपेच ददला गेला. तकफायत खान हातीम बेग याला दख्खनच्या सुभ्यांचा ददवाण नेमले गेले. रत्नशाळे चा व खखलतखान्याचा मुश्रीफ व इनायतुल्लाह याला वाकनतवस व आयम्याचा मुस्तौफ़ी नेमले गेले. रतववार, २ नोव्हेंबर १६८४ / ४ जजल्हेज १०९५ ला [२५०] शाहजादा काम बक्ष याचा मुलगा सुलतान उम्मेद बक्ष वारला. बादशाहाने पादशाहजाद्याचे सांत्वन करायला त्याच्या घरी भेट ददली. बातमी आली क़ी रतववार, २ नोव्हेंबर १६८४ / ४ जजल्हेज १०९५ ला चांद्याचा जमीनदार रामससिंह याला बादशाही सैन्याने परास्त केले . त्याचे कुटुं ब मागे सोडू न २०० स्वारांसह तो डोंगरात पळू न गेला. इततकाद खान, हमजा खान व तकशनससिंह यांनी चांद्यात प्रवेश केला. बुिवार, १९ नोव्हेंबर १६८४ / २१ जजल्हेज १०९५ ला रामससिंह ततघा जणांसोबत चांद्यात आला व त्याच्या महालात जायला लागला. तकशनससिंहचा सेवक मुराद बेग दारापाशी पहारा दे त होता. त्याने त्याला अडवले . रामससिंहाने त्याला जमदडीने भोसकले पण इतरांनी त्याच्यावर वार केला व तो मारला गेला. दुसऱ्या ददवशी मुराद बेग ही मेला. बुिवार, ३ धडसेंबर १६८४ / ६ मुहरमम १०९६ ला बादशाहाने तकशनससिंहाला एक अंगरखा, फमामन व एक हत्ती पाठवला. गरयाचा जमीनदार हरीससिंह याला अंगरखा पाठवला गेला. कललच खानाच्या बतहणीचा मुलगा बतलू न बेग बुखाऱ्याहून आला. त्याला एक तलवार, सोन्याच्या साजाचा एक खंजीर, २००० रुपये व सहा सदी (२०० स्वार) ददली गेली. ददवंगत मुखललस खान याचा जावई अब्दुर काददर ज्याने शत्रूकडू न कोंढाणा घेऊन तो अब्दुल करीमच्या स्वािीन केला होता, तो रतववार, १४ धडसेंबर १६८४ / १७ मुहरममला १०९६ दरबारास आला. त्याला १०० (५० स्वार) अशी वाढ दे ऊन तो आता पाच सदी (१०० स्वार) झाला. इहतमाम खान सरदार बेग याला सैफुल्लाह खानाच्या जागी

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२१७

नवाऱ्याचा दरोगा नेमले गेले. सय्यद मुजफ्फर हैदराबादीच्या मुलीचा तववाह कामगार खानाशी झाला, त्याला अंगरखा ददला गेला. इततकाद खान चांद्याहून दरबारास आला [२५१] व त्याला पलं गतोश खानाच्या जागी कुरबेगी नेमून एक अंगरखा, एक हत्ती व

पाच सदीची (१५० स्वार) वाढ दे ऊन दोन हजारी (४०० स्वार) केले गेले. हयात खानाला मीर अब्दुल करीम याच्या जागी सात चौक़ीचा आमीन नेमले गेले. खखदमतगुजार खान वारला. त्याचा मुलगा मुहम्मद कुली याला दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. दासांचा दरोगा व मंजजल-ए-नजूल चा दरोगा ही त्याची पदे अनुक्रमे फतह मुहम्मद व दीवाफकन यांना ददली गेली. काझी हैदर मुनशी याला खान ही उपािी धमळाली. मुनशी व सद्र शेख मखदम याला फाजजल खान ही उपािी ददली गेली. खुशनतवसांचा प्रमुख हाजी इस्माईल हा स्वतः बादशाहाची फमामने ललतहत असे, त्याला रौशन-रक्म ही उपािी धमळाली. रतववार, २८ धडसेंबर १६८४ / १ सफर १०९६ ला काझी शेख-उल-इस्लाम याने मक्का व मदीनाला जाण्याची अनुमती मातगतली. त्याला परमनमम (अततशय मऊ) दोशाला व अदब-इ-जजयारातचे पत्रक ददले गेले. प्रेतषताच्या थडग्यास भेट म्हणून प्रेतषताला उद्दे शून ललतहले ल्या स्तुती-पत्रांची पेटी त्याच्या स्वािीन करण्यात आली. त्या पावन थडग्याच्या दारासमोर ती पेटी उघडली गेली, त्यातील तपशवी काढू न ती थडग्याच्या आतल्या पोकळ भागात ठे वण्यासाठी आतल्या खोलीत नेली गेली. बरकंदाज खानाचा मुलगा सुहराब खान याला एक मण वजनाचे गोळे उडवणारी एक मोठी तोफ व वीस शेर वजनाचे गोळे उडवणाऱ्या इतर तीन तोफा [२५२] घेऊन तवजापूरला बक्षी-उल-मुल्क याला दे ण्यासाठी पाठवले गेले. इततकाद खानाला पारनेर व संगमनेरच्या आसपास पसरले ल्या शत्रूला परास्त करण्यासाठी पाठवले गे ले. खालसा तवभागाचा पेशदास्त रशीद खान याला चेनाची1 पेरणी करण्याच्या प्रश्ासाठी इंदरला2 पाठवले गेले. खान-इ-जमानच्या मृत्यू नंतर त्याची मुले बऱ्हाणपूरहून दरबारास आली व त्यांना अंगरखे व बढत्या ददल्या गेल्या. आततश खानाला मोठे सैन्य व काम बक्षच्या ५००

1 2

चेना हे ज्वारी ककिंवा बाजरी या प्रकारातले िान्य ककिंवा चणे हे कडिान्यही असू शकेल. इंग्रजी अनुवादातील तळटीपेनुसार हे इंदर म्हणजे गोदावरी व मांजरा नद्यांच्या संगमाजवळ सध्याच्या तेलंगणातील तनजामाबाद आहे.

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२१८

स्वारांसतहत नवलगोड्याच्या ददशेने पाठवले गेले. इहतमाम खानाचा मुलगा हमीदुद्दीन याला त्याच्या वधडलांच्या जागी खातम बंदखानाहचा दरोगा नेमले गेले. २२ जानेवारी १६८५ / २६ सफर १०९६ ला बातमी आली क़ी गाझीउद्दीन खान बहादुर याने रायरीच्या पायथयाशी असले ल्या पट्ट् याला आग लावली, कातफरांच्या अनेक सरदारांना मारले , त्यांची मालमत्ता जप्त केली, त्यांची गुरढ े ोरे व स्त्स्त्रया ताब्यात घेतल्या व मोठा तवजय धमळवला. ही बातमी दे णारा सय्यद उघलान याला एक हत्ती दे ण्यात आला. गाझीउद्दीन खानाचा चोपदार शाह मुहम्मद हा खानाकडू न तनघून वाटे त कपडेही न बदलता (इतक्या तातडीने) आला होता, त्याला एक अंगरखा व २०० रुपये दे ण्यात आले . खानाला (गाझीउद्दीन) तफरोज जंग ही पदवी व नगारे ददले गेले. त्याच्या सवम अधिकाऱ्यांसाठी १५० हून अधिक अंगरखे पाठवले गेले. गुरूवार, २९ जानेवारी १६८५ / ४ रतब-उलअव्वल १०९६ ला औरंगजेबाची परस्तार उदीपुरी महल तहला आणायला खानाहजाद खानाला औरंगाबादला पाठवले . [२५३] बुिवार, ४ फेब्रुवारी १६८५ / १० रतब-उलअव्वल १०९६ ला दरबारातील तसेच प्रांतातील सवम अधिकाऱ्यांना थंडीचे अंगरखे ददले गेले.

बख्तावर खानािा मृत्यू सोमवार, ९ फेब्रुवारी १६८५ / १५ रतब-उल-अव्वल १०९६ ला खवासींचा दरोगा बख्तावर खान, ३५ वषांची प्रदीघम सेवा करून वारला. बादशाहाच्या अत्यंत तवश्वासातील स्नेही, सुज्ञ मंत्री व एक कणखर माणूस गेल्याचे त्याला फार दुःख झाले . त्याच्या आदे शानुसार त्याची शवपेटी अदालतगाह जवळ आणली गेली, बादशाहाने स्वतः इमामाची भधमका घेतली, शवपेटीच्या मागे काही पावले चालला, फाततहा वाचला, दान केले व पूणम कुराण वाचून घेतले . बख्तावर खानाने मरण्यापूवी स्वतः करता बांिले ल्या थडग्यात पुरण्यासाठी त्याचे पार्थिंव ददल्लीला नेले गेले. तवद्वान, फक़ीर व कवी, यांचा तो चांगला धमत्र होता व त्यांची दे खभाल करायचा. परंपरागत काव्य शैलीत तो तज्ञ होता, त्याने मीरत-उल-आलम ललतहले होते व माणूस घडवण्यात तसेच दानशूरपणात तो सवोच्च पदावर होता. पलं गतोश खानाला त्याच्या जागी खवासींचा दरोगा हे पद ददले गेले, हाक़ीम मुहसन खानाला रत्नशाळे चा दरोगा तर मीर तहदायतुल्लाह याला सोनारांचा दरोगा नेमले गेले. मी मुहम्मद साक़ी, या इततहासाचा ले खक, बख्तावर खानाचा ददवाण व मुनशी म्हणून काम करत होतो व त्याने ललतहले ल्या गुप्त पत्रांचे मसुदे बादशाहाकडू न

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२१९

तपासून घेण्यासाठी ते त्याला दाखवायचो. [२५४] बादशाहाने लगेच मला त्याच्या सेवत े घेतले व गुरूवारचा वाकनतवस नेमले . * * *

नाजजर दरबार खान यािा मृत्यू गुरूवार, २६ फेब्रुवारी १६८५ / २ रतब-उस-सानी १०९६ ला जनानखान्याचा नाजजर दरबार खान याचा मृत्यू झाला. तो एक वृद्ध, खंबीर, उदार मनाचा व बादशाहाचा तनष्ठावंत अधिकारी होता. त्याच्या शवपेटीलाही बादशाहाने तशाच प्रकारे आणायचा आदे श ददला व अंत्यतविीच्या नमाजात त्याने स्वतः इमामाची भूधमका घेतली. त्याचे पार्थिंव ददल्लीला पाठवले गेले. खखदमत खानाकडे असले ले अजांचे दरोगापद तसेच ठे ऊन दरबार खानाचे नाजजर पद त्याला ददले गेले व शेख तनजामचा मुलगा शेख अब्दुल्लाह याला दवाखान्याचा अिीक्षक म्हणून नेमले गेले. शतनवार, १४ माचम १६८५ / १८ रतब-उस-सानी १०९६ ला शुजाअत खान हैदराबादीचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा मललक मीरान याला अंगरखा व मनसब ददली गेली. सोमवार, १६ माचम १६८५ / २० रतब-उस-सानी १०९६ ला रुहुल्लाह खानाला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत कलगी व चांदीचा नगारा दे ऊन तवजापूर जवळ शत्रूला परास्त करायला पाठवले गेले. त्याच्या बरोबर अडीच लक्ष रुपये, तहऱ्याचा परखानाह असले ली जजघा, आजम शाह साठी रत्नजधडत लशरपेच, जहानझेब बानू बेगम करता मोत्यांच्या दो-लारी कंठा, बीदर बख्त करता मोत्यांचा कंठा, वालाजाह करता स्मरणी, वालाशान करता मोत्यांचा दो-लारी कंठा, [२५५] सरफराज खान, फतहजंग खान, कान्होजी, बसंतराव व इतरांसाठी ३२ अंगरखे ददले गेले. शतनवार, २१ माचम १६८५ / २५ रतब-उस-सानी १०९६ ला सैद खान बहादुर याचा नातू वफादार खान याला जबरदस्त खान ही उपािी, अंगरखा, खंजीर, तलवार, रत्नजधडत साज चढवले ली ढाल, रत्नजधडत जजघा, भाता, िनुष्य, घोडा, हत्ती, १०००० रुपये व पाच सदीची (१०० स्वार) वाढ दे ऊन बाल्खला दत म्हणून पाठवले गेले. त्याच्या बरोबर सुभान कुली खान याच्यासाठी १८००० रुपयांचा हत्ती व इतर ककिंमती सामान व भेटवस्तु पाठवल्या गेल्या. सजावर खान ही उपािी ददले ल्या शफ्कतुल्लाह याला त्याच्या अपरािाबद्दल क्षमा करून दुसरा मीर तुजुक नेमले गेले.

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२२०

सोमवार, २३ माचम १६८५ / २७ रतब-उस-सानी १०९६ ला खुजजस्ताह अखतर औरंगाबादहून आला व भेट घेतली, त्याला एक अंगरखा व बाजूबंद ददला गेला. ख्वाजा अब्दुर रहीम तवजापूरच्या दतावासाहून परतला व त्याला एक अंगरखा, एक हत्ती व ५००० रुपये ददले गेले. मीर अब्दुल करीम याला जानमाजखानाह या पदा बरोबरच, नक्काश-खान्याचा दरोगा नेमले गेले. मी या तवभागाचा मुश्रीफ झालो. गुरूवार, २६ माचम १६८५ / १ जमाद-उल-अव्वल १०९६ ला तफरोज जंग बहादुर याने भेट घेतली व त्याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर, पाच घोडे व सात तोळे गुलाबाचे अत्तर ददले गेले. बादशाहाला कळले क़ी शुक्रवार, २७ माचम १६८५ / २ जमाद-उल-अव्वल १०९६ ला तवजापूरचा वेढा1 सुरू झाला. खान जहान बहादुर जफर याने [२५६] जोहरापूरच्या ददशेने अध्याम कोसाच्या अंतरावर खंदक खणायला सुरवात केली तर रुहुल्लाह खान व कालसम खान यांनी तकल्ल्याच्या तटापासून पाव कोसावर खंदक खणले . हरकऱ्याने तनरोप आणला क़ी मंगळवार, १४ एतप्रल १६८५ / २० जमाद-उलअव्वल १०९६ ला राठोडांनी लसवानहचा तकल्ला घेतला. तफरोज खान मेवातीचा मुलगा परददल व इतर अनेक लोक मारले गेले. शारजा तबजापुरी तुंगभद्रा नदीकाठी मुहम्मद आजम शाहच्या सैन्याच्या ददशेने िैयामने पुढे आला. या तुंबळ युद्धात अनेक लोक मारले गेल्यानंतर तो पळू न गेला. रतववार, १२ एतप्रल १६८५ / १८ जमाद-उल-अव्वल १०९६ ला मुहम्मद अकबर याचा एक दास बादशाहाकडे पेशकश म्हणून दोन घोडे घेऊन आला. त्याला भेट नाकारली गेली पण त्याला नव्वाब बेगम (झीनतुस्त्न्नसा) कडे जायला सांतगतले गेले. गुरूवार, २३ एतप्रल १६८५ / २९ जमाद-उल-अव्वल १०९६ ला सरबुलंद खान (ख्वाजा याकुब) वारला.

अहमदनगर त्रकल्ल्यािे वणवन अहमदनगरचा तकल्ला सपाटीवर बांिला आहे व त्याला भक्कम बनवण्यासाठी या टे कडीवजा तकल्ल्याचा पाया पृथवीच्या सवामत खालच्या पातळीपयंत नेला आहे. भूकंप 1

इंग्रजी अनुवादातील तळटीपेनुसार तवजापूरचा वेढा १ एतप्रल १६८५ ला सुरू झाला असे अखबारात येते.

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२२१

टाळण्यासाठीच या टे कडीवर (तकल्ल्याच्या रूपात) हा खखळा ठोकला गेला आहे असे म्हणल्यास वावगे होणार नाही. तकल्ल्याच्या भोवती मोठे पटांगण आहे. तकल्ल्याच्या आत इमारती व प्रफुब्ल्लत करणाऱ्या बागा आहेत, ज्यांच्या खाली दुर्मिंळ अशा भूधमगत खोल्या बांिल्या आहेत. तकल्ल्याच्या भोवती बारा मतहने पाण्याने भरले ला खंदक आहे. बाहेरून पाण्याचे दोन ओढे तकल्ल्यात येतात. [२५७] नगर शहर तकल्ल्यापासून पाव कोसावर आहे, त्याला तटबंदी नाही. पूवी त्यातील इमारती, प्रत्येक घरात जाणारे कालव्याचे पाणी व एकूण वस्ती यामुळे हे शहर एकमेवातद्वतीय होते. ददवंगत दातनशमंद खान हा व्यापारी असताना काही काळ इथे रातहला होता. तो म्हणत असे क़ी अहमदनगर हे तकतीतरी गोष्टींमध्ये काब्श्मरपेक्षा सरस आहे. शहरात फराहबक्ष व तबतहश्तबाग नावाच्या अततसुंदर बागा आहेत. सलाबत खानाने मुतमझा तनजामशाहाच्या वेडेपणाच्या काळात त्या बांिल्या होत्या. त्यांची स्मृती धचरकाल दटकवण्यासाठी या दोन्ही बागांच्या लांबी रुं दीचे तसेच त्यातील दुर्मिंळ इमारतींचे वणमन मी करणार आहे. फराहबक्ष बागेची लांबी व रुं दी २००० झीरा आहे, याचे क्षेत्रफळ २७८ तबघे येते. त्याच्या मिोमि ५२८ झीरा (चौरस) १९ तबघे क्षेत्रफळाचा तलाव आहे. डोंगराच्या पायथयापासून भूधमगत कालव्यामागे या तलावात पाणी आणले जाते. तलावाच्या मिोमि १६० खोल्यांची वरती घुमट असले ली दोन मजली इमारत आहे. िनुिरम त्यावरून सराव करतात. तबतहश्तबागेची लांबी रुं दी ३१२ झीरा आहे, याचे क्षेत्रफळ १०० तबघे भरते. त्याच्या मिोमि पाण्याचे अष्टकोनी कुंड आहे. यातही कालव्याचे पाणी आणले आहे. याच्या मध्यभागी असले ली इमारत आता मोडकळीस आली आहे. याच्या बाजूला एक आकषमक इमारत व तुकी न्हाणीघर आहे, जे उच्चभ्रू लोकांना राहण्यासाठी उत्तम आहे. तकल्ल्यापासून पाच कोसावर मंजरसभा ककिंवा मंजजलसभा नावाचे तवश्रांतीचे दठकाण आहे. असे म्हटले जाते क़ी इथे टे कडीच्या पायथयाशी एक उंच इमारत बांिली आहे. डोंगरातून येताना तनमामण होणाऱ्या दाबामुळे बागेतल्या पुष्करणीचे पाणी १०० याडम उंच फेकले जाते. बादशाहाने [२५८] या ‘पृथवीच्या फुलाला’ भेट ददली व मोडकळीस आले ल्या इमारतींची डागडु गी करायचा आदे श ददला. टे कडीवर असले ले सलाबत खानाच्या थडग्याची इमारत ही फार सुंदर आहे. या प्रदे शातील हवामान फार तापले ले नसते, रात्री झोपताना पांघरूण घ्यावे लागते.

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२२२

बादशाहािे अहमदनगरहून िोलापूराि कूि रतववार, २६ एतप्रल १६८५ / २ जमाद-उस-सानी १०९६ ला शुभ ददवस व वेळ बघून बादशाही छावणी अहमदनगरहून हलली व फराहबक्ष बागेजवळ पडाव केला. बुिवार, २९ एतप्रल / ५ जमाद-उस-सानी १०९६ ला बादशाहा फराहबक्ष बागेत गेला. ३० एतप्रल १६८५ / ६ जमाद-उस-सानी १०९६ ला सय्यद उघलान याला लसयादत खान ही उपािी धमळाली. तफरोज जंग खान याचा हा गुरू, त्याच्या बरोबर तवलायतेहून (इराण) भारतात आला होता व त्याला बादशाहाच्या सेवेचे सौभाग्य लाभले . बादशाहाच्या कृपेने त्याला सन्मान व उच्चश्रेणी प्राप्त झाली. काझी सय्यद अबु सैद याने आजारपणामुळे सेवेतून तनवृत्ती घेण्यासाठी तवनंती केली. संभाच्या काकाचा मुलगा अजुमनजी याला दोन हजारी (१००० स्वार) धमळाली व त्याला अंगरखा आणण एक घोडा ददला गेला. इज्जतुल्लाह खानाला अहमदनगरचा तकल्ले दार नेमले गेले. शुक्रवार, १ मे १६८५ / ७ जमाद-उस-सानी १०९६1 ला तफरोज जंग बहादुर याला अहमदनगरला राहायला पाठवले गेले व त्याला कुराण असले ला ताईत, एक तवशेष अंगरखा व २०००० रुपये ददले गेले. त्याच्या साथीदारांना अंगरखे व खंजीर ददले गेले. [२५९] औरंगजेब बादशाहा झाला त्याच्या आिी, मुहम्मद शरीफ याचा मुलगा ख्वाजा अब्दुल्लाह हा त्याच्या सैन्याचा काझी होता. त्याला आता दरबाराचा काझी नेमले गेले. शतनवार, २३ मे १६८५ / २९ जमाद-उस-सानी १०९६ ला कमरुद्दीनला मुख्तार खान ही उपािी धमळाली व तफरोज जंगचा मुलगा कमरुद्दीन, याला खान ही उपािी धमळाली. रतववार, २४ मे १६८५ / १ रज्जब १०९६ ला बादशाहा सोलापूरला पोहोचला. इततकाद खानाला एक तवशेष अंगरखा, एक भाता व िनुष्य दे ऊन जाफराबादकडे (बीदर) पाठवण्यात आले . त्याच्या साथीदारांना अंगरखे, तलवारी व घोडे धमळाले . शतनवार, ३० मे १६८५ / ७ रजब १०९६ ला शाह आलम बहादुर घोड्यावरून दरबारास येत असताना एक माणूस उगारले ली तलवार घेऊन त्याच्याकडे िावला. बादशाहाच्या आदे शानुसार त्याला पकडू न पादशाहाजाद्याच्या कोतवालाकडे दे ण्यात आले .

1

इंग्रजी अनुवादात इथे २ जमाद-उस-सानी ददले आहे पण फासी पाठात (‫‘ )هفتم‬हफ्तम’ म्हणजे सात ददले आहे.

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२२३

अबुल हिनच्या त्रवरोिात शाह आलम बहादुरच्या हाताखाली िैन्य पाठवले जाते मुहम्मद मआसूम व मुहम्मद जाफर हे बादशाही छावणीत दत म्हणून राहात होते. बादशाहाने आदे श ददला क़ी या हैदराबादी सेवकांनी इहतमाम खानाकडे राहावे तसेच त्यांनी पाठवले ली व त्यांना धमळाले ली सवम पत्रे खानाला दाखवावीत [२६०]. त्यात त्याला काही संशयास्पद सापडले तर त्याने लगेच बादशाहाला त्याची वाताम द्यावी. शत्रूकडील मातहती धमळवण्यासाठी हेर खूप पररश्रम करत होते. हैदराबादच्या राजाचा शेवट जवळ आला तसे अबुल हसनचे त्याच्या सेवकांना पत्र आले क़ी, ‘बादशाहा फार थोर माणूस आहे व आजवर त्याने मोठ्ा मनाने व्यवहार केला आहे. पण लसकंदर (आददलशाह) पोरका व असहाय आहे हे बघून त्याने तवजापूरला वेढा घातला आहे व त्यावर पूणम दबाव आणत आहे. असे असताना, तवजापूरच्या मोठ्ा सैन्याच्या बरोबरीने राजा संभाने मोठ्ा सैन्यातनशी या असहाय राजाला मदत करण्यासाठी ततकडू न एक आघाडी उघडावी. मी खलीलु ल्लाह खान पलं ग-हमला याच्या हाताखाली ४०००० लोक दे ऊन या बाजूने फळी उभारीन. मग बघू बादशाहा त्याच्या अनेक शत्रूंना कसे तोंड दे तो ते. तुला जरी कोतवाली चबूतऱ्या जवळ ठे वले गेले असेल तरी घाबरू नकोस कारण लवकरच तुझ्या सुटकेची व्यवस्था केली जाईल’. खानाने हे पत्र बादशाहाकडे पाठवले . त्यामुळे रतववार, २८ जून १६८५ / ६ शाबान १०९६ ला पादशाहाजाद्याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर, एक मुत्तका व वीस घोडे दे ऊन हैदराबादवर चाल करायला पाठवले गेले. त्याची मुले व उच्च पदांवरील अधिकारी यांना अंगरखे, रत्ने, घोडे, हत्ती व बढत्या ददल्या गेल्या. १५ जुलै १६८५ / २३ शाबान १०९६ ला तवजापूरहून आले ल्या रुहुल्लाह खानाला तफरोज जंग बहादुरच्या जागी अहमदनगरला पाठवले गेले. कामगार खानाला खानाहजाद खानाच्या जागी बादशाही लवाजम्याचा दरोगा नेमले गेले व कामगार खानाच्या जागी मुख्तार खानाला पागेचा दरोगा नेमले गेले. रतववार, १९ जुलै १६८५ / २७ शाबान १०९६ ला आजम खानासाठी हररताश्माची मूठ व इलाका असले ला खंजीर [२६१] व फूल कटारा तर शाहजादा बीदर बख्तसाठी मोत्यांची स्मरणी, पहुंची व फरघोल असे सगळे मुख्तार खानाकडे दे ऊन त्याला पाठवण्यात आले . मंगळवार, १४ जुलै १६८५ / २२ शाबान १०९६ ला माळव्याचा नाजजम मुघल खान वारला व १९ जुलै १६८५ / २७ शाबान १०९६ ला जौनपूरचा फौजदार तरतबयत खानाचा मृत्यू झाला. मीर

अध्याय २८

२ ऑगस्ट १६८४ ते २१ जुलै १६८५

२२४

अब्दुल करीम याला एका अपरािासाठी लशक्षा म्हणून त्याच्याकडू न जानमाजखान्याची दरोगाई काढू न तफरत्या छावणीचा खवास मुहम्मद शरीफ याला ददली गेली. बादशाहा म्हणाला, ‘हा धचनीमातीच्या वस्तुंचा तवक्रेता, माकडागत ददसणारे सोंग व ढोल बडवणारा (कुतुबशाह), याची खोड मोडायची मी टाळत होतो. आता ही कोंबडी स्वतःच कोकलत समोर आली आहे त्यामुळे मला संयम ठे वणे अशक्य झाले आहे’. या मोतहमेमुळे तवजापूरच्या मोतहमेवर पररणाम होऊन ती लांबेल हे ठाऊक असूनही त्या नीच माणसाला संपवण्याचे आदे श पादशाहाजाद्याला ददले गेले. खान जहान बहादुर जफर जंग इंदी ठाण्यापाशी राहून शाह आललजाह (आजम) याच्या सैन्याला रसद पुरवण्याचे काम करत होता. त्याला पादशाहाजाद्याच्या सैन्यात साधमल होऊन पररश्रम घेऊन चांगली सेवा करण्याचा आदे श ददला गेला.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२२५

अध्याय २९ राजवटीचे एकोणततसावे वषम – तहजरी १०९६-९७ २२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६ * * * * [२६२] तवलायतेहून (इराण) आले ल्या लसकंदर बे याला अंगरखा, रत्नजधडत

खंजीर व १०००० रुपये ददले गेले. आलाहवदी खानाचा मुलगा अमानुल्लाह खान व ददले र खानाचा मुलगा फतह मामूर खान या दोघांना तवजापूरच्या खंदकात लढताना वीरमरण आले . अमानुल्लाह खानासाठी अली खान बहादुर आलमगीरशाही याला दुखवट्याची वस्त्रे पाठवण्यात आली. मुहम्मद आजम शाहच्या सैन्यातील तोफेच्या दारूने अचानक पेट घेतला व ५०० बहललया व बंदकची मारले गेले. गुरूवार, १३ ऑगस्ट १६८५ / २३ रमजान १०९६ ला बेरारचा सुभेदार इररज खान व आजम शाहा यांच्या सैन्यातील एक अधिकारी सय्यद शेर खान मरण पावला. तफरोज जंग बहादुर अहमदनगरहून आला व भेट घेतली. बादशाहाने स्वतःच्या कमरेला लावले ला शेरमाही मूठ असले ला खंजीर त्याला ददला व खान बहादुर याने ददले ली भेट बादशाहाने स्वहस्ते घेतली. मुहम्मद आजम शाहाचा ददवाण मीर खान याला बऱ्हाणपूरचा नायब सुभेदार नेमन ू पाठवले गेले. सोमवार, २४ ऑगस्ट १६८५ / ४ शव्वाल १०९६ ला लसकंदर बे याला खान ही उपािी व तीन हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. हुसैन अली खान याला इररज खानाच्या जागी बेरारची सुभेदारी ददली गेली व राजजउद्दीन खानाला त्याचा नायब तनयुक्त केले . लु त्फुल्लाह खानाला बादशाहाचे काही आदे श घेऊन शाह आलम बहादुरकडे पाठवण्यात आले . [२६३] त्याच्या जागी लसयादत खानाला अजम-एमुकरमरचा दरोगा नेमण्यात आले . कललच खानाचा मुलगा ख्वाजा हमीद याला खान ही उपािी व एक हत्तीण दे ऊन आजम खानाच्या सैन्याकडे खजजना घेऊन पाठवले गेले. गुरूवार, १ ऑक्टोबर १६८५ / १३ जजल्कदा १०९६ ला कललच खानाला एक अंगरखा, एक झराह व एक हत्ती दे ऊन जाफराबादला सुभद े ार म्हणून पाठवले गेले. आसालत खान व नजाबत खान ही सय्यद मुजफ्फर हैदराबादी याची मुले तसेच अक्रम खान, नालसर खान व सय्यद हसन खान यांना त्याच्या बरोबर पाठवले गेले.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२२६

बादशाहाला मुहम्मद आजम शाहाच्या सैन्यातील दुष्काळाबद्दल कळले . हा दुष्काळ इतका भीषण होता क़ी गव्हाचा एक दाणाही शेकडो पुरुषांना त्याच्या मोहपाशात अडकवण्यासाठी पुरेसा होता व आपल्याला खायला न धमळाल्यामुळे आपण क्षीण होऊ या तवचारानेच सगळे सैन्य हताश झाले होते. रोज आघाडीवरील मोच्यांमध्ये व त्याच्या बाहेर शत्रूशी सुद्धा तुंबळ युद्ध होत होते. जीवनातील दोन अत्यावश्यक गोष्टी, झोप व अन्नं, सैन्याला धमळत नव्हत्या. मृत्यूचा सवमत्र संचार होता. कुठू नही अन्न धमळत नव्हते. पादशाहजाद्याला ‘आदे शानुसार’ असे ललहून एक पत्र पाठवले गेले क़ी, ‘तू या पररब्स्थतीत असल्यामुळे सैन्यासतहत दरबारास परत ये’. पत्र धमळाल्यावर पादशाहजाद्याने त्याच्या जवळच्या अधिकाऱ्यांशी चचाम केली. प्रथम तो हसन अली खान बहादुर आलमगीरीकडे वळू न म्हणाला क़ी, ‘मोतहम चालवणे हे अधिकाऱ्यांची साथ धमळण्यावर अवलं बून असते. मला बादशाहाकडू न असे पत्र धमळाले आहे. शांतता व युद्ध, घाई व उशीर या बाबतीत तुमचा सल्ला महत्त्वाचा आहे. [२६४] तुम्ही यासारख्या अनेक कठीण पेचप्रसंगातून गेला आहात. याबाबत तुमचा काय तवचार आहे ?’. खान म्हणाला, ‘सैन्याच्या व एकूणच सवांच्या भल्यासाठी मला वाटते क़ी माघार घेणे योग्य आहे. बाल्ख मोतहमेत पादशाहजादा मुराद बक्ष ततथल्या भीषण थंडीमुळे ततथे राहू शकत नव्हता तेव्हा शाहजहानच्या आदे शानुसार त्याने युद्ध थांबवले , मोचे उठवले व तो दरबारास परतला. आपल्या सैन्याची पररब्स्थती सवांना मातहत आहेच व तुम्हाला माघारीचा आदे शही धमळाला आहे’. यानंतर पादशाहजादा इतरांकडे वळला. त्यांनीही खानाला होकार दशमवला. मग पादशाहजादा म्हणाला क़ी, ‘तुम्हाला जे बोलायचे होते ते तुम्ही बोललात. आता माझे ऐका. अंगात जीव आहे तोवर मुहम्मद आजम, त्याची दोन मुले व बेगम या भयंकर दठकाणाहून माघार घेणार नाहीत. माझ्या मृत्यू नंतर अंत्यतविी करण्यासाठी बादशाहा माझ्या पार्थिंवाला बाहेर काढण्याचा आदे श दे तील. माझ्या साथीदारांनी राहावे ककिंवा थांबावे हे त्यांनी ठरवायचे आहे’. मग ते सगळे दुजोरा दे त म्हणाले क़ी, ‘आम्हालाही तसेच वाटते’. बादशाहाला जेव्हा पादशाहजाद्याच्या ततथे थांबण्याच्या तनिामराबद्दल कळले तेव्हा त्याने तफरोज जंग बहादुर याला रतववार1, ४ ऑक्टोबर १६८५ / १६ जजल्कदा १०९६ ला मोठे सैन्य व अगणणत सामग्री [२६५] घेऊन

1

इंग्रजी अनुवादात इथे सोमवार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे रतववार आहे.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२२७

पादशाहजाद्याच्या सैन्याची मदत करायला पाठवले . एक सदी व चार सदी मनसब असले ल्यांपैक़ी बादशाहाच्या समोर असले ले अधिकारी व मोतहमेवर गेलेले मनसबदार यांना त्यांच्या दलातील ततसऱ्या व चौथया भागांची घोड्यांच्या मोजणीची अट लशलथल केली गेली. बादशाही अधिकाऱ्यांना आदे श ददला गेला क़ी (दाघ) मोजणी झाल्यावर घोडे तवकत घेऊन ज्यांचे घोडे युद्धात हरवले असतील त्यांना दे ण्यासाठी हे घोडे पादशाहाजाद्याकडे पाठवावेत. तनरोपाच्या ददवशी तफरोज जंग याला एक अंगरखा, माही व ते नेण्यासाठी एक हत्ती, चार तनशाण व दोन वसशिंडांचे चार केसाळ उंट ददले गेले व त्याला बादशाहाच्या पायांचा मुका घेण्याची अनुमती ददली गेली, बादशाहाने त्याच्या पाठीवरून हात तफरवला. त्याच्या अधिकाऱ्यांना अंगरखे, घोडे, हत्ती व बढत्या ददल्या गेल्या. तफरोज जंग तवद्युत वेगाने पादशाहाजाद्याकडे पोहोचला व थकल्या भागल्या सैन्यात चैतन्य फुलले . तकल्ल्याबाहेर पडू न युद्ध करणाऱ्या शत्रूशी दोन हात करण्यासाठी शाहाने त्याच्या सैन्याची नेमणूक केली. एकदा अचानक असे झाले क़ी तफरोज जंग तवजापूरच्या जवळ रसूलपूरला राहत असताना पाम नाईकने पाठवले ले सहा हजारांचे पायदळ तवजापूरकडे रसद घेऊन रात्रीच्या वेळी जात असताना ततथे पोहोचले . त्यांना वाटले क़ी तकल्ल्याच्या इतक्या जवळ आहे म्हणजे ही तवजापुरी तुकडीच असावी. तफरोज जंगला हेरांकडू न हे कळले असल्यामुळे त्याने संिी सािली [२६६] व सूयोदयापूवी त्यांच्यावर तुटून पडला. शत्रूंपैक़ी एकही जण सुटला नाही, सगळे कापले गेले व शत्रूचा प्रचंड पराभव झाला. शत्रू सैन्याची मुंडक़ी घेऊन तफरोज जंगने पाठवले ल्या ६२ मनसबदारांना २००० रुपये बक्षीस धमळाले . १००० मोहरांच्या वजनाची एक मोहर तफरोज जंगला पाठवली गेली. शतनवार, १० ऑक्टोबर १६८५ / २२ जजल्कदा १०९६ ला इततकाद खानाला इंदी पासून ते भीमेच्या तीरापयंतच्या प्रदे शाचा ठाणेदार नेमले गेले. त्याचा एक साथीदार बारयाचा नूर-उल-बहार याला सैफ खान ही उपािी धमळाली व इतरांना तनरोप दे ताना अंगरखे, घोडे व हत्ती ददले गेले. मरहमत खानाला जाफराबाद (बीदर) व हैदराबाद मिील मुद्गलचा ठाणेदार नेमले गेले. त्याच्या चाकरांना अंगरखे, घोडे, हत्ती व रोख रक्कम ददली गेली. उजैन जवळ गडबड करणाऱ्या पहाडससिंह गौड याने आजम शाहाचा अधिकारी नायब मुलुकचंद, जो त्याला परास्त करण्यासाठी बाहेर पडला होता, त्याच्यावर मोठ्ा सैन्यासह आक्रमण

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२२८

केले . थोड्या झटापटीनंतर त्या बंडखोराला एक बाण लागला व तो मरण पावला. या तवजयाबद्दल मुकुलचंदचे पत्र बादशाहाला दाखवले गेले. दरबारातील उपब्स्थतांनी अणभवादन करून (ईश्वराकडे बादशाहासाठी) आशीवामद मातगतले . फजैल खानाला अंगरखे ददले गेले. एका गुप्त बातमीदाराकडू न त्याला हे आिीच कळले होते व त्याने ते बादशाहाला सांतगतले होते. मुकुलचंदचे पत्र घेऊन आले ल्या इनायतुल्लाह यालाही अंगरखा ददला गेला. तसेच पादशाहाजाद्याचा सेवक अब्दुल हक़ीम ज्याने त्या बंडखोराचे मुंडके बादशाहाकडे आणले त्यालाही अंगरखा ददला गेला. [२६७] बादशाहाने ते मुंडके पादशाहाजाद्याकडे पाठवायचा आदे श ददला. मुकुलचंदला राय-ए-रायान ही उपािी, एक अंगरखा व वाढ दे ऊन त्याला सात सदी केले गेले.

शाह आलम बहादुर यािा हैदराबादवर त्रवजय रतववार, १८ ऑक्टोबर १६८५ / ३० जजल्कदा १०९६ ला शाह आलम बहादुर व खान जहान बहादुर यांच्याकडू न हैदराबाद शहर घेतल्याचे तसेच अबुल हसन गोळकोंड्यात अडकल्याचे वृत्त, शत्रूचा सेनापती इब्रातहम (ज्याला खलीलु ल्लाह खान याने नेमले होते), हरकऱ्या मुहम्मद ताक़ी, अबुल हसनचा मेहुणा शरीफ-उल-मुल्क व इतरांची पादशाहजाद्या सोबत झाले ली भेट, त्या सगळ्यांना मनसब दे ण्यासाठी केले ली तवनंती व अबुल हसन याचे प्रशस्तीचे पत्र, हे सगळे पादशाहाजाद्याचा एक अधिकारी मीर हाशीम याने बादशाहाकडे आणले . दरबारात उपब्स्थत असले ल्यांनी या मोठ्ा तवजयाबद्दल अणभवादन केले . आनंदी संगीत वाजवले गेले. बादशाहाने अबुल हसनचे पत्र त्याला दाखवायला सांतगतले . हाक़ीम फतहुद्दीनचा मुलगा व हाक़ीम मुहसन खानाचा काका धमझाम मुहम्मद लशराझी1 याने ते बादशाहाला दाखवले व खालील कालश्ले षाने तवजयाचा काळ सांतगतला. [२६८] * * * *

‫دل جهانيان شاد‬ ِ ‫از نرص ِت پادشاه غازي گرديد‬ ‫بجنگ حيدرآباد‬ ‫حساب تاري خ شد فتح‬ ‫آمد بقلم‬ ِ ِ

1

इंग्रजी अनुवादातील तळटीपेनुसार याला तनयामत खान अली व नंतर दातनशमंद खान अशी उपािी धमळाली. याने गोळकोंड्याच्या वेढ्याचा प्रलसद्ध वृतांत व शाह आलम पतहला याचा बहादुर शाह नामाह नावाचा अपूणम अधिकृत इततहास ललतहला आहे.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२२९

‫ ه‬۱۰۹۷ ‫سنه‬ अज नुस्रत-ए-पादशाह घाझी गरदीद ददल-ए-जहानयीन शाद आमद बकलम तहसाब-ए-तारीख शुद फतह जंग-ए-हैदराबाद िममवीर बादशाहाच्या तवजयाने लोकांचे मन आनंददत झाले तारखेची संख्या ललतहली गेली ‘हैदराबादची लढाई जजिंकली’ तहजरी सन १०९७ त्याला एक अंगरखा ददला गेला. पादशाहजादा शाह आलम बहादुर याला दहा हजारीची वाढ धमळू न तो आता चाळीस हजारी (३०००० स्वार) झाला. जानमाजखान्याचा पूवम दरोगा मीर अब्दुल करीम याला पादशाहजादा, त्याची मुले, खान जहान, सर-इ-लश्कर इब्रातहम व पादशाहजाद्याच्या हाताखाली काम करणाऱ्या नामदारांसाठी अंगरखे व रत्ने घेऊन जायला सांतगतले . दे वडीचा मुश्रीफ मुहम्मद शफ़ी, करावलांचा मुश्रीफ आलाह यार, पादशाहजाद्याचा सेवक मीर हाशीम, मुनव्वर खानाचा मुलगा सय्यद अबु मुहम्मद व हीरा कुंभारचा मुलगा कल्याण हे सगळे कामासाठी एकत्र जात होते. ते हैदराबाद पासून चार कोस लांब असले ल्या मंगल येथे आले तेव्हा अचानक आले ल्या महापूरत घरे वाहून जातात तसे अगणणत सैन्य घेऊन शेख तनजाम हैदराबादी ततथे अचानक प्रकट झाला. त्यांनी इतके मोठे सैन्य किी बधघतले नव्हते तरी मीर अब्दुल करीम वगळता, ते सगळे िीराने लढले . तो जख्मी होऊन पडला [२६९] व त्याला नंतर बंदी बनवले गेले. इतर सगळे मारले गेले. सय्यद मुजफ्फरची मुले नजाबत खान व आसालत खान यांना कललच खानाच्या तुकडी सोबत जाफराबादहून (बीदर) पाठवले होते. त्यांनी शत्रूशी संगनमत केले असल्याने वरकरणी युद्ध केल्याचे दाखवून ते शेख तनजामला साधमल झाले . इतर काही कारण नसताना केवळ त्यांच्या बरोबर जाण्यासाठी तनघाले ले अनेक प्रवासी तवनाकारण मारले गेले. बादशाहाने पाठवले ले अलं कार, अंगरखे व इतर सामान तसेच प्रवाशांचे व व्यापाऱ्यांचे सामानही शत्रूने जप्त केले . गोळकोंड्याचा अबुल हसन याच्या लोकांनी चार ददवसांनी मीर अब्दुल करीम याला हैदराबाद शहराच्या सीमेवर असले ल्या पादशाहजाद्याच्या छावणीत सोडले व ते नाहीसे झाले . हेजीब (दत) मुहम्मद मुराद खान याला हे कळल्यावर त्याने त्याला त्याच्या घरी नेले. काही ददवसात त्याच्या जखमा बऱ्या झाल्या व तो पादशाहजाद्याला भेटला. अबुल हसन याने पादशाहजाद्यासाठी ददले ला तोंडी तनरोप त्याने सांतगतला व तो तनघून गेला. बादशाहाने

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३०

दरबारास बोलावले ल्या खान जहान बहादुर याच्या बरोबर तो दरबारास पोहोचला. गुरूवार, २९ ऑक्टोबर १६८५ / ११ जजल्हेज १०९६ ला सर-इ-लश्कर मुहम्मद इब्रातहम याला पादशाहजाद्याच्या तवनंतीनुसार सहा हजारी (तततकेच स्वार) व महाबत खान ही उपािी, शरीफ-उल-मुल्क याला तीन हजारी (३०० स्वार), हरकऱ्या मुहम्मद ताक़ी याला दोन हजारी (३०० स्वार) व इततबार खान ही उपािी ददली गेली. सोमवार, २ नोव्हेंबर १६८५ / १५ जजल्हेज १०९६ ला सजावर खान वारला. त्याचा मुलगा रहमतुल्लाह याला दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. बादशाहाला तफरोज जंग कडू न पत्र धमळाले क़ी तवजापूर मिील िमिम्यांवरील तोफ ताब्यात घेतली आहे. तफरोज जंगला दे ण्यासाठी पाचूची एक अंगठी लसआदत खानाकडे ददली गेली. [२७०] बुिवार, ९ धडसेंबर १६८५ / २२ मुहरमम १०९७ ला उम्दतउल-मुल्क आसद खान याची आई ददल्लीला वारली. त्याच्याकडे दुखवट्याची वस्त्रे पाठवली गेली. तुराणहून आले ला रहीम बे व इराणहून आले ला ददवंगत सफलशकन खानाचा जावई हाजी मुहम्मद राफ़ी, यांना अंगरखे ददले गेले. हाजी कासीम याचा मुलगा नस्खनतवस धमझाम मुहम्मद कुराणाची प्रत करण्यासाठी मुंगीपाटण येथे गेला होता, तो परतल्यावर त्याला १००० रुपये बक्षीस धमळाले . बहरामंद खानाला पाटणकडे पाठवले गेले. लसकंदर खान व इतरांना त्याच्या बरोबर जाण्यासाठी तनयुक्त केले गेले. अजम-इमुकरमरचा दरोगा लसयादत खान व सद्र फाजजल खान यांना हररताश्माची दौत ददली गेली. मुख्तार खानाला िनुष्य व भाता दे ऊन हळसंगी ठाण्यावर पाठवले गेले. गुरूवार, २४ धडसेंबर १६८५ / ७ सफर १०९७ ला खान जहान बहादुर हैदराबादहून आला व भेट घेतली, त्याला अंगरखा धमळाला. त्याच्या बरोबर असले ल्या सुभानजी व इतर दख्खनी सरदारांनाही अंगरखे ददले गेले. गुरूवार, ३१ धडसेंबर १६८५ / १४ सफर १०९७ ला रशीद खानाला काही तवभागांची व्यवस्था लावायला कहिंदुस्थानाला (उत्तरेला) पाठवले गेले. ददवंगत बख्तावर खानाचा ददल्ली मिील महाल लसयादत खानाला ददला गेला. काबुलचा सुभेदार आमीर खान याला एक अंगरखा व हजार जात अशी वाढ झाल्याचे सांगणारे प्रशस्तीचे फमामन पाठवले गेले. राण्याचा पूवम सेवक हातीम याला तुडा-भीम चा फौजदार नेमले गेले. दीनदार या नावाने नुकताच इस्लाम िमामत आले ला ब्रजभूषण कवामुद्दीन-खानी याला इखलास खानाच्या जागी जानमाजखानाहचा मुश्रीफ नेमले गेले. इखलास खानाला

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३१

रौशनरक्मच्या जागी अजांचा मुश्रीफ केले गेले. [२७१] कमरुद्दीन खान दरबारास आला होता त्याला एक हत्ती दे ऊन त्याच्या वधडलांकडे परत पाठवले गेले. त्याच्या वधडलांसाठी त्याच्याकडे एक अंगरखा व एक तलवार ददली गेली. मक्केच्या शरीफचा दत अहमद आका येऊन भेटला व त्याला एक अंगरखा व २००० रुपये दे ण्यात आले . रतववार, ३१ जानेवारी १६८६ / १६ रतब-उल-अव्वल १०९७ ला महाबत खान व शरीफ-उल-मुल्क यांनी भेट घेतली. खानाला एक तवशेष अंगरखा, सोन्याच्या साजाची तलवार, ४१ घोडे, एक हत्ती, ५०००० रुपये व नऊ तोळे अत्तर ददले गेले तर दुसऱ्याला एक अंगरखा, स्फदटकाची मूठ असले ला एक खंजीर, १०००० रुपये व सात तोळे अत्तर ददले गेले. त्याची मुले तहदायतुल्लाह व इनायतुल्लाह यांना अंगरखे धमळाले . अब्दुल काददर दख्खनी याला दोन हजारी (१००० स्वार) व एक हत्ती धमळाला. लसवा मकहूर याचा जावई अचलोजी याला भेटीच्या ददवशी पाच हजारी (२००० स्वार), नगारे, तनशाण, रत्नजधडत पहुंची व एक हत्ती दे ण्यात आला. तोफखान्याचा दरोगा सफलशकन खान तवजापूरहून आला होता, एक खंजीर व एक हत्ती ददल्यावर त्याला त्वररत परतायचा आदे श ददला गेला. पलं गतोश खान बहादुर याला लशक्षा करण्यासाठी त्याचे पद व मनसब काढू न घेण्यात आली. त्याच्या जागी वजीर खान शाहजाहनी याचा मुलगा लसलाह खान याला खवासींचा दरोगा, हे बादशाहाच्या जवळच्या पदांपैक़ी एक ददले गेले व त्याला अन्वर खान ही उपािी धमळाली. सुहराब खानाला त्याच्या जागी मीर तुजुक केले गेले. शतनवार, ६ माचम १६८६ / २० रतब-उस-सानी १०९७ ला [२७२] बादशाहाची परस्तार औरंगाबादी महल तहला घेऊन येण्यासाठी खान जहान बहादुरला बऱ्हाणपूरला पाठवले गेले. बादशाहाने स्वतःच्या हाताने त्याला फुलकटारा व मोत्यांचा इलाका असले ला रत्नजधडत खंजीर ददला. परस्तारसाठी त्याच्याकडे एक पाचूची स्मरणी ददली गेली. खान जहान व रुहुल्लाह खानाच्या मुलांनी एकमेकांना अणभवादन करताना हात डोक्याकडे नेला. बादशाहाने आदे श ददला क़ी यापुढे कोणीही अणभवादन करताना हात डोक्याकडे न्यायचा नाही व कोणी जर हे पाळले नाही तर त्याला घुसलखान्यात प्रवेश धमळणार नाही. बुखाऱ्याचा राजा अब्दुल अजीज खान मक्केला गेला असता दरबारास परतायच्या आिी ततथेच मरण पावला. त्याचा सेवक मीर जलालु द्दीन दरबारास आला व त्याला एक अंगरखा, सोन्याच्या मुठीचा एक रत्नजधडत खंजीर व १००० रुपये ददले गेले.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

कुतुबशाहािा प्रिानमंत्री मदाण्णा (साभार BnF)

२३२

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३३

तरबीयत खानाच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा दरबारास आला त्याला दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. मंगळवार, १६ माचम १६८६ / १ जमाद-उल-अव्वल १०९७ ला अबुल हसनचा एक नातलग झैन-उल-आबदीन याने भेट घेतली, त्याला अंगरखा ददला गेला. अबुल हसनचा आज्ञािारकपणा व शरणागती याचा पुरावा म्हणून त्याने शाह आलमकडे मदाण्णा ब्राह्मणाचे मुंडके पाठवून ददले . पादशाहजाद्याने ते बहादुर अली खान याच्या हाती बादशाहाला पाठवले . पाटणचा फौजदार हमीदुद्दीन खान याला कंदहारचा तकल्ले दार नेमले गेले. पदच्युत केले ला रुस्तम बेग दरबारास आला. ददवंगत हफ़ीज मुहम्मद आमीन खान याची ददल्लीतील हवेली महाबत खानाला ददली गेली. सय्यद झैनउल-आबदीन याला ददवंगत सय्यद अनवर खानाच्या जागी सोलापूरचा तकल्ले दार व फौजदार नेमले गेले. मुख्तार खानाला एक रत्नजधडत खंजीर [२७३] दे ऊन तवजापूरला पाठवले गेले. बख्तबुलंद याला दे वगड म्हणजे इसलामगडची जमीनदारी ददली गेली व एक अंगरखा, एक असी व एक घोडा ददला गेला. मुहम्मद आजम शाहचा एक सेवक बुलंद अफगाण याने राय-इ-रायान मुलुकचंद याने पाठवले ली पहाडससिंह गौड याच्या मुलांची डोक़ी दरबारास आणली, त्याला एक अंगरखा धमळाला. फजैल खानाने आणले ले इमाजी व तुकोजी यांना प्रत्येक़ी एक अंगरखा व एक हत्ती धमळाला. राय-इ-रायन मुकुलचंद वारला. त्याच्या जागी बहरावर खानाला माळव्याचा सुभेदार नेमले गेले. बुिवार, २१ एतप्रल १६८६ / ७ जमाद-उस-सानी १०९७ ला औरंगाबादी महल ददल्लीहून बादशाही छावणीत पोहोचली. पादशाहजादा मुहम्मद काम बक्ष ततचे स्वागत करायला दे वडी जवळ तकल्ल्याच्या दरवाज्यापयंत पुढे गेला. खान जहान बहादुर, त्याची मुले व अधिकारी सय्यद मुनव्वर खान यांना भेटीनंतर एक अंगरखा ददला गेला. त्याचा सवामत मोठा मुलगा तहम्मत खान याला अंगरखा, तलवार व एक हत्ती दे ऊन तवजापूरला पाठवले गेले. जसवंतससिंह बुद ं े ला याला अंगरखा, एक हत्ती व नगारे ददले गेले. बंडखोर पादशाह कुली खान याचा भाऊ फाजजल बेग याला तहव्वर खान ही उपािी दे ऊन तहम्मत खानाच्या हाताखाली तनयुक्त केले गेले. दौलताबादचा तकल्ले दार सय्यद मुबारक खान याला मुतमजा खान ही उपािी धमळाली. मरहमत खानाला खजजना घेऊन तवजापूरला जायचा आदे श ददला गेला.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३४

फाजजल खान आला-उल-मुल्क याचा मुनशी रामराय, याचा कविंध्याचल नावाचा भाऊ होता. अब्दुर रहीम खान त्याच्या दोन मुलांना मध्यरात्री बादशाहाकडे घेऊन आला. [२७४] त्यांनी इस्लाम िमम स्वीकारला व त्यांना सआदतुल्लाह व सआदुल्लाह अशी नावे

ददली गेली. ददवसाच्या शेवटी आदे शानुसार, ख्वाजाने त्या दोघांना हत्तींवर बसवून झेंडे फडकवत व संगीत वाजवत शहरातून धमरवणूक काढली. सोमवार, ३ मे १६८६ / १९ जमाद-उस-सानी १०९७ ला खान जहान बहादुर याला कहिंदुस्थानातील बंडखोरांना िडा लशकवण्यासाठी आग्र्याकडे पाठवले गेले. त्याला एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत तलवार, सोन्याच्या साजाचा एक घोडा, एक हत्ती व दोन कोटी दाम ददले गेले. तहम्मत खान व मुनव्वर खान सोडू न त्याच्या इतर मुलांना त्याच्या बरोबर जाताना अंगरखे ददले गेले. जुन्नरचा तकल्ले दार अब्दुल अजीज खान वारला. त्याचा मुलगा अब्दुल खैर खान याने त्याची जागा घेतली. जाफराबादचा फौजदार जानलसपार खान दरबारास आला होता त्याला परत पाठवले गेले. मीर मुनशी व सद्र फाजजल खान याला खखदमत खानाच्या जागी अजांचा दरोगा हे अततररक्त पद ददले गेले. रुहुल्लाह खानाचा मुलगा मीर हसन याचे आमीर खानाच्या मुलीशी लग्न लावले गेले व त्याला खानाहजाद खान ही उपािी व सोन्याच्या साजाचा एक घोडा ददला गेला. इहतमाम खानाला खखदमत खानाच्या जागी बादशाही जनानखान्याचा नाजजर नेमले गेले. बहरामंद खानाला इंदीच्या ठाण्यावर पाठवले गेले. त्याचा सहाय्यक मुहम्मद मतलब याने सेवा करताना प्राण अपमण केले . सोमवार, ७ जून १६८६ / २५ रज्जब १०९७ ला शाह आलम बहादुर याने भेट घेतली व त्याला गोशपेच असले ला अंगरखा व एक रत्नजधडत पहुंची ददली गेली. [२७५] सवम पादशाहजादे व शाहजाद्यांना अंगरखे ददले गेले. शतनवार1, १२ जून १६८६ / ३० रज्जब १०९७ ला पादशाहजाद्याच्या वाढददवसाच्या ददवशी त्याला ४०००० रुपयांची, माणकाची असी ददली गेली. पादशाहजाद्याचा सेवक मुमीन खान याने अबुल हसन कडू न बादशाहासाठी १०० हत्ती आणले . अबुल हसनचा दत मुहम्मद मआसूम याने भेट घेतल्यावर त्याला अंगरखा ददला गेला. कललच खानाने जाफराबादहून येऊन भेट घेतली. मुहम्मद मतलब याला ददवंगत सैफुल्लाह खानाच्या जागी मीर तुजुक

1

इंग्रजी अनुवादात इथे शुक्रवार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे शतनवार आहे.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३५

नेमले गेले. मुहकमससिंह चंद्रवत त्याच्या घरून दरबारास आला व त्याला एक अंगरखा धमळाला.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३६

त्रवजापूरिा त्रकल्ला घेण्यािाठी बादशाहािे िोलापूरहून कूि लसकंदरला (आददलशाह) खखजजरच्या मैत्रीचे सुदैव प्राप्त न झाल्यामुळे त्याला राज्यपदाचे सवोच्च स्थान (सावमभौमत्व) धमळवता आले नाही1. सत्तेतील त्याच्या वाटे कऱ्यांनी [२७६] लसद्दी मसाऊद, अब्दुर रौफ व सेनापती शारजा यांना त्याच्यावर अंकुश ठे वण्यासाठी नेमले व त्यांनी त्याला काहीच महत्त्व ददले नाही. अहंकार व गर्विंष्ठपणामुळे ते एकमेकातच भांडत असत. राजाला शहर सोडता येत नव्हते पण तो नागरीकांचा छळ करत असे. उन्मत्त कातफर संभा याच्या प्रभावाखाली येऊन मुसलमानांचा छळ करण्यात त्याचा बरोबरीचा हात असे. संकटकाळात तवजापूरचा तकल्ला त्याला वाचवेल ही त्याची िारणा होती. एकदा लसरकहिंदचा शेख मुहम्मद नक्षबंदी याने भेट घेतली. चचाम करताना तो म्हणाला क़ी, ‘मला कळले क़ी बादशाहाला तवजापूरवर स्वारी करायची आहे’. बादशाहा उत्तरला, ‘आम्हा राजांना आमच्या पदाचा एकच लाभ होतो तो म्हणजे प्रलसद्धी धमळणे. माझी इच्छा होती क़ी माझ्या एखाद्या मुलाने तो घ्यावा पण तसे होताना ददसत नाही. त्यामुळे मी स्वतः जाऊन बघणार आहे क़ी ही काय भभिंत आहे जी आमच्या समोर झुकत नाही’. सोमवार, १४ जून १६८६ / २ शाबान १०९७ ला बादशाही छावणी सोलापूरहून तवजापूरच्या ददशेने हलली. शतनवार, २६ जून १६८६ / १४ शाबान १०९७ ला पादशाहजादा मुहम्मद आजम व बीदर बख्त [२७७] यांनी भेट घेतली व त्यांना अंगरखे ददले गेले. बहादुर खान व राव कणमचा मुलगा राव अनूपससिंह यांना भेटीच्या वेळी अंगरखे ददले गेले. शतनवार, ३ जुलै १६८६ / २१ शाबान १०९७ ला बादशाही छावणी तवजापूर पासून तीन कोसावर असले ल्या रसूलपूराला पोहोचली तेव्हा तफरोज जंग बहादुर याने भेट घेतली. त्याला ३०००० रुपये, ९५०० रुपयांचे दहा घोडे, चांदीच्या साजाचा एक हत्ती व एक तवशेष अंगरखा दे ऊन त्याला बीदर बख्तच्या जागी पाठवण्यात आले . त्याचा मुलगा कमरुद्दीन खान याला मोत्यांचा इलाका असले ला एक रत्नजधडत खंजीर ददला

1

जगज्जेत्या लसकंदरला खखजजर नावाच्या प्रेतषताने अंिाऱ्या जंगलातून वाट दाखवत पाण्याचा स्रोताकडे नेले होते व ततथले पाणी तपऊन तो नंतर जगज्जेता झाला अशा कथेचे लसकंदरवर बेतले ले एक नाटक आहे. त्यातील लसकंदर आणण लसकंदर आददलशाह यांच्या नावातील समानतेवरून साक़ी मुस्तैद खानाने ही उपमा मांडली आहे.

अध्याय २९

२२ जुलै १६८५ ते ११ जुलै १६८६

२३७

गेला. रतववार, ४ जुलै १६८६ / २२ शाबान १०९७ ला बादशाहाने मोचे पुढे न्यायचा, बुरूज तोफांनी उध्वस्त करण्याचा व खंदक भरण्याचा आदे श ददला.

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२३८

अध्याय ३० राजवटीचे ततसावे वषम – तहजरी १०९७-९८ १२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७ * * * * [२७८] नवाजजश खानाला मांडसौरचा तकल्ले दार व फौजदार नेमून एक

अंगरखा ददला गेला. सुहराब खानाला रत्नजधडत जजघा ददली गेली. सरफराज खान व दाऊद खान यांनी भेट घेतल्यावर त्यांना अंगरखे ददले गेले. शेख तनजामाचा मुलगा अबुल खैर याला मुहम्मद शरीफच्या जागी जानमाजखानाहचा दरोगा नेमले गेले व मी दीनदार खानाच्या जागी या तवभागाचा मुश्रीफ झालो. हसन अली खानाच्या हाताखाली राजजउद्दीन खान त्या प्रांताचा कारभार चालवत होता. एकदा त्याच्या सैतनकांशी बोलत असताना तो अचानक खाली पडला व मरण पावला. इररज खानाचा जावई मुहम्मद मुमीन याला ददवंगत राजजउद्दीन खान याच्या जागी बेरारचा नायब सुभद े ार नेमले गेले. शतनवार, २१ ऑगस्ट १६८६ / ११ शव्वाल १०९७ ला कललच खानाला भाता व िनुष्य दे ऊन मोच्यामवर नेमले गेले. ददले र खानाचा मुलगा कमालु द्दीन खान याच्या जखमा भरून तनघाल्या होत्या त्यामुळे त्याने येऊन भेट घेतली, त्याला एक अंगरखा, एक तलवार व हररताश्म असले ली एक आसा ददली गेली. इततकाद खान अहमदनगरहून आला व भेट घेतली. राजा भीमससिंह आदे शानुसार अजमेरहून आला व भेट घेतली. शतनवार, ४ सप्टें बर १६८६ / २५ शव्वाल १०९७ ला तकल्ल्याच्या बुरूजा समोर उभारले ल्या तोफेची पाहाणी करायला व मोतहमेला इतका उशीर का होत आहे ते बघायला बादशाहा थेट खंदकापयंत दौडत गेला. जमले ल्या लोकांनी एकच हलकल्लोळ केला आणण तकल्ल्यातून अग्ग्नबाण व गोळ्यांचा वषामव सुरू झाला. [२७९] आगीचे गोळे बादशाहाच्या डोक्यावरून गेले. मीर अब्दुल करीम याने कल्पकतेने ते वषम सांगणारा कालश्ले ष लशसाच्या ले खणीने एका कागदावर खरडला आणण बादशाहाला दाखवला -

‫فتح بيجاپور زودي ميشود‬ ِ फतह-ए-तबजापूर जुदी मीशुद तवजापूर लवकरच जजिंकले जाईल

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२३९

बादशाहाने ते चांगले लक्षण मानून उत्तर ददले , ‘ईश्वर असेच करो’ आणण ईश्वराच्या कृपेने, त्याच आठवड्यात तकल्ला जजिंकला गेला. शतनवार, ११ सप्टें बर १६८६ / ३ जजल्कदा १०९७ ला मोचे खणायचे काम उत्तम प्रकारे केल्याबद्दल जलाल नावाच्या दासाला सरबराह खान ही उपािी दे ण्यात आली. दोन मतहने व बारा ददवसात बादशाही सैतनकांनी शत्रूला संपवण्यासाठी सगळे काही गोळा केले होते त्यामुळे आपले मरण जवळ आले ले बघून लसकंदर व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या अपरािांसाठी क्षमा मागत जीवदान मातगतले . रतववार, १२ सप्टें बर १६८६ / ४ जजल्कदा १०९७ ला आलमगीर ने तो तकल्ला जजिंकला व बादशाही सत्तेखाली आल्यामुळे त्या दे शातील सवम स्तरांतील लोकांचे भाग्य उजळले . त्या दे शात बराच काळ इस्लामचे झेंडे उलटे झाले होते ते पुन्हा मानाने वर आले . पृथवीच्या चारही कोपऱ्यातून आवाज आला व गगनात दुमदुमला, ‘सत्याचा तवजय व असत्याचा सवमनाश’.

बादशाहाने उदार मनाने [२८०] लसकंदर आददलशाह याची तवनंती मान्य केली, त्यामुळे तो बादशाही क्रोिापासून वाचला. त्याला ददवान-इ-आम मध्ये भेटीची अनुमती धमळाली व त्याला एक तवशेष अंगरखा, ७०० रुपयांचा मोत्यांचा इलाका व फूलकटारा सतहत एक रत्नजधडत खंजीर, १३००० रुपयांचा पाचूचे लोलक असले ला मोत्यांचा कंठा, एक रत्नजधडत कलगी व एक रत्नजधडत आसा धमळाली. त्याला लसकंदर खान ही उपािी दे ऊन वार्षिंक एक लक्ष रुपये भत्ता मान्य झाला. गुलालबाडीत त्याच्यासाठी एक तंबू ठोण्यात आला व आवश्यक सामान पुरवले गेले. लसकंदर बे याला पूवी लसकंदर खान ही उपािी ददली गेली होती, आता त्याच्या अललकडे अललफ1 लावून इस्कंदर खान असा बदल केला गेला. अब्दुर राऊफ व शारजा भेटी करता आले , त्यांना प्रत्येक़ी एक अंगरखा, एक तलवार, मोत्यांचा इलाका असले ला एक रत्नजधडत खंजीर, सोन्याच्या साजासतहत एक घोडा, चांदीच्या साजासतहत एक हत्ती व सहा हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. यातील आिीच्याला, ददले र खान व नंतरच्याला रुस्तम खान अशा उपाध्या ददल्या गेल्या. महाबत खान, शरीफ-उल-मुल्क मुख्तार खान व सफमराज खान यांना हत्ती ददले गेले, कलीच खानाला एक खंजीर व एक घोडा, लु त्फुल्लाह खान व घजनफर खानाला तनशाण 1

अललफ (‫ )ا‬हे फासी ललपीतील पतहले अक्षर आहे. दोन लसकंदर खानांमध्ये गोंिळ होऊ नये म्हणून लसकंदर बे याच्या उपािी मिील लसकंदर (‫ )سکندر‬चे इस्कंदर (‫ )اسکندر‬करताना ‘स’ च्या अललकडे अललफ लावला गेला.

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४०

व तुघ, सफलशकन खानाला नगारे, तहम्मत खानाला रत्नांच्या साजाची तलवार तर कमरुद्दीन खानाला एक रत्नजधडत खंजीर ददला गेला. [२८१] बादशाहाने उदार मनाने त्याच्या उपब्स्थतीत उम्दत-उल-मुल्क आसद खान याला उशीवर पाय दुमडू न बसायची अनुमती ददली. सुखसज्जाखानाहचा दरोगा ख्वाजा वफा याने त्याच्याकडे एक मसनद, सोन्याच्या िाग्यांची बैठक व सोन्याचे भरतकाम असले ली सुझानी नेली व खानाने त्याला एक अंगरखा व १००० रुपये ददले . बादशाहाने त्याला पैसे स्वतःकडे ठे वायची अनुमती ददली. हसन अली खान बहादुर आलमगीरशाही गंभीर आजाराने मरण पावला. तो एक अजोड वीर व सेनापती होता, त्या बरोबरच दानशूर, सत्यवचनी व सदाचारी होता. मुहम्मद मुक़ीम व खैरुल्लाह या त्याच्या मुलांना अंगरखे ददले गेले. महाबत खानाला त्याच्या जागी बेरारचा सुभेदार नेमले गेले व त्याला एक अंगरखा, झराह, लशरस्त्राण, राक शलवार व दबलघा ददला गेला. मुहम्मद साददक याला त्याचा सहाय्यक नेमले गेले. रतववार, १९ सप्टें बर १६८६ / ११ जजल्कदा १०९७ ला बादशाही छावणी रसूलपूरहून हलवून तकल्ल्यापासून अिाम कोस अंतरावर आलापूर दरवाज्यासमोर असले ल्या तलावा शेजारी नेली गेली. त्या ददवशी बादशाहा तकल्ला, त्यातील इमारती व नगरकोटाच्या भभिंतीचे काम वगैरे बघायला बाहेर पडला. शुक्रवार, १७ सप्टें बर १६८६ / ९ जजल्कदा १०९७ ला मीर बक्षी अशरफ खान याचा मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने, अचूक अथमबोि आणण वेगवान ले खणीच्या बागेतील गुलाब कोमेजला. रुहुल्लाह खानाला त्याच्या जागी सवोच्च बक्षीचे पद ददले गेले व बहरामंद खानाला त्याच्या जागी सहाय्यक बक्षी तर बरहामंदच्या जागी कामगार खानाला घुसलखान्याचा दरोगा नेमले गेले. कामगारच्या जागी कालसम खानाला मीर तुजुक नेमले गेले. [२८२] मुहम्मद हुसैन व मुहम्मद बक्र या अशरफ खानाच्या भावाच्या मुलांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. २५ सप्टें बर १६८६ / १७ जजल्कदा १०९७ च्या रात्री बादशाहाने लसकंदरला त्याच्याकडे बोलावून घेतले , त्याला आदराने बसायला सांतगतले व त्याला तहऱ्याचा लशरपेच व पानसुपारीची तीन पातकटे ददली. * * * रुहुल्लाह खानाला तवजापूरचा नाजजम नेमले गेले. तवजापूरला आता दार-उल-जफर असे म्हटले गेले. त्याला हजार जात व स्वारांची वाढ दे ऊन पाच हजारी (४००० स्वार) धमळाली. अझीझुल्लाह खानाला तकल्ले दार नेमले गेले, मुहम्मद रफ़ी याला ददवाण, सआदत खानाला बक्षी व वाकनतवस, लसद्दी इब्रातहम

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४१

याला कोतवाल व फौजदार, हाजी मुनीम याला तोफखान्याचा दरोगा, झैन-उल-आतबदीन व मुहम्मद जाफर यांना अनुक्रमे दाघ-इ-तशीहचा दरोगा व आमीन नेमले गेले. अबुल बरकत याला काझी व मुहम्मद अफजल याला (नुकत्याच जजिंकले ल्या प्रांताचा) िममशास्ता नेमले गेले. गुरूवार, १४ ऑक्टोबर १६८६ / ६ जजल्हेज १०९७ ला लसकंदर खानाला १०००० रुपये बक्षीस ददले गेले. खानाहजाद खानाला धमरजेकडे पाठवले गेले. खान जहान बहादुरचा मुलगा तहम्मत खान बहादुर याला आलाहाबादचा सुभद े ार नेमले गेले. तो अडीच हजारी (२२०० स्वार) होता व त्याला ऐशी लक्ष रुपये दाम बक्षीस ददले गेले. तकफायत खान हातीम याला नवीन प्रदे शाचा कारभार लावायला सागरला पाठवले गेले. त्याचा जावई जाफर याला त्याच्या सोबत त्या तवभागाचा ददवाण म्हणून पाठवले गेले. [२८३] खानाला एक हत्ती धमळाला. इख्लासकेश याला यार अली बेग याच्या जागी मीर बक्षीचा पेशदास्त नेमले गेले तर यार अली याला सहाय्यक बक्षीचा पेशदास्त नेमले गेले. राजा अनूपससिंह याला सागरचा तकल्ले दार व फौजदार नेमले गेले. अब्दुल वातहद खान याला नवीन प्रदे शात पाठवले गेले. काददरदाद खानाला धमरजेचा तकल्ले दार नेमले गेले. कालसम खानाला बसवपट्टणला पाठवले गेले व शेखचंद याला ततथला तकल्ले दार नेमले गेले. शतनवार, २३ ऑक्टोबर १६८६ / १५ जजल्हेज १०९७ ला लसकंदर खानाच्या कुटुं बातील सोळा जणांना १५० मोहरा बक्षीस ददल्या गेल्या. या लोकांच्या डाव्या हाताची बोटे कापून त्यांना उत्तराधिकाराच्या अधिकारातून वगळण्याचा करार त्यांच्या आजोबांच्या काळात झाला होता. या लोकांना त्यांची मुले व कुटुं बासतहत सोलापूरला राहण्याचा आदे श ददला गेला व त्यांना वार्षिंक भत्ता धमळाला. खान जहान बहादुरचा मुलगा लसपाहदार खान याला मुकरमम खानाच्या जागी लाहोरचा सुभद े ार नेमले गेले. मंगळवेढ्याच्या आसपास पसरले ल्या संभाच्या सैन्याला िडा लशकवण्यासाठी इततकाद खानाला बगळ्याच्या तपसाचा परखानाह असले ली एक रत्नजधडत कलगी दे ऊन ततथे पाठवले गेले.

बादशाहा त्रवजापूरहून िोलापूरला परत येतो शतनवार, ३० ऑक्टोबर १६८६ / २२ जजल्हेज १०९७ ला बादशाहाने तवजापूर सोडले [२८४] व मंगळवार, २ नोव्हेंबर १६८६ / २५ जजल्हेज १०९७ ला सोलापूरला पोहोचला. लसकंदर खानाला (आददलशाह) व त्याच्या कुटुं बाला घेऊन यायचा आदे श ददला गेला, तसेच त्याच्या राज्यपदाची तनशाणी असले ल्या माही-मरातीब, छत्री व इतर

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४२

वस्तु कोठारात ठे वायचा आदे श ददला गेला. त्या ददवशी तफरोज जंग याला हैदराबाद मिील इब्राहमगड घ्यायला पाठवले गेले. त्याला एक तवशेष अंगरखा व एक हत्ती ददला गेला. तफरोज जंगच्या सैन्यात नेमले ले सरदार ददले र खान, शारजा खान, जमशीद खान, मालु जी, गोपाळराव, कमालु द्दीन खान, अब्दुर काददर खान, जहांगीर कुली खान, सफ़ी खान, उद्वतससिंह भादुररया, सरबराह खान (चेला) व इतर सवम लहान मोठ्ांना अंगरखे रत्ने, घोडे, हत्ती, बढत्या व उपाध्या ददल्या गेल्या. शतनवार, ६ नोव्हेंबर १६८६ / २९ जजल्हेज १०९७ ला बादशाहाने सोलापूरच्या तकल्ल्याला भेट ददली. रतववार, २१ नोव्हेंबर १६८६ / १५ मुहरमम १०९८ ला बीदर बख्तचा तववाह मुख्तार खानाच्या मुलीशी केला गेला. काझी अब्दुल्लाह याने लग्न लावले . शाहजाद्याला त्याच्या आजोबांनी (बादशाहा) एक अंगरखा, माणकाचा लशरपेच, एक असी, मोत्यांचा कंठा, एकलरी (माळ), आठ अंगठ्ा, एक लक्ष रुपये, दोन घोडे व एक हत्ती ददला. [२८५] नवविूला एक अंगठी, मोत्यांचा कंठा व रत्नजधडत कडे धमळाले . सोमवार, २२ नोव्हेंबर १६८६ / १६ मुहरमम १०९८ ला मक्क्याच्या शरीफचा दत अली आका1 याला एक अंगरखा, खंजीर, घोडा व ३००० रुपये दे ऊन तनरोप ददला गेला. लसकंदर खानाची मुलगी अयेशा तहला मोत्यांची टोपी ददली गेली. मीर अब्दुल करीम दुसऱ्यांदा सात चौक़ीचा अमीन झाला.

बादशाहा िोलापूरहून हैदराबादकडे कूि करतो हैदराबादचा राजा अबुल हसन हा मूखम होता व पापाच्या गतेत बुडाला होता. त्याचे दुभामग्य त्याला नको त्या मागामवर नेत होते व मृत्यूनंतरच्या जगात दं डनीय असले ल्या अपरािांकडे डोळे धमटू न त्याने भटक्या कहिंदुंना त्याने राज्याचे अधिकारी व कारभारी म्हणून नेमले होते व त्या शातपत जमातीमिील (कहिंदुंच्या) प्रथांना चालना ददली होती. ते चुक़ीच्या मागामने जाणारे भटके अज्ञानी, सडले ले मांस खाणारे जंगली राक्षस, ते इराणी (लशया) त्या नालायक पंथाच्या (कहिंदु) सहाय्याने सावमजतनक ररत्या सवम प्रकारची पापे करू लागले होते. इस्लाम व त्याच्या अनुयायींना काही मान उरला नव्हता, मलशदींना काही शोभा उरली नव्हती आणण मंददरांची भरभराट होत होती. (इस्लामी) न्यायव्यवस्था

1

फासी पाठात पृष्ठ २७१ वर याचे नाव अहमद आका ददले आहे.

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४३

नामशेष झाली होती1 आणण पाखंडी चालीरीतींवर काही तनयंत्रण नव्हते. बेसाविपणाच्या मद्याने व्यसनािीन झाले ल्या अबुल हसनला ददवस व रात्र यातील अंतर कळे नासे झाले होते. असंगाशी संग केल्यामुळे व त्याचे लक्ष तवचललत झाल्यामुळे त्याने कातफरांऐवजी िमामची तनवड करायला नकार ददला. खऱ्या ईश्वराच्या भक्तांवर राक्षसी संभाने घातले ल्या तवतवि घावांमध्ये अबुल हसन हा त्याचा हस्तक व मदतनीस झाला होता. त्याची जराशी वक्रदृष्टी झाल्यावर ककिंवा त्याच्या एखाद्या पोकळ िमक़ीमुळे त्याने शत्रूला वाटे ल तततक़ी मोठी रक्कम दे ऊ केली व केवळ त्याच्या क्षुद्रपणामुळे व भ्याडपणामुळे त्याने स्वतःला त्याच्या पासून सुरणक्षत ठे वले . [२८६] हा बादशाहांचा बादशाहा मुसलमानांचा आश्रयदाता आहे. तो केवळ खऱ्या िमामच्या लोकांचाच सन्मान करतो व केवळ कातफर व पाखंडी लोकांनाच त्रास दे तो. त्याच्या तलवारीच्या िारेने बंडखोरांचे रक्त पृथवीवरून नाहीसे झाले आहे. त्याच्या तळपत्या तलवारीने त्याने भक्कम तकल्ले जजिंकले असले तरी, बागेतील फुले वासंती वाऱ्यानेच उमलतात. आपल्या बादशाहाची िमाम प्रतत असले ली प्रचंड आस्था व जगाचा स्वामी असल्यामुळे त्याच्या अंगी असले ली सूक्ष्म न्यायबुद्धी यामुळे त्याला वाटले क़ी प्रथम खडसावून व आज्ञा दे ण्याच्या उदार मागामने अबुल हसन याच्या कानातील बेसाविपणाचा कापूस काढू न त्या दुदै वी माणसासमोर इस्लामी जगाची कवाडे उघडू न त्याला योग्य मागामचे दशमन घडवावे. बादशाहाने त्या नीच माणसाला समजुतीचे व मागमदशमन करणारे अनेक संदेश पाठवले जेणेकरून तो कातफर राक्षसी शत्रूश ं ी (औरंगजेबाचे व इस्लामचे शत्रू) केले ली युती सोडेल, पाखंडी चालीरीतींचे आचरण करणाऱ्यांशी असले ली त्याची जवळीक संपवेल, ब्राह्मणांना मंत्री म्हणून नेमण्याचे पाप बंद करेल, कातफर आक्रमकांना मदत (सैन्य ककिंवा पैस)े दे णे बंद करेल, तनतषद्ध मानले ल्या गोष्टींचा (जसे मद्य प्राशन) प्रसार करणे बंद करेल व (स्वातंत्र्याची) व्यथम इच्छा

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘the requisites of canonical practice remained closed under bolts’ असे म्हटले आहे. फासी पाठात (‫اسباب مرسوعات مدورس بود‬ ) ‘अस्बाब-एِ

मसरुआत मदरस बुद’ असे आहे. यातला ‘मदरस’ (ककिंवा मदोरस, मदवरस) हा शब्द ‘मद्रूस’ (‫ )مدروس‬असावा. मद्रूस म्हणजे नामशेष होणे (स्टा. १२०२). फासी पाठात ‘र’ आणण ‘व’ ही अक्षरे एका पाठोपाठ आली क़ी किीकिी चुकून त्यांचा क्रम उलटा झाले ला ददसतो. वाक्याचा एकूण संदभम लक्षात घेता, इथे तसे झाले असावे.

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४४

बाळगणे सोडू न दे ईल. याचा पररणाम असा होईल क़ी त्याची तनरपराि प्रजा बादशाही घोड्यांच्या टापांखाली भरडली जाणार नाही तसेच त्याला ससिंहासनावरून उचलू न फेकून ददल्याने होणारा त्याचा व्यलक्तगत अपमान ही टळे ल. पण दै वाने त्याची साथ सोडली होती त्यामुळे सवमनाशाने त्याला धचथावणी ददली. अबुल हसनला शरणागतीच्या योग्य मागामवर ठे वण्यासाठी पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला नेमले असल्याने त्याच्या सैन्याने हैदराबाद मिील अबुल हसन याचे घर लु टले . त्यावेळी अबुल हसनने त्याला भुलवून व थापा मारून स्वतःची सुटका करून घेतली, त्याचा खजजना [२८७] भरून घेतला, सैन्य जमवले व गोळकोंड्याचा तट भक्कम केला. त्याच्या डोळ्यावर अज्ञानाची झापड होती व दयेची भीक मागणाऱ्या तोंडावर कुलु प. म्हणून बादशाहाला खालील वचनाप्रमाणे वागणे भाग पडले – गाढवांचे दुराग्रही पाय आखले ल्या मागामबाहेर गेले, तर त्यांच्या तोंडा समोर तुमच्या हातातील काठी तफरवावी रतववार, ५ धडसेंबर १६८६ / २९ मुहरमम १०९८ ला बादशाहा गुलबगाम अहसानाबाद येथील मीर सय्यद मुहम्मद तगसुदराज याच्या थडग्याला भेट द्यायला सोलापूरहून तनघाला. तो ततथे अनेकदा गेला. ततथल्या रतहवाशांच्या, ज्यात फक़ीर व णभकारी ही होते, प्रतततनिींना वीस हजार रुपये ददले गेले. ततथे एक आठवडा रातहल्यावर अबुल हसन शुद्धीवर येईल या वेड्या आशेपायी छावणी जाफराबाद बीदरला गेली. पण इतके सौभाग्य त्याच्या नशीबात नव्हते. त्यामुळे अखेर शुक्रवार, १४ जानेवारी १६८७ / १० रतब-उल-अव्वल १०९८ ला त्या दुदै वी माणसाला (कुतुबशाह) िडा लशकवण्यासाठी बादशाहा घोड्यावर स्वार झाला. अबुल हसनला जेव्हा हे कळले तेव्हा तो बादशाही सैन्याने भयभीत झाला व त्याचा तकल्ला सोडू न कुठे लपावे हे त्याला कळे नासे झाले . त्यामुळे त्याने स्वतःला त्यात कोंडू न घेतले व स्स्मतहीन ओठ, डोळ्यात पाणी, सुन्न झाले ले डोके, व स्वरहीन वाणी अशा भांबावले ल्या ब्स्थतीत, एखाद्या धचत्रासारखा भभिंतीकडे तोंड करून उभा रातहला. त्यावेळी [२८८] जसा त्याचा अंत जवळ आला तसे पुन्हा एकदा तनष्ठेची अचमना करावी असे त्याला वाटले * * *. बादशाहाने त्याचे काही ऐकले नाही व त्याला केवळ तलवारीने उत्तर धमळाले . बादशाहा पुढे गेला व हैदराबाद पासून दोन टप्प्यांवर थांबला. तवजापूरहून इब्रातहमगड घ्यायला पाठवले ला तफरोज जंग

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४५

ितराव्या शतकातील मुिलमानी िकीर दोन प्रमुख वर चचाम करत आहेत. सवामत खाली उजवीकडे काहीतरी लशजवत आहेत, त्याच्या वरती चक्क कबाब लशजवत आहेत. त्यांच्या डावीकडे बहुदा औषिे / चूणम करत आहेत तर त्यांच्या डावीकडे काही अभ्यासात ककिंवा प्राथमनेत मग्न आहेत. त्याखाली डाव्या कोपऱ्यात गायीला मारले जात आहे. (साभार – BnF)

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४६

ददले ले काम संपवून हैदराबाद मागे लगबगीने दरबारास आला. त्याच्या पत्रांतून कळले क़ी त्याने बादशाहासाठी हैदराबाद शहराचा ताबा घेतला होता. पण आलमगीराचे दै व बलवत्तर असल्यामुळे शत्रूकडे अगणणत सैन्यबळ व संपत्ती असूनही ते इतक्या दहशतीत होते क़ी स्वतः बादशाही सैन्याच्या ककिंवा तफरोज जंगच्या सैन्याच्या मागामत एक माणूस ही आला नाही. शुक्रवार, २८ जानेवारी १६८७ / २४ रतब-उल-अव्वल १०९८ ला मेलेल्या प्राण्याभोवती ककिंवा साखरेच्या खड्याभोवती मुंग्या आणण माशा जमाव्यात तशा तकल्ल्याच्या पायथयाशी जमले ल्या शत्रूसैन्याला [२८९] परास्त करण्याचा आदे श बादशाहाने ददला. बादशाही सैन्याने आदे शाचे पालन करण्यासाठी खूप पररश्रम घेतले . ते म्हणतात ना, वारा आला आणण धचलटे उडाली, तसे शत्रूसैन्य त्यांची मालमत्ता, मुलेबाळे व कुटुं बे बादशाही सैन्याच्या हातात सोडू न पळाले . कललच खान तकल्ल्याकडे दौडला व त्याला लगेच आत जायचे होते. पण दे वाच्या मनात काहीतरी वेगळे होते * * * जंबूरकाचा एक गोळा त्याच्या खांद्यावर अदळला व त्याच्या सोबत शौयामने दौडत असले ल्या लु त्फुल्लाह खानालशवाय इतर कोणीही त्याच्या मदतीस गेले नाही. त्यामुळे खानाला त्या भयंकर कत्तलीच्या दठकाणाहून घोड्यावरून त्याच्या छावणीत परतावे लागले . बादशाहाच्या आदे शानुसार उम्दत-उल-मुल्क त्याची चौकशी करायला गेला. त्यावेळी वैद्य त्याच्या खांद्यातून हाडाचे तुकडे काढत होते व तो मस्तकावर जराही आठी न आणता शांतपणे बसून उपब्स्थतांशी बोलत व एका हाताने कॉफ़ी पीत होता. तो म्हणाला, ‘माझ्याकडे कमालीचा वैद्य आहे’. आदे श ददल्या प्रमाणे सगळ्या वैद्यांनी अथक प्रयत्न करूनही [२९०] तीन ददवसांनी तो मरण पावला. बादशाहाने तफरोज जंग बहादुर व मृताच्या इतर मुलांना तसेच लसयादत खान यांना अंगरखे ददले व इतर उपहार दे ऊन सन्मातनत केले . सोमवार, ७ फेब्रुवारी १६८७ / ४ रतब-उस-सानी १०९८ ला चर खणायचा आदे श ददला गेला. आगीचाच तकल्ला बनला आहे असे वाटे ल इतक्या अव्याहतपणे तकल्ल्यातून अग्ग्नबाण व गोळ्यांचा वषामव सुरू होता. तरीही बादशाही सैन्याने सफलशकन खानाच्या नेतृत्वाखाली भाजण्याची ककिंवा मरणाची भीती न बाळगता एका मतहन्यात चर खंदकापयंत नेले. ज्या कामाला काही वषम लागलात ते काम डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर झाले होते. तकल्ल्यासमोर मोठ्ा तोफा चढवल्या गेल्या, त्यांच्या

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४७

गोळ्यांनी त्याचा पाया उध्वस्त झाला तरी यश अजून लांब होते. सफलशकन खानाने उंच िमिमे बांिले होते ते तकल्ल्याच्या बुरुजाच्या उंची एवढे केले व त्यावर तोफा चढवल्या. तरी तफरोज जंग बरोबर असले ले त्याचे वैर आणण द्वे ष यामुळे त्याने हातातले काम सोडले . सलाबत खानाला त्याच्या जागी मीर आततश नेमले गेले. [२९१] ददले ले काम त्याने पूणम केले नाही व तो मागे हटला. सय्यद घैरत (इज्जत) खानाने त्याची जागा घेतली. सरदारांची हेकेखोरी व दढलाई यामुळे शत्रूने मध्यरात्री तोफांवर छापा घातला, त्या तनकामी केल्या व (इज्जत) घैरत खान, सरबराह खान (चेला) व त्यांच्या हाताला लागले ली एक तुकडी यांना घेऊन गेले. सफलशकन खानाची मनसब काढू न घेतली गेली व त्याला तुरुंगात टाकले गेले. सलाबत खानाला पुन्हा मीर आततश नेमले गेले. लु त्फुल्लाह खान व खास चौक़ीची तुकडी व इतर उत्साही सैतनकांना िमिम्यांची राखण करायला नेमले गेले. तकल्ल्याच्या पायथयाशी वाहण्याऱ्या नदीत, खान तीन ददवस थांबला, तेव्हा दुसरी तुकडी आली व शत्रूला पळवून लावले आणण िमिमा भक्कम केला. दोन ददवसांनी अबुल हसन ने इज्जत खान व इतरांना अंगरखे दे ऊन परत पाठवले . पण महामूर व अवकाळी पावसामुळे िमिमे दटकले नाहीत. सफलशकन खानाने वचन ददले क़ी दुसऱ्या बुरुजाच्या जवळ तो तततक्याच उंचीचे िमिमे अगदी कमी वेळात बांिून दे ईल. म्हणून त्याला सोडले गेले व त्याने वचन पूणम केले . यावेळी मोठ्ा पावसामुळे मांजरा नदीला चांगलाच पूर आला होता. शेजारून काही रसद येणे अशक्य होते. दुष्काळ पडला व गहु, िान्ये व तांदुळ नाहीसे झाले . [२९२] िान्याच्या अभावामुळे छावणीत सगळीकडे दुःखाचे हुंदके ऐकू येऊ लागले . हैदराबादच्या लोकांपैक़ी एकही माणूस जजवंत उरला नाही. घरे, नद्या व माळराने मृतांनी भरली होती. छावणीचीही तीच पररब्स्थती होती. रात्री बादशाहाच्या छावणी भोवती मृतांचे ढीग लागत होते. सूयोदया पासून ते सूयामस्ता पयंत स्वच्छता कामगार ती प्रेते ततथून नेऊन नदीच्या काठाशी टाकत होते. हा प्रकार अहोरात्र चालू होता. जे उरले होते ते मेलेल्या प्राण्यांचे ककिंवा माणसांचे मास ही खायला मागे पुढे बघत नव्हते. तकत्येक कोस मेलेल्या लोकांचे ढीग पडले ले ददसत होते. सततच्या पावसाने त्यावरील त्वचा व मांस तवरघळत होते. तसे झाले नसते तर त्या उग्र दपामने वाचले ल्या लोकांना संपवले असते. काही मतहन्यांनी जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा हाडांच्या पांढऱ्या काठ्ांमुळे ते लांबन ू बफामच्या टे कड्यांसारखे ददसत होते. वाचले ल्यांच्या सुदैवाने पावसाला उसंत धमळाली, नदीचे उग्र रूप थंडावले

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४८

आणण जवळच्या प्रदे शातून रसद आली. सरदार खान करोरीगंज याच्या जागी शाहजहानचा अध्यास्त्मक गुरू मीर सय्यद मुहम्मद कनौजी याचा मुलगा सय्यद शरीफ खान हा प्रामाणणक, सक्षम व कतृमत्ववान माणूस नेमला गेला. लोकांच्या चररताथामचा पालक बादशाहा, याच्या कृपादृष्टीमुळे दुष्काळ सरला व स्वस्ताई आली.

पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला अटक * * * * [२९३] पादशाहजाद्याकडे उत्तम समज, तकम व कल्पनाशक्त़ी असूनही चुक़ीच्या संगतीमुळे व दुष्ट सल्लागारांमळ ु े बादशाहाने त्याला गडबड व तवश्वासघात करण्यापासून रोखले , जे केले नसते तर त्याला त्रास झाला असताच पण बादशाहाच्या मनातही ततरस्कार तनमामण झाला असता. हे प्रकरण सवांच्या समोर येऊ नये म्हणून काही वेळ बादशाहाने त्याच्या वतमनाकडे दुलम क्ष केले . पण तवजापूरच्या कारभारावर त्याचा पररणाम होऊ लागला, काही लोक जे लसकंदरला गुप्तपणे संदेश पोहोचवत होते त्यांना पकडू न मारले गेले. शतनवार, २८ ऑगस्ट १६८६ / १८ शव्वाल १०९७ ला त्याचे इतर अतवश्वासू सेवक, म्हणजे तोफखान्याचा दरोगा मुमीन खान, अजीज अफगाण, सहाय्यक बक्षी मुल्तफत खान व िूतम कब्रिंदाबन पूफामन यांना छावणीतून हद्दपार केले गेले. या दुष्ट सल्लागारांमळ ु े पादशाहजाद्याच्या सल्लागार मंडळातील सारासार तववेकाचा व दरदृष्टीचा ददवा तवझला होता व हैदराबाद तवरुद्ध चालले ल्या युद्धात तो मूखम अबुल हसनच्या लबाड काव्यांना बळी पडला होता. [२९४] मोचामतील गुप्त ले खतनकाकडू न गोळकोंड्याच्या तकल्ल्यात जी पत्रे पाठवली जात होती ती तफरोज जंगच्या हातात पडली. तसेच अतवश्वासाच्या इतर संकेतांनी या बाबतीतले सत्य समोर आणले . एका रात्री खान बादशाहाकडे गेला, त्याला पत्र दाखवली व पादशाहजाद्याने ही व इतर अवाज्ञा व अतवश्वासाची कृत्ये स्वेच्छे ने केली असल्याचे पटवून ददले . बादशाहाने इहतमाम खानाचा िाकटा भाऊ हयात खान, जो पादशाहजाद्याच्या ददवान-इ-खासचा दरोगा होता, त्याला बोलावले व सांतगतले क़ी, ‘शेख तनजाम हैदराबादी आज रात्री सैन्यावर छापा घालणार आहे, तुझ्या लोकांना शत्रूला थोपवायला पाठव. तुझे लोक जसे ततथे जातील तसा इहतमाम खान तुझ्या छावणी भोवती पहारा दे ईल, हा तनरोप पादशाहजाद्याला दे ’. हा आदे श इहतमाम खानाला ददला गेला. हे सगळे झाले . दुसऱ्या ददवशी बादशाहा ददवान-इ-आम मध्ये बसला असताना पादशाहजादा व त्याची मुले मुहम्मद मुईझुद्दीन व मुहम्मद अजीम यांना ततथे आणले गेले. पादशाहजादा ततथे येऊन

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२४९

काही वेळ बसला असता बादशाहा म्हणाला, ‘मी आसद खान व बहरामंद खानाशी काही गोष्टींबद्दल बोललो आहे. प्राथमनाघरात जाऊन त्यांच्याशी बोल’. तीघेही काही संशय न घेता ततथे गेले. त्यांची शस्त्रे ततथे काढू न घेण्यात आली व त्यांच्या करता बाहेर तंबू उभारला जाईपयंत त्यांना ततथेच थांबवले गेले, मग त्यांना तंबूत नेले. बादशाहा दरबारातून उठला व खास परस्तारच्या दे वडी मागे जनानखान्याकडे गेला. ‘अरेरे, अरेरे’ असे म्हणत त्याने दोन्ही हात गुडघ्यांवर आपटले व पुढे म्हणाला क़ी, ‘मी चाळीस वषांचे कष्ट िुळीस धमळवले ’ [२९५]. थोडक्यात, इहतमाम खानाच्या कष्टांनी पादशाहजाद्याच्या तंबू बाहेर पहारे लावले गेले. बादशाही कारकुनांनी त्वररत त्याच्या घरातील सामान व दासांना ताब्यात घेतले , जे समुद्रात एक थेंब टाकल्यासारखे होते. इहतमाम खान हजारी होता, त्याला आता सरदार खान ही उपािी व ५०० ची वाढ धमळाली. त्याचा मुलगा हमीदुद्दीन हा दोन सदी होता त्याला दोन सदी (५० स्वार) ची वाढ धमळाली. बऱ्याच काळापासून जमशीद खान खाणी चालवत होता व अब्दुल वातहद खजजना घेऊन येत होता. बादशाहा जुन्या िमिम्यांमागे तफरोज जंगच्या तंबूत गेला. आक्रमण करण्यासाठी उच्चाधिकारी नेमले गेले, त्यांनी ददवसभर भरपूर कष्ट केले . तफरोज जंग खान बहादुर व रुस्तम खान जखमी झाले , ददवसाच्या शेवटी बरेच िाडसी लोक मारले गेले होते. काम बक्षला (कुमक म्हणून) उम्दत-उल-मुल्क आसद खान याच्या बरोबर पाठवले गेले. गोळ्या, चादर व हुक्का यांच्या वषामवामुळे लोकांना जखमी ककिंवा मृत न होता एक इंचही पुढे सरकता येत नव्हते आणण तरीही उदद्दष्ट साध्य होत नव्हते. तफरोज जंग याच्या तंबूत रात्र काढल्यानंतर भल्या पहाटे कुठल्याही लवाजम्यातवना बादशाहा छावणीत परतला. इतरही अनेक योजना करून बधघतल्या गेल्या, अगणणत संपत्ती खचम झाली. लाभाच्या लालसेपोटी कातफरांनी (मराठे ?) शत्रूला सहाय्य करत डावपेच टाकले . काही लोभी लोक तफतूर होऊन त्याला साधमल झाले व त्याच्याकडू न काहीतरी लाभ होईल अशी आशा असताना, त्याच्या बतावणीमुळे नरकात गेले. काहींनी िान्य पाठवून [२९६] स्वतःचा तवनाश ओढवून घेतला व शेवटी कृतघ्न लोकांचे जे होते तेच त्यांच्या नशीबी आले . वेढा प्रदीघम काळ चालला. बादशाहाने ठरवले क़ी गोळकोंड्याच्या भोवती लाकुड व मातीचा कोट उभा करायचा. काही वेळातच तो बांिला गेला व दारांपाशी पहारे लावून ओळखपत्रातवना आत बाहेर करण्यास बंदी घातली गेली. तफरोज जंग खान याच्या जखमा भरल्यावर त्याने येऊन भेट घेतली, त्याला एक अंगरखा,

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२५०

एक झराह, एक तवशेष जझलम व एक रत्नजधडत आसा ददली गेली. जखमी झाले ल्या रुस्तम खानाला एक अंगरखा ददला गेला. ददवंगत महाबत खानाचा मुलगा बहराम खान तोफेचा गोळा लागून मारला गेला. त्याचा भाऊ फरजाम याला दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. जान तनसार खानाचा भाऊ मारला गेला व या कारणासाठी त्याचा सन्मान केला गेला. सफलशकन खानाचा भाऊ शुजाअत खान, तफरोज जंग खानाच्या सैन्यातील बक्षी मीर अबुल मुआला, एक्कताज खान, सुहराब खान, मुहम्मद हक़ीम व इतर जखमी व भाजले ल्या लोकांच्या जखमा बादशाहाने ददले ल्या बणक्षसांनी भरल्या. शतनवार, २८ मे १६८७ / २६ रज्जब १०९८ ला अबुल हसनचा सवमश्रेष्ठ सेवक आणण तकल्ल्याच्या बाहेरील सैन्याचा सेनापती शेख तनजाम बादशाहाच्या भेटी करता आला. त्याने ५०० मोहरा व १००० रुपये सादर केले व त्याला मुकरमब खान, सहा हजारी (५००० स्वार), एक तवशेष अंगरखा, एक तलवार, मोत्यांचा इलाका असले ला एक खंजीर, एक रत्नजधडत ढाल, एक तनशाण, नगारे, एक लक्ष रुपये रोख, वीस अरबी, [२९७] इराक़ी, तुकी व कच्छी घोडे व दोन हत्ती ददले गेले. माललक मुनव्वर, शेख लाड,

शेख अब्दुल्लाह व त्याची मुले व इतर नातलगांना उच्च उपाध्या, चार हजारी वरील पदे , अंगरखे, तनशाण, नगारे, घोडे व हत्ती ददले गेले. संभाचा साल्हेरचा तकल्ले दार आसुजी दख्खनी याने भेट घेतली. त्याला एक अंगरखा, आलम, तुघ, नगारे, एक घोडा, एक हत्ती व २०००० रुपये ददले गेले. सरफराज खानाचा भाऊ सरबुलंद खान याला आलम, तुघ व नगारे ददले गेले. संभाचा सांगोल्याचा तकल्ले दार माणकोजी हा तकल्ला जजिंकल्यानंतर भेटायला आला. त्याला एक अंगरखा व दोन हजारी (१००० स्वार) ददली गेली. शुक्रवार, २० मे १६८७ / १८ रज्जब १०९८ ला खान-इ-सामान मुहम्मद अली खान वारला. तो उदात्त तवचारांचा व उदार होता. त्याच्याकडे जाणारे कोणीही ररकाम्या हाताने परत जात नसत. तो तनष्ठावंत, िार्मिंक, प्रामाणणक, सत्यवचनी तसेच हुशारीने वागणारा होता. कामगार खानाला त्याचे पद ददले गेले व त्याच्या जागी इततकाद खानाला बादशाहाच्या जवळचे पद, घुसलखान्याचा दरोगा, नेमले गेले. शरीफ-उल-मुल्क हैदराबादी याचा मुलगा व अबुल हसन याच्या बतहणीचा मुलगा इब्फ्तकार खान याने भेट घेतली. त्याला एक अंगरखा व तीन हजारी (१००० स्वार) ददली गेली. शरीफ खान याला छावणीचा करोरीगंज व दख्खनच्या चार सुभ्यांतून जजझया कर गोळा करणारा अधिकारी

अध्याय ३०

१२ जुलै १६८६ ते ३० जून १६८७

२५१

म्हणून नेमले गेले. सुभ्यांमध्ये स्वतः तफरून शरीयानुसार जजझया आकारला जात आहे याची खात्री करण्याचा आदे श त्याला ददला गेला. [२९८] मीर अब्दुल करीम याला करोरीगंजचा सहाय्यक असा अततररक्त पदभार दे ण्यात आला. शतनवार, २५ जून १६८७ / २४ शाबान १०९८ ला शरीफ-उल-मुल्क वारला. त्याच्या मुलांना दुखवट्याची वस्त्रे ददली गेली.

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५२

अध्याय ३१ राजवटीचे एकतीसावे वषम – तहजरी १०९८-९९ १ जुलै १६८७ ते १९ जून १६८८ * * * * गुरूवार, ७ जुलै १६८७ / ७ रमजान १०९८ ला सफलशकन खानाने काही वेळातच खणले ले खंदक व तकल्ल्याच्या बुरूजाच्या उंची एवढे उभारले ले िमिमे व तोफखाना पाहण्यासाठी बादशाहा बाहेर पडला. बादशाहाने दोन तास पायी चालत तकल्ल्याच्या पररब्स्थतीची पाहाणी केली. बादशाहा सोलापूरहून तनघण्यापूवी कहिंदुस्थानातील बंडखोरांचा बंदोबस्त करायला गेलेला मुहम्मद आजम शाह बऱ्हाणपूरला पोहोचला. [२९९] पादशाहजादा तसेच तवजापूरच्या सुभ्याचा कारभार नीट बसवायची जबाबदारी ज्याला ददली होती तो बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान हे दोघे रतववार, १० जुलै १६८७ / १० रमजान १०९८ ला बादशाहा समोर उपब्स्थत झाले . पादशाहजाद्याला तकल्ल्यावरील आक्रमणाचे नेतृत्व ददले गेले.

गोळकोंडा त्रकल्ला घेतला तवजापूर घेण्यापूवी सरअंदाज खान बतनी तबजापुरी बादशाही सेवेत आला होता व नंतर अबुल हसनकडे काम करून त्याचा तवश्वासू सरदार झाला होता. बुिवार, २१ सप्टें बर १६८७ / २४ जजल्कदा १०९८ ला बक्षी-उल-मुल्क याने बहादुर खान व संिीची वाट पाहणाऱ्या इतर काही वीरांची तुकडी करून तकल्ल्याभोवती चालत असताना सरअंदाज खानाच्या तफतुरीमुळे जुन्या खंदकाच्या जवळील एका ठदिंडी दरवाज्याने ते तकल्ल्यात लशरले . तकल्ल्याच्या पायथयापाशी वाहणाऱ्या नदी शेजारी राहात असले ला पादशाहजादा त्याच्या लोकांची कुमक करण्यासाठी खंदकापाशी पोहोचला आणण तवजयी नगारे वाजवले . अबुल हसनच्या सैतनकांनी केले ल्या कडव्या प्रततकाराला न जुमानता बक्षी-उल-मुल्क त्याच्या साथीदारांसतहत अबुल हसनच्या महालात पोहोचला. त्याला पकडू न लगेच पादशाहजाद्याकडे आणले गेले. बादशाहाचा मुनशी शेख अब्दुस-समद जाफर खानी याचा मुलगा अब्दुल वली [३००] याने या घटनेची रुबाई प्रस्तुत केली. * * * आजम शाह याच्या उपजत कृपावृत्तीमुळे त्याने या दुदै वी माणसाला त्याच्या कृत्यांचे योग्य बक्षीस दे ण्यापासून स्वतःला रोखले पण बादशाहाच्या अनुमतीने

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५३

त्याला स्वतःच्या तंबूत आणले . ददवसाच्या शेवटी त्याने त्याला बादशाहाकडे नेले. अपरािांच्या तुरुंगात अडकले ला या बंदीवानाला त्याच्या मनातील िास्तीतून मुक्त केल्यानंतर त्याच्यासाठी उभारले ल्या तंबूत ठे वले गेले. बादशाहाने त्याच्यावर क्रोि करण्याऐवजी मोठ्ा मनाने त्याच्याकडे पूणम दुलम क्ष केले . * * * ईश्वराची कृपा आहे क़ी इतका बळकट तकल्ला केवळ आठ मतहने व काही ददवसात जजिंकता आला. काय आश्चयम आहे क़ी बरोबर एका वषामच्या अंतराने अजजिंक्य मानले जाणारे दोन तकल्ले जजिंकले गेले. मीर अब्दुल करीम याने या अचाट तवजयाचा काळ सांगणारा कालश्ले ष तयार केला, त्याबद्दल त्याची प्रशंसा केली गेली –

ٔ ‫فتح قلعه گولکنده مبارکباد‬ ِ फतह-ए-तकला-ए-गोळकोंडा मुबारकबाद गोळकोंडा तकल्ला जजिंकला, अणभनंदन हा तकल्ला तकती भक्कम आहे तसेच या शहरातली आकषमणे व या दे शाचे हवामान कसे आहे त्याचे आता मी वणमन करणार आहे. प्राचीन काळी गोळकोंडा हे [३०१] मंगल या नावाने ओळखले जायचे. दे वराय हा त्याचा राजा होता. त्यानंतर तो

बहमनी राजांनी घेतला. बहमनी राज्याच्या अस्तानंतर हा तकल्ला अली नक़ी कुत्ब-उलमुल्क या सुलतान मुहम्मद बहमनीच्या एका दासाच्या हाताखाली आला. हा तकल्ला एका टे कडीवर आहे. त्याचे लशखर एखाद्या तलवारीच्या पात्यासारखे आकाशाचे धचलखत फाडू न वर जाते. इथे अवकाशवासी पृथवीवर रहाणाऱ्या लोकांना भेटतात. आलमगीर सोडू न इतर कोणीही हा तकल्ला जजिंकून घेतला नाही. याच्या एकाही बाजूस अशी कपार नाही जजच्यावर फास टाकून त्या योगे वर चढू न तकल्ला जजिंकता येईल. पण त्याला एक टे कडी होती जजचा वापर करून एखादा सेनापती यावर यशस्वी आक्रमण करू शकला असता. औरंगजेबाच्या मंचकारोहणापूवी त्याने हा दे श आक्रधमला होता पण नंतर कृपाळू होऊन अब्दुल्लाह कुत्ब-उल-मुल्क याला क्षमा केली होती. त्याला वाटले च होते क़ी औरंगजेब किीतरी परतेल म्हणून त्याने या टे कडी भोवती तट बांिून ती गोळकोंडा तकल्ल्याच्या आत घेतली व तकल्ल्याला चांगली बळकटी प्राप्त झाली. * * * हैदराबाद नगर गोळकोंडा तकल्ल्यापासून दोन कोसांवर आहे. मुहम्मद कुली कुत्ब-उल-मुल्क याने ते वसवले . [३०२] भागामती नावाच्या एका वारांगनेवर तो मुग्ि

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५४

झाला होता यामुळे त्याने याचे नाव भागानगर असे ठे वले . त्यानंतर याला सध्याचे नाव प्राप्त झाले . आता हे (मुघल) साम्राज्यात समातवष्ट झाल्यामुळे त्याला दार-उल-जजहाद हैदराबाद असे नाव दे ण्यात आले . हे मन व शरीरासाठी आनंददायी असले ले खूप सुंदर दठकाण आहे. इथल्या लागवडी खाली असले ल्या प्रदे शाचा तवस्तार कल्पनेच्या पलीकडे आहे, इथली घरे सुद्धा कोणाच्या कल्पनेपेक्षा अधिक उंच आहेत, हवा इतक़ी शीतल, तनतळ वाहते झरे व तहरवळ इतक़ी ताजीतवानी आहे क़ी एखाद्याला वाटे ल क़ी इथल्या पाना फुलांना पाचू व माणकाचे रंग धमळाले आहेत. * * * बादशाही दरबारात हैदराबादी लोकांच्या आगमनाचे तसेच त्यांना पाच सदी पासून ते सात हजारी पयंत मनसबी दे ण्याचे व बादशाही सेवेत व्यावसातयक, कुशल कामगार व कारागीर कसे घेतले गेले या सगळ्याचे वणमन करण्यासाठी एक वेगळा खंड ललहावा लागेल. सोमवार, २६ सप्टें बर १६८७ / २९ जजल्कदा १०९८ ला मुहम्मद काम बक्ष याला बेरारचा सुभेदार नेमले गेले. त्याला आिी दहा हजारी (५००० स्वार) ददली होती व आता पाच हजाराची वाढ धमळाली. उम्दत-उल-मुल्क आसद खान व तफरोज खान यांना प्रत्येक़ी हजार स्वाराची वाढ दे ऊन ते सात हजारी झाले . महाबत खानाला एक हजार (१००० स्वार) अशी वाढ धमळाली. त्याचा नातू [३०३] मुहम्मद मनसूर नुकताच इराणहून आला. त्याने भेट घेतली व त्याला मुकरममात खान ही उपािी व दीड हजारी (१००० स्वार) ददली गेली. अबुल हसनचा दत्तक मुलगा अब्दुल्लाह याला चार हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. लु त्फुल्लाह खान दोन हजारी (१००० स्वार) होता त्याला दोनशे स्वारांची वाढ धमळाली. मुहम्मद यार खान याला पाच सदीची वाढ दे ऊन दोन हजारी (३०० स्वार) धमळाली. उगंजचा राजा अनुशा खान याच्याशी संगनमत केल्याच्या संशयावरून ददवंगत कललच खानाचा भाऊ मीर बहाउद्दीन याला तुराण येथे मारण्यात आले . त्याचा मुलगा मीर मुहम्मद आमीन बादशाही दरबारास आला. अनुशा खानाचा सासरा व बुखाऱ्याचा राजा अजीज खान याच्याशी अनुशा खानाचे युद्ध चालू होते. मीर मुहम्मद आमीन यावर कृपादृष्टी दाखवत त्याला खान ही उपािी व दोन हजारी (१००० स्वार) धमळाली. सफलशकन खानाचा मुलगा मुखललस खान हा तोफखान्याचा दरोगा असले ल्या त्याच्या वधडलांचा सहाय्यक म्हणून काम करत होता त्याला आता त्याच्या वधडलांचे पद ददले गेले व दोनशे स्वारांची वाढ दे ऊन तो आता हजारी (३०० स्वार) झाला. रत्नशाळे चा मुश्रीफ

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५५

इनायतुल्लाह हा चार सदी (४० स्वार) होता त्याला १५ स्वारांची वाढ धमळाली. आक़ील खानाचा जावई शुकरुल्लाह खान याला लसद्दी याहयाच्या जागी हैदराबादच्या भोवतालच्या भागाचा फौजदार नेमले गेले. [३०४] तो पाच सदी (तततकेच स्वार) होता व आता त्याला एक हजार स्वारांची वाढ धमळाली. मीर अब्दुल करीम याला दं ड तवभागाचा दरोगा नेमले गेले. लु त्फुल्लाह खानाला मुहम्मद मुअज्जमच्या सेवकांचा दरोगा नेमले गेले. त्यातील प्रत्येकाला त्याचे पद व श्रेणी प्रमाणे बादशाहाच्या कारभाराखाली आता मनसब धमळाली होती. खचले ल्या खखदमत खानाला सरदार खानाच्या जागी नाजजर नेमले गेले व सरदार खानाला मुअतकाद खानाच्या जागी तपलखान्याचा दरोगा नेमले गेले. मुहम्मद मतलब याला खान ही उपािी धमळाली.

िागर प्रांतावर त्रवजय हैदराबादचे तवस्तृत राज्य जजिंकल्यावर, ततथले सगळे तकल्ले घेतल्यावर, सवम दठकाणी कारभारी व प्रशासक़ीय अधिकारी पाठवल्यावर तसेच हैदराबादच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना पदभार ददल्यावर बादशाहाला थोडी मोकळीक धमळाली. मग त्याने रुहुल्लाह खानाचा मुलगा खानाहजाद खान याला एक मोठे सैन्य दे ऊन सागरला पाठवले . हा भाग तवजापूर व हैदराबादच्या मध्ये आहे व दे ढ जमातीचा पाम नायक1 त्याचा कुप्रलसद्ध राजा आहे. नीच व दास्यवृत्तीच्या लोकांना दै व साथ दे ते त्यामुळे हा नालायक कातफर, त्याच्या वधडलांपासून आजोबांपयंत सगळे इतर सवम जातींपेक्षा सगळ्यात क्षुद्र असल्याने [३०५] त्याने त्याचे गर्विंष्ठ डोके वर करून त्या प्रदे शावर अधिकार सांतगतला. त्याच्याकडील १२००० स्वार व एक लक्ष पायदळ तसेच काही चांगले भक्कम तकल्ले , ज्यापैक़ी एकात तो स्वतः राहत असे, यामुळे तो त्याचे डोके वर करून तवजापूर व हैदराबादच्या बरोबरीचा असल्याचे दाखवत असे. कोणीही त्याला संपवू शकत नव्हते. इतकेच काय तर, संकट काळी मुसलमान त्याच्याकडे मध्यस्त व रक्षक मानून त्याला सरदारासारखा मान द्यायचे. तवजापूरच्या वेढ्यात यानेच रसद घेऊन ६००० लोक पाठवले होते ज्यांना आिी म्हटल्याप्रमाणे तफरोज जंग याने कापून काढले .

1

फासी पाठात याचे नाव किी पदम (पृष्ठ २३९) तर किी तपद (पृष्ठ २६४, ३०४, ३०५) असे येते. याचे योग्य नाव पाम आहे. अधिक मातहतीसाठी History of Aurangzeb, Vol 5, Chapter 56 बघावा.

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५६

गोळकोंड्याच्या वेढ्यात सुद्धा याने हैदराबादींना अनेकदा रसद पुरवली होती व स्वतःचा शेवट ओढवून घेतला होता. खानाहजाद खानाला सूचना ददली होती क़ी या भरकटले ल्या माणसाने बादशाहाला भेटायचे मान्य केले तर त्याचा प्रदे श उध्वस्त करण्याची ककिंवा त्याच्या राज्यातील लोक मारून वा तुरुंगात टाकण्याची आवश्यकता नाही. पण त्याने तसे न केल्यास त्याला चांगली अद्दल घडवावी. खान लगबगीने त्याच्या प्रदे शात गेला व गवम तनद्रे तून त्याला जागे करून त्याला बादशाही आदे श पाठवला. त्याच्या राज्यातील लोकांच्या दै वात तवनाश ललतहला नव्हता तसेच त्याची संपत्ती िुळीला धमळणार असे तविीललखखत नव्हते त्यामुळे तनवाड्याच्या ददवसावर जरी त्याचा तवश्वास नसला तरी बादशाही संदेश धमळाल्यावर मोठ्ा सैन्याची भीती बाळगून, राजांच्या राजाला व बादशाहाला मी शरण जात आहे असे त्याने कळवले . त्यामुळे त्याची मालमत्ता सुरणक्षत रातहली [३०६] व त्याचे लोक मारले गेले नाहीत. बादशाहाच्या आदे शानुसार खानाने त्याच्या कुटुं बाचे रक्षण केले व गवताचे एक पातेही तोडू ददले नाही. तो तकल्ल्याबाहेर येऊन खानाला भेटला व सोमवार, २८ नोव्हेंबर १६८७ / २ सफर १०९९ ला तो तकल्ला मुसलमानी सरदारांसमोर झुकला. जगाच्या आरंभापासून आजवर ज्या दठकाणी कोणीही नमाजाची बांग ददली नव्हती ततथे मुसलमानी ढोल इतक्या जोरात वाजला क़ी कातफरांचे कान बिीर झाले . ‘केवळ इस्लामच खरा, कातफरी खोटी’ ही आरोळी गगनात दुमदुमली व मुसलमानांची छाती गवामने फुलली. खानाने ततथे तकल्ले दार नेमला व आजुबाजूच्या भाग ताब्यात घेऊन नायकाला घेऊन दरबारास आला. या कामाबद्दल त्याचा यथायोग्य सन्मान केला गेला. खानाच्या वधडलांनी गोळकोंड्याच्या वेढ्यात चांगले काम केले होते व आता मुलानेही सागर घेताना तततक़ीच क्षमता दाखवली. पाम नायक हा ददसायला कुरूप आणण तवधचत्र प्राणी होता.* * * रात्रीला याचे प्रतीक मानल्यामुळे ततला सुतक लागले आहे या काळ्या ढगामुळे ददवस ही रात्रीसम झाला आहे अस्वलांशी व डु करांशी याची तुलना केली तर त्यांचा घोर अपमान होईल प्रेताला आंघोळ घालणाऱ्याला ही याला बघून तकळस येईल

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५७

[३०७] बादशाहाच्या भेटीचे सौभाग्य धमळाले पातहजे हा तवचार त्याच्या

हृदयातील अंिाऱ्या कोपऱ्यात कसा चमकला ते मला मातहत नाही. मंगळवार, २७ धडसेंबर १६८७ / २ रतब-उल-अव्वल १०९९ ला बादशाहाने त्याला भेटीची अनुमती ददली व त्याच्या पररब्स्थतीच्या तुलनेत त्याला फार वरती उभे राहायचा सन्मान ददला. चार पाच ददवस दरबारास आल्यानंतर तो अचानक नरकात गेला. धमसरा - असे नीच आयुष्य संपले ले बरे. त्याची मुले व नातलगांना योग्य मनसब ददली गेली. बादशाहाने आदे श ददला क़ी सागर प्रांत आता नुस्रताबाद म्हणून ओळखला जाईल. हा प्रांत आनंददायी, प्रसन्न करणारा व सुपीक आहे. * * *

बादशाहा हैदराबादहून त्रवजापूरला परततो जगाचे तनयमन करणे व माणसांना लशस्त लावणे या एकाच कामात बादशाहाला रस होता त्यामुळे नवे दे श जजिंकण्याच्या या कामापेक्षा शारीररक आरामाला त्याने किी महत्त्व ददले नाही. त्यामुळे हैदराबादचे हवामान आल्हाद दायक असतानाही [३०८] साम्राज्याचा कारभार पूणमत्वाकडे नेण्यासाठी अनुकूल असले ल्या शहरांकडे कूच करायचे त्याने ठरवले . तवशेष करून त्या बंडखोर व अस्वच्छ कातफर संभाला िडा लशकवण्यासाठी, ज्याने लसकंदर व अबुल हसन या दोन वाट चुकले ल्या वाटसरूंबरोबर संरक्षक युती केली आणण त्याच्या या चुक़ीच्या दाव्यामुळे त्या दोघांबद्दल लोकांच्या मनात जराही तवश्वास व आदर उरला नाही. बुिवार, २५ जानेवारी १६८८ / १ रतब-उस-सानी १०९९ ला बादशाहा तवजापूरकडे तनघाला. एका शुभ मुहूतामवर खान बहादुर तफरोज जंग याला आडोणीचा तकल्ला मसाऊद हबशीकडू न जजिंकुन घेण्यासाठी नेमले गेले. हा मसाऊद, लसकंदरच्या वधडलांचा दास होता. या (लसकंदरच्या) राजवटीच्या गोंिळात त्याने सत्ता त्याच्या हातात घेतली व कृतघ्न होऊन त्याच्या मालकाच्या मुलाकडे राजाची उपािी सोडू न इतर काही ठे वले नाही. त्याने सगळा खजजना, पुरले ले िन, दुर्मिंळ वस्तु व मूल्यवान अलं कार असे सगळे त्याच्या तकल्ल्यात नेऊन ठे वले . खान बहादुर सोबत २५००० लोकांचे सैन्य ददले गेले. मुहम्मद आजम याचा मोठा सन्मान करून त्याला ४०००० स्वार दे ऊन संभाला संपवायला पाठवले गेले. मंगळवार, ७ फेब्रुवारी १६८८ / १४ रतब-उस-सानी १०९९ ला

अध्याय ३१

१ जुलै १६८७ ते १९ जून १६८८

२५८

बादशाहा [३०९] जाफराबाद बीदर येथे पोहोचला आणण कमथानाहच्या तलावा शेजारी छावणी पडली. अबुल हसन याने त्याच्या पंिरा वषांच्या राजवटीत, हैदराबाद ते मुहम्मदनगर, या एका कोसाच्या अंतरापेक्षा अधिक अंतर घोड्यावरून एका ददवसात किीच पार केले नव्हते. त्यामुळे बादशाहा बरोबर रोज इतक़ी घोडदौड करणे त्याच्यासाठी फारच त्रासाचे होत होते. म्हणून त्याने बादशाहाकडे तनवृत्तीची याचना केली. बादशाहाने जानलसपार खान याला त्याला दौलताबादला नेऊन सोडायचा आदे श ददला तसेच अधिकाऱ्यांना आदे श ददला क़ी दुबळ्या िमामतील लाडावले ल्या लोकांना ज्या काही अत्यावश्यक वस्तू जसे क़ी पलं ग वगैरे, त्याच्यासाठी तयार ठे वाव्यात. त्याला वार्षिंक ५०००० रुपये भत्ता ददला गेला. अशा अपराध्याला इतक्या सुख सोयी दे णे व त्याचे अपराि क्षमा करणे ही बादशाहाने दाखवले ली केवढी कमालीची कृपादृष्टी होती ! त्या तलावाला टायतग्रस (नदी) म्हणणे जराही अततशयोक्त़ीचे झाले नसते. त्याच्या उत्तर तीरावर जो बसतो त्याला जीवन स्वास्थय लाभते. याच्या इतक़ी स्वच्छ हवा व पाणी इतर कुठे ही नाही. या पतवत्र पाण्याजवळची शेते कायम तहरवी असतात कारण हे शेतकरी पावसाळी ढगांवर अवलं बून नाहीत. ते एका वषी पेरणी करतात व पुढची काही वषे पीक घेतात. प्रलसद्ध महान ख्वाजा मुहम्मद याकुब जोईबारी याने इथे जीवनाची पूतमता केली. बादशाहाला [३१०] मृतात्म्यांबद्दल फार ममत्व वाटत असे. त्याने त्याच्या नातलगांचा सन्मान केला व त्याचे पार्थिंव स्वतःच्या पूवमजांबरोबर पुरण्यासाठी पाठवले . इथे तीन ददवस थांबल्यानंतर सैन्याने पुन्हा कूच केले . शतनवार, २५ फेब्रुवारी १६८८ / ३ जमाद-उल-अव्वल १०९९ ला बादशाहा गुलबगाम शहराबाहेर पोहोचला. ततथे त्याने मीर सय्यद मुहम्मद तगसुदराज याच्या दग्यामला भेट ददली व त्या पावन स्थानातील रतहवाश्यांच्या डोक्यावरून दाररद्र्याचा पडदा बाजूला सारला. सात ददवसांच्या पडावानंतर सैन्याने तवजापूरकडे कूच केले . गुरूवार, १५ माचम १६८८ / २२ जमाद-उलअव्वल १०९९ ला बादशाहा ततथे पोहोचला. सवम रतहवासी व फक़ीर, शहराचा तसेच आजूबाजूच्या प्रदे शाचा तवनाश झाल्यामुळे दाररद्र्याने गांजले होते. बादशाहाच्या औदायामने त्यांना िीर धमळाला. * * * [३११]

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२५९

अध्याय ३२ राजवटीचे बत्तीसावे वषम – तहजरी १०९९-११०० २० जून १६८८ ते ८ जून १६८९ * * * * या काळात बादशाही सैन्याने जे अगणणत बलाढ्य तकल्ले जजिंकले होते त्याबद्दल ललहायला माझ्याकडे जागाच नाही. बंडखोर राजाराम जाट याच्यावर मुहम्मद बीदर बख्त याच्या नेतृत्वाखाली, तसेच खान जहान बहादुर जफर जंग व इतर वीरांच्या दे खरेखीत जी मोतहम झाली, तो सगळा प्रचंड मोठा घटनाक्रम होता. त्यात काही मोठ्ा गोष्टी साध्य झाल्या व प्रचंड पैसा खचम झाला त्यामुळे याबद्दल थोडे ललतहणे क्रमप्राप्त आहे. शतनवार, ११ ऑगस्ट १६८८ / २३ शव्वाल १०९९1 ला बादशाहाला या सैन्याच्या वाकनतवसांकडू न कळले क़ी बुिवार, ४ जुलै १६८८ / १५ रमजान १०९९ ला तो राक्षसी कुत्रा बंदुक़ीच्या गोळीने नरकात गेला आहे. जवळपासच्या प्रदे शातून बंडखोरांना हुसकवले होते व शांतता प्रस्थातपत केल्यामुळे सवम लोक बादशाहाची प्रशंसा करत त्याला अणभवादन करत होते. [३१२] ५ सप्टें बर १६८८ / १९ जजल्कदा १०९९ ला त्या बंडखोराचे मुंडके बादशाहाकडे

आणले गेले. कामगार खानाचा तववाह सैय्यद मुजफ्फर हैदराबादी याच्या मुलीशी झाला व बादशाहाकडू न त्याला एक अंगरखा, एक घोडा व १०००० रुपयांचा एक सेहरा ददला गेला. आला-उल-मुल्क फाजजल खान याचा मुलगा इततमाद खान याला कामगार खानाच्या जागी बादशाहाच्या घराचा खान-इ-सामान नेमले गेले व त्याला ५०० जात (१०० स्वार) अशी वाढ दे ऊन दोन हजारी (४०० स्वार), एक कलगी व हररताश्माची आसा ददली गेली. धमझाम मुईज्ज याला त्याच्या जागी दफ्तरदार-इ-तान हे पद तसेच मुसावी खान ही उपािी धमळाली. ख्वाजा अब्दुर रहीम खान याला मुहसान खानाच्या जागी बयुतात तर मुआतमाद खानाला त्याच्या जागी दाघ-इ-तशीहा चा दरोगा नेमले गेले. इततकाद खानाला त्याच्या बायकोच्या (व अमीर-उल-उमरा शातहस्ता खानाची मुलगी)

1

ّ ‫‘ )بيست و‬बीस्त व सय्यूम’ इंग्रजी अनुवादात इथे ३ शव्वाल ददले आहे. फासी पाठात (‫سيوم‬ म्हणजे २३ म्हटले आहे.

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६०

मृत्यू नंतर एक तवशेष अंगरखा व एक खंजीर ददला गेला. अबुल हसन हैदराबादी याला तीन मुली होत्या. बादशाही आदे शानुसार त्यातील पतहलीचा तववाह लसकंदर तबजापुरीशी, दुसरीचा लसरकहिंदचा शेख मुहम्मद नक्शबंद याचा मुलगा मुहम्मद उमर याच्याशी तर ततसरीचा उम्दत-उल-मुल्क आसद खान याचा [३१३] मुलगा इनायत खान याच्याशी केला गेला. इनायत खानाला एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती व एक सेहरा ददला गेला. मीर आततश मुखललस खान याला कृष्णा नदीचे पाणी भुयारी मागामद्वारे तवजापूर शहरापयंत आणायचे काम ददले गेले व त्याला एक खंजीर ददला गेला. बादशाहा पादशाहजादा होता त्यावेळी मुशीद कुली खान नावाचा त्याचा सेवक होता. त्याचा मुलगा फज्ल अली याला खान ही पदवी ददली गेली व त्याला उच्च ददवाणी कचेरीत वाकनतवस हे पद ददले गेले. नंतर पदतनणश्चती करताना बादशाहा म्हणाला क़ी, ‘त्याला तवचारा क़ी त्याला त्याच्या नावात खान लावायचे आहे का त्याच्या वधडलांची

उपािी’. त्याने काही कारणास्तव ‘फज्ल अली खान’ हे तनवडले . बादशाहा म्हणाला, ‘माझे जन्मदाते आणण मी कुबामन-इ-अली आहोत. त्या मूखामला सांगा अली तवसरुन जा,

तू आता कुली आहेस. फज्ल कुली खान ठीक आहे’. मला बादशाहाचे या संबि ं ातले तवचार आठवतात. एकदा एका भारतीय वंशाच्या दरबारी ने तवनंती केली क़ी त्याच्या घरातील दोन दासांनी कुराणाचे पठण पूणम केले होते व ते बादशाहाने कृपया ऐकावे. बादशाहाने त्यांना रात्री घेऊन यायला सांतगतले . ते आले तेव्हा त्या दरबारीने सांतगतले क़ी, ‘हे असे दोघे आले आहेत’. बादशाहा म्हणाला, ‘त्या पाखंडीचे (लशया) नाव घेऊ नका’. त्या दरबारीला आश्चयम वाटले व म्हणाला क़ी, ‘मी अमुक अमुक लोकांबद्दल म्हणत होतो’. बादशाहा उत्तरला क़ी, ‘माझ्यावर तवश्वास नसेल तर त्यांना त्यांची नावे तवचार’. तो बाहेर गेला व नंतर आत येऊन म्हणाला, ‘त्यांचे नाव हसन अली व हुसैन अली आहे’. बादशाहा म्हणाला, ‘माझे जन्मदाते व मी कुबामन-इ-अली आहोत. या कहिंदुस्तानी लोकांचा या नावाशी काय संबंि ? दुष्ट लालसे पोटी ते पाखंडी लशयांशी मैत्री साितात व योग्य मागम सोडू न भटकतात. दे व करो व आपण बेसाविपणाच्या िुंदीतून बाहेर पडो’. [३१४] मेहरुस्त्न्नसा बेगम ने ददल्लीला जायची अनुमती मातगतली. लु त्फुल्लाह खानाला ततला घेऊन जायचा आदे श ददला गेला. तपलखान्याचा दरोगा सरदार खान याला अंगरखा व १०० स्वारांची वाढ दे ऊन दीड हजरी (५०० स्वार) धमळाली. पदच्युत केले ला छावणीचा काझी सय्यद अबु सैद मरण पावला. त्याची मुले तनजामुद्दीन व फैय्याजुद्दीन यांना

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६१

दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. * * सफलशकन खानाला लसयादत खानाच्या जागी अजमइ-मुकरमर चा दरोगा नेमले गेले. शाहजादा दौलताफ्जा वारला व त्याला अली आददल खान तबजापुरी याच्या थडग्यात पुरले गेले. रत्नशाळे चा मुश्रीफ इनायतुल्लाह याला झीनतुस्त्न्नसा बेगमच्या घरचा खान-इ-सामान नेमले गेले. खान जहान शाहजानीचा मुलगा लश्कर खान, ज्याला मुनव्वर खान ही उपािी ददली होती, त्याला तवजापूरचा मुख्याधिकारी नेमले गेले. सरदार खानाचा मुलगा हमीदुद्दीन खान याला त्याच्या वधडलांच्या जागी तपलखान्याचा दरोगा नेमले गेले. तो पाच सदी होता व आता त्याला १०० स्वारांची वाढ धमळाली. आता मी पादशाहादा आजम शाह व तफरोज जंग यांच्या तवजयाबद्दल ललतहतो. संभाचा पराभव करण्यासाठी बादशाहाचा तनरोप [३१५] घेतल्यावर पादशाहजाद्याने बेळगावकडे कूच केले . काही वेळातच त्याने मोचे लावून गोळीबारी चालू केली. पूवी तवजापूरच्या सेवेत असले ल्या व काही ददवसांपूवीच वारले ल्या प्रांतप्रमुखाच्या मुलाला त्या मूखम लोकांनी ततथे प्रमुख (तकल्ले दार ?) नेमले होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आले क़ी त्यांचे काही चालणार नाही व बादशाही सैन्य नेटाने जोर लावत आहे तेव्हा त्यांनी हट्ट सोडला. हा तकल्ला व त्याच्यावर अवलं बून असले ले सगळे जजिंकले गेले. याला आजमनगर1 असे नाव ददले गेले. पादशाहजाद्याने कृपावंत होऊन मध्यस्ती केल्यामुळे त्या मुलाला दरबारास आणून योग्य मनसब ददली गेली. छावणीस परतायचा काळ (पावसाळा) असल्यामुळे पादशाहजादा ही दरबारास आला. आडोणीच्या तकल्ल्याला वेढा घालण्यात गुंतले ल्या तफरोज जंग बहादुर याने आददलशाही दास मसाऊद याला आिी बादशाही दरबारास येण्याचे आमंत्रण ददले . पण तो मूखम म्हातारा चुक़ीच्याच मागामवर जात आहे हे बधघतल्यावर त्याने त्या प्रांतातले श्रीमंत जजल्हे लु टले , वाडी जाळू न टाकली, िैयामने तकल्ल्यातून बाहेर पडले ल्या लोकांना कापून काढले , खंदक खणले , बंदुका व तोफा डागल्या आणण अशा प्रकारे वेढा करकचून आवळला. [३१६] शेवटी ६

1

फासी पाठात आजमाबाद आहे पण तळटीपेत व हस्तललखखतात आजमनगर ददले आहे.

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६२

ऑगस्ट १६८८ / १८ शव्वाल १०९९1 ला तो तवनम्र होऊन तकल्ल्याबाहेर आला व त्याच्या मागण्या सांतगतल्या. तकल्ल्याचे नाव इमततयाजगड ठे वले गेले. मोतहमेत तवजय धमळाल्याचे तफरोज जंग खानाचे पत्र आल्यावर लसयादत खानाला व ते पत्र घेऊन येणाऱ्याला अंगरखे ददले गेले. तवजयोत्सवाचे संगीत वाजवले गेले व दरबारात उपब्स्थत असले ल्यांनी अणभवादन केले . अनंत कृपादृष्टी असले ल्या बादशाहाने त्या नीच मसाऊदला खान ही उपािी, सात हजारी (तततकेच स्वार) व मुरादाबादची जाहगीरी व फौजदारी ददली. दख्खन पार करेपयंत त्याने तफरोज जंग खानाच्या सैन्याबरोबर राहावे असा आदे श ददला गेला. त्याच्या मुलांना व नातलगांचा ही सन्मान केला गेला. तकल्ल्यातील वस्तुंचा ताबा घेऊन तसेच आजूबाजूच्या प्रदे शाचे तनयंत्रण व प्रशासन व्यवस्था लावून तफरोज जंग खान सोमवार, १९ नोव्हेंबर १६८८ / ५ सफर ११०० ला दरबारास पोहोचला व उत्तम सेवस े ाठी त्याचा सत्कार केला गेला. [३१७] खान-इ-सामान इततमाद खान याला फाजजल खान तर अमानत खानाचा मुलगा मीर हुसैन याला त्याच्या वधडलांची उपािी ददली गेली.

भयंकर महामारी - बादशाहािे त्रवजापूरहून िंभाच्या दे शात कूि तफरोज जंग खान इग्म्तयाजगड जजिंकून परतल्यावर काही ददवस दरबारास रातहला व नंतर त्याला त्या कातफराला संपवण्यासाठी पाठवले गेले. त्याला मदत करण्यासाठी बादशाहाने स्वतः कूच करायचे ठरवले . शुक्रवार, १४ धडसेंबर १६८८ / १ रतब-उल-अव्वल ११०० हा ददवस मोतहम सुरू करण्यासाठी तनवडला गेला व लांबच्या परगण्यात गेलेले हमाल दरबारास बोलावले गेले. मुहरमम (१६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर १६८८) मतहन्याच्या मध्यास पसरले ल्या महामारीने अनेकांना मारले . लोकांचे स्वास्थ तबघडल्यामुळे आनंदोत्सव संपले . सगळे शोकमग्न झाले . जणु मृत्यूला जगातून मानवाचे नावच पुसून टाकायचे होते. तनवाड्याचा ददवस आला असे मी म्हणू शकत नाही पण या तवनाशी शक्त़ीसमोर उच्च नीच सगळ्यांनी प्राण गमावले . * * * [३१८]

1

इंग्रजी अनुवादात ८ शव्वाल ही ततथी ददली आहे पण फासी पाठात ‘तहजदाम-ए-शव्वाल’ ّ ‫ )هژدهم‬म्हणजे १८ शव्वाल आहे. (‫شوال‬ ِ

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६३

काखेत ककिंवा मांडीवर गळू व प्रचंड ताप येऊन माणूस बेशुद्ध व्हायचा, वैद्यांच्या उपायांनी आराम पडत नव्हता. फार थोडे लोक दोन ददवसांच्या वर जगले , बरेच लोक दोन ककिंवा तीन ददवसांनी मेले. जे जगले व ज्यांचे नातलग मेले नाहीत ते सुद्धा आजूबाजूची पररब्स्थती पाहून मरणासन्न झाले होते. चांगल्या ददवसातही हा तवचार मनात रातहला असता तर तकती बरे झाले असते ! थोडक्यात कोणीही कोणाची काळजी घेत नव्हते व सगळीकडे ‘फक्त मी फक्त मी’ असा आवाज घुमत होता. अिममेली माणसे जगाच्या व्यवहारापासून अललप्त होऊन तासंतास मरणाच्या दारात खखतपत पडली होती. मेलेल्यांपैक़ी काही म्हणजे बादशाहाची परस्तार, जुनी व तनष्ठावंत औरंगाबादी महल, मुहम्मदी राज हा महाराजा जसवंतससिंहाचा मुलगा ज्याला बादशाही जनान्यात वाढवले होते व तेराव्या वषी त्याला मनसब ददली होती, फाजजल खान सद्र व इतर अनेक नामदार. मिल्या श्रेणीतील लोक व चाकरमानी, मुसलमान आणण कातफर तकती मेले त्याची गणतीच करता येणार नाही पण तनणश्चतपणे एक लाखापेक्षा कमी नाहीत. अनेकांच्या मेंदवर पररणाम झाला ककिंवा त्यांचे डोळे , जीभ, कान तनरुपयोगी झाले . वरीष्ठ अधिकाऱ्यांपैक़ी तफरोज जंग बहादुर याच्या डोळ्यावर पररणाम झाला. मग सामान्य माणसांचे दुःख काय सांगावे ? इततहासकारांनी या पूवी कुठल्याही काळात इतका उद्रे क नोंदवला नसेल. म्हाताऱ्यांत म्हाताऱ्या लोकांनीही किी अशी साथ बधघतली ककिंवा ऐकली नव्हती, जी गेले दोन मतहने चालली. * * * [३१९] या सगळ्या तवनाशात उपयुमक्त ददवशी हृदय कणखर करून व तनणश्चत उद्दे श समोर ठे वून बादशाहा तवजापूरातून बाहेर पडला. ईश्वराची कृपा आहे क़ी एका आठवड्याच्या अततरेकानंतर ही साथ ओसरू लागली. ईश्वराच्या कृपेने बादशाहा अकलू जला पोहोचला. वैद्यांच्या मतानुसार तफरोज जंग खान याचा डोळा इतक्यात बरा होण्याची शक्यता नसल्यामुळे पादशाहजाद्याला एकट्यालाच शत्रूच्या दे शात सैन्यासतहत पाठवले गेले.

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६४

नीि िंभाला अटक व मृत्यूदंड दे ऊन नरकात प्रवेश1 * * * * बादशाहा जेव्हा [३२०] उपयुमक्त दठकाणी कायमभाग आटोपण्यासाठी राहत होता तेव्हा अदृष्य तवश्वामिली आनंदी वाताम ऐकून जगाचे कान सुखावले . जे तवजयी संगीत ऐकण्यासाठी मुसलमानांचे कान आतुर झाले होते ते साऱ्या गगनात दुमदुमले . बादशाहाच्या अंगभूत गुणांमुळे व न्यायामुळे शांती व सुरक्षा प्रस्थातपत झाली होती. बंडाळी बुडली. सैतान कैद झाला. थोडक्यात सांगायचे तर बादशाहाच्या सुदैवाने राक्षसी कातफर संभा याला सैन्याने अटक केली. शेख तनजाम हैदराबादी म्हणजे मुकरमब खान, एक शूर सेनापती होता. तो व त्याच्या मुलांमध्ये धमळू न त्यांच्याकडे पंचवीस हजारी (२१००० स्वार) होती. त्याचे सैन्यबल लक्षात घेता याच्या आिीच तबजापूरहून त्याला शत्रूकडे असले ला पन्हाळा घेण्यासाठी नेमले होते. एखाद्या िोरणी व सावि माणसाप्रमाणे त्याने त्या कातफराची बातमी आणण्यासाठी हेर पाठवले . अचानक त्यांनी पक्क़ी बातमी आणली क़ी संभाचे त्याच्या नात्यात असले ल्या लशके कुटुं बाशी वैर झाल्यामुळे तो रायरीहून खेळण्याला गेला होता व त्या कुटुं बाशी समेट घडवून तसेच तकल्ल्याचा बंदोबस्त केल्याची खात्री करून तो संगमेश्वरला गेला, [३२१] जजथे त्याचा मंत्री कवी कलश याने बागा व उंच इमारती बांिल्या होत्या, आणण करमणुक़ीत व तवलासात गुंतला होता. आपल्याकडच्या स्वाणभमानी व तनष्ठावंत लोकांची तुकडी घेऊन बादशाहावर असले ल्या अढळ भक्त़ीने प्रेररत होऊन, त्याच्या जीवाची जराही परवा न करता खान कोल्हापूरहून तनघाला. ततथून ती जागा चाळीस कोसाच्या अंतरावर होती व कुठल्याही प्रवाशाने पृथवीवर पतहली नसेल अशी अत्यंत अवघड वाट, डोंगर दऱ्यातून गेली होती. लांब पल्ले पार करत तो ततथपयंत गेला. संभाच्या हेरांनी त्याला कळवले क़ी मुघलांचे सैन्य येत आहे तरी मूखमपणाच्या व गवामच्या मददरेने िुंद असले ला तो दुराणभमानी माणूस त्यांना म्हणाला क़ी, ‘मूखम लोकांनो, तुम्हाला वेड लागले आहे. मुघल सैन्य इथे येऊ शकेल का ?’ असे म्हणून त्यांचा लशरच्छे द केला. 1

फासी पाठातील संपूणम वाक्य असे आहे – ( ‫رسيدن‬ ‫شدن سنبهای شقاوتآما و بياسا‬ ‫دستگن‬ ِ ِ ّ ‫ )آن جهنم ماوی‬दस्तगीर शूदन-ए-संभा-ए-लशकावतआमा व ब-यासा रसीदन-ए-आन जहन्नम मावा.

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६५

खानाने प्रचंड थकवा सहन करत तवजेच्या ककिंवा वाऱ्याच्या वेगाने अचानक संभावर छापा घातला. त्या नीच शातपत माणसाने चार पाच हजार दख्खनी नेझगुजारांसह प्रततकार केला. दै वयोगाने कवी कलशाला एक बाण लागला व थोड्या झटापटी नंतर तो ततथून पळाला. आपल्याला कोणी पातहले नाही असे वाटू न कोल्याच्या वृत्तीचा संभा कवी कलशाच्या हवेली रुपी तबळात लपला1. हेरांनी खानाला सांतगतले क़ी तो ततथे लपला आहे. खानाने पळू न जाणाऱ्या लोकांमागे न जाता महालाला घेरा घातला. त्याचा मुलगा इखलास खान काही लोकांबरोबर पायऱ्यांनी आत गेला व त्या नीच माणसाला केसाला िरून ओढत खानाच्या हत्ती पाशी आणले . [३२२] * * * * त्याचे पंचवीस सहकारी त्यांच्या बायका मुलींसह बंदी बनवले गेले. ही बातमी अकलू जला, ज्याला यापुढे आसदनगर म्हटले गेले, बादशाहाकडे पोहोचली. त्याने शाहना सरदार खान याचा मुलगा हमीदुद्दीन खान याला आदे श ददला क़ी तातडीने मुकरमब खानाकडे जाऊन त्या कैद्याला साखळदं डात जखडू न घेऊन या. तवजयी खान त्या प्रांतातून (सुखरूप) हुशारीने बाहेर आला व आलमगीर बादशाहाच्या सुदैवाने त्या कातफराच्या एकाही सरदाराने (त्याला सोडतवण्याचे) काही प्रयत्न केले नाहीत. शुक्रवार, १५ फेब्रुवारी १६८९ / ५ जमाद-उल-अव्वल ११०० ला जेव्हा बादशाही सैन्य आसदनगरहून (अकलू ज) बहादुरगडास गेले होते तेव्हा संभाला दरबारास आणले गेले. बादशाहाने इस्लामच्या तनष्ठेपोटी आदे श ददला क़ी छावणी पासून दोन कोस अंतरावर त्या कनिंद्य व दुदै वी संभाला तख्ता कुलाह2 घालावी व त्याच्या सहकाऱ्यांना तवदुषकाची वस्त्रे घालावीत. त्यांना हर प्रकारे त्रास दे ऊन उंटावर बसवून ढोल व कणे वाजवत छावणीत व दरबारास आणावे म्हणजे ते बघून मुसलमानांना अत्यानंद होईल आणण कातफरांचा आवेश गळू न पडेल. त्याला दरबारास आणले त्या ददवसापूवीची रात्र खरोखर शब-इबारात होती कारण तो आनंदोत्सव बघण्याच्या उत्सुकतेने सकाळपयंत कोणीही झोपले

1

इंग्रजी अनुवादात ‘Sambha concealed himself in a hole in the mansion of Kavi Kalas’ असे ददले आहे पण फासी पाठाशी ताडू न बधघतले तर त्या वाक्यातील रूपक शब्दशः

घेतल्यामुळे तसे शब्द वापरल्याचे ददसते. 2

वरच्या बाजूला टोकदार होत जाणारी तवदुषकाची लाकडी टोपी ज्याला लहान घंटा व इतर वस्तु लटकवले ल्या असत. अशा प्रकारची टोपी इराण मध्ये अट्टल गुन्हेगारांना घालत असत. स्टा. २८६, म.आ.ज.स. १९४

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६६

नाही आणण तो ददवस ईद सारखा होता कारण सगळे लहान थोर पुरुष हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी बाहेर पडले . थोडक्यात, तवटं बना करण्यासाठी त्याची धमरवणूक काढू न नंतर लशरच्छे द करण्याच्या लायक़ीच्या या माणसाची छावणीत चििंड काढली गेली व नंतर [३२३] बादशाहाकडे नेले गेले. तो दरबार-ए-आम मध्ये बसला होता. त्याने त्याला

तुरूंगात घेऊन जायला सांतगतले . त्याच क्षणी बादशाहा ससिंहासनावरून उतरला व गुडघे टे कून ईश्वराचे आभार मानण्यासाठी डोके जधमनीवर टे कवले आणण दोन्ही हात वर करून

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६७

कमांचा न्याय करणाऱ्या व इच्छापूती करणाऱ्या तविात्याची (अल्लाह) प्राथमना केली. मग त्या दरदशी नेत्रांतून ईश्वरी चमत्काराचे द्योतक असल्यासारखे अश्रु वाहू लागले . त्याचा मुकुट आकाशाला टे कला आहे पण मस्तक मात्र ईश्वर चरणी लीन आहे संभाने या आिी बादशाही कृपेकडे दुलम क्ष केले होते. पतहल्यांदा जेव्हा बादशाहाच्या दरबारातून त्याच्या वधडलांबरोबर तो पळू न गेला आणण दुसऱ्यांदा, जेव्हा ददवंगत ददले रखानाकडे असताना ततथून पळू न गेला. त्यामुळे त्याच ददवशी त्याच्या डोळ्यांतन ू बघण्याची शक्त़ी काढू न घेण्यात आली व दुसऱ्या ददवशी त्या खोटारड्या कवी कलशाची जीभ (हासडली गेली). * * * [३२४] स्वगामकडे तोंड करून उभ्या असले ल्या त्या बळकट रायरीवरचा संभा कुठे आणण त्याच्या कृतघ्नतेमुळे घोर तवटं बना होऊन बंदीवासात खखतपत पडले ला संभा कुठे ! या घटनेचा काळ नोंदवण्या करता तवद्वानांनी रचले ल्या अनेक कालश्ले षांपैक़ी आजम

शाहाचा सेवक इनायतुल्लाह याने रचले ला कालश्ले ष सवामत उत्तम असल्याचे सवांनी मान्य केले , तो असा –

‫با زن و فرزند سنبها شد اسن‬ त्याच्या बायकामुलांसतहत संभाला कैद झाली या अप्रततम सेवेसाठी त्याला पकडणाऱ्याला, खान-इ-जमान फतह जंग ही उपािी, ५०००० रुपयांचे बक्षीस, एक तवशेष व झगमगीत अंगरखा, रत्नजधडत खोगीर व साज असले ला घोडा, एक खंजीर, रत्नजधडत परदलाह असले ली एक िूप व वाढ दे ऊन सात हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. त्याचा मुलगा इखलास खान याला खानइ-आलम ही उपािी, एक अंगरखा व वाढ दे ऊन पाच हजारी (तततकेच स्वार) ददले गेले. शेख मीरान याला मुनव्वर खान व शेख अब्दुल्लाहला इखततसास खान या उपाध्या दे ण्यात आल्या. इखतराम खान, त्याचे नातलग व सहकारी यांना प्रत्येक़ी एक अंगरखा व मनसब ददली गेली.

ّ ‫ابر وبال و نکاِل که از قتل‬ ‫و چون افنای آن مرس ِک‬ ِ ‫بدکيش جهنم نصيب در بر‬ ِ ‫] داشت‬۳۲۵[ ‫بالد اسالم بر ابقاي او رجحان‬ ‫اس مسلمانان و نهب و‬ ِ ‫غارت‬ ِ ِ ‫و‬

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६८

ّ ‫دم آن‬ ‫اصحاب دين و دولت‬ ‫صوابديد‬ ‫باب سع و ملت و‬ ِ ِ ِ ‫سفك‬ ِ ِ ‫ و بفتواي را‬ّ ٔ ‫يکم‬ ‫وصول‬ ‫بعد‬ ِ ‫حري قاطع الطريق الزم آمد‬ ِ ِ ‫موکب ظفزنزول بيست و‬ ِ ٔ‫ی‬ ٔ ّ ‫هر‬ ِ ‫ش و دو بکوره گانو مسیم بفتح اباد بيست و‬ ِ ‫نهم ش‬ ٔ ‫جمادياالوِل سنه‬ ‫بدرك‬ ‫بوساطت تي ِغ کافرکش با کب کلس که تا همه جا همراهش بود‬ ‫مذکور‬ ِ ِ ‫اسفل فرو وفت‬ ّ ٔ ‫یم رفت‬ ٔ ‫کافر بچه جهن‬ इस्लामी शहरे लु टून व मुसलमानांची कत्तल करून ककिंवा त्यांना बंदी बनवून जे जंगली क्रौयम व अपमान या मुणश्रक बदकेश जहन्नुम-नसीब कातफराने केला होता तो बघता, त्याला जजवंत ठे वण्याच्या कारणांवर तवचार तवमशम झाला. [३२५] शरीयावर आिाररत फतव्याप्रमाणे, राज्यातील मान्यवर व इस्लामी

कायद्याचे जाणकार यांनी या हरबी काती-उल-तरीक1 ला (नरकात) िाडणे योग्य होईल असे ठरवले . त्यामुळे रतववार, ३ माचम १६८९ / २१ जमाद-उलअव्वल ११०० ला बादशाहा कोरेगावला आल्यावर, सोमवार, ११ माचम १६८९ / २९ जमाद-उल-अव्वल १६८९ या ददवशी त्याला कवी कलश याच्या बरोबर सवामत खोल अशा नरकात िाडले 2. कातफराचा मुलगा नरकात गेला3 बादशाहाच्या यशामागचे पूवमसत्र ू सांगून मी हे प्रकरण संपवतो. संभाला पकडणे अशक्य आहे असे मानून आिी कोणीही त्याबद्दल बोलत नव्हते. मीर सय्यद मुहम्मद तगसुदराज याचा एक मुलगा सय्यद फतह मुहम्मद याने संपूणम आयुष्य सैन्यात काढले होते व त्यानंतर तो अहसनाबाद, गुलबगाम येथे तनवृत्त होऊन राहत होता. त्याचा मुलगा सय्यद बाददउल्लाह (ज्याच्या कपाळावरूनच त्याचे वैराग्य, चांगुलपणा व संताचा उत्तराधिकारी होण्याची त्याची योग्यता ददसायची) याची गतकाळातील संतांवर असणारी तनष्ठा व या कुटुं बातील लोकांवर असले ली माया पाहून बादशाहाने त्याला या संताच्या दरग्याचा उत्तराधिकारी नेमले होते. त्याला काही गावातील सुपीक जमीन सुयूरघाल

1 2 3

मारेकरी, हत्यारा, लु टारू. स्टा. ९४८. इंग्रजी अनुवादात या दोन वाक्यांमिील काही शब्द गाळले आहेत. इंग्रजी अनुवादात ही ओळ गाळली आहे.

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२६९

म्हणून ददली होती व सढळ हाताने इनामही [३२६] ददले होते. तो एकदा छावणीत आला व बादशाहाला भेटून म्हणाला क़ी, “मी अनेकदा या तेजस्वी थडग्यासमोर बसून या कातफराच्या तवनाशासाठी प्राथमना केली आहे. एके रात्री मला स्वप्न पडले क़ी मी तीथमयात्रेसाठी तफरत होतो आणण पार करायला अवघड अशी एक टे कडी ओलांडून जात होतो. ततथे काही लोक खांब ठोकत होते. त्यांनी मला तवचारले , ‘कुठे चालला आहेस ?’ मी त्यांना कुठे जात होतो ते सांतगतले . ते म्हणाले क़ी, ‘बरेच ददवस एक डु क्कर या दठकाणी येत आहे. त्याला पकडण्यासाठी तू सुद्धा आम्हाला मदत करायला पातहजेस’. सकाळ झाल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला क़ी मी सुद्धा सैन्यात येऊन या नीच कातफराला पकडण्यासाठी घझात मध्ये भाग घेतला पातहजे”. हे ऐकून बादशाहाला परम आनंद झाला व त्याने सय्यदचा मोठा सन्मान केला. या नंतर दहा ददवसांच्या आत लोकांची इच्छापूती झाली. संभाला पकडल्याची बातमी आली त्या ददवशीच बादशाहाने सय्यदला बोलावले व त्याला शुभेच्छा व आर्थिंक सहाय्य करून तनरोप ददला. या मोठ्ा तवजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दरग्याला गरीबांकररता व ततथली दे खभाल करणाऱ्यांसाठी १०००० रुपये पाठवले गेले. मंगळवार, २ एतप्रल १६८९ / २१ जमाद-उस-सानी ११०० ला बादशाहाने कोरेगावहून कूच केले व इस्लामाबाद ककिंवा चाकणकडे तनघाला. पादशाहजादा मुहम्मद आजम याने त्याच्या अललकडे पाच कोसावर तळ ददला होता. तो ततथे आला व भेट घेतली. त्या ददवशी पादशाहजाद्याला [३२७] तनरोप दे ऊन बादशाहा त्याच्या महालात परतला. या शुभ वषामतली आणखी एक घटना म्हणजे या संकट काळात रामा बरोबर असले ल्या एका सरदाराची अटक. संभाने या कातफराला, त्याच्या िाकट्या भावाला, अटकेत ठे वले होते. संभाच्या मृत्यू नंतर तो प्रमुख झाला आणण त्याने रायरीची सत्ता हाती घेतली. रायरी घेण्यापूवी जेव्हा जुल्फ़ीकार खानाने वेढा करकचून आवळला होता तेव्हा हा बैराग्याचे रूप घेऊन ततथून तनसटला.

ّ ‫ببت آن ے‬ ‫ز‬ ‫حميت راکه خرگز * نخواهد ديد روی نيکبخب‬ ‫ز‬ ‫ز‬ ‫خويشت را * زن و فرزند بگذارد بسخب‬ ‫آساي گزيند‬ ‫تن‬ बघा या पळपुट्याला सुदैव किी ददसणार नाही,

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२७०

चचिंता केवळ आपुली स्त्रीपुत्र ही बघणार नाही हेरांनी पत्राद्वारे बातमीची खातरजमा केल्यावर बादशाहाने अब्दुल्लाह खान बारहा याला रामा त्या बाजूला आला तर त्याला अटक करायचा आदे श ददला. हा अब्दुल्लाह खान काही ददवस बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान याच्याकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. नंतर जेव्हा रुहुल्लाह खानाला हैदराबादला पाठवण्यात आले तेव्हा तो तवजापूरचा सुभेदार झाला व नंतर बादशाहाच्या आदे शानुसार तवजापूरच्या प्रभावळीतील दोन तकल्ले घेण्यासाठी गेला होता. हेरांनी त्याला पक्क़ी बातमी ददली क़ी रामाने काही काळ भूमीगत राहून आता ३०० सरदार गोळा केले होते, [३२८] व त्या दठकाणापासून काही कोसांवरून जात तबदनूरच्या राणीच्या प्रदे शात गेला होता. खानाने तकल्ले घेण्याचा तवचार पुढे ढकलला व आिी त्याच्या सवामत मोठ्ा मुलाला, हसन अली याला त्या ददशेने पाठवून स्वतः तीन ददवस व रात्र असे लांब पल्ले मारत रात्री या अस्वलीणीच्या (तबदनूरची राणी) सीमेवर, सुभानगड व जारा या तकल्ल्याजवळ पोहोचला. तुंगभद्रे च्या काठावरील हा तकल्ला ततच्या ताब्यात होता व त्यातच शत्रूने आश्रय घेतला होता. खानाने त्याची तलवार रक्ताने लाल केली. अनेक जण मेले व नरकात गेले. इतर शंभराहून अधिक लोक, जसे कहिंदुराव, संताचा भाऊ व्यंकोजी1, बतहजी, मतनया घोरपडे यांना अटक झाली. या िामिुमीत रामा त्याची पगडी, अंगरखा, जोडे सोडू न कोणालाही कळणार नाही अशा प्रकारे पळू न गेला. खानाने इतके मोठे काम करूनही केवळ दै वाने साथ न ददल्यामुळे त्याने पुरेशी काळजी न घेतल्याने रामा पळू न गेला असे झाले आणण त्या अस्वलीणीनेही रामाला लपायला मदत करून नंतर त्याला पळू न जायला मदत केली अशी शंका घेतली गेली. आिी बातमी आली क़ी रामाला पकडले आहे म्हणून बादशाहाने त्याला दरबारास घेऊन यायला सांतगतले . दुसरी बातमी आल्यावर, अटक केले ल्या लोकांना तवजापूरच्या तकल्ल्यात ठे वायचा आदे श बादशाहाने ददला. जानतनसार खानाला मोठ्ा तुकडीतनशी [३२९] त्या अस्वलीणीवर चालू न जायचा आदे श झाला. तेव्हा त्या सैतानी संताने यशस्वीपणे खान, मतलब खान व शारजा खानाला थोपवले . शेवटी त्या राणीने दं ड म्हणून थोडी रक्कम दे ऊन ते प्रकरण धमटवले .

1

फासी हस्तललखखतात कहिंदुराव, संताचा भाऊ येकोजी, बहरजी व मातनया घोरपडे असे ददले आहे.

अध्याय ३२

२० जून १६८८ ते ८ जून १६८९

२७१

कहिंदुराव, बहरजी व इतर काही बंदी या भक्कम तुरुंगातून पळाले हे इतके आश्चयमकारक होते क़ी ततथल्या पहारेकऱ्यांशी संगनमत केल्या लशवाय असे काही होणे अशक्य होते. ही बातमी बादशाहाला कळवल्यावर उरले ल्या ऐंशी कैद्यांना त्याच्याकडे पाठवले गेले व ततथे त्यांचा लशरच्छे द केला गेला1. लश्कर खानाला अब्दुल्लाह खानाच्या जागी नाजजम नेमले गेले. त्याचा मुलगा वाजजहुद्दीन याला तकल्ले दार केले गेले व कोतवाल फौजदार खानाला लशक्षा म्हणून त्याची मनसब कमी करण्यात आली.

1

इंग्रजी अनुवादात ‘on the matter being reported to the Emperor the remaining eighty prisoners were executed’ असे ददले आहे. पण फासी पाठात ( ‫معروض‬ ‫بعد‬ ِ ِ

ّ ‫ز‬ ّ ‫نداي حضور رسيده بياسا رسيدند‬ ٔ ‫نفر ز‬ ِ ‫‘ )معل بقيه هشتاد‬बाद-ए-मअरोज-ए-मुअल्ला बातकया हश्ताद नफर-ए-जजिंदानी हजूर रसीदा बयासा रसीदन्द’ असे ददले आहे.

अध्याय ३३

९ जून १६८९ ते २८ मे १६९०

२७२

अध्याय ३३ राजवटीचे तेहेततसावे वषम – तहजरी ११००-११०१ ९ जून १६८९ ते २८ मे १६९० [३३०] * * * * हाजी शफ़ी खानाला मुसावी खानाच्या जागी दफ्तरदार-इ-

तान नेमले गेले तर मुसावी खानाला शफ़ी खानाकडील दख्खनची ददवाणी ददली गेली. दरबारी व प्रांतातील सवम अधिकाऱ्यांना पावसाळी अंगरखे ददले गेले. अब्दुल अजीज खानाचा मुलगा अबुल खैर खान याला राजगडचा तकल्ले दार नेमले गेले. मुख्तार खान याला मुखललस खानाच्या जागी मीर आततश व मुखललस खानाला मुहम्मद यार खानाच्या जागी अजम-इ-मुकरमर नेमले गेले. बादशाहाचा आवडता मीर अब्दुल करीम याने करोरीगंज म्हणून काम करताना हैदराबाद मिील दुष्काळात सगळ्याचा तुटवडा असताना रसदीची सोय करून तकमती तनयंत्रणात ठे वल्या होत्या त्यामुळे तो बादशाहाच्या सन्मानास पात्र ठरला होता. त्याला मुल्तफत खानाची उपािी ददली गेली. सरदार खानाचा कुलीन मुलगा हमीदुद्दीन याला खान ही उपािी धमळाली व त्याला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याचा मुलगा मुहम्मद खुजजस्ता अख्तर याला औरंगाबादहून दरबारास आणण्याचा आदे श ददला गेला. कामगार खानाकडे एक तुकडी दे ऊन त्याला मुअज्जमच्या जनानखान्यातील सेवकांना शाहजहानाबादला नेण्याचे काम दे ण्यात आले . इरादत खानाचा मुलगा व आजम खानाचा नातू मुबारकुल्लाह याला [३३१] इस्लामाबाद चाकणचा फौजदार नेमले गेले व इस्लाम खान वालाशाही याचा मुलगा कमालु द्दीन खान याला ततथला तकल्ले दार नेमले गेले. इखलासकेश याला शरफुद्दीनच्या जागी खान-इसामानच्या कचेरीतील वाकनतवस नेमले गेले. सलाबत खानाने जेव्हा दरबारास येण्याचा अजम केला तेव्हा त्याच्या जागी इततमाद खानाला सुरतेच्या उत्कृष्ट बंदराचा ददवाण व फौजदार नेमले गेले. जान तनसार खान अबुल मुकारम याला हररताश्माची मूठ व साज असले ला खंजीर दे ऊन शत्रूला िडा लशकवण्यासाठी पाठवले गेले. बुिवार, १० जुलै १६८९ / २ शव्वाल ११०० ला बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान याला कातफरांकडू न रायचूरचा तकल्ला घेण्याचे काम दे ण्यात आले . मुख्तार खानाला त्याचा सहाय्यक नेमले गेले. संभाला पकडण्यापूवी इततकाद खानाला या हरामखोराचे घर व खजजना असले ला रायरी तकल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. शतनवार, १९ ऑक्टोबर १६८९ / १५

अध्याय ३३

९ जून १६८९ ते २८ मे १६९०

२७३

हररताश्मािी मूठ अिले ला खंजीर (साभार MET)

मुहरमम ११०१ ला त्याने तकल्ला घेतला. संभा व रामा यांच्या माता, पत्नी, मुली व मुले यांना त्याने अटक केले . जुम्दत-उल-मुल्क याने त्याच्या मुलाच्या तवजयाचे पत्र बादशाहा समोर सादर केले व त्याला एक तवशेष अंगरखा व पर-इ-कुलांग असले ला एक रत्नजधडत जजघा ददला गेला. सुमिुर संगीत वाजवले जात होते. दरबारींनी अणभवादन करून पेशकश सादर केली. अब्दुर रहीम खान बयुतात याला रायरीला जाऊन संभाची मालमत्ता जप्त करायला सांतगतले गेले. [३३२] इततकाद खानाने शतनवार, २३ नोव्हेंबर १६८९ / २० सफर ११०१ ला भेट घेतली, त्याला वाढ दे ऊन तीन हजारी (२००० स्वार), एक अंगरखा, एक घोडा, एक रत्नजधडत भाता, एक िनुष्य, ३०००० रुपये रोख व जुल्फ़ीकार खान बहादुर ही उपािी ददली गेली. बादशाहाने उदार मनाने आदे श ददला क़ी संभाची आई व लसवाची पत्नी आणण त्याच्या इतर नातलगांना पुरतील असे तंबू गुलालबाडी येथे लावून त्यांना सन्मानाने व पूणम एकांतात ततथे उतरवावे. जुम्दत-उल-मुल्क याच्या छावणी जवळच राणीच्या सेवकांची छावणी ठोकण्यात आली. प्रत्येकाच्या पदाप्रमाणे त्यांना वार्षिंक भत्ता दे ण्यात आला. संभाचा नऊ वषामचा मुलगा शाहू याला सात हजारी (तततकेच स्वार), राजा ही उपािी, एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर, असी, घोडा, हत्ती, नगारे व आलम दे ण्यात आले . त्याचे िाकटे भाऊ मदनससिंह व आिू (मािव) ससिंह, यांना मनसबी व बक्षीसे दे ऊन त्यांना त्यांची आई व आजी यांच्या बरोबर राहायचा आदे श ददला

अध्याय ३३

९ जून १६८९ ते २८ मे १६९०

२७४

गेला. त्यांचा घरखचम चालवण्यासाठी प्रत्येकाला नेमून ददले ल्या सरकारात1 बादशाही अधिकारी नेमले गेले. तफरोज जंग खानाचा मुलगा कमरुद्दीन खान दरबारास आला होता, त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व पाच सदीची (२०० स्वार) वाढ दे ऊन त्याला अडीच हजारी (२००० स्वार) ददली गेली.

रायिूरिा त्रवजय शुक्रवार, २९ नोव्हेंबर १६८९ / २६ सफर ११०१ ला बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान [३३३] याने रायचूरचा तकल्ला घेतला. आता त्याला तफरोजनगर म्हटले जाते. त्याला एक अंगरखा व प्रशस्तीचे फमामन पाठवले गेले. त्याचा मुलगा खानाहजाद खान याला वाढ दे ऊन दीड हजारी (६०० स्वार) ददली गेली. बुिवार, १८ धडसेंबर १६८९ / १६ रतबउल-अव्वल ११०१ ला बादशाही सैन्य कोरेगावहून तवजापूरकडे जायला तनघाले . शुक्रवार, ३ जानेवारी १६९० / २ रतब-उस-सानी ११०१ ला या शहरात (तवजापूर) काही ददवस थांबण्यासाठी सैन्य आले . पंिरा ददवस काढल्यानंतर ९ फेब्रुवारी १६९० / १० जमाद-उल-अव्वल ११०१ ला ते बद्री गावी पोहोचले . बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान याने कृष्णेच्या काठी बादशाही तंबूसाठी चांगली जागा तनवडली. बादशाहाला ती आवडली व खानाला एक तहऱ्याची अंगठी ददली गेली. बादशाहा इथे दोन मतहने रातहला. एकदा बादशाहा न्यायसभेत असताना मीर तुझुक सलाबत खान याने एका माणसाला सादर केले जो म्हणाला क़ी, ‘मी बादशाहाचा लशष्य होण्यासाठी बंगालच्या दर दे शातून आलो आहे. माझी इच्छा पूणम होईल अशी माझी आशा आहे’. बादशाहाने हलकेच हास्य करत त्याच्या खखशातून १०० रुपये आणण सोने, चांदीचे काही तुकडे काढू न त्या माणसाला दे ण्यासाठी (खानाकडे) ददले व म्हणाला क़ी, ‘त्याला सांग क़ी माझ्याकडू न त्याची ही अपेक्षा आहे’. खानाने त्याला ते पैसे ददले पण त्याने ते फेकले व [३३४] नदीत उडी टाकली. तो बुडू नये म्हणून खानाने ओरडा केला, आदे शानुसार काही

लोकांनी पोहत त्याला नदीतून बाहेर काढले . जवळच्या लोकांकडे वळू न बादशाहा सरदार खानास म्हणाला, ‘एक माणूस बंगालहून माझा लशष्य होण्याची वेडी आशा घेऊन आला आहे – 1

मुघल प्रशासनात ‘सरकार’ हा एक प्रशासक़ीय तवभाग होता. सुभा, सरकार, महाल अशी ही व्यवस्था होती. इं.औ., अध्याय २, पृ. xxvi.

अध्याय ३३

९ जून १६८९ ते २८ मे १६९०

२७५

तुपी लें गे बावडी दें गे, गहरा नीलज, चुहा खदान मूल तू कल बांिे छज्जा याला धमया मुहम्मद नाफ़ी लसरकहिंदी याच्याकडे घेऊन जा व त्याला लशष्य बनवून त्याच्या डोक्यावर लसरकहिंदी टोपी घालायची तवनंती करा’. ईश्वर साक्षी आहे क़ी, राजाच्या मुखवट्या मागच्या दरवेशाचे दशमन घडवणारा, फक़ीरांचा उत्कषम करणारा व एखाद्या लशष्याला दीक्षा दे ऊन तवद्वान होण्यास मागमदशमन करू शकणारा, अशा पावन पदापयंत जो पोहोचला आहे असा, आजच्या काळात, या बादशाहा लशवाय एकही शेख ककिंवा फक़ीर नाही. पण त्याची सत्ता स्वगामपयंत असूनही त्याचा स्वभाव तवनयशील आहे. त्याच्याकडे श्रीमंती व थाटामाटाची सगळी सािने असूनही तो प्राथमनेला मान दे णारा आहे.

ٔ ‫شاه شهانم که درين سلطنتش‬ ِ ‫بنده‬ ‫خواجک و سن ِت درويشانست‬ ‫صورت‬ ِ ٔ बंदा-ए-शाह-ए-शहानम के दरीन सलतनतश सूरत-ए-ख्वाजगी व सीरत-ए-दरवेशानस्त मी त्या राजांच्या राजाचा सेवक आहे ज्याचे साम्राज्य बाहेरून कुबेरासारखे भासते पण अंतरंग दरवेशासारखे आहे शतनवार, १५ फेब्रुवारी १६९० / १६ जमाद-उल-अव्वल ११०१ ला वाकनतवसांच्या पत्रांवरून बादशाहाला कळले क़ी मुहम्मद बीदर बख्त याने सनसनीचा तकल्ला कातफरांकडू न घेतला आहे [३३५] व पराभूत झाले ल्या शत्रूला यमसदनी िाडले आहे. रतववार, १८ मे १६९० / १९ शाबान ११०१ ला बादशाही छावणी बद्रीहून गलगल्याला गेली. तवजापूरचा ददवाण अमानत खान याला हाजी शफ़ी खानाच्या जागी दफ्तर-इ-तान केले गेले तर त्याची जागा अबुल मुकरमम याने घेतली. ख्वाजा अब्दुर रहीम खान याला ददवंगत मुआतमाद खानाच्या जागी दाघ-ए-तशीहा हे पद ददले गेले. मुहम्मद आजम याच्यासाठी एक अंगरखा व लशरपेच पाठवला गेला तर बीदर बख्त याला एक अंगरखा, एक रत्नजधडत भाता, एक िनुष्य, एक घोडा, एक हत्ती, एक लशरपेच, एक प्रशस्तीचे फमामन व बहादुर ही उपािी ददली गेली. मुहम्मद मुअज्जम याला पाच मण गुलाबपाणी व दोन मण तबद-ए-धमश्कचा अकम ददला गेला. उद्वतससिंह याने त्याच्या घरून येऊन भेट घेतली व त्याला एक अंगरखा व राजा ही उपािी ददली गेली. खान जहान

अध्याय ३३

९ जून १६८९ ते २८ मे १६९०

२७६

बहादुर जफर जंग कोकलताश याला आलाहाबादचा सुभेदार व त्याचा मुलगा तहम्मत खान याला अविचा सुभेदार व गोरखपूरचा फौजदार नेमले गेले. अब्दुल्लाह खान याला सजावर खानाच्या जागी नांदेडचा फौजदार तर सरदार खानाला छावणी भोवतीच्या १२ कोस पररसराचा फौजदार नेमून त्याला ४०० ची वाढ ददली गेली. बादशाहाला कळले क़ी ग्वाल्हेरचा फौजदार व आजम खान कोकाह याचा मुलगा सफदर खान याने एका गढीवर आक्रमण केले व बंदुक़ीच्या गोळीने तो मरण पावला. शाहजादा [३३६] खुजजस्ता अख्तर याला तपलखान्याचा दरोगा हमीदुद्दीन खान याने औरंगाबादहून दरबारास आणले . शाहजाद्याने भेट घेतली व त्याला त्याच्या वधडलांबरोबर राहण्याचा आदे श ददला गेला. हमीदुद्दीन याने सुदृढ हत्ती सादर केल्याबद्दल त्याला ३० स्वारांची वाढ ददली गेली. बातमीदारांकडू न कळले क़ी रुस्तुम खान शारजा याला सातारा तकल्ल्याच्या आसपास टे हळणीसाठी तनयुक्त केले असता शत्रूने प्रदीघम युद्धानंतर त्याला व त्याचे कुटुं ब व मुलांना अटकेत ठे वले आहे.

अध्याय ३४

२९ मे १६९० ते १८ मे १६९१

२७७

अध्याय ३४ राजवटीचे चौतीसावे वषम – तहजरी ११०१-०२ २९ मे १६९० ते १८ मे १६९१ ख्वाजा खखदमतगार खान याला ख्वाजा खखदमत खानाच्या जागी रत्नशाळे चा नाजजर व दरोगा नेमले गेले व ख्वाजा खखदमत खान याला तनवृत्ती दे ऊन शाहजहानच्या थडग्याचा वली नेमले गेले. बादशाहाने सवम प्रांतप्रमुखांना [३३७] आदे श ददला क़ी खानाला तनयमीतपणे २००० रुपये पाठवण्यात यावेत. लु त्फुल्लाह खानाला खटावच्या ठाण्याला पाठवण्यात आले . शेख अबुल मुकारम याला बुडापाचगावचा ठाणेदार नेमले गेले. रूमच्या कैझरचा दत अहमद आका, बुखाऱ्याच्या राजाचा दत नजर बे व काश्गरच्या राजाचा दत अब्दुर रहीम बेग यांनी भेट घेतली व त्यांच्या राजांची पत्रे व भेटवस्तू सादर केल्या. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रथम भेटीत, त्यांच्या वास्तव्यात व तनरोपाच्या वेळी अनेक प्रकारच्या भेटवस्तू, अंगरखे, रत्ने, घोडे, हत्ती व थोडी रोख रक्कम ददली गेली. या राजांनी मैत्रीपोटी ददले ल्या भेटवस्तुंच्या बदल्यात त्यांना काही दुर्मिंळ वस्तु, कहिंदुस्थानात तवणले ल्या गोष्टी, रत्ने तसेच इतर अनेक मौल्यवान वस्तु पाठवल्या गेल्या. हमीदुद्दीन खानाला मुहम्मद आजम शाहकडे खजजना घेऊन जाण्याचा आदे श दे ण्यात आला. मीर नूरुद्दीन याला मुतमजाबाद धमरजचा तकल्ले दार नेमले गेले. जान तनसार खानाला एक अंगरखा व हत्ती दे ऊन शत्रूला परास्त करण्यासाठी पाठवले गेले. अमानत खानाचा मुलगा ददयानत खान याला मुसावी खानाच्या जागी दख्खनच्या सुभ्यांचा ददवाण नेमले गेले. ददवंगत खान हा शुद्ध इराणी वंशाचा होता. त्याचे उदात्त व्यलक्तमत्व, तवद्वान व कलाकारांना आश्रय दे णे, [३३८] वैचाररक शाखेतील ज्ञान तसेच काव्यावर असले ली हातोटी यामुळे तो इतरांपेक्षा तनराळा होता. तो शाह नवाज खानाचा जावई होता व त्यामुळे लग्नाच्या बाबतीत बादशाहाला ज्येष्ठ होता.

आिद खान कृष्णेच्या पलीकडे जातो बुिवार, १२ नोव्हेंबर १६९० / १९ सफर ११०२ ला आदे शानुसार उम्दत-उलमुल्क आसद खान याने शत्रूला िडा लशकवण्यासाठी कृष्णेच्या पलीकडे चाल केली. त्याला तहऱ्याच्या कोंदणात कुराण असले ले कडे, एक तवशेष अंगरखा व ५०० मोहरा ककिंमतीचा एक घोडा ददला गेला. त्याच्या प्रमुख सहकाऱ्यांना अंगरखे, रत्ने, तलवारी,

अध्याय ३४

२९ मे १६९० ते १८ मे १६९१

२७८

घोडे व हत्ती ददले गेले तर इतरांना त्यांच्या पदाप्रमाणे अंगरखे ददले गेले. जानमाजखान्याचा दरोगा मुल्तफत खान याला ख्वाजा हयात खान वफा याच्या जागी आबदार-खान्याचा प्रमुख (बादशाहाच्या जवळचे पद) हा अततररक्त पदभार ददला गेला. मुहम्मद मुनीम याला त्याच्या जागी सात चौक़ीचा मुनीम नेमले गेले. सोमवार, २३ फेब्रुवारी १६९१ / ४ जमाद-उस-सानी ११०२ ला बादशाहा गलगल्याहून, म्हणजे नवीन नावाप्रमाणे कुत्बाबादहून तनघून तवजापूरच्या रसूलपूर दरवाज्यासमोर उतरला. शतनवार, ११ एतप्रल १६९१ / २२ रज्जब ११०२ ला खान जहान बहादुर याला आललजाहच्या जागी पंजाबचा नाजजम नेमले गेले. त्याच्या जागी त्याचा मुलगा तहम्मत खान याला आलाहाबादचा सुभेदार नेमले गेले. [३३९] सोमवार, १८ मे १६९१ / २९ शाबान ११०२ ला शत्रूला िडा लशकवण्यासाठी गेलेल्या बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान याने भेट घेतली. त्याला पाच सदीची वाढ दे ऊन आता तो साडेतीन हजारी (२००० स्वार) झाला. शत्रूला िडा लशकवण्यासाठी मुख्तार खानाला पाठवले गेले. त्याचा एक सहाय्यक मुफ्तखर खान याला सोलापूरला जाऊन शेख-उल-इस्लाम याला आदे शानुसार दरबारास घेऊन यायला सांतगतले गेले.

अध्याय ३५

१९ मे १६९१ ते ६ मे १६९२

२७९

अध्याय ३५ राजवटीचे पसतीसावे वषम – तहजरी ११०२-०३ १९ मे १६९१ ते ६ मे १६९२ बुिवार, २७ मे १६९१ / ९ रमजान ११०२ ला मुहम्मद काम बक्ष याला जजिंजीच्या प्रदे शातील बंडखोरांना परास्त करायला तसेच शत्रूला ततथून बाहेर काढायला पाठवले गेले. त्याला पाच हजारीची वाढ दे ऊन वीस हजारी (१५ हजार स्वार) ददली गेली. [३४०] त्याला लशरपेच असले ला अध्याम बायांचा अंगरखा1, रत्नजधडत खंजीर, तलवार,

ढाल, कलगी, माणणक जडवले ली दौत2, सोने व मुलाम्याचा साज असले ले वीस घोडे, चांदीचा साज असले ला एक घोडा व दोन लक्ष रुपये रोख ददले गेले. त्याच्या सहकाऱ्यांपैक़ी बक्षी-उल-मुल्क व इतर सरदार, कारकून यांना रत्ने, अंगरखे, घोडे व हत्ती ददले गेले. इस्लामगडचा (गोंडवनातील दे वगड) जमीनदार दीनदार याला एक हजारी (तततकेच स्वार), एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती व राजा ही उपािी दे ऊन घरी परतण्याची अनुमती ददली गेली. मथुरेचा फौजदार राजा तबशनससिंह याच्या कडू न सोन्याची तकल्ली असले ले पत्र धमळाले . त्यातून कळले क़ी २१ मे १६९१ / ३ रमजान ११०२ ला सोघारची गढी कातफरांकडू न जजिंकून घेतली व भांबावले ला शत्रू चारही ददशांना पळू न गेला. शुक्रवार, १९ जून १६९१ / २ शव्वाल ११०२ ला हमीदुद्दीन खानाला रत्नजधडत जजघा दे ऊन शत्रूला परास्त करण्यासाठी सख्खरच्या ददशेला पाठवले गेले. मीर आततश मुख्तार खान याला एक अंगरखा व एक हत्ती दे ऊन रायबाग व हुक्केरी जवळील बंडखोरांना िडा लशकवायला पाठवले गेले. गाजजउद्दीन खान बहादुर तफरोज जंग व त्याचा मुलगा चीन

1

इंग्रजी अनुवादात इथे ‘a robe, a sarpech and half-sleeves’ असे ददले आहे पण फासी ‫ز‬ पाठात (‫آستت‬ ‫ )خلعت با سپيچ و نيمه‬खखलत बा लशरपेच व तनमा आस्तीन म्हणजे ‘लशरपेच व अध्याम बाया असले ला अंगरखा’ असे ददले आहे. खखलअत ककिंवा अंगरख्याचे अनेक प्रकार

2

होते ज्यात अंगरख्याबरोबर इतर छोट्या वस्तु ददल्या जायच्या (मु.प्र., अध्याय १ , पृष्ठ १०). इंग्रजी अनुवादात इथे ‘inkpot and manik’ असे म्हटले आहे पण फासी पाठात ( ‫دوات و‬

ّ ‫مرصع‬ ‫‘ )مانک‬दवात व माणणक मुरस्सआ’ असे आहे, म्हणजे माणणक जडवले ली दौत. ‘मुरस्सआ’ म्हणजे जडवले ला ककिंवा बसवले ला (स्टा. १२१५).

अध्याय ३५

१९ मे १६९१ ते ६ मे १६९२

२८०

कललच खान यांना हत्तीणी दे ऊन सन्मातनत केले गेले. लु त्फुल्लाह खानाला सलाबत खानाच्या जागी खास चौक़ीचा दरोगा नेमले गेले. मुखललस खान कुरबेगी, रुहुल्लाह खानाचा मुलगा खानाहजाद खान [३४१] व जानतनसार खान यांना प्रत्येक़ी दोन हजारी (७०० स्वार) ददली गेली. सलाबत खानाला अडीच हजारी (१२०० स्वार), सय्यद सैफ खान नूर-उल-दहार याला दीड हजारी (७०० स्वार), मुहम्मद यार खानाला दीड हजारी (४०० स्वार) व खखदमतगार खानाला एक हजारी (२०० स्वार) ददली गेली. लु त्फुल्लाह खानाच्या हातून काहीतरी आगळीक झाल्यामुळे त्याची अडीच हजारी (१००० स्वार) काढू न घेण्यात आली.

पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम यािी िुटका आिी बादशाहा रागावला होता तेव्हा त्याने पादशाहजादा व त्याच्या मुलांना केस कापायची सुद्धा अनुमती ददली नव्हती. सहा मतहने असेच गेले. शाहजहानचा नायब खखदमत खान नाजजर याने अनेक वषम सेवा केली असल्याने तो थोडा िीटाई ने बादशाहाशी बोलू शकत असे. त्याने या बाबतीत लशलथलता बाळगण्यासाठी बादशाहाकडे लावून िरले . त्यावेळी पादशाहजाद्याला (लशक्षा करून) सुयोग्य मागामवर आणले पातहजे असा बादशाहाने आदे श ददला. काही ददवसांनंतर त्याच्या रागाचा पारा थोडा तनवळल्यावर व त्याची स्वाभातवक मृदुता परतल्यावर मुहातफज सरदार खानाकडे कुराणातील कवने दे ऊन आदे श ददला गेला क़ी, ‘अटकेत असले ला पादशाहजादा दुसरा युसुफ व युनुस यांना हे नेऊन दे . त्यांना या कवनांचा पाठ करायला सांगा, म्हणजे ईश्वरी दयेने कदाधचत माझे हृदय पररवतमन होऊन त्याची सुटका होईल [३४२] व माझ्या पासून दर रातहल्यामुळे त्याला होणाऱ्या यातनांतून त्याला मुक्त़ी धमळे ल’. या मौललक तविानात एक सुंदर कल्पना दडली होती त्यामुळे उपयुमक्त खान बादशाहास म्हणाला क़ी, ‘त्याची सुटका करणे हे बादशाहाच्या तनणमयावर अवलं बून आहे’. बादशाहा उत्तरला क़ी, ‘हो, पण कोणावरही अत्याचार होत असेल तेव्हा न्याय धमळण्याची आशेने तो माझ्याकडे येऊन अचमना करेल यासाठी सवामत तववेक़ी अशा त्या राजांच्या राजाने (ईश्वराने) मला पृथवीपती केले आहे. काही ऐतहक कारणास्तव मी त्याच्यावर तनबंि घातले आहेत. पण त्याची सुटका करण्याची वेळ अजून आले ली नाही. ईश्वराच्या दरबारा लशवाय त्याला दुसरे कोणतेही आश्रय स्थान नाही. त्याचा माझ्यावर असले ला तवश्वास अबाधित राहायला पातहजे कारण माझ्याकडे यायचे सोडू न जर तो ईश्वराकडे गेला तर मग मी कोणाकडे

अध्याय ३५

१९ मे १६९१ ते ६ मे १६९२

२८१

जाऊ ?’ हा पादशाहजादा एक ददवशी बादशाहा होणार हे तविी ललखखत असल्यामुळे तो या तववंचनेतून व दु:खातून सोन्याप्रमाणे उजळू न बाहेर पडेल असे बादशाहाला हृदयातून वाटत होते. एखादी माशीही त्या व्यलथत मनोरुग्णाला त्रास दे णार नाही याची सवम प्रकारे काळजी घेऊन यथायोग्य व सुतनयोजजत पद्धतीने तो त्याचे दु:ख तनवारण करू लागला. **** बादशाहाने बद्रीहून कूच केले त्या ददवशी त्याने उपयुमक्त मुहातफजला [३४३] आदे श ददला क़ी जेव्हा बादशाहा त्याच्या छावणीतून बाहेर जाईल तेव्हा छावणी तशीच ठे ऊन ततथले गाललचे व इतर गोष्टी बदलू नयेत. पादशाहजाद्याला त्याच्या तंबूतून इथे आणून सवम जागा दाखवून थोडा वेळ सगळीकडे बसवावे म्हणजे त्यायोगे त्याच्या इंदद्रयांत व हाता पायांत चैतन्य तनमामण होऊन बदल घडू न येईल. हे केले गेले. पादशाहजादा मुहातफजला म्हणाला क़ी, ‘मी (बादशाहाची) भेट घेऊ इब्च्छतो. भेटीची तहान घराच्या फेरफटक्याने कशी भागेल ?’ त्याच्या आईच्या, नवाब बाईच्या तनिनाची वाताम ददल्लीहून येईपयंत हे असे चालले होते. त्याच्या तंबू पासून ते ददवान-ए-खास पयंत झाकले ली वाट तयार केली गेली. बादशाहा व झीनतुस्त्न्नसा बेगम यांनी त्याच्याकडे जाऊन त्याचे सांत्वन केले . यानंतर सोमवार, २० जुलै १६९१ / ४ जजल्कदा ११०२ ला त्याला बादशाहाच्या भेटीची अनुमती धमळाली. त्याला बादशाहा सोबत झुह्रचा नमाज करायचा तसेच राजवाड्यातील मलशदीत शुक्रवारचा नमाज व बादशाहा जेव्हा शुक्रवारच्या नमाजासाठी जामा मलशदीत जाईल तेव्हा त्याच्या सोबत जाण्याचा आदे श ददला गेला. तसेच किीकिी आदे शानुसार त्याला स्नान करण्यासाठी तकल्ल्यातील न्हाणीगृहात जाण्याची व किीतरी बागेत तसेच बादशाहाने बांिन ू घेतले ल्या शाहबाद तलावाकडे जाण्याची अनुमती धमळाली. थोडक्यात (अटकेचा) पडदा हळू हळू दर सारला गेला. ख्वाजा दौलत महल्ली याला पादशाहजाद्याच्या कुटुं बाला ददल्लीहून दरबारास आणायचा आदे श ददला गेला. [३४४] मुहम्मद मुईझुद्दीन व मुहम्मद आजीम यांना प्रत्येक़ी ९ हजारी (२००० स्वार), मुहम्मद रफ़ी-उल-कद्र याला सात हजारी (१००० स्वार) व मुहम्मद खुजजस्ता अख्तर याला एक अंगरखा ददला गेला. या सन्मानाबद्दल त्यांनी ददवानए-आम मध्ये बादशाहाला अणभवादन केले . हमीदुद्दीन खानाला एक हत्ती व एक अंगरखा धमळाला. सोमवार, २० जुलै १६९१ / ४ जजल्कदा ११०२ ला बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह

अध्याय ३५

१९ मे १६९१ ते ६ मे १६९२

२८२

खानाला नुस्रताबाद सागरला पाठवले गेले, त्याच्या सहकाऱ्यांचा सन्मान केला गेला. सलाबत खानाचा मुलगा तहव्वर खान याला काम बक्षच्या सैन्याचा सजावल नेमले गेले. तो आठ सदी (३०० स्वार) होता, त्याला एक सदीची (५० स्वार) वाढ ददली गेली. लु त्फुल्लाह खानाला पदच्युत केल्यानंतर पुन्हा पदावर नेमण्यात आले . सफलशकन खानाने मुहम्मद मुअज्जम याचा जनानखाना व त्यातील सेवक यांना ददल्लीहून औरंगाबादला आणले . बातमी आली क़ी रतववार, ४ ऑक्टोबर १६९१ / २१ मुहरमम ११०३ ला उम्दत-उल-मुल्क आसद खानाने कडप्पा येथे काम बक्षची भेट घेतली व बुिवार, १६ धडसेंबर १६९१ / ५ रतब-उस-सानी ११०३ ला ते जजिंजीला पोहोचले . शुक्रवार, १८ धडसेंबर १६९१ / ७ रतब-उस-सानी ११०३ ला एका वेड्याने जामा मलशदीत तलवार घेऊन बादशाहाच्या ददशेने िाव घेतली. अंगरक्षकाने त्याला अटक केली. त्याला सलाबत खानाकडे ददले गेले. गुरूवार, २४ धडसेंबर १६९१ / १३ रतब-उससानी ११०३ ला बादशाहा लशकारीसाठी दौडत होता तेव्हा मुहम्मद आजम व बीदर बख्त यांनी भेट घेतली. पूणम प्रवासात ते त्याच्या सोबत होते [३४५] व ततथे पोहोचल्यावर ते नुस्रताबाद सागरकडे जाण्यास तनघाले . बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान हा आदे शानुसार काम बक्षच्या सैन्यातून दरबारास आला होता. गुरूवार, ३१ धडसेंबर १६९१ / २० रतबउस-सानी ११०३ ला तो बादशाहास भेटला. शतनवार, १६ जानेवारी १६९२ / ७ जमादउल-अव्वल ११०३ ला तत्रनोमलीचा तकल्ला घेतल्याबद्दल झुब्ल्फकार खान बहादुर याला वाढ दे ऊन चार हजारी (२५०० स्वार) ददली गेली. मंगळवार, २६ एतप्रल १६९२ / १९ शाबान ११०३ ला शाहजादा मुईझुद्दीनची मुले अझ्झुद्दीन व इझ्झुद्दीन सुलतान तसेच मुहम्मद अजीमची मुले मुहम्मद करीम व फरुम ख लसयार यांनी भेट घेतली व त्यांना त्यांच्या भत्त्यात वाढ, अंगरखे, रत्ने दे ऊन त्यांचा सन्मान केला गेला. मंगळवार, ३ मे १६९२ / २६ शाबान ११०३ ला बादशाहा तवजापूरहून तनघाला व दुसऱ्यांदा कुत्बाबादाला थांबला. इथे राहात असताना तो रोजचा नमाज, शुक्रवारचा नमाज व ईदचा नमाज करायला शहरात जात असे. खालशाचा दफ्तरदार रशीद खान याला हैदराबादच्या काही खालसा महालांचे उत्पन्न मोजायला व गोळा करायला नेमले गेले. बादशाहाचा आवडता लशष्य, खान-इ-सामानच्या कचेरीचा वाकनतवस व आयमाचा मुस्तौफ़ी, इनायतुल्लाह याला खान ही उपािी व एक सदीची वाढ दे ऊन आठ सदी (६० स्वार) केले गेले व त्याला खानाचा सहाय्यक नेमले गेले. [३४६] बादशाहाचा एक जुना

अध्याय ३५

१९ मे १६९१ ते ६ मे १६९२

२८३

तवश्वासू व घरातला दास सरदार खान मरण पावला. बादशाहाचे भले चचिंतणे व लोकांची सेवा करणे या उदद्दष्टांशी तो पूणमपणे एकतनष्ठ होता. फक़ीरांवर त्याचे तवशेष प्रेम होते. त्याचा मुलगा हमीदुद्दीन खान हा बादशाहाशी तनष्ठावंत राहून त्याच्या कृपेला पात्र ठरल्यामुळे त्याच्या वधडलांच्या पश्चात कोतवाली वगैरे पदे त्याला ददली गेली. ददवसातील पाच नमाजांसाठी ददवान-ए-खासच्या जवळ बांिल्या जाणाऱ्या मलशदीला बादशाहाने भेट ददली व त्याचे तनयधमत िार्मिंक कमम पार पाडू न, अध्यास्त्मक प्रगतीसाठी स्वतःच्या हातानी काही दगड लावले .

अध्याय ३६

७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३

२८४

अध्याय ३६ राजवटीचे छत्तीसावे वषम – तहजरी ११०३-०४ ७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३ * * * * रतववार, ८ मे १६९२ / २ रमजान ११०३ ला मुहम्मद मुईझुद्दीनला आसदनगर (अकलू ज) जवळ आले ल्या शत्रूला िडा लशकवण्यासाठी पाठवले गेले. त्याला बालाबंद व लशरपेचासतहत एक अंगरखा, २१ घोडे, एक हत्ती व एक हजारीची (तततकेच स्वार) वाढ दे ऊन दहा हजारी (३००० स्वार) ददली गेली. [३४७] शाहजादा रफ़ी-उल-कद्र याला एक हजार जात वाढ दे ऊन आठ हजारी (१००० स्वार) ददली गेली. मुहम्मद खुजजस्ता अख्तर याला त्याची पतहली मनसब धमळाली, सात हजार जात. अमानत खान याला मामूर खानाच्या जागी औरंगाबादचा प्रमुख अधिकारी नेमले गेले व मामूर खानाला बीरचा फौजदार नेमले गेले. अमानत खानाकडे दीड हजारी (६०० स्वार) होती व त्याला ३०० स्वारांची वाढ धमळाली तर मामूर खानाकडे दीड हजारी (४०० स्वार) होती त्याला ४०० स्वारांची वाढ धमळाली. ददवंगत सय्यद मुतमजाचा मुलगा मुहाधमद खान, ज्याला पूवी हमीद खान म्हणायचे तो आता धमवातचा फौजदार झाला व त्याला ५०० स्वारांची वाढ दे ऊन तीन हजारी (२५०० स्वार) धमळाली. हैदराबादचा अब्दुर रज्जाक खान लारी याला कोकण व रायरी प्रदे शाचा फौजदार नेमून १००० स्वारांची वाढ दे ऊन चार हजारी (४००० स्वार), एक घोडा, एक हत्ती व नगारे ददले गेले.

शाहजादा मुहम्मद अजीमुद्दीन यािा त्रववाह रतववार, २६ जून १६९२ / २१ शव्वाल ११०३ ला मुहम्मद अजीमुद्दीन याचा तववाह खलीलु ल्लाह खानाचा मुलगा रुहुल्लाह खान याच्या मुलीशी झाला. नवरदे वाला १७००० रुपयांचा लशरपेच, ८००० रुपयांचा बाजूबंद, रत्नजधडत साजाचा घोडा, एक हत्ती व १००० जात वाढ दे ऊन दहा हजारी (२००० स्वार) ददली गेली. कुत्ब-उल-आलम [३४८] व शाह आलम यांच्या थडग्यांचे उत्तराधिकारी सय्यद मुहम्मद व सय्यद मुहम्मद

जाफर गुजराती हे दोघे अहमदाबादहून भेट घेण्यासाठी आले . रीती प्रमाणे, तनरोप दे ताना त्यांना एक अंगरखा, एक हत्ती व ठरातवक मदतीची रक्कम ददली गेली. मंगळवार, ५ जुलै १६९२ / १ जजल्कदा ११०३ ला खान जहान बहादुर जफर जंग याचा मुलगा व

अध्याय ३६

७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३

२८५

आलाहाबादचा सुभेदार तहम्मत खान याला दरबारास येण्याचा आदे श ददला गेला. तबहारचा सुभेदार अमीर-उल-उमरा याचा मुलगा बुजुगम उम्मेद खान याने आलाहाबादला त्याची जागा घेतली व अमीर-उल-उमराचा दुसरा मुलगा मुजफ्फर खान याला त्याच्या जागी जौनपूरचा सुभद े ार नेमले गेले. रुहुल्लाह खान वारला. तो सूयमवश ं ी असल्यासारखा (तेजपुंज) होता. त्याने सवम काही धमळवले होते, लशष्टाचारात तो सवोत्तम होता व सवम लोकांना अगदी मनापासून मदत करायचा. बादशाहाच्या मावशीच्या मुलाचा मुलगा असल्याने व बहुगुणी असल्यामुळे त्याच्या जाण्याने बादशाहाला फार दुःख झाले . ईश्वर त्याला क्षमा करो. त्याच्या शेवटच्या क्षणांत बादशाहा त्याच्याकडे गेला व त्याच्या वतीने ईश्वराकडे क्षमा मातगतली. या एका गोष्टीमुळे त्याला बहुतेक तरी क्षमा धमळे ल. त्याच्या मृत्यू समयी तो हे म्हणाला – हा (तुमचा) सेवक तकती गवामने या जगाचा तनरोप घेत आहे [३४९] क़ी त्याच्या अंत समयी तुम्ही त्याच्यापाशी आला आहात ! त्याचा सक्षम व लाडका मुलगा खानाहजाद खान याला ५०० (३०० स्वार) वाढ दे ऊन दोन हजारी (१००० स्वार) ददली गेली व मुखललस खानाच्या जागी त्याला कुरबेगी नेमले गेले. बहरामंद खानाला ददवंगत रुहुल्लाह खानाच्या जागी मीर बक्षी नेमले व त्याला ५०० (तततकेच स्वार) ची वाढ दे ऊन चार हजारी (२००० स्वार) ददली गेली. मुखललस खानाला त्याच्या जागी दुसरा बक्षी म्हणून नेमले व त्याला ५०० जात वाढ दे ऊन अडीच हजारी (७०० स्वार) ददली गेली. ददवंगत रुहुल्लाह खानाचा भाऊ अजीजुल्लाह खान याला दीड हजारी (६०० स्वार) ददली गेली. ख्वाजा अब्दुर रहीम खान वारला. मीर हुसैन अमानत खान याला त्याच्या जागी बयुतात नेमले गेले. इनायतुल्लाह खानाला त्याच्या जागी ददवाण-इ-तान नेमून १०० (२० स्वार) वाढ दे ऊन सात सदी (८० स्वार) धमळाली. सफम-इ-खासची ददवाणीही त्याला ददली गेली व आणखी वीस स्वारांची वाढ ददली गेली. गंभीर आजारामुळे सलाबत खानाने ददल्लीला जायची अनुमती मातगतली पण काही पडाव पुढे गेल्यावर वाटे तच वारला. त्यावेळी तो अनेकदा हे म्हणायचा – मी स्वतःच येऊन थडग्याच्या कोपऱ्यात तवसावलो आहे, क़ी कुणाच्या खांद्यावर या हाडांचा भार पडू नये

अध्याय ३६

७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३

२८६

[३५०] तो व्यवहारात अततशय प्रमाणणक आणण कुशल होता तसेच वररष्ठांना

पटकन प्रसन्न करण्यात तनपुण होता. बाल्खचा मुहम्मद बादी याला पदच्युत केले होते, आता त्याला परत तीन हजारी (७०० स्वार) ददली गेली. शुक्रवार, २२ जुलै १६९२ / १८ जजल्कदा ११०३ ला बादशाहाने आदे श ददला क़ी मुहम्मद मुअज्जमने न्यायसभेत येऊन भेट घ्यावी व खाली वाकून जधमनीचा मुका घ्यावा (अणभवादन करावे). शुक्रवार, २ सप्टें बर १६९२ / १ मुहरमम ११०४ ला खखदमतगार खान नाजजर याला ५०० (१५० स्वार) वाढ धमळाली. मुहम्मद यार खानाला ५०० ची वाढ दे ऊन दोन हजारी (४०० स्वार) ददली गेली. काम बक्षच्या सैन्यातील काकर खान याला जजिंजीचा ठाणेदार नेमून ५०० (३०० स्वार) ची वाढ दे ऊन दीड हजारी (७०० स्वार) ददली गेली. गुजमबदामरांचा मुश्रीफ मीर हुसैन याला मुहम्मद मुईझुद्दीन याच्या जनानखान्यातील मतहला सेवकांना दरबारास आणण्यासाठी ददल्लीला पाठवले गेले. हद्रामौतच्या राजाचा दत मुहम्मद जमील याला एक अंगरखा व २००० रुपये दे ऊन तनरोप ददला गेला. सोमवार, २४ ऑक्टोबर १६९२ / २३ सफर ११०४ ला रफ़ी-उल-कद्र व खुजजस्ता अख्तर यांना झुह्रच्या नमाजासाठी त्याच्या वधडलांबरोबर मलशदीत येण्याचा आदे श ददला गेला. लत्फुल्लाह खान व असालत खान यांना आसदनगरच्या ठाण्यास पाठवले गेले. रफ़ी-उल-कद्रच्या मनसबीतून २००० स्वार कमी केले होते ते पुन्हा ददले गेले. ख्वाजा मुबारक याला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्या प्रशासनात नाजजर पदावर खखदमतगार खानाचा नायब नेमण्यात आले . तफरोज जंग खानाच्या सैन्यातील ओछामचा जमीनदार राजा उद्वतससिंह याला इररजचा फौजदार [३५१] नेमून ५०० (तततकेच स्वार) वाढ दे ऊन दोन हजारी (१५०० स्वार) ददली गेली. फरामशखान्याचा मुश्रीफ अब्दुल हाय याने बादशाहाला कळवले क़ी त्याच्या आदे शाप्रमाणे पादशाहजाद्याची छावणी उत्तम प्रकारे सुशोणभत केली आहे. बादशाहाने खखदमतगार खान व इतर सेवकांना आदे श ददला गेला क़ी पादशाहजाद्याच्या धमरवणूक़ीत साधमल होऊन त्याला या छावणीपयंत पोहोचवावे. बुिवार, ३० नोव्हेंबर १६९२ / १ रतबउस-सानी ११०४ ला कहिंदौन बयानाचा फौजदार कमालु द्दीन खान याला त्याच्या क्षेत्रातील बंडखोरांना संपवल्याबद्दल ५०० (तततकेच स्वार) वाढ दे ऊन दोन हजारी (१००० स्वार) ददली गेली. ददवंगत अमीर-उल-उमरा1 याचा मुलगा इततकाद खान याला आग्रा व

1

अमीर-उल-उमरा शातहस्ता खान एतप्रल १६९४ मध्ये वारला, फासी पाठ पृष्ट ३६८.

अध्याय ३६

७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३

२८७

पररसराचा फौजदार नेमले गेले व त्याला २०० स्वारांची वाढ दे ऊन दीड हजारी (१२०० स्वार) ददली गेली. झुब्ल्फकार खान बहादुर याला चार हजारी (३००० स्वार) ददली गेली. ददवंगत अमीर-उल-उमरा याचा मुलगा खुदाबंदा खान याला बहराईच चा फौजदार नेमले गेले. तो नऊ सदी (४०० स्वार) होता त्याला एक सदीची वाढ ददली गेली. अबुल मुहम्मद खान तबजापुरी हा तीन हजारी (१००० स्वार) होता त्याला ५०० स्वारांची वाढ ददली गेली. मुख्तार खानाकडे तीन हजारी (१५०० स्वार) होती व त्याच्या कडू न काढू न घेतले ली ५०० (१०० स्वार) त्याला परत केली गेली. हमीदुद्दीन खानाने हत्तींची उत्तम प्रकारे काळजी घेतली होती असे परीक्षणात लक्षात आल्यामुळे त्याच्या हजारी (६०० स्वार) मध्ये २०० स्वारांची वाढ ददली गेली. शतनवार, ११ फेब्रुवारी १६९३1 / १५ जमाद-उस-सानी ११०४ ला शाहजादा मुहम्मद अजीम याला ६० कापडाचे थान, अंगरखे, लशरपेच, फुताह, तनमआस्तीन व [३५२] बालाबंद ददले गेले. खवासींचा दरोगा व हक़ीम अलीमुद्दीनचा मुलगा अन्वर खान याला शाहजहानच्या काळात वजीर खान ही उपािी होती. तो वारला तेव्हा त्याच्या मागे कोणी वारस नव्हता. शतनवार, ११ माचम १६९३2 / १४ रज्जब ११०४ ला आबदारखान्याचा दरोगा मुल्तफत खान याला ददवंगत व्यक्त़ीच्या जागी वरील पद ददले गेले व त्याला एक सदीची (५० स्वार) वाढ दे ऊन हजारी (१५० स्वार) ददली गेली. या पदामुळे त्याला बादशाहाच्या जवळची नेमणूक धमळाली. बादशाहाला हेरांच्या पत्रांवरून कळले क़ी िान्याचा तुटवडा तनमामण झाल्यामुळे जुब्ल्फकार खान बहादुर याच्या सैन्याला मोचे लावून िरणे जड जात होते. त्यामुळे जजिंजीचे मोचे सोडू न तो बारा कोस मागे आला होता. याच्या काही ददवस आिी धमळाले ल्या पत्रांतून असे कळले होते क़ी जजिंजीला जुब्ल्फकार खानाच्या सैन्याला शत्रूने घेरून त्याची रसद तोडली होती त्यामुळे त्याच्यापयंत काही कुमक पोहोचली तर त्याला मदत होणार होती. उम्दत-उल-मुल्क आसद खान याला त्याच्या मुलाच्या मदतीसाठी जाण्याचा तातडीचा आदे श ददला गेला. त्याने जाण्यास तवलं ब केल्याने बादशाहाने दरबार

1

इंग्रजी अनुवादात १५ जमाद-उस-सानी व १२ जानेवारी १६९३ म्हटले आहे. पण तप.जं. नुसार १५ जमाद-उस-सानीला ११ फेब्रुवारी १६९३ येते व १५ जमाद-उल-अव्वलला १२ जानेवारी १६९३ आहे. फासी पाठात ही १५ जमाद-उल-आखखर (सानी) आहे. यावरून, इंग्रजी अनुवादात चुकून जमाद-उस-सानीच्या ऐवजी जमाद-उल-अव्वलचा ददनांक ददला असावा असे वाटते.

2

इंग्रजी अनुवादात इथे १ माचम ददले आहे पण तप.जं. नुसार शतनवार, ११ माचम आहे.

अध्याय ३६

७ मे १६९२ ते २५ एतप्रल १६९३

२८८

भरला असतानाच स्वतःच्या हाताने आणखी एक फमामन ललतहले . मी स्वतः ततथे उपब्स्थत असताना बादशाहा मीर मुनशी फजैल खान याला म्हणाला क़ी, ‘आसद खान दाखवतो क़ी तो त्याच्या मुलाला भेटायला उत्सुक आहे. पण आता संकटकाळी तो ततथे जायला उशीर करून दुलम क्ष करत आहे. त्याने असेच म्हणावे क़ी – अरे मृत्यूच्या प्रेतषता, मी जड नाही, केवळ एक दुदै वी म्हातारा माणूस आहे [३५३] बढाया मारणे सोपे आहे पण त्या खऱ्या करून दाखवणे अवघड’. ततथे

जाण्यापूवी उम्दत-उल-मुल्क त्याच्या गोटात असे उघडपणे म्हणत होता क़ी, ‘बादशाहाने मला अजून काही काम ददले नाही. मला जर त्याने काही काम ददले तर एक तुकम काय करू शकतो ते त्याला ददसेल’. त्याचे हे उद्गार बादशाहापयंत पोहोचले होते. बादशाहा आता उपयुमक्त फजैल खान व ग्रंथालयाचा दरोगा कातबल खान यांच्याकडे वळू न म्हणाला क़ी, ‘त्याची तुकी संपली. ती काय म्हण आहे ... ?’ त्याप्रमाणे दोघांनी लगेच सांतगतले –

‫ترگ تمام شد‬ ٔ ‫ديگر بخود مناز که‬ दीगर बाखुद मनाज के तुकी तमाम शुद पुन्हा वल्गना करू नका, तुमच्या ‘तुकीत’ आता काही दम उरले ला नाही ही ओळ फमामनात ललतहली गेली.

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२८९

अध्याय ३७ राजवटीचे सदततसावे वषम – तहजरी ११०४-०५ २६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४ * * * * मुसलमानांसाठी आनंददायी अशा रमजानच्या आगमनाने उपासाच्या बागेत ईदची कळी फुलली व कातफरांनी केले ल्या अत्याचारांचे व जखमांचे काटे व काटे री झुडुपे फुलांच्या ताटव्यांमिून पार उडू न गेले. * * * * पादशाहजादा आजम शाह याला जलोदर झाला होता म्हणून त्याचा प्रवास सुखकर आणण सुरणक्षत करण्यासाठी बादशाहाने त्याच्यासाठी एक मुलाम्याची पालखी [३५४] पाठवली. बादशाहाने आदे श ददला क़ी त्याने नेमून ददल्यालशवाय इतर कोणीही

गुलालबाडीत पालखीतून येता कामा नये. आजवर फक्त उम्दत-उल-मुल्क आसद खान व खाजगी सेवक मुल्तफत खान यांनाच पालखीची अनुमती ददली होती. तबदनूरच्या राणीच्या दताने ततचे पत्र व ३०० होन नजराणा सादर केला.

काम बक्ष िे दुखद वतवन **** हैदराबादी कनामटकाच्या सीमेवर असले ल्या कडप्पा जजल्यातील नांददयाल तकल्ला उम्दत-उल-मुल्क याने घेतल्यावर त्याने ततथे छावणी टाकली होती. पादशाहजाद्याला दरबारातून बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान [३५५] याच्या सोबत वागीनगेरा तकल्ला घेण्यासाठी पाठवले गेले होते. जेव्हा बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान याला या कामावर नेमले गेले तेव्हा पादशाहजादा आदे शानुसार उम्दत-उल-मुल्कची कुमक करण्यासाठी गेला. तो कडप्प्याला पोहोचला तेव्हा जजिंजीला वेढा घालू न बसले ल्या व शत्रूच्या कचाट्यात सापडल्यामुळे रसद धमळवू न शकले ल्या जुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग याची मदत करायला जायचा आदे श त्याला व उम्दत-उल-मुल्क याला धमळाला. पादशाहजाद्याने तारुण्याच्या जोशात, खुशमस्करी करणाऱ्या लोकांच्या नादी लागून तसेच दरदृष्टी असले ल्या अनुभवी लोकांचे न ऐकता सगळा प्रवास मजल दर मजल घोड्यावरूनच केला. त्यात मिेच लशकार करणे ककिंवा (प्रलसद्ध) दठकाणांना भेट दे णे हे सुद्धा होते. बहरामंद खानाने संिीचा फायदा घेत व पादशाहजाद्याशी तवनम्रपणे व

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९०

गोड बोलू न दरबारास परतण्याचा मागम िरला. उम्दत-उल-मुल्कला त्याच्या उतारवयात व अशक्तपणा बाजूला ठे वून अत्यंत दुःखी होऊन लशष्टाचारामुळे अतोनात कष्ट घेत सगळा प्रवास घोड्यावरून करावा लागला. मैत्रीच्या मातीत तक्रारीच्या बीजाचे रूपांतर जसे मनस्तापात होते व अंतगमत तवरोिाचा शेवट संकट व मानहानीत होतो तसेच दोन्ही गटांच्या प्रमुखांमिील कटु ता बळावली. तसेच दुष्ट लोकांच्या मध्यस्तीमुळे या दोघांमिील दरी आणखी वाढत गेली. सैन्य जेव्हा जजिंजीच्या जवळ आले तेव्हा नुस्रत जंग खान पादशाहजाद्याचे स्वागत करायला पुढे आला व त्याने भेट घेतली. पादशाहजादा भेटीच्या शाधमयान्यात बसला होता. [३५६] उम्दत-उल-मुल्क, नुस्रत जंग व सरफराज खान यांना बसायची अनुमती धमळाली. बरयाचा सय्यद खान जहान याचा मुलगा लश्कर खान याला, नुस्रत जंगच्या बरोबरीची वागणूक धमळावी अशी अपेक्षा होती. ती त्याला न धमळाल्यामुळे तो ततथून तनघून गेला व परत किीच पादशाहजाद्याला भेटायला गेला नाही. हे सगळे वडील (उम्दत-उल-मुल्क) व मुलाच्या (नुस्रत जंग) संगनमताने झाले आहे असे सांगून पादशाहजाद्याच्या सेवकांनी लश्कर खानाचे कान भरले . तर दुसरीकडे, हे पादशाहजाद्याच्या गैरमजीमुळे आहे असे या (दोन) सरदारांनी त्याला पटवले . कटु ता व दुस्वासाची सगळी बीजे पेरली गेल्यामुळे पादशाहजाद्याची तववंचना व त्याच्या मनातील चलतबचल वाढली. तोवर काही मूखांच्या सांगण्यानुसार पादशाहजाद्याने रामा (राजाराम) बरोबर गुप्त पत्रव्यवहार सुरू केला. या सगळ्या घडामोडींमुळे शत्रूचे फावले व त्याने आगीत तेल ओतून पादशाहजाद्याची आणखी ददशाभूल केली. नुस्रत जंग सगळ्या बाजूंना लक्ष ठे वून होता व दररोज तकल्ल्यातील त्याच्या हेरांना १००० रुपये दे त होता. त्याला पादशाहजाद्याच्या गुप्त पत्रव्यवहाराबद्दल कळले . या तपतापुत्रांनी बादशाहाला हे सगळे कळवले व त्यांनी तवनंती केल्याप्रमाणे राव दलपत बुद ं े ला याला पादशाहजाद्याच्या छावणी भोवती पाळत ठे वून त्याचे दरबारात येणे जाणे तसेच उम्दत-उल-मुल्कच्या अनुमती लशवाय कोणालाही भेटणे बंद केले गेले. भांडण उघड्यावर आले . उम्दत-उलमुल्क व नुस्रत जंग यांच्याशी असले ल्या मतभेदांमुळे पादशाहजाद्याला त्याच्या दुष्ट सेवकांसोबत [३५७] अंिाऱ्या रात्री तकल्ल्यात जायचे आहे अशा बातम्या तकल्ल्यातील गुप्तहेर सतत पाठवत होते. या तपतापुत्रांना शेवटी पादशाहजाद्याची भीती वाटू न त्यांनी सरदारांशी चचाम करून त्याच्या छावणी भोवती असले ली चौक़ी आणखी पक्क़ी केली व सवामनुमते ठरवून तकल्ल्याच्या वेढ्यात असले ल्या सगळ्या ठाणेदारांना बोलावून घेतले .

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९१

तकल्ल्याचा वेढा दढला झाल्याचे बधघतल्यावर लगेच शत्रूने सवम शक्त़ी तनशी आक्रमण केले व सगळ्या बाजूंनी एकच िांदल उडाली. उम्दत-उल-मुल्क पादशाहजाद्याच्या रक्षणासाठी मागे थांबला होता तर नुस्रत जंग मोचामत जाऊन तोफा व इतर सामग्री काढायच्या कामात गुंतला होता. त्यांना ठाणेदारांना मदत करता आली नाही. जो कोणी स्वतःला सांभाळू न परतू शकला तो परतला, बाक़ी सगळे उध्वस्त झाले . इस्माईल खान माखा हा थोर सरदार, ज्याच्याकडे तकल्ल्याच्या मागचा भाग होता, तो लढायला उभा रातहला पण शत्रुची संख्या खूप होती व तो जखमी झाल्यावर संताच्या कामगीरीमुळे शत्रू त्याला घेऊन गेला. प्रचंड गोंिळ माजला होता. नुस्रत जंग याने मोचे काढू न लवकर माघार घ्यायचा प्रयत्न केला, मोठ्ा तोफांच्या बत्तीच्या धछद्रात खखळे ठोकून त्या तनकामी केल्या होत्या. त्याचे लोक गोळा करून सगळे सामान घेऊन तो छावणीत परतला. त्यावेळी शत्रूने मोठ्ा आत्मतवश्वासाने, आनंदात व जोशात, एक लाख घोडदळ व पायदळाच्या जमावाने नुस्रत जंग याला घेरले . पादशाहजाद्याची छावणी ततथून दोन कोसावर होती तर तकल्ल्याचा कोट केवळ पाव कोसावर. मुसलमानांसमोर मृत्यू उभा ठाकला होता. खान बहादुर व इतर सगळ्या सरदारांकडे धमळू न [३५८] २००० च्या वर सैन्य नव्हते. खानाने बादशाहाचे स्मरण करून व ईश्वराच्या मदतीवर तवश्वास ठे वून जोरदार आरोळी ठोकत मैदानात उडी घेतली. वीरांनी अगदी हातघाईचे तुंबळ युद्ध केले . इस्लामी गाझींनी शत्रूचे ३०० पायदळ व ३०० घोडदळ ही मारले . खान बहादुर याने हत्तीवर बसून त्यांना तकल्ल्याच्या दरवाज्यापयंत मागे ढकलले तसा त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. या लढाईत शत्रूचे हजार पायदळ मारले गेले. बादशाही सैन्याचा तवजय झाला व शत्रू परागंदा झाला. तकल्ल्यात परत जाताना शत्रूने मागे सोडले ले एक हजार घोडे मुसलमानांच्या हाती लागले . तवजयी सैन्याचे ४०० घोडे व चार हत्ती तोफा व जंबुरक़ी यांच्या माऱ्यात मारले गेले. बादशाही मनसबदार व इतर सरदारांचे तततकेच लोक शहीद झाले . अगदी थोडेच होते ज्यांना काही जखम झाली नाही. या मोठ्ा तवजयानंतर सूयामस्ताला खान बहादुर छावणीत पोहोचला व उम्दत-उल-मुल्कला भेटला. त्यांना कळले क़ी पादशाहजादा व त्याच्या सल्लागारांनी ते दोघे भेटायला आल्यानंतर त्यांना अटक करायची योजना केली होती. ते दोघे दौडत गेले व लशष्टाचार झुगारून पादशाहजाद्याच्या तंबूत लशरले व त्यांच्या िन्याशी एकतनष्ठ राहत िन्याच्याच मुलाला [३५९] अटक केली. दुसऱ्या ददवशी खान बहादुर याने सवांना िीर दे त त्यांची प्रशंसा

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९२

केली. सैन्यातील सवम लहान थोरांना हत्ती, घोडे, अंगरखे व रोख बक्षीस दे ऊन खूष केले . त्याने शत्रूवर अनेकदा तवजय धमळवला. िान्याची टं चाई झाल्यामुळे सैन्याला उभे ही राहता येत नव्हते. त्यामुळे शत्रूशी तह करून तो बादशाही प्रदे शात परतला व ततथे छावणी टाकली. त्यावेळी मुहरमम खाना बरोबर पादशाहजाद्याला दरबारास पाठवण्याचा बादशाहाचा आदे श धमळाला. उम्दत-उल-मुल्क दरबारास जायला तनघाला. खान बहादुर नुस्रत जंग चार मतहन्यांनंतर परत गेला व पुन्हा तकल्ल्याला वेढा घालू न जोर लावला. त्याच्या ऐवजी, तकल्ला कसा घेतला गेला व रामा व संताने केले ल्या पलायनाचा वृतांत आता मी दे तो. बुिवार, १४ जून १६९३ / २० शव्वाल ११०४ ला काम बक्ष दरबारास आला व जझतुस्त्न्नसा बेगमच्या मध्यस्थीने त्याने जनानखान्यात बादशाहाची भेट घेतली. त्याने नजर म्हणून १००० मोहरा व तनसार म्हणून तततकेच रुपये सादर केले . बादशाहाने आदे श ददला क़ी ज्यांना कोणाला लशरपेच भेट ददला गेला असेल त्यांनी रतववार सोडू न इतर ददवशी तो घालावा. त्यांना धमळाले ल्या लशरपेचात समािान मानावे व दुसरा लशरपेच बनवून घेऊ नये ककिंवा तो घालू नये. [३६०] रतववार, १३ ऑगस्ट १६९३ / २१ जजल्हेज ११०४ ला लाहोरचा पदच्युत नाजजम खान जहान बहादुर जफर जंग कोकलताश खान याने भेट घेतली. त्याचा मुलगा व आलाहाबादचा पदच्युत सुभेदार तहम्मत खान याने भेटीची तवनंती केली पण त्याला मुहम्मद मुईज्जुद्दीनच्या कुटुं बाला पन्हाळ्याला नेण्याचे काम ददले गेले. शत्रूला िडा लशकवायला गेलेला हमीदुद्दीन खान परतला व शतनवार, ७ ऑक्टोबर १६९३ / १६ सफर ११०५ ला भेट घेतली. आिी त्याला कठड्याच्या बाहेर उभे रहावे लागत असे आता बादशाहाने कृपाळू होऊन त्याला त्याच्या आत उभे राहण्याचा सन्मान ददला. इनायतुल्लाह खानाचा मामा, मुल्ला मुहम्मद ताहीर वारल्यामुळे त्याला शाल बालाबंद ददला गेला. गुरूवार, ९ नोव्हेंबर १६९३ / २० रतब-उल-अव्वल ११०५ ला उम्दत-उलमुल्क खान जहान बहादुर याने बादशाहास कळवले क़ी तहम्मत खानाने तीन ददवस संता बरोबर युद्ध केले व अथक पररश्रम घेऊन त्या कातफराला परास्त केले . राजा अनूपससिंह याला नुस्रताबाद सागरचा फौजदार, रादं दाज खानाला इग्म्तयाजगड अडोणीचा

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९३

तकल्ले दार, सजावार खानाला1 मुहम्मदाबाद बीदर2 चा तकल्ले दार व मामूर खानाला बीर व लशवगावचा फौजदार नेमून बढत्या व बक्षीसे ददली गेली.

आलीजाह आजम दरबाराि येतो पादशाहजादा आलीजाह याला त्याच्या आजारामुळे दरबारास बोलावून घेतले होते. २२ ऑक्टोबर १६९३ / २ रतब-उल-अव्वल ११०५ ला तो पादशाहजादा मुहम्मद [३६१] बीदर बख्त बहादुर व शाहजादा मुहम्मद वालीजाह यांच्या बरोबर आला व भेट

घेतली. तो अजून पूणम बरा झाला नसल्यामुळे बादशाहाने त्याच्यावर उपचार करायची व त्याची दे खभाल करायची इच्छा प्रकट केली. त्याचा तंबू गुलालबाडीच्या मध्यभागी, ददवाण-इ-खासच्या जवळ लावला गेला होता व त्यात त्याच्यासाठी एक स्वागतकक्ष व आतमध्ये दोन खोल्या उभ्या केल्या होत्या. रतववार, ५ नोव्हेंबर १६९३ / १६ रतब-उलअव्वल ११०५ ला शाहजादा मुहम्मद वालीजाह याला सात हजारी (२००० स्वार), आलम व नगारे ददले गेले. पादशाहजद्याच्या सैन्यातील अधिकारी खान जमान फतह जंग याने भेट घेतली. पादशाहजाद्यावर उपचार करण्यासाठी हाक़ीमुलमुल्क व त्याच्या मानलसक स्वास्थयासाठी फजैल खान मीर हादी, मीर मुनशी पाठवले होते ते परतले व त्यांनी भेट घेतली. बादशाहा दररोज एकदा त्याला भेटायला जात असे व त्याला ददले ले पथयाचे अन्न तो व जझतुस्त्न्नसा बेगम त्याच्या बरोबर घेत असत. पादशाहजादा बरा होईपयंत त्या दोघांनी फक्त तेच अन्न ग्रहण केले . ईश्वराच्या कृपेने व बादशाहाचे पररश्रम व आलशवामदामुळे तो इतक्या अवघड दुखण्यातून बाहेर पडला. त्याचा एक सेवक मुहम्मद सलीम अस्लम याने त्याच्या आजारातून बाहेर पडण्याचा कालश्ले ष केला तो असा – बादशाहाने केले ली प्राथमना हेच पादशाहजाद्याचे औषि होते [३६२] बादशाहाने ते ऐकले व त्या कवीची प्रशंसा केली. शतनवार, २३ धडसेंबर १६९३ / ५ जमाद-उल-अव्वल ११०५ ला तो बरा होऊन ददवाण-ए-खास मध्ये आला व बादशाहा समोर बसून त्याला प्रफुल्लीत केले . हक़ीम-

1 2

इंग्रजी अनुवादात सरदार खान म्हटले आहे पण फासी पाठात सजावार खान असे आहे. बीदरचा उल्ले ख जाफराबाद असा अनेक दठकाणी येतो परंतु इथे त्याला मुहम्मदाबाद म्हटले आहे. इंग्रजी अनुवाद व फासी पाठात ही हाच उल्ले ख असल्याने तसेच ठे वले आहे.

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९४

उल-मुल्क याने त्याला बरे करण्यात त्याचे सवम कौशल्य पणाला लावले होते. त्याला हजार जात वाढ दे ऊन चार हजारी ददली गेली. शाह आलीजाह याने त्याच्या आजाराचा वृतांत ददला तो असा – जलोदराचा हा आजार होण्यापूवी तीन वषम हक़ीम मआसूम खान माझ्या समोर अप्रत्यक्षपणे पण दतांकरवी प्रत्यक्षपणे म्हणायचा क़ी त्याला माझ्यात जलोदराची लक्षणे ददसली आहेत. माझी प्रकृती चांगली राहावी व आजाराला बळ धमळू नये यासाठी तो हर प्रकारे प्रयत्न करायचा. मी औषि घेऊन तनयधमतपणे पथय पाळले व आजार वाढे ल अशा गोष्टींपासून मी दर रातहलो तर त्याला समािान वाटायचे. मी त्या ददवंगत वैद्याच्या सूचनांकडे दुलम क्ष केले . त्याच्या मृत्यूनंतर दोन वषांनी मी मेटाकुटीला आलो होतो. मी जजिंजीला जात असताना आजार उभा ठाकला. हाक़ीम मुहम्मद शफ़ी, हक़ीम मुहम्मद रजा व हक़ीम मुहम्मद आमीन सावजी यांनी खूप कष्ट घेतले तरी आजार बळावत होता. हे इतके झाले क़ी माझ्या हाताची बाही १४ तगरा इतक़ी मोठी असूनही ती मला घट्ट होत होती. माझ्या पायजम्याचा आकार एक याडम ६ तगरा इतका झाला होता. ज्याचे पथय पाळणे आवश्यक होते ते सवम मी सोडू न ददले . पाण्याच्या ऐवजी मी कासनी व इन्ब-उलसआललब याचा काढा घेत असे. वैद्यांचा हेतु चांगला असल्यामुळे ते म्हणायचे क़ी ‘पादशाहजादा पथय पाळत नाही’. [३६३] रात्री सवांनी माझ्या प्रकृती स्वास्थयाची आशा

सोडली होती व आता माझ्या त्वचेला भेग पडेल असे वाटले होते. बेगम, मुहम्मद बीदर बख्त, गायती आरा, बख्तुस्त्न्नसा व माझ्या जनानखान्यातील इतर काही लोक माझ्या भोवती गोळा झाले होते. मी अिमवट जागा अिमवट झोपले ल्या ब्स्थतीत होतो. तेव्हा दाढी व धमशी असले ला, गव्हाळ रंगाचा एक तेजस्वी माणूस पलं गाच्या पायापाशी माझ्या समोर आला व जवळ उभा राहून म्हणाला, ‘आत्ता पयंत आजाराचा कुठलाही भाग बरा झाले ला नाही. तुला अगदी प्रामाणणकपणे पश्चात्ताप झाला तर ईश्वर तुला पटकन बरा करेल’. मी म्हणालो, ‘तुम्ही सांगाल त्या शब्दात मी पश्चात्ताप व्यक्त करीन व ईश्वराने योजले तर पुन्हा मी ते पाप करणार नाही’. मग मी त्या अंतबामय महान व्यक्त़ीच्या मागमदशमनाखाली पश्चात्ताप व्यक्त केला व मला बरे वाटले . तो नाहीसा झाला. बेगम व इतरांना मी बरा झाल्याचे सांतगतले . त्याच वेळी मला लघवी करावीशी वाटली. एका वेळेस मला दोन मडक़ी भरून लघवी झाली व नंतर अगदी हलके वाटू लागले . पहाटे पयंत पाच वेळा मला अशी लघवी झाली व सात दठकाणची सूज पूणमपणे गेली. लोकांनी मला तवचारले क़ी,

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९५

‘तुला त्या महान वैद्याची ओळख सांगता येईल का ?’. मी म्हणालो क़ी, ‘मी त्याला

ओळखत नाही ककिंवा त्याचे नावही मला मातहत नाही’. पण दुसऱ्या ददवशी शेख अब्दुर रहमान दवेश याने तेथून चाळीस कोस लांब असले ल्या अडोणीहून ललतहले क़ी, आज रात्रीचे तीन प्रहर उरले असताना अबु तालीबचा मुलगा तनष्ठावंत अलीचा पुण्यवान सेनापती मला म्हणाला क़ी, ‘आज रात्री मी त्याला तुबमत1 ददली आहे व त्याच्या आरोग्यासाठी ईश्वराकडे प्राथमना केली आहे. तो तनणश्चतपणे बरा होईल. काही शंका बाळगू नका’. मी बरा झाल्यावर [३६४] मुस्तफा काशी व माझ्या इतर काही सेवकांनी त्यांची स्वतःची मालमत्ता व थोडी रोख रक्कम फक़ीर व गरीबांत वाटली. मीर झैन-उलआतबदीन याने १२००० रुपये ददले . माझ्या रोगमुक्त़ीच्या आंघोळीनंतर तहदायत खानाने १५००० रुपये खचम करून लोकांना एक आठवडा जेवणावळी घातल्या. बेगमने पतवत्र नजफ व श्रेष्ठ करबल्याला भेट म्हणून ६०००० रुपये पाठवले . माझ्या वैयलक्तक धमळकतीतून एक लक्ष वीस हजार रुपये मक्का, मदीना व इतर पावन क्षेत्रांतील गरीबांसाठी पाठवले गेले. बेगम व शाहजाद्यांनी गरीबांसाठी थोडे सोने ददले . हक़ीम-उलमुल्क व फजैल खान जेव्हा बादशाहाकडू न परतले तेव्हा माझ्या चेहऱ्े यावर आणण हातांवर थोडीच सूज उरली होती. त्याने सोन्याचे तवद्युतकमम ललहून ददले , ते घेतल्यावर एक नवीन सूज ददसू लागली. पण तो म्हणाला, ‘घाबरू नकोस, ती आता पूणम जाईल’. मग मी दरबाराला जायला तनघालो. हक़ीमाला मी २००० अशरफ़ी, एक अंगरखा व एक हत्ती भेट ददला. फजैल खानाचाही सन्मान केला गेला. फतह जंगचा मुलगा मुनव्वर खान याला पाच सदीची वाढ दे ऊन साडेतीन हजारी (२००० स्वार) ददली गेली. अलीमदम न खान हैदराबादी याला शत्रूने अटक केली होती. त्याला सोडल्यानंतर पाच हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. उम्दत-उल-मुल्क जजिंजीहून परतून आदे शानुसार नुस्रताबाद सागरला राहात होता. सोमवार, ८ जानेवारी १६९४ / २१ जमाद-उल-अव्वल ११०५ ला बादशाहाच्या आदे शानुसार तो दरबारास आला. काम बक्षच्या प्रकरणामुळे बादशाहा रागावला असेल असे त्याला वाटत होते. भेटीच्या ददवशी जेव्हा तो अणभवादनाच्या जागी आला [३६५] तेव्हा, खवासींचा दरोगा

1

अलीच्या थडग्यातल्या मातीला तुबमत म्हणतात. आजारी माणसाने ती खाल्ली तर त्याचे दुखणे बरे होते अशी मुसलमानांमध्ये समजूत आहे. स्टा. २९२.

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९६

असल्यामुळे ससिंहासनाच्या जवळ उभा असले ल्या मुल्तफत खान अगदी हळू आवाजात हे पुटपुटला –

ّ ‫در عفو لذتيست که در انتقام نيست‬ दर अफू लज्जतीस्त के दर इन्तकाम नीस्त क्षमा करण्यात जो गोडवा आहे तो सूड घेण्यात नाही बादशाहा उत्तरला क़ी, तू अगदी योग्य वेळी बोललास. त्या प्रमुख मंत्र्यावर कृपादृष्टी टाकत बादशाहाने त्याला त्याच्या पायांचा मुका घ्यायला सांतगतला आणण घोर तववंचनेतून बाहेर काढले . ददवंगत बुजुगम उम्मेद खानाच्या1 जागी कोकलताश खान जफर जंगचा मुलगा लसपाहदर खान, जो आलाहाबादचा सुभेदार झाला होता त्याला जौनपूरच्या फौजदारीचा अततररक्त पदभार ददला गेला व त्याच्या तीन हजारीत (२५०० स्वार) ५०० स्वारांची वाढ, तसेच एक कोटी दाम बक्षीस ददले गेले. खानाहजाद खान वाट सुरणक्षत करायला गढनमुन्याला गेला होता तो गुरूवार, ८ फेब्रुवारी १६९४ / २२ जमाद-उस-सानी ११०५ ला दरबारास परतला. शाहजादा बीदर बख्त याला माशाची मूठ व मोत्यांचा इलाका असले ला १०००० रुपयांचा खंजीर दे ऊन शत्रूला परास्त करण्यासाठी पाठवले गेले. खान फतह जंग, त्याच्या मुलांना व नातलगांना शाहजाद्याच्या सैन्यात तनयुक्त केले गेले व त्यांना अंगरखे, बढत्या, रत्ने, घोडे व हत्ती ददले गेले. गुरूवार, ८ माचम १६९४ / २१ रज्जब ११०५ ला मुहम्मद मुईझुद्दीन2 याने पन्हाळ्याचा वेढा सोडला व तो दरबारास आला. त्याला त्याचा मुलगा इझ्झुद्दीन बरोबर खाजगीत भेट ददली गेली. मुख्तार खानाला मीर आततश नेमले गेले. नवाजजश खान रूमी याला मुरादाबाद चाकल्याचा रक्षक नेमले गेले. बादशाही सेवेत मनसबदार व अधिकारी असले ला बारयाचा एक सय्यद व शाह आलीजाहचा एक तवश्वासू सेवक अमानुल्लाह हे दोघं धमत्र होते. [३६६] एकदा ते दोघं कुठे तरी जात असताना त्यांचे भांडण झाले , मैत्री तुटली. अमानुल्लाह याने सय्यदवर जमिडीने वार करून त्याला मारले . शाह आलीजाह याच्या छावणीत असले ल्या 1 2

फासी पाठ पृष्ठ ३६९ वर बुजुगम उम्मेद खान १२ मे १६९५ रोजी वारल्याचे म्हटले आहे. अखबारात प्रमाणे मुईझुद्दीनने २८ ककिंवा २९ माचमला बादशाहाची भेट घेतली. त्यामुळे ८ माचम ला तो पन्हाळ्याहून तनघाला असण्याची शक्यता अधिक आहे.

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९७

अमानुल्लाहच्या तंबूकडे सय्यदांचा जमाव गेला. ततथे त्यांचा ही जमाव तयार होता. जोरदार झटापट झाली. बादशाहाला हे कळल्यावर त्याने मीर आततश मुख्तार खान याला मध्यस्ती करून प्रकरण धमटवण्यासाठी पाठवले गेले. खानाने दोन्ही बाजूंची समजूत काढायचा यत्न केला पण सय्यद लोक काही ऐकेनात. त्याने तसे कळवले . बादशाहाने पत्राच्या एका कागदावर कुराणातील ओळ ललतहली ती अशी – ‘जर दोन तनष्ठावंत गटांमध्ये भांडण झाले तर त्यांची समजूत काढा. जर

त्यापैक़ी कोणी दुसऱ्या तवरुद्ध बंडाळी केली तर तुम्ही बंडाळी करणाऱ्या तवरुद्ध तोवर लढा जोवर ते ईश्वराची आज्ञा मानत नाहीत’. तो ददवस गेला. दुसऱ्या ददवशी सगळे सय्यद लोक न्यायसभेसमोर बसले होते. बादशाहाने त्यांना काझी-उल-कुझातकडे जायला सांतगतले व शरीयतनुसार ददले ला त्याचा तनणमय लागू होईल असा आदे श ददला. हे मूखम म्हणाले , ‘आम्ही काझीकडे जाणार नाही. आमच्या शत्रू बरोबर आम्ही काय ते बघून घेऊ’. हे ऐकल्यावर बादशाहा संतापला. अंगरख्याच्या बाया वर करून म्हणाला, ‘मी ज्यांना अनेकदा चोपले आहे व ज्यांनी माझा राग बधघतला आहे त्यांना शरीयतचा तनणमय मान्य करा हे सांतगतल्यावर असे उत्तर द्यायची तहम्मत कशी होते !’. त्याने खास चौक़ीत व जुन्या तुकडीत काम करणाऱ्या सगळ्या सय्यदांना पदच्युत करून ते जजथे बसले होते त्या घुसलखान्याच्या दरवाज्या समोरील तंबू बाहेर काढायचा आदे श ददला. [३६७] आता कोणी एक शब्दही बोलले नाही. सैफ खान, सय्यद खान व सय्यदांच्या इतर सरदारांनी नामदारांच्या घरात आश्रय घेऊन हजार वेळा तनषेि केला क़ी, ‘आम्ही त्यात साधमल नव्हतो’. काही काळ त्या सगळ्यांना सेवेतून बाहेर ठे वण्यात आले व मध्यस्ती व तनवेदन केल्यानंतर त्यांना पुन्हा पदावर घेण्यात आले . त्यांनी त्यांचा श्वास घशातच ठे वला व लशष्टाचाराच्या गुडघ्यांचा आिार घेऊन बसले . मग एकदा मुईझुद्दीनचे सािारण वीस सेवक त्याचा ददवाण फज्ल अली खाल याच्याशी उद्धटपणे वागले आणण कोणीही त्यांना समजवायचा प्रयत्न केला तर गुड ं ांप्रमाणे लशव्याशाप दे ऊ लागले . नुकत्याच झाले ल्या सय्यद प्रकरणामुळे बादशाहा त्रस्त झाला असल्याने हे त्याला सांतगतल्यावर त्याने हमीदुद्दीन खानाला या लोकांना लशक्षा करायची आज्ञा ददली. खान ततथे गेला तेव्हा या लोकांनी माघार न घेता आगीत उडी घेतली. माशांची क्षमता सवमश्रुत आहे, एक हजार माशा मुठीत माऊ शकत नाहीत. पण जेव्हा त्या थोड्या चवताळले ल्या लोकांनी या हजार

अध्याय ३७

२६ एतप्रल १६९३ ते १५ एतप्रल १६९४

२९८

लोकांवर चाल केली तेव्हा ते सगळे तग िरू शकले नाहीत व लगेच पांगले . त्यावेळी खान बहादुरचा हत्ती या गोंिळामुळे तपसाळला व सवांना तुडवत ततथून बाहेर पडला आणण बादशाही कोठाराच्या ददशेने एक कोस पळत गेला. खानाला एक मोठे कोठार ददसले ज्यात िान्य रचून ठे वले होते. हत्ती त्याच्या बाजूला जाताच त्याने शांतपणे हौद्यातून त्याच्यावर उडी मारली [३६८]. मग लोकांनी िावत जाऊन हत्तीला परत आणले . खान दुसऱ्या हत्तीवरून परत झटापटीच्या जागी पोहोचला. शेवटी स्वतः लावले ल्या आगीत त्या लोकांचा अंत झाला.

अध्याय ३८

१६ एतप्रल १६९४ ते ४ एतप्रल १६९५

२९९

अध्याय ३८ राजवटीचे आडतीसावे वषम – तहजरी ११०५-०६ १६ एतप्रल १६९४ ते ४ एतप्रल १६९५ आग्र्याचा सुभद े ार अमीर-उल-उमरा शातहस्ता खान याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. या उच्चकुलीन नामवंताचे गुणतवशेष इतके तवलक्षण होते क़ी त्याच्या औदायामच्या व दानशूरतेच्या प्रलसद्धीने आकाश झाकले गेले होते. सवम कहिंदुस्थानात लक्षाविी रुपये खचम करून त्याने बांिले ल्या कारवा-सराई व पूल ही त्याची स्मारके आहेत. आजम खान कोकाहचा मुलगा साललह खान याला त्याच्या वधडलांची पतहली उपािी तफदाई खान ददली गेली व ग्वाल्हेरची फौजदारी सोडू न तो [३६९] त्याच्या वधडलांच्या जागी आग्र्याचा सुभद े ार झाला. मंगळवार, ३१ जुलै १६९४ / १८ जजल्हेज ११०५ ला बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान याच्याकडे चार हजारी (२५०० स्वार) होती, त्याला हजारची वाढ धमळाली. जुब्ल्फकार खान बहादुर याच्याकडे चार हजारी (३००० स्वार) होती, त्याला हजार जात वाढ धमळाली. बक्षी-उल-मुल्क मुखललस खान याच्याकडे अडीच हजारी (६०० स्वार) होती, त्याला ५०० (१०० स्वार) वाढ धमळाली. खान-इसामान फाजजल खान याला ५०० ची वाढ दे ऊन अडीच हजारी (५०० स्वार) ददली गेली. रतववार, ७ ऑक्टोबर १६९४ / २७ सफर1 ११०६ ला शत्रूने सोडल्यावर इस्माईल खान मखा दरबारास परतला व त्याला इंदी ते मुतमजाबाद या वाटे चे रक्षण करायची जबाबदारी ददली गेली. त्याच्या पाच हजारी (तततकेच स्वार) वर त्याला एक हजारची वाढ ददली गेली. खानाहजाद खानाला खास चौक़ीच्या सेवकांचा दरोगा नेमले गेले. अक्सर खान2 हैदराबादी याला अविचा सुभद े ार नेमले गेले. राजा भीमससिंह पाच हजारी, वारला. अमीर-उल-उमराची मुले इततकाद खान व अबुल मुआला तसेच ददवंगताचा ददवाण मुरलीिर हे सगळे शुक्रवार, १४ धडसेंबर १६९४ / ७ जमाद-उल-अव्वल ११०६ ला दरबारास आले व त्यांना दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. बादशाहाने ददले ले काम

1

इंग्रजी अनुवादात इथे शाबान मतहना ददला आहे पण फासी पाठात सफर मतहना आहे.

2

इंग्रजी अनुवादातील तळदटपेनुसार अक्सर खान म्हणजे बहुदा गोळकोंड्याच्या सेवेत असले ला मुहम्मद अली बेग. त्याला औरंगजेबने अक्सर अली खान अशी उपािी ददली. फोटम सेंट जॉजम डायरी ऑफ १६८८-९० मध्ये याचा अनेकदा उल्ले ख येतो.

अध्याय ३८

१६ एतप्रल १६९४ ते ४ एतप्रल १६९५

३००

आटोपून इखलासकेश उज्जैनहून दरबारास परतला. मंगळवार, १२ फेब्रुवारी १६९५ / ८ रज्जब ११०६ ला तबहारचा सुभेदार बुजुगम उम्मेद खान वारला. त्याचे भाऊ इततकाद खान व अबुल मुआला यांना दुखवट्याची वस्त्रे ददली गेली. तफदाई खानाला बुजुगम उम्मेद खानाच्या जागी तबहारचा सुभेदार नेमले गेले. त्याच्या जागी [३७०] मुख्तार खानाची आग्र्याला नेमणूक झाली व त्याच्या जागी खानाहजाद खान याला मीर आततश नेमन ू त्याच्या अडीच हजारीत ५०० ची वाढ केली गेली. बादशाहाने वररष्ठ बक्षींना आदे श ददला

अध्याय ३८

१६ एतप्रल १६९४ ते ४ एतप्रल १६९५

३०१

क़ी मुहम्मद मुअज्जम याची मनसब आता चाळीस हजारी (तततकेच स्वार) झाल्याची नोंद करावी. दरबारात व सुभ्यांत आदे श ददला गेला क़ी रजपूत सोडू न इतर कुठल्याही कहिंदने हत्यार बाळगायचे नाही, हत्ती, अरबी ककिंवा इराक़ी घोड्यांवर बसायचे नाही व पालखीत बसायचे नाही. सोमवार, १ एतप्रल १६९५ / २६ शाबान ११०६ ला बादशाहाने कुत्बाबादहून कूच केले व ३ एतप्रल १६९५ / २८ शाबान ११०६ ला पाचव्यांदा तवजापूरला पोहोचला. नौरसपूर व अफजलपूरच्या जवळ त्याने छावणी टाकली होती.

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०२

अध्याय ३९ राजवटीचे एकोणततसावे वषम – तहजरी ११०६-०७ ५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६ **** बादशाहाने रमजानचा मतहना इथेच काढला कारण ब्रह्मपुरी (अजून) त्याच्या तनवासासाठी उपयुक्त नव्हते. एके ददवशी खान जहान बहादुर जफर जंग याने अदालतगाह मध्ये बादशाहाला धचनीमातीचा एक लहान गोलाकार पेला ददला [३७१] व म्हणाला क़ी हा मूसाचा (मोझेस) पेला आहे. बादशाहाने तो बधघतला व शाहजादा मुईझुद्दीन व मुहम्मद अजीम यांच्याकडे ददला. त्या पेल्याच्या मानेवर अक्षरासारखी ददसणारी काही धचत्रे दोन ओळीत कोरली होती. शाहजादे म्हणाले क़ी, ‘म्हणजे ही तहब्रू भाषा असणार’. खान बहादुर त्या अक्षरांकडे बघत म्हणाला क़ी, ‘मला काही तहब्रू ककिंवा धमब्रू मातहत नाही. ज्याने हा तवकला त्याने मला ही मातहती ददली’. बादशाहा म्हणाला, ‘ही अक्षरे आहेत व याची कारातगरी वाईट नाही’. या गंमतीदार व सदाचारी खानाबद्दल

अशा अनेक मनोरंजक व आश्चयमकारक कथा प्रचललत आहेत. पण ही घटना माझ्या समोरच झाल्यामुळे त्याची आठवण म्हणून मी ती नोंदवत आहे. बादशाहाने आदे श ददला क़ी नाजजर खखदमतगार खान व ख्वाजा मंझूर यांनी तवशेष अंगरखा घेऊन मुहम्मद मुअज्जम याच्या घरी जावे व त्याला त्याच्या स्वीकृतीच्या अणभवादनासाठी प्राथमनागृहात घेऊन यावे. मग तो बादशाहा सोबत ददवान-ए-अदालत मध्ये आला, नमाज पढला व त्याला (बादशाहाच्या) पावलांचा मुका घ्यायची अनुमती धमळाली. बादशाहाने त्याच्या कपाळाचा मुका घेतला. एक लक्ष रुपयांचा लशरपेच, एक तलवार, मुलाम्याचा व सोन्याचा साज असले ले दोन घोडे, तलै र व चांदीचा साज असले ला एक हत्ती दे ऊन त्याला परत त्याच्या घरी पाठवले गेले. अमीर-उल-उमराचा मुलगा खुदाबंदा खान हा त्याच्या वधडलांच्या मृत्यूनंतर बहराईच च्या फौजदारीवरून दरबारास आला व त्याला दुखवट्याची वस्त्रे दे ण्यात आली. हमीदुद्दीन खानाला १०० स्वारांची वाढ दे ऊन दीड हजारी (५०० स्वार) करण्यात आले . बादशाहाचा [३७२] सवामत मोठा मुलगा नेहमी त्याच्या उजव्या हाताला बसत असे आणण शाह आलम याला लशक्षा केल्यानंतर (तवटं बना) शाह आलीजाहला तो मान

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०३

ददला गेला होता. त्यामुळे सवामत मोठ्ा पादशाहजाद्याने बादशाहाला तवचारले क़ी, ‘ईदच्या ददवशी माझ्या अधिकाराबद्दल बादशाहाचा काय आदे श आहे ?’. तो म्हणाला

क़ी, ‘माझ्या लवाजम्या आिी ईदगाहला जा आणण मग माझ्या उजव्या हाताला तू बसशील’. त्याने तसे केले . बादशाहाचा लवाजमा पायऱ्यांपाशी पोहोचला तेव्हा मुअज्जम पुढे गेला, बादशाहाची भेट घेतली व त्याच्या पायांचा मुका घेतला. बादशाहाने त्याचे हात हातात घेतले व नंतर त्याचा डावा हात आपल्या उजव्या हातात घेऊन मलशदीत गेला. मग असे झाले क़ी सवामत मोठा मुलगा बादशाहाच्या उजव्या बाजूला त्याला खेटून बसला. शाह आलीजाह नंतर आला व त्याच्या हातात तवशेष तलवार होती. त्याने ती बादशाहाकडे ददली व बादशाहाच्या उजव्या बाजूला बसायला जागा करून दे ण्यासाठी सूचकपणे त्याच्या भावाच्या हाताला स्पशम कला. बादशाहाची नजर त्या बाजूला गेली व त्याने उजव्या हाताने आलीजाहचा अंगरखा पकडू न त्याला त्याच्या डाव्या बाजूला खेचले . इतर कोणात पुढे जाण्याची ककिंवा (पादशाहजाद्याला) मागे खेचण्या इतक़ी िमक होती का ! नमाज झाल्यावर आणण खाततब चौथऱ्यावर उभा रातहल्यावर त्याने बादशाहाचे नाव घेताच तो शाह आलीजाहचा हात िरून उभा रातहला व थोरल्या पादशाहजाद्याला तनरोप ददल्याची खूण केली. शाह आलम त्याच्या मुलांबरोबर ततसऱ्या दरवाज्याने गेला व बादशाहा दुसऱ्या दरवाज्याने. मुहम्मद अकबर याच्या मुली झतकयतुस्त्न्नसा व सतफयतुस्त्न्नसा आदे शानुसार दरबारास आल्या व त्यांचा तववाह रतफ-उल-कद्र व मुहम्मद खुजजस्ता अख्तर यांच्याशी केला गेला. गुरूवार, ९ मे १६९५ / ५ शव्वाल ११०६ ला मुहम्मद मुअज्जम [३७३] प्राथमनागृहात आला व ख्वाजा मंझूरकडे ददले ल्या अंगरख्याबद्दल अणभवादन करून आग्र्याला (सुभद े ार पदावर) जाण्यासाठी तनरोप घेतला. नंतर तो बादशाहा बरोबर ददवानए-अदालत मध्ये गेला, बादशाहाच्या पायांचा मुका घेतला व बादशाहाने त्याच्या कपाळाचा मुका घेतला. फाततहा वाचल्यानंतर त्याला तनरोप ददला गेला. त्याच्या मुलांपैक़ी मुहम्मद रतफ-उल-कद्र व खुजजस्ता अख्तर यांना त्याच्या बरोबर जायला सांतगतले गेले व मुहम्मद मुईझुद्दीन व मुहम्मद अजीम हे दोघे बादशाहा बरोबर मागे रातहले . त्यांना पादशाहजाद्यासोबत त्याच्या छावणीपयंत जायला सांतगतले गेले.

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०४

बादशाहािे त्रवजापूरहून ब्रह्मपुरीला कूि नामांतर करून इस्लामपुरी (१६९५) शतनवार, ११ मे १६९५ / ७ शव्वाल ११०६ ला बादशाही छावणी नवरसपूर व अफजलपूरहून तनघाली व २१ मे १६९५ / १७ शव्वाल ११०६ ला भीमेकाठी ब्रह्मपुरीला थांबली. आदे शानुसार बादशाहाची सवम मुले, त्यांची मुले व इतरांना इथे पोहोचल्याबद्दल अणभनंदनपर अणभवादन करायला सांतगतले गेले. औरंगजेब त्याच्या तंबूकडे जाताना, शाह आलीजाह याच्या तंबू शेजारून जात होता तेव्हा त्याच्या तंबूचा घेर त्याला थोडा मोठा वाटला. ततथल्या सवेक्षकाला आदे श ददला गेला क़ी आलीजाहच्या तंबूचे माप घेऊन मंचकारोहणापूवी बादशाहाच्या तंबूचा घेर जजतका असायचा तेवढाच तो ठे वावा. मुहम्मद अजीम व रुहुल्लाह खानची मुलगी [३७४] यांना मुलगा झाला, मुलाच्या वधडलांनी ५०० मोहरा नजर म्हणून सादर केल्या. मुलाचे नाव रुह-उल-कद्स ठे वले गेले. शुक्रवार, २३ ऑगस्ट १६९५ / २२ मुहरमम ११०७ ला बीदर बख्त व मुख्तार खानाची मुलगी यांना मुलगा झाला. शाह आलीजाह याने दरबारात अणभवादन करून ५०० मोहरा सादर केल्या. मुलाचे नाव तफरोज बख्त ठे वले गेले. रतववार, २२ सप्टें बर १६९५ / २२ सफर ११०७ ला मुहम्मद मुईझुद्दीन व आजीम आग्र्याला जाताना तनरोप घ्यायला शाह आलीजाह याला भेटायला गेले व त्यांना प्रत्येक़ी अंगरखा, बालाबंद, लशरपेच, मोत्यांचा कंठा व एक हत्ती ददला गेला. उम्दत-उल-मुल्क याच्या मुलीशी खुदाबंदा खानाचा तववाह करण्यात आला, त्याला एक अंगरखा ददला गेला. जुब्ल्फकार खान बहादुर याला वाढ दे ऊन पाच हजारी (४००० स्वार), बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान याला पाच हजारी (३००० स्वार), बक्षीउल-मुल्क मुखलीस खान याला ३००० (१००० स्वार) व हमीदुद्दीन खान याला दोन हजारी ददली गेली.

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०५

कासिम खान बहादुर व खानाहजाद खानावर जी आपत्ती कोिळली त्यािा िंणक्षप्त वृतांत बादशाहाला कळले क़ी संता बादशाही प्रांत लु टून त्याची लू ट घेऊन बादशाही छावणी पासून ऐंशी1 कोसांवरून जाणार आहे. [३७५] कालसम खान हा एक कायमक्षम व समथम अधिकारी तसेच सेरा प्रांताचा सेनापती त्यावेळी अडोणी2 जवळ आला होता. बादशाहाने त्याला आदे श ददला क़ी शत्रूच्या मागावर जाऊन त्याचा पुरता तबमोड करावा. बादशाहाने खानाहजाद खान, सफलशकन खान, सय्यद असालत खान, मुहम्मद मुराद खान व इतर लोकांना त्याची कुमक करायला पाठवले . त्यात खास चौक़ीचे मनसबदार, खास तुकडी व सात चौक़ी मिील बरेच लोक व तोफखाना असे सगळे होते. रतववार, १९ जानेवारी १६९६ / २३ जमाद-उस-सानी ११०७3 ला हे दोघे शत्रू पासून सात कोसावर एकत्र झाले . कालसम खानाची व्यलक्तगत मालमत्ता अडोणीच्या तकल्ल्यात होती. त्याला ख्वाजा खानाहजाद खान व इतरांचे मनसोक्त मनोरंजन करायचे होते म्हणून, न वापरले ले कनामटक़ी तंबू, सोने, चांदी, तांबे व सवम प्रकारची धचनीमातीची भांडी असे सगळे त्याने स्वतःच्या व इतर नामदारांच्या तंबूंसोबत तीन कोसांवर पुढे पाठवून ददले . शत्रूला हे कळल्यावर त्याने त्याच्या सैन्याची तीन गटात तवभागणी केली. पैक़ी एक गट लू ट करायला गेला. दुसरा (मुघल) सैन्याला थोपवण्यासाठी व ततसरा राखीव तुकडी म्हणून मागे रातहला. सूयोदयानंतर चार घटकांनी पतहल्या गटाने पुढे गेलेल्या छावणीवर छापा मारला, अनेकांना जखमी केले ककिंवा मारले आणण होते नव्हते ते सगळे घेऊन पसार

1

इंग्रजी अनुवादात इथे आठरा कोस ददल आहे पण फासी पाठात (‫ )هشتاد‬हश्ताद म्हणजे ऐंशी कोस ददले आहे, म्हणजे सािाराण १६० मैल व २५७ तकमी.

‫ز‬

2

इंग्रजी अनुवादात इथे चुकून सेरा जवळ ददले आहे. फासी पाठात (‫بآدوي‬ ‫‘ )قريب‬करीब बٔ आडोनी’ म्हणजे अडोणी जवळ ददले आहे.

3

ही ततथी दोन मतहन्यांनी चुकली आहे. अखबारात ३९७२ सांगतो क़ी १९ जानेवारी १६९६ च्या कमीत कमी एक मतहना आिी कालसम खान मारला गेला होता. त्यांची वाताहात झाल्यानंतर खानाहजाद खानची मदत करायला व हमीदुद्दीनला लढा चालू ठे व असे सांगायला गेलेले गुजमबदामर १९ जानेवारी १६९६ ला बादशाहाकडे परतले . फोटम सेन्ट जॉजम डायरी मिील ५ धडसेंबर १६९५ ची नोंद सांगते क़ी, ‘१५००० लोकांचे मराठा सैन्य या भागात आल्याची पक्क़ी बातमी आहे व त्यांनी यापूवीच लसराचा नवाब कालसम खान याला पराभूत केले आहे ’.

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०६

झाले . ही बातमी कालसम खानाकडे येऊन थडकली. खानाहजाद खानाला झोपेतून न उठवता तो एकटाच लढायला पुढे गेला. [३७६] तो एक कोस ही जात नाही तोवर शत्रूच्या दुसऱ्या गटाने त्याच्यावर चाल केली व युद्ध सुरू झाले . खानाहजाद खान उठल्यावर त्याला हे कळले व छावणीतील सगळे सामान, भारवाही, तंबू वगैरे सगळे ततथेच सोडू न तो पुढे गेला. शत्रूकडे अगणणत काळे बंदकिारी पायदळ1 व मोठे घोडदळ ही असल्यामुळे तुंबळ युद्ध झाले व दोन्हीकडील बरेच लोक मारले गेले. बादशाही सैन्य प्रबळ असूनही व शत्रूची हानी होऊन सुद्धा ते एक इंचही मागे सरले नाहीत ककिंवा डगमगले नाहीत. यावेळी शत्रूची ततसरी तुकडी छावणीवर तुटून पडली व ततथे ठे वले ले सगळे सामान लु टून नेले. खानाहजाद खान व कालसम खानाला युद्धाच्या िामिुमीत ही बातमी कळल्यावर ते हतबल झाले . चचाम करून त्यांनी त्यांचे तंबू ज्या दठकाणी पुढे पाठवले होते ततथे जायचे ठरवले . ततथे दोड्डेरी नावाचा लहानसा तकल्ला व त्याच्यासमोर एक तळे होते. एक कोस लढाई करत ते संध्याकाळी त्या तळ्यापाशी आले . शत्रू ही आता त्यांच्या वाटे ला गेला नाही व त्याने एका बाजूला त्यांचा परीघ आखला. बादशाही लोकांनी तकल्ल्यात जाऊन दारे लावून घेतली. दोन्ही खानांनी जे काही खायचे आणले होते ते सवांसोबत वाटू न खाल्ले . पण इतर सैतनकांना तळ्याच्या पाण्यालशवाय काही खायला धमळाले नाही. तसेच घोड्यांना व हत्तींनाही चारा ककिंवा खाद्य धमळाले नाही. रात्र झाली तशी शत्रूने [३७७] युद्धासाठी तयार असले ल्या बादशाही सैन्याला घेरले . पुढचे तीन ददवस शत्रू फक्त समोर आला पण युद्धाला तोंड फुटले नाही. शेवटी कालसम खानाने ज्याचा अपमान केला होता त्या धचतळदुगमच्या जमीनदाराचे हजार पायदळ, संिी धमळताच लढायला आले . चौथया ददवशी सूयोदयापूवी गेल्या वेळेपक्ष े ा दहापट मोठे (काळे ) पायदळ समोर आले व युद्धाला तोंड फुटले . तोफगोळे व इतर युद्ध सामग्री लु टली असल्यामुळे व सैतनकांनी जे बरोबर आणले होते ते संपल्यामुळे काही वेळ हताशपणे िावपळ करून शेवटी सैतनक काही न करता बसून रातहले . शत्रू गोळ्यांचा मारा करत रातहला व यातही अनेक लोक मेले. बाहेर पडायची वाट बंद आहे हे बघून उरले ल्या सैतनकांनी त्या लहानशा तकल्ल्यात िाव घेतली. हे संकट कोसळले त्या दठकाणी उपब्स्थत असले ल्या तवश्वसनीय बातमीदारांनी सांतगतले

1

इंग्रजी अनुवादात याला ‘black infantry musketeers’ असे म्हटले आहे तर फासी पाठात (‫بندوقچ‬ ‫ )کاله پياده‬म्हणजे ‘काला प्यादा बंदकची’ असे म्हटले आहे. ٔ

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०७

क़ी, कातफरांनी आमचे एक तृततयांश सैतनक पुढे पाठवले ल्या छावण्यांमध्ये व तळ्याच्या काठावर मारले . शत्रूने तकल्ल्याला सवम बाजूंनी वेढले व त्यांना लक्षात आले क़ी सगळी तुकडी आता भुकेने मरेल. (मुघल) सैन्य तकल्ल्यात गेले त्या ददवशी सवम स्तरातील सैतनकांना ततथल्या रसदे तील ज्वारी व बाजरीची भाकरी धमळाली व काही जुने व नव्या पेंढीतील गवत प्राण्यांना धमळाले . दुसऱ्या ददवशी माणसांना भाकरी नव्हती व प्राण्यांना गवत. अशा अगततक अवस्थेत जर प्राण जाणार असतील तर ते ही ठीक ! कालसम खानाला अफूचे इतके व्यसन होते क़ी तो त्याच्यालशवाय जगू शकत नव्हता. आता त्याला अफू न धमळाल्यामुळे [३७८] त्याचा मृत्यू झाला. ततसऱ्या ददवशी तो मेला आणण या बातमीने बळावले ल्या शत्रूच्या कचाट्यातून सुटला. ततथल्या तुकडीचे मनोिैयम पार खचले होते. तरी काही उत्साही लोक म्हणाले क़ी, आणखी तकती काळ आपण भूक सहन करायची व असे खखतपत पडू न मरायचे ? शत्रूवर तुटून पडू न एकदा काय तो सोक्षमोक्ष लावू आणण हौतात्म्य धमळवू ककिंवा तवजयी होऊ. पण काही झाले तरी या संकटातून मुक्त होऊन काहीतरी प्राप्त करू. पण सरदारांनी मान्य केले नाही. आणण अनेक लोक भुकेने मेले तर घोडे चारा समजून एकमेकांची शेपटी चावू लागले तोवर शत्रूने एक बुरूज उडवून सवम बाजूंनी आक्रमण केले . खानाहजाद खानाने सुरक्षेची भीक मातगतली व एकाच अटीवर तह झाला क़ी तो संताला रोख, सामान, रत्ने, घोडे, कालसम खानाचे हत्ती, वीस लक्ष रुपये दे ईल तसेच बालतकशनचा मुलगा, त्याचा तवश्वासू मुनशी व त्याच्या घरातला प्रमुख अधिकारी ओलीस राहतील. हे मान्य झाले . संताने शब्द ददला क़ी लोकांना काही काळजी न करता तकल्ल्याबाहेर येऊन दरवाज्या समोर दोन ददवस राहता येईल व त्याच्या सैतनकांकडू न जे हवे ते तवकत घेता येईल. तीन ददवसांनंतर बादशाही सैन्याने तकल्ला सोडला. शत्रूने त्यांना खाण्यासाठी अन्न पाणी ददले . दोन ददवस ते तकल्ल्याच्या दरवाज्या बाहेर रातहले . ततसऱ्या ददवशी खानाहजाद खान शत्रूच्या तुकडीच्या संरक्षणात दरबारास यायला तनघाला. त्यांच्या कुमक़ीसाठी दरबाराकडू न पाठवले ला हमीदुद्दीन खान बहादुर व हैदराबादहून तनघाले ला रुस्तमददल खान अडोणी जवळ त्यांना भेटले . [३७९] पराभूत झाले ल्या सरदारांना त्यांनी तंबू, कपडे, रोख व इतर आवश्यक मदत केली. तकल्ले दार रादअंदाज खान याने त्याच्या क्षमते पलीकडे जाऊन त्यांना मदत केली व त्यांना आवश्यक असले ल्या वस्तुंपेक्षा अधिक गोष्टी नागरीकांच्या घरातून व सगळीकडू न गोळा केल्या गेल्या. इतके सगळी लू ट करून घरी जायला तनघाले असतानाही शत्रूला तहम्मत

अध्याय ३९

५ एतप्रल १६९५ ते २४ माचम १६९६

३०८

खान बहादुरशी युद्ध करायचे होते. शत्रूला िडा लशकवण्याचा आदे श धमळू नही त्याच्याकडे सैन्य कमी असल्यामुळे तो बसवपट्टणला थांबला होता.

त्रहम्मत खानािा मृत्यू खान बहादुरकडे एक हजाराच्या वर सैन्य नसताना तो शत्रूपाशी पोहोचला. तो त्यांचा पराभव करणार असे वाटत असताना अचानक एक गोळी त्याच्या छातीत घुसली व तो तत्क्षणी मेला. माहुताला परत तफरायचे होते पण खानाचा सेनापती बाक़ी बेग म्हणाला क़ी, ‘खान जजवंत आहे, हत्ती पुढे घेऊन जा, मी शत्रूला पळवून लावतो’. त्याने शत्रूचा सामना केला व पाय रोवून उभा रातहला. पण मस्तक गमावले ले सैन्य तकती काळ दटकाव िरणार ? जवळ एक तकल्ला होता, तो त्यात गेला. शत्रूने त्याचे सामान लु टले व काही ददवस तकल्ल्याला वेढा घातला. मग त्यातून काही धमळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी माघार घेतली. ही संिी सािून बाक़ी बेग दरबारास परतला. बादशाहाने आदे श ददला क़ी खानाहजाद खानाला जाफराबादचा (बीदर) सुभेदार, सफलशकन खानाला िामुनीचा फौजदार, सय्यद असालत खानाला रणथंबोरचा तकल्ले दार तर मुहम्मद मुरादला दोहाद व गोध्राचा फौजदार म्हणून नेमावे. इतर सैतनक बादशाही छावणीत थांबले . [३८०] बादशाहाने खान जहान बहादुर व ददवंगत सेनापती तहम्मत खान याच्या इतर मुलांना दुखवट्याची वस्त्रे ददली व कृपावंत होऊन त्यांचे सांत्वन केले . स्वतःच्या हाताने त्याने त्या नामदाराला (खान जहान) खरोली ददली व म्हणाला क़ी, बरेच ददवस मी पानसुपारी ऐवजी हे खात हे. बाक़ी बेगला पाच सदीची मनसब ददली गेली. लु त्फुल्लाह खानाला सफलशकन खानाच्या जागी आख्ताबेगी व खानाहजाद खानाच्या जागी खास चौक़ीचा दरोगा नेमले गेले. बीदर प्रांतातून जजझया गोळा करणारा आमीन इखलासकेश याला मुहम्मद काजझमच्या जागी इंदौर परगण्याचा आमीन व फौजदार नेमले गेले. तो चार सदी (५० स्वार) होता व आता त्याला १०० स्वार ददले गेले. शाह आलीजाह याला अध्याम बायांचा अंगरखा, बालाबंद, माणणक बसवले ला पाचूचा मुतक्का दे ऊन बहादुरगडाकडे पाठवले गेले. शाहजादा वालाजाह याला एक अंगरखा व एक असी तर जहानझेब बानू बेगमला माणकाचे गळ्यातले लोलक ददले गेले. खवासींचा दरोगा मुल्तफत खान याला दीड हजारी (२०० स्वार) ददली गेली.

अध्याय ४०

२५ माचम १६९६ ते १३ माचम १६९७

३०९

अध्याय ४० राजवटीचे चाळीसावे वषम – तहजरी ११०७-०८ २५ माचम १६९६ ते १३ माचम १६९७ **** [३८१] बुिवार, २५ माचम १६९६ / १ रमजान ११०७ ला तो इस्लामपुरीहून

सोलापूरकडे तनघाला. उपास करण्यासाठी, शुक्रावरचा नमाज व ईदच्या नमाजासाठी तो सतत मलशदीत जायचा. शाहजादा मुहम्मद काम बक्ष याचा मुलगा सुलतान मुही-उस-सुन्नत याने भेट घेतली, त्याला रोजचा भत्ता ददला गेला. शाहवदी खानाचा मुलगा शेर अफ्गान खान1 याला नरवरचा फौजदार नेमून त्याच्या मनसबीत वाढ दे ऊन त्याला दीड हजारी (१७०० स्वार) अशी मनसब ददली गेली. आसमलान खानाकडे हजारी होती, त्याला ५०० ची वाढ ददली गेली. तर्बिंयत खानाला २०० स्वारांची वाढ दे ऊन दोन हजारी (१२०० स्वार) ददली गेली. सय्यद अजमतुल्लाह खान याला ५०० ची वाढ दे ऊन दोन हजारी (९०० स्वार) ददली गेली. बक्षी-उल-मुल्क मुखललस खान याने बादशाहाला एक लक्ष बैत असले ले सैबचे काव्य (ददवान) सादर केले . त्याच्या बहुतेक कतवता जगातील सवोत्तम कतवतांपैक़ी असल्याचे मानले जाते व त्यातून नैततकता व अध्यात्माची लशकवण धमळते म्हणून बादशाहाने त्याचा स्वीकार केला. बरेच ददवस खालील गज़ल बादशाहाच्या दरबारात ऐकवली जायची आणण दरबारातील लोक ती गुणगुणायचे (गजल वगळली आहे). [३८२] महादे व डोंगराकडे शत्रूला िडा लशकवायला गेलेला तर्बिंयत खान परतला व त्याने

भेट घेतल्यावर त्याला एक अंगरखा ददला गेला. ददवंगत अमीर-उल-उमरा याचा मुलगा इततकाद खान याला राजा तबशनससिंहच्या जागी इस्लामाबादचा फौजदार नेमले गेले. रतववार2, २ ऑगस्ट १६९६ / १३ मुहरमम ११०८ ला रतफ-उल-कद्र व खुजजस्ता अख्तर

1

इंग्रजी अनुवादात शाहवदी खानाच्या मुलाचे नाव ‘Sher-afkan Khan’ असे ददले आहे पण फासी पाठात ‘क’ च्या जागी ‘ग’ असल्याचे ददसते (‫ )شن افگن خان‬त्यामुळे त्याचे नाव शेरअफगन ककिंवा शेरअफगान खान असे असावे.

2

इंग्रजी अनुवादात इथे सोमवार म्हटले आहे पण तप.जं. प्रमाणे रतववार आहे.

अध्याय ४०

२५ माचम १६९६ ते १३ माचम १६९७

३१०

यांना प्रत्येक़ी हजार स्वारांची वाढ ददली गेली. खटावचा ठाणेदार रामचंद्र1 याला वाढ दे ऊन दोन हजारी (१५०० स्वार दो अस्पा) ददली गेली. तर्बिंयत खानाने आणले ल्या िुंडीरावला दीड हजारी मनसब व महादे व डोंगराची ठाणेदारी ददली गेली. भदावरचा जमीनदार राजा कल्याणससिंह दरबारास भेटायला आला होता त्याला तनरोप ददला गेला. तो सात सदी (४०० स्वार) होता व आता त्याला २०० जात (तततकेच स्वार) अशी वाढ ददली गेली. खुदाबंदा खानाला मुरीद खानाच्या जागी अहदींचा बक्षी नेमले गेले. बादशाहाला कळले क़ी त्याच्या आदे शाप्रमाणे सोमवार, १३ जुलै १६९६2 / २२ जजल्हेज ११०७ ला पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम मुलतानकडे तनघाला होता. [३८३] आजम खानाचा मुलगा इरादत खान पतहला, त्याचा मुलगा इरादत खान दुसरा, नाव मुबारकुल्लाह याला औरंगाबादच्या पररसराचा फौजदार नेमले गेले व मूळ मनसब व वाढ िरून सात सदी (१००० स्वार) ददले गेले. संताला िडा लशकवायला तसेच दोड्डेरी गडाचा वेढा उठवायला गेलेला हमीदुद्दीन खान दरबारास परतला. त्याची प्रशंसा केली गेली व त्याला बहादुर ही उपािी ददली गेली. त्याच्या तवनंतीनुसार रुस्तुमददल खान व इतर सहकाऱ्यांना योग्य बढत्या ददल्या गेल्या. अहमदाबादचा नाजजम शुजाअत खान मुहम्मद बेग याला चार हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. बादशाहाला कळले क़ी ददल्लीचा सुभेदार आक़ील खान वारला. तो तवरक्त, स्वतंत्र वृत्तीचा, मोहपाशांपासून मुक्त व ब्स्थरबुद्धी होता. त्याने दक्षतापूवमक काम केले व तो त्याच्या सहकाऱ्यांशी गर्विंष्ठपणे वागायचा. महाबत खान इब्रातहम याला लाहोरचा सुभद े ार नेमले होते तेव्हा ददल्लीतील तकल्ला व राजवाड्याच्या इमारती बघायची अनुमती द्यावी असा त्याने बादशाहाला अजम केला होता. त्याप्रमाणे ‘आदे शानुसार’ अशी ललखखत अनुमती आक़ील खानाकडे पाठवली गेली. त्याने बादशाहाला उत्तर पाठवले क़ी, ‘मी या कारणास्तव त्याला (तकल्ल्यात) आमंतत्रत करणार नाही क़ी – सवमप्रथम म्हणजे तो हैदराबादी आहे व त्याच्या करमणुक़ीसाठी त्याला बादशाही राजवाडे बघून द्यावेत अशा पदावर तो नाही. दुसरे म्हणजे (आतल्या वस्तुंना) हात लावू नये म्हणून सवम खोल्यांची दारे बंद केली आहेत. 1

इंग्रजी व फासी पाठात याचे नाव ‘Ramchand’ (‫ )رام چند‬असे आले आहे. खटावकर इनामदारांच्या वंशजांनी प्रकालशत केले ल्या ‘मराठे शाहीचा उत्तरकाल आणण खटावकर इनामदार’ च्या प्रस्तावनेत याबद्दल मातहती ददली आहे.

2

इंग्रजी अनुवादात इथे २ जुलै ददले आहे पण तप.जं. नुसार १३ जुलै आहे.

अध्याय ४०

२५ माचम १६९६ ते १३ माचम १६९७

३११

दालनात गाललचे घातले ले नाहीत व बघण्यासाठी येणारा माणूस इतकाही महत्त्वाचा नाही क़ी त्याच्या करता राजवाडा स्वच्छ करून गाललचे घालावेत. [३८४] तसेही भेटीच्या वेळेस तो माझ्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही. त्यामुळे त्याला आत न घेण्याची अशी सगळी कारणे आहेत’. तो जेव्हा ददल्लीत आला व त्याची इच्छा प्रकट केली तेव्हा आक़ील खानाने त्याला आमंत्रण पाठवले नाहीच, पण त्याला तुटक व उद्धट उत्तर ददले व मग त्याला त्याच्या मुक्कामी परतायचे होते. खानाची अनेक वषांची सेवा, प्रामाणणकपणा व अढळ तनष्ठा पाहता बादशाहा त्याच्याकडे महत्त्वाची कामे सोपवायचा म्हणून त्याने त्याच्या या गर्विंष्ठपणा व हेकेखोरीकडे दुलम क्ष केले . त्याचे इतरही छं द होते. तो राझी या टोपण नावाने ललतहत असे व त्याने रचले ले काव्य व मसनवी तो मागे सोडू न गेला. मौलाना रूमी याच्या मसनवीतील सूक्ष्म गोष्टी सोडवण्यात तो स्वतःला अजोड समजायचा. स्वभावाने तो उदार व दयाळू होता. दरबाराहून ददल्लीला गेल्यानंतर काही काम नसले ल्या मुहम्मद यार खान याला ददवंगताच्या जागी ददल्लीचा सुभद े ार नेमले गेले. तो आिी अडीच हजारी (१५०० स्वार) होता, त्याला पाच सदी (तततकेच स्वार) ची वाढ धमळाली. सद्रुद्दीन खानाकडे दीड हजारी होती त्याला ५०० जात वाढ व मानाचे पद धमळाले . इक्कताज खानाचा मुलगा इक्कताज खान याला अब्दुस समद खानाच्या जागी आलाहाबाद प्रांतातील जहानाबाद कोराहची फौजदारी दे ण्यात आली. सलाबत खानाचा मुलगा तहव्वर खान सहारणपूरला फौजदार म्हणून गेला. लु त्फुल्लाह खानाच्या सैन्यातील अधिकारी छत्रसाल याला सरफराज खानाच्या जागी नुस्रताबाद सागरचा तकल्ले दार व फौजदार नेमले गेले. खान जमान फतह जंगचा मुलगा खान-इ-आलम हा सहा हजारी (४००० स्वार) होता, त्याला हजार स्वारांची वाढ धमळाली. त्याचा भाऊ मुनव्वर खान हा चार हजारी (२००० स्वार) होता, त्याला ५०० स्वारांची वाढ धमळाली. फतहुल्लाह खान दोन हजारी (५०० स्वार) होता, त्याला २०० स्वारांची वाढ धमळाली. [३८५] जाफराबादला सुभेदार म्हणून नेमणूक झाले ला खानाहजाद खान याने भेट घेतली.

अध्याय ४१

१४ माचम १६९७ ते २ माचम १६९८

३१२

अध्याय ४१ राजवटीचे ४१ वे वषम – तहजरी ११०८-०९ १४ माचम १६९७ ते २ माचम १६९८ रमजानची िार्मिंक कतमव्ये पार पाडायला बादशाहा इस्लामपुरीहून (ब्रह्मपुरी) सोलापूरला गेला होता. ईद-उल-तफत्रचा नमाज झाल्यावर (१३ एतप्रल १६९७ / १ शव्वाल ११०८) ला तो इस्लामपुरीला परतला. शाहजादा मुहम्मद काम बक्ष, उम्दत-उल-मुल्क व मुख्य छावणीत उपब्स्थत असले ले इतर लहान थोर नामदार यांनी भेटून नजराणे सादर केले . बक्षी-उल-मुल्क मुखललस खान याला मुलगा झाल्याबद्दल त्याने बादशाहाला नजर सादर केली व बादशाहाने त्याला मुहम्मद हसन असे नाव ठे वले . खान-इ-सामान फाजजल खान याचा मुलगा अब्दुर रहीम ददल्लीहून दरबारास आला. त्याच्या वधडलांनी धचनी कापडाचे काही नग सादर केले व त्याची प्रशंसा झाली. बंगालचा पदच्युत केले ला ददवाण तकफायत खान मीर अहमद याला ददवंगत रशीद खानाच्या जागी खालसा तवभागाचा पेशदास्त नेमले गेले. ददवान-इ-तानचा पेशदास्त व इनायतुल्लाह खानाचा मुलगा तहदायतुल्लाह याला त्याच्या वधडलांच्या जागी झीनतुस्त्न्नसा बेगमचा मीर-इ-सामान नेमले गेले. पलं गतोश खान [३८६] बहादुर याने मुलगा झाल्याबद्दल भेटवस्तू ददल्या. मुलाचे नाव रहमानवदी ठे वण्यात आले . फाजजल खानाने खान-इ-सामानच्या पदावरून राजीनामा ददला व त्याला अबू नसर खानाच्या जागी काब्श्मरचा सुभेदार नेमले गेले. खानाहजाद खानाला रुहुल्लाह खान ही उपािी दे ऊन खान-इ-सामानचे पद दे ण्यात आले . अबु नसर खानाला मुकरमम खानाच्या जागी लाहोरचा सुभेदार नेमले गेले व त्याला दरबारास बोलावण्यात आले . खुदाबंदा खानाला बादशाहाचा बयुतात नेमले गेले. राजा अनूपससिंहचा मुलगा सरूपससिंह याला त्याच्या वधडलांकडे पाठवण्यात आले . तो सात सदी (५०० स्वार) होता व त्याला तीनशे जात वाढ ददली गेली. मतलब खान व वाजजहुद्दीन खानाला शत्रूला परास्त करण्यासाठी इंदापूरकडे पाठवले गेले. खान तफरोज जंगचा मुलगा धचन कललच खान बहादुर त्याच्या वधडलांवर रुष्ट होऊन दरबारास आला. तो बादशाही छावणी जवळ आल्यावर एका मतहन्या नंतर त्याला भेट ददली गेली. इखलासकेश याला खान-इ-सामान रुहुल्लाह खान याचा पेशदास्त नेमले गेले. बीदर बख्त बहादुर याला एक अंगरखा व सोन्याच्या साजाचा एक इराक़ी घोडा दे ऊन

अध्याय ४१

१४ माचम १६९७ ते २ माचम १६९८

३१३

ितराव्या शतकातील िोन्यािे काम अिले ली ढाल (साभार MET)

बहादुरगड येथे शाह आललजाहकडे पाठवण्यात आले . मतलब खानकडे हजारी (४०० स्वार) होती, त्याला ५०० (१०० स्वार) वाढ ददली गेली. इहतमाम खान म्हणजेच अलाह यार याला लु त्फुल्लाह खानाच्या जागी आख्ताबेगी नेमले गेले. सलाबत खानाचा मुलगा तहव्वर खान [३८७] याला सहारणपूरच्या फौजदारी वरून काढल्यावर तो दरबारास आला व त्याला कुरखानाहचा दरोगा नेमले गेले. शाहजादा मुहम्मद अजीम याला इब्रातहम खानाच्या जागी बंगालचा सुभद े ार व कूचतबहारचा फौजदार नेमले गेले. इब्रातहम खानाला लसपाहदार खानाच्या जागी आलाहाबादचा सुभेदार नेमले गेले व त्याचा मुलगा जबरदस्त खान याला जौनपूरचा फौजदार नेमले गेले. सालाबादप्रमाणे पादशाहजादे , शाहजादे व बादशाहाच्या दरबारातील व प्रांतातील लहान थोर नामदारांना पावसाळ्याचे अंगरखे ददले गेले. लश्कर खान शाहजाहनी याचा नातू मुआतकाद खान याला सआदुल्लाह खानाचा मुलगा इनायत खान याच्या जागी बऱ्हाणपूर सुभ्याचा सेनापती नेमले गेले. दाराब बेग गुजमबदामरचा मुलगा झुब्ल्फकार खान याने प्रलशक्षणात चांगले गुण दाखवले व त्याला ददवान-इ-खासच्या पागेचा मुश्रीफ नेमले गेले. मुल्तफत खान व इनायतुल्लाह खान यांना माणकाच्या अंगठ्ा ददल्या गेल्या. इस्माईल खान माखा याला अब्दुर रज्जाक खान लारी याच्या जागी इस्लामगड रायरीचा फौजदार नेमले गेले व त्याला आददलखानी कोकणाची फौजदारी ददली गेली.

अध्याय ४१

१४ माचम १६९७ ते २ माचम १६९८

३१४

भीमेिा महापूर (पुरुषाथामची खरी) परीक्षा पाहणाऱ्या या मायावी जगातील एक तवस्मयकारक घटना म्हणजे पोटात संकटे दडवून उिाण आले ला समुद्र व काळ्या मेघांच्या गडगडाटात सवमत्र लखलखणारी तवद्युल्लता. सोमवार, १९ जुलै १६९७ / १० मुहरमम ११०९ ला भीमा नदीने नोहाच्या पूराची (जगबुडी) दुसरी आवृत्ती सादर केली. लांबवर झाले ल्या अततवृष्टीमुळे [३८८] खालच्या भागात पूराचे प्रचंड लोट वाहू लागले . त्याच्याकडे बघूनच माणसाचे प्राण जात होता त्यामुळे त्याकडे बघायचा ही कोणाचा िीर होत नव्हता. प्रत्येक क्षणाला त्याचा ओघ, हानी व रुद्रावतार वाढत होता. * * * * बहादुरगडापासून तीस कोसावर शाह आलीजाहची छावणी होती. व्यापाऱ्यांनी गोळा केले ले खाण्याचे सामान व जळणाचा लाकुडसाठा नदी बरोबर वाहत खाली आला. पुराच्या प्रकोपाने अनेक गावे पूणमपणे उध्वस्त झाली. नदीच्या उग्र प्रवाहात झापांवर बसले ले लोक व गुरे वाहून जात होती. मांजर व उंदीर यांसारखे नैसर्गिंक शत्रूही जीवाच्या भीतीने थरथरत, एकमेकांकडे बघत शांतपणे वाहून जात होते. पाणी जसे सगळ्या सपाट प्रदे शात पसरले तसे उम्दत-उल-मुल्क आसद खान, मुखललस खान व इतरांच्या छावण्यांमध्ये लशरले . यापैक़ी अनेकांनी भरपूर पैसा खचम करून नदीच्या काठावर सुद ं र महाल बांिले होते ते सगळे पाण्याने उध्वस्त झाले . हे श्रीमंत लोक होड्यांमध्ये बसून हेलकावे खात सुरणक्षत दठकाणी पोहोचले . इतरांना मालमत्तेबरोबर जीवही गमवावा लागला. * * * * [३८९] वाला शुकोह याचा महाल असले ल्या टे कडीवर शाह आललजाह, काम

बक्ष व इतर लहान थोर लोकांचे तंबू होते. ही टे कडी सािारण चाळीस याडम उंच होती. तीन ददवसात यातले फक्त चार याडम पाण्याच्या वर उरले होते. ईश्वराच्या कृपेने ततसऱ्या ददवशी मध्यरात्री पाणी कमी होऊ लागले व लोकांची पाण्याच्या वेढ्यातून सुटका झाली. * * * * खान जहान बहादुर जफर जंग याचा आजार बळावला तेव्हा शतनवार, २० नोव्हेंबर १६९७ / १६ जमाद-उल-अव्वल ११०९ ला बादशाहाने त्याच्या घरी भेट ददली. खान अंथरुणाला खखळू न होता व त्याला उठता आले नाही. बादशाहा मसनदीवर बसला

अध्याय ४१

१४ माचम १६९७ ते २ माचम १६९८

३१५

होता व खानाला बादशाहाच्या पावलाचे चुंबन घेता येत नाही याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. तो म्हणाला क़ी, ‘मला युद्धात मरून बादशाहाची सेवा करायची इच्छा होती’. बादशाहा उत्तरला क़ी, [३९०] ‘तू आयुष्यभर तनष्ठेने माझी सेवा करत रातहलास तरी तुझी इच्छा पूणम झाली नाही म्हणतोस !’ िन्य आहे, सेवकाच्या तनष्ठेची व िन्याच्या उपकारांची ! मंगळवार, २३ नोव्हेंबर १६९७ / १९ जमाद-उल-अव्वल ११०९ ला खान वारला. तो

खूप मोठा नामवंत, पुण्यवान व गुणवान तसाच एक कुशल सेनापती होता. त्याच्या सभेत कायम शोभा असायची व तो सोडू न इतरांना फार कमी वेळा बोलायची आवश्यकता भासायची. तो स्वतःच काय हवे आहे ते सांगायचा. त्यामुळे इतरांना ‘होय, ते योग्यच आहे’ असे म्हणण्या लशवाय फारसे काही बोलायला उरायचे नाही. त्याला फारसे बोलायला आवडायचे नाही. त्याच्या सभांमध्ये बहुतेक वेळा काव्य, गद्य, तलवार, रत्ने, घोडे, हत्ती व कामोत्तेजक पदाथम हे चचेचे तवषय असायचे. त्याने इतक्या मोतहमा व शौयम पूणम गोष्टी केल्या आहेत क़ी त्यातील थोड्या सुद्धा इथे नोंदवता येणार नाहीत. शुक्रवार, २४ धडसेंबर १६९७ / २० जमाद-उस-सानी ११०९ ला काम बक्ष याला बेरारचा सुभेदार केले गेले. त्याच्याकडे वीस हजारी (७००० स्वार) होती व आता तीन हजारी स्वार वाढ ददली गेली. त्याचा ददवाण मीराक हुसैन याला त्याचा सहाय्यक म्हणून पाठवण्यात आले . उम्दत-उल-मुल्कच्या आजारामुळे त्याला सही करणे अशक्य झाले होते. कारभार करता यावा म्हणून बादशाहाने इनायतुल्लाह खानाला सही करायला सांतगतले . उम्दत-उल-मुल्क आसद खानाने जुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग याचे पत्र बादशाहाच्या समोर ठे वले . त्यात म्हटले होते क़ी इस्लामी वीरांनी ईश्वराच्या मदतीने [३९१] जजिंजी जजिंकले आहे. एका उंच डोंगरावर बांिले ला आणण कनामटकातील

तकल्ल्यांमध्ये उंची, युद्ध सामग्री व संरक्षक क्षमता यात प्रलसद्ध व प्रबळ असले ला जजिंजी जजिंकताना त्याने बरेच कातफर मारले . या तकल्ल्यात लपले ला तो नीच रामा या सदै व यशस्वी होणाऱ्या सैन्याचा प्रताप व प्रकोप बघून इतका भयभीत झाला क़ी त्याचे कुटुं ब, मालमत्ता व इतर गोष्टी मागे सोडू न तो ततथून पळू न गेला. सोमवार, ७ फेब्रुवारी १६९८ / ६ शाबान ११०९1 ला सात तकल्ले असले ली भक्कम जागा बळाने जजिंकून (मुघल) साम्राज्यात जोडली गेली. त्या दुदै वी कातफराच्या चार बायका, तीन मुले, दोन मुली व

1

इंग्रजी अनुवादात इथे १६ शाबान म्हटले आहे पण फासी पाठात शशमे (६) शाबान आहे.

अध्याय ४१

१४ माचम १६९७ ते २ माचम १६९८

३१६

सेवकांना अटक केली गेली. तसेच कनामटक प्रांतातील सुमारे शंभर इतर तकल्ले व युरोपीय लोकांची काही बंदरे साम्राज्यात आली. त्या प्रांतातील प्रबळ व श्रीमंत लोकांनी खान बहादुरच्या करवी बादशाहाला सुयोग्य नजराणे पाठवले . उम्दत-उल-मुल्कला या सवोत्तम कामतगरीसाठी [३९२] हजारी स्वारांची वाढ दे ऊन सात हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. नुस्रत जंग याला हजार स्वारांची वाढ दे ऊन पाच हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. नुस्रत जंगच्या सैन्यातील एक अधिकारी राव दलपत याला या युद्धात त्याने घेतले ल्या अपार कष्ट व मेहनतीबद्दल अडीच हजारी (१३०० स्वार) वर पाच सदी (२०० स्वार) अशी वाढ ददली गेली. जजिंकले ल्या तकल्ल्याला नुस्रतगड असे नाव ददले गेले. मुख्तार खानाच्या जागी आग्र्याला सुभेदार म्हणून नेमले ल्या इततकाद खान याला काही अटी घालू न ददले ले ५०० स्वार तवनाअट केले गेले व त्याला नगारे ददले गेले. लसयादत खान साथीच्या रोगाने मरण पावला. त्याच्या मुलाला त्याची उपािी ददली गेली व इतर नातलगांना दुखवट्याची वस्त्रे व बढत्या ददल्या गेल्या. तो वारल्यामुळे ररते झाले ले ददवानए-खास च्या दरोगाचे पद रुहुल्लाह खानाला त्याच्या खान-इ-सामान या पदाबरोबर अततररक्त पदभार म्हणून दे ण्यात आले . काझी अब्दुल्लाह सद्र झाला.

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३१७

अध्याय ४२ राजवटीचे बेचाळीसावे वषम – तहजरी ११०९-१० ३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९ [३९३] * * * * गेल्या वषी प्रमाणे या वषीही बादशाहा रमजान मतहन्यातील

िार्मिंक कायामसाठी सोलापूरला गेला. २ एतप्रल १६९८ / १ शव्वाल ११०९ ला ईद-उलतफत्र होती. बहादुरगडाहून दरबारास पाचारण करण्यात आले ला शाहजादा बीदर बख्त बहादुर दे वगावात थांबला. बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान व मीर तुझुक मनसूर खान त्याचे स्वागत करायला पुढे गेले व त्याला बादशाहाकडे घेऊन आले . दरबार-ए-आम मध्ये भेट होण्यापूवी ते मलशदीत भेटले . त्याला माणणक व पाचूचा लशरपेच व एक अंगरखा, एक रत्नजधडत पहुंची, एक घोडा व एक हत्ती दे ऊन पन्हाळ्याकडे पाठवले गेले. त्याच्या सैन्यातील अधिकाऱ्यांचा ही सुयोग्य सन्मान गेला गेला. भागू बंजारा बादशाहाकडे पतहल्यांदा आला तेव्हा त्याला पाच हजारी (४००० स्वार) ददली होती पण तो नंतर शत्रूला धमळाला. आता तो परत आल्यावर त्याला आिीची श्रेणी ददली गेली व एक अंगरखा, एक घोडा व एक हत्ती ददला गेला. माझा दरबार हा तनराशेचा दरबार नाही, शंभर वेळा पश्चात्ताप करून जरी तुमचे मन तफरले असेल तरी पुन्हा (माझ्याकडे) या काझी अब्दुल्लाह याला अिांगवायूचा झटका येऊन तो वारला. ददल्लीतील एक वंशपरंपरागत काझी मुहम्मद अक्रम औरंगाबादचा काझी म्हणून काम करत होता. त्याला दरबारास बोलावून बादशाही छावणीचा काझी तनयुक्त केले गेले. इनायतुल्लाह खानाला आज्ञा झाली क़ी सद्र तवभाग ददवाणीत मोडत असल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी सद्र तनयुक्त करेपयंत सद्रचा सहाय्यक म्हणून त्याने काम पाहावे. तो नऊ सदी (७० स्वार) होता व त्याला एक सदी (३० स्वार) ची वाढ ददली गेली. बादशाहाने नूर-उल-हक करवी त्याच्या भावाला, शेख-उल-इस्लाम याला [३९४] आमंत्रण दे ऊन दरबारास भेट घेण्यासाठी येण्याचे प्रशंसा करणारे फमामन पाठवले . काझी पदावरून त्याने राजीनामा ददल्यावर आणण पतवत्र स्थानांना (मक्का मदीना) भेट दे ऊन आल्यानंतर तो दरबारास आला नव्हता व अहमदाबादला राहत होता. बादशाहाची इच्छा होती क़ी तो दरबारास

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३१८

आल्यावर त्याला मान्य असल्यास त्याला सद्र नेमावे. तो पुण्यवान माणूस दरबारास यायची तयारी करत असताना एका दुिमर आजाराने त्याला ग्रासले व त्याला ज्या जगाची ओढ लागली होती ततथे तो लगबगीने गेला (वारला). बादशाहाने तफरोज जंग खानाच्या सैन्यात असले ल्या मुहम्मद आमीन खानाला तातडीने दरबारास यायला सांगन ू त्याला सद्रचे पद ददले . अमानत खानाचा जावई अशमद खान अबुल आला हा काबूलची सेवा संपवून दरबारास आला. त्याला ददवंगत तकफायत खानाच्या जागी खालशाचा ददवाण नेमले गेले. बातमी आली क़ी गुरूवार, २८ एतप्रल १६९८ / २७ शव्वाल ११०९ ला काबुलचा सुभेदार आमीर खान याचा मृत्यू झाला. तो एक अततशय परोपकारी नामवंत, गौरवशाली, बादशाही सत्तेतील एक प्रमुख सेवक व एक तनष्ठावंत सक्षम अधिकारी होता. काबुल प्रांताचा कारभार लावून तो प्रांत व्यवब्स्थतपणे चालवणे हे त्याने केले ले फार मोठे काम होते. बादशाहाचा त्याच्यावर प्रचंड तवश्वास होता. तो बादशाहाचा मावसभाऊ होता व बादशाहाच्या मंचकारोहणापूवी त्याने उत्तम सेवा करून तो चाररत्र्य संपन्न असल्याचा जणू दाखलाच ददला होता. त्यामुळे बादशाहाला त्याच्या मृत्यूचे अतोनात दुःख झाले . त्याने पादशाहजादा मुअज्जम याला ५०००० रुपयांचा लशरपेच दे ऊन काबुलचा कारभार त्याच्या हातात घेण्याचा आदे श ददला. शुक्रवार, २० मे १६९८ / २० जजलकदा ११०९ ला अहमदाबादचा सुभद े ार शुजाअत खान याच्या मध्यस्तीने दुगामदास राठोड याने क्षमा मागण्याच्या उद्दे शाने मुहम्मद अकबर याचा मुलगा बुलंद अख्तर याला दरबारास आणले . पादशाहजादा अकबर राठोडांच्या प्रदे शात भटकत असताना या मुलाचा जन्म झाला होता व तो दे शातून पळू न गेला तेव्हा याला इथेच ठे वून गेला होता. साम्राज्यात गडबड व गोंिळ तनमामण व्हावा या हेतूने रजपूतांनी त्याला वाढवले होते. भेटीच्या वेळी दुगामदास हात बांिून दरबारात आला. बादशाहाने त्याचे हात सोडण्याचा आदे श ददला व त्याला एक अंगरखा, रत्नजधडत खंजीर व तीन हजारी (२५०० स्वार) ददली गेली. बुलंद अख्तर याने खाजगी खोलीत भेट घेतली व त्याला एक अंगरखा व लशरपेच ददला गेला. त्याची गुलालबाडीतच राहायची सोय केली गेली. ददवंगत खान जहान बहादुर याचा मुलगा अबुल फतह खान याला एक अंगरखा व एक घोडा दे ऊन त्याच्या लग्नासाठी त्याला ददल्लीला जायची अनुमती ददली गेली. तहम्मत खानाचा मुलगा व इस्लाम खानाचा नातू नेकनाम खान याला बीदर बख्त बहादुरच्या

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३१९

सैन्याचा बक्षी व वाकनतवस नेमन ू एक सदी (२०० स्वार) ची वाढ दे ऊन हजारी (३०० स्वार) ददली गेली. धचन कललच खान बहादुर तवजापूर जवळ शत्रूला परास्त करून दरबारास परतला. मुनीम खानाच्या मध्यस्तीने सत्वा डाफळे याने भेट घेतली व त्याला सहा हजारी (५००० स्वार) व नगारे ददले गेले. बक्षी-उल-मुल्क मुखललस खानाला तीन हजारी (२०० स्वार) ददली गेली. तरबीयत खान [३९६] मीर आततश याला शत्रूची छावणी मोडायला बेरारकडे पाठवले होते, त्याला अडीच हजारी (१२०० स्वार) ददली गेली. खानइ-सामान रुहुल्लाह खान याला ही तेवढीच मनसब धमळाली. ददवंगत शेख मीर याचा मुलगा मुहतशाम खान याला पदच्युत केल्यानंतर परत घेतले गेले व त्याला दोन हजारी (१००० स्वार) धमळाली. धचन कललच खान बहादुर याला पट्टा असले ला खंजीर दे ऊन शत्रू तवरुद्ध कोट्याला पाठवण्यात आले . िमांतर करून मुसलमान केला गेलेला छत्रमालचा मुलगा हेदायतकेश भोलानाथ याला त्याचा बाप नरकात गेल्यानंतर प्रमुख वाकनतवस नेमले गेले. मुर्शिंद कुली खान याचा मुलगा फजल अली खान याला मुलतानचा ददवाण नेमले गेले. मुल्ला अब्दुल कालसम याला औरंगाबादला शाह आलीजाहच्या आईच्या कबरीपाशी कुराण पठण करायला रोज एक रुपया ददला जात होता. त्याला नवीन दख्खनी मनसबदार म्हणून (बादशाही सेवेत) प्रवेश धमळाला व त्याच्या गुणवत्तेमुळे तो उच्च अधिकारी होऊन काम बक्षचा पतहला बक्षी व तवजापूरचा ददवाण झाला व त्याला दराईत खान ही उपािी ददली गेली. तो म्हणत असे क़ी, ‘मला काव्याची ही गोडी आहे’. त्याच्या चाणाक्ष वत्तीमुळे त्याने तेजहुश हे टोपण नाव घेतले . हमीदुद्दीन खान बहादुर तवजापूरला एक मंददर पाडू न ततथे मशीद बांिायला गेला होता. त्याने आदे शाचे उत्तम ररत्या पालन केल्याबद्दल दरबारात परतल्यावर त्याची भरपूर प्रशंसा केली गेली व त्याला घुसलखान्याचा दरोगा नेमून बादशाहाच्या जवळचे पद ददले गेले. अक्सर अली खान हैदराबादी याला काम बक्षच्या जागी बेरारचा सुभद े ार नेमले गेले. मुहम्मद आमीन याला दरबारास आल्यावर [३९७] कहिंदुस्तानचा सद्र हे पद तसेच पाचूच्या व चांदीचा मुलामा असले ल्या तीन अंगठ्ा

ददल्या गेल्या. मुहम्मद अक्रम औरंगाबादहून दरबारास आला व त्याने बादशाही छावणीचा काझी म्हणून काम हाती घेतले . हैबतुल्लाह अरब याने हैदराबादहून बादशाहाला दे ण्याच्या लायक़ीच्या वस्तु आणल्या होत्या त्या त्याने सादर केल्या. त्यात मुल्ला अब्दुल्लाह (खानसाम्या) याने ललतहले ल्या ‘नेहैया’ ची एक प्रत होती. बादशाहाकडे याचा

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३२०

पतहला खंड होता व त्याला दुसऱ्या खंडाची आस लागली होती. त्याने त्या माणसाला एक हत्ती, ५० स्वारांची वाढ, हजारीची मनसब व १००० रुपये ददले . बुखाऱ्याचा कुतबुद्दीन याने भेट घेतली. भेटीच्या ददवशी त्याला एक अंगरखा, १०००० रुपये, २०० मोहरांच्या वजनाची एक मोहर, २०० रुपयांच्या वजनाचा एक रुपया तसेच तनरोपाच्या ददवशी एक हत्तीण व १५००० रुपये ददले गेले. अविचा सुभेदार जबरदस्त खान याला वाढ दे ऊन तीन हजारी (२५०० स्वार) ददली गेली. फतहुल्लाह खानाला एक अंगरखा व मुलाम्याचा खंजीर दे ऊन परांड्याच्या परीसरात टे हळणी करण्यासाठी नेमले गेले.

ख्वाजा याकुत बाणाने जखमी होतो काम बक्षचा नाजजर ख्वाजा याकुत त्याच्या िन्याप्रती अत्यंत प्रमाणणक व तनष्ठावंत होता त्यामुळे तो किीकिी त्याला कटू वाटतील अशा, पण सत्य गोष्टी सांगायचा. [३९८] यामुळे पादशाहजाद्याच्या सेवेत असले ल्या काही जवळच्या पण उद्धट लोकांचा अपमान होत असे. या दुष्टांनी त्याला बाणाने मारून टाकायची तयारी केली. सोमवार, १२ धडसेंबर १६९८ / १८ जमाद-उस-सानी १११० ला तो पादशाहजाद्याच्या घरून स्वतःच्या घरी जात असताना संिीची वाट बघत वाटे त उभ्या असले ल्या एका दुष्टाने त्याला भाल्यासारखा तद्वशूली बाण मारला. त्याचे दै व बलवत्तर असल्याने रक्षणकत्यामने (ईश्वर) त्याच्या हाताची ढाल करून तो बाण त्याच्या पोटात जाण्यापासून रोखला. नाहीतर तो मारला गेला असता. मारणारा शक्त़ीशाली असला तरी वाचवणारा अधिक शक्त़ीशाली असतो बादशाहाला हे कळल्यावर * * * त्याच्या सेवकांचे रक्षण करण्यासाठी त्याने याची चौकशी करायचे ठरवले व पादशाहजाद्याच्या सेवेतील पाच जमादारांना अटक करून या बाण मारणाऱ्याला शोिायचा आदे श कोतवालाला ददला गेला. चार जणांनी स्वतःहून कोतवालाकडे समपमण केल्यावर कोतवालाने कळवले क़ी या प्रकरणामागे पादशाहजाद्याचा कोका होता. बादशाहाने आदे श ददला क़ी पादशाहजाद्याच्या बक्षीने [३९९] त्याला त्याच्याकडे आणावे. बक्षीने त्याची प्रशंसा करून त्याला भुलवून बादशाही

छावणी जवळ आणले पण काही नीच लोकांच्या धचथावणीमुळे तो तफरला. तो काय करू शकत होता ? त्याचे दै वच तफरले होते. ख्वाजा मुहम्मद याने बादशाहाला कळवले क़ी, ‘तो येणार नाही व तो आज्ञाभंग करायच्या तयारीत आहे’. बादशाहाने आदे श ददला क़ी

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३२१

पादशाहजाद्याने त्याला छावणीतून हद्दपार करावे. पादशाहजाद्याने त्याला बोलावले , २०० अशरफ़ी, एक तंबू व भोई दे ऊन त्याला पाठवून ददले . पण त्याला असे घालवले गेल्यामुळे पादशाहजादा रुष्ट झाला. त्याने अजून नदी पार केली नव्हती तेव्हा बादशाहाने पादशाहजाद्याला संदेश पाठवला क़ी त्याला घेऊन दरबारास येऊन त्याच्या वतीने बादशाहाकडे क्षमा मागावी. पादशाहजाद्याने त्याला बोलावले व दरबारास घेऊन आला. बादशाहाला हे कळल्यावर त्याने पादशाहजाद्याला सांतगतले क़ी कोकाला ददवान-एखास मध्ये ठे वून भेटायला ये. पादशाहजाद्याने उलटा संदेश पाठवला क़ी, ‘हा माणूस व मी एकाच वेळी भेटायला येऊ’. असे म्हणून त्याने त्याचा बालाबंद काढू न तो त्या कोकाच्या व स्वतःच्या कंबरे भोवती एकत्र बांिला. ही वाईट कृत्ये बादशाहाला कळवल्यावर त्याने त्याला अदालतगाह मध्ये थांबायला सांतगतले . मग आदे शानुसार बक्षी-उल-मुल्क मुखललस खान याने त्याला समज द्यायचा प्रयत्न केला. पण त्याचे दै व त्याला साथ दे त नसल्यामुळे त्याने त्याचे काही ऐकले नाही. त्या अतनष्ट धमत्राला पादशाहजाद्यापासून वेगळे करण्याचा आदे श हमीदुद्दीन खान बहादुरला ददला गेला. पादशाहजाद्याने त्याची कट्यार काढली व खानाने ती त्याच्या हातातून काढू न घेण्यासाठी त्याचा हात पकडला. खानाला थोडे कापले पण ईश्वराच्या दयेने पादशाहजाद्याला काही झाले नाही. आणण जे व्हायचे होते ते त्या नीच माणसाला झाले . [४००] हे सगळे कळल्यावर, रत्नशाळे जवळ एक तंबू ठोकून लशक्षा म्हणून पादशाहजाद्याला त्यात बंददस्त करावे तसेच कोकाला लशक्षा म्हणून तुरुंगात टाकावे असा बादशाहाने आदे श ददला. पादशाहजाद्याची मनसब काढू न घेण्यात आली व त्याची मालमत्ता, सामान, पदाची धचन्हे वगैरे सगळे जप्त केले गेले. बादशाहाच्या आदे शानुसार पादशाहजाद्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना त्याच्या समोर बोलावले गेले व त्यांना अंगरखे दे ऊन बादशाही सेवेत घेतले गेले. त्यावेळी गाझीउद्दीन खान तफरोज जंग याने पाठवले ले संताचे डोके दरबारास पोहोचले व दख्खनच्या प्रमुख प्रांतातून त्याची चििंड काढायचा आदे श ददला गेला. या पुस्तकात या नीच माणसाबद्दल अनेकदा काही मातहती ददली गेली आहे, त्याचा उरले ला इततहास असा आहे – दोड्डेरीचे प्रकरण व तहम्मत खान बहादुर याच्या मृत्यू नंतर संताला जजिंजीकडे जायचे होते. हमीदुद्दीन खान बहादुरला रुहुल्लाह खानाच्या सैन्यातून बाहेर पडू न त्याचा पाठलाग करायचा बादशाही आदे श गेला. तो ततथे गेला व त्याच्याशी युद्ध

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३२२

करून कालसम खानाचे काही हत्ती त्याने परत धमळवले . मग खानास आदे श गेला क़ी बीदर बख्त याला त्याच्या मागे जायचा आदे श ददला आहे व ज्या अधिकाऱ्यांना शाहजाद्याकडे तनयुक्त केले आहे त्यांना ततथे सोडू न त्याने (खानाने) दरबारास परतावे. शाहजाद्याच्या त्याच्याशी अनेक लढाया झाल्या पण प्रत्येक वेळी तो नीच सुरणक्षतपणे पळू न गेला. राजा रामाला घेऊन जाणाऱ्या िना जािव याच्याशी त्याचे जुने वैर होते. त्यामुळे जजिंजीला जाताना [४०१] त्याची िनाशी झटापट झाली. संताचा तवजय झाला व त्याने िनाचा सहाय्यक व नागोजीचा1 मेहुणा अमृतराव, याला पकडू न हत्तीच्या पायी ददले . त्याने राजा रामाला पण पकडले पण िना तनसटला. दुसऱ्या ददवशी संता हात बांिून राजा रामाच्या समोर आला व म्हणाला क़ी, ‘मी पूवीचाच सेवक आहे. तुम्ही िनाला माझ्या बरोबरीचा मान ददलात व जजिंजीला त्याच्या मदतीने जायचे ठरवले त म्हणून मला राग अनावर झाला. आता तुम्ही सांगाल ती सेवा मी करायला तयार आहे’. त्याने राजा रामाला सोडले व जजिंजीला घेऊन गेला. जुब्ल्फकार खान बहादुरशी लढण्यात, काम बक्षला धचथावणी दे ण्यात, वेढ्यात गोंिळ उडवून दे ण्यात व इस्माईल खान माखाला पकडण्यात याचा मोठा हात होता. जेव्हा तकल्ला पडला तेव्हा तो राजा रामा बरोबर पळाला व साताऱ्या जवळ असले ल्या िनाशी लढायला गेला. िना बरोबर झाले ल्या युद्धात दै वाने संताची साथ ददली नाही व त्याचा पूणम पराभव झाला. तो ततथून पळाला व काही लोकांबरोबर नागोजीच्या जमीनदारीत गेला. नागोजीने त्याला तवनम्रपणे आसरा ददला पण त्याच्या बायकोच्या भावाला (अमृतराव) संताने मारले होते. संताला जजवे जाऊ दे ऊ नका असे ततने नागोजी व ततच्या दुसऱ्या भावाला तवनवले . नागोजीने त्याला मोठ्ा मनाने तनरोप ददला पण ततचा भाऊ त्याच्या मागे सूड उगवायला गेला. त्यावेळी संताच्या [४०२] मागे जाण्याचा बादशाही आदे श तफरोज जंग याला धमळाला व त्याचे, बीदर बख्त

व हमीदुद्दीन खान या सवांचे सैन्य त्याच्या हाताखाली ददले गेले. सजावल म्हणून तनयुक्त केले ल्या मतलब खानाला ही बातमी धमळताच तो संतावर चालू न गेला. याचे वृतांत वेगळे आहेत पण एकतर खानाने त्याला नरकात पाठवले ककिंवा ज्याला सूड उगवायचा होता (नागोजी मानेचा दुसरा मेहुणा) त्याने त्याला मारले . असे करून त्याचे डोके तफरोज खानाच्या हातात पडले व त्याने ते बादशाहाकडे पाठवले . * * * * या सवोत्तम

1

फासी पाठात याचा उल्ले ख मानकोजी असा आहे पण इंग्रजी अनुवादात नागोजी म्हटले आहे.

अध्याय ४२

३ माचम १६९८ ते २० फेब्रुवारी १६९९

३२३

कामतगरीबद्दल खानाला एक पगडी धमळाली व त्याची प्रशंसा केली गेली. मतलब खानाला ५०० ची वाढ धमळाली.

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३२४

अध्याय ४३ राजवटीचे त्रेचाळीसावे वषम – तहजरी १११०-११ २१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७०० बादशाहा रमजानचा मतहना व ईद साजरी करायला सोलापूरला गेला. काम बक्ष याचा जनानखाना बुनगाह (मुख्य छावणी) हून ततथे घेऊन यायचा आदे श मनसूर खानाला ददला गेला. ददवंगत आततश खानाच्या जागी मामूर खानाला कनामटकचा फौजदार नेमले गेले. हमीदुद्दीन खान बहादुर [४०३] याला ददवंगत मुहरमम खानाच्या (ख्वाजा मुहरमम अलीमदम न खानी) जागी दुसऱ्या रत्नशाळे चा दरोगा नेमले गेले. रुस्तम खान बहादुर शाहजहानीच्या नातलगांपैक़ी एक रुस्तम बेग खान लसरकालसयान हा नुकताच भारतात येऊन सेवेत दाखल झाला होता, त्याला याहया खानाच्या जागी मंगळवेढ्याचा तकल्ले दार नेमले गेले. बादशाहाने आदे श ददला क़ी काम बक्ष याने हसनबाडीच्या मलशदीत झुह्रचा नमाज व अस्रचा नमाज बादशाहा बरोबर करावा. पादशाहजाद्याचा पदच्युत ददवाण व नायब मीरक हुसैन याने बादशाही पैशाचा मोठ्ा प्रमाणात गैरव्यवहार गेला होता. त्याला कोठडीत ठे वून त्याच्याकडू न जजतके येणे आहे ते ददवाणी अधिकारी सांगतील त्याप्रमाणे वसूली करावी असा आदे श सरबराह खान कोतवालचा सहाय्यक मुहम्मद आमीन याला ददला गेला. मला हा भला माणूस मातहत होता, त्याच्यात अनेक चांगले गुण होते पण त्याला व्यवहाराची जाण नव्हती. जगात ज्या अनेक कुप्रलसद्ध व चुक़ीच्या गोष्टी प्रचललत आहेत त्यातील एक ही आहे क़ी – काही नीच लोकांच्या व स्वतःच्या सेवकांच्या स्तुतीने आपली खरीखुरी क्षमता व प्रमाणणकपणा याबद्दल हुरळू न जाणाऱ्या दोन तीन नामवंतांप्रमाणे, ज्यांची नावे इथे दे णे अनावश्यक आहे, तो सुद्धा अशाच खोट्या प्रततष्ठेच्या आहारी गेला होता. शेवटी हे सगळे प्रकरण उघडक़ीस आले . तो सुभ्याचा नायब असताना, त्याची नीच मुले, घात करणारे इतर नातलग, बनेल फक़ीर, वाक्चतुर व फसवे लोक यांनी तो गातफल व अननुभवी आहे याचा फायदा घेत, त्याचा तवश्वास संपादन, बादशाहा व पादशाहजाद्याच्या पैशांचा अपहार करून स्वतः आपापल्या घरी पळाले व याला अटकेत खखतपत पडावे लागले . [४०४] थोडक्यात, मुखललस खान, मुल्तफत खान व इनायतुल्लाह खान यासारख्या काही पुण्यवान नामवंतांना शेवटी त्याची क़ीव आली व

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३२५

त्याला मदत करण्यासाठी त्यांनी बादशाहाकडे रदबदली केली. त्याला अटकेतून सोडले गेले पण त्यानंतर मात्र मृत्यू त्याच्याकडे येईपयंत तो किी सावरला नाही. आदे शानुसार खुदाबंदा खान छावणीची सुरक्षा करायला गेला व उम्दत-उलमुल्क ईदच्या नमाजासाठी दरबारास आला. ईदच्या ददवशी काम बक्ष बादशाहाच्या धमरवणुक़ीत घोड्यावर बसला होता. (अनेकांनी) बादशाहाला पेशकश ददली. (ईद तनधमत्त) बक्षीसे व उपहार दे ण्यात आले . बुलंद अख्तर ईदच्या अणभवादनासाठी आला. ददवान-इ-खासच्या दरोगा पदावरून रुहुल्लाह खानाची बदली केल्यावर त्याला आिीच्या अडीच हजारीत पाच सदीची वाढ दे ण्यात आली. तहदायतुल्लाह खानाने मुलाचा जन्म झाल्याबद्दल नजर सादर केली. दख्खनच्या तोफखान्याचा प्रमुख मनसूर खान याने कळवले क़ी कमरानगडचा (कनूमल) तकल्ले दार व त्याचा भाऊ युसुफ खान याने त्या भागात बंडखोर अकबर या नावाने लोकांना मातहत असले ल्या एका माणसाला पकडू न पाठवले होते. त्याला हमीदुद्दीन खानाकडे दे ण्याचा आदे श ददला गेला. गुरूवार, २० एतप्रल १६९९ / २९ शव्वाल १११० ला काम बक्ष एका तंबूपाशी गेला व त्याची एक साखळी गुलालबाडीच्या बाहेर ठोकली. मंगळवार, १६ मे १६९९ / २६ जजल्कदा १११० ला राणा अमरससिंहाच्या दतांनी भेट घेतली. त्यांनी पेशकश म्हणून एक हत्ती, दोन घोडे, नऊ तलवारी व चामड्याच्या नऊ तवजारी सादर केल्या. [४०५] कामगार खान व रूपससिंहाचा मुलगा राजा मानससिंह हे दोघे अडीच हजारी होते, त्यांना प्रत्येक़ी ५०० ची वाढ धमळाली. खान तफरोज जंगचा भाऊ अब्दुर रहीम खान हा हजारी होता, त्याला ५०० ची वाढ धमळाली. मंगळवार, ३० मे १६९९ / १० जजल्हेज १११० ला बादशाही लवाजमा ईदगाहला जाऊन येण्यापूवीच काम बक्ष ततथे जाऊन आला. रतववार, १८ जून १६९९ / २९ जजल्हेज १११० ला त्याला वीस हजारीवर परत घेतल्याबद्दल त्याने अणभवादन केले . शतनवार, २४ जून १६९९ / ६ मुहरमम ११११1 ला धचन कललच खान बहादुर हा कोट्याजवळ शत्रूला परास्त करून दरबारास परतला. बादशाहाने बक्षी-उलमुल्क मुखललस खान याला आदे श ददला क़ी त्याचे स्वागत करायला तकल्ल्याच्या दरवाज्यापयंत पुढे जाऊन त्याला बादशाहाकडे घेऊन यावे. त्याला ५०० (२०० स्वार)

1

ّ ‫‘ )ششم‬शशम-ए-मुहरमम’ इंग्रजी अनुवादात इथे १६ मुहरमम ददले आहे पण फासी पाठात (‫محرم‬ ِ

म्हणजे ६ मुहरमम आहे. ज्युललयन ददनांक मात्र बरोबर आहे.

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३२६

ची वाढ दे ऊन साडेतीन हजारी (३००० स्वार) केले गेले. सोमवार, १० जुलै १६९९ / २२ मुहरमम ११११ ला ददवंगत नजाबत खान याचा मुलगा मुहम्मद इब्रातहम, ज्याला खान-इआलम ही उपािी ददली होती, त्याला तुरूंगातून मुक्त करून पुन्हा तीन हजारी (२००० स्वार) व जौनपूरची फौजदारी ददली गेली. राणा राजससिंह याची मुले इंद्रससिंह व बहादुरससिंह यांना अनुक्रमे दोन हजारी (१००० स्वार) व हजारी (५०० स्वार) ददली गेली. मुहम्मद आमीन खानाने तफरोज जंग खानाच्या पत्रातून बादशाहाला कळवले क़ी बादशाही सैन्याने इस्लामगडच्या जमीनदाराला पराभूत केल्यानंतर तो ततथून पळू न गेला व इस्लामगड जजिंकला गेला. शूजाचा मुलगा बुलंद अख्तर याचा एक तोतया आलाहाबाद जवळ उत्पन्न झाला होता व त्याला पकडू न एका गुजमबदामराबरोबर ग्वाल्हेरला पाठवले होते. त्याने तकल्ले दाराच्या लशक्क्याची पावती आणली होती. मरीयम दगडाचा1 एक पेला [४०६] शुजाअत खानाने मुल्तफत खानाला पाठवला होता, तो बादशाहाला दाखवला

गेला. तो दठपक्या दठपक्यांचा (ककिंवा खडबडीत) असल्याने त्याला तो आवडला. खानाला आदे श ददला गेला क़ी शुजाअत खानाला कळवून अशा प्रकारचे पेले व तबक तयार करून बादशाहाकडे पाठवावे. खानाने काही उत्तम भांडी व इतर वस्तु जसे, ससिंहासन, टाक़ी, एकसंि पलं ग व वैतवध्यपूणम आकार व प्रकाराचे दगड तयार करून पाठवले . बादशाहाने ते स्वीकारले . प्रलसद्ध चघताईचा नातू वातहद खान याला घोरबंदचा ठाणेदार नेमले गेले. तो तीन सदी (तततकेच स्वार) होता. सत्वा डाफळे 2 मागे दरबारास आला होता तो दुदै वाच्या असुरामुळे सैन्यातून पळू न गेला. मीर आततश तरबीयत खान, सय्यद खान, शुक्रुल्लाह खान काश्गरी व इतरांना त्याचा पाठलाग करून त्याला िडा लशकवायला पाठवले गेले. खान जहान बहादुरची बहीण हाजी खानम ततच्या भावाच्या मृत्यूनंतर ददल्लीहून दरबारास आली व ततला ५००० रुपयांची रत्ने, एक अध्याम बायांचा

1

गाललचा दुमडू नये म्हणून त्याच्या कोपऱ्यांवर वजन म्हणून हे दगड ठे वले जायचे.

2

सत्वाजीराव डाफळे हा बाजीराव चव्हाण डाफळे चा तपता. सातारा तकल्ल्याच्या लढाईत तटाला पडले ल्या खखिंडारातून मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात हा बाजीराव मारला गेला व तवजापूरच्या पणश्चमेस असले ल्या जथ गावाची जाहातगरी याच्या कुटुं बाला ददली गेली. सत्वाजीराव हा जाहगीरदार होता. या कुटुं बाने सन १६७२ मध्ये तवजापूरची चाकरी सुरू केली. (जथच्या तत्कालीन प्रमुखाने जदुनाथ सरकारांना ६ ऑगस्ट १९१६ रोजी पत्र ललतहले होते). सत्वा डाफळे हे नाव अखबारात (राज्य वषम ४३, ४८) अनेकदा येते.

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३२७

अंगरखा, एक दोशाला व २००० रुपये रोख ददले गेले. खान जहान बहादुरचा मुलगा नुस्रत खान हा नऊ सदी (५०० स्वार) होता त्याला एक सदीची वाढ धमळाली तर अबुल फतह खान या िाकट्याला सात सदी (३०० स्वार) होती त्याला तीन सदी (१०० स्वार) वाढ धमळाली. इनायतुल्लाह खानाचा मुलगा जझयाउल्लाह याने मुलाच्या जन्माबद्दल सुयोग्य पेशकश सादर केली. मुखललस खानाने मुहम्मद ताक़ी नावाच्या इराणच्या व्यापाऱ्यांच्या प्रमुखाला दरबारात सादर केले . त्याने एक कुराण, एक लं गरी घोरी, २७ टका सोन्याचे भरतकाम केले ले कापड व इत्र-ए-तफतना सादर केले . रुहुल्लाह खानाला झुब्ल्फकार खान बहादुरच्या जागी बादशाही लवाजम्याचा दरोगा नेमले गेले [४०७] व लसयादत खानाला अब्दुर रहमान खानाच्या जागी अजम-इ-मुकरमरचा दरोगा नेमले गेले. सफलशकन खानाला पादशाहजाद्याचा दत नेमले गेले. बादशाहाने आदे श ददला क़ी अनूपससिंहाचा मुलगा सरूपससिंह याने झुब्ल्फकार खान बहादुर कडू न राजा रामाचा लवाजमा घेऊन दरबारास यावे व हमीदुद्दीन खानाने उम्दत-उल-मुल्कच्या धमस्ल मध्ये असले ला लसवाचा लवाजमा आणून गुलालबाडीत राजा शाहू याच्या जवळ ठे वावा. तट्ट् याचा सुभद े ार व लसतवस्तानचा फौजदार सआदुल्लाह खान याचा मुलगा तहफझुल्लाह खान याला मुईझुद्दीनच्या लशफारसीने त्याच्या दोन हजारीत (७०० स्वार) ३०० जातची वाढ ददली गेली. हमीदुद्दीन खान बहादुर हा दोन हजारी (१४०० स्वार) होता, त्याला १०० स्वारांची वाढ ददली गेली. शेख सआदुल्लाह याला खवासींचा मुश्रीफ या पदावरून काढू न टाकण्यात आले . माझ्या आिीच्या पदासतहत हे पद मला ददले गेले. नुस्रत जंग याने भेट घेतली व त्याला एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती व एक रत्नजधडत खंजीर ददला गेला.

कात्रिरांिे त्रकल्ले घेण्यािाठी बादशाहािे कूि वसंतगड म्हणजे तकलीद-इ-फतह चा तवजय [४०८] इस्लामपुरीला चार वषम रातहल्यानंतर * * * * त्या राक्षसी कातफरांची

भूमी व तकल्ले बादशाही घोड्यांच्या टापांखाली तुडवण्यासाठी बादशाहाला स्वतः मोतहमेवर जायची इच्छा झाली. त्याने आदे श ददला क़ी एका वषामपूवी बादशाहाच्या घरच्यांसाठी बांिले ल्या दगड-चुन्याच्या लहानशा कोटा भोवती अडीच कोसाचा परीघ असले ला कच्चा भभिंतीचा एक परकोट बांिावा. हे काम पंिरा ददवसात पूणम झाले .

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३२८

झीनतुस्त्न्नसा बेगम, पादशाहजाद्याची आई (उदीपुरी) व जनानखान्यातील इतर बायका तसेच इतर लोकांची कुटुं बे उम्दत-उल-मुल्क मदार-उल-महाम आसद खानाच्या हाताखाली आवश्यक सैन्य दे ऊन या सुरणक्षत दठकाणी ठे वली गेली. गुरूवार, १९ ऑक्टोबर १६९९ / ५ जमाद-उल-अव्वल ११११ ला एका सुमुहूतामवर बादशाहा ततथून तनघाला. [४०९] (या प्रवासातील) सगळ्या पडावाच्या जागा व केले ली चाल मला नोंदवता येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर, वीस ददवसांत तो मुतमजाबाद धमरजच्या परीघात पोहोचला. पादशाहजादा आलीजाह मुहम्मद आजम याला बादशाहाने पेडगावहून बोलावले होते, तो इथे येऊन भेटला व त्याला बऱ्याच गोष्टी, एक तवशेष अंगरखा, एक रत्नजधडत िकिक़ी, मुलाम्याचा साज असले ला एक घोडा ददला गेला. तो नीच रामा बेरारला गेल्याची पक्क़ी बातमी धमळाली म्हणून बीदर बख्त याला मुतमजाबाद येथील छावणीतून तनघून त्याच्या पाठलागावर जायचा आदे श ददला गेला. रुहुल्लाह खानाला एक अंगरखा व एक तलवार आणण हमीदुद्दीन खान बहादुरला एक अंगरखा व एक कट्यार दे ऊन पन्हाळा ते सातारा या पट्ट् यात एकही वस्ती उरणार नाही अशा प्रकारे तो उध्वस्त करायचा आदे श ददला गेला. बादशाही छावणी कराड परगण्याजवळ पोहोचली तेव्हा बादशाहाला कळले क़ी ततथे एक ठाणे होते पण शत्रूने ते पाडू न टाकले तसेच आिी किीतरी ततथे एक मशीद बांिली होती पण त्यात ददवाबत्ती होत नव्हती. बादशाहा त्या ददशेने दोन कोस चाल करून गेला [४१०] व ततथे नमाज करून आदे श ददला क़ी ते दठकाण वसवावे आणण ठाणे बांिून काढावे. पळू न गेलेल्या लोकांना िीर ददल्यावर ते ततथे पुन्हा राहायला आले . त्यांच्या सुरक्षेसाठी एक तुकडी नेमण्यात आली. ततथून बादशाहा मासूर नावाच्या ठाण्याला गेला, जजथे इस्लामी लोकांची एक तुकडी राहत होती. त्याच्या समोर तीन कोसावर एका भक्कम डोंगरावर वसंतगड नावाचा दणकट तकल्ला होता. तो शत्रूच्या ताब्यात होता व जजिंकण्यास अवघड म्हणून प्रलसद्ध होता. * * * * बादशाहाने मीर आततश तरतबयत खान याला तो डोंगर चढू न ततथल्या सैतानांशी लढायचा आदे श ददला. खानाने दोन ददवसात दोन वषांचे काम केले व तोफखान्याच्या लोकांना तकल्ल्याच्या दरवाज्याखाली नेऊन त्याच्या समोर तोफा लावल्या आणण शत्रूला उध्वस्त करायची तयारी केली. शत्रूही तोफा व गोळ्यांचा वषामव करण्यापासून थांबला नाही.

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३२९

‫س دريای کشنا که‬ ‫خن‬ ‫بعد‬ ‫عرض اين ی‬ ِ ِ ‫مطابق‬ ِ ‫حکم جهان مطاع دولت خانه‬ ِ ِ ‫ان حق بيان گذشت که‬ ‫پای قلعه‬ ِ ِ ‫بتفاوت کروےه منود برپا شد و بر زب‬ ّ ً ّ ‫کت بابرکت جز غزا امرﮯ نيست مرضاة َّلل و رسوله‬ ِ ِ ‫پيشنهاد هم ِت ما ازين حر‬ ّ ‫بقتل‬ ‫کاب‬ ِ ِ ‫ صباح بقصد يورش پا در ر‬ِ ‫سمند اقبال بايد گذاشت و عل ِم توجه‬ ّ ‫کف ِار اسار افراشت‬ हे कळल्यावर, तकल्ल्यापासून एका कोसावरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या काठावर त्याचा तंबू उभारायचा आदे श बादशाहाने ददला व म्हणाला क़ी, ‘या सगळ्यामागे माझा बाक़ी काही उद्दे श नसून, िममयुद्ध हेच एकमेव उदद्दष्ट

आहे, याने अल्लाह व प्रेतषत प्रसन्न होवोत. उद्या सकाळी आक्रमण करण्यासाठी मी सुलक्षणी घोड्यावर स्वार होऊन तनघेन व नीच कातफरांची कत्तल करून माझे तनशाण उंचावेन’. [४११] बादशाहाची छावणी इतक्या जवळ लावले ली बघून शत्रूचे िैयम खचले .

* * * त्यांनी त्याच ददवशी तहाची भीक मातगतली व त्यांना केवळ सन्मानाने (कुटुं बासतहत) ततथून बाहेर पडायचे होते. बादशाहा दीनांचा कैवारी असल्याने त्याने ततथल्या तुकडीला यमसदनी िाडण्या ऐवजी तनःशस्त्र होऊन बाहेर जाऊ द्यावे असा आदे श ददला. रात्री शत्रूला बाहेर पडायची संिी दे ण्यात आली व दुसऱ्या ददवशी सकाळी, शतनवार, २५ नोव्हेंबर १६९९ / १२ जमाद-उस-सानी ११११ ला तकल्ला जजिंकला व त्याला तकलीद-इ-फतह असे नाव ददले गेले. बादशाही सैन्याला तकल्ल्यावर बरेच पुरले ले िन, सामग्री व हत्यारे हाती लागली. शुक्रवार, १७ नोव्हेंबर १६९९ / ४ जमाद-उस-सानी ११११ ला बादशाहाला कळले क़ी नीरा नदीच्या पलीकडे बीदर बख्तचे मकहूर रामाशी तुंबळ युद्ध झाले . खानइ-आलम व सफमराज खान यांनी पराक्रम गाजवला व शत्रू छावणी आणण सामान सोडू न पळू न गेला. शाहजादा व इतर [४१२] शूर वीरांसाठी भेटवस्तू पाठवल्या गेल्या. खान बहादुर नुस्रत जंग याला शाहजाद्याच्या हाताखाली सेवा करायचा तसेच मकहूर रामाने डोके वर केल्यास त्याला िडा लशकवण्याचा आदे श ददला गेला. मुहम्मद अकबर याचे दोन सेवक क्षमेची भीक मागणारे त्याचे पत्र व अत्तराची पेटी घेऊन कंदहारहून दरबारास आले . त्यांच्या बरोबर अकबरासाठी एक अंगरखा व फमामन पाठवले गेले. त्यात ललतहले होते क़ी जोवर तो भारताच्या सीमेत येत नाही तोवर त्याला क्षमा केली जाणार नाही, पण

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३०

बादशाही सीमेत आल्यावर त्याच्यावर कृपादृष्टी दाखवत त्याला बंगालचा सुभेदार नेमायचा आदे श तसेच इतर अनेक गोष्टी ददल्या जातील. सुरत बंदराचा मुत्सद्दी अमानत खान वारला. ददनायत खान या त्याच्या मोठा भावाला त्याच्या जागी नेमले गेले. सैफुद्दीन खान सफावी हा सोलापूरचा तकल्ले दार झाला. लु त्फुल्लाह खान तवजापूरचा सुभद े ार झाला, तो अडीच हजारी (१४०० स्वार) होता, त्याला आता ५०० जात (६०० स्वार) वाढ ददली गेली.

िाताऱ्यािा त्रवजय [४१३] * * * शुक्रवार, ८ धडसेंबर १६९९ / २५ जमाद-उस-सानी ११११ ला

तकल्ल्याच्या पायथयापासून अध्याम कोसावर बादशाही छावणी टाकली होती. पलीकडच्या बाजूला आजम शाह याची छावणी होती. सैन्याने तकल्ल्याला सगळीकडू न वेढा घातला होता. आदे शानुसार मीर आततश तरबीयत खान मोचे उभारू लागला. काही ददवसातच हे वीर मेटापयंत पोहोचले व तोफखाना [४१४] वर चढवला. तकल्ल्यावर तोफांचा प्रचंड मारा चालू झाला. पण जी तकल्ल्याची भभिंत वाटली होती तो तीस याडम उंच कातळ तनघाला व त्याच्या वरती साठ याडम मुझव्वर व सांगधचन (सुटे दगड) होते. तोफगोळ्यांनी खाली पडेल असे ततथे काही नव्हते. सातारा हे मंजजल-ए-कातफर-ए-हरबी1 होते त्यामुळे ततथे युद्ध सामग्री, रसदीचे सामान, उन्हाळ्यातही पुष्करणी असले ला पाण्याचा भरपूर मोठा साठा व प्रचंड शौयम व कौशल्य असले ले सैन्य होते. तकल्ल्यातून अहोरात्र अग्ग्नबाण, बंदुका, हुक्का, चादर व माश्कचा मारा चालू होता. तकल्ल्याच्या बाहेर असले ल्या शत्रू सैन्याने रसदीवर छापा मारला आणण वीस मैलांच्या परीघात गुरांच्या जीवनाचे एकमेव सािन असले ले गवत जाळले . काही वेळा त्यांनी थेट छावणीवर हल्ला केला पण तो परतवून लावला गेला. िान्य व पेंढा याचा कमालीचा तुटवडा तनमामण झाला. बाय गोष्टींकडे बघणाऱ्या लोकांना हा तकल्ला जजिंकणे अशक्य आहे असे वाटले .

‫ز‬ َّ ُ ُّ ‫عزم راسخ اريکه‬ ِ ‫پادشاه موفق مويد الم‬ ِ ِ ‫جاهد ف سبيل هللا بهمان‬ ِ ‫دل قوي و‬ ‫کارفرماي بودند‬ ‫آرای‬ ٔٔ

1

सातारा तकल्ला हे राजारामाच्या राहण्याचे दठकाण होते हे दाखवण्यासाठी फासी पाठात हा शब्दप्रयोग केला आहे. इथे मंजजल हे राहण्याचे दठकाण या अथामने आले आहे.

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३१

बादशाहा मात्र अल्लाहच्या मागामवर चालणाऱ्या जजहादी योद्ध्ांची मदत करणाऱ्यावर दृढ तवश्वास ठे वून अत्यंत खंबीरपणे व िैयामने उभा होता. शेवटी तकल्ल्याच्या दरवाज्यापासून १३ जझरा अंतरावर एक िमिमा उभा केला गेला. तो बांिण्यासाठी इतक़ी सामग्री लागली क़ी आसपासच्या तीस कोसात एकही झाड उरले नाही. पादशाहजाद्याच्या बाजूनेही तकल्ल्याच्या पायथया पयंत मोचे लावले होते. बेलदारांना तकल्ल्याच्या खाली भुयार खणायचे आदे श ददले गेले. [४१५] काही ददवसातच िमिम्याच्या बाजूच्या २४ याडामतून कठीण दगड असले ली माती काढली गेली. तकल्ले जजिंकण्यात अत्यंत पटाईत असले ले दोन हजारी मावळे या बेलदारांबरोबर होते. या लोकांना तीन वषामचा पगार, एक लक्ष तीस हजार रुपये आिीच ददले गेले होते. तकल्ल्यावर चढाई करण्यासाठी लागणारे सगळे सामान, पायऱ्यांच्या लशड्या, दोराच्या लशड्या व चामडी अंगरखे त्यांना ददले होते. * * * * सगळ्या सरदारांचे मत पडले क़ी नुसते हे सगळे गोळा केल्याने तकल्ला जजिंकता येणार नाही. म्हणून तरतबयत खानाने त्या २४ याडम उंच िमिम्याच्या तळाशी हाताळायला सोपी अशी लशडी तयार केली. ती तयार करायला त्याने उंटांचे एक हजार गाडे, तपशव्यांचे कापड, चांगले तागाचे कापड व सपाटीवरचे सगळे जळण वापरले . यातील तागाचे कापड इतके दुलम भ झाले होते क़ी चार याडामपेक्षा कमी कापडासाठी एक रुपया द्यावा लागला. हे सगळे करून त्याने ते भुयार तटाच्या तळापयंत नेले व त्याच्या वरच्या बाजूला त्या लाकडी लशड्या लावल्या. पण त्या िमिम्यांवर खानाने लहान तोफा चढवून घेतल्या यापेक्षा फार काही यातून साध्य झाले नाही कारण सैतनकांना तटाच्या पलीकडचे काही ददसत नव्हते, बंदुका चालवता येत नव्हत्या व फक्त तटाखाली लपून आतमध्ये दगड फेकता येत होते. त्यामुळे तटावरून तकल्ल्यात जाणे शक्य होणार नव्हते. बादशाहाने आदे श ददला क़ी रुहुल्लाह खानाच्या नेतृत्वाखाली फतहुल्लाह खानाने तकल्ल्याच्या दरवाज्याच्या बाजूने दुसरे भुयार खणावे. शुक्रवार, १५ माचम १७०० / ५ शव्वाल ११११ ला खानाने ती योजना प्रत्यक्षात आणत [४१६] एका मतहन्यात तकल्ल्याच्या रेवणी खाली भुयार नेले. तरतबयत खानाने लशड्या लावण्याच्या त्याच्या फसले ल्या प्रयत्नांत सुिारणा करायच्या हेतूने तटाच्या भभिंतीत एक कोनाडा कोरला व त्याच्या एका बाजूला चार याडम आणण दुसरीकडे दहा याडम पोखरून काढले . तकल्ल्यातील लोक व इथे लक्ष ठे वणाऱ्या या वीरांमध्ये फक्त एक पातळ पडदा होता. पण दोन्ही बाजूंनी कोणी तो ओलांडायचा

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३२

प्रयत्न केला नाही. या संपूणम खड्ड् यात दारू भरून त्यायोगे तट पाडू न सैन्याला वाट करून द्यायची असे ठरले . बादशाहाने आदे श ददला क़ी घोडदळ, पायदळ, तोफखाना, खासचौक़ी, अफगाण व घक्करांचा जमाव, इतर तुकड्या व ततथे सतत उपब्स्थत असले ले कनामटक़ी यांच्या बरोबर बक्षी-उल-मुल्क मुखललस खान व हमीदुद्दीन खान बहादुर यांनीही हजार लोक घेऊन संिीची वाट बघत ततथे थांबावे म्हणजे सुरुंगाचा स्फोट झाल्यावर जेव्हा आघाडीची1 तुकडी2 तकल्ल्यात प्रवेश करेल तेव्हा यांना त्यांची मदत करता येईल. शतनवार, १३ एतप्रल १७०० / ५ जजल्कदा ११११ ला सकाळी आिी एका सुरुंगाला बत्ती ददली गेली तशी तटाची भभिंत आतल्या बाजूला पडली व आतली मोठी तुकडी आगीच्या तोंडी पडली. दुसरा सुरुंग पेटवल्यावरही भभिंत आतच पडेल या अपेक्षेमुळे आत घुसणाऱ्या तुकडीला मागे थांबायची चेतावनी न दे ता दुसरा स्फोट केला गेला. पण यावेळी तटाची भभिंत मुघलांच्या (बाहेरच्या) बाजूला पडली आणण आत जायचा प्रयत्न करणाऱ्या हजारो लोकांवर दगड िोंड्यांचा वषामव झाला. जे लोक संिीची वाट बघत मातीच्या तबळात लपले होते त्यांची ततथेच कबरीची सोय झाली. [४१७] अनेकांचे हात पाय िडावेगळे झाले आणण ती त्यांच्या तवनाशाची कबर वाटावी अशा प्रकारे ते इतस्ततः फेकले गेले. थोडक्यात सांगायचे तर जवळपास दोन हजार शूर वीर मारले गेले. तटाला मोठे खखिंडार पडले होते व एकाने वर जाऊन आवाज ददला क़ी, ‘अरे वर या, इथे कोणी नाही’, तरीही मोचामत असले ल्या लोकांना भीतीने इतके ग्रासले क़ी कोणीच पुढे गेले नाही. ती योजना फसली. जे केले होते त्यातून काहीच तनष्पन्न झाले नाही त्यामुळे ते न केल्यासारखेच झाले . त्यामुळे संिी तनघून गेल्यावर काही तासांनी शत्रूने बधघतले क़ी पलीकडे कोणी नाही तेव्हा त्यांनी ते खखिंडार भरून काढले व ती जागा आणखी भक्कम करून ततथून बंदुकांनी गोळ्यांचा वषामव करू लागले . तो दमदमाही पडला होता व त्यावरील रहकलाही खाली पडल्या होत्या, आणण शत्रूला कोण सामोरे जाणार असे म्हणून सैतनकांनी हात वर केले . तेव्हा बादशाहा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा रातहला

1

या आघाडीच्या तुकडीला जदुनाथ सरकारांनी ‘the forlorn hope’ म्हटले आहे. पाश्चात्य सैन्यांमध्ये या नावाची आत्मघातक़ी तुकडी असायची. तकल्ल्याला खखिंडार पडले क़ी त्यावर

2

जोरदार हल्ला चढवून प्राणांची जराही परवा न करता शत्रूवर तुटून पडणे हेच त्यांचे काम होते. तवजापूर जजल्यातील जथ गावाच्या प्रमुखांचा पूवमज बाजी चव्हाण डाफळे या तुकडीत होता. त्याचा उल्ले ख आिीच्या पानांवर (सत्वा डाफळे ) आला आहे.

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३३

त्यामुळे मारल्या गेलेल्या लोकांच्या प्रेतांवरून चालत जाऊन ते तकल्ल्यात जाऊ लागले . होय, नेत्याच्या अभावी कामाचा गोंिळ उडतो. सेनापतीच्या अनुपब्स्थतीत वीरांची ब्स्थती डोके गमावले ल्या िडागत होते. एक लाखाचे जरी सैन्य असले तरी त्या एका व्यक्त़ीच्या (सेनापती) अभावाने त्यांना एक होता येत नाही व तो एकटा जरी युद्धभूमीवर उतरला तरी त्याला या लक्ष लोकांची मदत लागत नाही. यात काही वादच नाही. * * * * [४१८] तो स्वतः पादशाहजाद्यासोबत जाऊन आक्रमणाचे नेतृत्व करू शकेल

याच कारणास्तव बादशाहाने त्याची छावणी डोंगराच्या पायथयाजवळ लावायला सांतगतली होती. दै वाला त्याचेच खरे करायचे होते त्यामुळे सगळ्या मंत्र्यांनी एकत्र येऊन त्याला त्यापासून परावृत्त केले . आजही बादशाही छावणी हलवायची या तयारीत सगळे होते पण कामाचा गोंिळ उडाल्यावर ततथे जाऊन काय सािणार होते ? बादशाहा * * * सारखा म्हणत होता क़ी, ‘मी त्यांच्या बरोबर राहून तवजय प्राप्त करू शकलो असतो तर तकती चांगले झाले असते !’ त्याने सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना प्रेरणादायी संदेश पाठवून त्यांना खंबीर राहायला सांतगतले . ‘तुमच्या मनातील कल्पनांनी व उद्वे गामुळे तुम्ही खच्ची का होता ? शत्रूने तुमच्यावर तवजय धमळवले ला नाही. फक्त तुमचे तनयोजन फसले आहे. जेव्हा छत खाली पडते तेव्हा त्याच्या खाली झोपले ल्या अजाण लोकांचा जीव जातोच’. त्याच ददवशी सरफराज खान, मानाजी व बक्षीउलमुल्क बहरामंद खान याच्या सैन्याला ततथे जाऊन तरतबयत खाना सोबत मोचामवर थांबायचा आदे श ददला गेला. दढगाऱ्याखाली अडकले ल्या मृतांचे जे नातलग त्यांच्यापयंत पोहोचू शकले त्यांनी त्यांचे पार्थिंव बाहेर काढू न आपापल्या छावणीत नेले. आणखी तवधचत्र गोष्ट म्हणजे बहललया पायदळातील लोक त्यांच्या नातलगांच्या व धमत्रांच्या मृत्यूने फार तवव्हल झाले होते व मीर आततश वर धचडले होते [४१९] दगड मातीच्या त्या प्रचंड डोंगराखालू न मृतांना बाहेर काढणे अशक्य आहे हे त्यांना कळू न चुकले पण त्यांच्या वाईट िमामप्रमाणे मृतांना जाळणे बंिनकारक असल्यामुळे त्यांनी गुप्तपणे संपूणमपणे लाकडाने बनवले ल्या मोच्यांना आग लावली. ती आग सात ददवस व रात्र जळत रातहली. असा वणवा तवझवण्यासाठी पाणी कुठे होते ? अनेक कहिंद व ज्यांना बाहेर काढता आले नाही ते मुसलमान, एकत्र जळाले . बादशाहाच्या सगळ्या दासांप्रमाणे भाकरी साठी व जजवाच्या भीती पोटी या नामदाराने (तरतबयत खान) हा तकल्ला जजिंकण्यासाठी जे काही अथक पररश्रम घेतले

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३४

त्याची कल्पनाच करता येणार नाही. माणूस योजतो पण शेवटी ईश्वरच करतो. हे ईश्वरा ! बादशाहाचे दै वच असे होते क़ी त्याच्या ८५ वषांच्या जीवनात त्याने ज्या ददशेला बधघतले ततथून अनेक दरवरच्या गोष्टी व उच्च कोटीच्या योजनांनी लगबगीने त्याचे स्वागत केले . मंगळवार, ५ माचम १७०० / २५ रमजान ११११ ला बातमी आली क़ी रामाने बेरारला िाव घेतली होती पण ततथे अपेक्षाभंग झाल्याने तो त्याच्या घरी परतला व नरकात गेला (वारला). बुिवार, २० माचम १७०० / १० शव्वाल ११११ ला बातमी आली क़ी त्याच्या सरदारांनी त्याच्या पाच वषामच्या मुलाला राजपदावर बसवले होते पण [४२०] तो ही वारला. हे दै वी संकेत बघून व पूणम तवनाश टाळण्यासाठी त्या कातफराच्या (राजाराम) घरातील प्रमुख अधिकारी परशुराम साताऱ्या पासून सात कोसावर असले ल्या परळी तकल्ल्यातून बाहेर आला व रुहुल्लाह खानाच्या मध्यस्तीने त्याला बादशाहाची क्षमा धमळाली. साताऱ्याच्या तकल्ले दार सुभान या तववेक़ी व भाग्यवान माणसाने इतर मराठा सरदार त्यांच्या वैयलक्तक स्वाथामसाठी शरणागती घेत असल्याचे बधघतले . तरतबयत खानाने लावले ल्या सुरुंगांमळ ु े त्या बाजूची बुरूजाच्या अध्याम अंतरापयंतची ७० याडम लांब भभिंत पडली होती. तोफखान्याच्या माऱ्यात अनेक लोक मारले गेले होते, तवशेष करून पादशाहजाद्याच्या मोचांमागील टे कडीवर चढवले ली मुल्कझब्त ही तोफ तकल्ल्यावरील पकड मजबूत करत आग ओकत आतल्या इमारती ध्वस्त करत होती. सुरुंगाच्या स्फोटात ४०० लोक मारले गेले होते. आणण फतेहुल्लाह खानाने तकल्ल्याच्या दरवाज्यापयंत खणत्या लावून एकाच स्फोटात दरवाजा व भभिंत उडवायची योजना करत होता. हे सगळे पाहता बादशाहाकडे दयेची भीक मागण्यालशवाय काही पयामय नाही हे लक्षात आले व त्याने पादशाहजाद्याकडे त्याचा दत पाठवला. तकल्ल्यातील हजारो पुरुष व बायकांवर दया दाखवत त्याने बादशाहाकडे त्याची रदबदली केली, जी मान्य केली गेली. [४२१] तकल्ल्यातील लोकांना क्षमा केल्याचा आदे श तनघाला. रतववार, २१ एतप्रल १७०० / १३ जजल्कदा ११११ ला कातफरांच्या तकल्ल्याच्या तट बुरूजांवर आमचे तनशाण लावले गेले. * * * * हा तकल्ला पादशाहजाद्याच्या मध्यस्तीने घेतला गेला म्हणून याला आजमतारा हे नाव ददले गेले. दुसऱ्या ददवशी पादशाहजाद्याने सुभानचे हात गळ्यात बांिून बादशाहासमोर आणले . बादशाहाने त्याला सोडायचा आदे श ददला व त्याला बादशाही

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३५

सेवेत घेतले . त्याला पाच हजारी (२००० स्वार), एक अंगरखा, एक कट्यार, एक घोडा, एक हत्ती, एक तुघ, एक अमल, नगारे व २०००० रुपये ददले गेले. * * * * [४२२] तकल्ल्याचा वेढा ८ धडसेंबर १६९९ / २५ जमाद-उस-सानी ११११ ला

सुरू केल्यापासून ते २१ एतप्रल १७०० / १३ जजल्कदा ११११ ला तो घेई पयंत चार मतहने व आठरा ददवस गेले. त्या काळात झाले ल्या इतर काही घटना आता मी थोडक्यात सांगतो. तकलीद-इ-फतहच्या तवजयाबद्दल उम्दत-उल-मुल्क याने पाठवले ल्या ४०० अशरफ़ी बुिवार, ६ धडसेंबर १६९९ / २३ जमाद-उस-सानी ११११ ला बादशाहा समोर सादर केल्या गेल्या. बक्षी-उल-मुल्क मुखललस खान याने आदे शानुसार काम बक्ष याला शाह आलीजाहकडे नेले व शाहच्या तवनंतीनुसार आदे श ददला गेला क़ी दरबार भरेल तेव्हा काम बक्षने ही उपब्स्थत राहावे. हमीद खानाचा मुलगा शेख फरीद याला खान ही उपािी धमळाली. मंगळवार, २६ धडसेंबर १६९९ / १४ रज्जब ११११ ला रामाला िडा लशकवून आले ल्या बीदर बख्त याने भेट घेतली. नुस्रत जंगने भेट घेतली व त्याचा चांगला सन्मान केला गेला. शतनवार, ६ जानेवारी १७०० / २५ रज्जब ११११ ला इखलास खान, ज्याला इहतमाम खान ही उपािी ददली होती तो टे हळणीसाठी गेला असता बादशाही छावणी पासून एका मैलावर शत्रू समोर आला. तुंबळ युद्ध झाले . तो, त्याचा एक मुलगा व नजाबत खानाचा मुलगा इतर अनेक सैतनकांबरोबर मारले गेले व अनेक जखमी ही झाले . ददवंगताचे पद [४२३] हमीदुद्दीन खानाला ददले गेले व त्याला एक तवशेष अंगरखा आणण कंबरेचा एक रत्नजधडत मुतक्का ददला गेला. बादशाहाला कळले क़ी बादशाही छावणी पासून अध्याम कोसावर मुहम्मद आमीन खान शत्रूशी झुज ं दे त होता व त्याला कुमक धमळाली तर तो बंडखोरांना संपवू शकेल. हमीदुद्दीन खान बहादुर याला त्याच्या कुमकेस जायचा आदे श ददला गेला. बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान व हमीदुद्दीन खान बहादुर रसद आणायला खटावच्या बाजूला गेले होते तेव्हा शत्रू जजथे कुठे आला ततथे त्याला पळवून लावले गेले व छावणीसाठी भरपूर रसद घेऊन आले . भेट झाल्यावर त्यांची भरपूर प्रशंसा केली गेली. बहरामंद खानाला पाचूचा मुतक्का व हमीदुद्दीन खानाला एक लशरपेच ददला गेला. खटावचा ठाणेदार रामचंद्र याला वाढ दे ऊन दोन हजारी (३००० स्वार) ददली गेली. बुिवार, ३१ जानेवारी १७०० / २० शाबान ११११ ला पादशाहजाद्याला इब्रातहम खानाच्या जागी लाहोरचा सुभेदार नेमले गेले. बुलंद अख्तरला

अध्याय ४३

२१ फेब्रुवारी १६९९ ते ९ फेब्रुवारी १७००

३३६

एक तलवार, एक खंजीर, एक ढाल, एक भाता व एक िनुष्यपेटी ददली गेली. त्याने खासगीत भेटून अणभवादन केले .

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३३७

अध्याय ४४ राजवटीचे चौव्वेचाळीसावे वषम – तहजरी ११११-१२ १० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१ [४२४] * * * * काब्श्मरचा सुभेदार फाजजल खान याला पादशाहाजाद्याचा

सहाय्यक म्हणून पंजाब प्रांताचा कारभार बघायला सांतगतले गेले. तो अडीच हजारी (१२०० स्वार) होता व त्याला ५०० (२०० स्वार) ची वाढ धमळाली. अंबरचा जमीनदार तवजयससिंह याला त्याच्या वधडलांच्या मृत्यूनंतर राजा जयससिंह ही उपािी ददली गेली व त्याचा भाऊ (जमुना) याला तवजयससिंह ही उपािी धमळाली. तो हजारी (८०० स्वार) होता व त्याला ५०० (१२०० स्वार) वाढ धमळाली. धचन कललच खान बहादुर याला त्याच्या मनसबीतून कमी केले ले ५०० जात परत दे ऊन त्याला चार हजारी (३००० स्वार) ददली गेली. छत्रसाल राठोड1 याला आजमताराचा तकल्ले दार नेमले गेले. सोमवार, २२ एतप्रल १७०० / १४ जजल्कदा ११११ ला बादशाहाने तकल्ल्याला भेट ददली व बहमनी राजांनी ततथे बांिले ल्या जुन्या मलशदीत नमाज केला. बादशाहाच्या आदे शानुसार मलशदीला चुन्याचा ले प ददला गेला.

परळी त्रकल्ल्यािा त्रवजय बादशाहाने [४२५] आजमतारा तकल्ला जजिंकून ततथे तकल्ले दार व फौजदार नेमल्यावर त्याला परळी जजिंकायचा होता. त्याने फतहुल्लाह खानाला पुढे जाऊन तकल्ल्याला वेढा घालायला सांतगतला. खान त्याच ददवशी तकल्ल्याच्या पायथयाशी पोहोचला व एका बुरूजाखाली असले ल्या दरवाज्याच्या रोखाने भुयारी मागम खणायला सुरू केले . बादशाही अधिकाऱ्यांनी वेढ्यासाठी लागणारी सामग्री साताऱ्याहून पटकन परळीच्या पायथयाशी पोहोचवली. मंगळवार, ३० एतप्रल १७०० / २२ जजल्कदा ११११ ला तीन ददवसांनी ततथे पोहोचल्यावर बादशाहाने तकल्ल्याच्या दरवाज्या समोरील सपाटीवर छावणी टाकली. पादशाहजाद्याची छावणी बादशाही छावणी समोर होती. रुहुल्लाह खान मीर मुरचाल झाला. धचन कललच खान बहादुर, पादशाहजाद्याचे लोक व

1

फासी पाठात इथे छत्रसाल बुंदेला म्हटले आहे पण जदुनाथ सरकारांनी ते दुरुस्त करून इंग्रजी अनुवादात राठोड ददले आहे.

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३३८

सैन्यातील इतरांनी तकल्ल्याला सवम बाजूंनी काही कोसांचा वेढा घातला. परळी हा सातारा तकल्ल्यापेक्षा बळकट आहे. थोडक्यात, तकल्ल्याच्या संरक्षक क्षमतेवर मात करत करत खानाने मोचे खणून तकल्ल्याच्या समोरील टे कडीवर तोफा चढवल्या व काही वषांचे काम तततक्याच ददवसात पूणम केले . पण पावसाचा जोर [४२६] व िान्याची चणचण याबद्दल मी काय ललहू ? * * * * पोरक्या झाले ल्या मुलांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंप्रमाणे काळे ढग रात्रंददवस बरसत होते. घरे पाण्याखाली गेली होती. * * * थोडक्यात, नद्यांना आले ल्या पुरामुळे व कुठू नही रसद धमळत नसल्यामुळे मोठा दुष्काळ पडला. बादशाहाच्या िैयामचे व क्षमतेचे मला आश्चयम वाटते क़ी त्या कठीण पररब्स्थतीने घाबरून न जाता तो सैतनकांचे सांत्वन करत त्यांना प्रोत्साहन दे त होता. शेवटी खानाने भुयार खणत एका पसरट व लांब उतरत्या कातळाखाली नेले, जो एका बाजूला पंिरा याडम उंच तर दुसऱ्या बाजूला दहा याडम उंच असून त्या ठदिंडी दरवाज्यासमोर होते. हा कातळकडा जजिंकून घेणे फार अवघड होते पण तो घेतला तर तकल्ला जजिंकणे फार सोपे होणार होते. मंगळवार, ४ जून १७०० / २७ जजल्हेज ११११ ला दहा याडम उंच असले ल्या बाजूस काही लशड्या लावण्यात आल्या व वीरांना त्यावर चढायला सांतगतले गेले म्हणजे शत्रूने एकत्र येऊन त्यांना प्रततकार केला असता. मग इतरत्र लावले ल्या लशड्यांनी काही वीरांना घेऊन खान त्या कातळावर गेला. ततथून ते ठदिंडी दरवाज्यापयंत मेटावर असले ले शत्रूसैन्य त्यांच्या तलवारीच्या माऱ्यात येत होते व ततथे घोडे ही पळवता आले असते. कातफरांनी लगेच दाराकडे पळ काढला व मुघलही लगेच ततथे पोहोचले . तकल्ल्यात जाणे हा [४२७] खानाचा हेतु नव्हता तर त्याला त्या कातळाचा ताबा घेऊन ततथे लोक नेमून व तोफ चढवून मग दरवाज्यावर मारा करायचा होता. मग कातळावर सैतनकांची सोय करण्यासाठी म्हणून तो स्वतः लाकुड आणण गवत वर घेऊन जायला परत खाली गेला. तेवढ्यात झाले ल्या झटापटीत तीन ककिंवा चार मुघल व एक बहललया त्या ठदिंडी दरवाज्यातून कातफरांबरोबर आत गेले. इतरांनाही तेच करायचे होते पण तेवढ्यात एका मुघलाला गोळी लागून तो मेला व तो बहललया घाबरून अशा प्रकारे पळाला क़ी तो इतर पळणाऱ्यांबरोबर धमसळे ल. ती संिी घेऊन शत्रूने दार बंद करून घेतले व तटावरून गोळ्या व हुक्क्याचा मारा सुरू करून, अशा (तबकट) प्रसंगासाठीच तकल्ल्याकडे जाणाऱ्या या वाटे वर साठवून ठे वले ल्या दारूच्या साठ्ाला आग लावली. फतेहुल्लाह खानाचा नातू फक़ीरुल्लाह खान व साठ ककिंवा सत्तर लोक मारले गेले व इतर अनेक

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३३९

जखमी झाले . कातळावर सगळीकडू नच मारा करता येत असल्यामुळे इतरांना त्यावर थांबणे अशक्य झाले व ते परत आिीच्या स्थळी खाली आले . पण या चालीने कातफरांच्या हृदयात भीती तनमामण झाली. दुसऱ्या ददवशी त्यांनी त्यांच्या बरोबर तकल्ल्यात लशरले ल्या दोघांना सोडू न बादशाही सैन्याच्या ददशेने जाऊन ददले व शरणागतीची आळवणी करत सुरक्षेसाठी पादशाहजाद्याकडे गेले. बादशाहाने मोतहमेची चाल पादशाहजाद्याच्या मागमदशमनाखाली केली होती व तो नेहमीच त्याच्या सूचना मान्य करायचा त्यामुळे बादशाही आदे शानुसार रतववार, ९ जून १७०० / ३ मुहरमम १११२ ला [४२८] पादशाहजाद्याने तकल्ल्यातल्या सैन्याला तनःशस्त्र होऊन काही न घेता बाहेर जायची अनुमती ददली. दार-उल-इस्लाम असले ले हे स्थान राक्षसी लसवाच्या युक्त्यांमुळे तवजापुरींच्या हातातून जाऊन त्याचे रुपांतर दार-उल-हरब मध्ये झाले होते. त्याने आज ही उक्त़ी खरी ठरवली – ‘सत्य आले व असत्य नाहीसे झाले ’. नवीन मंददर पाडले गेले व जुनी मशीद पुन्हा उभारली. हा तकल्ला इब्रातहम आददलशाहने सन १६२५ / १०३५ तहजरी मध्ये बांिला होता. सगळ्या नवीन गोष्टींना तो नवरसांची नावे द्यायचा (जसे क़ी मुल्ला झहूरीच्या पुस्तकाचे नाव, नवरस-इ-इब्रातहम हे शहराचे नाव व दाम ककिंवा नाण्याचे नाव नवरस) म्हणून आता या तकल्ल्याचे नाव नवरसतारा ठे वले गेले. * * * *

बादशाही िैन्यािे भूषणगडाकडे कूि नवरसताराच्या तवजयानंतर बादशाहाला भूषणगडाकडे जायचे होते. या भयंकर जागेतून बाहेर पडणे हे सैन्यातील लहान थोर सवांना चांगले वाटत असले तरी व्यावहाररक व दै वी संकटांमुळे ज्याला काही त्रास झाले ला नाही असा आख्या छावणीत कोणी सापडला नसता. * * * * सैतनकांची इतक़ी दमछाक झाली होती क़ी त्यांना ततथेच थांबणे फार सुकर वाटत होते [४२९]. पण शेवटी बादशाहा हा सवांच्या सुखाचा दाता होता व त्याची इच्छा नसती तर कोणीच त्या भयंकर दठकाणातून बाहेर पडू शकले नसते. परतीचा प्रवास शुक्रवार, २१ जून १७०० / १५ मुहरमम १११२ ला सुरू झाला. भटक्यांना काही काळजी नव्हती कारण त्यांचे सगळे सामान एखाद्या कोंबड्यावरही मावले असते. एका चालीनंतर दोन रात्रींची तवश्रांती घ्यावी लागत होती कारण ज्या लोकांचे सामान घोड्यावर लादले होते त्यांना जसे जमेल तसे छावणी पयंत पोहोचायचे

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३४०

होते. सैन्यातील अनेक जण पाच कोस जायला तीन दठकाणी थांबले व कृष्णेकाठी आले तेव्हा ततला इतका पूर आला होता क़ी तकनारेच ददसत नव्हते. सैन्याला नदी पार करायला काही ददवस लागले व बऱ्याच कष्टांनी ते साबीतगड व आसपासच्या गावात पोहोचले . गुरूवार, २५ जुलै १७०० / १९ सफर १११२ ला छावणी भूषणगड जवळ पोहोचली. पाऊस त्याच्या घरी परतला होता. सैन्याच्या जीवात जीव आला. नदी-नाल्यांचा उपद्रव थांबला होता. लोकांना थोडी सुरक्षा व शांती धमळाली. पादशाहजाद्याला त्याच्या सैन्याला थोडे ताजेतवाने करायला खांदेशात जाऊन बऱ्हाणपूरला राहायला सांतगतले गेले आणण युद्धाने त्रस्त झाले ल्या लोकांना जुन्या साम्राज्यातील समृद्ध शहरात पाठवले गेले. प्रांतप्रमुखांना ताजेतवाने सैन्य बादशाहाकडे पाठवण्याचे आदे श ददले गेले. शाहजादा बीदर बख्त त्याच्या सैन्यातनशी [४३०] मुख्य तळाची सुरक्षा करत होता त्याला बादशाहाकडे बोलावले गेले. भेट घेतल्यावर त्याला पन्हाळा जजिंकण्यासाठी पाठवले गेले. त्याच्या सैन्या व्यततररक्त झुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग याला व काही वेळानंतर मीर आततश तरतबयत खान याला ही त्याच्या हाताखाली ददले गेले. सगळ्यांना सुखात ठे वणे हीच बादशाहाची एकमेव इच्छा होती त्यामुळे त्याच्या बरोबर असले ल्या सैन्याला थोडी तवश्रांती धमळण्यासाठी त्याने एका ददवसाच्या अंतरावर असले ल्या खवासपूरला मुख्य तळ करायचा तनश्चय केला. शुक्रवार, ३० ऑगस्ट १७०० / २६ रतब-उल-अव्वल १११२ ला छावणी ततथे जाण्यासाठी तनघाली व ततथे पोहोचल्यावर िान्य, पेंढा व इतर आवश्यक गोष्टींच्या पुरेशा पुरवठ्ामुळे सैतनक तनभश्चिंत झाले . * * * पाण्याचा थेंबही नसले ल्या नदीच्या पात्रात, जजचे नावच ‘भरपूर पाण्याचे मृगजळ’ आहे, व पावसाळा सोडता ततथे किी पाणी असेल असे स्वप्नातही वाटले नसते अशा नदीच्या दोन्ही काठांवर आणण मुख्य पात्रातही आघाडीच्या व उजव्या फळीतल्या सरदारांनी व सैतनकांनी [४३१] त्यांचे तंबू ठोकले होते. तेव्हा नोहाच्या जगबुडीच्या संदभामतली ‘पाण्याचे लोटच्या लोट बाहेर पडले ’ ही उक्त़ी साथम ठरली. मंगळवार, १ ऑक्टोबर १७०० / २८ रतब-उस-सानी १११२ ला रात्रीच्या वेळी वरच्या बाजूला पाऊस पडल्याने डोंगरातील झऱ्यांनी तो खाली आणला व सगळे आपापल्या तंबूत गाढ झोपले असताना अचानक सवम बाजूंनी पाणी सगळीकडे घुसले व सपाटीवर पसरले . सगळे तंबू वाया गेले. मोठ्ा प्रमाणावर जनावरे व लोक बुडाले . इतरांना पाण्याने वेढले . उरले ला वेळ जर रात्रच असती आणण पूर जर चार ककिंवा पाच घटकांच्या वर दटकला असता तर

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३४१

कोणीच वाचू शकले नसते. ईश्वराच्या दयेने सूयोदय झाला आणण लोकांनी आपले प्राण वाचवले . सवांनी आपापल्या घरांतील उरले सुरले सामान शोिायचा प्रयत्न केला पण त्यांना काही सापडले नाही. शेवटी सामानाची आशा सोडू न ते दाही ददशांना रडत गेले. काही तंबू दर उंच टे कड्यांवर होते त्यांना (नदीत) काय झाले याचा थांग पत्ता नव्हता. ईश्वराची कृपा आहे क़ी बादशाही तंबू बराच उंच होता त्यामुळे त्याला काही बािा झाली नाही. * * * राजवटीच्या ४४ व्या वषामच्या सुरवातीच्या काही घटना मी अजून नोंदवले ल्या नाहीत [४३२] त्यामुळे शाबानच्या (गेल्या मतहन्याच्या) शेवटापयंतच्या घटना आता मी सांगतो कारण घटनांची सुसग ं ती पाळणे हे इततहासकारासाठी आवश्यक असते. मूखम कातफर1 िना जािव याला िडा लशकवायला गेलेला झुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग त्याला परास्त करून परतला. तो व त्याचे सहकारी दाऊद खान, दलपत, रामससिंह व इतरांची प्रशंसा करून त्यांना अंगरखे, रत्ने व बढत्या ददल्या गेल्या. मुलतानचा सुभद े ार शाहजादा मुहम्मद मुईझुद्दीन याने िौहरचा तकल्ला डोगऱ्याच्या जमीनदाराकडू न जजिंकल्या बद्दल त्याला २००० स्वारांची वाढ दे ऊन बारा हजारी (६००० स्वार दो अस्पा) ददली गेली. बंगालचा सुभेदार शाहजादा मुहम्मद अजीम याला त्याच्या मनसुबीतून कमी केले ले १००० स्वार परत ददले गेले. तट्ट् याचा सुभेदार तहफझुल्लाह खान हा दोन हजारी (तततकेच स्वार) होता. शाहजाद्याच्या तवनंतीनुसार त्याला ५०० ची वाढ ददली गेली. काब्श्मरचा सुभेदार फाजजल खान याने लाहोरची सुभेदारी नाकारली होती व दरबारास येण्याची अनुमती मातगतली होती. सहाय्यकाचे पद स्वीकारण्याच्या अटीवर त्याला ददले गेलेले २०० स्वार त्याच्या मनसबीतून कमी केले गेले व त्याची तवनंती मान्य केली गेली. वाटे तच बऱ्हाणपूरला त्याचा मृत्यू झाला. तो एक सरळमागी, अणभमानी व तनष्ठावंत माणूस होता. इनायत खानाला आदे श ददला गेला क़ी ३००० स्वारांची जाहगीर तनख्वा म्हणून काम बक्ष याला द्यावी व नवीन याद-दाश्तसाठी आग्रह िरू करू नये. बयुतात खुदाबंदा खान याला अक्सर खानाच्या जागी मुहम्मदाबादचा सुभेदार नेमून ५०० (तततकेच स्वार) ची वाढ ददली गेली. मीर मुनशी व ग्रंथपाल फजैन खान याला त्याच्या

1

इंग्रजी अनुवादात ही दोन तवशेषणे गाळली आहेत. फासी पाठात (‫کافر خنه س‬ ِ ) ‘कातफर-ए-

खखरा-सर’ असे म्हटले आहे. ‘खखरा-सर’ म्हणजे मूखम, तबनडोक (स्टा. ४९२).

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३४२

िौदोल राजघराण्यातील स्त्स्त्रयांना एका दठकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी हा वापरत. धचत्रकाराने याला ‘siege de reine’ (लसयेज द रैन) म्हणजे राणीचे आसन म्हटले आहे. भोई व इतर लोकांच्या पोशाखात दाखवले ला फरक लक्षवेिक आहे. (साभार – BnF)

अध्याय ४४

१० फेब्रुवारी १७०० ते २८ जानेवारी १७०१

३४३

जागी [४३३] बयुतात नेमले गेले. इनायतुल्लाह खानाला बीदर बख्त याचा ददवाण नेमले गेले. बादशाहाला कळले क़ी कहिंद लोक लशजवले ले अन्न घेत नाहीत त्यामुळे संभाचा मुलगा राजा शाहू हा लशजवले ल्या अन्नाच्या ऐवजी गोड पदाथम, फळे व पक्वान्न खात असे. हमीदुद्दीन खानाने त्याच्यापयंत संदेश पोहोचवला क़ी, ‘तू बंददवासात नाहीस, तू तुझाच घरी राहत आहेस. तू लशजवले ले अन्न खाल्ले पातहजेस’. जझतुस्त्न्नसा बेगम तहला मुख्य तळाहून बोलावले गेले होते म्हणून शतनवार, १२ ऑक्टोबर १७०० / १० जमादउल-अव्वल १११२ ला ती चौदोल मध्ये बसून आली. काम बक्ष व बुलंद अख्तर यांनी पुढे जाऊन ततचे स्वागत केले . तबहारचा सुभेदार तफदाई खान याला ततरहुट व दरभंग्याची फौजदारी धमळाली. तो अडीच हजारी होता व आता त्याला तवनाअट ५०० जातची वाढ धमळाली. काश्गरचा राजा बल्बरीस खान याच्या मृत्यूनंतर राज्यात अराजक माजल्यामुळे बादशाहाने त्याच्या सेवेत असले ला ददवंगत राजाच्या चुलत्याचा नातू व शाह खानचा मुलगा आसमलान खान याला घरी जाऊन त्याच्या राज्याचा कारभार बघायला सांतगतले . धमहीन-पूर-ए-सलतनत याच्या सैन्यातील सरदार खान याला त्याला मदत करायची अनुमती ददली गेली. सद्रुद्दीन मुहम्मद खान याला मुअतकाद खानाच्या जागी खानदे शचा सुभेदार नेमले गेले व त्याला ५०० स्वारांची वाढ दे ऊन दोन हजारी (तततकेच स्वार) ददली गेली. [४३४]

पन्हाळा घेण्यािाठी बादशाहािे कूि सोमवार, १६ धडसेंबर १७०० / १६ रज्जब १११२ ला बादशाहा मुतमजाबाद धमरजकडे तनघाला व बुिवार, १ जानेवारी १७०१ / २ शाबान १११२ ला ततथे पोहोचला. प्रलसद्ध खलीफा सुलतानचा पुतण्या व इराणचा सद्र रातहले ल्या कवामुद्दीन खानाचा नातू आणण सफलशकन खानाचा मुलगा बक्षी-उल-मुल्क मुखललस खान हा ३ जानेवारी १७०१ / ४ शाबान १११२ ला गंभीर आजारामुळे वारला. त्याला नवीन धमरज शहरात संत सय्यद शमसुद्दीन याच्या दरग्याच्या आवारात पुरले गेले. उच्चकुलीन सभ्यता व कामकाजातील प्रातवण्य या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे होत्या. ऐतहक गोष्टींपासून अललप्तता व स्वतंत्र वृत्ती हे त्याचे स्वभाव गुण होते. बादशाहा नेहमी त्याच्याबद्दल म्हणायचा क़ी, माझ्या सोबत एक तरुण खलीफा सुलतान आहे. रुहुल्लाह खानाला ददवंगत मुखललस खानाच्या जागी दुसरा बक्षी नेमले गेले व सफलशकन खानाला त्याच्याकडील कुरबेगी व अहदींचा बक्षी ही पदे ददली गेली.

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३४४

अध्याय ४५ राजवटीचे पंचेचाळीसावे वषम – तहजरी १११२-१३ २९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२ रमजानच्या मतहन्यात बादशाहा धमरजेलाच रातहला. त्यानंतर रतववार, २ माचम १७०१ / ३ शव्वाल १११२ ला तो पन्हाळा व त्याच्या शेजारील उंच व पन्हाळ्याला ककिंधचतही कमी नसले ल्या पावनगडच्या मोतहमेसाठी तनघाला. शतनवार, ९ माचम १७०१ / २० शव्वाल १११२ ला तकल्ल्याजवळ, दरवाज्याकडे तोंड करून, त्याच्यापासून बंदुक़ीच्या माऱ्याच्या अंतरावरून वाहणाऱ्या नदीकाठी बादशाही छावणी पडली. [४३५] त्या ददवशी मी पुण्यवान हातफज याच्या काव्यातून तकल्ल्याच्या तवजयासंदभामत काही भाक़ीत शोित होतो तेव्हा मला खालील ओळी ददसल्या – ज्या हृदयास अदृश्य जग ददसते त्याच्याकडे जमशेदचा पेला1 असतो, क्षणभरासाठी हरवले ल्या अंगठीची काळजी का बरं करावी ? खरतर या सुमंगल ले खाची ही अंगठी (पन्हाळा) अनेकदा मुसलमानी राजांच्या सत्तेखाली होती. राक्षसी लसवाने ती आददलशाही राजांकडू न जजिंकून घेतली. त्यानंतर संपूणम दख्खन दे श जेव्हा कातफरी सत्तेच्या घाणीतून बाहेर काढला गेला, तेव्हा तो आलीजाह मुहम्मद आजम याच्या पररश्रमातून बादशाही सैन्याने जजिंकला. मग ततथला गलथान व भ्याड तकल्ले दार तसेच कातफरांप्रमाणे वागणाऱ्या लशबंदीमुळे कातफर-बच्चा राक्षसकुलीन हरबीपुत्र कपटी व नीच2 संभा याने तो पुन्हा जजिंकून घेतला. अल्लाहचे आभार क़ी आता तो पुन्हा मुसलमानांच्या हातात आला आहे. थोडक्यात, नुस्रत जंग खानाला बंडखोर जजथे कुठे असतील ततथे त्यांना िडा लशकवायला पाठवले गेले.

1

प्राचीन इराणी परंपरेनुसार जमशेदचा पेला अमरत्वाचे वरदान दे णारा होता व ततथल्या प्राचीन राजांकडे तो होता असे मानले जाते. जमशेद नावाच्या प्राचीन राजाच्या नावावरून याला हे नाव ददले गेले आहे. याला जाम-ए-जहान-नेमा ककिंवा जाम-ए-जम असे ही म्हटले जाते. अनेक फासी

2

ग्रंथांमध्ये व काव्यात याचा उल्ले ख येतो. ٔ ‫ز‬ इंग्रजी अनुवादात इथली तवशेषणे गाळली आहेत. फारसी पाठात ( ‫حري‬ ‫کافربچه عفريتناد ی‬ ٔ ‫شق‬ ٔ ‫‘ )زاده خديعتنهاد سنبهای‬कातफर-बच्चा-ए-इतफ्रततनजाद हरबीजादा-ए-खदीअततनहाद संभा-ए-शक़ी’ असे म्हटले आहे. स्टा. १००७, ८५६, १३९८, ४१५, ६०६, ४५०, १४३७, ७५०.

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३४५

शाहजादा वाला-तबार व इतर जमाव आल्यामुळे बादशाहाच्या बरोबर असणाऱ्या काही तुकड्यांना तकल्ल्याच्या पलीकडच्या बाजूस छावणी टाकायला सांगण्यात आले . सैन्याने दोन्ही तकल्ल्यांना पूणम सात कोसाचा घेरा घातला होता. तरतबयत खानाच्या नेतृत्वाखाली मोचे लावले गेले व शत्रूवर [४३६] तोफा बरसू लागल्या. अगदी थोड्याच वेळात तकल्ल्याचे पाच बुरूज त्यांच्या अध्याम उंचीपयंत खाली आले होते. इथल्या खडकाळ मातीत चर खणून ते डोंगरात नेत या सेनापतीने कमालीची मेहनत घेतली. जधमनीखाली

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३४६

काही जारीब लांबीचे खणकाम करून तीन सशस्त्र जण न वाकता एकत्र चालू शकतील अशी त्याने वाट करून घेतली. काही पावलांच्या अंतरावर वीस सैतनक बसू शकतील अशी खोली केली. हवा खेळती राहण्यासाठी व उजेडासाठी त्याला सगळीकडू न उच्छवास केले गेले. तकल्ल्यातील लशबंदीने तटावरून डोके वर काढू नये यासाठी त्याने इथे त्याचे बंदकची ठे वले . शत्रू जजथून तोफा डागत होता त्या बुरूजाखाली ही वाट नंतर नेली गेली. त्याचा पाया इतका पोखरला होता क़ी शत्रूकडील हुक्का व मतवाल्यांच्या साठ्ाला स्पशम करता येईल इतक्या जवळ जाऊन वीरांची एक तुकडी त्यांच्यावर लक्ष ठे वून होती. त्यापुढे त्याने हा भुयारी मागम तकल्ल्याच्या तटा खालू न आत पयंत नेला. पण या कामात बराच उशीर झाला होता आणण पावसाळा ही तोंडावर आला होता. या प्रदे शातील वाईट हवामानामुळे नद्या ओलांडणे व रसद गोळा करणे अवघड होणार होते आणण म्हणून ही जागा बादशाही छावणीसाठी अयोग्य असल्याचे लक्षात आले . त्याच्या सैन्याला पुनरुज्जीतवत करण्यासाठी औरंगाबादला गेलेल्या फतहुल्लाह खान याला बादशाहाने परत बोलावले होते व तो नुकताच छावणीत परतला होता. [४३७] बादशाहाने त्याला पादशाहजाद्याच्या (काम बक्ष) छावणीच्या बाजूने त्याच्या हाताखाली व मुनीम खानाच्या सहकाऱ्याने दुसरे भुयार खोदायला सांतगतले . खानाने एका मतहन्यात त्या उंच डोंगरातील खडबडीत माती पोखरून ते भुयार थेट तकल्ल्याच्या दरवाज्याखाली नेले. दोन्ही बाजूंचे सैन्य बराच वेळ लढले . पण आतल्या लशबंदीने बंदुकचींचे कौशल्य बधघतले , एक़ीकडू न तरबीयत खान व दुसरीकडू न फतहुल्लाह खान तकल्ला उध्वस्त करतील हे त्यांच्या लक्षात आले . मुहम्मद मुराद खान याला त्याचे लोक व काम बक्षच्या सैन्याचा बक्षी ख्वाजा मुहम्मद यांना बरोबर घेऊन पावनगडाचे तट बुरूज उडवायचे होते आणण वेढ्यातील सैन्याने आतल्या लशबंदीला पळू न जायला काही वाट सोडली नव्हती. बादशाहा आलमगीरने पावसामुळे ककिंवा इतर कुठल्या अतनष्ट घडामोडींमुळे त्याचे साध्य किी सोडले नव्हते व या सैन्याने किी काम अिमवट सोडले नव्हते. हे सगळे लक्षात घेऊन तकल्ल्यातील लशबंदीने तरतबयत खानाच्या [४३८] मध्यस्तीने शाहजादा व पादशाहजादा यांच्याकडे शरणागती मागण्यासाठी लोक पाठवले . एकूण संभव्य बळींची संख्या लक्षात घेऊन या दोन्ही कृपाळू माणसांनी दयेची तवनंती मान्य करायची लशफारस केली व बादशाहाने त्याला अनुमती ददली. तकल्ले दार कत्रिंबक याला त्याच्या मालमत्तेसतहत जायची अनुमती ददली गेली. २८ मे १७०१ / १ मुहरमम १११३ ला हा तवजय प्राप्त झाला

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३४७

व दोन्ही तकल्ले साम्राज्यात आले . पन्हाळा इतका उंच होता क़ी आजमताऱ्याचे मस्तक याच्या तटापयंत ही पोहोचत नव्हते. * * * [४३९] पन्हाळ्याला नबीशाहदुगम असे नाव ददले गेले. आता मी आिीच्या काही समकालीन घटनांबद्दल सांगतो. काबूलचा तकल्ले दार शेर जमान खान याला नालसर खानाच्या जागी नायब सुभेदार नेमले गेले व नालसर खानाला लशक्षा म्हणून मनसबीतून ५०० जात (६०० स्वार) कमी केले गेले. सद्रुद्दीन मुहम्मद खान सफावी याला धमझाम उपािी ददली गेली. बादशाहाला कळले क़ी गाझीउद्दीन खान बहादुर तफरोज जंग आदे शाप्रमाणे तळाचे रक्षण करण्यासाठी आला आहे. धचन कललच खान बहादुर त्याच्या वधडलांवर रुष्ट होऊन आदे शानुसार औरंगाबादला गेला. मुख्तार खानाचा मुलगा व हैदराबादचा नाजजम जानलसपार खान वारला. त्याची सुभेदारी काम बक्षच्या सहकाऱ्यांना ददली गेली. ददवंगत जानलसपार खानाचा मुलगा रुस्तमददल खान याला नायब सुभद े ार करून त्याच्या हजारीत (५०० स्वार), ५०० (तततकेच स्वार) अशी वाढ ददली गेली. बल्बरीस खानाला मुतमजाबादच्या तळाचा संरक्षक नेमले गेले व त्याच्या दीड हजारी (५०० स्वार) मध्ये ५०० (१०० स्वार) अशी वाढ ददली गेली. दाऊद खानाला नुस्रत जंग याच्या हाताखाली तवजापुरी कनामटकचा1 सहाय्यक फौजदार नेमले गेले. बादशाहाला प्रचंड सदी होऊन घशाला सूज आल्यामुळे त्याला ईद-उलतफत्रच्या (२८ फेब्रुवारी १७०१ / १ शव्वाल १११२) नमाजासाठी बाहेर जाता आले नाही. [४४०] काम बक्ष व त्याची मुले व बुलंद अख्तर यांनी बादशाहाला ईद बद्दल अणभवादन

केले . बादशाहाने आदे श ददला क़ी शाहजाद्यांनी ददले ल्या भेटवस्तूंना नजर म्हणायच्या ऐवजी तनयाज म्हणावे व नामदारांनी ददले ल्यांना तनसार म्हणावे. तुराणचा दत कुतबुद्दीन याने काबूलला जाताना तनरोप घेतला होता. ततथे पोहोचल्यावर त्याला बादशाही सेवेत घेतले जावे अशी त्याने पादशाहजाद्याला तवनंती केली. त्याला हजारी (२०० स्वार) ददली गेली.

1

इंग्रजी अनुवादात ‘Karnatak Haidarabadi (Bijapuri)’ असे ददले आहे. फासी पाठात हैदराबादी हा शब्दच येत नाही त्यामुळे तो इथे वगळला आहे.

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३४८

शुक्रवार, १८ एतप्रल १७०१ / २१ जजल्कदा १११२ ला ददवाण-ए-खासच्या अंगणात वीज कोसळली व त्याने आब्दारखान्यातील एक भोई मारला गेला पण इतर लोक सुरणक्षत होते. पादशाहजादे , शाहजादे व दरबारातील तसेच प्रांतांमध्ये नेमले ल्या नामदारांनी बादशाहाला तसद्दुकसाठी पैसे पाठवले . ददवंगत सआदुल्लाह खानाचा मुलगा व तट्ट् याचा सुभेदार तहफजुल्लाह खान वारला. खानाच्या मुलांपक ै ़ी हा अक्षम नव्हता. सैद खान बहादुर शाहजहानी याचा मुलगा खानाहजाद खान याला मुईझुद्दीनच्या तवनंतीनुसार तट्ट् याचा सुभद े ार व लसतवस्तानचा फौजदार नेमले गेले. तो दोन हजारी (१०० स्वार) होता व त्याला ५०० (७०० स्वार) अशी वाढ तसेच सैद खान ही उपािी ददली गेली. मुल्तफत खानाला खानाहजाद खान बख्तयावर1 ही उपािी ददली गेली. इस्माईल खान माखा याला नबीशाहदुगमचा फौजदार नेमले गेले. तो पाच हजारी (४००० स्वार) होता, त्या हजार स्वारांची वाढ ददली गेली. शेख मीर याचा मुलगा मुहतशाम खान याला दोन हजारी तनयुक्त केली होती, त्याची कमी केले ली एक हजारी त्याला परत ददली गेली. हमीदुद्दीन खान बहादुरला [४४१] एक अंगरखा, कमरेचा मुतक्का व मीर आततश तरबीयत खान याला एक अंगरखा व लशरपेच ददला गेला. इटवाहचा फौजदार खैरांदेश खान कंबूह याला बक्षीस म्हणून सात लक्ष दाम व िामुनीची फौजदारी ददली गेली. धचन कललच खान बहादुर याला मामूर खानाच्या जागी तवजापुरी कनामटकाचा फौजदार नेमले गेले. तो चार हजारी (३००० स्वार) होता त्याला ६०० स्वारांची वाढ ददली गेली. बादशाहाकडे अहमदाबादहून बातमी आली क़ी नाजजम शुजाअत खान मुहम्मद बेग याचा १६ जून १७०१ / २० मुहरमम १११३ रोजी मृत्यू झाला. तो फारच सुदैवी होता कारण अगदी तळागळातून वर येऊन आमीर पदापयंत पोहोचला होता. तो अत्यंत सरळ व कुशल अधिकारी तसाच एक सक्षम सेनापती व कारभारी होता. त्याने किीही काही घोडचुका केल्या नाहीत व त्याच्यात अनेक चांगले गुण होते2. खालशाचा ददवाण अशमद खान वारला.

1

2

इंग्रजी अनुवादात त्याला खानाहजाद खान ही उपािी ददल्याचे म्हटले आहे पण फासी पाठात खानाहजाद खान बख्तयावर अशी उपािी ददली आहे. फासी हस्तललखखतात इथे आणखी काही शब्द ददले आहेत जे छापील फासी पाठात गाळले आहेत – सुभ्यातील लोकांना त्याच्या चमत्कारी कलागुणांची मातहती होती व त्याच्या थडग्यावर

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३४९

इनायतुल्लाह खान तान व खालशािा ददवाण होतो त्याच्या ददवान-ए-तान या पदाच्या अततररक्त त्याला ददवंगत अशमद खानाकडे असले ली खालशाची ददवाणी ददली गेली. तो दीड हजारी (१५० स्वार) होता व आता त्याला १०० स्वार वाढ धमळाली. मुख्य तळावरून बोलावून घेतले ल्या उम्दत-उल-मुल्क आसद खान याने गुरूवार, २८ ऑगस्ट १७०१ / ४ रतब-उस-सानीला १११३ ला भेट घेतली. लु त्फुल्लाह खानाला तवजापूरच्या सुभद े ारी वरून औरंगाबादच्या सुभेदारीवर तनयुक्त केले गेले व ५०० स्वारांची वाढ दे ऊन तो आता तीन हजारी (२५०० स्वार) झाला. शातहस्ता खानाचा मुलगा अबु नसर खान [४४२] याला त्याची अडीच हजारी (१००० स्वार) परत करून मुख्तार खानाच्या जागी माळव्याची सुभद े ारी व ५०० (१५०० स्वार) वाढ ददली गेली. आदे शानुसार माळव्यात िार येथे छावणी टाकून बसले ल्या शाह आलीजाह याला अहमदाबादचा सुभेदार तनयुक्त करून त्याला ततथे कूच करायला सांगणारे फमामन पाठवले गेले. पूणम वषामच्या घटना सांगून झाल्या असल्यामुळे आता मी पुन्हा बादशाहाच्या नबीशाहदुगमहून खटावकडे झाले ल्या प्रवासाकडे वळतो. साददकगड, नामगीर, धमफ्ताह व मफ्तूह चे तवजय – काही ददवस पन्हाळ्याच्या पररसरात रातहल्यानंतर, लोकांच्या भल्यासाठी बादशाही सैन्याने खटावकडे कूच केले कारण त्या पररसरात रसद मुबलक प्रमाणात उपलब्ि होती ज्यामुळे ईश्वतनर्मिंत प्राणीमात्र सुखी झाले असते तसेच बादशाही सैन्याने कूच केले आहे हे कळल्यावर विमनगड, नामगीर, चंदन व वंदन हे तकल्ले कातफरांकडू न घेणे सोपे गेले असते. [४४३] असा तवचार करून गुरूवार, २९ मे १७०१ / २ मुहरमम १११३ ला सैन्याने कूच केले . फतहुल्लाह खान, ज्याला त्याच्या उत्तम सेवब े द्दल बहादुर ही उपािी ददली गेली होती, त्याला एका तुकडी बरोबर पुढे जाऊन कातफरांना परास्त करायला पाठवले गेले. खानाने तातडीने जाऊन या चारही तकल्ल्यांच्या मेटावरील लशबंदीवर छापा मारला, अनेक शत्रू मारले व अगणणत गुरे व माणसे बंदी बनवली गेली. हा आवेश व सैन्य पोहोचले आहे ते बघून ६ जून १७०१ / १० मुहरममला १११३ विमनगडावरील लशबंदी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गड ररकामा सोडू न पळू न गेली. खान बहादुरचे नाव मुहम्मद सादीक होते

त्यांनी फाततहा वाचला. या अधिकाऱ्याच्या सक्षम प्रशासनाच्या वृतां तासाठी सरकार यांचे History of Aurangzeb, अध्याय ५८ तवभाग ३-७ पाहावे.

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३५०

म्हणून गडाचे नाव साददकगड ठे वले गेले. सोमवार, २३ जून १७०१ / २७ मुहरमम १११३ ला बादशाहाने खटावपासून दोन कोसांवर असले ल्या या गडाच्या पररसरात छावणी टाकायचा आदे श ददला. ततथून त्याने खान बहादुरला बक्षी-उल-मुल्क बहरामंद खान याच्याबरोबर नांदगीर घ्यायला पाठवले . दहा ते बारा ददवसात त्या तकल्ले दाराने जीवाच्या भीतीने त्या मंत्र्याची भेट घेतली व गडाची तकल्ली त्याच्या हाती सोपवली. [४४४] नामदारांनी तो तकल्ला जजिंकला असल्याने नांदगीरचे नाव बदलू न नामगीर ठे वले गेले. इथून इस्लामी सैन्य चंदन वंदनच्या ददशेने तनघाले व त्यांना धमफ्ताह व मफ्तूह अशी नावे ददली गेली. प्रथम चंदनला वेढा घातला गेला व थोड्याच वेळात लशबंदीने शरणागती पत्करली. मग वंदन हा पतहल्या श्रेणीचा तकल्ला सैन्याने वेढला. त्यातील लशबंदीला सुरक्षेसाठी याचना करण्यालशवाय काही पयामय नव्हता. सोमवार, ६ ऑक्टोबर १७०१ / १४ जमाद-उल-अव्वल १११३ ला त्यांनी तकल्ला सोडला. * * * * हे चार बलाढ्या तकल्ले चार मतहन्यात नाही तर [४४५] चार ददवसात जजिंकले गेले * * * * काही ददवसांनी बादशाहाच्या आदे शानुसार उम्दत-उल-मुल्क आसद खान मुख्य छावणीतून दरबारास आला व भेट घेतली. गाझीउद्दीन खान तफरोज जंग बेरारहून आला व त्याला छावणीचे रक्षण करायला सांतगतले गेले. मुकरमम खान तनवृत्ती घेऊन भत्त्यावर तनवामह करत होता, तो ददल्लीहून बादशाहाला भेटायला आला व काही ददवसांनी त्याला त्याच्या तनवृत्तीच्या िममस्थळाकडे परत जाण्यासाठी तनरोप ददला गेला.

खेळण्यािा त्रवजय व इतर घटना [४४६-४४७] * * बादशाहा या तकल्ल्याच्या (खेळणा) मोतहमेकडे वळला.

यासाठी सैन्य साददकगडाच्या जवळू न ७ नोव्हेंबर १७०१ / १६ जमाद-उस-सानी १११३ ला तनघाले व बारा पडावांत मलकापूरच्या जवळ पोहोचले . इथून पुढे अंबा घाटाची वाट चांगली नसल्यामुळे ती मोकळी करून घेण्यासाठी इथे सात ददवस थांबावे लागले . बीदर बख्त याला नबीशाहदुगमहून [४४८] परतताना हुक्केरी व गोककला पावसाळा काढायची अनुमती ददली गेली होती. त्याने त्या भागातले अनेक तकल्ले काही काळातच शत्रूकडू न जजिंकून घेतले . आता त्याला खेळण्याकडे ‘लक्ष दे ण्यासाठी’ ततथे येण्याचा आदे श ददला गेला. तो बोरगाव मागे वाटे तील गाव व वाड्या जाळू न टाकत या दठकाणी बादशाहाला

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३५१

भेटला. अवकाळी पावसामुळे इथे सवम प्रकारच्या अडचणी तनमामण झाल्या होत्या. शेवटी फतहुल्लाह खान बहादुर कडू न वाटा मोकळ्या झाल्याचा तनरोप धमळाला व पार करायला अत्यंत अवघड असे हे चार कोसांचे अंतर सैन्याने सगळ्या सामानासकट अगदी सहजपणे कापले . शतनवार, ६ धडसेंबर १७०१ / १६ रज्जब १११३ ला एका टे कडीच्या उतारावर मोकळ्या जागेत सैन्याची छावणी टाकणे सोयीचे होणार असल्यामुळे ततथे सैन्याची छावणी पडली. खेळणा ततथून साडे तीन कोसावर होता व इतके सामान घेऊन इतके मोठे सैन्य त्या भागातून दोन तीनदाच गेले असल्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांची गर्विंष्ठ डोक़ी बादशाही सैन्याने केले ल्या छाप्यांनी तुडवली गेली. या डोंगराळ प्रदे शातील सगळ्या वाटा दाट काटे री जंगलाने वेढल्या आहेत व सूयमही त्यात डोकावण्याचे िाडस करत नाही. [४४९] त्या नीच कातफरांप्रमाणे हे उंच व बलाढ्य वृक्ष सवम ददशांना पसरले आहेत. त्यांच्या फांद्या एकमेकात इतक्या गुरफटल्या आहेत क़ी एखादी मुंगीही त्यातून कशीबशीच वाट काढू शकेल. पायी चालणाऱ्यांसाठी सुद्धा ही वाट अवघड आहे. इथले खाचखळगे फारच भयंकर व खोल आहेत. इथल्या डोंगरांचे पाय जधमनीत खोलवर रुतल्यासारखे ते घट्ट उभे आहेत. खान बहादुरला वाटे तील या सगळ्या अडीअडचणी बाजूला सारायचा आदे श ददला गेला. त्याच्या नेतृत्वाखाली लाकुडतोडे व पाथरवटांनी एका आठवड्यात कमालीचे काम करून दाखवले . टे कड्या सरळ झाल्या, उंच सखल भाग गेले व झाडे कापली गेली. शंभर घोडेस्वारांना सलगपणे जाता येईल इतक़ी रुं द वाट तयार झाली. २३ धडसेंबर १७०१ / ३ शाबान १११३ ला खान बहादुरला एक तवशेष भाता ददला गेला व उम्दत-उल-मुल्क मदार-उल-महाम आसद खान याच्या हाताखाली ददले ल्या सैन्याचे मागमदशमन करायला नेमले गेले. त्याच्या बरोबर हमीदुद्दीन खान [४५०] बहादुर, मुनीम खान, इखलास खान व राजा जयससिंह यांना दे ऊन त्याला तकल्ल्याला वेढा घालायला सांतगतले गेले. २६ धडसेंबर १७०१ / ६ शाबान १११३ ला उम्दत-उल-मुल्क याला अमीर-उल-उमरा ही उपािी, एक रत्नजधडत खंजीर, ४००० अशरफ़ी बक्षीस व बादशाहाच्या पायाचा मुका घेण्याचा सन्मान धमळाला व त्याला वेढा घालण्यासाठी पाठवले गेले. त्या ददवशी खान बहादुर व हमीदुद्दीन खान बहादुर, मुनीम खान व इतर काही वीर सूयोदयापूवी खखिंडीत पोहोचले . शत्रूने ततथल्या बुरुजांच्या भभिंती बळकट केल्या

अध्याय ४५

२९ जानेवारी १७०१ ते १८ जानेवारी १७०२

३५२

होत्या व खान बहादुर ज्या टे कडीवर तोफा चढवून त्या तकल्ल्यावर डागणार होता, ती तकल्ल्यासमोरील टे कडीच शत्रूने बळकावल्यामुळे खानाने आिी त्यांच्याकडे लक्ष द्यायचे ठरवले . डाव्या बाजूने शत्रू अचानक चाल करणार नाही हे बघायला त्याने हमीदुद्दीन खान बहादुरला त्या बाजूला नेमले व फतेहुल्लाह खान बहादुर स्वतः उजव्या बाजूने गेला. शौयामच्या वाऱ्याने शत्रूच्या पतहल्या ददवसाची मशाल तवझवल्यावर १३ ककिंवा १४ जणांबरोबर तो अचानक त्या सैतानांवर तुटून पडला व मृतांच्या दढगाने त्या टे कडीची उंची दुप्पट झाली. पळू न जाण्यालशवाय शत्रूला काही पयामय उरला नाही. त्यांनी गडबडीत स्वतःला खाली झोकून ददले व त्यांना तकल्ल्याकडे िावायचे होते. ततथून तनघण्यापूवी खान बहादुर याने [४५१] जझैर दे ऊन काही लोकांना शत्रूला िडा लशकवण्यासाठी िाडले होते व ते तकल्ल्याकडे जाणाऱ्या वाटे वरच थांबले होते. अशा प्रकारे ही वाट बंद झाल्याचे बधघतल्यावर शत्रूने जंगलात पळ काढला व झाडांमध्ये लपले . त्या वेळी बादशाही सैन्याची आणखी एक तुकडी पाठोपाठ आली व आत घुसत शत्रूंपक ै ़ी अनेकांना पकडले . खान बहादुरने त्यांच्या कमरेला िोंडे बांिून त्यांना तवनाशाच्या दरीत ढकलू न ददले (कडेलोट केला). त्या टे कडीवर त्याची पकड मजबूत करणे ही चांगली युद्धनीती होईल असा त्याने तवचार केला. संध्याकाळी बादशाहाला ही वाताम कळली. खान बहादुरला २०० स्वारांची वाढ, आलम व रत्नजधडत खंजीर ददला गेला. हमीदुद्दीन खान बहादुर याला एक कट्यार तर मुनीम खानाला सोन्याच्या साजाचा एक अरबी घोडा (त्याचा घोडा मारला गेला होता म्हणून) व बादशाहाच्या स्वयंपाकघरातील जेवण पाठवले गेले. खान बहादुरच्या सवम सहकाऱ्यांना बढत्या ददल्या गेल्या. रात्र मोचे लावण्यात गेली. जजथून बाण व तोफा डागता येतील अशी आणखी एक टे कडी त्याने दुसऱ्या ददवशी घेतली. लशबंदीची घरे जाळू न उध्वस्त करण्यासाठी त्या टे कडीवर तोफा चढवल्या गेल्या. एक भुयार खोदायचे काम सुरू केले गेले. [४५२] रतववार, ११ जानेवारी १७०२ / २२ शाबान १११३ ला बादशाहा कामाची व तकल्ल्याची पाहाणी करायला गेला व मोचे पुढे रेटायचा आदे श ददला. शुक्रवार, १६ जानेवारी १७०२ / २७ शाबान १११३ ला पुढच्या तुकडीचे मनोिैयम व कामाची गती वाढवायला त्याने आिीच्या जागेवरून त्याची छावणी हलवली आणण ती तकल्ल्यापासून अध्याम कोसावर आणली.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५३

अध्याय ४६ राजवटीचे सेहचाळीसावे वषम – तहजरी १११३-१४ १९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३ सोमवार, १९ जानेवारी १७०२ / १ रमजान १११३ ला बीदर बख्त याला मुख्य छावणीच्या आसपास टे हळणी करायला सांतगतले गेले होते त्याला आता परत तफरून नबीशाहदुगमच्या जवळ थांबायचा आदे श ददला गेला. सद्र-उस-सद्र मुहम्मद आमीन खान याला २०० स्वारांची वाढ व आलम दे ऊन अंबा घाटाने तळ कोकणात उतरून खेळण्याच्या खालच्या बाजूनी शत्रूचा प्रदे श उध्वस्त करून लशबंदीचा येण्या-जाण्याचा मागम बंद करायला सांतगतले गेले. आदे शानुसार तरतबयत खान अंबा घाटाच्या तोंडाशी थांबला. मुहम्मद आमीन खान [४५३] याने कोकणात उतरून त्या पट्ट् यातली गावे लु टून उध्वस्त केली, अनेक लोक व गुरे ताब्यात घेतली व तकल्ल्याचा कोकण दरवाजा बंद करायच्या प्रयत्नात तो होता. आता मी खान बहादुर फतहुल्लाह खानच्या कामाबद्दल सांगतो. तोफा व जझैर त्यांच्या जागी चढवल्यावर त्याने िाडस दाखवत सुरुंगाची वाट पुढे नेत तटाच्या अलीकडील खंदकापयंत नेली. आतील लशबंदी अहोरात्र तोफा व बंदुकांचा मारा करत वेढ्याच्या कामात गुंतले ल्या लोकांचे प्राण घेत होती. खान बहादुर याने त्याचे काम नेटाने चालू ठे वले . धमत्र व शत्रूंच्या जजवाचे मोल िान्याच्या अध्याम दाण्या इतकेही रातहले नव्हते. तकल्ल्याच्या दरवाज्यापासून गुप्त वाटे ने येऊन प्रततकार करण्यासाठी शत्रू रेवणीत येऊन बसला होता. खान बहादुर ढाब घेऊन पुढे आला आहे व लशड्या लावण्याच्या प्रयत्नात आहे हे बधघतल्यावर शत्रू सैन्याला काय करावे ते कळे नासे झाले आणण ते (भांबावल्यामुळे) भभिंतीकडे तोंड करून उभे रातहले . दरवाज्याच्या खाली खंदकाच्या मध्यापासून ते जधमनीच्या स्तरापयंत लावले ल्या लशड्या त्यांनी उध्वस्त केल्या. खान बहादुर याने उंटगाड्यांपासून (कजावाह) लशड्या बनवल्या व त्याच्यावर ढाब बसवून तो आघाडीच्या तुकडी पुढे गेला. आता मी मुहम्मद आमीनने केले ल्या कामाबद्दल थोडे सांगतो. त्याला कोकण दरवाजा बंद करण्यासाठी पाठवले गेले होते. आकाशा एवढा उंच डोंगर चढू न जायचे िाररष्ट दाखवत [४५४] तो खेळण्याच्या दरवाज्या समोरील टे कडीवर आला. शत्रूने त्यावर

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५४

तट उभारून त्याच्या पुढे खोल खंदक खणले होते. * * * थोडक्यात, हाती घेतले ल्या कामाच्या प्रगतीवर थोड्या वेळासाठी अडचणींचा पडदा पडला होता. बुिवार, ४ माचम १७०२ / १५ शव्वाल १११३ ला स्वतःच्या जजवाची पवाम न करता त्याने काही अणभमानी वीरांबरोबर ती टे कडी सर केली व शत्रूला ततथून तकल्ल्याच्या रेवणीपयंत मागे सारले . मृतांचे ढीग तयार झाले होते. लशबंदीचा वाट बंद केली गेली व तवजय प्राप्त झाला. हे कळल्यावर बादशाहाने खानाला बहादुर ही उपािी ददली व त्याला एक िूप, एक अंगरखा व एक फमामन पाठवले . त्याच्या सहकाऱ्यांनाही सुयोग्य बढत्या, तलवारी, कमरेचे खंजीर, घोडे, हत्ती व अंगरखे धमळाले . बादशाहाने दरदृष्टीने बीदर बख्तला नबीशाहदुगमहून बोलावून घेतले [४५५] होते. त्याचे सैन्य, राजा जयससिंह याचे सैन्य, मोचे सांभाळणारा फतहुल्लाह खान व दं डा राजापुरीचा मुत्सद्दी याकुत खान याने पाठवले ले हजार लोक घेऊन त्याला कोकण दरवाज्याकडू न तकल्ला घ्यायला सांतगतले गेले. त्याने मोचे लावून तोफांनी तट बुरूज उडवायला सुरवात केली. मुहम्मद आमीन खान आजारी पडल्यामुळे त्याला बादशाहाने परत बोलावून घेतले . फतहुल्लाह खान बहादुर याने अथक पररश्रम घेऊन त्या कठीण खडकात ढाब बसवले आणण बुरूजाच्या मध्यापयंत पोहोचला, सगळीकडू न भुयारे पोखरली गेली होती * * * तरीही यश काही हाती लागत नव्हते. शेर दहान व कडक तबजली या डोंगर फोडू शकणाऱ्या तोफांनी भरमसाठ मारा करून दे खील बुरुजाचे काहीच धचरे तनखळू न पडले होते. शत्रूकडू न सातत्याने १०० व २०० मण मतवाल्यांचा मारा होत होता. काही वेळा रात्री ते छापे मारून मोच्यांवर तुटून पडायचे. त्यांना थोपवण्यासाठी खान बहादुर स्वतः त्यांच्याशी दोन हात करत होता. एकदा तो मजूरांना ढाब बसवायला मदत करत होता तेव्हा वरून आले ला एक िोंडा १६ अंगुली रुं दीच्या फळीवर पडला व ततचे तुकडे झाले . त्याने खानाच्या डोक्याला मार बसला व तो बरेच अंतर खाली घरंगळत गेला व एका कजावाहवर आपटला, त्यामुळे मरता मरता वाचला. त्याच्या कमरेला व इतर दठकाणी बरेच लागले . एका मतहन्याने तो पूणम बरा झाला व बादशाहाची भेट घेतली, त्याला तवशेष लशरपेच दे ऊन मग तो परत कामावर गेला. तो [४५६] शत्रूला हुल दे ऊन दुसऱ्याच बुरूजाच्या शेजारून आक्रमण करायचा बेत करत

होता तेव्हा बीदर बख्त याच्या परीश्रमांनी तकल्ल्याची रेवणी २७ एतप्रल १७०२ / १० जजल्हेज १११३ ला ताब्यात आली, म्हणजेच थोडक्यात खेळणा तकल्ला जजिंकला गेला.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५५

राजा जयससिंह व त्याच्या लोकांनी या आक्रमणात कमालीची सेवा केली. याजूज व माजूज1 यांच्या इतके असंख्य सैन्य शत्रूकडे असूनही हा अडथळा दर झाल्यावर त्यांचे िाबे दणाणले . * * * शाहजाद्याला रत्नजधडत लशरपेच, राजाला ५०० (२००० स्वार) अशी वाढ व इतर वीरांना बढत्या व सन्मान धमळाला. सैफुल्लाह खानाचा मुलगा असदुल्लाह जो वेगाने घोडदौड करत बातम्या घेऊन यायचा त्याला त्याच्या वधडलांची उपािी ददली गेली. शाहजाद्याला आदे श ददला गेला क़ी तोफा पुढे नेऊन तकल्ल्याचा दरवाजा पाडावा कारण फतहुल्लाह खान बहादुर याच्या बाजूच्या दरवाज्या इतका तो उंच, भक्कम आणण तोडायला अवघड नव्हता. पण ततथे होणाऱ्या अतवश्रांत व जोरदार पावसाबद्दल मी काय ललहू ! दोअस्बा घोड्याप्रमाणे १० ककिंवा २० ददवस सुद्धा डोळे उघडू न दे ता ककिंवा डोके वर करू न दे ता तो अखंड कोसळत होता. पण इतके असूनही दोन्ही [४५७] बाजूच्या मोचांमिील वीर वाऱ्यासारखे सरसर पुढे जात होते. या शत्रूला ते घाबरत

नसल्यामुळे या क्रूर संकटाला ही ते भीक घालत नव्हते. आक्रमणासाठी वाट तयार नसताना, ढाब पडले असताना व कामात सगळा गोंिळ माजला असताना ही फतहुल्लाह खानाने ठरवले क़ी जर आक्रमण करायचे असेल तर त्याला लगेच वारा व तवजेच्या वेगाने तटावर चढायला लागेल. त्याच्या तवनाशाची ही सगळी तयारी चालली असल्याचे बघून परशुरामने काही तवनंत्या करून शरणागतीची बोलणी करायला काही ब्राह्मणांना शाहजाद्याकडे पाठवले . बादशाहाने नेमले ल्या बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान व फजैल खान बयुतात यांच्या मध्यस्तीने संदेश नेण्या-आणण्यात काही ददवस गेले. शेवटी त्याला व लशबंदीला स्वतःचा जीव वाचवून बाहेर पडता येईल या लशवाय इतर कुठलीही तवनंती बादशाहाने मान्य केली नाही. गुरूवार, ४ जून १७०२ / १९ मुहरममला १११४ परशुरामाने स्वतःच्या हाताने शाहजादा व बक्षी-उल-मुल्क याचा झेंडा ततथे लावला व रतववार, ७ जून १७०२ / २२ मुहरमम १११४ ला रात्रीच्या अंिारात त्याला बाहेर जाऊ ददले गेले. बादशाहाच्या आदे शानुसार त्याला कोणीही अडवले नाही. डोंगराच्या माथयावरून

1

इंग्रजी अनुवादात हे गोग व मगोग अशा नावांनी ददले आहेत. इस्लामी ग्रंथांत यांचा उल्ले ख याजूज व माजूज असा येतो. फासी पाठातही असाच उल्ले ख आहे. ज्यू, खिस्ती तसेच इस्लामी ग्रंथांपासून ते अगदी अलक्षेन्द्रच्या मोतहमेपयंत या दोन्ही नावांचा उल्ले ख व्यक्त़ी, जमाती ककिंवा प्रदे श या अथी येतो. असुर, मागास, रानटी, दुष्ट प्रवृत्तीच्या सेनेचे नेतृत्व करणारा शत्रू, अशा प्रकारे त्यांचा उल्ले ख आले ला ददसतो. स्टा. १५२४, ११३७.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५६

आसमंतात नाद घुमला – सत्याने असत्याचा पराभव केला1. पापी कातफरांनी मुसलमानांना धमळाले ले (िमामच)े सत्यवचन ऐकले आणण मुसलमानांना धमळाले ल्या ईश्वरी तवजयामुळे ते जधमनीत खोल बुडाले . काही उत्तम कवींनी या तवजयाचे वषम कालश्ले शात मांडले ते असे –

ٔ ‫فتح شد قلعه کهيلنا ؟‬ फतह शुद तकला-ए-खेलना ? खेळणा तकल्ल्यावर तवजय धमळवला ? शब्दांच्या वजनाचे मुल्यमापन करून हा कालश्ले ष स्वीकारला गेला. सुयोग्य उच्चार करून व अल्लाहचे आभार मानून बादशाहा कुराणाचे वाचन करत असता सख्खर लना हे शब्द समोर आले . ‘सख्खर लना’ (आम्हाला धमळवून ददले ) हे शब्द शुभ संकेत आहेत असे मानून [४५८] जजिंकले ल्या तकल्ल्याला सख्खरलना2 हे नाव ठे वले गेले. या भागातील डोंगर व माती फार सुद ं र आहे, जसे काही खाली डोंगर नसून नुसती फुले व वनौषिी सवमदर पसरली आहेत. ज्याला ईश्वराची प्रततभा बघायची आहे त्याच्यासाठी बागांसारखे ददसणारे हे डोंगर व सपाटी यांलशवाय दुसरे काही समपमक असणार नाही. इथे एकही झाड नाही ज्याचा काही उपयोग नाही, एकही फूल नाही ज्याने बुद्धीला सुगंिाची भूल पडत नाही. या तवस्तृत सपाटी वरील प्रत्येक कणातून धमळणाऱ्या फुलांमिून व औषिी वनस्पतीतून अनेक दे शांचा महसूल गोळा करता येईल. इथल्या िुळीचा प्रत्येक कण हृदयास आकर्षिंत करतो. * * * बुिवार, १० जून १७०२ / २५ मुहरमम १११४ ला फतहुल्लाह खान बहादुर याने तयार केले ल्या वाटे मागे जाऊन बादशाहाने तकल्ल्याला भेट ददली. झातबत खानाला पुरेशी सामग्री दे ऊन त्याचा तकल्ले दार नेमले गेले. तकल्ल्याची पुढची बाजू फारच बळकट आहे. * * * पण इतर तकल्ल्यांवर ददसतात तशा इमारती, बागा ककिंवा तलाव यावर नाहीत. हा सीमेवरील तकल्ला असल्यामुळे हा तकल्ला जजिंकून बालाघाट व पैनघाट (तळकोकण) 1

या वाक्यापासून [४५८] या पृष्ठ क्रमांकापयंतची वाक्ये इंग्रजी अनुवादात गाळली आहेत.

2

इंग्रजी अनुवादात याचा अथम ‘God made hell subject to us’ असा ददला आहे. कुराणातील सुराह ४३ आयत १३ मध्ये ‘सख्खर लना’ हे दोन शब्द येतात. ही पूणम आयत वाचली तर ‘(अल्लाहने) आम्हाला हे धमळवून ददले ’ असा या शब्दांचा अथम तनघतो.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५७

साम्राज्यात आले . सगळ्या मोतहमांमागे बादशाहांची हजार राजक़ीय कारणे असतात त्यामुळे या तकल्ल्यावरील तवजय [४५९] हा प्रचंड मोठा समजला गेला. दुसऱ्या ददवशी बादशाहाने या आनंदातप्रत्यथम शाहजाद्याला एक लक्ष रुपये इनाम दे ऊन हुक्केरी व रायबागला छावणी टाकायला पाठवले . फतहुल्ला खान बहादुर याला एक रत्नजधडत जजघा व त्याच्या उपाध्यांमध्ये आलमगीरशाही ही नवीन उपािी लावली गेली. रुहुल्लाह खान व हमीदुद्दीन खान बहादुर यांना प्रत्येक़ी २०० स्वार वाढ ददली गेली. बादशाहाच्या जवळचा खानाहजाद खान याच्याकडे दोन हजारी (४०० स्वार) होती त्याला ५०० स्वारांची वाढ व एक हत्ती ददला गेला. मुनीम खानाला पीलखान्याचा दरोगा व वाढ दे ऊन हजारी (३०० स्वार) ददली गेली. औरंगजेब पादशाहजादा असताना त्याचा सेवक असले ला ख्वाजा लु त्फुल्लाह याचा भाऊ अब्दुल्लाह खान याला आग्र्याच्या तकल्ले दारीवरून पदच्युत केले होते. आता काही कारणास्तव त्याची दोन हजारी (१००० स्वार) काढू न घेण्यात आली. ददवंगत जझयाउद्दीन खानाचा नातू व खानाहजाद खानाचा मोठा भाऊ मीर अबुल वफा याला वृद्ध ददवंगत फतह मुहम्मद कुल याच्या जागी जानमाजखानाचा दरोगा हा अततररक्त पदभार दे ण्यात आला. त्याच्या अलौतकक प्रततभेत अंगभूत असले ली सूक्ष्म आकलनशक्त़ी व बुद्धीची कल्पकता बादशाहाच्या दरबारात थोड्याच ददवसात ददसायला लागली. त्याच्या प्रततभेची झेप या एका घटनेतून ददसते – मुहम्मद मुअज्जम बहादुर शाह कडू न बादशाहाला सांकेततक भाषेतील एक पत्र धमळाले . त्याचा उलगडा होत नसल्याने बादशाहाने त्याच्या वैयलक्तक पत्रव्यवहाराचे पुस्तक मीरकडे ददले व म्हणाला क़ी, [४६०] ‘मी या पत्रातील दोन तीन अस्पष्ट संकेत तसेच ठे वले आहेत. ते पडताळू न त्याचा अथम काढ. मीरने त्याची लक्षवेिी दृष्टी व तीक्ष्ण बुजद्धमत्ता वापरून पादशाहजाद्याच्या पत्रातील आशय गुप्ततेच्या अंिारातून सुस्पष्टपणाच्या उजेडात आणला व ते संपूणम ललहून काढू न बादशाहाला दाखवले . बादशाहाने त्याची प्रशंसा केली व त्याच्या क्षमतेबद्दल त्याचा तवश्वास दृढ झाला. याबद्दल त्याला ५० मोहरांचे वजन असले ली एक मोहर व २० स्वारांची वाढ दे ऊन त्याला चार सदी (३० स्वार) ददली गेली. १८ फेब्रुवारी १७०२ / १ शव्वाल १११३ ला नेहमीप्रमाणे ईद-उल-तफत्र साजरी झाली. अमीर-इल-उमरा आजारी असल्यामुळे बादशाहाने त्यावर कृपादृष्टी दाखवत त्याला न्यायसभेच्या आतल्या दाराने यायची अनुमती ददली. यापुढे त्या दाराला व्यलथत

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५८

लोकांचे दार म्हटले जावे असा आदे श ददला गेला. ततथून आत येऊन बोळातून पुढे येत तो हुजऱ्याच्या जजन्यापासून एक जझरा अंतरावर कठड्याजवळ बसत असे. तीन ददवस तो ततथे बसला व नंतर पूवीप्रमाणे उभा रातहला. इनायतुल्लाह खानाला एक हत्ती ददला गेला. आग्र्याचा नाजजम मुख्तार खान हा अडीच हजारी होता त्याला ५०० ची वाढ ददली गेली. मीर आततश तरतबयत खान तीन हजारी (५०० स्वार) होता त्याला ५०० ची वाढ धमळाली. सुरत बंदराचा मुत्सद्दी ददयानत खान याला ५०० ची वाढ दे ऊन तो दोन हजारी (१५० स्वार) झाला. २७ एतप्रल १७०२ / १० जजल्हेज १११३ ला ईद-उज-जुहा झाली. मंगळवार, २५ ऑगस्ट १७०२ / १२ रतब-उस-सानीला १११४ प्रेतषताच्या आठवणी1 म्हणून जपले ल्या वस्तू एका तंबत ू ठे वल्या गेल्या. [४६१] बादशाहाने ततथे पहारा दे ऊन व यात्रा (जजयारत) करून आशीवामद प्राप्त केला. दै वयोगाने त्याला कळले क़ी कोणीतरी गुलालबाडीत पालखीतून आले होते. अमीर-उल-उमरा, बहरामंद खान, रुहुल्लाह खान, खानाहजाद खान व हमीदुद्दीन खान बहादुर यांच्या व्यततररक्त कोणीही पालखीतून येऊ नये असा आदे श ददला गेला. अजीजुल्लाह खान कुरबेगी याला सजावर खानाच्या जागी कंदहारचा तकल्ले दार नेमले गेले. तो दीड हजारी (८०० स्वार) होता त्याला २०० स्वारांची वाढ धमळाली. बीदर बख्त याला औरंगाबादचे रक्षण करायचा आदे श ददला गेला. ततथला नाजजम लु त्फुल्लाह खान याला खान तफरोज जंगच्या हाताखाली बेरारचा सहाय्यक (नायब) सुभेदार म्हणून पाठवले गेले. पण ततथे पोहोचण्यापूवी तो वारला. तो सुलशणक्षत होता व शूर वीर ही होता. त्याने तनरंतर उत्तम सेवा केली व जवळपास सगळे जीवन दरबारात उच्च पदांवर ककिंवा बाहेर सैन्याचे नेतृत्व करण्यात व्यतीत केले . गुरूवार, ५ नोव्हेंबर १७०२ / २५ जमाद-उस-सानी १११४ ला जाफर खानाचा पुतण्या, मीर बक्षी बहरामंद खान याचा अिांगवायूमुळे मृत्यू झाला. आदे शानुसार काम बक्ष याने अमीरउल-उमराचे सांत्वन केले व त्याला दरबारास घेऊन आला. बादशाहाने आपुलक़ीने त्याचे सांत्वन केले व त्याला एक अंगरखा व एक रत्नजधडत लशरपेच ददला गेला. ददवंगत खान एक स्वाणभमानी, तवनम्र, उदार, तनतळ स्वभावी, प्रसन्नवदनी व सौजन्यपूणम नामदार होता. जुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग याला ददवंगताच्या जागी मीर बक्षी नेमले गेले.

1

११ रतब-उस-सानीला शेख अब्दुल काददर तगलानीचा मृत्यू झाला. १२ रतब-उल-अव्वल या ददवशी प्रेतषताचा मृत्यू झाला होता.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३५९

[४६२] खुदाबंद खानाला धचन कललच खानाच्या जागी फौजदार करून त्याचे पूवीचे पद

ददले गेले. ददल्लीचा नाजजम मुहम्मद यार खान याला मुरादाबादचा फौजदार नेमन ू ५०० (तततकेच स्वार) वाढ दे ऊन साडेतीन हजारी (३००० स्वार)1 व नगारे ददले गेले. मुनीम खानाने मुहम्मद आमीन खानाच्या कुमकेसाठी जाण्यास उशीर केला म्हणून त्याच्या मनसबीतून २०० (५० स्वार) कमी केले गेले व त्याला तपलखान्याचा दरोगा या पदावरून काढण्यात आले . हमीदुद्दीन खान बहादुर याला ते पद दे ऊन त्याच्या अडीच हजारीत (८५० स्वार) ५०० (२५० स्वार) अशी वाढ दे ण्यात आली. माझ्याकडे अनेक पदे असताना व मला तातडीचे गुप्त संदेश ललहायचे काम ददले असताना त्यात नजारतचा मुनशी हे पद वाढवले गेले. वाकनतवसाचे पद माझ्याकडू न माझा मुलगा हाफ़ीज मुहम्मद मुहसन याला ददले गेले. झेबुस्त्न्नसा बेगमच्या मृत्यूबद्दल ददल्लीहून बादशाहाकडे बातमी आली. या बातमीमुळे बादशाहाला इतके दुःख झाले क़ी त्याला अश्रु आवरले नाहीत पण शेवटी त्याला ईश्वराची इच्छा मान्य करावी लागली. सय्यद अमजद खान, शेख आताउल्लाह व हाफ़ीज खान (नूर मुहम्मद) यांना जहांआराचा वारसा असले ल्या तीस हजारी बागेत ततचे थडगे बांिून ततच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानिमम करायचा आदे श ददला गेला. [४६३] बादशाहा सख्खरलनाहून बहादुरगडाकडे परततो व इतर काही घटना.

बुिवार, १० जून १७०२ / २५ मुहरमम १११४ ला बादशाही सैन्य बहादुरगडाकडे तनघाले . जी खखिंड काही ददवसांपूवी कोरड्या हवामानात पार केली होती तीच खखिंड महामूर पावसात पार करायला सैन्याला तकती वेळ लागला असेल त्याची कल्पनाच केले ली बरी. ओझ्याच्या प्राण्यांपैक़ी उंटांनी त्या वाटे वर पाऊल ठे वायला नकार ददला. हत्ती गललतगात्र अवस्थेत सामान वाहून नेऊ लागले पण प्रततकूल हवामानामुळे गाढवाप्रमाणे धचखलात रुतले . * * * * जे करणे अपररहायम होते ते केले गेले. सवम लोकांचे ओझे भोईंच्या माथी ददले गेले. * * * * [४६४] तवश्रांतीचा स्वगम धमळण्याच्या आशेने श्रीमंत लोक कसेबसे खखिंडीच्या पायथयाशी, म्हणजे पतहल्या पडावापाशी

1

इंग्रजी अनुवादात इथे बहुदा नजरचूक़ीने ३०० स्वार ददले आहे. फासी पाठात ( ‫اصل و اضافه‬

‫‘ )سه هزار و پانصد ٔي سه هزار سوار‬असल व इजाफा सेह हजार व पां सदी सेह हजार स्वार’ म्हणजे, ‘मूळ व वाढ िरून साडेतीन हजारी व तीन हजार स्वार’ असे आले आहे.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३६०

पोहोचले . रसद वाहून नेणारे लोक (कारखानजात) पोहोचले नसल्यामुळे बादशाही सैन्याला उशीर झाला. सख्खरलनाच्या तकल्ले दाराकडे सूत्र द्यावे असा बादशाहाने आदे श ददला. सात ददवसांनी सैन्याने पुन्हा कूच केले . वाटे तील ओढ्याने बादशाही सैन्याला प्रवेश ददला पण नंतर काही लोकांना तगळू न टाकले . काही वेळासाठी ततथे थांबावे लागले . जे बुडले ते बुडले आणण ज्यांना दै वाने वाचवले ते वाचले . त्या कपटी ओढ्याने पुढे असले ल्या बादशाही व इतर छावण्यांच्या लोकांना आिी जाऊन ददले आणण नंतर फसवणूक करून उिळले ल्या घोड्यासारखा सैरभैर वाहत लोकांना अगततक केले . त्याने बळकावले ले सामान परत धमळवण्यासाठी हत्तीच्या मालकांना त्याला अनेक तवनवण्या करून त्याची मनिरणी करावी लागली. इतरांना ‘अरे दे वा’ असे म्हणत डोक्यावर हात मारून घेण्यालशवाय काही पयामय उरला नाही. शेवटी एका कोसाच्या अंतरावर बादशाहाने मलकापूरकडे जाणारा डावा फाटा घेतला. या दुदै वी काळात िान्याचा भाव रुपयाला एक शेर इतका झाला होता तर पेंढा व जळण शोिूनही सापडत नव्हते. स्वतःची मालमत्ता पायदळी तुडवून लोक शांत धचत्ताने [४६५] त्यांच्या कष्टी जीवनाबद्दल तवचार करत पडले होते. एके ददवशी बादशाहाच्या लवाजम्यातील एक मनसबदार मुजफ्फर प्रवासात बादशाहाला भेटला. छावणीच्या दठकाणी बादशाहा उतरल्यावर हमीदुद्दीन खानाला म्हणाला क़ी, ‘ददलाराम नावाची एक दासी (परस्तार) अनेक वषम सेवेत होती. ततच्या मुलीचे संगोपन करून मुजफ्फरशी ततचे लग्न लावून ददले होते. आज प्रवासात तो भेटल्यावर माझ्या लक्षात आले क़ी तो पांढऱ्या दाढीचा माणूस आहे. हा दोहा – तुझ्याकडे असले ल्या ददलाआराम ला हृदयात ठे व, जगातील इतरांकडे दुलम क्ष कर व ‘एकावर तनष्ठा ठे वलीत तर तुम्ही असामान्य व्हाल’ ही उक्त़ी मोठ्ा अक्षरात एका फरशीवर ललहून माझ्याकडे आण’. खानाने आदे शाचे पालन केले व काही ददवसांनी ते बादशाहाला दाखवले . तेव्हा तो म्हणाला क़ी, ‘ही फरशी ददल्लीला मुजफ्फरकडे घेऊन जा व ददवंगत ददलारामच्या थडग्यावर बसव’. त्याला पाचशे रुपये ददले गेले. ददल्लीच्या कारकूनांना आदे श ददला गेला क़ी त्या माणसाला प्रांताच्या उत्पन्नातून एका वषामचे वेतन

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३६१

ददले जावे. दोन वषांनी तो जेव्हा बादशाहाकडे परत आला तेव्हा त्याला त्याचे पूणम वेतन व ५० जातची वाढ ददली गेली. * * * * [४६६] शतनवार, ४ जुलै १७०२ / १९ सफर १११४ ला बादशाहाने हत्तीवरून

ओढा पार केला व एका कोसावर छावणी टाकली. त्याला न्यायसभेच्या एका खोलीत बसायची लहानशी जागा धमळाली. शाहजादा व इतर नामदारांना त्यांच्या छावणीत उभे राहायचेही त्राण उरले नव्हते. पवमतासारखा ब्स्थतप्रज्ञ व समुद्रासारखा अथांग असले ला बादशाहा नेहमी म्हणायचा क़ी, ‘एका लहानशा ढगाचा पाऊस आहे, मग इतके हताश का बरं होता ?’ कुराणातील कवने सांगून त्याने त्यांना प्रोत्सातहत केले , ‘अरे श्रद्धावंतांनो, िीर िरा आणण मदतीसाठी प्राथमना करा कारण जे िीर िरतात त्यांना ईश्वर साथ दे तो. पण तुम्हाला कळत नाही. थोडी भीती व भूक व संपत्तीचा ऱ्हास यानी आम्ही हे नक्क़ीच लसद्ध करू शकू पण जो िीर िरतो व संकटकाळी म्हणतो क़ी खरच, आम्ही ईश्वराचे आहोत आणण त्याच्याकडेच आम्ही परतणार आहोत त्याच्यासाठी आम्ही चांगली बातमी घेऊन येतो’1. हुश्श ! शेवटी काही ददवसांच्या अंिःकारानंतर सूयम पुन्हा बाहेर आला व लोकांना हायसे वाटले . रतववार, २६ जुलै १७०२ / १२ रतब-उल-अव्वल १११४ ला एक मतहना सतरा ददवसात १४ कोस [४६७] कापल्यानंतर सैन्य नबीशाहदुगामच्या पायथयापाशी पोहोचले . सूयम पुन्हा आिीसारखा तळपू लागला. भुकेले लोक हातपाय हलवू लागले व क्षुिा व उमी पुन्हा अंगी खेळू लागल्या. मनातली मरगळ गळू न पडली. लोकांच्या डोक्यावरून मोठे ओझे दर झाले . * * * बघवणार नाही अशा ब्स्थतीमध्ये मागे रातहले ले लोक लं गडत ततथे पोहोचले . बुिवार, २९ जुलै १७०२ / १५ रतब-उल-अव्वल १११४ ला बादशाही सैन्य वडगावला2 पोहोचले . ततथे एक मतहना व आठ ददवस रातहल्यानंतर ते बहादुरगडाकडे तनघाले . रतववार, ६ सप्टें बर १७०२ / २४ रतब-उस-सानीला १११४ पाऊस कमी झाला नव्हता व

1

कुराण, ii १५०-१५१ – ही बद्र ककिंवा ओहोदच्या युद्धापूवी प्रेतषताच्या सैन्यातील घाबरणाऱ्या लोकांना चेतावणी दे ण्याच्या उद्दे शाने सांतगतले ली वाक्ये आहेत.

2

पन्हाळ्याच्या पूवेस २० तकमीवर हे वडगाव आहे.

अध्याय ४६

१९ जानेवारी १७०२ ते ७ जानेवारी १७०३

३६२

कृष्णेला पूर आल्याची बातमी आली तरी बादशाहा त्याच्या लक्ष्यापासून तवचललत झाला नाही. सोळा ददवसात नऊ कोस अंतर कापून सगळे सैन्य कृष्णेच्या काठी पोहोचले . नदीला चांगले च भरते आले होते. सैन्य होड्यांतून नदी पार करू लागले . [४६८] अशा तबकट पररब्स्थतीत दहा ददवसात फक्त अिे सैन्य पलीकडे पोहोचले होते. नदी पार करण्यासाठी बादशाहा नावेत बसला. सगळे सैन्य सुरणक्षतपणे पलीकडे जाईपयंत आणखी वीस ददवस बादशाही छावणी ततथे थांबली होती. * * * ततथून मजल-दर-मजल करत तो आसदनगरला गेला व ततथे काही ददवस थांबून मग बहादुरगडाला पोहोचला. या शेवटच्या टप्प्यांतून जाताना चार कोस वाटे च्या दोन्ही बाजूस गाझीउद्दीन खान बहादुर तफरोज जंग याच्या सैन्यातील वस्तुंचे व लवाजम्याचे प्रदशमन मांडले होते. खानाने इस्लामपुरीतील त्याच्या तळाहून त्याचा महल्ला व त्या बरोबर उत्तमोत्तम वस्तू व सजावटीचे महागडे सामान पाठवले होते जे एखाद्या उच्च पदस्थ नामदाराच्या आवाक्याबाहेरचे वाटत होते तसेच सेनापतीच्या कक्षे बाहेरील तोफा व सवमप्रकारची पेशकश पाठवली होती. त्यापैक़ी एक लहान तलवार बादशाहाने स्वीकारली व त्याला तरुण गाझी नाव ददले . तोफखान्याचे बरेचसे सामान सरकारजमा केले गेले. बादशाहाने आदे श ददला क़ी आमीर लोकांनी तनयमात बसतात त्यापेक्षा अधिक तोफा बाळगू नयेत. बादशाहाने स्वतः ललतहले ल्या वाक्यांवरून ‘आदे शानुसार’ असे ललतहले ले पत्र [४६९] बीदर बख्त याला पाठवले गेले ती वाक्ये इथे दे णे उधचत होईल. ‘खान तफरोज जंग हा सात हजारी असून त्याच्या तवभागात त्याने दाखवले ल्या महल्ल्यात

इतर वस्तुंबरोबर तोफा, गजनाळ, शुतरनाळ, घोरनाळ अशा गोष्टी होत्या ज्या सरकारने त्याच्या हाताखाली ददले ल्या गोष्टींपेक्षा अधिक आहेत तसेच सेनापतीच्या कक्षेबाहेरच्या आहेत. तुला त्याच्यापेक्षा दुप्पट पगार असून तू त्याचा योग्य वापर न करता अशा प्रकारे वाया का घालवतोस ? कतमव्य म्हणून आपण जे काही करणे अपेणक्षत आहे ते करणे हेच पररपूणमतेचे लक्षण आहे. काव्यपंक्त़ी – थोडेच आयुष्य उरले आहे तरीही घराचा मालक गवामच्या िुद ं ीत आहे’. * * *

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६३

अध्याय ४७ राजवटीचे सत्तेचाळीसावे वषम – तहजरी १११४-१५ ८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३1 कोंढाण्याचा तवजय - गुरूवार, ३ धडसेंबर १७०२ / २४ रज्जब १११४ ला सैन्य कोंढाणा घ्यायला तनघाले व २७ धडसेंबर १७०२ / १८ शाबानला १११४ तकल्ल्याच्या पायथयापाशी पोहोचले . [४७०] बंगालचा सुभेदार मुहम्मद अजीम याला शमशीर खानाच्या जागी

तबहारच्या सुभेदारीचा अततररक्त पदभार ददला गेला. शमशीर खानाला मुअज्जमाबाद अविची सुभद े ारी ददली गेली. बऱ्हाणपूरचा सुभेदार व बागलाणचा फौजदार नजाबत खान दोन हजारी (१५०० स्वार), रायरीचा तकल्ले दार लशवससिंह हजारी (तततकेच स्वार), खान तफरोज जंग याच्या वतीने कारभार बघणारा बेरार सुभ्याचा नायब सरांदाज खान दीड हजारी (५०० स्वार) या सगळ्यांना प्रत्येक़ी तवनाअट ५०० जात वाढ दे ण्यात आली. मुहतशाम खानाला कालसम खानाच्या जागी नळदुगमचा तकल्ले दार नेमले गेले. औरंगाबाद सुभ्याचा नाजजम बीदर बख्त याच्याकडे खांदेशची सुभद े ारी (अततररक्त ?) ददली गेली. तो पंिरा हजारी (१०००० स्वार) होता, त्याला २००० स्वारांची वाढ ददली गेली. नुस्रत जंग खानाला बऱ्हाणपूरच्या जवळ शत्रूला िडा लशकवायला पाठवले गेले. त्याला एक रत्नजधडत मुतक्का व चार हत्ती ददले गेले. काम बक्षचा मुलगा सुलतान मुही-उल-सुन्नत याला सात हजारी (२००० स्वार), आलम व नगारे ददले गेले. मुलतान व तट्ट् याचा सुभेदार मुईजुद्दीन याला बंडखोर बब्ख्तयार याला संपवल्याबद्दल एक शाही पत्र, एक अंगरखा व एक रत्नजधडत खंजीर दे ऊन त्याची प्रशंसा केली गेली. तो बारा हजारी (८००० स्वार) होता, त्याला आता २००० स्वार व दहा लक्ष दाम बक्षीस ददले गेले. [४७१] धचन कललच खान बहादुर याला तवजापूरची सुभद े ारी, एक लशरपेच, एक घोडा व त्याच्या मुलाला एक हत्ती व एक घोडा बक्षीस म्हणून ददला गेला. झीनतुस्त्न्नसा बेगम तहला इस्लामपुरीहून बहादुरगडला घेऊन यायला काम बक्षला पाठवले गेले. त्याला एक अंगरखा व एक रत्नजधडत लशरपेच ददला गेला. सद्र-उस-सद्र मुहम्मद आमीन खान याला

1

इंग्रजी अनुवादात इथे चुकून १७०४ साल ददले आहे, ते १७०३ आहे.

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६४

त्याच्या हाताखाली नेमले गेले. शतनवार, १३ माचम १७०३ / ६ जजल्कदा १११४ ला मीर मुनशी, बयुतात व खान-इ-सामानचा सहाय्यक आणण वजीर खानाचा मुलगा तनवृत्त फजैल खान1 वारला. सद्गुण व कतमबगारी ही या काळातील या तवद्वानाची वस्त्रे होती. तो स्वतःबद्दल म्हणायचा क़ी, ‘हा माणूस उपब्स्थत आहे, काम कुठे आहे ?’ बादशाहा याच्याबद्दल म्हणायचा क़ी, ‘हा खान-इ-सामानच्या सहाय्यकाचे काम अशा प्रकारे करतो क़ी जणू माझे घरच उजळू न तनघते’. ददवंगत फाजजल खानाचा मुलगा अब्दुर रहीम हा त्याच्या वधडलांच्या तनिनानंतर ददल्लीहून दरबारास आला व त्याला बयुतात हे पद, खानाची उपािी व वाढ धमळाली. बादशाहा म्हणाला क़ी, ‘आला-उल-मुल्क फाजजल खान व फाजजल खान (बुहामनद्द ु ीन) यांच्या सेवब े द्दल मी त्यांचे दे णे लागतो. मी या घरच्या सेवकाची प्रेमाने काळजी घेईन’. आणण त्याच्यातही चांगली क्षमता व गुणवत्ता होती. पण तो भर तारुण्यातच मरण पावला. या कुटुं बातील फाजजल खान बुहामनुद्दीनचा पुतण्या व जावई जझयाउद्दीन वगळता इतर कोणीही उरले नसल्यामुळे त्याला धचनापट्टणच्या [४७२] ददवाणीहून दरबारास यायला सांतगतले गेले. त्याला वाढ, खान ही उपािी व बयुतातचे

1

मुल्ला आला-उल-मुल्क तुमी, फाजजल खान पतहला, हा पर्शिंयाहून भारतात आले ल्या उच्चतम तवद्वानांपैक़ी एक होता. त्याला उच्च ददवाण नेमल्यानंतर केवळ सोळा ददवसातच त्याचे तनिन झाले . त्याचा पुतण्या बुहामनुद्दीन त्या सुमारास भारतात आला व त्याला ददल्लीतील सरकारी सेवेत घेतले गेले, प्रथम कातबल खान, इततमाद खान (धडसेंबर १६७४) व शेवटी फाजजल खान ततसरा (नोव्हेंबर १६८८) अशा पदव्या त्याला ददल्या गेल्या. त्याच्याकडे खान-इ-सामान (१६८८१६९७) व काब्श्मरचा सुभेदार (१६९७ ते ऑक्टोबर १७००) ही पदे होती. तो दरबारास येताना वाटे त बऱ्हाणपूरला वारला. सन १७०३ मध्ये त्याचा मुलगा अब्दुर रहीम याला खाली ददले ल्या फजैल खानाच्या जागी बयुतात म्हणून नेमले गेले. फजैल खान हा मुळचा मीर हादी, म्हणजे पादशाहजादा मुहम्मद आजम याचा ददवाण मीर हाजी वजीर खान याचा मुलगा. आग्र्याच्या तवद्वान संत शेख अब्दुल अजीज याचा तो लशष्य होता. पादशाहजादा मुहम्मद आजम याच्या सेवेत त्याला स्थान धमळाले व एतप्रल १६७८ मध्ये शेखच्या मृत्यू नंतर पादशाहजाद्यावर त्याचा बराच प्रभाव होता. १६८३ पासून अनेक वषम त्याला आग्र्याला नोकरीतवना व बंददवासात ठे वले गेले (कारण बादशाहाला बहुदा वाटले क़ी तो पादशाहजाद्याला लशया पंथाकडे नेण्याचा प्रयत्न करतो आहे). नंतर त्याला दरबारास बोलवून मीर मुनशी, बादशाही ग्रंथपाल, सहाय्यक खान-इ-सामान व बयुतात नेमले गेले व फजैल खान ही उपािी ददली गेली. तो १३ माचम १७०३ ला वारला. या फजैल खानचा आणण वर ददले ल्या दोन फाजजल खानांचा एकमेकांशी काही संबंि नाही.

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६५

पद ददले गेले. फतहुल्लाह खान बहादुर याने तकल्ले जजिंकण्यात व शत्रूला परास्त करण्यात जी चांगली सेवा केली ती सवांच्या मुखी असल्यामुळे इथे ती नोंदवावी लागणार नाही. काबुलच्या नेमणूक़ीबद्दल त्याने अनेकदा त्याची इच्छा बोलू न दाखवली होती. शुक्रवार, २८ मे १७०३ / २३ मुहरममला १११५ त्याची इच्छा पूणम झाली. त्याच्या अडीच हजारीत (१००० स्वार) ५०० ची वाढ ददल्यावर तो आनंदाने काबुलकडे तनघाला. इराणहून (तवलायत) नुकताच आले ला मुहम्मद कुली याला हजारी (१०० स्वार), खान ही उपािी, एक अंगरखा व २००० रुपये ददले गेले. ख्वाजा मुहम्मद, ज्याला आमानत खान ही उपािी धमळाली होती, त्याला वैजापूरच्या1 फौजदारी बरोबर संगमनेरची फौजदारी धमळाली व त्याला एक हत्ती ददला गेला. दरबाराचा इमाम अब्दुल खाललक अरब याच्या पत्नीस पाच रत्ने ददली गेली. गुलबग्यामचा तकल्ले दार इरादत खान हा एक हजारी (३०० स्वार) होता, त्याला ३०० स्वारांची वाढ ददली गेली. बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खानाला हररताश्माची दौत ददली गेली. इनायतुल्लाह खानाचा मुलगा जझयाउल्लाह खान याला आग्र्याची ददवाणी ददली गेली. बक्षी-उल-मुल्क धमझाम सद्रुद्दीन मुहम्मद खानाला एक हत्ती, एक घोडा व एक अंगरखा दे ऊन बहादुरगडाचा तळ संरणक्षत करायला पाठवले गेले. तो अडीच हजारी (८०० स्वार) होता, त्याला ५०० (२५० स्वार) अशी वाढ ददली गेली. राक्षसी संभाचा मुलगा राजा शाहू याला माणकाची असी, तहरा जडवले ली सोन्याची पहुंची, पाच रत्नजधडत अंगठ्ा, [४७३] एक रत्नजधडत खंजीर व सोन्याच्या साजाचा एक घोडा ददला गेला. फतह दौलत कुल याने आदे शानुसार शाहूला शाहजादा काम बक्ष याच्याकडे नेले. शाहजाद्याने त्याला एक अंगरखा व असी बक्षीस ददली. आदे शानुसार शाहूचा तंबू काम बक्षच्या तंबूजवळ लावला गेला. ददवान-ए-खासचा दरोगा हमीदुद्दीन खान बहादुर याने पीधडतांच्या न्यायालयात त्यांना बसण्यासाठी सोयीची अशी एक लाकडी बैठक सादर केली. त्याला तीन हजारी (१७०० स्वार) ददली होती त्यात ५०० (३०० स्वार) वाढ ददली गेली. आमीर खानाचा मुलगा मीर खान हा बहरामंद खानाच्या मुलीशी लग्न करायला औरंगाबादला गेला होता. त्याने भेट घेतली व रत्ने असले ल्या महागड्या वस्तु 1

इंग्रजी अनुवादात इथे तवजापूर म्हटले आहे. फासी पाठात इतर दठकाणी तवजापूरचा उल्ले ख (‫‘ )بيجاپور‬जजम’ वापरून केले ला ददसतो तर या दठकाणी (‫‘ )بضاپور‬ज्वाद’ वापरला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वैजापूरच्या जवळच संगमनेर आहे. त्यामुळे तवजापूरच्या ऐवजी वैजापूर व संगमनेर या दोन दठकाणाची फौजदारी एका माणसाकडे दे ण्याची शक्यता अधिक वाटत.

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६६

सादर केल्या. त्याला एक अंगरखा ददला गेला. राजा शाहूचा भाऊ मदनससिंह मुख्य छावणीतून दरबारास आला व आदे शानुसार भेट घेतली. पादशाहजादा आलीजाह याला अहमदाबाद बरोबरच अजमेरची सुभद े ारी ददली गेली. त्याला चाळीस हजारी (३०००० स्वार) ददली होती त्यात १०००० स्वारांची वाढ ददली गेली. सख्खरलनाचा तकल्ले दार उद्वतससिंह याला सशतम व तबनशतम ५०० (३०० स्वार) अशी वाढ ददली गेली. लसयादत खान उघलानचा मुलगा लसयादत खान याला दोन हजारी (२०० स्वार) होती त्याला ५०० (तततकेच स्वार) वाढ ददली गेली. रुस्तम खान शारजा तबजापुरीचा मुलगा घाललब खान याला साडेतीन हजारी (३००० स्वार) होती. आलाहदाद खान ख्वेशगीला रहमानदाद खानाच्या जागी मांडलाची (?) फौजदारी ददली गेली. तो हजारी [४७४] (५०० स्वार) होता त्याला ५०० (तततकेच स्वार) ची वाढ ददली गेली. तवजापूरचा सुभद े ार धचन कललच खान बहादुर याला आददलखानी तळकोकण, आजमनगर, बेळगावचा फौजदार तसेच सैफ खानाच्या जागी सापगावचा ठाणेदार नेमले गेले. तो चार हजारी (३००० स्वार) होता, त्याला हजार स्वारांची वाढ व एक कोट दाम बक्षीस ददले गेले. तनयाज खानाला त्याचा सहाय्यक नेमले गेले व त्याच्या ५०० (३०० स्वार) मनसबीत ५०० स्वारांची वाढ ददली गेली. बादशाहाच्या जवळचे पद धमळाले ल्या खानाहजाद खान याला मीर ही उपािी ददली गेली. या वषामतील काही घटना नोंदवून झाल्यानंतर आता मी कोंढाण्याचा तवजय व इतर काही गोष्टी सांगतो. बादशाहाने मीर आततश तरतबयत खान याच्या हाताखाली असले ल्या सैन्याला टे कडीवर जाऊन लशबंदीवर मारा करायचा आदे श ददला. खानाने या उंच तकल्ल्याच्या बुरूजासमोरील टे कडीवर मोठ्ा तोफा चढवल्या व काही काळ त्याचा मारा करून त्यांचे तट बुरूज पाडायच्या प्रयत्नात होता जेणे करून तो पाशवी शत्रू त्याच्या चराऊ कुरणातून बाहेर पडला असता. गुरूवार, ८ एतप्रल १७०३ / २ जजल्हेज १११४ ला हा व इतर तकल्ले पडले . याचे नाव बब्ख्शंदाबख्श ठे वले गेले. हा खरच इतका बळकट तकल्ला आहे क़ी तकतीही कष्ट घेतले तरी जोवर दे णारा दे त नाही तोवर तो जजिंकता येणार नाही. पावसाळा तोंडावर आला होता व वाटा अवघड असल्यामुळे [४७५] आणण राजगड घेणे हे बादशाहाचे लक्ष्य असल्याने पावसाळा मुतहयाबाद पुणे इथे घालवून मग पुन्हा मोतहमेवर जायचे असे ठरवले गेले. शतनवार, २४ एतप्रल १७०३ / १८ जजल्हेज

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६७

१११४ ला परतीचा प्रवास सुरू झाला व शतनवार १ मे १७०३ / २५ जजल्हेज १११४ ला सैन्य इब्च्छत स्थळी पोहोचले . आता मी या काळातली एक घटना सांगतो ज्यातून बादशाहाला त्याच्या सेवकांप्रतत वाटणारी आस्था, गुणवत्तेला उत्तेजन दे णे, मानवजातीच्या तनयमांचे काटे कोर पालन व त्याची पररपूणम न्यायबुद्धी ददसून येते.

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६८

पुण्याला जेव्हा बादशाही छावणी पोहोचली तेव्हा चुकून असे झाले क़ी अमीरउल-उमराची छावणी खालशाचा नाजजम इनायतुल्लाह याच्या छावणीपेक्षा खालच्या स्तरावर लागली. थोड्या वेळाने जेव्हा खानाने त्याच्या जनानखान्याच्या छावणीला जोडणारा भाग बंद करून घेतला तेव्हा अमीर-उल-उमराचा प्रतीहार वसंत याने ‘इथून तनघून जा, नवाबाची छावणी इथे लागणार आहे’ असे सांगायला एका माणसाला पाठवले . खानाने उत्तर ददले क़ी ‘ठीक आहे. पण मला छावणीत दुसरी जागा धमळे पयंत जरा थांबा’. त्या प्रतीहाराने उद्धटपणे प्रत्युत्तर ददले . खानाने त्याची छावणी काढू न जवळच दुसरीकडे लावली आणण अमीर-उल-उमराची छावणी ततथे लागली. ददवाणाच्या कचेरीतील वाकनतवस इखलासकेश [४७६] याच्या बातमीवरून हा प्रकार बादशाहाच्या कानी आला. त्याने लगेच हमीदुद्दीन खान बहादुर याला अमीर-उल-उमराकडे तनरोप द्यायला पाठवले क़ी ‘हा प्रसंग नीट हाताळला गेला नाही. तू दुसऱ्या दठकाणी ककिंवा तुझ्या आिीच्या दठकाणी परत जा. ज्याने ततथे आिी छावणी लावली होती तोच ततथे रातहल’. खानाने त्याला हे कळवले पण अमीर-उल-उमराने ते मान्य करायला उशीर लावला. खान बहादुर त्याला ततथे सोडू न मैत्रीत इनायतुल्लाहकडे गेला व झाली गोष्ट सांगन ू त्याला म्हणाला क़ी, ‘तू जर अमीर-उल-उमराकडे जाऊन सांतगतले स क़ी तुला दुसरी जागा धमळाली आहे आणण तुम्हाला तुमची जागा बदलायची आवश्यकता नाही तर बरे होईल’. इनायतुल्लाह त्याला म्हणाला क़ी, ‘तू अमीर-उल-उमराकडे आदे शानुसार गेला होतास. मी आदे शालशवाय त्याच्याकडे कसा जाऊ ?’ खान बहादुरने बादशाहाकडे परतून झाला प्रकार त्याला सांतगतला. दुसऱ्या ददवशी जेव्हा दरबार भरण्याच्या वेळी अमीर-उल-उमरा बादशाहाकडे आला तेव्हा बादशाहाने इहतमाम खान कुल याला आमीर-उल-उमराला इनायतुल्लाह खानाकडे घेऊन जाऊन झाल्या गोष्टीबद्दल क्षमा मागायला सांतगतले . आदे शाचे पालन करण्यालशवाय आता आसद खानाकडे काही गत्यंतर नव्हते. त्याने ते मान्य करून आदे शाचे पालन केले . आमीर खानाने मला इनायतुल्लाह खानाकडे असा तनरोप दे ऊन पाठवले क़ी ‘असा आदे श तनघाला आहे पण आमीर-उल-उमराची भेट पुढे ढकलण्यासाठी तू पटकन बादशाहाकडे तवनंती केलीस तर फार बरे होईल’. माझा तनरोप त्याला धमळाला नाही कारण इनायतुल्लाह आंघोळ करत होता. आमीर-उल-उमरा आला व अजून गालीचाही न घातले ल्या ददवाणखान्यात बसला. खान गडबडीत बाहेर आला आणण आमीर-उल-उमराने त्याचा हात हातात घेऊन बाहेर नेऊन दौडत त्याला त्याच्या

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३६९

छावणीत नेले. [४७७] खानाचे स्वागत करण्याच्या उद्दे शाने त्याने त्याला एक थान कापड ददले व ते दोघे कायम एकत्र राहतील अशा प्रकारे चुकूनही कुठली तक्रार न करता त्याचा भरपूर आदर सत्कार केला. असे लोकही अजून जगात उरले आहेत व त्यांनी जीवनातील पडाव अशा उत्तम प्रकारे व्यतीत केले आहेत. सहा मतहने व अठरा ददवस रातहल्यावर पावसातवना झाले ला दुष्काळ, गरीबांचे मृत्यू, अक्षम लोकांचे रडगाणे, गहू, तांदुळ व चारा अदृष्य होणे, शाहगंज (बादशाही बाजार) मध्ये णभकाऱ्यांचे तवव्हळणे अशा सगळ्यानंतरही आकाश पाताळ एक झाले तरी बादशाहाचा तनश्चय दृढ होता. त्यामुळे बुिवार, १० नोव्हेंबर १७०३ / १२ रज्जब १११५ ला सैन्य राजगडाच्या मोतहमेवर तनघाले . पुण्यापासून चार कोसावर आकाशापयंत जाणारी एक उंच खखिंड आहे. उंचसखल भाग समतल करण्यासाठी गेले दोन मतहने कामगारांनी अपार कष्ट घेतले होते तरीही पृथवीवरील जीव आकाशात कसे पाहू शकतील ककिंवा आकाशातल्या हातांची सर पृथवीवरच्या हातांना किी येईल का ? * * * * सात ददवसात सैन्याने ती खखिंड पार केली व [४७८] आणखी एक टप्पा पार करून रतववार, २८ नोव्हेंबर १७०३ / ३० रज्जब १११५ ला गडाच्या पायथयाशी असले ल्या तनमुळत्या सपाटीपाशी पोहोचले . राजगडचा डोंगर फक्त आभाळाच्या डोंगरापेक्षा लहान आहे. त्याचा घेरा बारा कोसाचा आहे. त्याच्या उंचीची कल्पनाही करता येत नाही. त्याची काटे री जंगले व भुताटक़ी असले ल्या कपारी केवळ वाराच पार करू शकतो. त्याच्या कड्यांवरून फक्त पाऊस खाली येऊ शकतो. पूवीच्या काळी आददलशाही राजांकडे हा तकल्ला होता. त्या राक्षसी लसवाने तो घेतल्यावर तीन बाजूंना माची बांिून घेतली व ततथे तीन बळकट तकल्ले केले , त्यांची नावे सुवेळा, कोकणाच्या वरच्या बाजूची पद्मावती व कोकणाऱ्या खालच्या बाजूची संजीवनी. अशा प्रकारे त्याने शत्रूला हा तकल्ला घेता येणे अशक्य करून ठे वले . गुरूवार, २ धडसेंबर १७०३ / ४ शाबान १११५ ला बादशाहाने आदे श ददले क़ी हमीदुद्दीन खान बहादुर याच्या दे खरेखीखाली व मीर आततश तर्बिंयत खान याच्या नेतत्ृ वाखाली सैन्याने तकल्ल्यावर आक्रमण सुरू करावे. [४७९] आता नरकात असले ला तो नीच कातफर (लसवा) याने पद्मावत

तकल्ल्याच्या दरवाज्यापासून ते डोंगराच्या कड्यापयंत एका दठकाणी एकत्र येणाऱ्या

अध्याय ४७

८ जानेवारी १७०३ ते २७ धडसेंबर १७०३

३७०

अशा दोन भभिंती बांिून लष्करी स्थापत्यात सोंड नावाने ओळखली जाणारी एक तत्रकोणी बांिणी उभी केली होती. या दोन्ही भभिंतींखालची वाट इतक़ी उतरती आहे आणण ततथे इतके घसरडे कडे आहेत क़ी त्यावर कोणाचाही पाय दटकत नाही. दोन्ही भभिंती धमळतात त्या दठकाणी त्याने आणखी बळकट बुरूज बांिला होता ज्याला त्याच्या मागील टे कडीवरून वाट होती. इथे त्याने युद्ध सामग्री गोळा केली होती. या बुरूजाची उंची सरळ दोराने मोजली तर तीस याडम भरेल इतक़ी असल्यामुळे बादशाहाने नेमले ल्या दोघांनी पद्मावतच्या समोर व त्या बुरूजाच्या समोर टे कडी एवढा उंच िमिमा उभारला व ते काम तटाच्या खालच्या सुट्या दगडांपयंत पुढे नेले. हे काम केले जात असताना आतल्या लशबंदीने त्यांचे िमिमे उभारूनही त्यांना (आम्हाला थांबवण्यात) यश धमळाले नाही. तकल्ल्याचे तट बुरूज उडवण्यासाठी नेमक्या दठकाणी उभ्या केले ल्या आमच्या तोफांनी अनेक दठकाणी त्यांचा िुव्वा उडवला.

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७१

अध्याय ४८ राजवटीचे अठ्ठेचाळीसावे वषम – तहजरी १११५-१६ २८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४ इनायतुल्लाह खानाचा मुलगा तहदायतुल्लाह खान व ददवंगत फैजुल्लाह खानाची मुलगी यांचा तववाह संपन्न झाला. [४८०] बादशाहाने त्याला एक अंगरखा व एक घोडा भेट ददला. आघर खानाच्या मुलाचे लग्न राजा रामच्या मुलीशी लावले गेले. नवरदे वाला तीन रत्नजधडत अंगठ्ा व एक अंगरखा धमळाला. बहरामंद खानाचा नातू ताक़ी खान याचा तववाह शातहस्ता खानाच्या मुलीशी करण्यात आला. त्याला ५००० रुपयांचे अलं कार ददले गेले. शातहस्ता खानाला इस्लाम खान रूमीचा मुलगा नवाजजश खानाच्या जागी मांडूचा फौजदार व तकल्ले दार तनयुक्त केले गेले. बीदर बख्त बहादुर याचा ददवाण मीर अहमद खान याला खानदे शचा सुभेदार नेमले गेले. खान तफरोज जंगच्या वतीने बेरारची नायब सुभद े ारी बघणारा रुस्तम खान शारजा तबजापुरी याला तनमा (सशिंदे) सोबत झाले ल्या युद्धात पकडले गेले होते. त्याने स्वतःला सोडवून घेतले व खान तफरोज जंगकडे परतला. त्याच्या सात हजारीतून (तततकेच स्वार) एक हजार (तततकेच स्वार) कमी केले गेले. २७ जानेवारी १७०४ / १ शव्वाल १११५ ला ईद-उल-तफत्र साजरी झाली. राजा नेकनामचा तववाह राजा रामच्या मुलीशी करण्यात आला व त्याला अंगरखा ददला गेला. बुद्ध पाचगावचा ठाणेदार व लसवाचा चुलत भाऊ हा अडीच हजारी (१५०० स्वार) होता, त्याला ५०० जातची वाढ ददली गेली. काही अपरािास्तव सरफराज खानाकडू न त्याची मनसब काढू न घेण्यात आली. काम बक्षच्या तवनंतीनुसार त्याला सहा हजारी (५००० स्वार) मनसब परत ददली गेली. बेळगावचा पदच्युत तकल्ले दार सैफ खान फक़ीरुल्लाह याचा मुलगा सैफ खान याला धचन कललच खान बहादुर याच्या वतीने तवजापूरची नायब सुभद े ारी ददली गेली. [४८१] मुखललस खान, ज्याला पूवी मुताकाद खान म्हटले जायचे, त्याला आग्र्याला तकल्ले दार म्हणून पाठवले गेले. तनमाला िडा लशकवल्याबद्दल तफरोज जंग खानाला लसपहसालार ही उपािी, दोन हजार स्वारांची वाढ दे ऊन सात हजारी (१०००० स्वार) व एक कोटी दाम बक्षीस ददले गेले. मुहम्मद आमीन खान बहादुर तीन हजारी (१००० स्वार) होता त्याला ५०० (२०० स्वार) ची वाढ धमळाली. तफरोज जंग खानाच्या हाताखाली असले ला ददले र खान सात हजारी (तततकेच स्वार)

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७२

होता, त्याला ५०० स्वारांची वाढ ददली गेली. आलाहाबादचा नाजजम लसपहदार खान चार हजारी (३००० स्वार) होता, त्याला जौनपूरचा जमीनदार महाबत याला िडा लशकवल्याबद्दल ५०० स्वारांची वाढ ददली गेली. खान तफरोज जंग याचा भाऊ हमीद खान बहादुर अडीच हजारी (१५०० स्वार) होता, त्याला ५०० (२०० स्वार) वाढ ददली गेली. राजा इंद्रससिंह हा तीन हजारी (२००० स्वार) होता, त्याला ५०० जातची वाढ ददली गेली. खान तफरोज जंगचा भाऊ रहीमुद्दीन खान हा हजारी (२५० स्वार) होता त्याला ५०० (१०० स्वार) ची वाढ धमळाली. मीर सय्यद मुहम्मद तगसुदराज याच्या थडग्याचा उत्तराधिकारी सय्यद हुसैन याला एक रत्नजधडत खंजीर व सोन्याच्या साजाचा एक घोडा ददला गेला. बादशाहाच्या जनानखान्याचा नाजजर खखदमतगार खान ख्वाजा ताललब याला अिांगवायू झाल्यावर काही ददवसांच्या आजारानंतर त्याचा मृत्यू झाला. तो शाह नवाज खानाकडू न बादशाहाकडे त्याच्या पत्नीच्या हुंड्यापोटी आला होता व एक वृद्ध सुस्वभावी सेवक होता. ददवंगत आमीर खानाचा मुलगा महममत खान [४८२] हा हजारी (२५० स्वार) होता, त्याला १५० स्वारांची वाढ धमळाली. ओरीसाचा पदच्युत सुभेदार कामगार खान दरबारास आला. धमया अबु लतीफची पतवत्र टोपी हमीदुद्दीन खान बहादुर याला धमळाली व तरतबयत खानाला एक खंजीर दे ऊन दोघांना घोडनदीच्या जवळ पसरले ल्या शत्रूला िडा लशकवायला पाठवले गेले. मुहम्मद अस्लम खानाच्या जागी पादशाहजाद्याचा ददवाण झाले ला मुनीम खान याला सय्यद मीराकच्या जागी पंजाबचा ददवाण केले गेले. काम बक्षला वीस हजारी (१०००० स्वार) पुन्हा ददली गेली होती, आता त्याचे कमी केले ले ५००० स्वार त्याला परत ददले गेले. इराणचा राजा शाह अब्बास याच्या बतहणीचा मुलगा अली नक़ी याला बादशाहाच्या भेटीचे सौभाग्य लाभले . त्याच्या प्रवास खचाम करता सुरतेच्या कोशातून पाच हजार रुपये ददले गेले. तो दरबारास आला तेव्हा त्याला तीन हजारी (१००० स्वार), एक अंगरखा, एक घोडा, एक हत्ती व एक रत्नजधडत जजघा ददला गेला. लसकंदर खान तबजापुरी याचा मुलगा मुहम्मद मुतहयुद्दीन याचा तववाह राक्षसी संभाच्या मुलीशी केला गेला. बादशाहाने सात हजार रुपये हुंडा ददला. राक्षसी संभाचा मुलगा राजा शाहू1 याचा तववाह बहादुरजीच्या मुलीशी केला गेला. त्याला एक रत्नजधडत पट्टा, मुलाम्याचा लशरपेच

1

यावेळी राजा शाहू याचे वय २२ वषम होते (जन्म १८ मे १६८२). ऐ.शका. पृ. २८.

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७३

व १०००० रुपयांचा रत्नजधडत जजघा ददला गेला. सुलतान फरुम खलसयार याला मुलगी झाल्याबद्दल मुहम्मद अजीम याने पाठवले ली भेट बादशाहाला धमळाली. [४८३] काझी अक्रम खानाला एक हत्ती ददला गेला. दरबारातील व प्रांतातील सवम सरकारी अधिकाऱ्यांना पावसाळी अंगरखे ददले गेले. रुस्तमददल खानाला सलाबत खानाच्या जागी तवजापुरी कनामटकाचा फौजदार नेमले गेले. तो दीड हजारी होता, त्याला ५०० जात (१००० स्वार) वाढ व एक कोटी दाम बक्षीस ददले गेले. बाल्खचा दत ख्वाजा जातहद याला भेटीच्या ददवशी १०० मोहरांच्या वजनाचे सोन्याचे नाणे व १०० रुपयांच्या वजनाचा रुपया ददला गेला. तनरोपाच्या ददवशी त्याला एक अंगरखा, एक रत्नजधडत खंजीर व ५००० रुपये रोख ददले गेले. बीदर बख्तला औरंगाबादच्या सुभेदारी बरोबर माळव्याची सुभद े ारी ही ददली जात असल्याचे फमामन व त्या सोबत अंगरखा पाठवला गेला. नुस्रत जंगचा नायब दाऊद खान याला मुजफ्फर खानाच्या जागी काम बक्षच्या वतीने सहाय्यक म्हणून हैदराबादचा1 सुभा सांभाळायचा पदभार ददला गेला. तो पाच हजारी (तततकेच स्वार) होता, त्याला एक हजारी (तततकेच स्वार) ची वाढ धमळाली. मुहम्मद अजीमचा व बंगाल सुभ्याचा ददवाण आणण ओरीसाचा रक्षक2 मुशीद कुली खान हा दीड हजारी (१००० स्वार) होता, त्याला ५०० (१०० स्वार) अशी वाढ धमळाली. शत्रूला िडा लशकवायला गेलेले हमीदुद्दीन खान बहादुर व तरतबयत खान आदे शानुसार दरबारास परतले . २१ नोव्हेंबर १७०४ / ४ शाबान १११६ ला3 बादशाहाला कळले क़ी तफरोज जंग खान तनमा सशिंदे व छत्रसाल बुद ं े ला यांना िडा लशकवायला बेरारहून कहिंदुस्थानाकडे तनघाले आहेत. इराणच्या सीमेवरून बातमी आली क़ी आिीच्या वषांमध्ये वणमन केले ल्या व तनराशेच्या जंगलात पळू न गेलेल्या पादशाहजादा मुहम्मद अकबर [४८४] याचा मृत्यू झाला. तजीआ वाचून बादशाहाने स्वतःचे सांत्वन केले व म्हणाला क़ी, ‘कहिंदुस्थानाचा मोठा बंडखोर संपला’. त्याने झीनतुस्त्न्नसा बेगमकडे ही बातमी िाडली व अकबरचा

1

इंग्रजी अनुवादात इथे तवजापूर म्हटले आहे पण फासी पाठात हैदराबाद आहे.

2

फासी पाठात याला हाररस, म्हणजे रक्षक म्हटले आहे. अखबारात मध्ये हा ओरीसाचा फौजदार असल्याचे म्हटले आहे. कदाधचत ओररसाची सुभेदारी कोणाला ददली नसावी.

3

अखबारात प्रमाणे ही घटना २ धडसेंबर १७०३ ची आहे, त्यामुळे वषम चुकले असू शकेल.

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७४

मुलगा बुलंद अख्तर याच्याकडे दुखवट्याचा तुरा1 पाठवला. आग्र्याच्या तकल्ल्यात नेकुलसयार, रफ़ी-उल-कद्र याची पत्नी राजझयतुस्त्न्नसा2, खुजजस्ता अख्तरची पत्नी झातकयतुस्त्न्नसा बेगम व ददवंगताच्या मुलींना दुखवट्याचे तुरे पाठवले गेले. आता मी राजगडाला घातले ल्या वेढ्याच्या उवमररत इततहासाकडे वळतो. रतववार, ६ फेब्रुवारी १७०४ / ११ शव्वाल १११५ ला आमचे वीर बुरूजावर चढले व तटाच्या आत जाऊन त्यांना थांबवायला आले ल्या शत्रूला तकल्ल्याच्या आतल्या भागात पळवून लावले . त्यांनी ततथे चांगले पाय रोवले . या बंददवानांनी जरी शरणागतीचे दरवाजे स्वतःसाठी बंद करून घेतले होते व तोफा, बंदुका, अग्ग्नबाण तसेच दगडांचा मारा थांबवला नव्हता आणण त्यांच्या या माऱ्यापासून संरक्षणाचा काही उपाय नसल्यामुळे अनेक पुण्यवान वीरांना जीव गमवावा लागला होता, तरी त्यांचे िाडस व बललदान बघून शत्रूच्या मनात िडक़ी भरली. [४८५] त्यांचे सेनापती तफरंगाजी व दामाजी3 यांनी बक्षीउल-मुल्क रुहुल्लाह खान याच्याकडे दत पाठवून शरणागतीची भीक मातगतली. खानाच्या मध्यस्तीने बादशाहाने आदे श ददला क़ी लशबंदीला शस्त्र खाली टाकून बाहेर पडता येईल. बुिवार, १६ फेब्रुवारी १७०४ / २१ शव्वाल १११५ ला त्यांनी स्वतःच्या हातानी बादशाही तनशाण तकल्ल्यावर चढवले व स्वतः तवनाशाच्या खड्ड् यात गेले (बाहेर पडले ). त्याच ददवशी बक्षी-उल-मुल्क हमीदुद्दीन खान बहादुर इतर नामदारांबरोबर तकल्ल्याच्या दरवाज्यातून आत गेला व आदे शाप्रमाणे असे चार तकल्ले घेऊन कातफरांना हकलवून लावल्याची आरोळी गगनात दुमदुमली. * * * हमीदुद्दीन खान बहादुर याला काहीच ददवसांपूवी ५०० (३०० स्वार) अशी वाढ धमळू न साडेतील हजारी (२००० स्वार) धमळाली होती त्याला आता या पराक्रमाबद्दल नौबतीचा अधिकार दे ण्यात आला. हा तकल्ला घेतल्याबद्दल तरतबयत खानाला ५०० (२०० स्वार) अशी वाढ दे ऊन साडेतीन हजारी (१८०० स्वार) ददली गेली. [४८६] बक्षी-

1

इंग्रजी अनुवादात याला ‘mourning turban-end’ असे म्हटले आहे. फासी पाठात ‘तुराह मातमी’ म्हणजे दुखवट्याचा तुरा असे आले आहे.

2

फासी पाठ पृष्ठ २०३ व ३७२ वर तहचे नाव सतफयतुस्त्न्नसा अले ददले आहे.

3

फासी पाठात यांना फरऔनजी व हामानजी म्हटले आहे. जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी अनुवादात शुद्धी करून तफरंगाजी व दामाजी केले आहे. खाफ़ी खान, खंड २, पृ. ५१३ वर केवळ हामाजी म्हटले आहे. फासी हस्तललखखतात फरऔनजी व हाहानजी आहे.

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७५

उल-मुल्कला साडेतीन हजारी (१५०० स्वार) अशी वाढ ददली गेली होती, त्याला आता एक महागडा रत्नजधडत लशरपेच ददला गेला. तकल्ल्याचे नाव नबीशाहगड ठे वले गेले. तोरणा तकल्ल्याचा तवजय – तोरणा राजगडापासून चार कोसावर होता. बुिवार, २३ फेब्रुवारी १७०४ / २८ शव्वाल १११५ ला बादशाही छावणी त्याच्या जवळ लागली व नेहमीप्रमाणे वीरांना तकल्ला घेण्यासाठी पाठवण्यात आले . * * * तकल्ला बळकट असूनही तरतबयत खान त्याच्या दरवाज्यासमोर मोचे लावून सुरुंग खणायला लागला. मुहम्मद आमीन खान बहादुरने दुसऱ्या बाजूने लशबंदीची वाट बंद केली. इतर लोकांनी तकल्ल्याला घेरले . * * * [४८७] आलाहवदी खान जाफरचा नातू अमानुल्लाह खान हा या शूर कुटुं बात त्याच्या तनिड्या छातीसाठी प्रलसद्ध होता. शुक्रवार, १० माचम १७०४ / १५ जजल्कदा १११५ ला बादशाहाचे ८९ वे चांद्र वषम सुरू झाले . त्याच रात्री त्याने त्याच्याकडील काही मावळ्यांना प्रेररत केले व त्यापैक़ी एकाने तटापाशी पुढे जाऊन दोरीची माळ दगडाला घट्ट लावली. मग त्याच गटातील पंचवीस लोक दोराच्या लशडीने वर पोहोचले आणण युद्धाची आरोळी ठोकली. ते ऐकून खान, त्याचा भाऊ अताउल्लाह खान व इतर लोक जीवाची पवाम न करता त्यांच्या मागे वर गेले. हमीदुद्दीन खान बहादुर सगळ्या बाजूंनी संिीचा कानोसा घेत असताना पतहल्या तुकडी सारखा कमरेला दोर बांिून मागोमाग आत गेला. ज्या लोकांनी प्रततकार केला त्यांना मारले गेले. इतरांनी बाले तकल्ल्यात जाऊन दार लावून घेतले . वरवर सोपे वाटणारे हे अवघड काम मोठ्ा जोखमीचे असले तरी वीरांपुढे घाबरणाऱ्यांचा दटकाव कसा लागेल. [४८८] त्यामुळे शत्रू अगततक झाला व त्याने शरणागतीची भीक मातगतली. बादशाहाने त्यांना तनशस्त्र होऊन बाहेर जाऊन ददले . तकल्ल्याचे नाव फतह-उल-घैब ठे वले गेले. खान बहादुर हमीदुद्दीनला एक अंगरखा, एक फतहपेच व बादशाहाच्या स्वतःच्या कपाटातला एक दोशाला ददला गेला. आमानुल्लाह खानाला ५०० (२०० दो अस्पा स्वार) अशी वाढ दे ऊन दीड हजारी (७०० स्वार) ददली गेली. इतरांनाही सुयोग्य सन्मान धमळाला. बादशाहाच्या उदद्दष्टांच्या आशीवामदाने लोकांना या भयावह दठकाणी पावसाळा काढायला लागला नाही कारण त्याने जुन्या प्रांताकडे जाऊन जुन्नर जवळ छावणी टाकायचे ठरवले . [४८९] बुिवार, १५ माचम १७०४ / २० जजल्कदा १११५ ला बादशाहाच्या जवळचे पद असले ला मीर खान याला आमीर खान ही त्याच्या वधडलांची परंपरागत उपािी दे ण्यात आली. बादशाहा म्हणाला क़ी, ‘तुझे

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७६

वडील मीर खान जेव्हा आमीर खान झाले तेव्हा त्यांनी शाहजहानला त्याच्या बदल्यात एक लक्ष रुपयांची भेट ददली होती. तुझी भेट काय असेल ?’. तो म्हणाला क़ी, बादशाहावर हजार हजार जीव ओवाळू न टाकावे माझे जीवन व मालमत्ता हे सगळे बादशाहा करताच आहे. दुसऱ्या ददवशी त्याने याकुतच्या हस्ताक्षरातले कुराण बादशाहाला भेट ददले . बादशाहा म्हणाला क़ी, ‘तू जी भेट ददली आहेस ती जगावेगळी व त्यातील मजकूरापेक्षा अधिक मौल्यवान आहे’ आणण त्याला एक हत्ती भेट ददला. मंगळवार, ९ मे १७०४ / १५ मुहरमम १११६ ला बक्षी-उल-मुल्क रुहुल्लाह खान त्याच्या तारुण्यात व श्रीमंतीत वारला. त्याची मुले खलीलु ल्लाह खान व इततकाद खान, ज्याला नंतर रुहुल्लाह खान ही उपािी ददली गेली, यांच्या घरी दुखवट्याची वस्त्रे पाठवली गेली. ते बादशाहाकडे अणभवादनासाठी आले असता बादशाहाने त्यांचे सांत्वन केले . ददवंगताची मुलगी दरबारास आली होती, ततला पाच हजार रुपयांची रत्ने ददली गेली. धमझाम सद्रुद्दीन मुहम्मद खान याला ददवंगताच्या जागी दुसरा बक्षी नेमले गेले. तो मुख्य छावणीहून येईपयंत मीर खानाहजाद खान याला त्याचा सहाय्यक म्हणून काम बघायला सांतगतले गेले. सोमवार, १७ एतप्रल १७०४ / २३ जजल्हेज १११५ ला बादशाहाने [४९०] खेड गावी छावणी टाकली. त्याचे नाव मसाऊदाबाद ठे वले गेले. ततथे साडेसात मतहने रातहल्यानंतर सैन्य वागीनगेराकडे तनघाले . * * * *

वागीनगेराच्या त्रवजयािाठी कूि पाम नाईक याच्याकडू न नुस्रताबाद सागर जजिंकून घेतले तेव्हाच्या घटनांचा वृतांत मी या आिीच ददला आहे, ज्यात रुहुल्लाह खानाचा मुलगा खानाहजाद खान याच्या मध्यस्तीने पाम नाईक हैदराबादला दरबारास आला व त्यानंतर लगेच नरकात गेला हे सगळे आले आहे. [४९१] नंतर खलीलु ल्लाह खानाचा मुलगा रुहुल्लाह खान याला राजवटीच्या ३२ व्या वषामत फतेहाबाद कोरेगावहून रायचूर घ्यायला पाठवले होते. त्या आिी, राजवटीच्या २८ व्या वषी बादशाहाने अहमदनगरला तळ ददला असताना पाम नाईकचा पुतण्या व मानले ला मुलगा तपधडया दरबारास आला होता व त्याला मनसब दे ऊन कामात मदत करू शकेल म्हणून खानाने स्वतःकडे ठे वून घेतले होते. रायचूर जजिंकल्यानंतर या कपटीने खानाला सांतगतले क़ी त्याला अनुमती धमळाली तर एका आठवड्यासाठी तो वागीनगेराला जाऊन सािन सामग्रीचा ताजा साठा घेऊन परत येईल. ही जागा सागर प्रांतातच आहे व त्याची वस्ती एका टे कडीवर आहे. पाम नाईक कडू न

अध्याय ४८

२८ धडसेंबर १७०३ ते १६ धडसेंबर १७०४

३७७

सागर घेतल्यानंतर ही जागा पळू न गेलेल्या कातफरांचे आश्रय स्थान झाली होती. खान त्याच्या बोलण्याला भुलला व त्याने अनुमती ददली. त्या नीच माणसाने ततथे गेल्यावर त्याचा शब्द तफरवला व तवरोिाची भूधमका घेऊन बारा तेरा हजार बंदुकिारी तयार करून ती जागा बळकट करायचा प्रयत्न केला. * * * खानाने जेव्हा त्याच्या तवरुद्ध सैन्य पाठवले तेव्हा त्याने किी पैशाने तर किी शक्त़ी वापरून स्वतःला वाचवले . खानाला दरबारास बोलावले गेले. तो वरवर तनष्ठा असल्याचे दाखवत खंडणी दे त होता पण हळू हळू िन गोळा करून टे कडीच्या एका बाजूला तट बांिून घेतला [४९२] व पायदळ उभे करून त्याने वागीनगेरा उदयास आणले . शहरातील इमारती आणण जवळपासची शेती वाढवून त्याने सत्ता व अधिकार प्राप्त केला व मराठ्ांचा मोठा हस्तक बनून त्याने गडबड व बंडाळी उभी केली. पाम नाईकचा वारस मुलगा जातगया याला तपधडयाने पदच्युत केले व स्वतः दरबार भरवू लागला. त्याने सगळीकडे चालवले ल्या लू टमारीबद्दल तसेच लहान थोर सवांची मालमत्ता उध्वस्त केल्याचे ऐकल्यावर बादशाहाने आजम शाह याला त्याचा नाश करायला पाठवले . तेव्हा तो पादशाहजाद्याला भेटला व सात लक्ष रुपये नजराणा दे ऊन त्याने स्वतःला वाचवले . तसेच गाझीउद्दीन खान बहादुर तफरोज जंग याच्या अधिकारातही त्याने हीच पद्धत सुरू ठे वली व सगळे धमळू न नऊ लक्ष रुपयांचा नजराणा दे ऊन स्वतःला वाचवले . बादशाहा जेव्हा तवजापूर जजिंकायच्या मोतहमेत व्यस्त होता तेव्हा या अदरदशी माणसाने पुन्हा स्वतःचा तवनाश ओढवून घेतला. सरते शेवटी हे सगळे बळकट तकल्ले जजिंकण्याच्या मोतहमेतून बादशाहा मोकळा झाल्यानंतर आणण जुन्नरकडे जाणाऱ्या अनेक अवघड खखिंडी मोकळ्या झाल्यानंतर या कातफराचा सूड घ्यायची वेळ जवळ आली होती. रतववार, २२ ऑक्टोबर १७०४ / ४ रज्जब १११६ ला बादशाहा त्या करता तनघाला.

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३७८

अध्याय ४९ राजवटीचे एकोणपन्नासावे वषम, - तहजरी १११६-१७ १७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५ [४९३] * * * ददवंगत रुहुल्लाह खानाच्या तनिनानंतर त्याचा काका

अजीजुल्लाह खान याला औरंगाबादहून बोलावून घेतले होते, त्याने भेट घेतली. तफरोज जंग याच्या तवनंतीनुसार बेरारचा नायब सुभद े ार रुस्तुम खान याच्या मनसबीतून कमी केले ले हजार जात (तततकेच स्वार) पुन्हा दे ण्यात आले . ददवंगत आमीर खानाचा मुलगा मीर खान हा हजारी (५०० स्वार) होता, त्याला १०० स्वारांची वाढ धमळाली. कुरखानाहचा दरोगा व ददवंगत सलाबत खानाचा मुलगा तहव्वर खान याला तफदाई खान ही उपािी ददली गेली. १६ जानेवारी १७०५ / १ शव्वाल १११६ ला ईद-उल-तफत्र साजरी झाली. बुलंद अख्तरचा तंबू हा अस्बक असले ला सराचा होता. त्याच्याकडू न काहीतरी आगळीक झाल्यामुळे बादशाहाने आदे श ददला क़ी तो कापडाच्या कनातींचा कलं दरी तंबू करावा. गौहरआरा बेगमचा मीर-इ-सामान हाफ़ीज नूर मुहम्मद याने आतहया-उल-उलू म मिील शुद्ध केले ले तनवडक ललखाण बादशाहाला भेट केले व त्याला एक हत्ती, १००० रुपये रोख व [४९४] हाफ़ीज खान ही उपािी ददली गेली. तवजापुरी कनामटकाचा पदच्युत फौजदार रुस्तुमददल खान याला दाऊद खानाच्या जागी हैदराबादचा नायब सुभद े ार नेमले व त्याच्या दोन हजारी (१००० स्वार) मध्ये ५०० (तततकेच स्वार) वाढ ददली गेली. तवजापूरचा नाजजम धचन कललच खान बहादुर याला त्याच्या जागी फौजदारी ददली गेली. तो चार हजारी (तततकेच स्वार) होता व त्याला दोन हजार स्वारांची वाढ तसेच पाच लक्ष दाम बक्षीस म्हणून ददले गेले. मंगळवार, १३ माचम १७०५ / २८ जजल्कदा १११६ ला अहमदाबादहून बातमी आली क़ी शाह आलीजाहची पत्नी जहानझेब बानू बेगम तहचा मृत्यू झाला. ततच्या अगदी जवळच्या मैतत्रणींनी सांतगतले क़ी, “ततच्या उजव्या स्तनाग्रावर दाण्या एवढा फोड आला होता. काही काळ औषि घेतले तरी तो मोठा होत इतका सुजला क़ी ततला प्रचंड ताप आला. वैद्यांनी औषि लावले . शेवटी मोलसयर मारतॉ या फ्रेंच माणसाने सांतगतले क़ी, ‘माझ्या नात्यातील एक मतहला वैद्य ददल्लीला आहे. ततला जर बोलावले गेले आणण ततने

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३७९

तपासणी करून जर मला या रोगाबद्दल अधिक मातहती ददली तर ती पटकन बरी होईल’. ती आल्यावर बेगमने ततच्या कोकाहला तवचारले क़ी, ‘ततला बोलावून ततचे वय व ती मद्यसेवन करते का याची चौकशी कर’. कोकाने तवचारणा करून सांतगतले क़ी, ‘ततचे वय ४० वषम आहे व ती मद्यसेवन करते’. बेगम म्हणाली क़ी, ‘रोज वाढणाऱ्या या आजारातून मी बरी होईन असे मला वाटत नाही. माझ्या शरीराला एखाद्या पापी माणसाचे हात लागावेत असे मला वाटत नाही’. शाह ने ततला समजवायचा प्रयत्न केला पण काही उपाय झाला नाही. दोन वषम आजार तसाच रातहला व शेवटी ती वारली”. ततच्या पार्थिंवाची व्यवस्था लावणे, दानिमम करणे, [४९५] पार्थिंव ददल्लीला पाठवणे तसेच ख्वाजा कुतबुद्दीन बब्ख्तयारच्या स्मशानात पुरणे यासाठी सगळे धमळू न दोन लक्ष रुपये खचम झाले . तरूण असल्यापासून नाच गाणे पाहण्याची आवड असले ल्या शाह आललजाह याने त्याचा त्याग केला. ततचे सगळे अलं कार बीदर बख्तकडे पाठवले गेले. ततच्या इतर वस्तु व रोख रक्कम नजीबुस्त्न्नसा बेगमच्या अधिकाऱ्यांकडे ददली गेली. * * * धमहीन पूर-ए-खखलाफत च्या सेवत े असले ला अधिकारी सय्यद आसालत खान हा आदे शानुसार दरबारास आला. पादशाहजाद्याच्या तवनंतीनुसार त्याला ५०० (२०० स्वार) वाढ ददली गेली व तो दीड हजारी (७०० स्वार) झाला. इब्रातहम खानाच्या लशफारसीनुसार याकुब खानाला रहमनदाद खानाच्या जागी पाखली िामतूरचा फौजदार नेमून हजार स्वारांची वाढ ददली गेली. कान्होजी लशके पाच हजारी (तततकेच स्वार) होता त्याला हजार जात वाढ धमळाली. तहम्मत खानाचा मुलगा मुरीद खान याला ददवंगत ददले र खानाच्या जागी सुरत बंदराचा तकल्ले दार नेमले गेले. हमीद खान बहादुर हा तफरोज जंग खानाशी भांडण करून दरबारास आला. तो दोन हजारी (१००० स्वार) होता व त्याला आिी कमी केले ले ५०० (तततकेच स्वार) परत ददले गेले. चंदनकेराचा जमीनदार वासुदेव याला त्याची पतहली मनसब तीन हजारी जात व एक हत्ती ददला गेला. राजा शाहू आदे शानुसार हमीदुद्दीन खान बहादुरच्या सैतनकांसोबत तफरोज जंगच्या घरी जाऊन परत आला. [४९६] सोमवार, ४ जून १७०५ / २२ सफर १११७1 ला काम बक्षला हैदराबादला पाठवायचे ठरले होते पण बादशाहाने ते पुढे ढकलले . तवजापूरचा सुभेदार धचन कललच

1

इंग्रजी अनुवादात २ सफर म्हटले आहे पण ते बहुदा नजरचुक़ीने झाले असावे कारण फासी पाठात ‘बीस्त व दुवूम’ (‫ )بيپت و دوم‬म्हणजे २२ सफर म्हटले आहे.

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८०

खान बहादुर याला बुहामनुल्लाह खान व काधमल खान यांच्या जागी नुस्रताबाद सागर व मुद्गलच्या फौजदारीचा अततररक्त पदभार ददला गेला. सैफ खानाला धचन कललच खानाच्या जागी आजमनगर व तळकोकणाची तकल्ले दारी व फौजदारी दे ऊन ५०० (१३०० स्वार) वाढ ददली गेली. धमझाम सफावी खान याचा तववाह ददवंगत मुअज्जम खानाच्या मुलीशी करण्यात आला. त्याला एक अंगरखा, लशरपेच व १२००० रुपये रोख ददले गेले. बक्षीउल-मुल्क नुस्रत जंग खान याला ५००० रुपयांची माणकाची अंगठी ददली गेली. इनायतुल्लाहच्या पत्नीला ८००० रुपयांची मोत्यांची बढी व इतर रत्ने ददली गेली. हमीदुद्दीन खान बहादुरच्या मुलीला एक उदराज व दोन मोत्यांची मरक़ी ददली गेली. आलाहाबादचा नाजजम लसपहदार खान हा चार हजारी (३००० स्वार) होता, त्याला हजारी जातची वाढ धमळाली. फतहुल्लाह खान बहादुर आलमगीरशाही याला आलाह यार खानाच्या जागी लोहगडाची ठाणेदारी दे ऊन २०० स्वारांची वाढ ददली गेली. रतववार, २ सप्टें बर १७०५ / २४ जमाद-उल-अव्वल १११७1 ला शाह आलीजाह याला दरबारास बोलावण्यासाठी एक फमामन पाठवले गेले. रतववार, ९ सप्टें बर १७०५ / १ जमाद-उससानी १११७ ला धमहीन पूर-ए-सलतनत याला जबरदस्त खानाच्या जागी पंजाबची सुभेदारी ददली गेली. शाह आलीजाह याला बीदर बख्तच्या जागी बऱ्हाणपूर व औरंगाबादची सुभद े ारी ददली गेली. काब्श्मरचा पदच्युत सुभेदार इब्रातहम [४९७] खान याला शाह आलीजाहच्या सहकाऱ्यांच्या जागी अहमदाबादचा सुभेदार नेमले गेले. तो पाच हजारी (तततकेच स्वार) होता, त्याला हजार जातची (तततकेच स्वार) वाढ ददली गेली. त्याचा मुलगा जबरदस्त खान याला शाह आलीजाह याच्या सहकाऱ्यांच्या जागी अजमेरची सुभेदारी ददली गेली. तो हजारी होता व त्याला ५०० (१००० स्वार) अशी वाढ धमळाली. धमहीन पूर-ए-खखलाफतचा तसेच काबुल सुभ्याचा ददवाण मुनीम खान याला जम्मूचा फौजदार व पादशाहजाद्याच्या वतीने पंजाबचा उपप्रांतप्रमुख नेमले गेले. तो हजारी (५०० स्वार) होता, त्याला ५०० (तततकेच स्वार) वाढ धमळाली. नवाजजश खानाला काब्श्मरचा सुभद े ार नेमले गेले. मुलतान व तट्ट् याचा सुभेदार मुईझुद्दीन याला जबरदस्त खानाच्या जागी लाखी जंगलचा फौजदार नेमले गेले. धचन कललच खान बहादुर याचा

1

इंग्रजी अनुवादात ४ जमाद-उल-अव्वल म्हटले आहे पण हे नजरचुक़ीने झाले असावे कारण फासी पाठात ‘बीस्त व चहारम’ (‫ )بيست و چهارم‬असे म्हटले आहे.

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८१

मुलगा हयातुल्लाह खान याला एक हत्ती व रत्नजधडत खंजीर ददला गेला. धमझाम सफावी खान याला ततसरा बक्षी नेमले गेले. मीर आततश तरतबयत खान याला नबीशाहगड1 व भीमा नदीपयंत मुतहयाबादचा तकल्ले दार केले गेले. त्याला हजार स्वार सेहबंदी धमळाले . बाक़ी खानाचा मुलगा व हमीदुद्दीन खानाचा काका बाक़ी खान याला कामगार खानाच्या जागी आग्र्याचा तकल्ले दार नेमले गेले. तो दीड हजारी होता त्याला ५०० (३०० स्वार) वाढ धमळाली. मीर आततश तरतबयत खान याला मनसूर खानाच्या जागी दख्खनच्या तोफखान्याचा दरोगा हा अततररक्त पदभार धमळाला. त्याचा मुलगा मुहम्मद इशाक याला त्याचा सहाय्यक म्हणून नेमले गेले. काम बक्षचा ददवाण वजारत खान अरब शेख मुहम्मद याला हैदराबादचा कारभार सुरळीत करायला पाठवले गेले. शुक्रवार, १६ नोव्हेंबर १७०५ / १० शाबान १११७ ला [४९८] माळव्याची सुभेदारी बीदर बख्त याच्याकडेच ठे वायचा आदे श ददला गेला. राजाराम जाट याच्याकडे असले ले सनसनी मंगळवार, ९ ऑक्टोबर १७०५ / २ रज्जब १११७ ला दुसऱ्यांदा जजिंकून घेतल्याबद्दल आग्र्याचा नाजजम मुख्तार खान याच्या तीन हजारीत ५०० जात वाढ ददली गेली. बादशाहाला कळले क़ी शाह आलीजाह याच्या सैन्यातून बाहेर पडले ला दुगामदास राठोड परतला आहे. त्याला परत तीन हजारी (२००० स्वार) दे ण्याचा आदे श ददला गेला. आता मी वागीनगेराच्या वेढ्याकडे वळतो. तीन मतहने व काही ददवसांनी गुरूवार, ८ फेब्रुवारी १७०५ / २४ शव्वाल १११६2 ला सैन्य त्याच्या जवळ पोहोचले . खान तफरोज जंग याचा मुलगा, तवजापूरचा नाजजम व या दे शाचा जाहगीरदार धचन कललच खान बहादुर याने आदे शानुसार मुहम्मद आमीन खान बहादुर, तरतबयत खान बहादुर व तोफखान्याच्या अधिकाऱ्यांबरोबर पुढे जाऊन तकल्ल्यापासून पाव कोसावर छावणी टाकली. बादशाहाची छावणी तकल्ल्यापासून एका कोसावर होती. शत्रू रोज पुढे येऊन बादशाही सैन्याशी दोन हात करत होता. सािारण हजार बंदुकिारी, कहिंद व मुसलमान,

1

इंग्रजी अनुवादात इथे नबीशाहदुगम म्हटले आहे पण फासी पाठात नबीशाहगड आहे. बहुदा हे नजरचुक़ीने झाले असावे कारण औरंगजेबाने पन्हाळगडाला नबीशाहदुगम (फासी पृष्ठ ४३८) हे नाव ददले आहे तर राजगडाला नबीशाहगड (फासी पृष्ठ ४८६). तसेच राजगड पुण्याजवळ (मुतहयाबाद) असल्यामुळे इथे नबीशाहगड असण्याची शक्यता अधिक आहे.

2

इंग्रजी अनुवादात इथे ४ शव्वाल असे म्हटले आहे पण हे नजरचुक़ीने झाले असावे कारण फासी ّ पाठात (‫‘ )بيست و چهارم شوال‬बीस्त व चहारम शव्वाल’, म्हणजे चोवीस असे म्हटले आहे.

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८२

तख्त-ए-रवां – हलते सििंहािन औरंगजेबाच्या दख्खन मोतहमेत शेवटच्या काही वषामत हे धचत्र काढले असावे. छत्रीच्या थोडे ‫‘ )شبیه ز‬शबीह हजरत आलमगीर बादशाह’ ललतहले डावीकडे (‫حرصت عالمگن بادشاه‬ आहे. घोड्याच्या मागच्या पायांखाली धचत्रकाराचे नाव ‘भवानीदास’ आहे. वर उजव्या कोपऱ्यात माही मरातीब व इतर राजधचन्हे घेतले ले हत्ती आहेत. (साभार MET).

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८३

बरेचसे सय्यद व इतर जमातींचे व सवोत्कृष्ट खलीफांच्या सेवकांपैक़ी असे सैन्य त्यांच्या तवरोिात असताना अनेकदा तुंबळ युद्ध झाले . डोंगरावरून डागले ल्या तोफांमुळे प्रचंड रक्तपात झाला. एका मागोमाग एक अग्ग्नबाण उडत होते. एके ददवशी सकाळी, संिीच्या शोिात असताना, धचन कललच खान बहादुर, मुहम्मद आमीन खान [४९९] बहादुर, तरतबयत खान बहादुर, अजीज खान रोतहला व इखलास खान धमयाना यांनी लाल टे कडी नावाची एक टे कडी जजिंकून घेतली, जजचा ताबा धमळाल्यावर शत्रूचे बळ कमी होणार होते. शत्रूला हे कळल्यावर ते मोठ्ा संख्येने ततथे आले व त्यांच्यावर दगडांचा इतका मारा केला क़ी त्यांना ते झेपले नाही. त्या वीरांनी शत्रूला घेरायचा प्रयत्न केला पण त्यांना ते न जमल्यामुळे ते परत तफरले . काम बक्ष व आमीर-उल-उमरा यांना पाठवूनही त्या वीरांच्या पररश्रमाला फळ आले नाही. माघारी नंतर बादशाहाने त्यांना त्या बाजूने प्रयत्न करण्याचे सोडू न इतर बाजूंनी काम पुढे न्यायला सांतगतले . त्या ददवशी धचन कललच खान बहादुर व मुहम्मद आमीन खान बहादुर एका तुकडी सोबत मोचे लावायची जागा शोित असताना एक तोफ गोळा त्यांच्यावर पडला. एकाच्या घोड्याचे दोन पाय व दुसऱ्या घोड्याचा पुढचा एक पाय, उडवले गेले पण दोन्ही सेनापती सुखरूप खाली उतरले . बादशाहाला हे कळल्यावर आमीर खान या त्याच्या वैयलक्तक सेवकाबरोबर त्याने दोन्ही सेनापतींसाठी सोन्याच्या साजाचे दोन अरबी घोडे व धचन कललच खानासाठी मूल्यवान स्फदटकाची अत्तरदाणी दे ऊन त्यांना उपकृत केले . थोडक्यात, लाल टे कडी आणण पेट्टा, िेडापूरच्या समोरील टे कडी यांच्यामध्ये मोचे लावायचे अशी या वीरांची योजना होती. मुहम्मद आमीन खान बहादुर याने शत्रूला पळवून लावण्यासाठी लाल टे कडी व मोचामची जागा या दोन्हीच्या मध्ये एक तुकडी ठे वली. सुलतान हुसैन, ज्याला मलं ग म्हटले जायचे, त्याने पादशाहजाद्याचे लोक घेऊन धमळाले ली टे कडी काही वेळ हातात ठे वायचा प्रयत्न केला. [५००] तसेच रुहुल्लाह खानाचा मुलगा बाकर खान याने िैयामने दुसऱ्या टे कडीवर ठाण मांडले . या दोन्ही तुकड्यांनी ददवस रात्र शत्रूचा मारा घेत त्याला थोपवून िरले . शत्रू या लोकांना रोज घेराव घालत असूनही त्यांच्या कामाला यश धमळे ल असे वाटू लागले होते. तेव्हा मराठे शत्रूला मदत करायला येत असल्याची बातमी पसरली. गुरूवार, ८ माचम १७०५ / २३ जजल्कदा १११६ ला िना जािव व कहिंदुराव पाच ते सहा हजार स्वार घेऊन बादशाही सैन्याजवळ आले . त्यांच्यापैक़ी अनेकांच्या कुटुं बांनी या तकल्ल्यात आश्रय घेतला होता त्यामुळे

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८४

बादशाही सैन्याला एका बाजूला खेळवत ठे वून दुसऱ्या बाजूने त्यांच्या कुटुं बांना त्यांनी बाहेर काढले व तनघून गेले. त्यांनी वागीनगेराच्या प्रमुखाला सुचवले क़ी, ‘आपल्या दोघांच्या एकतत्रत सैन्याने सुद्धा आपण बादशाही सैन्याशी लढू शकत नाही. तुझा तकल्ला लोखंडाचा असला तरी तो तवतळे ल आणण तपतळ्याचा असला तर तो उध्वस्त होईल. तुझ्या दे शाचा तवध्वंस होऊ दे ऊ नकोस. तुझी जमीनदारी घालवू नकोस. तुझ्या उरले ल्या मालमत्तेवर जास्त तवसंबू नकोस. तुझे सैन्य तवखरून दे ऊ नकोस’. मराठ्ांना रोज काही हजार रुपये दे ऊन त्याने त्यांच्याशी संिान बांिले होते. या दुदै वी माणसाच्या खखशातून हा पैसा गेला पण त्यांच्याकडू न याला काय धमळाले ? त्याच्या धचथावणीने मराठे काही वेळा छावणीच्या अनेक बाजूंनी प्रकटले पण त्यांना मार ददल्यावर ते डोंगरात पळू न गेले. मुहम्मद आमीन खान बहादुर, हमीदुद्दीन खान बहादुर, आमानुल्लाह खान [५०१] व इतर वीरांच्या हालचालींमुळे अनेक मोठे पराक्रम केले गेले. तोवर त्या बंडखोर प्रमुखाने शांततेसाठी प्रयत्न सुरू केले . त्याने अब्दुल घानी काब्श्मरी नावाच्या एका व्यापाऱ्याकडे सुरक्षा व इतर काही गोष्टींसाठी प्राथमनापत्र ददले . या अब्दुल घानीकडे कपट व फसवेतगरी सोडू न इतर काही सामान नव्हते व अशा युक्त्या वापरून आणण लबाडी करून तो त्या प्रमुखाच्या जवळ पोहोचला होता. तो हीन माणूस बादशाहाला मातहत असले ल्या नामदारांपैक़ी नसल्यामुळे त्याने ते पत्र वातकयाखवान तहदायतकेश याच्याकडे आणून ददले , ज्याच्याशी तो एकदा किीतरी बोलला होता. तो म्हणाला क़ी, ‘मी एकदा सहज तकल्ल्याजवळ चालत गेलो होतो व संध्याकाळच्या नमाजामुळे मला उशीर झाला होता. तेव्हा बेरड प्रमुखाचे काही लोक ततथे आले व मला बांिून घेऊन गेले. त्याने थोडी चौकशी करून मला हे पत्र ललहून ददले ’. तहदायतकेशने हा प्रकार बादशाहाच्या कानावर घातला. बादशाहा इतका तववेक़ी व अनुभवी असूनही, वेढा शेवटाकडे जात असल्याची धचन्हे ददसूनही व त्या हीन माणसाचे मूल्य मातहत असूनही, त्या तवनंत्या मान्य होतील असे बादशाहाने सांतगतले . पादशाहजाद्याला या वाटाघाटींसाठी मध्यस्त म्हणून नेमले गेले. त्या बंडखोर प्रमुखाने त्याचा भाऊ सोमससिंह याला दरबारास पाठवले . त्याला जमीनदारी, तपधडया हे नाव आणण मनसब हवी होती. तो आल्यावर त्याला बणक्षसे व मनसब ददली गेली. शेख मीर याचा मुलगा मुहतशाम खान हा काब्श्मरीचा दे णेकरी होता. त्याला काही मनसब ददले ली नव्हती व तो या वेढ्यात काही कष्टही घेत नव्हता. त्या काब्श्मरीच्या कपटाने त्याला तकल्ल्याचा

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८५

तकल्ले दार नेमून मनसब दे ऊन काही लोकांबरोबर आत नेले गेले. [५०२] सोमससिंह याने अफवा पसरवली क़ी तपधडया वेडा झाला व तकल्ल्यातून पळू न गेला आहे. त्या काब्श्मरीने त्याच्या आईकडू न संदेश आणला क़ी तो नीच मराठ्ांबरोबर पळू न गेला आहे व सोमससिंह याला आता तकल्ल्यात येऊन जमीनदारीचा पदभार ददला जावा व त्यानंतर एका आठवड्याने तकल्ला सोडला जाईल. असे केले गेले. काब्श्मरीला तीन सदीची मनसब ददली गेली. तहदायतकेश याला काही ददवसांसाठी हादी खान ही उपािी व वाढ धमळाली. आघाडीवरून होणारा तोफांचा मारा थांबवला गेला. सेनापतींना दरबारास बोलावले गेले. त्या कपटीला वाटले होते क़ी त्याची योजना लसद्धीस जाऊन बादशाहा ददले ल्या आश्वासनाप्रमाणे ततथून तनघून जाईल व त्याचा दुटप्पीपणा व कपट यशस्वी होईल. पण तसे काही झाले नाही. त्याने तकल्ला सोडायला व बादशाही सैन्याला प्रवेश द्यायला उशीर केला व त्यामुळे गडबड तनमामण होऊन पुन्हा युद्धाची इच्छा प्रज्वललत झाली. शांतता प्रस्थातपत करण्यासाठी चालले ल्या या वाटाघाटींच्या काळात बादशाहाचे ईस्प्सत साध्य करण्यासाठी केवढे मोठे प्रयोजन केले जात होते आणण त्याने त्याच्या उदद्दष्टांवर तकती प्रमाणात पाणी ओतले होते ज्यामुळे संहाराचा अग्ग्न तवझला होता याची त्याला काही कल्पनाच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर, या मिल्या तवलं बाच्या काळात बक्षी-उल-मुल्क झुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग याला बऱ्हाणपूरहून खजजना घेऊन दरबारास यायचा आदे श ददला होता तो तातडीने राव दलपत, रामससिंह व मोठ्ा सेनेबरोबर ततथे आला. जजिंजीला नुस्रत जंग याचा सहाय्यक म्हणून काम करणारा दाऊद खान तातडीने बहादुर खान व मोठ्ा जमावासह ततथे आला. कमरनगरचा तकल्ले दार युसुफ खान व गुल्बग्यामचा तकल्ले दार कामयाब खान [५०३] तसेच इतर फौजदार व तकल्ले दार उत्तम तुकड्यांसह गोळा झाले . बादशाहाने नुस्रत जंग याला तकल्ला घेऊन शत्रूला िडा लशकवायचा आदे श ददला. भेटीच्या दुसऱ्या ददवशी खान तकल्ल्याची पाहाणी करायला सुलतान हुसैन व बकार खान यांच्याकडे असले ल्या टे कड्यांच्या बाजूला गेला. पेट्ट् यातील त्यांच्या जागी बसून शत्रूने गोळीबार केला व पुढे आले पण त्यांना झोडपून, अनेकांना मारले व इतर मागे पळू न गेले व तटाची राखण करते झाले . या ददवसातील झटापटीत राव दलपत याच्या दलातील अनेक लोक िैयामने लढू न मारले गेले ककिंवा जखमी झाले . जमशीद खान तवजापुरी तोफेच्या गोळ्याने मारला गेला. नुस्रत जंग याने तटापासून थोड्याच अंतरावर

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८६

भक्कमपणे त्याचे पाय रोवले . बादशाहाच्या आदे शानुसार हमीदुद्दीन खान बहादुर, तरतबयत खान बहादुर व इतर नुस्रत जंग याच्या जागी गेले. धचन कललच खान शत्रूला थोपवण्यासाठी लाल टे कडी व मोचे यांच्या मध्ये थांबला. काही ददवसांनंतर त्याला तकल्ल्याभोवती टे हळणी करायला सांतगतले गेले व मुहम्मद आमीन खान व इतर मुघल, बक्षी-उल-मुल्क धमझाम सद्रुद्दीन मुहम्मद खान सफावी यांनी त्याची जागा घेतली. तोवर नुस्रत जंग याने टे कडीच्या उतारावर शत्रूच्या वापरात असले ल्या काही तवतहरी ताब्यात घेतल्या व कठडे बांिून, सुरक्षा कवच तयार करून तटाच्या जवळ पोहोचला. सरते शेवटी शुक्रवार, २७ एतप्रल १७०५ / १४ मुहरमम १११७ ला [५०४] ईश्वर व बादशाहावर तवश्वास ठे वून, एका बाजूने दाऊद खान आणण त्याचे भाऊबंद व दुसऱ्या बाजूने हमीदुद्दीन खान बहादुर, तरतबयत खान बहादुर व इतर वीरांना आक्रमणासाठी तनयुक्त करून तो स्वतः घोड्यावर बसून त्यांना पाठठिंबा द्यायला थांबला. सन्मान धमळवण्यासाठी उत्सुक असले ले हे वीर दोन्ही बाजूंनी िावत गेले व माघार घेत असले ला शत्रू हे आक्रमण थोपवू शकला नाही. तो पट्टा सोडू न ते तकल्ल्यात पळत सुटले . तवजेत्यांनी त्या उंचसखल भागातून एक कोस िावत जाऊन शत्रूला कापून काढत व झोडपत स्वतःचे पाय ततथे भक्कम रोवले . त्या शातपत बेरड व मराठ्ांनी जेव्हा हा तवजय बधघतला तेव्हा आता पळू न जाण्यालशवाय काही गत्यंतर नाही हे त्या बेरड प्रमुखाला कळू न चुकले . ददवसाच्या वेळात बादशाही सैन्याला थोपवण्यासाठी बंदुकिारी लोकांची एक तुकडी ततथे नेमून संकट काळातील त्याचे सहकारी असले ल्या मराठ्ांबरोबर टे कडीच्या दुसऱ्या बाजूने तो पळू न गेला. संध्याकाळच्या सुमारास बंदुकिाऱ्यांच्या तुकडीने ततथल्या घरांना व सामानाला आग लावली व ते पळू न गेले. ततथले स्फोट व दुदै वी लोकांचे नाहीसे होणे यावरून खरी पररब्स्थती समोर आली. दाऊद खान, मनसूर खान व इतर त्या प्रमुखाच्या घराकडे िावले पण ते ररकामे होते. पळू न जाण्यापूवी त्याने मुहतशाम खानाला त्या घरात बांिून ठे वले होते. तकल्ला जजिंकल्यानंतर [५०५] खानासाठी दरबाजा उघडला गेला. बादशाहाच्या कृपेने व सुदैवाने हा मोठा तवजय नुस्रत जंग याच्या लोकांच्या पदरात पडला. दुसऱ्या ददवशी नुस्रत जंग बादशाहाला भेटायला आला तेव्हा त्याला एक रत्नजधडत तलवार, सोन्याच्या साजाचा एक घोडा व चांदीच्या साजाचा हत्ती ददला गेला. दाऊद खानाला एक तलवार व एक घोडा, त्याचा भाऊ बहादुर खान याला १०० स्वारांची वाढ व नगारे, राव दलपतच्या मुलांना वाढ ददली गेली व रामससिंहला ५०० चा वाढ

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८७

धमळाली. हमीदुद्दीन खान बहादुरच्या कष्टांबद्दल त्याला ३०० स्वारांची वाढ व एक अंगरखा ददला गेला. तरतबयत खान बहादुर याला २०० स्वारांची वाढ व नौबतीचा सन्मान धमळाला. मतलब खान व आमानुल्लाह खान यांना प्रत्येक़ी २०० स्वारांची वाढ व नौबतीचा सन्मान धमळाला. मीर तुजुक सैफुल्लाह खान त्या ददवशी गोळा हाताला लागून जखमी झाला होता, त्याला १०० मोहरा दे ण्यात आल्या. दुसऱ्या ददवशी बादशाहाच्या जवळचे पद असले ला आमीर खान, बक्षी-उल-मुल्क धमझाम सद्रुद्दीन मुहम्मद खान (सफावी) व प्रिानमंत्री इनायतुल्लाह खान यांना प्रत्येक़ी ५०० ची वाढ धमळाली. ख्वाजा अंबर याला खखदमतगार खान ही उपािी धमळाली. ख्वाजा बख्तावर याला खान ही उपािी धमळाली व [५०६] त्या दोघांना प्रत्येक़ी १०० (५ स्वार) अशी वाढ धमळाली. काझी अक्रम खान याला १०० ची वाढ धमळू न तो हजारी झाला. धचन कललच खान बहादुर व मुहम्मद आमीन खान बहादुर यांनी जवळपासच्या प्रदे शात टे हळणीसाठी जाऊन उत्तम काम केले होते व शत्रूच्या पाठलागातही खूप कष्ट घेतले होते. शत्रू पळू न गेल्यानंतर त्यांना दरबारास पाचारण करण्यात आले . पतहल्याला हजार जात अशी वाढ दे ऊन पाच हजारी (तततकेच स्वार) ददली गेली व एक कोटी ५० लक्ष दाम बक्षीस, मुलाम्याची तलवार व एक हत्ती ददला गेला. दुसऱ्याला एक तलवार व ५०० ची वाढ दे ऊन चार हजारी (१२०० स्वार) ददली गेली. सय्यद सफमराज खान याला आिी कमी केले ले ५०० स्वार पुन्हा ददले गेले व आता तो सहा हजारी (५००० स्वार) झाला. त्याला एक अंगरखा व हजार मोहराही ददल्या गेल्या. ददवंगत जमशीद खानाची मुले फररदन खान व हसन खान यांना अनुक्रमे ५०० (३०० स्वार) व ५०० (२०० स्वार) अशी वाढ दे ऊन दीड हजारी ददली गेली. मुघल व इतर जमाव, दोन्ही खान बहादुरांच्या जमावातील कहिंद व मुसलमान यांना वाढ, घोडे, तलवारी व खंजीर ददले गेले. थोडक्यात सांगायचे तर या तवजयाचा मोठा समारंभ केला गेला. जगभरातील मुसलमानांनी आनंदोस्तव साजरा केला. या नीच कातफरांच्या तवनाशामुळे शेतकरी व सामान्य लोक, श्रेष्ठ नामदार व दे शातील सय्यद संतष्ट ु व आनंदी झाले . या तकल्ल्याला रहमानबक्ष खेरा असे नाव ददले गेले. [५०७]

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८८

बादशाही छावणी दे वापूरला पडते कातफरांच्या दे शात शरीयाचा1 प्रसार व्हावा आणण सवांच2े राहणीमान सुिारावे असा हा दे श जजिंकून घेण्यामागे मुख्य हेतु होता. त्यामुळे पळू न गेलेल्या व लपून बसले ल्या रयतेला तवश्वासात घेऊन त्यांना न्यायाची व सन्मानाची वागणूक धमळे ल असा संदेश पाठवून पुन्हा ततथे येऊन राहण्यासाठी व शेतीची कामे चालू करण्यासाठी उद्युक्त करून आसपासचा प्रदे श पुन्हा ब्स्थर स्थावर करणे आवश्यक होते. या कामासाठी तसेच काही दुराग्रही प्रमुखांकडू न नजराणा घेण्यासाठी ककिंवा त्यांना िडा लशकवण्यासाठी धचन कललच खानाला सैन्याची एक तुकडी दे ऊन तातडीने पाठवले गेले. घाबरले ल्या रयतेचे रहमानबक्ष खेरा येथे पुनरागमन, इथे तकल्ला व मशीद बांिणे ही सगळी कामे मागी लावण्यासाठी तसेच पावसाळा काढण्यासाठी बादशाहाने आदे श ददला क़ी बादशाही छावणीसाठी जवळपास एखादी सुयोग्य जागा तनवडावी. यासाठी कृष्णेच्या काठी, रहमानबक्ष खेरा पासून तीन कोसावर असले ले दे वापूर अधिकाऱ्यांनी तनवडले . बादशाहा एका मजले त ततथे पोहोचला. लोकांसाठी ही फारच आरामदायी व तवश्रांतीसाठी उत्तम अशी खरोखर सुंदर जागा होती. बादशाहाच्या कृपेने सवांना तवश्रांतीचा आनंद घेता आला. शेतकरी त्यांच्या घरी परतले व शेतात कामाला लागले , बंडखोरांना िडा लशकवला गेला. ख्वाजा मसऊद महाल्ली याच्या दे खरेखीखाली एक बळकट तकल्ला व एक सुद ं र मशीद बांिली गेली. त्याला मसऊद खान अशी उपािी ददली गेली. त्यावेळी [५०८] तकल्ले दाराचा भ्याडपणा व शत्रूच्या कपटामुळे बब्ख्शंदाबख्श कोंढाणा त्याने जजिंकून घेतला. बादशाहाने हमीदुद्दीन खान बहादुर व तरतबयत खान बहादुर यांच्याकडे वीरांची एक तुकडी दे ऊन व सुयोग्य बढत्या, सन्मान, रोख रक्कम वगैरे दे ऊन तातडीने ततथे पाठवले .

1

2

इंग्रजी अनुवादात इथे ‘spread Islamic practices in an infidels land’ असे ददले आहे. फासी पाठात (‫اسم سع در کفرآباد‬ ِ ‫‘ )مر‬मरालसम-ए-शरआ दर कातफराबाद’ म्हणजे

कातफरांच्या दे शात शरीया लागू करणे असे आहे. इंग्रजी अनुवादात इथे ‘all the slaves’ असे म्हटले आहे. फासी पाठात (‫عموم عباد‬ ِ ) ‘उमूम आबाद’ म्हणजे सवम लोकांचे असा अथम अणभप्रेत आहे.

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३८९

बादशाहाच्या आजारािा वृतांत दुदै वाने सगळ्यांचे स्वास्थय कुठल्या ना कुठल्या आजाराशी जोडले ले असते व प्रत्येक सुख कुठल्या ना कुठल्या दुःखाचा हात िरून येते. यावेळी सगळ्यांना थोडी तवश्रांती धमळाली असतानाच तवश्वाचा जीव ज्यात गुंतला होता व ज्याच्यामुळे लोकांना स्थैयम धमळाले होते त्या बादशाहाच्या प्रकृतीत अचानक काहीतरी तवधचत्र तबघाड होऊन अनाकलनीय असा त्रास सुरू झाला. * * * * तनसगमदत्त मनोिैयम व दृढतनश्चय या गुणांमुळे बादशाहाने सुरवातीला या आजाराला डोके वर करू ददले नाही आणण कारभार थांबवला नाही. पण काही वेळा पूवेच्या आकाशात ददसणाऱ्या सूयामप्रमाणे न्यायसभेच्या लहानशा दरवाज्यात त्याचा चेहरा ददसत असे. तवनंत्या व पत्रांच्या रूपाने लोकांच्या इच्छा व अपेक्षा अनेकदा त्याच्यापयंत पोहोचत व तो स्वत: ब्स्थर हाताने त्यांना सुयोग्य उत्तरे ललतहत असे. त्यानंतर आजार बळावल्यामुळे व दुखणे वाढल्याने त्याला कमालीच्या नैराश्याने ग्रासले व तो किीकिी बेशुद्ध होत असे. या भयंकर घटनेमुळे [५०९] साम्राज्याचे व िमामचे तुकडे होतील क़ी काय असे वाटू लागले . लोकांनी स्वतःच्या मृत्यूची याचना केली पण त्यांना तो धमळाला नाही. छावणीत मोठी गडबड सुरू झाली. वाटे ल त्या हृदयद्रावक अफवा पसरू लागल्या. प्रदे शात अराजकासारखी ब्स्थती तनमामण होऊन उपद्रव करणाऱ्यांना उघडपणे अत्याचार करायची दुदै वी स्वप्ने पडू लागली व संिीची वाट बघत शत्रू सगळीकडे घात लावून बसला होता. दहा ते बारा ददवस हा प्रकार चालला आणण शेवटी जीवन दात्याने घाबरले ल्या लोकांच्या शरीरात नवीन प्राण फुंकले , बादशाहाचे दुखणे बरे केले व जगाला सुरक्षा व शांतता प्रदान केली. लशरजोर झाले ला शत्रू व दुष्कमी दुष्टात्म्यांच्या डोक्यावर नैराश्याची िूळ पडली (तनराश झाले ). आमीर खान सांगायचा क़ी, “एके ददवशी अतीव दुःखात असताना बादशाहा पुटपुटला – ‘तुम्ही ऐंशी ककिंवा नव्वदीत पोहोचता तोवर,

काळ अनेक दुःखांशी तुमची ओळख करून दे ईल आणण ततथून तुम्ही शंभरीकडे जाल तेव्हा मृत्यूच तुमच्या जीवनाचे दृश्यरूप होईल’

अध्याय ४९

१७ धडसेंबर १७०४ ते ५ धडसेंबर १७०५

३९०

त्याचे हलके कण्हणे माझ्या कानास पडले आणण मी पटकन म्हणालो क़ी, ‘बादशाहास स्वास्थय लाभो ! शेख गंजा याने ही कवने खालील ओळीच्या प्रस्तावनेत

ललतहली आहेत’ – ‘मग तुम्ही हसतमुख रातहलात तर चांगले आहे,

कारण आनंदात तुम्ही ईश्वराला स्मरता’ बादशाहा म्हणाला क़ी, ‘पुन्हा म्हण’. मी अनेकदा त्याला ते म्हणून दाखवले . त्याने मला ललहून दाखवायला सांतगतले . मी तसे केले . त्याने ते काही वेळ वाचले ”. अगततक झाले ल्या लोकांवर कृपावंत होणाऱ्या व दुखावले ल्या मनांची वेदना दर करणाऱ्याने (ईश्वराने) तवश्वाच्या आश्रयस्थानाला (बादशाहाला) बळ ददले आणण [५१०] दुसऱ्या ददवशी बादशाहा व्यलथत झाले ल्या लोकांच्या दरबारास उपब्स्थत रातहला. लोकांना त्यांचे जीवन परत धमळाले . बादशाहा म्हणाला क़ी, ‘तुझ्या कवनांनी मला पूणम बरे केले व माझ्या अशक्त हृदयास शक्त़ी प्रदान केली’. वैद्य हाजजक खान याने बादशाहाच्या उपचारात जी पद्धत वापरली ती प्राचीन वैद्यांच्या तोलाची होती. ईश्वराचे शतशः आभार, व ईश्वराचे पुन्हा आभार ! या भाग्यवान माणसाला त्याच्या उत्तम सेवस े ाठी सोन्याची तुला करून तेवढे सोने व एक लशरपेच ददला गेला. बादशाहाच्या प्रकृती बद्दल ऐकून धचन कललच खान बहादुर अस्वस्थ होऊन छावणीत आला होता पण मिुस्नुहीच्या1 वापराने त्याच्या प्रकृतीस उतार पडला व बादशाहाला बरे वाटल्यावर त्याने त्याला परत त्याच्या सुभ्याच्या रक्षणास पाठवले . मंगळवार, २३ ऑक्टोबर १७०५ / १६ रज्जब १११७ ला बादशाहा पालखीने बहादुरगडाकडे तनघाला. हा मतहना (रज्जब) व पुढचा सगळा मतहना (शाबान) प्रवासात गेला. वाटे तच काझी अक्रम खान वारला. त्याच्या गुणांचे कौतुक करत बादशाहा त्याच्याबद्दल बोलताना ‘सवामत तवद्वान ददवंगत माणूस’ असे म्हणायचा.

1

इंग्रजी अनुवादात याला ‘China root (Smilax China)’ म्हटले आहे व फासी पाठात ( ‫چوب‬

‫ز‬ ‫چيب‬ ٔ ) ‘चोबधचनी’. ही वनस्पती चीन व जपानहून भारतात आणली जात असे व सूज, मिूमेह यासारख्या दुखण्यांवर उपचार म्हणून ततचा वापर होत असे.

अध्याय ५०

६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६

३९१

अध्याय ५० राजवटीचे पन्नासावे वषम – तहजरी १११७-१८ ६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६ * * * * [५११] गुरूवार, ६ धडसेंबर १७०५ / १ रमजान १११७ ला बादशाहा बहादुरगड येथे पोहोचला. बब्ख्शंदाबख्श घ्यायला गेलेले अधिकारी त्याला फेरा मारून व टे हाळणी करून तकल्ला जजिंकायची कामतगरी पुढे ढकलू न दरबारास परतले होते. रहमानबक्ष खेरा जजिंकल्यावर झुब्ल्फकार खान बहादुर नुस्रत जंग याला चोरांचा1 पाठलाग करण्यासाठी औरंगाबादला पाठवले गेले होते. त्याला दरबारास बोलावून घेतले गेले व त्याने बहादुरगडला येऊन भेट घेतली. २३ जानेवारी १७०६ / १९ शव्वाल १११७ ला बादशाही सैन्याने अहमदनगरकडे कूच केले तेव्हा नुस्रत जंग खान याचा सन्मान करून त्याला बब्ख्शंदाबख्श घेण्यासाठी पाठवले गेले. त्याच्या स्वतःच्या सैन्याबरोबरच त्या भागाचा जजल्हा प्रमुख तरतबयत खान बहादुर यालाही पाठवले गेले. कातफर संभाचा मुलगा शाहू गुलालबाडीत राहत होता, त्याला नुस्रत जंगच्या सैन्याबरोबर जायचा आदे श ददला गेला. शुक्रवार, २५ जानेवारी १७०६ / २१ शव्वाल १११७ ला काही राजनैततक कारणांसाठी त्याचा तंबू खानाच्या तंबूजवळ लावायचा आदे श ददला गेला व त्याला एक तवशेष अंगरखा व दोन मूल्यवान उदराज ददले गेले. बावीस वषांनी बादशाही छावणी अहमदनगर येथे रतववार, २० जानेवारी १७०६ / १६ शव्वाल १११७ ला पोहोचली. [५१२] गुरूवार, २१ माचम १७०६ / १७ जजल्हेज १११७ ला बातमीदारांनी बादशाहाला कळवले क़ी नुस्रत जंग याने बब्ख्शंदाबख्श परत घेतला होता व पराभूत झाले ल्या लशबंदीला तनशस्त्र करून बाहेर हाकलू न लावले होते. गुजरात प्रांताचा कारभार बघणारा पादशाहजादा आलीजाह याला बादशाहाच्या प्रकृतीची फार काळजी वाटत असल्याने व आत्यंततक प्रेम व भक्त़ी पोटी त्याने दरबारास येण्याची अनुमती मातगतली. आदे शानुसार तो आला व २५ माचम १७०६ / २१ जजल्हेज १११७ ला त्याने भेट घेतली. इब्रातहम खानाची

1

इथे ‘मराठ्ांचा पाठलाग’ अपेणक्षत आहे. दरबारी कागदपत्रांत मराठ्ांचा उल्ले ख चोर ककिंवा लु टारू असा करावा हा आदे श औरंगजेबाने काढला होता. फासी पाठ पृष्ठ ५१४.

अध्याय ५०

६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६

३९२

काश्मीरहून गुजरातला नेमणूक झाली होती व त्याला ततथे पोहोचायला उशीर झाल्यामुळे गुजरात प्रांतात परसले ल्या शत्रूला पळवून लावायला बीदर बख्त याला आदे श ददला गेला. शाहजाद्याच्या जागी बऱ्हाणपूरची सुभेदारी नजाबत खान याला ददली गेली व माळव्याचा कारभार खान-इ-आलम याच्याकडे. बादशाहाला ददल्लीहून बातमी आली क़ी त्याची िाकटी बतहण गौहरआरा बेगम वारली. त्याला [५१३] अतीव दुःख झाले व तो पुनःपुन्हा म्हणाला क़ी, ‘शाहजहानच्या मुलांपैक़ी फक्त ती व मीच उरलो होतो’. * * * त्याने ततच्या चाकरांचे व आप्तजनांचे सांत्वन करून त्यांना अनेक प्रकारे मदत केली. ततचा मीर-इ-सामान हाफ़ीज खान याला मुहम्मद अस्लमच्या जागी लाहोरचा ददवाण केले गेले. बादशाहाचा गुरू ददवंगत काझी मुहम्मद अस्लम याचा नातू सय्यद मुहम्मद याला त्याच सुभ्याचा (लाहोर) सद्र नेमले गेले. सरबुलंद खान ख्वाजा मूसा याची मुले व शाहजादा मुहम्मद मुईझुद्दीन याच्या मुलीची मुले ख्वाजा झाक्ऱीया व ख्वाजा यातहया यांनी भेट घेतली व त्यांना अंगरखे व रोख रक्कम भेट ददली गेली. तरतबयत खान बहादुरच्या मुलीस ४००० रुपयांचे अलं कार ददले गेले, ज्याने ततचे वडील प्रफुब्ल्लत झाले . धचन कललच खान बहादुर याला युसुफ खानाच्या जागी तफरोजनगरचा फौजदार व कुद्रातुल्लाह खानाच्या जागी तालीकोट्याचा फौजदार नेमले गेले. बक्षी-उल-मुल्क धमझाम सफावी खान याचा पुतण्या मुहम्मद मुहासन नुकताच इराणहून आला होता व त्याने बादशाहाची भेट घेतली. हमीदुद्दीन खान बहादुरची मुलगी आमात-उल-हमीद तहला २००० रुपयांचे अलं कार भेट ददले गेले. सफमराज खानाला तपधडया नाईकचा पाठलाग केल्याबद्दल त्याच्या सहा हजारी (५००० स्वार) मध्ये हजार स्वारांची वाढ ददली गेली. नुस्रताबादचा दे शमुख जातगया हा अडीच हजारी (१५०० स्वार) होता, त्याला [५१४] पाच सदीची वाढ ददली गेली. मुहम्मद अजीमचा गुरू व ददल्लीचा काझी मुल्ला हैदर याला छावणीचा काझी म्हणून नेमणूक करण्यासाठी दरबारास बोलावण्यात आले होते. तो आला व त्याला हे उच्चपद ददले गेले. नुस्रत जंग याच्या तवनंतीने मऊमैदानची जमीनदारी राव बुिससिंहच्या जागी नुस्रत जंगचा अधिकारी राजा रामससिंह हाडा याला ददली गेली. ऐतहक व अध्यास्त्मक बाबतीत कृपावंत असले ल्या बादशाहाला संतांचा प्रमुख शेख अब्दुल लततफ याने त्याला ददले ली अबुल फैयाज (दानांचा तपता, दानशूर) ही उपािी त्याच्या नावातून काढू न घ्यायला अनुमती ददली व आलीजाहवर कृपावंत होऊन बादशाहाने ही उपािी त्याला त्याच्या नावात लावायची अनुमती ददली.

अध्याय ५०

६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६

३९३

खान-इ-सामान खुदाबंदा खान हा अडीच हजारी (१००० स्वार) होता, त्याला ५०० (२०० स्वार) अशी वाढ ददली गेली. यापुढे शत्रूचा (मराठ्ांचा) उल्ले ख चोर असा करावा हा आदे श ददला गेला, ते छावणीपासून दोन कोसावर आले होते. बादशाहाने खानइ-आलम, बक्षी-उल-मुल्क सद्रुद्दीन मुहम्मद खान सफावी व इतरांना त्यांना िडा लशकवायला पाठवले . युद्धाच्या िामिुमीत त्यांनी बातमी पाठवली क़ी शत्रू संख्येने मोठा आहे त्यामुळे बादशाहाने हमीदुद्दीन खान बहादुर व मतलब खान यांना धचलखते दे ऊन त्यांना मदत करायला पाठवले . शत्रूचा पराभव झाला. खान-इ-आलम व मुनव्वर खानाला तलवारींची भेट दे ऊन शाह आलीजाहकडे पाठवले गेले. [५१५] धचन कललच खान बहादुरकडे त्याचे नाव कोरले ली पाचूची एक अंगठी पाठवली गेली. आग्र्याचा तकल्ले दार बाक़ी खान हा दोन हजारी (६०० स्वार) होता, त्याला ५०० जात वाढ धमळाली व कृपेचा स्वीकार करत तो म्हणाला – बादशाहाच्या कृपेतून काम साध्य होते, बाक़ी फक्त तनधमत्तमात्र आहे शाह आलीजाहच्या मुली गायततयारा बेगम व इफ्फतआरा बेगम व बीदर बख्तची मुलगी बख्तुस्त्न्नसा बेगम या दरबारास आल्या. त्यांना प्रत्येक़ी आठ ते दहा हजार रुपयांचे अलं कार भेट ददले गेले. नुस्रत जंग सड्या फौजेने औरंगाबाद जवळ ‘चोरांच्या’ मागावर गेला व रामससिंह हाडा बरोबर त्याचे सामान दरबारास पाठवून ददले . अब्दुल अजीज खानचा मुलगा व जुन्नरचा फौजदार व तकल्ले दार अबुल खैर खान याला त्याच्या वधडलांची उपािी धमळाली होती. बऱ्हाणपूर येथील दौलतमैदान भागात असले ल्या धमया शेख अब्दुल लतीफ याच्या थडग्याचा कारभारी (वली) म्हणून त्याची नेमणूक झाली. मुहम्मद आमीन खानाचा मुलगा कमरुद्दीन खान याला एक येमेनी लशरपेच ददला गेला व ददवंगत मुखललस खानाचा मुलगा मुहम्मद हसन याला एक रत्नजधडत अंगठी ददली गेली. मंगळवार, १८ जून १७०६ / १७ रतब-उल-अव्वल १११८ ला बादशाहाची मुलगी मेहरुस्त्न्नसा बेगम व ततचा पती इजझदबक्ष यांचे तनिन झाले . त्यांची मुले सुलतान दादरबक्ष व दावरबक्ष यांचे सांत्वन करण्यासाठी रत्नांनी भरले ले गोल खोके त्यांच्याकडे पाठवण्यात आले . रतववार, ३० जून १७०६ / २९ रतब-उल-अव्वल १११८ ला बादशाहाला रात्री उशीरा कळले क़ी बुलंद अख्तर याचा मृत्यू झाला आहे. त्याची तीन मुले व कुटुं बाला [५१६] अहमदनगरहून आणण्यासाठी ख्वाजा मसऊद खान याला पाठवले गेले. ददवंगताची मुलगी चमनी बेगम, सुलतान फतीहा करीबा व इतर मुलांना

अध्याय ५०

६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६

३९४

दुखवट्याची वस्त्रे व रत्ने ददली गेली. इस्लामपुरीला असले ला सत्वा डाफळे वारला. गुरूवार, २५ जुलै १७०६ / २४ रतब-उस-सानी १११८1 ला तरतबयत खान बहादुर याला रहमानबक्ष खेराच्या बाजूला ‘चोरांना’ पळवून लावायला पाठवले गेले. शातहस्ता खानाचा मुलगा व बंगाल मिील एक अधिकारी अबु नसर खान याला ददवंगत धमझाम खान-इआलम याच्या जागी अविचा सुभेदार नेमले गेले. तो तीन हजारी (२००० स्वार) होता, त्याला ५०० स्वारांची वाढ ददली गेली. रायरीचा तकल्ले दार व फौजदार लशवससिंह याला लोदी खानाच्या जागी नबीशाहगडाचा2 तकल्ले दार व फौजदार तसेच लशरवळचा ठाणेदार अब्दुल्लाह याच्या जागी चाकणचा तकल्ले दार नेमले गेले. तो दीड हजारी (१००० स्वार) होता, त्याला ५०० (३०० स्वार) अशी वाढ धमळाली. मुईझुद्दीनचा मुलगा अझ्झुद्दीन व मुहम्मद अझीमचा मुलगा मुहम्मद करीम यांना रोजचा भत्ता धमळत होता. त्यांना प्रत्येक़ी चाळीस लक्ष दाम ददले गेले. धमहीन पूर-ए-खखलाफत याने मुहम्मद इखलासकेश (बादशाहाच्या कृपेने ज्याच्या नावाआिी मुहम्मद या पावन शब्दाचे पालु पद लावून तो मुहम्मद इखलास म्हणून प्रलसद्ध झाला) याला दरबारातील त्याचा दत म्हणून नेमण्यासाठी नेमणुक़ीचा अंगरखा पाठवला व त्याने बादशाहाला अणभवादन केले . बाल्खच्या राजाचा दत मेहतर मुबारक याने भेट घेतली व पेशकश म्हणून बारा घोडे व पाच खेचरे सादर केली. मललक गाझी वरील तवजयाबद्दल बक्षीस म्हणून मुईझुद्दीन बहादुरकडे अंगरख्यांच्या दोन डाली, एक हत्ती व एक घोडा पाठवला गेला. अली मदम न खान हैदराबादी याच्या मृत्यूमुळे त्याचा मुलगा मुहम्मद रझा याला रामगडचा तकल्ले दार नेमले गेले. [५१७] तो हजारी (२०० स्वार) होता, त्याला २०० स्वारांची वाढ ददली गेली. नुस्रत जंग याच्या हाताखालचा अधिकारी राव कान्हू याचा मुलगा मांिाता याला यासीन खानाबरोबर हनुमंतगड व परीणक्षतगड, वचन ददले ल्या एका वषामच्या कालाविीत घेण्यासाठी पाठवण्यात आले . तन व खालसाचा मुत्सद्दी इनायतुल्लाह खान हा (दरबारात) गाललचावर उभा राहायचा, बादशाहाने त्याला कठड्याच्या आत उभे रहायची अनुमती ददली. तनरोपाच्या ददवशी मेहतार मुबारक या दताला एक अंगरखा, एक खंजीर, एक हत्ती व ५००० रुपये रोख ददले गेले. कमरनगरचा तकल्ले दार व फौजदार युसुफ खान 1 2

इंग्रजी अनुवादात तहजरी ततथी ददले ली नाही. इंग्रजी अनुवादात इथे नबीशाहदुगम (पन्हाळगड) म्हटले आहे पण फासी पाठात नबीशाहगड (राजगड) आहे.

अध्याय ५०

६ धडसेंबर १७०५ ते २५ नोव्हेंबर १७०६

३९५

याला धचन कललच खान बहादुरच्या जागी इग्म्तयाजगडचा तकल्ले दार व फौजदार नेमले गेले. तो हजारी (६०० स्वार) होता, त्याला ५०० स्वारांची वाढ ददली गेली. झीनतुस्त्न्नसा बेगमने स्वतःचे रक्त सांडून घेतले . बादशाहाकडू न ततला २००० रुपये, शाह आलीजाह कडू न २५०० रुपये व काम बक्ष कडू न १००० रुपये तसद्दुक म्हणून पाठवण्यात आले . हमीदुद्दीन खान बहादुर याने बादशाहाला धचकनकामाचे काही लशरपेच दाखवले जे त्याने कृपावंत होऊन स्वीकारले . * * *

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

३९६

अध्याय ५१ राजवटीचे एक्कावनावे वषम – तहजरी १११८-१९ २६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७ * * * [५१८] मुहम्मद आमीन खान बहादुर व त्याच्या सहकाऱ्यांनी शत्रूला

पराभूत करून त्याच्याकडू न जप्त केले ल्या वस्तूंसतहत सुखरूपपणे परतून बादशाहाची भेट घेतली. त्याला धचन बहादुर ही उपािी ददली गेली. अजीज खान बहादुर रोतहला याला त्याच्या नावात चघताय ही त्याच्या वधडलांची मानाची उपािी लावून उपकृत करण्यात आले . ददवंगत नुस्रत खानाचा मुलगा धमझाम बेग याने धमहीन पूर-ए-खखलाफतची पेशकश दरबारास आणली होती, त्याला एक रत्नजधडत खंजीर दे ऊन परत पाठवले गेले. त्याच्या सोबत मुअज्जमसाठी एक रत्नजधडत खंजीर, कमरेचा मुत्तका व ५०००० रुपयांची पहुंची ददली गेली. मुहम्मद आमीन खान धचन बहादुर हा चार हजारी (१२०० स्वार) होता, त्याला ३०० स्वारांची वाढ धमळाली. अजीज खान बहादुर चघताय हा अडीच हजारी होता त्याला ५०० जातची वाढ धमळाली. खखजजर खान बतनी हा दीड हजारी होता त्याला ५०० ची वाढ धमळाली. लसयादत खान उघलानचा पुतण्या व जावई ख्वाजा खान हा दीड हजारी (५०० स्वार) होता, त्याला १०० स्वारांची वाढ ददली गेली. ददवंगत आमीर खानाची मुलगी व मुईझुद्दीन याचा मुलगा सुलतान अझ्झुद्दीन यांचा तववाह ठरवण्यात आला. ततच्या खचामसाठी दहा हजार रुपये दे ण्यात आले . तवजापूरचा नाजजम धचन कललच खान बहादुर याला [५१९] दरबारास बोलावण्यात आले , त्याने येऊन भेट घेतली. लाहोरचा नायब सुभेदार मुनीम खान हा हजारी होता, त्याला ५०० (१०० स्वार) वाढ दे ण्यात आली.

बादशाहािा मृत्यू * * * * युद्धखोर कातफरांकडू न दख्खनचा तवस्तृत प्रदे श व या प्रदे शातील तकल्ले जजिंकून जजहाद पूणमत्वास नेल्यानंतर रतववार, २० जानेवारी १७०६ / १६ शव्वालला [५२०] तो अहमदनगरला थांबला. इथे एक वषम रातहल्यानंतर, त्याच्या राजवटीच्या ५१

व्या वषामत शव्वाल मतहन्याच्या शेवटी (२६ धडसेंबर १७०६ ते २३ जानेवारी १७०७)

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

३९७

दुदै वाने तो खूप आजारी पडला. पण * * * त्यातून तो सावरला. त्याच्या सवयीप्रमाणे तो अनेकदा व्यलथत झाले ल्या लोकांच्या दरबारास उपब्स्थत रातहला व कारभार चालवला. या काळात शाह आलीजाह याला माळवा सुभ्यातील गडबडीवर उपाय करायला पाठवले गेले तर काम बक्ष याला तवजापूरची सुभेदारी घ्यायला पाठवले गेले. यानंतर चार ते पाच ददवसांनी बादशाहाला प्रचंड ज्वराने ग्रासले व पुढचे तीन ददवस त्याची तीव्रता बरीच असूनही त्याचा दृढतनश्चय व मनोबलाच्या आिारे पाच पैक़ी एका वेळेस एकतत्रत नमाजासाठी, ईश्वराचे नाव घेण्यासाठी व इतर िार्मिंक कतमव्ये पार पाडण्यासाठी तो अदालतगाह मध्ये गेला. त्याने नमाजाच्या एकाही गोष्टीकडे दुलम क्ष केले नाही. या ददवसांत तो अनेकदा या ओळी पुटपुटायचा – एका तनधमषात, एका क्षणात, एका श्वासात, जगाची ब्स्थती बदलते [५२१] गुरूवार, १९ फेब्रुवारी १७०७ / २७ जजल्कदा १११८ या ददवशी, दुपारी

बादशाहाला हमीदुद्दीन खान बहादुरची एक याधचका दाखवली जात होती. तसद्दुक म्हणून एक हत्ती दे ण्याचे व ४००० रुपये ही हत्तीची ककिंम्मत काझी-उल-कझात मुल्ला हैदर याला गरीबांमध्ये वाटण्यासाठी दे ण्यात यावी असे त्यात म्हटले होते. बादशाहाने त्यावर साद (बरोबर) असे ललतहले . प्राण कंठाशी आले ल्या ब्स्थतीत त्याने त्या कागदाच्या वरच्या बाजूला ललतहले क़ी, ‘या क्षुद्र जीवाला आता वरच्या तवश्वात (स्वगामत) लवकर पाठवा’. शुक्रवार, २० फेब्रुवारी १७०७ / २८ जजल्कदा १११८ ला बादशाहा बाहेर आला व सकाळच्या नमाजासाठी त्याच्या शयनकक्षात जाऊन शुद्ध हरपत असताना व श्वास घ्यायला श्रम होत असतानाही हाताच्या बोटांनी स्मरणीचे मणी मोजत व जजव्हेने ईश्वराचे नामस्मरण करत तहलील म्हणत होता – अल्लाह लशवाय दुसरा ईश्वर नाही. एक चतुथांश ददवस गेल्यावर त्याच्या इच्छे नुसार – तो म्हणायचा क़ी शुक्रवारी मरण येणे हे फार पुण्याचे असते – तो वारला. * * * काझी, तवद्वान व पुण्यवान लोक त्याचे पार्थिंव पुरण्यासाठी तयार करण्यात गुंतले . त्याच्या शेवट्या इच्छे प्रमाणे [५२२] अंततम नमाज केला गेला व त्याचे पार्थिंव शयनगृहात ठे वले गेले. झीनतुस्त्न्नसा बेगमच्या तवनंतीनुसार, बादशाही छावणी पासून पंचवीस कोसावर असले ला पादशाहजादा मुहम्मद आजम शेवटी शतनवार, २२ फेब्रुवारी १७०७ / ३० जजल्कदा १११८ ला ततथे आला व अतीव शोकात बुडाला.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

३९८

सोमवार, २४ फेब्रुवारी १७०७ / २ जजल्हेज १११८ ला पादशाहजाद्याने अपार दुःखात ते पार्थिंव स्वतःच्या खांद्यावर घेऊन न्यायसभेपयंत अत्यंत आदरभावाने नेले व मग पुढे पाठवून ददले . बादशाहाच्या शेवटच्या इच्छे नुसार त्याचे पार्थिंव (दौलताबाद जवळ) शेख झैनद्द ु ीन याच्या थडग्याच्या समोरील मोकळ्या जागेत, बादशाहाने त्याच्या हयातीत बांिले ल्या थडग्यात पुरले गेले. * * * [५२३] या जागेला खुल्दाबाद म्हणतात व ती औरंगाबाद पासून आठ कोस तर

दौलताबाद पासून तीन कोसांवर आहे. त्याच्या थडग्यावरील लाल दगडाचा चौथरा लांबीत तीन याडम तर रुं दीत अडीच याडामहून मोठा नाही व फक्त काही बोटे उंच असून मध्यभागी पोकळ आहे. त्यात माती भरून त्यावर सुगि ं ी फुलझाडे लावली आहेत. * * * आता खुल्दमकान या उपािीने त्याचा (बादशाहाचा) उल्ले ख होतो. **** दै वी क्षमेचे भांडार असले ल्या या दे वदतासम आत्म्याच्या अगणणत आशीवामदांमुळे आसमंत बदलू न टाकणाऱ्या घटनांनंतर ज्या प्रकारची उल्थापालथ व तवनाश ददसून येतो त्याचा लवले शही बघायला धमळाला नाही. त्यामुळे हा अमर आत्मा जजवंत असताना लोक ज्या प्रकारे सुखसमािानात राहत होते अगदी तसेच ते राहू लागले . ईश्वराची क्षमा व कृपा त्यावर कायम राहो ! ९१ (चांद्र) वषम व १३ ददवस इतके त्याचे आयुष्य होते व त्याने ५० वषम, २ मतहने व २७ ददवस राज्य केले . या ददव्य दरबारातील या अतद्वतीय माणसाच्या कायामचे महत्त्व आणण आवाका सांगायला हे सगळे आकडे अगदी तोकडे पडतात. जो अजरामर झाला आहे त्याच्या जीवनाबद्दल आपण काय सांगणार ? यांच्या सारख्या अमत्यम लोकांसाठी मरण हा शब्द वापरायचा नाही असा तनयमच आहे. पुण्यवान किी मेले नाहीत व मरत नाहीत. यांच्यासाठी मरण हे केवळ ब्स्थत्यंतर असते. पररपूणमतेचा तनस्सीम उपासक मुहम्मद इखलास (केश) सांगायचा क़ी, “शुक्रवारी बादशाहाने ईश्वरी क्षमेच्या बागेत प्रवेश केला (वारला) त्याच्या आदल्या रात्री [५२४] ही भयंकर आपत्ती आता केवळ अटळ आहे या तवचाराने इनायतुल्लाह खान व

मी फारच अस्वस्थ झालो होतो. आम्ही दोघे ददवान-ए-हाफ़ीज हे पुस्तक उघडू न त्यातील कतवता चाळू लागलो तेव्हा आम्हाला ही गजल ददसली.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

३९९

जोवर असतील मिुशाला अन् मद्याचे प्याले मस्तक माझे रातहल िुललकण बनुनी मिुशाले 1 वाटे जधमनीवरती तव पायांचा ठसा जजथे मग तो उमटे द्रष्टे पुजततल मान झुकवुनी अनेक ददन मतहने वषे मम थडग्याच्या वाटे वरूनी जाशील जेव्हा, आनंदे तीथमक्षेत्र ते होईल जगती मद्यप्राशकांचे (सुफ़ी) आम्ही नैराश्यात बुडालो व रात्रभर तळमळत रातहलो. दुसऱ्या ददवशी सकाळचा एक प्रहर (तीन तास) झाला असता जे अटळ होते ते घडले . त्या रात्री आम्ही परत एकत्र बसलो होतो. बादशाही सैन्याचा काझी मुल्ला हैदर ततथे आला व आम्ही त्याला सांतगतले क़ी आम्ही ददवान-इ-हाफ़ीज मिील काही पाने चाळली होती. पण तकतीही प्रयत्न केला तरी आम्हाला त्या ओळी आठवल्या नाहीत. आम्ही आमची पुस्तके मागवली पण आमचे सामान आिीच बांिन ू ठे वले होते. शेवटी आम्ही आपापल्या घरी गेलो. झोप लागल्यावर स्वप्नात मला ददसले क़ी मी एका थडग्याच्या शेजारून जात होतो तेव्हा हजरत2 त्या थडग्यातून अिमवट (कमरेपयंत) बाहेर आला व मला आठवत नसले ल्या ओळी त्याने मला सांतगतल्या”. ‘मम थडग्याच्या वाटे वरूनी जाशील जेव्हा, आनंदे

तीथमक्षेत्र ते होईल जगती मद्यप्राशकांचे (सुफ़ी)’ पंक्त़ी – ज्याचे हृदय प्रेमाने सदाजागृतावस्थेत आहे तो किी मरत नाही माझे अमरत्व तवश्वाच्या पानांवर अंतकत केले आहे [५२५]

1

इंग्रजी अनुवादात बहुदा इथे ‘Magi’ म्हणजे ‘मागी अग्ग्न उपासक’ असे म्हणायचे आहे. फासी पाठात मुघान (‫ )مغان‬असा शब्द आहे ज्याचा एक अथम ‘मागी अग्ग्न उपासक’ होतो पण दुसरा अथम प्रवाशांच्या तवश्रांतीची जागा ककिंवा इथल्या संदभामप्रमाणे मिुशाला असा अपेणक्षत आहे.

2

इंग्रजी अनुवादात इथे ‘a holy man (Hazrat)’ असे म्हटले आहे. ‘हजरत’ हे तवशेषण ईश्वराला, एखाद्या पुण्यवान (िार्मिंक) व्यक्त़ीला तसेच बादशाहाला उद्दे शून ही वापरले जाते (स्टा. ४२२). इथला संदभम लक्षात घेतला तर हे बादशाहाला उद्दे शून वापरले असावे असे ददसते.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४००

या पररपूणव राज्यकत्याविे पावन िररत्र तो िार्मिंक चाली रीतींचे कटाक्षाने पालन करायचा हे त्याच्या तनममळ स्वभावाचे जणू वैलशष्ठ्च होते. प्रख्यात इमाम अबू हनीफा याच्या लशकवणीचे तो अनुसरण करायचा. त्याने इस्लामची पाच मूलभूत तत्त्वे त्याच्या सवम शक्त़ीतनशी प्रस्थातपत करून ती अगदी काटे कोरपणे कायामग्न्वत केली. नमाजाच्या आिी तो नेहमी शुधचभूमत होऊन (प्रेतषताची) पतवत्र कवने, इतर म्हणी व प्राथमना म्हणायचा. अतनवायम असले ले नमाज तो मलशदीत ककिंवा बाहेर जमावा सोबत करायचा तसेच सुन्नन, नवातफल व जजव्हाळ्याचा (मुस्तहब्बात) नमाज सवांसोबत व अत्यंत लीनतेने करायचा. दर मतहन्याच्या १२ व्या व १३ व्या ददवशी तसेच दर सोमवार, गुरूवार व शुक्रवारी तो उपास करायचा. शुक्रवारचा नमाज तो सवम मुसलमान व श्रद्धावंत यांच्या बरोबर करायचा. पतवत्र रात्रीत तो जागाच असायचा. ईश्वरी कृपेच्या ज्योतीने त्याने िमम व राज्य यांचा ददवा प्रज्वललत केला. सत्याचा ध्यास असल्यामुळे तो त्याच्या राजगृहातील मलशदीच्या गभमगह ृ ात रात्री तवद्वानांशी चचाम करायचा. त्याच्या खाजगी खोलीत तो किीही मसनदीवर बसला नाही. तो दर वषी शरीयानुसार, त्याच्या मंचकारोहणापूवी तवशुद्ध मागामने धमळाले ल्या उत्पन्नातून तर बादशाहा झाल्यानंतर ददल्लीतील काही गावांचे तसेच दोन ककिंवा तीन मीठ उत्पादन करणारे महाल वेगळे काढू न त्या उत्पन्नातील अडीच टक्के जकात भरायचा व त्याच्या खाण्या-तपण्याचा खचम स्वतः करायचा. त्याच्या मुलांच्या उत्पन्नातील जकातीची मोजणी करून तो ती रक्कम गरीबांसाठी पाठवून द्यायचा. रमजानचा पावन मतहना [५२६] तो ददवसा उपास करायचा व मतहन्याच्या शेवटी मध्यरात्री पयंत तो सुन्ननचा नमाज व तरावीह करत पुण्यवान व तवद्वान लोकांबरोबर सगळे कुराण वाचण्यात व्यस्त असायचा. मुहरममच्या १० व्या ददवशी (अशुराह) तो सतत प्राथमना करत मलशदीत थांबायचा. हजची यात्रा – ही िमामनस ु ार अतनवायम होती व त्याच्या हृदयातील इच्छे चे उदद्दष्ट ही तेच होते – तरी इतर काही अडी अडचणींमुळे त्याला ते पुढे ढकलावे लागले . पण त्याचे प्रायणश्चत्त म्हणून त्याने ततथे जाणाऱ्या लोकांना अनेक प्रकारे मदत केली जे हजला जाण्यासारखेच होते. त्याच्या राजवटीत काही वषांकरता दर वषी व इतर वेळी दर दोन तीन वषांनी या दोन पतवत्र शहरातील (मक्का व मदीना) पुण्यवान लोकांना प्रचंड मोठी रक्कम पाठवली जायची. तसेच त्याने रोजचा भत्ता दे ऊन त्याच्या वतीने काबाला प्रदणक्षणा घालणे, प्रेतषताच्या थडग्याला अणभवादन करणे, त्याने स्वतःच्या

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०१

हाताने ललतहले ल्या कुराणाचे पठण करणे, स्मरणी वापरून इस्लामी िममवचन (शाहदा) म्हणणे व इतर िार्मिंक कामे करण्यासाठी ततथे लोक तनयुक्त केले होते. दे वदतासम चररत्र असणाऱ्या या बादशाहात तवद्वानांमध्ये असणारी वैलशष्ठ्े व परीपूणम पुरुषात असावीत अशी नीतीमूल्य खरोखरच तवसावली होती. त्याला समज आली तेव्हा पासून, (इस्लामनुसार) ग्राय आणण वज्यम गोष्टींचे या बादशाहाला पूणम ज्ञान असल्यामुळे तसेच स्वतःच्या वासनांवर अंकुश असल्यामुळे, जे वज्यम आहे त्यापासून दर राहून जे ग्राय आहेत तेवढ्याच तवलासांचा त्याने उपभोग घेतला. तवलास व करमणुक़ीच्या सवम गोष्टी जेसे क़ी गोड आवाजाचे गायक, वादक वगैरे त्याच्या ससिंहासनाभोवती गोळा झाले होते व त्याच्या राजवटीच्या सुरवातीला काही वषम तो किीकिी त्यांच्या संगीताचा आस्वाद घ्यायचा व त्याला तवद्वानांप्रमाणे त्याची उत्तम जाणही होती, तरीही टोकाच्या त्याग-वृत्तीमुळे त्याने (नंतर) त्याचा आस्वाद घेणे पूणम बंद केले . [५२७] दरबारातील ज्या गायक, वादक व इतर कलाकारांनी त्यांच्या पापी कले बद्दल पश्चात्ताप केला त्यांना त्याने रोजचा भत्ता दे ऊन उदरतनवामहाचे सािन प्राप्त करून ददले . धमझाम मुकरमम सफावी हा संगीताचा उत्तम जाणकार होता. तो एके ददवशी बादशाहाला म्हणाला क़ी, ‘संगीताबद्दल बादशाहाचा दृतष्टकोन काय आहे ?’ बादशाहाने अरबी भाषेत तवचारले क़ी, ‘ते मुबाह आहे का ?’ खानाने पुन्हा तवचारले क़ी, ‘मग तुमच्या मते कुठल्या प्रकारचे संगीत ऐकण्याच्या लायक़ीचे आहे ?’ बादशाहा म्हणाला क़ी, ‘मला बासरी लशवाय संगीत, तवशेष करून पखवाज ऐकायला नको वाटते पण ते हराम आहे, म्हणून मी गाणेही ऐकण्याचे बंद केले आहे’. (इस्लाम) िमामत वज्यम असले ले कुठले ही कपडे त्याने किी पररिान केले नाहीत व चांदीची ककिंवा सोन्याची भांडीही किी वापरली नाहीत. त्याच्या उपब्स्थतीत किीही चुक़ीचा शब्द ककिंवा अपशब्द ककिंवा खोटे बोलले गेले नाही. दरबारींना त्याने सूचना ददली होती क़ी बोलताना एखादा शब्द थोडा जरी आक्षेपाहम वाटत असेल तर त्याच्या जागी दुसरा चांगला प्रततशब्द वापरावा. न्यायदानाच्या त्याच्या प्रेमापोटी तो रोज मोकळ्या व संवेदनशील मनाने दोन ते तीन वेळा उभा रहायचा व त्याच्या न्यायदानात काही अडचण न आणता गदीतून वाट काढत आले ल्या याचकांना न्याय धमळवून द्यायचा व ते सुद्धा कुठलीही भीती ककिंवा नैराश्य न बाळगता त्यांची अडचण त्याच्या समोर मांडायचे. तसेच

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०२

याधचका मांडताना जर त्यांनी काही अयोग्य शब्दाचा वापर केला ककिंवा वागण्यात काही चूक झाली ककिंवा काही अततशयोक्त़ी केली तरी तो रागवत नसे. त्याच्याकडू न किी कोणाचा अपमान झाला नाही. याचकांना इतके मोकळे पणाने बोलू दे ऊ नये असे त्याचे दरबारी त्याला अनेकदा सुचवत. पण तो म्हणायचा क़ी, ‘असे शब्द ककिंवा घटनांचे [५२८] वृतांत ऐकताना राज्यकत्यामला दे वदतासारखे शांत राहता आले पातहजे’. त्याच्या हातून लोककल्याणकारी नसले ले असे एकही काम किी झाले नाही. वेश्या व्यवसाय करणाऱ्या जमातीला ददल्लीतून बाहेर काढू न टाकण्यात आले व असा आदे श सवम बादशाही प्रांतांमध्ये पाठवला गेला. नैततक िममशास्त्याचे काम पूणम शक्त़ीने सवमसािारण लोकांमध्ये उच्च नीच सवांना लागू केले जात होते. इतके मोठे साम्राज्य चालवत असताना त्याने इस्लामी शरीयाने अधिकृत मानले ले हुदद व लसयासत यातील दं डनीती लशवाय इतर कशाचाही आिार घेतला नाही ककिंवा रागाच्या भरात अथवा उद्वे गाने किीही कोणाला मारून टाकायचा आदे श ददला नाही व इतर कोणालाही तसे करण्याची तहम्मत झाली नाही. तो इतरांना सन्मानाने वागवत असे व गुणवत्तेला महत्त्व दे त असे त्यामुळे तो सय्यद, शेख व तवद्वानांना (उलमा) मान द्यायचा. या हृद्य प्रयत्नांच्या आिारावर हनाफ़ी जमातीने (कममठ सुन्नी पंथ) कहिंदुस्थान सारख्या मोठ्ा दे शात आिीच्या कुठल्याही राज्यकत्यांच्या काळात किीही नव्हते इतके वचमस्व व महत्त्व प्राप्त केले . ले खणीच्या एका फटकाऱ्याने कहिंदु कारकूनांना सरकारी सेवेतून पदच्युत केले गेले. मोठ्ा संख्येने या नीच व कातफर लोकांची दे वस्थाने व भव्य मंददरे उखडू न टाकली गेली व उजाड झाली. ज्या लोकांना फक्त वरवरचे बघायची सवय असते त्यांना या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी यशस्वीपणे साध्य झाले ल्या बघून फार आश्चयम वाटते. तसेच या मंददरांच्या जागी भव्य मशीदींचे तनमामणही झाले . त्यांच्या सुदैवाने बादशाहाकडे आले ल्या अनेक कातफरांना त्याने स्वतः इस्लामचा कलमा सांतगतला व त्यांना मानाची वस्त्रे व इतर [५२९] सन्मान ददले . त्याच्या राजवटीच्या सािारण मध्यास शरीयाच्या आदे शाप्रमाणे त्याने कहिंदंवर जजझया कर लावायचे ठरवले व त्याच्या पूणम साम्राज्यात हे लागू झाले . हे दुर्मिंळ सत्कृत्य (हस्नत-इ-घररब) कहिंदुस्थानात केले गेले नव्हते व कहिंदंना याच्या इतक़ी हीन वागणूक या आिी कुठल्याही काळात किीही धमळाली नव्हती. दानिमम (खैरात), लोकोपकारी कामे (जसे सावमजतनक उपहारगृह)े व तनवृत्ती भत्ते (इद्रारात) या सगळ्यात तो इतके पैसे खचम

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०३

करायचा क़ी आिीच्या राज्यकत्यांचा खचम त्याच्या एक शंभरांश सुद्धा नव्हता. रमजानच्या पावन मतहन्यात तो गरजूंमध्ये ६०००० रुपये वाटायचा व इतर मतहन्यात त्याच्यापेक्षा कमी रक्कम द्यायचा. ददल्ली व इतर प्रांतांमध्ये क्षीण झाले ल्या व गरीब लोकांसाठी अनेक लं गर सुरू झाले . जजथे कुठे प्रवाशांच्या राहायची व्यवस्था नव्हती ततथे त्याने तवश्रामिाम (सराई) बांिले . संपूणम साम्राज्यातील जुन्या मशीदींची दे खभाल त्याच्या सरकारच्या खचामतून केली जायची व ततथे प्रत्येक़ी एक इमाम, मुआब्झ्झन व खातीब नेमले जायचे, म्हणजे या कामावर प्रचंड मोठ्ा प्रमाणात पैसा खचम होत होता. त्याच्या साम्राज्यातील सगळी शहरे व प्रांतांमध्ये त्याने इस्लामी तवद्वानांना व लशक्षकांना रोजचे भत्ते व भूमी दान (इम्लाक) केली होती तसेच त्यांच्या लशष्यांकररता त्यांची संख्या व ब्स्थती प्रमाणे त्यांना जेवणाचे पैसे ददले जायचे. सवम मुसलमानी लोकांना हनाफ़ी पंथाच्या तवद्वानांनी (उलमा) ददले ल्या तनणमयांप्रमाणे व न्यायशास्त्राप्रमाणे वागायला लावणे हेच त्याच्या उच्चपदाला पोहोचले ल्या मनाचे अंततम ध्येय होते. पण उपलब्ि पुस्तकांमध्ये ददले ले तनणमय हे काझी व मुफ्तींमिील मतमतांतर, परंपरेचे अपुरे पाठबळ, प्राचीन अधिकाऱ्यांचे परस्परतवरोिी तनणमय व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गोष्टी एका पुस्तकात ददले ल्या नसल्याने जोवर ही सगळी न्यायदानाची पुस्तके [५३०] एकत्र केली नाहीत व लोक न्यायदानाच्या प्रतक्रयेत तवद्वत्ता धमळवत नाहीत तोवर त्यातून (लागू होणाऱ्या कुराणातील तनवाड्याचा) नेमका उतारा काढणे अशक्य होते. त्यामुळे िमामचा आश्रयदाता असले ल्या या बादशाहाने प्रख्यात िममपंधडत व कहिंदुस्थानातील प्रलसद्ध तवद्वानांना एकत्र आणून बादशाही ग्रंथालयात एकत्र केले ली न्यायशास्त्राची पुस्तके व मुफ्तींच्या तनणमयांचे सार, या सगळ्याचा अभ्यास करून एक सवमसमावेशक पुस्तक तनमामण करावे ज्यातून नेमके व अचूक तनणमय दे ता येतील, यावर लक्ष केंदद्रत केले . हे मोठे काम तबहारच्या भागलपूर मिील शेख तनजाम याच्या अध्यक्षतेखाली नेमले ल्या सधमतीकडे सोपवले गेले व त्यात असले ल्या तवद्वानांना उत्तम वेतन व भत्ते ददले गेले. हे पुस्तक, ज्याला फतावा-इआलमगीरी असे नाव ददले गेले, तयार करण्यासाठी जवळपास दोन लक्ष रुपये खचम केले गेले व त्याने न्यायशास्त्राच्या इतर पुस्तकांपासून जगाला मुक्त केले . बादशाहाचे लोकांवर जे अनेक उपकार होते त्यापैक़ी एक म्हणजे िान्य व इतर खाद्य पदाथांवरील कर, प्रवाशांकडू न घेतला जाणारा पथकर (राहदारी), कापड व इतर

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०४

वस्तुंवरील जकात व तंबाखूवरील कर या सगळ्यांवर त्याने सूट ददली होती. तवशेष करून शेवटच्या करामुळे मोठ्ा प्रमाणात महसूल जमा होत असे व (लपवले ल्या तंबाखूचा) शोि घेण्याच्या तनधमत्ताने जकात अधिकारी मतहलांची झडती घेण्यासाठी त्यांच्या सन्मानास िक्का पोहोचवत असत. ज्या वस्तुंवरील कराने दर वषी तीस लक्ष रुपये धमळकत येत होती अशा काही करांवर तवशेष करून मुसलमानांना व इतर वस्तुंवर सवांना, साम्राज्यातील सवम प्रांतात सूट ददली गेली हे त्याच्या अनेक उपकारांपैक़ी एक होते. मनसबदारांच्या पूवमजांना व आप्तांना सरकारने ददले ल्या रकमांपैक़ी खचम न केले ल्या रक्कमेतून दर वषी त्यांच्या मनसबीतून ठरातवक रक्कम वळती करून घेण्याची पूवीच्या तवत्तीय तवभागची प्रथा त्याने बंद केली. यातून दर वषी सरकारकडे मोठी रक्कम जमा होत असे. [५३१] नामदारांच्या मृत्यूनंतर सरकारकडे त्यांचे काही दे णे नसेल तरी त्यांची मालमत्ता सरकार जमा केली जात असे. त्याने ही प्रथा बंद करून त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे त्यांची मालमत्ता ददली जाईल असे केले . पूवीच्या राजवटीत बादशाही अधिकारी अगदी कटाक्षाने अशी मालमत्ता सरकार जमा करत असत व त्यामुळे ददवंगत माणसाच्या आप्तांना त्याचा त्रास होत असे. गोळा केला जाणारा कर (हालसलात) हा केवळ कुराणातील आदे शानुसारच गोळा केला जावा अशा आदे शाची फमामने बादशाहाने सवम प्रांतांमध्ये पाठवली. या पावन इततहासात बादशाहाने त्याच्या मंचकारोहणापूवी व त्यानंतर केले ल्या मोतहमांबद्दल घटनाक्रमात सांतगतले च आहे. बादशाही (शाहजहानच्या) सैन्याने बाल्खवर आक्रमण केले तेव्हा अब्दुल अजीज खान याने त्याला तवरोि केला होता केवळ त्याबद्दल इथे मी ललतहणार आहे. मुंग्या व टोळांहून अगणणत अशा संख्येने प्रबळ असले ल्या शत्रूने बादशाही सैन्याला पूणमपणे घेरले होते व तुंबळ युद्ध सुरू होते. या युद्धाच्या िामिुमीतच झुह्रच्या (मध्यान्हीच्या) नमाजाची वेळ झाली. बादशाहाने त्याच्या अधिकाऱ्यांचे ऐकले नाही व खाली उतरला, जमावाबरोबर उभा राहून नमाज, सुन्नत व नवातफल1 अत्यंत ब्स्थर मनाने पूणम केली. अब्दुल अजीज खानाला हे कळल्यावर ‘ईश्वराकडू न मदत धमळते’

1

दोन्ही शब्दांचा अथम तोच असला तरी, इंग्रजी अनुवादात इथे ‘nafl’ म्हटले आहे पण फासी पाठात ‘नवातफल’ (‫ )نوافل‬आहे. स्टा. १४३०.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०५

या कवनाने प्रेररत होऊन, त्याने भांडण धमटवले व म्हणाला क़ी, ‘अशा माणसाशी वैर िरणे म्हणजे स्वतःचा तवनाश करणे आहे’. बादशाहाच्या अनेक छं दांपैक़ी, ज्या छं दाने त्याला दै वी ब्स्थतप्रज्ञता ददली, तो म्हणजे िार्मिंक पुस्तकांचा छं द. कुराणाचे समालोचन, प्रेतषताच्या परंपरा, न्यायशास्त्रावरील काम, [५३२] इमाम मुहम्मद घजालीचे ललखाण, तसेच मानेरच्या शेख शफम यातहया, शेख झैनुद्दीन, कुत्ब मुही लशराजी व त्या प्रकारातील इतर पुस्तकांतील तनवडक ललखाण अशा सगळ्याच्या तो सतत अभ्यास करत असे. त्याचे आणखी एक प्रमुख वैलशष्ठ् म्हणजे ईश्वराचा शब्द (कुराण) मुखोद्गत करणे. त्याच्या जीवनाच्या सुरवातीपासूनच पाठकांच्या मागमदशमनात त्याने कुराणातील काही सुराह पाठ करायचे ठरवले होते तरीही त्याच्या मंचकारोहणानंतर कमालीचे कष्ट व त्याचे दै वदतासारखे सातत्य यामुळे त्याने अखेर कुराण पाठ केले . त्याने कुराण पठण सुरू केले त्याची तारीख या पावन कालश्ले शात धमळते – संकरेक फलातंसी (तहजरी १०७१) व पठण पूणम केल्याची तारीख या कालश्ले शात धमळते – लौह-इ-महफूज (तहजरी १०७८). बादशाहाचे नस्ख ललपीतील ललखाण अगदी ठळक व रेखीव होते व त्याला त्यात चांगली गती होती. त्याच्या हस्ताक्षरातील कुरणाच्या दोन प्रती – पट्टीवर ललतहले ली, सोने व चांदीच्या रेघा व पुस्तकाची बांिणी यात सात हजार रुपये खचम झाले होते – त्याने मददनेला भेट ददल्या होत्या. त्याला नस्ताललक व लशकस्ता ललपी सुद्धा उत्तम येत होती. पत्र ललखाण व गद्य ले खनात त्याचा हातखंडा होता व त्याला गद्य व पद्य दोन्हीत चांगली गती होती. पण ‘कवींच्या मागे जाणारे अजाण असतात’ या कुराणातील (सु.२६,आ.२२४) पतवत्र वचनाला अनुसरून तो तनरुपयोगी कतवता वाचनात किी रमायचा नाही. पण नैततक मूल्यांची लशकवण दे णारे काव्य त्याला आवडत असे. [५३३] *** या काळातील या अतद्वतीय माणसाच्या चररत्राची सगळी सुलक्षणी वैलशष्ठ्े आठवणे व ले खणीतून कागदावर उतरवणे हे त्या ले खणीच्या क्षमतेबाहेरचे आहे. * * *

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०६

या पुण्यवान बादशाहाच्या अपत्यांिा वृतांत या सवमगुणसंपन्न राज्यकत्यामने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पररश्रम घेऊन त्याच्या मुलांना अशा प्रकारे मोठे केले क़ी त्यांना भव्य गोष्टी व कममठ लशक्षण धमळाले तसेच त्यांना सद्गुण, ईश्वरासमोर तवनम्रता, िमामने वज्यम केले ल्या गोष्टी त्याज्य समजणे, राज्यशास्त्र, नेतृत्व आणण इतर अनेक कलागुणांचे लशक्षण धमळाले . बादशाहाच्या मागमदशमनाखाली त्यांनी कुराणाचे पाठांतर केले व (बारा गुरुंकडू न) तवनम्रतेचे लशक्षण घेतले , तवतवि ललपींमध्ये प्रातवण्य धमळवले व तुकी तसेच फासी भाषेवर प्रभुत्व धमळवले . तसेच त्याच्या कुटुं बातील मुलींनाही त्याच्या मागमदशमनाखाली िमामचे आवश्यक तनयम व पद्धती लशकवल्या गेल्या, ईश्वराच्या भक्त़ीत सवम भाग घ्यायच्या, कुराण वाचणे व ललप्यंतर करणे व (मृत्यू) नंतरच्या जगासाठी सद्गुणांचा संचय करणे हे सगळे लशकवले गेले. ईश्वराने बादशाहाला पाच मुले व पाच मुली ददल्या. [५३४] आलमगीरनामाह व माझ्या या इततहासात बादशाहाच्या जीवनातील घटनांमिून त्याच्या अपत्यांचा वृतांत दठकदठकाणी आला आहे तरी मी इथे प्रत्येकाबद्दल थोडक्यात मातहती दे तो.

बादशाहािी मुले १. पादशाहजादा मुहम्मद सुलतान, नवाब बाईच्या पोटी जन्मला, १९ धडसेंबर १६३९ / ४ रमजान १०४९. तो त्याच्या तवनम्र स्वभावासाठी व कौतुकास्पद गुणांसाठी ओळखला जायचा. त्याने कुराणचे पाठांतर केले होते तसेच त्याला अरबी, फासी व तुकी बऱ्यापैक़ी येत होते. बादशाहाच्या युद्धांत त्याने त्याच्या पररश्रमातून शौयामची चुणूक दाखवली होती. बादशाहाच्या राजवटीच्या तवसाव्या वषी त्याचे तनिन झाले . २. पादशाह-ए-जहापनाह1 मुहम्मद मुअज्जम शाह आलम बहादुर हा ४ ऑक्टोबर १६४३ / ३० रज्जब १०५३ ला नवाब बाईच्या पोटीच जन्मला. याचे पुण्यवान चररत्र व बादशाहाच्या लशकवणुक़ीमुळे त्याला समज आल्यापासूनच त्याने उत्तम गोष्टी व पौरुषत्वाचे गुण ग्रहण करून त्याचे चररत्र गुणसंपन्न केले . लहान वयातच त्याने कुराण 1

इंग्रजी अनुवादात इथे ‘Prince’ म्हटले आहे पण फासी पाठात याला पादशाह-ए-जहााँपनाह अशी उपािी ददली आहे. हा ग्रंथ ललहून झाला तेव्हा तो बादशाहा असल्यामुळे ले खकाने असा उल्ले ख केला असावा.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०७

पाठ केले . सुयोग्य उच्चाराने कुराण वाचण्याची कला अवगत करून ते इतक्या गोड आवाजात तो म्हणत असे क़ी [५३५] तकतीही ऐकले तरी ऐकणाऱ्याला अजून ऐकावेसे वाटत असे. * * * तारुण्यात बराच वेळ तो लशकण्यात व पुस्तक़ी ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत असे. प्रेतषताच्या परंपरांबद्दल त्याचे ज्ञान हे हादीस च्या उत्तम जाणकारांपेक्षा अधिक आहे असे या काळातील तवद्वानांचे मत आहे. शरीयाचे त्याचे ज्ञान इतके अचूक आहे क़ी कुठल्याही प्रकरणात लागू होणारा कुराण ककिंवा हादीस मिील उल्ले ख तो चटकन काढू न दे ऊ शकतो. त्याची अरबी वाणी तर इतक़ी उत्तम व ओघवती आहे क़ी अरबस्थानातील अरबी सुद्धा त्याचे कौतुक करतात. तसेच त्याला फासी व तुकी भाषेचे ही उत्तम ज्ञान आहे. तवतवि ललपी ललतहण्यात तो इतरांचा गुरू व मागमदशमक होऊ शकेल. बऱ्याच रात्री तो जागून नवातफलचा नमाज, इतर रोजची कामे, कुराणाचे पठण, हादीस वरील पुस्तके, कुराणावरील समालोचन, शरीया व सुयोग्य वागणूक (सलु क) वाचण्यात घालवतो. सकाळचा नमाज (फज्र) तो सूयोदयाला करतो व एक ककिंवा किीकिी दोन भाल्यांच्या लांबीची नमाजाची चटई घेऊन त्यावर बसतो. त्यानंतर तो दशमनाच्या खखडक़ीत उभा राहून त्याला बघायला थांबले ल्या लोकांना उपकृत करतो व न्याय धमळवण्यासाठी आले ल्या व्यलथत याचकांची दुखणी ऐकतो. दररोज इथे जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तो थांबतो. त्यानंतर तो ददवाण-इ-खास मध्ये बसून उच्च पदस्थ ददवाण, बक्षी व इतर अधिकाऱ्यांबरोबर महसूल तसेच इतर कारभाराची पाहणी करतो. दुपारच्या नमाजानंतर तो जनानखान्यात जातो व जेवण करून प्रकृती स्वास्थयासाठी तवश्राम करतो. असारचा नमाज झाल्यानंतर तो व्यलथत लोकांच्या अडचणी दर करण्याचे काम करतो. सूयामस्ताच्या आिी शस्त्रागाराचे अधिकारी त्याच्या समोर शस्त्रे सादर करतात. [५३६] सूयामस्तानंतर भक्त़ीची ज्योत प्रज्वललत करून रात्रीचा एक प्रहर झाला असता तो अशाचा नमाज करतो व झोपायला जातो. ईश्वर या महान राजाची सावली जगातील सवम लोकांच्या मस्तकावर सदै व ठे वो ! ३. पादशाहजादा मुहम्मद आजम हा २८ जून १६५३ / १२ शाबान १०६३ ला शाहनवाज खान सफावीची मुलगी ददलरस बानू बेगम तहच्या पोटी जन्मला. पतहल्या पौर्णिंमेपासूनच याच्या ललाटावर तेजोवलय ददसू लागले व त्याच्या जीवनाच्या णक्षततजावर बुजद्धमत्तेचा तारा चमकू लागला.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०८

बादशाहाच्या उत्तम लशकवणुक़ीमुळे त्याने पूणमत्वाचे लशखर गाठले व अनेक कलागुण जोपासून त्यात प्रातवण्य धमळवले . याचे कुलीन वागणे व उत्तम लशष्टाचार याने बादशाहा फारच प्रसन्न होत असे. तो अत्यंत बुद्धीमान व कणखर होता. त्याच्या बोलण्यात चातुयम होते व कुठे ही असला तरी त्याला नेमके शब्द वापरता येत असत. तो त्याच्या वधडलांचा धमत्र म्हणता येईल या स्तरावर पोहोचला होता व त्याचे वडील नेहमी म्हणत असत क़ी, या अतद्वतीय मैत्रीत ताटातूट अतनवायम आहे. बादशाहा वारल्यानंतर तीन मतहने व वीस ददवसांनी, ८ जून १७०७ / १८ रतब-उल-अव्वल १११९ ला हा शाह आलम पतहला (मुअज्जम) याच्याशी झाले ल्या (उत्तराधिकाराच्या) युद्धात जाजऊ येथे मारला गेला. [५३७] ४. मुहम्मद अकबर हा ११ सप्टें बर १६५७ / १२ जजल्हेज १०६७ ला बेगम ददलरस बानूच्या पोटी जन्मला. त्याच्या वधडलांच्या लशकवणीमुळे त्याने उत्कृष्ट लशक्षण धमळवले . बादशाहाच्या राजवटीचे ४८ वे वषम चालू असताना इराण मध्ये याचा मृत्यू झाला. तो त्याच्या अतद्वतीय वधडलांना सोडू न नैराश्याच्या जंगलात पळू न गेला होता पण दोन गोष्टींमुळे लसद्ध होते क़ी त्याचा शेवट चांगला झाला – पतहली म्हणजे बादशाहा म्हणायचा क़ी, ‘अकबराने सुन्नी समाजा बरोबर नमाज करणे किीही थांबवले नाही व त्याला िमामचे वैरी असले ल्यांची (इराण मिील लशया लोक) किी भीती वाटली नाही’. दुसरे म्हणजे आठवा इमाम मूसा याच्या थडग्याजवळ लोक जजथे जोडे काढू न ठे वतात त्या पावन मशह्हद मध्ये त्याला पुरले गेले. तववेक़ी मंत्री इनायतुल्लाह खान याने (बादशाहाच्या) आदे शानुसार बीदर बख्त याला ललतहले ला आदे श (हस्बुलहुकुम) इथे सांतगतला तर वावगे होणार नाही – सवामत मोठा पादशाहजादा शाह आलम याचा ददवाण म्हणून मुनीम खान याची नेमणूक झाली. तो काबुलला जायला तनघाला तेव्हा त्याच्या करवी त्याच्या िन्याला संदेश ददला गेला क़ी, अकबर-इ-आबतर1 याने त्याचे सध्याचे व पुढचे (मरणोपरांत) जग

1

अकबर म्हणजे सवोत्तम, सवोत्कृष्ट (स्टा. ८८) आणण अबतर म्हणजे त्याच्या उलट – कवडीमोल, तबनकामाचा, दळभद्री (स्टा. ४). अकबराच्या बंडानंतर औरंगजेबाने आदे श ददला क़ी शासक़ीय नोंदींमध्ये त्याचा उल्ले ख अबतर व बंडखोर असा करावा. इराणच्या राजाने अकबराला त्याच्या वधडलांतवरुद्ध मदत करायला नकार ददला (कारण ते िममसंमत नव्हते) पण वधडलांच्या मृत्यूनंतर, भाऊबंदक़ीच्या युद्धात – जे इस्लामी व इतर राजवटींमध्ये ही सामान्यपणे होत असे – मदतीसाठी त्याला इराणचे सैन्य दे ण्याचे आश्वासन ददले .

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४०९

उध्वस्त केले आहे, त्याच्या व्यथम उपद्रवी हेतक ूं डे दुलम क्ष करू नये. ततथल्या (इराण) राजाने अनुमती ददल्यामुळे तो सध्या कंदहार जवळ फराहला1 राहत आहे व ततथून तो कुठे ही जाणार नाही. तो नीच कपटी अभक्ष्य भक्षणारा राक्षस ततथे बसून वाट बघतो आहे क़ी दुदै वाने काही अघदटत घडले (बादशाहाचा मृत्यू) व शाह आलम काबुलहून कहिंदुस्थानकडे जायला तनघाला तर तो इराणच्या राज्याच्या मदतीने काबुल व मुलतानमध्ये प्रवेश करेल. अरबीत – ‘जे लोक अल्लाहच्या व्यततररक्त इतर दे वांना मानतात ते एक अभद्र उदाहरण आहे’. (कुराण सु.२५, आ.३) लवकरच त्याच्या महान वधडलांबरोबर (मुहम्मद आजम) असेल अशा या नातवास तनरोपाची सूचना दे ताना (वस्सीयत) मी सांगतो क़ी शक्य आहे तततके [५३८] जुळवून घेण्याचा व भांडण न करण्याचा मागम घ्यावा कारण भांडणे हे स्वतःला संपवण्यासारखे असते व त्यातून एक तवधचत्र बंड उभे राहते. लोकांवर दया दाखवावी कारण (उत्तराधिकाराच्या) युद्धात गरीब िार्मिंक लोकांचे नुकसान होते. अरबी – ‘पुण्यवान लोकांसाठी शेवट आहे व नंतरचे जग या जगापेक्षा चांगले व धचरकालीन आहे.

तुम्हाला जे हवे आहे ते तनवडा’. (कुराण सु.२१ आ. १३२) ५. पादशाहजादा मुहम्मद काम बक्ष याचा जन्म २४ फेब्रुवारी १६६७ / १० रमजान १०७७ ला उददपुरी बाईच्या पोटी झाला. बादशाहाने याला मोठे केले व त्याने कुराणाचे पाठांतर केले व अभ्यासाची नेहमीची पुस्तके त्याच्या इतर भावांपेक्षा अधिक अभ्यासली. त्याला तुकी भाषेचे व तवतवि ललपींमध्ये ललतहण्याचे तवशेष ज्ञान धमळवले . माझ्या ले खणीच्या मयामदेत या उत्तम पादशाहजाद्याच्या शौयामचे व उदारतेचे वणमन मी कसे करू ? औरंगजेब वारल्यानंतर दोन वषांनी ३ जानेवारी १७०९ / ३ जजल्कदा ११२० ला रुस्तम ककिंवा इस्फंददयार प्रमाणे लढताना याला वीरगती प्राप्त झाली.

1

फराह हे मुघलांकडील काबुलच्या नैऋत्येला आहे व त्यावेळी ते कंदहार मध्ये येत नसून घजनीचा भाग होते त्यामुळे मुघल सीमेवर राहणारा अकबर हे कहिंदुस्तानच्या शांतीसाठी िोक्याचे होते. (सरकार यांचे Studies in Aurangzib’s Reign, Ch VI तसेच House of Shivaji, Ch XI पाहावे)

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४१०

बादशाहाच्या मुली १. झेबस्त्ु न्नसा बेगम - चा जन्म १५ फेब्रुवारी १६३८ / १० शव्वाल १०४७ ला ददलरस बानू बेगमच्या पोटी झाला. ईश्वराचे ज्ञान असले ल्या बादशाहाच्या मंगल संगोपनामुळे ततने कुराणाचे पाठांतर पूणम केले व त्यासाठी ततला ३०००० सोन्याची नाणी ददली गेली. ततने अरबी व फासीवर प्रभुत्व धमळवले होते व नस्ताललक, नस्ख [५३९] व लशकस्ताह या ललपींमिेही ती प्रवीण होती. ततला लशक्षण व कौशल्याचे महत्त्व कळत होते व धमळतील ती पुस्तके वाचणे, त्यांच्या प्रतत बनवणे व ती गोळा करणे याकडे ततचा ओढा होता. तवद्वानांचे व इतर अभ्यासकांचे ज्ञान वाढवणे याकडे ततने नंतर लक्ष द्यायला सुरवात कली. यातून झाले असे क़ी कोणीही बधघतले नसेल असे ग्रंथालय ततने तनमामण केले व िममवेत्ते, तवद्वान, पुण्यवान लोक, कवी, ले खक व अनेक अक्षरले खक ततच्या या वैभवसंपन्न जनानखान्यातील श्रीमंतीचा आस्वाद घ्यायला येत असत. जसे क़ी मुल्ला सतफउद्दीन आदम तबली याने ततच्या आदे शानुसार काब्श्मरमध्ये राहून कुराणावरील महान भाष्याचा फासीत अनुवाद केला ज्याला झेब-उत-तफालसर (भाष्यांचा अलं कार) असे नाव ददले गेले. ततच्या प्रततधष्ठत नावाने इतरही पत्रके व पुस्तके ललतहली गेली आहेत. ती ततच्या वधडलांच्या राजवटीच्या ४६ व्या वषी, १११३ (२६ मे १७०२1) मध्ये वारली. २. झीनतुस्त्न्नसा बेगम - तहचा जन्म ५ ऑक्टोबर १६४३ / १ शाबान १०५३ ला ददलरस बानू बेगमच्या पोटी झाला. ततच्या वधडलांनी ततला िमामची आवश्यक लशकवण व तनयमांचे ज्ञान दे ऊन वाढवले . ततच्या औदायामवर अनेकांची उपजीतवका चालत असे. ३. बद्रुस्त्न्नसा बेगम - तहचा जन्म १७ नोव्हेंबर १६४७ / २९ शव्वाल १०५७ ला नवाब बाईच्या पोटी झाला. ततच्या वधडलांनी ततला [५४०] कुराणाचे पाठांतर व िार्मिंक पुस्तके वाचायला सांतगतले . ततने पुण्यकमम करत ततचे जीवन व्यतीत केले . बादशाहाच्या राजवटीच्या १३ व्या वषी ९ एतप्रल १६७० / २८ जजल्कदा १०८० ला ती वारली.

1

फासी पाठात तहच्या मृत्यूचे वषम औरंगजेबाच्या राजवटीचे ४६ वे वषम म्हणजे तहजरी १११३ ददले आहे. इंग्रजी अनुवादात जदुनाथ सरकार यांनी २६ मे १७०२ म्हटले आहे. त्यांच्या History of Aurangzeb, खंड १, पृ. ६९ वर हाच ददनांक ददला आहे. पण तहजरी वषम १११३ हे १६ मे १७०२ ला संपले . त्यामुळे या ज्युललयन ददनांकाची शाश्वती वाटत नाही.

अध्याय ५१

२६ नोव्हेंबर १७०६ ते २० फेब्रुवारी १७०७

४११

४. झुब्दतुस्त्न्नसा बेगम - तहचा जन्म २ सप्टें बर १६५१ / २६ रमजान १०६१ ला ददलरस बानू बेगमच्या पोटी झाला. ती ईश्वराच्या भक्त़ीत मग्न असायची व त्यामुळे ततला अगणणत उपहार धमळाले . दारा शुकोहचा मुलगा लसपतहर शुकोह याच्याशी ततचे लग्न झाले व ततचे वडील (औरंगजेब) वारले त्याच वषी फेब्रुवारी १७०७ मध्ये ती वारली. ५. मेहरुस्त्न्नसा बेगम - तहचा जन्म १८ सप्टें बर १६६१ / ३ सफर १०७२ ला औरंगाबादी महलच्या पोटी झाला. ततच्या वधडलांच्या राजवटीच्या ५० व्या वषी सन १७०६ / तहजरी १११६ मध्ये ततचा मृत्यू झाला. ततचा तववाह मुराद बक्षचा मुलगा इजझद बक्ष याच्याशी झाला होता. ईश्वर त्यांचे भले करो !

पररलशष्टे

बादशाहाचा प्रवास

४१२

पररसशष्टे पररलशष्टांमध्ये ददले ले पृष्ठ क्रमांक हे फासी पाठातील पृष्ठ क्रमांक आहेत. या अनुवादात तसेच जदुनाथ सरकार यांच्या इंग्रजी अनुवादात ही, फासी पाठातील पृष्ठ क्रमांक चौकोनी कंसात ददले आहेत, उदा. [४०]. एखादा संदभम बघायचा असल्यास हा एकच क्रमांक वापरून या अनुवादात, इंग्रजी अनुवादात तसेच फासी पाठात ही बघणे वाचकास सोपे जाईल यासाठी ही पद्धत वापरली आहे.

बादशाहािा प्रवाि ददनांक

पडावािे दठकाण ककिंवा िालीिी िुरवात

िा.पृ.

२५ जाने १६५८

औरंगजेब औरंगाबादहून बऱ्हाणपूराकडे तनघाला



१८ फेब्रु १६५८

बऱ्हाणपूरला पोहोचला



२० माचम १६५८

आग्र्याकडे तनघाला



१४ एतप्रल १६५८

दीपलपूरहून पुढे तनघाला



उज्जैनपासून ७ कोसांवर िरमतपूरला तळ



२३ मे १६५८

चंबळ ओलांडली



२८ मे १६५८

दाराच्या सैन्यापासून दीड कोसावर थांबला



३० मे १६५८

सामूगढकडे तनघाला



१ जून १६५८

आग्र्याच्या नूरमंजजल बागेत पोहोचला



११ जून १६५८

आग्रा शहरात, दाराच्या राजवाड्यात रातहला



१३ जून १६५८

ददल्लीकडे तनघाला



१५ जून १६५८

घाटसामी येथे कळले क़ी दारा ददल्ली सोडू न पळाला



२१ जुलै १६५८

आघराबादच्या शालीमार बागेत पतहले मंचकारोहण



२२ जुलै १६५८

पंजाबकडे जाण्याची तयारी करायचा आदे श

१०

सप्टे १६५८

मुलतानला पोहोचला

११

३० सप्टे १६५८

मुलतानहून ददल्लीकडे तनघाला

११

२० नोव्हें १६५८

ददल्लीच्या तकल्ल्यात पोहोचला

११

२ धडसें १६५८

ददल्लीहून तनघाला

१२

१९ धडसें १६५८

सोरोनला लशकारीसाठी पोहोचला

१२

२१ धडसें १६५८

सोरोनहून तनघाला

१२

२ जाने १६५९

शूजाच्या छावणीपासून चार कोसावर कोराम बाहेर छावणी

१२

५ जाने १६५९

खाजवा येथे शूजाला हरवून त्याच्या छावणीत पडाव

१५

१२ जाने १६५९

खाजवाहून तनघाला

१५

पररलशष्टे १४ जाने १६५९

बादशाहाचा प्रवास

४१३

गंगातीरी पोहोचला

१५

आलाहाबादहून परतला

१७

१६ जाने १६५९

घाटमपूरहून मीर बक्षीला जसवंतससिंहावर पाठवले

१७

४ फेब्रु १६५९

नूरमंजजल बागेतून अजमेरकडे तनघाला

१८

८ फेब्रु १६५९

रूपबास येथील लशकारगृहातून तनघाला

१८

२० फेब्रु १६५९

तळ कहिंदौन येथे

१८

तुडा (तोडा भीम) गावी पडाव

१८

रामेश्वर तलावापासून सहा कोसावर छावणी

१८

अजमेर पासून तीन कोसांवर दे वराई येथे पडाव

१९

१८ माचम १६५९

अजमेरहून परतीच्या मागामवर

२१

७ एतप्रल १६५९

फतेहपूरला पोहोचला

२१

१९ एतप्रल १६५९

ददल्लीकडे तनघाला

२१

२ मे १६५९

खखज्राबादच्या महालात पोहोचला

२२

१२ मे १६५९

ददल्लीच्या तकल्ल्यात प्रवेश केला

२२

१३ नोव्हें १६५९

गंगेकाठी जाण्यासाठी बाहेर पडला

२८

२४ नोव्हें १६५९

गढमुक्तेश्वरला पोहोचला

२८

७ जाने १६६०

गढमुक्तेश्वरहून आलाहाबादकडे चाल केली

२९

१३ फेब्रु १६६०

शम्साबाद मागे ददल्लीच्या तकल्ल्यात

२९

८ धडसें १६६२

लाहोरकडे तनघाला

४२

कनामलहून लशकारीसाठी मुखललसपूरकडे

४२

८ फेब्रु १६६३

लाहोरला पोहोचला

४२

२३ एतप्रल १६६३

काश्मीरला जाताना ददलकशा बागेत थांबला

४५

१ मे १६६३

काश्मीरच्या प्रवासासाठी बाहेर पडला

४५

१२ मे १६६३

काश्मीरच्या वाटे वर भीमबारला पोहोचला

४५

१४ मे १६६३

भीमबारहून बाहेर पडला

४६

२८ मे १६६३

श्रीनगरला पोहोचला

४६

१६ ऑग १६६३

लाहोरला जायला तनघाला

४७

९ नोव्हें १६६३

ददल्लीकडे तनघाला

४७

२० नोव्हें १६६३

ददल्ली जवळ पोहोचला

४७

४ फेब्रु १६६६

शाहजहानच्या थडग्याला भेट, होडीने आग्र्याकडे

५४

२३ फेब्रु १६६६

आग्रा येथे दाराच्या वाड्यात उतरला

५४

९ ऑक्ट १६६६

यमुनेमागे आग्र्याहून ददल्लीला तनघाला

५७

९ माचम १६५९

पररलशष्टे

बादशाहाचा प्रवास

४१४

२३ ऑक्ट १६६६

ददल्लीला पोहोचला

५७

१२ धडसें १६६६

खास लशकारीवर बाहेर पडला

५८

२८ नोव्हें १६६९

बंडखोरांचा पराभव करण्यासाठी आग्रा प्रवास, यमुनेच्या

९१

तीरावर पडाव १ जाने १६७०

आग्रा तकल्ल्यातील राजवाड्यात राहायला लागला

९३

२ नोव्हें १६७१

बादशाहा आग्र्याहून तनघाला

११२

२३ नोव्हें १६७१

खखज्राबादला पोहोचला

११२

२६ नोव्हें १६७१

ददल्लीच्या राजवाड्यात पोहोचला

११३

७ एतप्रल १६७४

हसन अब्दालकडे जायला तनघाला

१३२

२३ धडसें १६७५

हसन अब्दाल हून ददल्लीकडे, कालाबाघला पडाव

१४८

२१ जाने १६७६

लाहोरच्या बागेत पोहोचला

१४८

२४ फेब्रु १६७६

लाहोर सोडले

१५४

२७ माचम १६७६

ददल्लीला पोहोचला

१५४

९ जाने १६७९

ददल्लीहून अजमेरकडे कूच केले

१७२

१९ फेब्रु १६७९

अजमेरला पोहोचला

१७२

१० माचम १६७९

छावणी अजमेरहून परत ददल्लीकडे तनघाली

१७४

२ एतप्रल १६७९

ददल्लीला पोहोचला

१७४

३ सप्टे १६७९

रजपूतांचा तबमोड करण्यासाठी अजमेरकडे प्रयाण

१८०

२५ सप्टे १६७९

अजमेरच्या आनासागर शेजारी जहांगीरी महालात

१८१

३० नोव्हें १६७९

अजमेरहून उदयपूरकडे तनघाला

१८२

३ जाने १६८०

मंडलहून कूच केले

१८५

४ जाने १६८०

दे बारीच्या खखिंडीत छावणी टाकली

१८६

६ माचम १६८०

उदयपूरहून अजमेरकडे तनघाला

१९०

२२ माचम १६८०

अजमेरला पोहोचला

१९१

१३ जाने १६८१

अजमेरहून तनघाला व दे वराईच्या छावणीत थांबला

२००

१७ जाने १६८१

अजमेरच्या राजवाड्यात प्रवेश केला.

२०३

८ सप्टे १६८१

अजमेरहून बऱ्हाणपूरकडे दे वराईला थांबला.

२१२

१३ नोव्हें १६८१

बऱ्हाणपूरला पोहोचला.

२१४

२८ फेब्रु १६८२

बऱ्हाणपूरहून औरंगाबादकडे तनघाला

२१७

१९ माचम १६८२

मुहम्मद आजम औरंगाबादहून कान्होरीला आला व

२१७

बादशाहाची भेट घेतली. २२ माचम १६८२

औरंगाबादच्या राजवाड्यात पोहोचला

२१७

१२ ऑक्ट १६८३

ओरंगाबादहून कणमपुऱ्याला पोहोचला

२३९

पररलशष्टे

बादशाहाचा प्रवास

४१५

१३ नोव्हें १६८३

अहमदनगरच्या मातीच्या तकल्ल्यापाशी पोहोचला

२३९

२६ एतप्रल १६८५

अहमदनगरहून पुढे फराहबक्ष बागेजवळ पडाव

२५८

२४ मे १६८५

सोलापूरला पोहोचला

२५९

१४ जून १६८६

छावणी सोलापूरहून तवजापूरच्या ददशेने हलली

२७६

३ जुलै १६८६

छावणी तवजापूर पासून तीन कोसावर रसूलपूराला

२७७

१९ सप्टे १६८६

रसूलपूरहून हलवून तकल्ल्यापासून अिाम कोस अंतरावर

२८१

आलापूर दरवाज्यासमोर असलेल्या तलावा शेजारी छावणी पडली ३० ऑक्ट १६८६

तवजापूर सोडले व सोलापूरच्या ददशेने तनघाला

२८३

२ नोव्हें १६८६

बादशाहा सोलापूरला पोहोचला

२८४

५ धडसें १६८६

सोलापूरहून गुलबगाम अहसानाबादकडे तनघाला

२८७

१२ धडसें १६८६

गुलबग्यामहून छावणी जाफराबाद बीदरला

२८७

हैदराबाद पासून दोन टप्प्यांवर थांबला

२८८

२५ जाने १६८८

हैदराबादहून तवजापूरकडे तनघाला.

३०८

७ फेब्रु १६८८

जाफराबाद बीदरला कमथानाह तलावा शेजारी

३०९

२५ फेब्रु १६८८

गुलबगाम शहराबाहेर पोहोचला

३१०

४ माचम १६८८

सात ददवसांच्या पडावानंतर तवजापूरकडे कूच

३१०

१५ माचम १६८८

तवजापूरला पोहोचला

३१०

१४ धडसें १६८८

तवजापूरातून बाहेर पडला

३१९

अकलूजला पोहोचला

३१९

१५ फेब्रु १६८९

आसदनगरहून (अकलूज) बहादुरगडास गेले

३२२

३ माचम १६८९

कोरेगावला आला

३२५

२ एतप्रल १६८९

कोरेगावहून इस्लामाबाद चाकणकडे तनघाला

३२६

१८ धडसें १६८९

कोरेगावहून तवजापूरकडे जायला तनघाले.

३३३

३ जाने १६९०

तवजापूरला काही ददवस छावणी

३३३

९ फेब्रु १६९०

तवजापूरहून बद्री गावी, इथे दोन मतहने रातहला

३३३

१८ मे १६९०

छावणी बद्रीहून गलगल्याला गेली.

३३५

२३ फेब्रु १६९१

गलगल्याहून तवजापूरच्या रसूलपूर दरवाज्यासमोर

३३८

३ मे १६९२

तवजापूरहून तनघून दुसऱ्यांदा कुत्बाबादाला थांबला

३४५

१ एतप्रल १६९५

कुत्बाबादहून कूच केले

३७०

३ एतप्रल १६९५

तवजापूरला नवरसपूर, अफजलपूर जवळ छावणी

३७०

११ मे १६९५

तवजापूरहून (नवरसपूर व अफजलपूर) तनघाला

३७३

२१ मे १६९५

ब्रह्मपुरीला पोहोचला (ब्रह्मपुरीची इस्लामपुरी)

३७३

पररलशष्टे

बादशाहाचा प्रवास

४१६

२५ माचम १६९६

इस्लामपुरीहून सोलापूरकडे तनघाला

३८१

२४ एतप्रल १६९६

रमजान संपल्यावर ब्रह्मपुरीला परतला असावा

३८१

१४ माचम १६९७

इस्लामपुरीहून सोलापूरकडे तनघाला

३८५

१३ एतप्रल १६९७

सोलापूरहून ब्रह्मपुरीला परतला

३८५

३ माचम १६९८

इस्लामपुरीहून सोलापूरकडे तनघाला

३९३

२ एतप्रल १६९८

सोलापूरहून ब्रह्मपुरीला परतला असावा

३९३

२१ फेब्रु १६९९

इस्लामपुरीहून सोलापूरकडे तनघाला

४०२

२३ माचम १६९९

सोलापूरहून ब्रह्मपुरीला परतला असावा

४०२

१९ ऑक्ट १६९९

इस्लामपुरी ब्रह्मपुरीहून तनघाला

४०८

८ नोव्हें १६९९

धमरज परगण्याच्या पररसरात पोहोचला

४०९

धमरज पररसरातून मासूरला गेला

४०९

वसंतगडापासून एका कोसावर कृष्णेच्या काठी

४१०

८ धडसें १६९९

सातारा तकल्ल्याच्या पायथयाशी

४१३

३० एतप्रल १७००

परळीच्या पायथयाशी पोहोचला

४२५

२१ जून १७००

परळीहून भूषणगडाकडे प्रवास सुरू झाला

४२९

२५ जुलै १७००

छावणी भूषणगडाजवळ पोहोचली

४२९

३० ऑग १७००

छावणी खवासपूरकडे जायला तनघाली

४३०

१६ धडसें १७००

मुतमजाबाद धमरजकडे तनघाला

४३४

१ जाने १७०१

मुतमजाबाद धमरजला पोहोचला

४३४

२ माचम १७०१

धमरजेहून पन्हाळ्याकडे तनघाला

४३४

९ माचम १७०१

पन्हाळ्याजवळ नदीच्या काठी छावणी

४३४

२९ मे १७०१

पन्हाळ्याहून खटावच्या ददशेने कूच

४४३

२३ जून १७०१

खटाव पासून दोन कोसांवर विमनगडाच्या जवळ

४४३

७ नोव्हें १७०१

साददकगडाजवळू न तनघाले

४४६

१९ नोव्हें १७०१

मल्कापूर जवळ पोहोचले - इथे सात ददवस थांबले

४४६

६ धडसें १७०१

खेळण्याच्या अललकडे साडे तीन कोसावर

४४८

१६ जाने १७०२

खेळण्यापासून अध्याम कोसावर छावणी पुढे घेतली

४५२

१० जून १७०२

खेळण्याहून बहादुरगडाच्या ददशेने कूच

४६३

वाटे तील खखिंडीच्या पायथयाशी पतहला पडाव

४६३

४ जुलै १७०२

वाटे त एका ओढ्यापासून एका कोसावर पडाव

४६६

२६ जुलै १७०२

नबीशाहदुगामच्या (पन्हाळा) पायथयाशी

४६७

२९ जुलै १७०२

पन्हाळ्याच्या पूवेस २० तकमीवर वडगावला

४६७

पररलशष्टे

बादशाहाचा प्रवास

४१७

६ सप्टे १७०२

वडगावहून बहादुरकडाच्या ददशेने कूच

४६७

२२ सप्टे १७०२

कृष्णेच्या काठावर पोहोचले

४६७

२ ऑक्ट १७०२

कृष्णेच्या पैलतीरी छावणी

४६८

२२ ऑक्ट १७०२

कृष्णेच्या पैलतीरावरून आसदनगरकडे कूच

४६८

आसदनगरला काही ददवस छावणी

४६८

बहादुरगडला पोहोचला

४६८

३ धडसें १७०२

कोंढाण्याकडे कूच

४६९

२७ धडसें १७०२

कोंढाण्याच्या पायथयापाशी पोहोचले

४६९

२४ एतप्रल १७०३

कोंढाण्याहून पुण्याकडे तनघाले

४७५

१ मे १७०३

पुण्याला पोहोचले

४७५

१० नोव्हें १७०३

पुण्याहून राजगडाकडे तनघाले

४७७

२८ नोव्हें १७०३

राजगडाच्या पायथयापाशी पोहोचले

४७८

२३ फेब्रु १७०४

तोरण्याच्या पायथयापाशी छावणी पडली

४८६

तोरणा घेतल्यानंतर जुन्नरच्या ददशेने कूच

४८८

१७ एतप्रल १७०४

खेडला (राजगुरूनगर) छावणी पडली

४८९

३१ जुलै १७०४

खेडहून वागीनगेराकडे कूच

४९०

२२ ऑक्ट १७०४

मिल्या छावणीपासून वागीनगेराकडे तनघाले

४९२

८ फेब्रु १७०५

वागीनगेरा तकल्ल्यापासून एक कोसावर छावणी

४९८

बहुदा मे १७०५

वागीनगेरा जजिंकल्यावर दे वापूरला छावणी

५०७

२३ ऑक्ट १७०५

दे वापूरहून बहादुरगडाकडे तनघाला

५१०

६ धडसें १७०५

बहादुरगडला पोहोचला

५११

२३ जाने १७०६

अहमदनगरकडे कूच

५११

२० जाने १७०६

अहमदनगरला पोहोचला

५११

२० फेब्रु १७०७

अहमदनगरला औरंगजेबाचा मृत्यू

५२१

२४ फेब्रु १७०७

बादशाहाचे पार्थिंव अहमदनगरहून खुल्दाबादला नेले

५२२

पररलशष्टे

स्थानांची बदलले ली नावे

४१८

स्थानांिी बदलले ली नावे औरंगजेबाने एखादा तकल्ला ककिंवा शहर जजिंकल्यानंतर त्याचे नाव बदलल्याचे अनेक उल्ले ख या ग्रंथात सापडतात. अशा जागांची नावे खालील सूचीत ददली आहेत. एखाद्या जागेच्या जुन्या नावाबरोबर नवीन नावाचा उल्ले ख या ग्रंथात आला असेल पण ते बदलल्याचा नेमका उल्ले ख (किी व कोणी बदलले ) या ग्रंथात आला नसेल तर, अशा नावांपुढे * धचन्ह ददले आहे. या नावांपैक़ी काही नावे औरंगजेबाने ककिंवा त्याच्या आिी ही बदलली गेली असू शकतील. ददनांक

जुने नाव

नवीन नाव

िा.पृ.

१३ फेब्रु १६६३

जूनागढ

इस्लामनगर

४३

जाने १६७०

मथुरा

इस्लामाबाद

९६

सुतफद खाक

मुघलाबाद

१४५

बाजारक

फाततहाबाद

१४५

नालशक*

गुलशनाबाद

२२०

तवजापूर

दार-उल-जफर

२८२

गुलबगाम*

अहसानाबाद

२८७

हैदराबाद

दार-उल-जजहाद

३०२

सागर

नुस्रताबाद

३०७

बेळगाव

आजमनगर

३१५

अडोणी

इग्म्तयाजगड

३१६

अकलूज

आसदनगर

३२२

चाकण*

इस्लामाबाद

३२६

रायचूर

तफरोजनगर

३३३

धमरज*

मुतमजाबाद

३३७

गलगला

कुत्बाबाद

३३८

दे वगड, गोंडवन

इस्लामगड

३४०

बीदर (जाफराबाद ?)*

मुहम्मदाबाद

३६०

ब्रह्मपुरी

इस्लामपुरी

३७२

रायगड / रायरी*

इस्लामगड

३८७

जजिंजी

नुस्रतगड

३९२

कनूमल*

कमरानगड

४०४

२५ नोव्हे १६९९

वसंतगड

तकलीद-इ-फतह

४११

२१ एतप्रल १७००

सातारा / अजजिंक्यतारा

आजमतारा

४२१

६ ऑग १६८८

२९ नोव्हे १६८९ २३ फेब्रु १६९१

२१ मे १६९५

पररलशष्टे

स्थानांची बदलले ली नावे

४१९

९ जून १७००

परळी / सज्जनगड

नवरसतारा

४२८

२८ मे १७०१

पन्हाळगड

नबीशाहदुगम

४३८

६ जून १७०१

विमनगड

साददकगड

४४३

३ जुलै १७०१

नांदतगरी

नामगीर

४४४

चंदन

धमफ्ताह

४४४

६ ऑक्ट १७०१

वंदन

मफ्तूह

४४४

७ जून १७०२

खेळणा

सख्खरलना

४५८

अवि*

मुअज्जमाबाद

४७०

ससिंहगड

बब्ख्शंदाबख्श

४७४

पुणे*

मुतहयाबाद

४७५

१६ फेब्रु १७०४

राजगड

नबीशाहगड

४८६

१० माचम १७०४

तोरणा

फतह-उल-घैब

४८८

१७ एतप्रल १७०४

खेड / राजगुरूनगर

मसाऊदाबाद

४९०

कोरेगाव (भीमा)*

फतेहाबाद

४९१

वागीनगेरा

रहमानबक्ष खेरा

५०६

८ एतप्रल १७०३

२७ एतप्रल १७०५

पररलशष्टे

मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख

४२०

मराठे ककिंवा दख्खनशी िंबंचित उल्ले ख या ग्रंथात मराठ्ांचे ककिंवा दख्खन मिील दठकाणांचे व घटनांचे उल्ले ख अनेक दठकाणी येतात. मराठ्ांच्या इततहासावर काम करताना असे नेमके उल्ले ख चटकन धमळणे आवश्यक असते म्हणून या सूचीत अगदी थोडक्यात हे उल्ले ख ददले आहेत. काही दठकाणी घटनेचे तववरण एकापेक्षा अधिक पानांवर असते, त्यामुळे अशा उल्ले खांच्या बाबतीत इथे घटनेच्या सुरवातीचा पृष्ठ क्रमांक ददला आहे. ददनांक

घटना ककिंवा उल्लेख

िा.पृ.

चाकणचा तकल्ला आमीर-उल-उमरा याने जजिंकला

३३

अफजलखानाचा वि

३३

शातहस्ता खानावर हल्ला

४५

जसवंतससिंहाचे अपयश व जयससिंहाची नेमणूक

४८

जसवंतससिंह दख्खनहून दरबारास परतला

५०

जयससिंह व ददलेरखान यांच्या मोतहमेत यश प्राप्ती

५०

१२ जून १६६५

लशवाजी-जयससिंह भेट

५१

१२ मे १६६६

लशवाजी-औरंगजेब भेट

५५

१९ ऑग १६६६

लशवाजी आग्र्याच्या कैदे तून तनसटतो

५६

जयससिंहाने नेताजीला दरबारास पाठवले

५८

फळटण, ताथवडा, मंगळवेढा मुघलांकडे

५९

नेताजीला मुसलमान केले , मुहम्मद कुली खान

६०

मुहम्मद मुअज्जमला दख्खनचा सुभेदार नेमले

६०

लशवाजीने पुरंदर घेतला

९९

१३ मे १६६५

२३ माचम १६६७ २ ऑक्ट १६७०

सुरतेवर आक्रमण, नगर जाळू न लुटले

१०६

२२ ऑक्ट १६७३

खानजहान बहादुर ने लशवाजीचा पराभव केला

१२९

७ जुलै १६७४

खानजहान बहादर याला जफर जंग कोकलताश उपािी

१४२

संभाजीला सहा हजारी (तततकेच स्वार) ददली

१४२

माचम-एतप्रल १६७७

सोलापूरचा तकल्लेदार मनोहरदास याला राजा उपािी ददली

१५७

१४ मे १६७७

बादशाही सैन्याने नळदुगम जजिंकला

१६०

आसद खानाला दख्खनला पाठवले

१६१

ददलेर खानाचे गोळकोंड्याच्या सैन्याशी युद्ध

१६५

८ मे १६७८

लशवाजीचे मुंगीपट्टणवर आक्रमण

१६६

१८ सप्टें १६७८

शाह आलम बहादुर याला दख्खनची सुभेदारी

१६९

पररलशष्टे

मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख

४२१

२१ सप्टें १६७८

आसद खान बऱ्हाणपुराहून औरंगाबादे कडे

१७०

४ ऑक्ट १६७९

मंगळवेढ्याचा तकल्ला जजिंकून घेतला

१८२

९ जून १६८०

औरंगाबादला खान जहान व शाह आलमची भेट

१९३

१४ मे १६८०

लशवाजीचा मृत्यू

१९४

१५ मे १६८१

मुहम्मद अकबर बऱ्हाणपूरमागे संभाजी कडे

२०६

खान जहान बहादुर याने लशवापूर लुटले

२१६

६ एतप्रल १६८२

संभाजीचा सेवक धचमणाजी बादशाहाकडे आला

२१८

२० मे १६८२

शरीफ खानाचे शत्रूशी तुंबळ युद्ध झाले

२१८

२३ मे १६८२

रुहुल्लाह खानाला नगर जवळ पाठवले गेले

२१९

हयात खानाला रामसेजला सजावल नेमले

२१९

यशवंतराव दख्खनीला चार हजारी ददली

२१९

कान्होजी दख्खनी याला पाच हजारी ददली

२२०

याकुत खान व खैरीयत खान यांना अंगरखे

२२१

जगदे व राय याला अंगरखा ददला

२२१

मुहम्मद मुईझुद्दीन याला अहमदनगरला पाठवले

२२२

औरंगाबाद शहराभोवती कोट

२२४

२० जाने १६८३

खान जहान बहादुरला अकबरच्या मागावर

२२४

६ फेब्रु १६८३

अकबर संभाजीच्या राज्यातून बाहेर पडला

२२४

रुहुल्लाह खान कोकण मोतहमेहून परतला

२२७

काझी हैदर बादशाहाकडे सेवेच्या इच्छे ने आला

२३४

शाह आलम शत्रूला संपवण्यासाठी मोतहमेवर

२३७

सरबुलंद खानाला बहादुरगडाकडे पाठवले

२४०

१८ धडसें १६८३

रुहुल्लाह खानाला मध्यरात्री युद्धास पाठवले

२४०

२७ जाने १६८४

खान जहान बहादुर याचे कृष्णाकाठी युद्ध

२४१

३१ माचम १६८४

खान बहादुर याला पुणे व गढनमुनाकडे पाठवले

२४२

संभाजीचे ११२ सेवक पकडू न डोक़ी मारली

२४३

शाह आलम बहादुर कोकणातून परतला

२४४

संभाजीचा कुटुं ब कतबला पकडला गेला

२४५

गाझीउद्दीन खानाला रायरी घ्यायला पाठवले

२४८

फिुद्दीनला सुप्याचा ठाणेदार म्हणून पाठवले

२४९

पदमजी, एकोजी, मल्हार, राव सुभानचंद यांना अंगरखे ददले

२४९

कोंढाणा जजिंकणारा अब्दुर काददर परतला

२५०

२८ ऑग १६८२ २८ सप्टें १६८२

१५ सप्टें १६८३

१८ मे १६८४ २१ सप्टें १६८४

१४ धडसें १६८४

पररलशष्टे

मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख

४२२

इततकाद खानाला पारनेर व संगमनेर कडे पाठवले

२५२

रायरीच्या पायथयाशी असलेल्या पट्ट् याला आग

२५२

अजुमनजी याला दोन हजारी (१००० स्वार) ददली

२५८

इततकाद खानाला जाफराबादकडे पाठवले

२५९

कुतुबशाहचा कट उघडक़ीस

२६०

हुसैन अली खान याला बेरारची सुभेदारी

२६२

सुभानजी व इतर दख्खनी सरदारांना अंगरखे ददले

२७०

लशवाजीचा जावई अचलोजी याला पाच हजारी

२७१

इमाजी व तुकोजी यांचा सन्मान

२७३

जुन्नरचा तकल्लेदार अब्दुल अजीज खान वारला

२७४

अबुल हसन व संभाजी यांचे संगनमत

२७६

इततकाद खानाला मंगळवेढ्याला पाठवले

२८३

साल्हेरचा तकल्लेदार आसुजी दख्खनी याची भेट

२९७

सांगोल्याचा तकल्लेदार माणकोजी भेटायला आला

२९७

संभाजी – लसकंदर – अबुल हसन यांची युती

३०८

मुहम्मद आजम याला संभाजी तवरुद्ध पाठवले

३०८

तफरोज जंग खान याला संभाजी तवरुद्ध पाठवले

३१७

संभाजी मुघल सैन्याच्या कैदे त

३२०

इस्लामी कायद्यानुसार संभाजीचा लशरच्छे द

३२५

राजाराम रायरीच्या वेढ्यातून तनसटला

३२७

राजारामाच्या मागावर तबदनूरच्या राणीवर स्वारी

३२७

अबुल खैर खान याला राजगडचा तकल्लेदार नेमले

३३०

रायरीला संभाजी व राजारामाचे कुटुं ब अटकेत

३३१

अब्दुर रहीम खान रायरीची मालमत्ता जप्त करतो

३३१

शाहूला सात हजारी, राजा ही उपािी

३३२

रुस्तुम खान शारजा मराठ्ांच्या अटकेत

३३६

२७ मे १६९१

काम बक्ष याला जजिंजीच्या प्रदे शात पाठवले

३३९

१६ धडसें १६९१

आसद खान व काम बक्ष जजिंजीला पोहोचले

३४४

८ मे १६९२

मुहम्मद मुईझुद्दीनला अकलूजला पाठवले

३४६

अब्दुर रज्जाक खान कोकण व रायरीचा फौजदार

३४७

काकर खान याला जजिंजीचा ठाणेदार नेमले

३५०

जुब्ल्फकार खान जजिंजीचे मोचे सोडू न मागे आला

३५२

२२ जाने १६८५

२४ धडसें १६८५

१४ धडसें १६८८ ११ माचम १६८९

१९ ऑक्ट १६८९

पररलशष्टे

मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख

४२३

पादशाहजादा-राजाराम गुप्त पत्र व्यवहार

३५६

जजिंजीला शत्रूचे मुघल सैन्यावर आक्रमण

३५७

कालसम खान व खानाहजाद खानावर आपत्ती

३७४

शाह आलीजाह याला बहादुरगडाकडे पाठवले

३८०

खटावचा ठाणेदार रामचंद्र याच्या मनसबीत वाढ

३८२

तर्बिंयत खानाने आणलेल्या िुंडीरावला मनसब

३८२

संताजीला तवरुद्ध गेलेला हमीदुद्दीन खान परतला

३८३

मतलब खान व वाजजहुद्दीन खान इंदापूरकडे गेले

३८६

बीदर बख्तला बहादुरगड येथे पाठवले

३८६

इस्माईल खान माखाला रायरीचा फौजदार नेमले

३८७

जुब्ल्फकार खान जजिंजी जजिंकतो

३९०

बीदर बख्त याला पन्हाळगडाकडे पाठवले

३९३

सत्वा डाफळे याला सहा हजारी ददली

३९५

फतहुल्लाह खानाला परांड्याला पाठवले

३९७

गाझीउद्दीन खानाने संताजीचे डोके पाठवले

४००

रुस्तमबेग खानला मंगळवेढ्याचा तकल्लेदार नेमले

४०३

बादशाही सैन्याने रायरी जजिंकला

४०५

सत्वा डाफळे सैन्यातून पळू न गेला

४०६

राजाराम व लशवाजीचा कतबला शाहू जवळ

४०७

बीदर बख्त याला राजारामाच्या मागावर पाठवले

४०९

पन्हाळा ते सातारा पट्टा उध्वस्त करायचा आदे श

४०९

२५ नोव्हे १६९९

बादशाही सैन्याने वसंतगड जजिंकला

४१०

१७ नोव्हे १६९९

बीदर बख्तचे राजारामाशी तुंबळ युद्ध झाले

४११

सैफुद्दीन खानाला सोलापूरचा तकल्लेदार नेमले

४१२

साताऱ्याची मोतहम

४१३

५ माचम १७००

राजारामाचा मृत्यू

४१९

२० माचम १७००

राजारामाचा पाच वषामचा मुलगा ही वारला

४१९

२१ एतप्रल १७००

सातारा तकल्ला मुघलांनी जजिंकला

४२१

६ जाने १७००

इखलास खानाचे शत्रूशी तुंबळ युद्ध झाले

४२२

खटावचा ठाणेदार रामचंद्र याला दोन हजारी

४२३

छत्रसाल राठोडला आजमताराचा तकल्लेदार नेमले

४२४

परळी तकल्ल्याचा तवजय

४२५

९ जून १७००

पररलशष्टे

मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख

४२४

२१ जून १७००

भूषणगडाकडे कूच

४२९

२५ जुलै १७००

छावणी भूषणगड जवळ पोहोचली

४२९

झुब्ल्फकार खान िनाजीला परास्त करतो

४३२

शाहूला लशजवले ले अन्न खाण्यास सांतगतले

४३३

२ माचम १७०१

पन्हाळा व पावनगडाच्या मोतहमेसाठी कूच

४३४

२८ मे १७०१

पन्हाळा व पावनगड हे दोन्ही तकल्ले जजिंकले

४३८

इस्माईल खानाला पन्हाळगडाचा फौजदार नेमले

४४०

विमनगडावरील लशबंदी गड ररकामा सोडू न गेली

४४३

खान बहादुरला नांदतगरी घ्यायला पाठवले

४४३

६ ऑक्ट १७०१

चंदन वंदन मुघल सैन्याने जजिंकले

४४४

७ नोव्हे १७०१

खेळण्याची मोतहम

४४७

४ जून १७०२

मुघलांनी खेळणा जजिंकला

४५७

रायरीचा तकल्लेदार लशवससिंह याला ५०० ची वाढ

४७०

मुहतशाम खानाला नळदुगमचा तकल्लेदार नेमले

४७०

बीदर बख्त याला खांदेशची सुभेदारी ददली

४७०

नुस्रत जंग याला बऱ्हाणपूरकडे पाठवले

४७०

दरबारात शाहूचा सन्मान केला गेला

४७२

खेळण्याचा तकल्लेदार उद्वतससिंह याला वाढ ददली

४७३

आघर खानाच्या मुलाचे लग्न राजारामच्या मुलीशी

४८०

तनमाजी सशिंदे याच्या अटकेत असले ला रुस्तम खान शारजा

४८०

६ जून १७०१

तबजापुरी परतला

२१ नोव्हे १७०४

राजा नेकनामचा तववाह राजारामच्या मुलीशी

४८०

लशवाजीच्या चुलत भावाला ५०० जातची वाढ

४८०

मुहम्मद मुतहयुद्दीनचा संभाजीच्या मुलीशी तववाह

४८२

शाहूचा बहादुरजीच्या मुलीशी तववाह

४८२

तफरोज जंग खान तनमाजी सशिंदे व छत्रसाल बुंदेला यांच्या

४८३

मागावर बेरारहून कहिंदुस्थानाकडे तनघाले

८ माचम १७०५

कान्होजी लशके याला हजार जात वाढ ददली

४९५

फतहुल्लाह खान याला लोहगडाची ठाणेदारी

४९६

तरतबयत खान राजगड व पुण्याचा तकल्लेदार

४९७

िनाजी व कहिंदुराव बादशाही सैन्याजवळ आले

५००

कोंढाणा मराठ्ांनी जजिंकून घेतला

५०८

कोंढाणा घ्यायला गेलेले अधिकारी परतले

५११

पररलशष्टे २३ जाने १७०६

मराठे ककिंवा दख्खनशी संबंधित उल्ले ख शाहूला नुस्रत जंगबरोबर कोंढाणा घेण्यासाठी जायचा

४२५ ५११

आदे श ददला गेला २१ माचम १७०६

मुघलांनी कोंढाणा परत घेतला

५१२

मराठ्ांचा उल्लेख चोर असा करावा हा आदे श

५१४

नुस्रत जंग औरंगाबाद जवळ ‘चोरांच्या’ मागावर

५१५

इस्लामपुरीला असलेला सत्वा डाफळे वारला

५१६

तरतबयत खानाला वागीनगेराकडे पाठवले

५१६

लशवससिंह याला राजगडाचा तकल्लेदार व फौजदार तसेच

५१६

चाकणचा तकल्लेदार नेमले युसुफ खान अडोणीचा तकल्लेदार व फौजदार

५१७

पररलशष्टे

िमामशी संबंधित काही ठळक घटना

४२६

िमावशी िंबंचित काही ठळक घटना या ग्रंथात अनेक दठकाणी िमामशी संबंधित काही ठळक घटनांचा उल्ले ख येतो. या घटनांचा उल्ले ख पटकन सापडण्यासाठी खालील सूचीत अशा नोंदी थोडक्यात ददल्या आहेत. इतर दठकाणी िमामशी संबंधित पण कमी महत्त्वाच्या घटना (उदा. पादशाहजाद्याने कुराणाचे पाठांतर केले ) ककिंवा काही तवषय चचेच्या स्वरूपात ही मांडले आहेत. अशा घटना ककिंवा नोंदी या सूचीत ददले ल्या नाहीत. घटना

िा.पृ.

नवरोजचा सण बंद केला व रमजान मध्ये शासक़ीय उत्सव सुरू केला

२५

इस्लाममध्ये तनतषद्ध मानलेल्या चालीरीती बंद करण्यासाठी िममशास्ताची तनयुक्त़ी

२५

तवश्रामागृहा शेजारी मशीद बांिली - साठ हजार रुपये खचम आला

२९

मुसलमान बनवून बादशाही जनानखान्यात वाढवले ल्या राजा रूपससिंहाच्या मुलीचा

३७

तववाह पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमशी केला हाजी अहमद सईदकडे मक्का व मदीनेसाठी ६,६०,००० रुपयांच्या भेटवस्तू ददल्या

४९

मक्केचा शरीफ सय्यद यातहया याला ६००० रुपये ददले

४९

मोठ्ा ततबेटचा जमीनदार दलाई महामुनी याने इस्लामचा स्वीकार केला

५२

नेताजीला मुसलमान बनवून सुंता केल्यावर मुहम्मद कुली खान ही उपािी ददली

६०

दरबारात संगीत तनतषद्ध झाले

७१

३ मे १६६८ - आसामच्या राजाची मुलगी रहमत बानू चा तववाह मुहम्मद आजमशी

७३

इस्लामच्या पालनासाठी हातीयापुलाजवळ असलेली हत्तींची लशल्पे फोडू न टाकली

७७

कातफरांची मंददरे व शाळा पाडू न टाकण्याचा सवम प्रांतप्रमुखांना आदे श

८१

वाढददवसाच्या ददवशी तुला करण्याची प्रथा आकराव्या वषी थांबवली

८१

गुजमबदामर सालीह बहादुर याला मलाणामचे मंददर पाडण्यासाठी पाठवण्यात आले.

८४

उद्धव बैरागी नावाच्या भटक्या कहिंद संताला कोठडीत ठे वले होते

८५

बादशाहाच्या आदे शानुसार काशी तवश्वनाथाचे मंददर पाडले

८८

३१ धडसेंबर १६६९ - शाहजहान व मुमताजच्या थडग्याला भेट व ततथल्या

९३

अधिकाऱ्यांना ४४००० रुपये ददले गोकला जाट व उदयससिंह यांना मारून त्याच्या कुटुं बाला मुसलमान बनवले

९४

‘केशवरायचा दे हरा’ हे मथुरेतील मंददर पाडण्याचा आदे श ददला

९५

कातफर बंडखोरांची कत्तल व त्यांना पकडण्यासाठी हसन अली खान कष्ट घेतो

१००

२३ फेब्रुवारी १६७३ - मुअज्जमने ख्वाजा कुतबुद्दीनच्या थडग्याला भेट ददली व

१२५

ततथे १००० रुपये दान केले

पररलशष्टे

िमामशी संबंधित काही ठळक घटना

२५ माचम १६७३ - मुहम्मद सुलताननेही कुतबुद्दीनच्या थडग्याला भेट दे ऊन ५००

४२७ १२५

रुपये दान केले मीर इब्रातहम मक्केला जाऊन आल्यावर त्याला त्याची मनसब परत ददली गेली

१३०

मक्केच्या शरीफचा दत सय्यद अली याला ५००० रुपये दे ऊन तनरोप ददला

१४०

दरवषी मक्का व मददनाला पाठवली जाणारी नजर स्वतः ततथे नेल्याबद्दल या वषी

१४३

आबीद खान याला मीर-ए-हज नेमण्यात आले पुढच्या वषामचे पंचांग न करण्याबद्दल शाही ज्योततषांकडू न ललखखत आश्वासन घेतले

१४६

२ जानेवारी १६७६ - शेख तनजाम याने तकश्तवारच्या राजाची मुलगी बाई फूपदे वी

१४८

तहचा तववाह मुहम्मद सुलतान याच्याशी लावून ददला २७ ऑक्टोबर १६७६ - गुरु तेग ससिंग याच्या लशष्याने बादशाहावर दोन तवटा

१५४

फेकल्या, त्याला अटक करून कोतवालाकडे सुपूतम केले क़ीरतससिंहाच्या मुलीचा तववाह शाहजादा मुहम्मद अजीम याच्याशी करण्यात आला

१६७

खंदेलच्या रजपुतांना िडा लशकवण्यासाठी तसेच ततथले भव्य मंददर पाडू न

१७१

टाकण्याकरता दाराब खानाला मोठ्ा सैन्यातनशी पाठवण्यात आले ८ माचम १६७९ - खंदेल, सानवेला तसेच जवळपासची इतर सवम मंददरे पाडू न

१७३

टाकण्यात आली २ एतप्रल १६७९ - कुराणाचा तनदे श तसेच शरीयाच्या परंपरेनुसार, राजिानी व सवम

१७४

प्रांतातील कातफरांवर (जझम्मी) जजझया कर लावला २५ मे १६७९ - जोिपूरची दे वळांतील काही गाड्या भरून आणले ल्या मूती

१७५

दरबारासमोरील जजलोखाना व जामा मलशदीच्या पायऱ्यांखाली पुराल्या म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय त्यावर पडत राहतील २६ मे १६७९ - बादशाहांनी मोठ्ा राजांच्या कपाळावर स्वतःच्या हाताने दटळा

१७६

लावण्याची परंपरा बंद केली गेली १५ जुलै १६७९ - राजा जसवंतससिंह याच्या तान्या मुलाला ददल्लीत पकडल्यावर

१७८

मुहम्मदी राज नाव ददले २५ सप्टें बर १६७९ - बादशाहाने अजमेरच्या शेख मुईनुद्दीनच्या थडग्याला भेट

१८१

दे ऊन ततथे ५००० रुपये ददले जानेवारी १६८० - उदयपूरच्या राणाच्या महालासमोरचे मंददर पाडण्यासाठी

१८६

रुहुल्लाह खान व एकत्तज खान गेले २४ जानेवारी १६८० - राणाने बांिलेला उदयसागर तलाव बघण्यासाठी बादशाहा

१८८

गेला व त्याच्या तीरावर बांिलेली तीनही मंददरे पाडण्याचा आदे श ददला २९ जानेवारी १६८० - हसन अली खानाने उदयपूरच्या जवळपासची १७२ मंददरे पाडू न टाकली, खानाला बहादुर आलमगीरशाही ही उपािी धमळाली

१८९

पररलशष्टे

िमामशी संबंधित काही ठळक घटना

२२ फेब्रुवारी १६८० - बादशाहा धचतोड बघायला गेला. त्याच्या आदे शानुसार

४२८ १८९

ततथली ६३ मंददरे पाडली गेली १० ऑगस्ट १६८० - अंबरची मंददरे पाडण्यासाठी पाठवलेला अबु तुराब दरबारास

१९४

आला व कळवले क़ी त्याने ६६ मंददरे पाडली होती १४ जून १६८१ - जोिपूरचा राणा याने त्याचे राज्य व मालमत्ता वाचवण्यासाठी

२०८

मंडलपूर व बिणूरचे परगणे जजझयाच्या बदल्यात तोडू न दे ण्याची तवनंती केली ३० जुलै १६८१ - मुहम्मद काम बक्ष याचा तववाह अमरचंदची मुलगी व

२११

मनोहरपूरचा जमीनदार जगतससिंह याची बतहण कल्याण कुमारी म्हणजे जमैतुस्त्न्नसा तहच्याशी लावण्यात आला २१ नोव्हेंबर १६८१ - बादशाहाने शेख अब्दुल लतीफ याच्या थडग्याला भेट दे ऊन

२१६

खऱ्या िमामच्या शत्रूंना चेचून टाकण्यासाठी त्याच्या आत्म्याकडे मदत मातगतली मुल्ला अब्दुल्लाह लसयालकोटी याचा लशष्य आणण वाकनतवस इखलासकेश याने

२२०

इस्लाम स्वीकारल्यानंतर त्याला खरेदी खात्याचा मुश्रीफ नेमले गेले २८ धडसेंबर १६८४ - काझी शेख-उल-इस्लाम बरोबर प्रेतषताला उद्दे शून पत्रांची पेटी

२५१

मक्केला जाताना ददली गेली दीनदार या नावाने नुकताच इस्लाम िमामत आलेला ब्रजभूषण कवामुद्दीन-खानी

२७०

याला इखलास खानाच्या जागी जानमाजखानाहचा मुश्रीफ नेमले गेले मक्केच्या शरीफचा दत अहमद आका येऊन भेटला व त्याला एक अंगरखा व

२७१

२००० रुपये दे ण्यात आले फाजजल खान आला-उल-मुल्क याच्या मुनशीच्या भावाच्या दोन मुलांना मध्यरात्री

२७३

बादशाहाकडे आणून त्यांना मुसलमान बनवून धमरवणूक काढली गुलबग्यामच्या तगसुदाराजच्या थडग्याला भेट दे ऊन वीस हजार रुपये दान केले

२८७

शरीफ खान याला सुभ्यांमध्ये स्वतः तफरून शरीयानुसार जजझया आकारला जात

२९७

आहे याची खात्री करण्याचा आदे श त्याला ददला गेला वागीनगेरा जजिंकल्यावर जगाच्या आरंभापासून आजवर ज्या दठकाणी कोणीही

३०६

नमाजाची बांग ददली नव्हती ततथे मुसलमानी ढोल इतक्या जोरात वाजला क़ी कातफरांचे कान बिीर झाले, ‘केवळ इस्लामच खरा, कातफर खोटे ’ ही आरोळी गगनात दुमदुमली व मुसलमानांची छाती गवामने फुलली तगसुदाराज याच्या दग्यामला भेट ददली व त्या पावन स्थानातील रतहवाश्यांच्या

३१०

डोक्यावरून दाररद्र्याचा पडदा बाजूला सारला मुसलमानांना अत्यानंद होऊन कातफरांचा आवेश गळू न पडेल म्हणून संभाजी व त्याच्या सहकाऱ्यांची चििंड काढली गेली

३२२

पररलशष्टे

िमामशी संबंधित काही ठळक घटना

संभाजीला पकडल्यानंतर बादशाहाने तगसुदराजचा मुलाला दरग्यासाठी १००००

४२९ ३२६

रुपये ददले आललजाह बरा झाल्यावर मक्का-मदीनेला एकूण १८०००० रुपये भेट ददले

३६४

आदे श ददला गेला क़ी रजपूत सोडू न इतर कुठल्याही कहिंदने हत्यार बाळगायचे

३७०

नाही, हत्ती, अरबी ककिंवा इराक़ी घोड्यांवर बसायचे नाही व पालखीत बसायचे नाही िमांतर करून मुसलमान केला गेलेला छत्रमालचा मुलगा हेदायतकेश भोलानाथ

३९६

याला त्याचा बाप नरकात गेल्यानंतर प्रमुख वाकनतवस नेमले गेले हमीदुद्दीन खान बहादुर तवजापूरला एक मंददर पाडू न ततथे मशीद बांिायला गेला,

३९६

आदे शाचे उत्तम ररत्या पालन केल्याबद्दल त्याची भरपूर प्रशंसा करून त्याला घुसलखान्याचा दरोगा नेमून बादशाहाच्या जवळचे पद ददले गेले बादशाहा मात्र अल्लाहच्या मागामवर चालणाऱ्या जजहादी योद्ध्ांची मदत

४१४

करणाऱ्यावर दृढ तवश्वास ठे वून अत्यंत खंबीरपणे व िैयामने उभा होता दार-उल-इस्लाम असलेले हे स्थान (परळी तकल्ला) राक्षसी लसवाच्या युक्त्यांमुळे

४२८

तवजापुरींच्या हातातून जाऊन त्याचे रुपांतर दार-उल-हरब मध्ये झाले होते आघर खानाच्या मुलाचे लग्न राजारामाच्या मुलीशी लावले गेले

४८०

तगसुदराजच्या थडग्याचा उत्तराधिकारी सय्यद हुसैनला रत्नजधडत खंजीर व

४८१

सोन्याच्या साजाचा खंजीर ददला लसकंदर खान तबजापुरी याचा मुलगा मुहम्मद मुतहयुद्दीन याचा तववाह संभाजीच्या

४८२

मुलीशी केला गेला कातफरांच्या दे शात (वागीनगेरा) शरीयाचा प्रसार व्हावा आणण सवांचे राहणीमान

५०७

सुिारावे असा हा दे श जजिंकून घेण्यामागे मुख्य हेतु होता ख्वाजा मसऊद महाल्ली याच्या दे खरेखीखाली ततथे एक बळकट तकल्ला व एक

५०७

सुंदर मशीद बांिली गेली काही वषांकरता दर वषी व इतर वेळी दर दोन तीन वषांनी मक्का व मदीनेला

५२६

प्रचंड मोठी रक्कम पाठवली जायची इतके मोठे साम्राज्य चालवत असताना त्याने इस्लामी शरीयाने अधिकृत मानलेले

५२८

हुदद व लसयासत यातील दं डनीती लशवाय इतर कशाचाही आिार घेतला नाही लेखणीच्या एका फटकाऱ्याने कहिंदु कारकूनांना सरकारी सेवेतून पदच्युत केले गेले,

५२८

मोठ्ा संख्येने या नीच व कातफर लोकांची दे वस्थाने व भव्य मंददरे उखडू न टाकली गेली व उजाड झाली, तसेच या मंददरांच्या जागी भव्य मशीदींचे तनमामणही झाले बादशाहाकडे आलेल्या अनेक कातफरांना त्याने स्वतः इस्लामचा कलमा सांतगतला

५२८

कहिंदंना इतक़ी हीन वागणूक या आिी कुठल्याही काळात किीही धमळाली नव्हती

५२८

पररलशष्टे

िमामशी संबंधित काही ठळक घटना

रमजानच्या पावन मतहन्यात तो गरजूंमध्ये ६०००० रुपये वाटायचा व इतर

४३० ५२८

मतहन्यात त्याच्यापेक्षा कमी रक्कम द्यायचा संपूणम साम्राज्यातील जुन्या मशीदींची दे खभाल त्याच्या सरकारच्या खचामतून केली

५२८

जायची व ततथे प्रत्येक़ी एक इमाम, मुआब्झ्झन व खातीब नेमले जायचे, म्हणजे या कामावर प्रचंड मोठ्ा प्रमाणात पैसा खचम होत होता त्याच्या साम्राज्यातील सगळी शहरे व प्रांतांमध्ये त्याने इस्लामी तवद्वानांना व

५२८

लशक्षकांना रोजचे भत्ते व भूमी दान (इम्लाक) केली होती तसेच त्यांच्या लशष्यांकररता त्यांची संख्या व ब्स्थती प्रमाणे त्यांना जेवणाचे पैसे ददले जायचे फतावा-इ-आलमगीरी या ग्रंथासाठी जवळपास दोन लक्ष रुपये खचम केले गेले.

५२८

गोळा केला जाणारा कर (हालसलात) हा केवळ कुराणातील आदे शानुसारच गोळा

५२८

केला जावा अशा आदे शाची फमामने बादशाहाने सवम प्रांतांमध्ये पाठवली बादशाहाच्या हस्ताक्षरातील सात हजार रुपयांच्या कुरणाच्या दोन प्रती मददनेला भेट

५३२

पररलशष्टे

राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी

४३१

राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक त्रविी औरंगजेबाच्या राजवटीचा कालखंड तब्बल पाच दशके इतका मोठा असल्यामुळे, या काळात, राजघराण्यातील अनेक जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी नोंदवले गेले आहेत. औरंगजेबाच्या पणतूचे लग्नही त्याने लावून ददले आहे हे तवशेष लक्षात घेण्यासारखे आहे. या सगळ्या घटना चटकन पाहता याव्यात म्हणून ही सूची ददली आहे. प्रसंग नेमका कळण्यासाठी, या अनुवादातील वाक्य खालील सूचीत थोडक्यात ददली आहेत. ददनांक

घटना

िा.पृ.

३० ऑग १६५९

दारा शुकोह याला मारून हुमायूनच्या थडग्यात पुरण्यात आले.

२७

पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याला मुलगा झाला व त्याचे

३५

नाव सुलतान मुहम्मद मुईझुद्दीन ठे वले गेले. यावेळी मुसलमान बनवून बादशाही जनानखान्यात वाढवल्या

३७

गेलेल्या राजा रूपससिंहाच्या मुलीचा तववाह पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम याच्याशी करण्यात आला. १५ फेब्रु १६६२

पादशाहजादा मुहम्मद अकबराची सुंता केली गेली.

३८

पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम व मुहम्मद मुईझुद्दीन याची

४८

आई यांना मुलगा झाल्याचे पत्र धमळाले. ५ धडसें १६६४

मुहम्मद मुअज्जम याचे पत्र आले क़ी रूपससिंह राठोडच्या

४९

मुलीला मुलगा झाला. २२ जाने १६६६

शाहजहान आजारामुळे मरण पावला.

५३

२४ फेब्रु १६६७

उदीपुरी महाल तहला मुलगा झाला व त्याला मुहम्मद काम बक्ष

६०

हे नाव दे ण्यात आले. ३ मे १६६८

आसामच्या राजाची मुलगी रहमत बानू, तहचा तववाह मुहम्मद

७३

आजमशी करण्यात आला. १२ मे १६६८

मुहम्मद आजमचे लग्न दारा व नाददरा बानू बेगम यांची मुलगी

७४

जहानझेब बानू बेगम तहच्याशी लावण्यात आले. १५ धडसें १६६९

रूपससिंह राठोडच्या मुलीला मुलगा झाल्याची बातमी दे णारे

९३

पादशाहजादा मुहम्मद मुअज्जमचे पत्र व सोबत १००० मोहरा धमळाल्या. ९ एतप्रल १६७०

ददल्लीहून बातमी आली क़ी बादशाहाची मुलगी बद्रुस्त्न्नसा बेगम

१००

वारली आहे. ४ ऑग १६७०

मुहम्मद आजम व जहानजेब बानू बेगम यांना मुलगा झाला.

१०५

पररलशष्टे

राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी मुहम्मद मुअज्जम कडू न त्याला व संजारच्या नजाम-इ-सानीची

४३२ १०६

मुलगी यांना मुलगा झाल्याबद्दल एक हजार मोहरा व पत्र आले. ११ सप्टें १६७१

बादशाहाची बहीण रोशनआरा बेगम वारली.

११०

१८ धडसें १६७१

मुहम्मद आजम याने त्याच्या पत्नीला झालेल्या मुलाच्या

११३

आनंदात १००० मोहरा पाठवल्या. त्याला जवान बख्त नाव ददले गेले. १८ जून १६७२

मुहम्मद अकबर याचे सुलैमान शुकोहच्या मुलीशी लग्न लावले

११९

गेले. १५ सप्टें १६७२

ख्वाजा तातहर नक्षबंदी याचा मुलगा मुहम्मद सलीह, याचा

१२०

तववाह मुराद बक्षची मुलगी आसैश बानू बेगम, तहच्याशी करण्यात आला. २७ नोव्हें १६७२

मुराद बक्षचा मुलगा इजदी बक्ष, ज्याला ग्वाल्हेरच्या तुरुंगातून

१२०

दरबारास आणले होते, त्याचा तववाह बादशाहाची मुलगी मेहरुस्त्न्नसा बेगम तहच्याशी केला गेला. १६ धडसें १६७२

मुहम्मद सुलतानचे लग्न मुराद बक्षची मुलगी दोस्तदार बानू

१२४

बेगम तहच्याशी लावले गेले. ३० जाने १६७३

झुब्दतुस्त्न्नसा बेगमचे लग्न दारा शुकोहचा मुलगा लसतपहर

१२५

शुकोह याच्याशी लावले गेले. २३ माचम १६७३

काम बक्षची सुंता झाली.

१२७

१८ जुलै १६७३

मुहम्मद मुअज्जम याची पत्नी, अब्दुल मुमीनची मुलगी वारली.

१२८

२० ऑग १६७३

पादशाहजादा अकबर याला मुलगा झाला व त्याचे नाव अब्दुल

१२८

वह्हाब ठे वले गेले. २४ सप्टें १६७३

पादशाहजादा मुहम्मद मुअज्जम ला मुलगा झाला व त्याचे नाव

१२८

खुजजश्ता अख्तर ठे वले गेले. २२ जुलै १६७५

मुहम्मद आजमला मुलगा झाला, त्याचे नाव लसकंदर शान

१४३

ठे वण्यात आले. धमझाम हुसैन सफावीची मुलगी कंदहारी महल तहच्या पोटी

१४७

जन्मलेली शाहजहानची सवामत मोठी मुलगी पुरहुनर बानू बेगम वारली. मुहम्मद मुअज्जम याला मुलगा झाल्याची आनंदाची बातमी

१५०

धमळाली. त्याला खुजजस्ता अख्तर हे नाव दे ण्यात आले. ३ ऑक्टो १६७६

सुलतान मुईझुद्दीनचा तववाह धमझाम मुकरममखान खान सफावी याच्या मुलीची करण्यात आला.

१५२

पररलशष्टे २१ फेब्रु १६७६

राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी मुहम्मद सुलतानाची पत्नी दोस्तदार बानू बेगम रुस्तम खान च्या

४३३ १५४

सराई मध्ये वारली. १३ जुलै १६७६

लसतपहर शुकोह व झुब्दतुस्त्न्नसा बेगम यांना मुलगा झाला.

१५४

त्याला आला तबार हे नाव ददले गेले. ५ ऑग १६७६

मुहम्मद सुलतानला मुलगा झाला, त्याचे नाव मसाऊद बख्त

१५५

ठे वण्यात आले. ३० ऑग १६७६

मुहम्मद सुलतान चे लग्न दौलताबादी महलच्या भावाच्या

१५५

मुलीशी केले गेले. १ सप्टें १६७६

मुहम्मद अकबर याचे लग्न मुराद कुली घक्कर याचा मुलगा

१५५

आलाह कुली याच्या मुलीशी करण्यात आले. १७ फेब्रु १६७७

शाह आलम बहादुरला (मुहम्मद मुअज्जम) मुलगा झाला,

१५७

मुहम्मद हुमायून नाव ठे वण्यात आले. ३ धडसें १६७६

पादशाहजादा मुहम्मद सुलतान याचा गंभीर आजाराने मृत्यू

१५९

झाला. लसतपहर शुकोहचा मुलगा सुलतान आला तबार मरण पावला.

१६०

२८ जाने १६७७

शाहजहानची (पत्नी) अकबराबादी महल तहचा मृत्यू झाला.

१६०

३ एतप्रल १६७७

पादशाहजादा मुहम्मद आजमचा मुलगा लसकंदर शान मरण

१६०

पावला. ९ जून १६७७

ददवंगत सुलतान मुहम्मद याचा मुलगा सुलतान मसाऊद बख्त

१६०

मरण पावला. ख्वाजा सलीह नक्शबंदी याच्या भावाचा मुलगा ख्वाजा याकुब,

१६६

याचा तववाह मुराद बक्षच्या मुलीशी केला गेला. सुलैमान शुकोहच्या मुलीचे लग्न ख्वाजा पारसाचा मुलगा

१६६

ख्वाजा बहाउद्दीन याच्याशी केले गेले. क़ीरतससिंहाच्या मुलीचा तववाह शाहजादा मुहम्मद अजीमशी

१६७

करण्यात आला. मुराद बक्ष याची मुलगी व ख्वाजा मुहम्मद सालीह याची पत्नी

१७०

असैश बानू वारली. २ ऑक्टो १६७९

शाहजादा मुहम्मद अजीम याला क़ीरतससिंह याच्या मुलीपासून

१८१

एक मुलगा झाला, मुहम्मद करीम नाव ठे वले. २४ नोव्हें १६७९

मुहम्मद अकबर याच्याकडू न पुत्रप्राप्ती झाल्याचे पत्र आले, नेकुलसयार नाव ठे वले गेले.

१८२

पररलशष्टे २३ जाने १६८१

राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी काम बक्षचा तववाह मनसबदार बरखुरदार बेग याची मुलगी

४३४ २०४

फि-इ-जहान खानम तहच्याशी करण्यात आला. २६ जुलै १६८१

आददलशाह तवजापुरीची मुलगी शहर बानू तहचा तववाह मुहम्मद

२१०

आजम याच्याशी करण्यात आला. ३० जुलै १६८१

मुहम्मद काम बक्ष याचा तववाह अमरचंदची मुलगी व

२११

मनोहरपूरचा जमीनदार जगतससिंह याची बतहण कल्याण कुमारी म्हणजे जमैतुस्त्न्नसा तहच्याशी लावण्यात आला. ४ माचम १६८३

पादशाहाजादा काम बक्ष याचा तववाह लसयादत खान सफावीची

२२५

मुलगी आजमम बानू तहच्याशी करण्यात आला. २६ जुलै १६८३

आजम शाह याच्या दासीला त्याच्यापासून एक मुलगा झाला,

२३४

मुलाचे नाव वालाजाह ठे वले गेले. आजम शाहचा सेवक मीर हाशीम याने मुलाच्या जन्माची वाताम

२४१

दे णारे पादशाहजाद्याचे पत्र व सोबत १००० मोहरा सादर केल्या. मुलाचे नाव झीजाह ठे वले गेले. १७ मे १६८४

ख्वाजा याकुत याने काम बक्ष याला मुलगा झाल्याची बातमी

२४३

आणली. मुलाचे नाव उम्मेद बक्ष ठे वण्यात आले. २४ जुलै १६८४

मुहम्मद आजम शाह याने वालाजाह याच्या आईच्या पोटी एका

२४५

मुलाच्या जन्म झाल्याबद्दल बादशाहाला ५०० मोहरा सादर केल्या. मुलाचे नाव वालाशान ठे वण्यात आले. १९ ऑग १६८४

शाहजादा मुईझुद्दीन याचे मुकरमम खानाचा मुलगा धमझाम रुस्तम

२४७

याची मुलगी सय्यदुस्त्न्नसा बेगम, तहच्याशी बादशाहा व शाह आलम बहादुर यांच्या उपब्स्थततत काझी अबु सय्यद याने लग्न लावले . २ नोव्हें १६८४

शाहजादा काम बक्ष याचा मुलगा सुलतान उम्मेद बक्ष वारला.

२५०

२१ नोव्हें १६८६

बीदर बख्तचा तववाह मुख्तार खानाच्या मुलीशी केला गेला.

२८४

शाहजादा दौलताफ्जा वारला व त्याला अली आददल खान

३१४

तबजापुरी याच्या थडग्यात पुरले गेले. २६ जून १६९२

शाहजादा मुहम्मद अजीमुद्दीन याचा तववाह खलीलुल्लाह

३४७

खानाचा मुलगा रुहुल्लाह खान याच्या मुलीशी झाला. मुहम्मद अकबर याच्या मुली झतकयतुस्त्न्नसा व सतफयतुस्त्न्नसा आदे शानुसार दरबारास आल्या व त्यांचा तववाह रतफ-उल-कद्र व मुहम्मद खुजजस्ता अख्तर यांच्याशी केला गेला.

३७२

पररलशष्टे

राजघराण्यातील जन्म, मृत्यू व िार्मिंक तविी मुहम्मद अजीम व रुहुल्लाह खानाची मुलगी यांना मुलगा झाला,

४३५ ३७४

मुलाचे नाव रुह-उल-कद्स ठे वले गेले. २३ ऑग १६९५

बीदर बख्त व मुख्तार खानाची मुलगी यांना मुलगा झाला.

३७४

मुलाचे नाव तफरोज बख्त ठे वले गेले. २६ मे १७०२

झेबुस्त्न्नसा बेगमच्या मृत्यूबद्दल ददल्लीहून बादशाहाकडे बातमी

४६२,

आली.

५३९

सुलतान फरुम खलसयार याला मुलगी झाल्याबद्दल मुहम्मद

४८२

अजीम याने पाठवलेली भेट बादशाहाला धमळाली. १३ माचम १७०५

पादशाहजादा मुहम्मद अकबर याचा मृत्यू झाला.

४८३

अहमदाबादहून बातमी आली क़ी शाह आलीजाहची पत्नी

४९४

जहानझेब बानू बेगम तहचा मृत्यू झाला. १८ जून १७०६

बादशाहाची मुलगी मेहरुस्त्न्नसा बेगम व ततचा पती इजझदबक्ष

५१५

यांचे तनिन झाले. ३० जून १७०६

बादशाहाला रात्री उशीरा कळले क़ी बुलंद अख्तर याचा मृत्यू

५१५

झाला आहे. ददवंगत आमीर खानाची मुलगी व मुईझुद्दीन याचा मुलगा

५१८

सुलतान अझ्झुद्दीन यांचा तववाह ठरवण्यात आला. २० फेब्रु १७०७

औरंगजेब बादशाहा वारला.

५२१

८ जून १७०७

मुहम्मद आजम याचा शाह आलमशी झालेल्या युद्धात मृत्यू

५३६

झाला. ३ जाने १७०९

काम बक्षचा युद्धभूमीवर मृत्यू झाला.

५३८

फेब्रु १७०७

बादशाहाची मुलगी झुब्दतुस्त्न्नसा बेगम तहचा मृत्यू झाला.

५४०

सन १७०६

बादशाहाची मुलगी मेहरुस्त्न्नसा बेगम तहचा मृत्यू झाला.

५४०

पररलशष्टे

फासी शब्दसूची

४३६

िािी शब्दिूिी एका भाषेतील एखाद्या शब्दाची नेमक़ी छटा दुसऱ्या भाषेत ही असतेच असे नाही. पण ऐततहालसक ग्रंथातील तवलशष्ट शब्दांचा नेमका अथम स्पष्ट करणे आवश्यक असते. त्यामुळे फासी पाठातील काही शब्द या अनुवादात आहेत तसे वापरले आहेत. त्यांचा अथमबोि होण्यासाठी ही सूची ददली आहे. एखाद्या फासी शब्दाचे अनेक आणण काही शब्दांचे तर परस्पर-तवरोिी अथम शब्दकोशात ददले ले आढळतात. ते सवम इथे दे णे उपयुक्त होणार नाही म्हणून फासी पाठातील अपेणक्षत ककिंवा त्याच्या शक्य तततका जवळ जाणारा अथमच इथे ददला आहे. शब्द

िािी

अथव व िंदभव

अताललक

‫اطاليق‬

पालक, मालक, प्रांतप्रमुख. फासी पाठात या शब्दात ‘तोय’ हे अक्षर न वापरता ‘ते’ हे अक्षर वापरले आहे.

(‫ )اتاليق‬स्टा. ७१ अदालत / अदालतगाह अमीन

/ ‫عدالة‬ ‫عدالتگه‬ ‫ز‬ ‫امت‬

न्यायसभा. स्टा. ८३८ जजल्यात कर गोळा करणारा सरकाराने नेमून ददलेला अधिकारी. स्टा. १०२

अगमजा

‫ارگجۀ‬

अत्तर ककिंवा सुगंिी द्रव्य. केशर, अगरू, कापूर, चंदन व कस्तुरी यांचे समभाग चूणम. स्टा. ३२४, ऐ.श. १९

अजम-इ-मुकरमर

ّ ‫عرض‬ ‫مکرر‬ ِ

दरबारात

घेतलेल्या

तनणमयांची

बादशाहाकडे

पुनर्विंचारणा करून त्याची तनणश्चती करणारा अधिकारी. स्टा. १३००

असी

‫اورش‬ ٔ

अंगठीवर लावलेला लहानसा आरसा. म.आ.ज.स. ३२४

अशा

‫عشاء‬

सूयामस्ताची ककिंवा रात्रारंभाचा नमाज. स्टा. ८४९

अश्रफ़ी

‫اس زف‬

सोन्याचे नाणे, मोहर. एका मोहरेची ककिंमत सािारण. १६ रुपये इतक़ी होती. स्टा. ६४

अस्र

‫عرص‬

संध्याकाळचा नमाज. स्टा. ८५२

अहदी / आहदी

‫احدي‬

बादशाहाच्या पररवारातील लशलेदार लोक. यांना बादशाहाच्या खासगीतून वेतन धमळत असे. ऐ.श. ९७८

आख्ताबेगी

‫بيک‬ ٔ ‫آخته‬

पागाप्रमुख. म.आ.ज.स. ३२४

पररलशष्टे आघाबानी

फासी शब्दसूची

‫ز‬ ‫آغاباي‬ ٔ

४३७

लसरीया व डमास्कस या भागात तवणले जाणारे तवलशष्ट प्रकारचे रेशमी कापड. आपल्याकडे पैठणीत जसे सोने ककिंवा चांदीचे िागे गुंफले जायचे तशीच कलाकारी या प्रकारच्या कापडात करण्याची परंपरा होती. ऐ.श. मध्ये याचा उल्लेख आंगाबानी असा केला आहे. ऐ.श. ९६८

आबदारखानाह आब-पाश-इदराह आधमल आयमा

‫آبدارخانه‬ ‫آب پاش‬ ‫دره‬ ‫عامل‬ ‫ايمه‬

पाणी पुरवठा / तपण्याच्या पाण्याचा तवभाग. स्टा. ५ पाण्याचा िबिबा असलेली दरी. स्टा. ३, २३१, ५१६ कर ककिंवा सारा गोळा करणारा अधिकारी. स्टा. ८३२ इस्लामच्या तत्त्वांनुसार एखाद्या िार्मिंक तवद्वानाला ककिंवा दानिमामसाठी अगदी नगण्य पैशाच्या मोबदल्यात ककिंवा फुकट ददली जाणारी जमीन. स्टा. १३२

आलम

‫علم‬

तनशाण, झेंडा ककिंवा पोशाखावर लावायचे धचन्ह, पागोट्याचा एक प्रकार. स्टा. ८६४, ऐ.श. ९६१

आसा

‫عصا‬

काठी, सोटा, दं ड ककिंवा गदा (सोने, चांदी ककिंवा इतर मूल्यवान वस्तुची), दरबारात मानाच्या व्यक्त़ी समोर ही िरली जायची. स्टा. ८५१

इत्र-ए-तफतना इन्ब-उल-

‫عطر فتنه‬ ِ

मंत्रमुग्ि करून टाकणारे ककिंवा मोहात पाडणारे सुगंिी

‫عنبالثعلب‬

यातील इन्ब याला ‘nightshade’ म्हटले आहे तर

सआललब

अत्तर. स्टा. ८५४, ९०७ सआललबला ‘orchid mascula’. पचनसंस्थेच्या तवकारांवर त्या काळी (बहुदा मध्य आलशयात) या औषिी वनस्पती वापरात असाव्यात. सआललब पासून सालेप हा पौतष्टक पदाथम प्राप्त करतात. स्टा. ३४५, ८६९

इलाका

‫عالقۀ‬

सोने ककिंवा इतर मुल्यवान िातू वा रत्नांची साखळी (उदा. मोत्यांचा इलाका असलेला रत्नजधडत खंजीर). स्टा. ८६१

इस्स्तकबाल एकलरी कघलची कजावा / कजवाह

‫استقبال‬ ‫يکلري‬ ‫قغلچيان‬ ‫کجاوه‬

भेट घेण्यासाठी पुढे येणे (ककिंवा दरबारास येणे). स्टा. ५४ एका िाग्याची माळ. म.आ.ज.स. ३२५ पहारेकरी, अंगरक्षक. म.आ.ज.स. ११५ स्त्स्त्रयांसाठी तयार केलेली उंटगाडी ककिंवा हौदा. स्टा. १०१६, म.आ.ज.स. ३२६

पररलशष्टे कमखाब /

फासी शब्दसूची

‫کمخاب‬

तकमखाब करावल / करावलान /

४३८

भरतकाम केलेले एकाच (कमखाब) ककिंवा तवतवि रंगांचे (तकमखाब) कापड. स्टा. १०४८

/ ‫قراول‬ ‫قراول بيک‬

करावलबेगी

मुघल बादशाहाच्या सैन्यातील एक तवलशष्ट पथक. या पथकातील लशपाई शांततेच्या काळात बादशाहाच्या लशकारीच्या वेळी रान उठवायला मदत करत. त्यांच्या प्रमुखाला करावलबेगी म्हणत. ऐ. श. मध्ये बंदुकिारी पायदळ असाही उल्लेख आला आहे. स्टा. ९६२, ऐ.श. १०९, ९९९

करोरी /

‫کرورهگنج‬

करोरीगंज

एक कोटी दाम ककिंवा अडीच लक्ष रुपये महसूल असलेला प्रांत, ककिंवा अशा प्रांतातील बाजाराचा सरकारी अधिकारी. म.आ.ज.स. ३२७

कलंदरी

‫قلندري‬

तंबूला असलेली झाप, कलंदरी तंबू म्हणजे झापाचा तंबू. स्टा. ९८६

कलगी कलमा

‫کلگ‬ ٔ

पगडी ककिंवा फेट्यात खोवायचा अलंकार, लशरपेच. स्टा.

‫کلمة‬

इस्लाम िमम स्वीकारताना म्हणायचे प्रमाण वाक्य. स्टा.

१०४३ १०४३

काती-उल-तरीक कातफर / कुफरी

‫قاطع‬ ّ ‫االطريق‬ ‫کافر‬

मारेकरी, हत्यारा, लुटारू. स्टा. ९४८ कृतघ्न, व्यणभचारी, अप्रामाणणक, नास्स्तक, िममकनिंदक, मूतीपूजक. स्टा. १००७, १०३८ डं.फो. ५५१

कारखानजात

‫کارخانجات‬

कारखान्याचे

अनेकवचन,

कारखाना

म्हणजे

उद्योगशाळा, काम करायची जागा. फा.म.को. ६५ कारवा-सराई कासनी

‫کاروان‬ ‫سای‬ ‫ز‬ ‫کاسب‬ ٔ

प्रवाशांसाठी उभी केले ली छावणी ककिंवा वस्ती, तवसाव्याची जागा. स्टा. १००३ पचनसंस्थेच्या उपचारासाठी जुन्या काळी (बहुदा मध्य आलशयात) वापरली जाणारी औषिी वनस्पती, फासी पाठात याला ‘कासनी’ म्हटले आहे तर इंग्रजी अनुवादात ‘succory’ म्हटले आहे स्टा. १००४

तकरतकराक-खाना कुतल / कोतल कुरखानाह

‫کرکراق‬ ‫خانه‬ ‫کوتل‬ ‫قورخانه‬

बादशाहाला लागणारे कपडे व इतर वैयलक्तक वापराच्या वस्तूंचे फडताळ ककिंवा तवभाग. मु.प्र. १९२-१९३ खखिंड. स्टा. १०१५ शस्त्रागार. स्टा. ९९४

पररलशष्टे कुरबेगी

फासी शब्दसूची

‫قوربيک‬ ٔ

४३९

स्टा. प्रमाणे शस्त्रागाराचा प्रमुख. इंग्रजी अनुवादात (पृ.३२८) जदुनाथ सरकारांनी याचा वेगळा अथम ददला आहे. त्यांच्या मते बादशाही धचन्ह व तनशाण यांची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्याला कुरबेगी म्हणतात. स्टा. ९९४

कुरोह

‫کروه‬

दोन मैलाचे अंतर मोजण्याचे माप, सािारणपणे एक कोस म्हणजे एक कुरोह. स्टा. १०२६

कुलंग कुशखाना

‫کلنگ‬ ‫قوشخانه‬

पहा पर-इ-कुलंग. लशकारी प्राणी व पक्षी ठे वले जायचे ते दठकाण. स्टा. ९९४

कुशबेगी

‫قوشبيک‬

लशकारी प्राणी व पक्षी ठे वले जायचे त्या कुशखान्याचा प्रमुख. स्टा. २२३, ९९४

कोका / कोकाह खरोली

‫کوکه‬ ‫کهروِل‬ ٔ

सावत्र भाऊ. स्टा. १०६३ आसाम मध्ये मोहरीचे दाणे व इतर वस्तूंपासून हे तयार केले जाते. पचनसंस्थेच्या तवकारांसाठी हे चांगले असल्याचे मानले जाते. https://www.sciencedirect.com/science/arti cle/pii/S2352618116301172

खवानचा खवासी / खवासान खातम बंदखानाह

खान-इ-सामान खानाहजाद खालसा

‫خوانچه‬ / ‫خواض‬ ‫خواصان‬ ‫خاتمبندخا‬ ‫نه‬ ‫ز‬ ‫خانساماي‬ ٔ ‫خانهزاد‬ ‫خالصه‬

तबक, बहुदा चांदीचे. स्टा. ४८१ हत्तीवर हौद्याच्या मागे बसायची जागा ककिंवा ततथे बसणारा. स्टा. ४८० खातम / खातीम - कडी, लशक्के, अवजड काम; खातमबंदी - जडकाम, लशक्के तयार करण्याची जागा. स्टा. ४३६, ४३७ घरखचामची दे खभाल करणारा माणूस ककिंवा तवभाग. स्टा. ४४३ कुटुं बात जन्मलेला, दासीपुत्र. स्टा. ४४५, फा.म.को. ७६ सरकारच्या ककिंवा बादशाहाच्या अधिकारात असलेला प्रदे श. स्टा. ४४२

खास चौक़ी / चौक़ी-इ-खास खखरा-सर खखलअत

‫چوگ خاص‬ ٔ ‫خنه س‬ ‫خبعت‬

बादशाहाच्या

वैयलक्तक

अंगरक्षकांची

तुकडी.

म.आ.ज.स. ३२५ मूखम, तबनडोक, िांदरट. स्टा. ४९२ अंगरखा, दरबारात ददले जाणारे मानाचे वस्त्र. स्टा. ४७१

पररलशष्टे खखलअतखाना

फासी शब्दसूची

‫خلعت خانه‬

४४०

दरबारात ददला जाणारी खखलअत (अंगरखा) ककिंवा मानाचा पोशाख (वस्त्रे) तयार करण्याची जागा. स्टा. ४७१

खुत्बा

‫خطبه‬

मशीदीत ददले जाणारे प्रवचन, तवशेष करून शुक्रवारच्या नमाजानंतर. स्टा. ४६७

खुशअस्पा /

‫خوش اسبه‬

उत्तम प्रतीच्या घोडदळाची तुकडी. स्टा. ४८, ४८७

‫خوشنويس‬ ‫ان‬ ‫گنج‬ ‫گجنال‬ ‫گره‬

शैलीदार लेखन करणारा, लेखतनक. स्टा. ४८७

खुशअस्बा खुशनतवस / खुशनतवसान गंज गजनाळ तगरा

कोठार, साठवण करण्याची जागा. स्टा. १०९८ हत्तीवरून डागली जाणारी तोफ. म.आ.ज.स. ३२६ दीड तसू ककिंवा एक गजाचा चौदावा ककिंवा सोळावा भाग, स्टा. प्रमाणे तीन बोटांची रुं दी. तगरा आणण झीरा ही वेगळी मापे आहेत. एच.एच.तव. १७८, स्टा. १०८६

गुजमबदामर

‫گرز بردار‬

लहानशी गदा ककिंवा सोटा िारण केलेला, दरबारात नामदारांची उपब्स्थती करणारा ककिंवा सांतगतलेले काम करणारा हरकारा. स्टा. १०८२

गुलालबाडी

‫کاللبار‬

बादशाहाच्या घरा / तंबू समोरील मोकळी जागा. म.आ.ज.स. ३२६

गोशपेच / गुशपेच

‫گوش پيچ‬

पगडी ककिंवा फेट्यात खोवायचा अलंकार, लशरपेच. स्टा. ११०४

घझात घाझी

‫غزات‬ ‫غازى‬

कातफरांतवरुद्ध केलेले युद्ध ककिंवा मोतहम. स्टा. ८८७ शूरवीर, तवशेषकरून कातफरांतवरुद्ध केलेल्या युद्धात शौयम गाजवलेला, िममवीर. स्टा. ८७८

घोरनाळ

‫گهورنال‬

घोड्यावरून मारा करता येईल अशी लांब नळीची ठासणीची ककिंवा तफरवता येणारी. बंदक. म.आ.ज.स. ३२६

घोरी

‫غورى‬

तवष घातले तर फुटते असे तवलशष्ट बनावटीचे धचनी मातीचे भांडे ककिंवा सािी ताटली, ताट. स्टा. ८९८

चकला चघताय

‫چکلۀ‬ ‫چغتای‬

जजल्हा ककिंवा फौजदाराचे अधिकारक्षेत्र. स्टा. ३९७ तुकी जमातीचे व राजाचे नाव. स्टा. ३९५

पररलशष्टे चबुतरा

फासी शब्दसूची

‫چبوترۀ‬

४४१

दरोग्याच्या कोठडी समोरील चौथरा जजथे गुन्हेगार ककिंवा त्यांची

छाटलेली

मुंडक़ी

प्रदशमनाकरता

रचत.

म.आ.ज.स. ३२५ चश्मक चहारकब / चारकब

‫چشمك‬ / ‫چهارقب‬ ‫چارقب‬

चश्मा / काजळ ? स्टा. ३९४ तुराणी राजांच्या वापरातले तवशेष वस्त्र ककिंवा पोशाख, सरकारांच्या इंग्रजी अनुवादाप्रमाणे हे बाया नसलेले छाती व पाठ झाकणारे वस्त्र आहे. याला बायांच्या जागी तसेच पुढच्या बाजूला लहान मोत्यांच्या जझरधमळ्या असतात. स्टा. ३८५, म.आ.ज.स. ३२५

चादर

‫چادر‬

एका प्रकारचे फकले जाणारा व आग पसरवणारा अग्ग्नबाण. म.आ.ज.स. ३२५

धचनीखानाह चेला चोबधचनी

‫ز‬ ‫چيب خانه‬ ‫چيلۀ‬ ‫ز‬ ‫چيب‬ ‫چوب‬ ٔ

धचनी मातीच्या वस्तूंचा तवभाग. स्टा. ४०६ दास. स्टा. ४०६ चायना रूट, ही वनस्पती चीन व जपानहून भारतात आणली जात असे व सूज, मिूमेह यासारख्या शरीरदोषांवर उपचार म्हणून ततचा वापर होत. असे. स्टा. ४०१, डं.फो. ३३२

चोबदार / चोपदार चौडोल / चौदोल जंबूरक जझैर / जझैल जमिर-एसादाकार जहन्नम जहन्नम-नसीब जानमाज-खानाह जामावार

‫چوبدار‬ َ ‫چودول‬ / ‫زنبورك‬ ‫زنبورک‬ / ‫جزائل‬ ‫جزاير‬ ‫جمدهر‬ ِ ‫ساده کار‬ ‫جﮩنم‬ ‫جﮩنم‬ ‫نصيب‬ ‫جانمازخانه‬ ‫جامهوار‬

दरबारात ककिंवा सभेत उपब्स्थतांची घोषणा करणारा. म.आ.ज.स. ३२५ दोन खांबांची पूणम झाकले ली पालखी. ड.फो. ३३४ एक लहान ककिंवा उंटावरून डागली जाणारी तोफ. स्टा. ६२४, म.आ.ज.स. ३२९ खाली ठे वून (आिार घेऊन) मारा करायची एक लांब बंदक. स्टा. ३६२, आ.इं.मु. १०९ सोनाराने तयार केलेली ककिंवा सोन्याचे काम असलेली जमिड. स्टा. ३७०, ६३९ नरक, नरकातील आग, पाताळ. स्टा. ३८२ नरकात / पाताळात जाणे ज्याच्या नशीबात आहे असा. स्टा. ३८२, १४०७ बादशाहाचे वैयलक्तक प्राथमनाघर. म.आ.ज.स. ३२६ फुलांचे काम असलेले कापड ककिंवा तागा. स्टा. ३५१, ३५२

जारीब

‫جریب‬

१४४ याडम इतक़ी लांबी, अंतराचे माप. स्टा. ३६१

पररलशष्टे जजघा

फासी शब्दसूची

‫جيغۀ‬

४४२

पगडी ककिंवा फेट्यात खोवायचा अलंकार, लशरपेच. स्टा. ३८२

जजलोखाना

‫جلو خانه‬

घोड्यांच्या रपेटीसाठीचे मोकळे मैदान. म.आ.ज.स. ३२६

जीन

‫زين‬

घोड्याची खोगीर ककिंवा हत्तीवर बसायची बैठक. स्टा. ६३५

झराह

‫زره‬

लोखंडी ककिंवा इतर िातूच्या लहान कड्यांच्या माळांचे कवच. स्टा. ६१६, म.आ.ज.स. ३२९

जझम्मी

‫ذم‬

इस्लामी कायद्यानुसार (शरीया), मुसलमान नसल्यामुळे, त्याच्याकडू न वार्षिंक कर वसूल करून सहन केला जाणारा माणूस. स्टा. ५५९

जझलम

‫جحلم‬

साखळीचे धचलखत, लशरस्त्राण ककिंवा लशरस्त्राणाची झाप. ड.फो.कहिं.इं. ३०४

झीरा

‫ذراع‬

झीरा

हे लांबी

मोजण्याचे

अरबी

माप

आहे.

स्थलकालानुरूप या मापाच्या मोजणीत बराच बदल झालेला ददसतो. एक याडम, एक क्यूतबट ककिंवा जुन्या पद्धतीप्रमाणे हाताच्या कोपरा पासून ते मिल्या बोटाच्या टोकापयंतचे अंतर आहे. तगरा ककिंवा तगरह याच्यापेक्षा वेगळे माप आहे. स्टा. ५५७, एच.एच.तव. ५६७ झुलेखा

‫زليخا‬

पोतीपर ककिंवा अजीजची पत्नी जजचा ज्यू ग्रंथात व कुराणात उल्लेख येतो. ततला पोतीपरचा दास जोसेफ याच्याबद्दल वाटणारी तीव्र ओढ पूवेकडील कवींच्या, तवशेष करून तनजामी व जामी या फासी कवींच्या ललखाणात आढळते. स्टा. ६२०

झुह्र टांक

‫ظهر‬ ‫تانک‬

मध्यान्हीचा नमाज. स्टा. ८२७ मराठ्ांकडे एक टांक म्हणजे चार मासा, पण इतरत्र ते चार ते नऊ मासा असे आढळते. एच.एच.तव. ५०८

डाली ढाब

‫داِل‬ ‫دهابها‬

टोपली ककिंवा डाल. स्टा. ४९९ तटावर चढू न जायला बांिलेली फळकुटे . म.आ.ज.स. २७०

तख्त-ए-रवां

‫تخت روان‬ ِ

भोयांनी उचलायची बादशाहाची खुची ककिंवा ससिंहासन. म.आ.ज.स. ३२८, हलते ससिंहासन डं.फो. २३६

पररलशष्टे तख्ता कुलाह

फासी शब्दसूची

‫تخته کاله‬

४४३

वरच्या बाजूला टोकदार होत जाणारी तवदुषकाची लाकडी टोपी ज्याला लहान घंटा व इतर वस्तु लटकवलेल्या असत. अशा प्रकारची टोपी इराण मध्ये अट्टल गुन्हेगारांना घालत असत. स्टा. २८६, म.आ.ज.स. १९४

तबरदार

‫یتندار‬

पायदळात पुढे जाऊन जंगलतोड करून वाट तयार करणारे. म.आ.ज.स. ३२८

तरावीह

‫تراوي ح‬

गुडघे टे कून नमाज करण्याची पद्धत, रमजानच्या शेवटच्या नमाजानंतर गुडघे टे कून २० ककिंवा अधिक वेळा मस्तक जधमनीला लावून नमाज करण्याची पद्धत.

तसद्दुक तसलीम

ّ ‫تصدق‬ ‫تسليم‬

स्टा. २९२ दान दे णे, त्याग करणे. स्टा. ३०४ वाकून अणभवादन करणे, आदर व्यक्त करणे, श्रद्धे ने लीन होणे. स्टा. ३०१

तहलील

‫تﮩليل‬

अल्लाह लशवाय दुसरा ईश्वर नाही हे वाक्य म्हणून ईश्वराची प्रशंसा करणे. स्टा. ३३९

ताजी तुघन / तुघून तुमान-इ-तुघ

‫تازی‬ ‫تويغون‬ ‫تومان طوغ‬ ِ

अरबी घोडा. स्टा. २७५ ससाण्याचा एक प्रकार, शाही ससाणा. स्टा. ८२२ एका उंच काठीला घोडा ककिंवा याकच्या शेपटीचे केस लावलेले मध्य आलशयात वापरले जाणारे राजधचन्ह. स्टा. ८२२, म.आ.ज.स. ३२९

तुबमत

‫تربة‬

अलीच्या थडग्यातल्या मातीला तुबमत म्हणतात. आजारी माणसाने ती खाल्ली तर त्याचे दुखणे बरे होते अशी मुसलमानांमध्ये समजूत आहे. स्टा. २९२

तुराम तोरा दफतर-इ-तान / दफ्तरदार-इ-तान दफ्तरदार

ّ ‫طرۀ‬ ‫توره‬ ‫دفن تن‬ ِ

झुमके, लटकणारे कानातले अलंकार. स्टा. ८१४

‫دفن دار‬

कचेरीतील उच्चाधिकारी, कोषाध्यक्ष. स्टा. ५२९,

एक हजार रुपयांची थैली. म.आ.ज.स. ३२९ वेतनाची तवभाग, तान हे तनख्वाचे लघुरूप आहे. म.आ.ज.स. ३२८ म.आ.ज.स. ३२५

दबलघा

‫دبلغه‬

लशरस्त्राणाखाली घातली जाणारी टोपी, जजरेटोप. श.वे. २७८

दरवेश

‫درويش‬

संतपदाला पोहोचलेला, तनर्विंकार, गरीब. स्टा. ५१६.

पररलशष्टे दाघ-ओ-तशीहा / दाघ-ए-तशीहा

फासी शब्दसूची

‫داغ و‬ ‫تصحيحه‬

४४४

मुघल सैन्यातील हा महत्त्वाचा तवभाग होता ज्यात कोणाकडे तकती व कुठल्या प्रकारचे घोडे आहेत तसेच एकूण तकती लोक आहेत या सगळ्याची मोजणी करून त्याची रीतसर नोंद ठे वली जायची. स्टा. ३०४, म.आ.ज.स. ३२५, ३२८

दान-इ-केश

‫دانۀ کيش‬

मानेवर ककिंवा गळ्या भोवती गुंडाळायचे भरतकाम केलेले, थंडीत कोटावरून घ्यायचे वस्त्र. म.आ.ज.स. ३२५

दामन दार-उल-इन्शा दार-उल-हरब

‫دامن‬ ‫داراالنشا‬ ‫دارالحرب‬

वस्त्राची खालपयंत जाणारी झूल. स्टा. ५०० सधचवाची कचेरी. म.आ.ज.स. ३२५ इस्लामी शासन नसले ला शत्रूचा प्रदे श. स्टा. ४९६, डं.फो. ३६९

ददवान-इ-तान

‫ديوان تن‬ ِ

वेतनाच्या कचेरीतील उच्चाधिकारी, तान हे तनख्वाचे लघुरूप आहे. म.आ.ज.स. ३२५, ३२८

दुशाला / दोशाला दोअस्पा /

‫دوشاله‬ ‫دواسبه‬

दोअस्बा

एकत्र लशवलेल्या दोन शाली. म.आ.ज.स. ३२५ सामान्य जात श्रेणी पेक्षा अधिक वेतन असलेली मनसबीची श्रेणी, दोअस्पा म्हणजे प्रत्येक माणसामागे दोन घोडे, सेहअस्पा म्हणजे तीन घोडे. स्टा. ५३९, म.आ.ज.स. ३२५

दोघरा

‫دوگهره‬

चौघरा - चार कप्प्यांची डबी यानुसार ही बहुदा दोन कप्प्यांची डबी असावी. डं.फो. ३३६

दो-लरी / दुलडी िकिक़ी िूप / िोप

‫دولرئ‬ ‫دهکدهک‬ ‫دهوپ‬

दोन माळांचा कंठा. म.आ.ज.स. ३२५ गळ्यात घालायचा अलंकार. म.आ.ज.स. ३२५ सरळ पात्याची दुिारी तलवार, दख्खनी सैन्यात अधिक प्रमाणात वापरलेली ददसते. म.आ.ज.स. ३२५

नकदी नक्काशखानाह नक्काशी नजर

‫نقديان‬ ّ ‫نقاش خانه‬ ّ ‫نقاش‬ ‫نذر‬

रोख वेतनावर असलेले सैतनक. म.आ.ज.स., ३२७ धचत्रकार, लशल्पकार, रंगारी वगैरे कलांचा तवभाग, धचत्रशाळा. स्टा. १४१८ धचत्रकला, रंगकाम, कोरीव काम. स्टा. १४१८ वरीष्ठ अधिकाऱ्याला ददली जाणारी भेट. म.आ.ज.स., ३२७

नवातफल

‫نوافل‬

िममतविीनुसार अतनवायम नसलेला नमाज, स्वतःहून केलेली. स्टा. १४३०

पररलशष्टे नस्खनतवस नस्खी नाजजम नाजजर

फासी शब्दसूची

‫نسخنويس‬ ‫ز‬ ‫نسچ‬ ‫ناظم‬ ‫ناظر‬

४४५

ललप्यंतर करणारा ककिंवा ललतहलेल्या मातहतीच्या प्रती बनवणारा लेखनीक. स्टा. १४०० अरबी / फासी ललतहण्याची तवलशष्ट ललपी. स्टा. १४०० प्रांतप्रमुख, सुभेदार ककिंवा इतर समान पद. स्टा. १३७५ दे खभाल करणारा सरकारी अधिकारी, शरीफ. स्टा. १३७५

नायब

‫نيابت‬ ِ

उपाधिकारी, सहाय्यक, प्रतततनिी. स्टा. १४४०, ऐ.श. ४५१

नास्तललक

‫نستعليق‬

नस्ख व तआली पासून बनलेला शब्द, एक प्रकारची सुवाच्य फासी लेखणी. स्टा. १४००

तनमआस्तीन तनमचाह

‫ز‬ ‫آستت‬ ‫نيمه‬ ‫نيمچه‬

अध्याम बायांचा. स्टा. १४४६ छोटी तलवार, बंदुक़ीच्या पुढे लावता येईल असे लहान पाते. स्टा. १४४५

तनसार

‫نثار‬

शब्दशः त्याग, बादशाहाच्या भल्यासाठी (तवजय, स्वास्थय इत्यादी) त्याच्या मस्तकाभोवती पैसे तफरवून लोकांना ददलेले दान. म.आ.ज.स. ३२७

नेझगुजार पर-इ-कुलंग परखानाह

‫ز‬ ‫ننه گذار‬ ‫ِپر کلنگ‬ ‫پرخانۀ‬

भालदार. स्टा. १४४२ मोठ्ा पक्षाचा नर, ककिंवा करकोचा, सारस, बगळा, परए-कुलंग म्हणजे कुलंगचे पीस. स्टा. १०४४ सरकारांनी या शब्दाचा अथम ददलेला नाही व फासी शब्दकोशात याचा उल्लेख ददसला नाही. परंतु याच्या संदभामवरून लशरस्त्राण ककिंवा पगडी अशा डोक्यावर घालायच्या पेहेरावात पीस खोवण्यासाठी केलेला हा अलंकार असू शकेल.

परदाल /

‫پردلۀ‬

परदलाह

एखादी वस्तू भक्कम करण्यासाठी ददलेला िातूचा आिार. या बाबतीत तलवारीच्या म्यानाला ककिंवा मुठीला ददलेला िातूचा रत्नजधडत आिार असू शकेल. स्टा.

परमनमम

‫ز‬ ‫پرمنم‬

२४१ अकबरने एका तवलशष्ट प्रकारच्या काब्श्मरी लोकरीपासून बनवलेल्या शालीला हे नाव ददले होते असे ऐन-इअकबरी या अबुल फज्ल याने ललतहलेल्या ग्रंथात म्हटले आहे. ऐ.अ. खंड १, पृष्ट ९६

पररलशष्टे परस्तार

फासी शब्दसूची

‫پرستار‬

४४६

ठे वलेली बाई, नाटकशाळा, पत्नी, सहचाररणी. स्टा. २४२, म.आ.ज.स. ३२८

पहुंची

‫پهونچ‬

माशाच्या शेपटासारखा अलंकार. ज.स.इं.अ ३२८. कड्यासारखा मनगटावरचा अलं कार डं.फो. २१९.

पास तपलखाना /

‫پاس‬ ‫فيل خانه‬

तफलखाना पेशकश पेशदास्त

एक प्रहर, म्हणजे तीन तास. स्टा. २३० हत्तीखाना व त्याची दे खभाल करणारा सरकारी तवभाग. म.आ.ज.स. ३२५

‫پشکش‬ ‫پيشدست‬

भेट. स्टा. २५२ कायामलयीन सहाय्यक, मुख्य अधिकारी ककिंवा कारकून. स्टा. २६७, म.आ.ज.स. ३२८

पेशवाज

‫پیشواز‬

गुडघ्याच्या खालपयंत जाणारा लांब झग्यासारखा पोशाख. स्टा. २६७

फज्र फरघोल

‫فجر‬ ‫فرغل‬

सकाळचा नमाज. स्टा. ९०८ नेहेमीच्या कपड्यांवरून घालायचा अंगरखा. स्टा. ९२०, फा.म.को. १७०, ऐ.श. ५३१

फरामशखानाह

ّ ‫فراشخانه‬

गाललचे, खुच्याम, शाधमयाने वगैरे सामान ठे वायची जागा ककिंवा खोली. स्टा. ९१३, फा.म.को. १७१, ऐ.श. ५३४

फाततहा

‫فتحه‬

कुराणातील पतहला अध्याय, मृत आत्म्यांकरता केलेला नमाज. स्टा. ९०२

तफल दरीयायी

‫درياي‬ ‫فيل‬ ٔ

इंग्रजी अनुवादात याला ‘dariai elephant’ असे म्हटले आहे तर फासी पाठात याचा उल्लेख ‘तफल दरयायी’, ज्याचा शब्दशः अथम पाण्यातला हत्ती असा होतो. पण शब्दकोशानुसार, तफल दरीया म्हणजे वॉलरस. स्टा. ९४५

फुताह / फोता

‫فوطه‬

अंघोळीला जाताना कमरे भोवती गुंडाळायचे फडके असे इंग्रजी अनुवादात ददले आहे. स्टा. मध्ये या व्यततररक्त, पायजम्याकरता वापरले जाणारे कापड ककिंवा न लशवलेले कापड असाही अथम ददला आहे. स्टा. ९४१, म.आ.ज.स. ३२६

फुल कटारा

‫پهول کتاره‬

इंग्रजी अनुवादात याला एक प्रकारचा खंजीर म्हटले आहे. स्टा. प्रमाणे कटाराचा अथम भाला ककिंवा लहान तलवार असा आला आहे. स्टा. १०१४, म.आ.ज.स. ३२८

पररलशष्टे बंदकची बदकेश बयुतात /

फासी शब्दसूची

‫بندوقچ‬ ‫بدكيش‬ ‫بيوتات‬

बयुताती

४४७

बहुतेक वेळा पायदळातील बंदकिारी सैतनक. स्टा. २०२ अमानुष, अपतवत्र. स्टा. १६४ सरकारी खचम, कर, ककिंमती यावर तनयंत्रण ठे वणारा तवभाग. ददवंगत सरकारी कममचाऱ्यांची मालमत्ता सरकार जमा करणारा अधिकारी. स्टा. २२७, म.आ.ज.स. ३२४

बकमअंदाज

‫برق انداز‬

घोडदळातील ककिंवा पायदळातील बंदुकिारी सैतनक. स्टा. १७६

बहरामी

‫بﮩرام‬

अत्यंत शूर, पराक्रमी. इराणमिील बहराम राजाच्या नावावरून हे तवशेषण रूढ झाले आहे. स्टा. २११

बहललया बाजूबंद

‫بهليه‬ ‫بازوبند‬

बंदुकिारी पायदळ. म.आ.ज.स. ३२४ दं डावर ककिंवा हातात घालायचे कडे (अलंकार). स्टा. १४५, म.आ.ज.स. ३२४

बाणअंदाज

‫بان انداز‬

इंग्रजी अनुवादात यांचा उल्लेख ‘rocket-men’ असा केला आहे. हे अग्ग्नबाण फेकणारे सैन्यातील पथक

बारानी बालादस्त खखलत बालाबंद तबघा

‫بار زاي‬ ‫خلت‬ ِ ‫باالدست‬ ‫باالبند‬ ‫بيگهه‬

असावे. पावसाळी अंगरखे ककिंवा झगे. स्टा. १४१ सवोत्कृष्ट खखलअत (अंगरखा). स्टा. १५० पगडी ककिंवा वरअंगाचा पोशाख. स्टा. १४९ तबघा या मापात ही स्थलकालानुरूप मोठ्ा प्रमाणात अंतर ददसते. भारतातील तवतवि प्रांतातच नाही तर उत्तर प्रदे श या एकाच राज्याच्या पूवी व पणश्चमी भागात याचे वेगवेगळे मोजमाप केल्याचे आढळते. ददल्लीच्या आसपास १ तबघा म्हणजे २५०० चौरस मीटर असे सािारणपणे नोंदवले गेले आहे. हे माप सािारण अंदाज येण्या पुरतेच ददले आहे. स्टा. प्रमाणे तबघा म्हणजे एका एकराचा ततसरा भाग. स्टा. २२४

तबद-इ-धमश्क बेलदार

‫بيد مشك‬ ‫بيلدار‬

एक सुगंिी झुडूप. स्टा. २१८, म.आ.ज.स. ३२४ खणकाम करणारे, भुयार खणून त्यातून तटापयंत जाऊन त्याच्या खाली सुरुंग लावत त्यासाठी यांचा उपयोग होत असे. म.आ.ज.स. ३२४

बैत

‫بيت‬

दोन ओळींचे काव्य. स्टा. २१५

पररलशष्टे बैत-उल-माल

फासी शब्दसूची

‫بيت المال‬

४४८

तवतवि तवभागातून येणारा पैसा ज्यात जमा होतो तो सरकारी खजजना, वारस नसलेल्याची ककिंवा सरकारने जप्त केलेली मालमत्ताही यात जमा होते. स्टा. २१५ , म.आ.ज.स. ३२४

मंजजल-ए-नजूम मकहूर

‫منازل نزول‬ ِ ‫مقﮩور‬

प्रवासाच्या टप्प्यांवरील तवश्रांतीची स्थाने. स्टा. १३९८ पराभूत

केलेला

ककिंवा

पराभूत

करण्याजोगा,

कातफरासारखे ज्याला वागवले गेले पातहजे असा. स्टा. १२९७ मघरीब मघरीब-जमीन मतवाला मरक़ी मश्क मसनद

‫مغرب‬ ‫مغرب زمتز‬ ‫متوالۀ‬ ‫مرگ‬ ٔ ‫مشك‬ ‫مسند‬

संध्याकाळचा नमाज. स्टा. १२८० पणश्चमेकडील भूप्रदे श. स्टा. १२८० एक प्रकारचा तोफगोळा ? दोन मोत्यांचा कंठा ? युद्धात वापरला जाणारा एक प्रकारचा ध्वम ? राजाची बसायची जागा, सािारणपणे जधमनीपासून थोड्या उंचीवर ठे वलेली बैठक. म.आ.ज.स. ३२७

मसनवी महल्ला

‫مثنوی‬ ّ ‫محله‬

दोन ओळींचे काव्य. स्टा. ११७३ संचलनाची ककिंवा उपब्स्थतांची तपासणी, नोंदवही. स्टा. ११९०, म.आ.ज.स. ३२७

माही-मरातीब

‫مایه مراتب‬

उच्च श्रेणीतील नामदारांना ददली जाणारी मानाची धचन्हे, जी हत्तीवरून सन्मानाने नेली जायची. त्यात मासा व इतर तवलशष्ट धचन्हे असायची. स्टा. ११४७, म.आ.ज.स. ३२७

धमसरा धमस्ल धमहीन-पूर-एखखलाफत / सलतनत मीर आततश मीर तुजुक मीर-इ-लशकार मुझव्वर मुत्तका

‫مرصع‬ ‫مثل‬ ‫ز‬ ‫پور‬ ِ ‫مهت‬ / ‫خالفة‬ ‫سلطنت‬ ‫من آتش‬ ‫من توزك‬ ‫من شکاری‬ ّ ‫مزور‬ ‫متكا‬

काव्याची एक ओळ. स्टा. १२५३ तळ, छावणी, पडाव, तंबू. म.आ.ज.स. ३२७ उत्तराधिकारी, युवराज, शब्दशः सल्तनती मिील मोठा मुलगा. स्टा. १३५७, २५९, ४७०, ६९३ तोफखान्याचा प्रमुख. स्टा. १३६०. समारंभांची दे खभाल करणारा अधिकारी. स्टा. १३६१ लशकारीसाठी नेमलेला प्रमुख अधिकारी. म.आ.ज.स. ७७ आिारासाठी उभी केलेली भभिंत. म.आ.ज.स. ३२७ बैठक ककिंवा पलंग. स्टा. ११६६

पररलशष्टे मुत्सद्दी

फासी शब्दसूची

‫متصدى‬

४४९

खालच्या श्रेणीतील सरकारी सेवक, कारकून, तहशोब ललतहणारा. स्टा. ११६०

मुफ्ती

‫مفب‬

ज्याचे वचन हे इस्लामी कायद्याचे प्रमाण मानले जाते, फतवा दे णारा, दं डाधिकारी. स्टा. १२८५

मुबाह

‫مباح‬

शब्दशः ग्राय. इस्लामच्या तनयमांप्रमाणे ज्या गोष्टी केल्याने काही पाप लागत नाही व काही पुण्यही धमळत नाही अशा गोष्टी. स्टा. ११४८

मुरचाल

‫مورچال‬

तकल्ल्याच्या वेढ्याचा प्रमुख, दरवाज्या समोरील पहारा. स्टा. १३४३

मुणश्रक मुस्तौफ़ी

‫مرسك‬ ‫ز‬ ‫مستوف‬

अनेकेश्वरवादी, मूतीपूजक. स्टा. १२४६ प्रमुख अधिकारी, तपासनीस, प्रमुख कारकून. स्टा. १२३५

मेहर

‫مﮩر‬

लग्नात मुसलमानी बायकांना धमळणारे स्त्रीिन. स्टा. १३५३

याद-दाश्त रबाई रहकला राक शलवार राहदार

‫ياد داشت‬ ٔ ‫رباع‬ ‫رهکله‬ ‫راك شلوار‬ ‫راهدار‬

नोंद, तनवेदन, स्मरणी, स्मृती. स्टा. १५२४ चारोळी, चार ओळींचे यमक जुळणारे काव्य. स्टा. ५६७ युद्धात वापरायचा चाकांचा गाडा. म.आ.ज.स. ३२८ पट्टे री तवजार. म.आ.ज.स. ३२८ वाटे वरील प्रवाशांकडू न

पथकर

गोळा

करणारा,

सावमजतनक रस्त्यांचा प्रमुख. स्टा. ५६६ राहदारी

‫راهداری‬

प्रवाशांकडू न सुरक्षेसाठी गोळा केलेला प्रवास ककिंवा पथकर, ककिंवा अशा करातून सूट ददली असल्यास त्याची पावती. स्टा. ५६६

ररकाबी रूम / रूमी लंगरी

‫کاي‬ ‫ر ی‬ ‫روم‬ ‫لنگری‬

बशी, कप ककिंवा इतर काही वस्तु ठे वण्यासाठी वापरली जाणारी वस्तु (तबक). स्टा. ५८४ रोम, ग्रीक, तुकी / तुकीचा रतहवासी. स्टा. ५९६ पाणी ककिंवा इतर द्रव्यपदाथम तपण्याचा पेला, भांडे. स्टा. ११३०

वली

‫وِل‬

(ईश्वर ककिंवा राजाच्या) जवळचा, रक्षण / दे खभाल

करणारा, संत, सत्पुरुष, न्याय दे णारा. स्टा. १४८१ वाकनतवस

‫واقع نويس‬

नेमून ददलेल्या बादशाही क्षेत्रातील घटनांची व बातम्यांची नोंद करणारा. स्टा. १४७६

वातकया-खवान

‫واقعه خوان‬

बातमी वाचून दाखवणारा. स्टा. १४५२, ४८१

पररलशष्टे वालाशाही सेवक शातगदम पेशाह शाहना शुतरनाळ शेरमाही

फासी शब्दसूची

‫واالشایه‬ ٔ ‫شاگرد پیشه‬ ‫شحنه‬ ‫شننال‬ ‫شنمایه‬

४५०

बादशाहाने स्वतःच्या खचामतून उभे केलेले ककिंवा पोसलेले सैन्यदल. म.आ.ज.स. ३२९ खालच्या श्रेणीचे सेवक. स्टा. ७२४ लश्कराचा व्यवस्थापक, प्रमुख अधिकारी. स्टा. ७३६ उंटावरून डागली जाणारी तोफ. म.आ.ज.स. ३२८ माशाच्या हाडापासून बनवलेली मूठ, खंजीर ककिंवा सुरा इत्यादी साठी वापरली जाणारी. स्टा. ७७४

संग-ए-यश्म सजावल /

‫سنگ يشم‬ ِ ‫ز‬ ‫ساول‬

सजावली सद / सदी

हररताश्म ककिंवा सूयमकांतमणी. स्टा. ७०२, १५३१ मालसक उत्पन्न गोळा करणारा, रसदीचा पुरवठा वगैरे बघणारा. स्टा. ६८१

‫صد‬

शंभर (तीन सदीची मनसब धमळाली म्हणजे ३०० जात ची मनसब). स्टा. ७८३

सद्र सरबारी सराचा

‫صدر‬ ‫سباري‬ ‫ساچه‬

प्रिानमंत्री, न्यायािीश, उच्चाधिकारी. स्टा. ७८३ बादशाही पहारेकऱ्यांचा प्रमुख, मुख्य रक्षक. स्टा. ६६९ मोठ्ा तंबूच्या आत असलेला लहान तंबू ककिंवा खोली. स्टा. ६६८

सलामी

‫سالم‬

राज्यकताम ककिंवा जमीनदाराला ददली जाणारी भेट . स्टा. ६९२

साचक सादकार सालार-इ-अस्बान लसयासत

‫ساچق‬ ‫ساده کار‬ ‫ساالر اسبان‬ ِ ‫سیاسة‬

लग्नात नवरीमुलीला धमळणाऱ्या भेटवस्तू. स्टा. ६३८ एक प्रकारचा सोनार. स्टा. ६३९ घोडदळाचा प्रमुख, सरनोबत. स्टा. ६४२ प्रशासन, राज्य करणे, कारभार चालवणे, लशक्षा करणे, प्रशासक़ीय पद्धत. स्टा. ७१२

सुखसज्जाखानाह सुझानी सुनून

‫سکهسچ‬ ‫خانه‬ ‫ز‬ ‫سوزي‬ ‫زز‬ ‫ست‬

बादशाहाकरता आरामदायी पलंगाचा पुरवठा करणारा तवभाग. म.आ.ज.स. ३२८ पलंगावर हंतरायची चादर, क्वधचत भरतकाम केलेली. म.आ.ज.स. ३२८ सुन्नतचे अनेकवचन, मुहम्मदची वचने व त्यावर आिाररत तनयम. स्टा. ७०४

सुयूरघाल

‫سيورغال‬

करमुक्त जमीन (िार्मिंक स्थळांना ददली जायची). स्टा. ७१९

सुखम

‫سخ‬

१ सुखम = १ रत्ती, ८ रत्ती = १ मासा, १२ मासा = १ तोळा, ८० तोळा = १ शेर. ऐ.अ. खंड १, पृष्ट १६

पररलशष्टे सेहअस्पा सेहबंदी

फासी शब्दसूची

‫سه اسبه‬ ‫سه بندي‬

४५१

पहा दोअस्पा. कराची वसूली करण्यासाठी नेमलेले अस्थाई दल ककिंवा सैतनक. म.आ.ज.स. ३२८

सेहरा

‫سهرۀ‬

स्मरणी

‫ز‬ ‫سمري‬

लग्नात मुलाचा चेहरा झाकण्यासाठी वापरले जाणारे सजावट केलेले वस्त्र. म.आ.ज.स. ३२८ जप करण्यासाठी वापरली जाणारी मण्यांची माळ. म.आ.ज.स. ३२८

हदद हबाश / हबशी /

‫حدود‬ ‫حبش‬

हबसाण

इस्लामी शरीयाने सांगीतलेले तविीतनयम. स्टा. ४१३ अबेलसतनया नावाचा अतफ्रका खंडातील दे श ज्याला आज इलथयोतपया नावाने ओळखले जाते, ततथून आलेल्या लोकांना आपल्याकडे हबशी म्हटले जाते. लसद्दीच्या ताब्यात असलेल्या जंजजऱ्याच्या आसपासच्या भागालाही आपल्याकडे हबसाण म्हटले जाते पण इथे ते अणभप्रेत नाही. स्टा. ४१०, स्थ.ना.को. ३६७

हरबी हराम हलवान / हलवानी हालसलात हुक्का

ٔ ‫حري‬ ٔ‫ی‬ ‫حرام‬ / ‫حلوان‬ ‫ز‬ ‫حلواي‬ ‫حاصالت‬ ّ ‫حقه‬

शत्रू, युद्धखोर, शत्रूच्या प्रदे शातील (इस्लाम



स्वीकारलेला). स्टा. ४१५ इस्लाम िमाम प्रमाणे वज्यम असलेल्या गोष्टी. स्टा. ४१४ स्वयपाक़ी, हलवाई. स्टा. ४२९ प्रांतातून धमळणारा कर. स्टा. ४०८ युद्धात वापरला जाणारा एक प्रकारचा अग्ग्नबाण, जदुनाथ सरकारांच्या मते, हस्तध्वम. स्टा. ४२६, म.आ.ज.स. ३२६

पररलशष्टे

नकाशातील स्थळांची सूची

४५२

नकाशातील स्थळांिी िूिी या अनुवादात उल्ले ख असले ल्या सवम स्थळांची ही सूची नसून इथे ददले ल्या नकाशातील स्थळांची सूची आहे. औरंगजेबाचे पडाव व त्याच्या आजूबाजूची महत्त्वाची स्थाने यात ददली आहेत. पुस्तकात ददले ल्या नकाशात स्थळाचे दठकाण सािारणपणे कळत असले तरी, इतर कुठल्या नकाशावर पाहताना ते दठकाण सापडणे वाचकास सोपे जावे म्हणून त्याचे अक्षांश रेखांश खालील सूचीत ददले आहेत. दठकाणािे नाव व प्रदे श

रेखांश

अक्षांश

अकलूज, महाराष्ट्र

17.894210

75.022627

अजमेर, राजस्थान

26.450786

74.635878

अफजलपूर, कनामटक

16.833679

75.676329

अहमदनगर, महाराष्ट्र

19.096157

74.755588

अहमदाबाद, गुजरात

23.024013

72.581180

आग्रा, उत्तरप्रदे श

27.179727

78.021080

आलापूर दरवाजा, तवजापूर

16.824825

75.739393

आलाहाबाद, उत्तरप्रदे श

25.429583

81.876225

उज्जैन, मध्यप्रदे श

23.178937

75.787607

उदयपूर, राजस्थान

24.583238

73.711905

औरंगाबाद, महाराष्ट्र

19.876357

75.344215

कमथानाह, बीदर, कनामटक

17.855598

77.450974

कणमपुरा, औरंगाबाद, महाराष्ट्र

19.866720

75.306847

कनामल, हरयाणा

29.685800

76.988474

कान्होरी, औरंगाबाद, महाराष्ट्र

20.090590

75.425666

काबुल, अफघाणीस्तान

34.556149

69.203873

कोंढाणा, महाराष्ट्र

18.365361

73.754877

कोताल, पातकस्तान

34.097475

71.142746

कोरेगाव भीमा, महाराष्ट्र

18.645484

74.059080

कोराम, उत्तरप्रदे श

26.102299

80.370793

कोल्हापूर, महाराष्ट्र

16.693330

74.222214

कोहात, पातकस्तान

33.592317

71.437833

खटाव, महाराष्ट्र

17.654049

74.361010

खवासपूर, महाराष्ट्र

17.498945

74.953816

खाजवा, फतेहपूर, उत्तरप्रदे श

26.054402

80.520215

खखज्राबाद, ददल्ली

28.572096

77.274558

खुल्दाबाद, महाराष्ट्र

20.005118

75.191411

पररलशष्टे

नकाशातील स्थळांची सूची

४५३

खेड राजगुरूनगर, महाराष्ट्र

18.854105

73.887318

खेळणा, महाराष्ट्र

16.906267

73.742776

खैबर खखिंड, पातकस्तान

34.094543

71.157144

गढमुक्तेश्वर, उत्तरप्रदे श

28.789267

78.082425

गलगला कुत्बाबाद, महाराष्ट्र

16.418858

75.438083

गुलबगाम, कनामटक

17.340242

76.831140

ग्वाल्हेर, मध्यप्रदे श

26.217746

78.183400

घाटमपूर, उत्तरप्रदे श

26.153572

80.166672

चंदन, महाराष्ट्र

17.838702

74.034838

चाकण, महाराष्ट्र

18.756901

73.862499

धचत्तोडगड, राजस्थान

24.884851

74.623179

जयपूर, राजस्थान

26.913463

75.790504

जलालाबाद, अफघाणीस्तान

34.429451

70.457811

जामरूद, पातकस्तान

34.001872

71.385390

तुडा, कहिंदौन, राजस्थान

26.917188

76.814296

तोरणा, महाराष्ट्र

18.276584

73.622549

ददल्ली

28.655738

77.241934

दीपलपूर, मध्यप्रदे श

22.851181

75.542968

दे बारीची खखिंड, उदयपूर, राजस्थान

24.605789

73.803313

दे वराई, अजमेर, राजस्थान

26.396571

74.619639

दे वापूर, महाराष्ट्र

16.435692

76.728091

िरमतपूर, मध्यप्रदे श

22.997894

75.647669

िौलपूर, राजस्थान

26.670034

77.902657

नांदतगरी, महाराष्ट्र

17.778669

74.126913

नूरमंजजल बाग, आग्रा, उत्तरप्रदे श

27.156387

77.983512

पन्हाळा, महाराष्ट्र

16.810980

74.108620

परळी, महाराष्ट्र

17.649355

73.911487

पुण,े महाराष्ट्र

18.518731

73.856637

पुष्कर, राजस्थान

26.487611

74.554198

फतेहपूर, उत्तरप्रदे श

27.097250

77.666214

फराहबक्ष बाग, अहमदनगर, महाराष्ट्र

19.068017

74.751899

बद्री, कनामटक

16.522537

75.459058

बऱ्हाणपूर, मध्यप्रदे श

21.314542

76.217928

बहादुरगड, महाराष्ट्र

18.509195

74.704863

बीदर, कनामटक

17.922500

77.526862

पररलशष्टे

नकाशातील स्थळांची सूची

४५४

ब्रह्मपुरी, महाराष्ट्र

17.559903

75.554521

भीमबार, पातकस्तान

32.973879

74.082078

भूषणगड, महाराष्ट्र

17.465246

74.406415

मंडल, राजस्थान

25.443778

74.571247

मल्कापूर, महाराष्ट्र

16.919630

73.932681

मासूर, महाराष्ट्र

17.399504

74.162901

धमरज मुतमजाबाद, महाराष्ट्र

16.819098

74.652921

मुखललसपूर, उत्तर प्रदे श

29.980591

77.498298

मुलतान, पातकस्तान

30.198584

71.473055

रसूलपूर, तवजापूर

16.828759

75.767474

राजगड, महाराष्ट्र

18.245914

73.682311

रामेश्वर, अजमेर, राजस्थान

26.282134

74.878015

रूपबास, राजस्थान

26.994117

77.592891

लाहोर, पातकस्तान

31.588121

74.314593

वंदन, महाराष्ट्र

17.847954

74.045331

वडगाव (पन्हाळा), महाराष्ट्र

16.834629

74.313646

विमनगड, महाराष्ट्र

17.725722

74.263678

वसंतगड, कराड, महाराष्ट्र

17.330678

74.104993

वागीनगेरा, महाराष्ट्र

16.525136

76.696263

तवजापूर, कनामटक

16.826014

75.719079

शम्साबाद, फरुम खाबाद, उत्तरप्रदे श

27.534189

79.438748

शालीमार बाग, ददल्ली

28.718158

77.150143

श्रीनगर, काश्मीर

34.070728

74.804386

सागर (शोरापूर), कनामटक

16.521559

76.758269

सातारा, महाराष्ट्र

17.672255

73.995816

सोरोन, उत्तरप्रदे श

27.886766

78.746449

सोलापूर, महाराष्ट्र

17.673826

75.901878

हसन अब्दल, पातकस्तान

33.823188

72.679539

कहिंदौन, राजस्थान

26.733314

77.034108

हैदराबाद, तेलंगणा

17.383685

78.401506

पररलशष्टे

संदभम सूची

४५५

िंदभव िूिी लघुरूप

िंदभव ग्रंथ

आ.ऑ.इं.मु.

The army of the Indian Mughals, William Irvine, प्रथम आवृत्ती,

१९०३ इं.ऑ.औ.

India of Aurangzeb, Jadunath Sarkar, प्रथम आवृत्ती, १९०१

ए.इ.

The Encyclopaedia of Islam, E.J.Brill, पुनमुमदद्रत आवृत्ती, १९८६

एच.एच.तव.

Glossary of judicial and revenue terms, H. H. Wilson, प्रथम

आवृत्ती, १८५५ ऐ.अ.

Ain-i-Akbari, H. Blochmann, पुनमुमदद्रत आवृत्ती, २००८

ऐ.श.

ऐततहालसक शब्दकोश, य.न.केळकर, दुसरी आवृत्ती, २००६

ऐ.शका.

ऐततहालसक शकावल्या, अतवनाश सोहनी, प्रथम आवृत्ती, १९९८

औ.ना.

औरंगजेबनामा, दे वीप्रसाद मुनशी, प्रथम आवृत्ती, १९०९

कुराण

The Holy Quran, Presidency of Islamic researches, Ifta

डं.फो.

A Dictionary Hindustani and English, Duncan Forbes, दुसरी

आवृत्ती, १८६६ तप.जं.

An Indian Ephemeris, Swamikannu Pillai, प्रथम आवृत्ती, १९२२

फा.म.को.

फाशी मराठी कोश, मािव पटविमन, दुसरी आवृत्ती, १९९७

म.आ.ज.स.

Maasir-i-Alamgiri, Jadunath Sarkar, सुिाररत आवृत्ती, १९४७

फासी पाठ

मआलसर-ए-आलमगीरी, साक़ी मुस्तैद खान, आघा अहमद अली, प्रथम आवृत्ती, १८७१

म.उ.ख.इ.

मराठे शाहीचा उत्तरकाळ आणण खटावकर इनामदार, ल. ब. इनामदार, हे. तव. इनामदार, प्रथम आवृत्ती, १९९१

म.रा.धच.ब.

मल्हार रामराव धचटणीस बखर, हेरवाडकर, प्रथम आवृत्ती, १९७२

मु.प्र.

Mughal Administration, जदुनाथ सरकार, ततसरी आवृत्ती, १९३५

श.वे.

शस्त्रवेि, तगररजा दुिाट, प्रथम आवृत्ती, २०१९

स्टा.

A Comprehensive Persian-English Dictionary, F. Steingass, पाचवी

आवृत्ती, १९६३ स्थ.ना.को.

स्थलनामकोश, बा.बा.करकरे, गो.बा.वैद्य, प्रथम आवृत्ती, १८९६